शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६

चित्रकवी - वसंत आबाजी डहाके ....



आता डोक्यात चंद्र घेऊन उभं राहायचं विठ्ठलासारखं,
कमरेवर हात ठेवून.
नाही तर विष्णूसारखं पडून
राहायचं पाण्यावर तरंगत.
चांदणं पाझरत राहील आत आत
सगळ्या नळ्यांमधून सावकाश.
आपलं शरीर इथं सापडतं
संतांना विठ्ठल सापडल्यासारखं.

‘टाटा मेमोरिअल हॉस्पिटल'मधून वावरताना कवी वसंत आबाजी डहाके यांना सुचेलेली ही कविता 'चित्रलपी' या काव्यसंग्रहातील आहे. या काव्यसंग्रहास साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता...

बुधवार, १० ऑगस्ट, २०१६

नावाची 'जन्म'कथा.....



घटना फार जुनी नाही. माझ्या एका मित्राला मुलगी झाली अन त्याने विचारले की माझ्या चिमुकल्या डिअर डॉटरसाठी काही नाव सुचवशील का ?
मी काहीच बोललो नाही मात्र थोडा विचारात पडलो. थोडा मागे भूतकाळात गेलो ….
खरे तर आजकालची नावे काहीशी क्लिष्ट, अगम्य, दुर्बोध तर असतातच पण त्यातलं मराठीपण हरवत चालले आहे. शिवाय भावंडांना हाक मारण्यासाठी दादा, ताई, अक्का, जिजी, माई, भाऊ अशी संबोधनेही वेगाने लोप पावताना दिसताहेत. आईबाबांच्या ऐवजी मॉम डयाडची ब्याद कमी होती की काय म्हणून ड्यूड, ब्रो, सिस, बेबी याचं फॅड सगळीकडे वाढलंय ! या आंग्लाळलेल्या संबोधनात भर घालण्याचे काम प्रेमीयुगुलंही नेटाने करताहेत. वानगीदाखल बोलायचे झाले तर काही मुली दिवसभरातून (चार वेगवेगळ्या) मित्रांना माझं पिलू, माझं कोकरू असल्या नावाने आळवत असतात. तर मुलंही मागे नसतात तेही अनेकींना एकाच वेळी सनम, जानम, जानू, पाखरू अशा नावांनी आळवत असतात. सखी आणि मित्रही हरवले आहेत. तिथे रुक्ष फ्रेंड आलेय.

मंगळवार, २ ऑगस्ट, २०१६

पुरुषी वासना आणि सखाराम बाईंडर......


पुरुषी विकार-वासना ह्या कधी प्रकट तर कधी अप्रकट स्वरुपात असतात. ह्या वासना कधीकधी पुरुषाचा कब्जा घेतात अन त्याच्या जीवनात रोज नवे नाट्य घडू लागते.
इतर लोकांना कधी बलात्कार वा अन्य अनैतिक बाबीतून हे नाट्य जाणवत राहतं. एखाद्या पुरुषाच्या मनात किती व कोणते वासना विकृती विकार असू शकतात किंवा तो वासनांचे शमन राजरोसपणे बायका ठेवून कसे करतो या बाबी समाजाच्या दृष्टीने नेहमीच औत्सुक्य विषय झाल्या आहेत !
मराठी रंगभूमीवर या अंतहीन पुरुषी वासनांचा वेध एका नाटकाने घेतला होता ते नाटक म्हणजे 'सखाराम बाईंडर'....त्याच्या अनुषंगाने या विकाराचा एक छोटासा धांडोळा...  

मराठी रंगभूमीने कात टाकली होती तेंव्हाच्या एका नाटकाची ही गोष्ट आहे. 
सत्तरचे दशक होते.
‘सखाराम बाईंडर’मधील सखारामचे काम निळू फुले करायचे.
यातील सखारामची एण्ट्री अंगावर काटा आणणारी अशी असायची.
सत्तरीच्या दशकात निळू फुुलेंनी त्यांच्या मुरब्बीपणाने व  इरसाल आवाजात केलेली ती संवादफेक अन त्यात घेतेलेले पॉझेस अगदी प्रेक्षकाचा कलेजा खलास करणारे होते. “हा राजाचा महाल नाही हे सखाराम बाईंडरचे घर आहे” अशी सुरुवात होऊन हा सखाराम प्रेक्षकाच्या डोळ्यातून मेंदूत उतरायचा. 
नाटक पुढं सरकत रहायचं. सखाराम आणि त्याच्या एकापाठोपाठ त्याच्या आठ बायका रंगमंचाचा नव्हे तर नाट्यगृहातील प्रेक्षकांचा ताबा घेत. त्याच्या घरात या सगळ्या बायका राहून मागे पुढे होत निघून जातात अन एक गेली की दुसरी असं चालत राही. लक्ष्मी ही त्याची सातवी आणि चंपा ही आठवी बायको !
ज्या ज्या वेळी घरात सखारामच्या घरात नवीन स्त्री येते किंवा आणली जाते तेव्हा तो तिला या घरात राहताना काय आहे, काय नाही, याची स्वच्छ शब्दांत कल्पना देतो.

सखाराम तिला सांगतो म्हणण्यापेक्षा सुनावतोच - "तोंड शिवराळ आहे. परिस्थिती जेमतेम, पण दोन वेळा खायला नक्की मिळेल. दोन पातळं सुरुवातीला, मग वर्षाला एक. ते पण भारी नाही. मग तक्रार चालणार नाही. घरात सगळं शिस्तशीर आणि बिनचूक करावं लागेल. गलथानपणा घडायला लागला की बाहेरची वाट. गय होणार नाही. नंतर दोष देता कामा नये. आपल्या घरात आपण राजे असतो. गावात जोड्याशी उभे न का करीनात, घर कसं घरासारखं हवं आपल्याला. काय?..."
नाटक पाहताना अडीच तास प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन राहायचा. नाटकाला तुफान व्यावसायिक यश मिळाले अन तितकीच वादग्रस्त लोकप्रियता देखील मिळाली. हे यश फक्त त्यातल्या निव्वळ भाषेमुळे, अभिनयामुळे नव्हते तर सखारामचे पुरुषीपण आणि त्याला शांतपणे आव्हान देणाऱ्या लक्ष्मीच्या बाईपणाची शरीर-भाषा यांचे होते. हे द्वंद्व नाटकाला अविस्मरणीय करून गेलं. वासना समजून घेण्यासाठी ही शरीर-भाषा सजगतेने पाहावी आणि ऐकावी लागते.

सखाराम बाईंडर हे विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले स्त्री-पुरुष संबंधांवरचे एक श्रेष्ठ नाटक. सखाराम बाईंडरमध्ये हाताळलेला स्फोटक विषय रसिकांपर्यंत पोहचविण्यास दिग्दर्शकाला कंबर कसूनच काम करावे लागते. निळू फुले, लालन सारंग या कलाकारांनी या नाटकाचा पहिला प्रयोग १९७२ केला होता. पुढे वाद-विवादांमुळे हे नाटक समाजात सतत गाजत राहिले. इंग्रजी भाषेतही याचे भाषांतर झाले. न्यूयॉर्क शहरातही  दीर्घकाळपर्यंत या नाटकाचे प्रयोग होत राहिले. 

नाटकाचा विषय असलेला बाईंडर वाईला राहायचा, खाणावळ चालवायचा. म्हणजे त्याने त्या वेळी ठेवलेली बाई ती खाणावळ चालवायची. तेंडुलकर या बाईंडराला भेटले होते. त्यांना तो चांगलाच लक्षात राहिला होता. तो तऱ्हेवाईक होता म्हणून नव्हे, तर तो 'खरा' होता, म्हणून. ते त्याच्याविषयी बोलायचे, विचार करायचे. या तुकडयातुकडयांतील विचारांतून ती व्यक्तिरेखा त्यांच्या मनात आकार घेत होती. एके दिवशी संध्याकाळी डॉ. श्रीराम लागू यांच्याशी बोलताना तेंडुलकरांना वाईचा हा बाईंडर आठवला. त्याच्याबद्दल लागूंशी बोलताना कल्पनेत असलेले, नसलेले अनेक तपशील स्पष्ट झाले. त्या बोलण्यातून 'सखाराम बाईंडर' ही व्यक्तिरेखा जन्माला आली. तो नाटकात बोलणार असलेली अनेक वाक्ये तेंडुलकरांना ऐकू येऊ लागली. 

त्याच रात्री तेंडुलकरांनी नाटकाचा पहिला अंक एकटाकी लिहून काढला. सखाराम बाईंडरमधे प्रमुख पात्राचं अगदी सुरवातीलाच भलंथोरलं स्वगत आहे. निळू फुल्यांच्या आवाजातलं हे स्वगत मेंदूला पोखरण्यास पुरेसं होतं. 'बाईंडर'चं नाट्य त्या स्वगतामध्ये नाही. नाटक पाहिल्यानंतर त्या सुरुवातीच्या स्वगताविषयी विचार केला, तर हे लक्षात येतं की त्या स्वगतात अर्थ नाही. म्हणजे, आपण कसे आहोत ह्याविषयी बाईंडरला जे वाटतं ते वेगळं आणि त्याच्या आयुष्यात आलेल्या बायका त्याचं जे काही करतात ते वेगळं. आणि हे कुणी समजावून सांगत नाही, तर आपलं आपण समजून घेतो. तेंडुलकरांच्या अनेक नाटकांमध्ये सुरूवातीला 'मी कोण' हे सांगणारी स्वगतं असतात. 'शांतता कोर्ट चालू आहे' मध्येही बेणारेबाई मी अमुक मी तमुक असं सांगते. अनेक पात्रं घटना सांगतात. पण ते काहीसं नैसर्गिक वाटावं म्हणून आख्ख्या नाटकालाच एका खोटया खोटया वाटणाऱ्या पण तरीही खरोखर समाजात चालणाऱ्या कोर्ट केेसचं स्वरूप दिलेलं आहे.

बाईंडरच्या आधी निळूभाऊंचे देखील फारसे नाव नव्हते. अभिनेता म्हणून प्रसिद्ध होण्यापूर्वी सुरवातीच्या काळात त्यांनी माळी म्हणून पुण्यातील एका मेडिकल कॉलेज मध्ये नोकरी केली होती. “कथा अकलेच्या कांद्याची” हे भाऊंचे पहिले नाटक. या नाटकाचे निळू भाऊंनी जवळ जवळ २००० प्रयोग केले. या नाटकामुळेच भाउंना त्यांचा पहिला सिनेमा “एक गाव बारा भानगडी” मिळाला होता. 'एक गाव बारा भानगडी'च्या झेलेअण्णांच्या भूमिकेनं त्यांना मराठी चित्रसृष्टीची कवाडं खुली झाली. त्यानंतर निळूभाऊंना 'सखाराम बाईंडर' नाटक मिळालं आणि या नाटकानं इतिहास घडवला. निळूभाऊंच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड असं या नाटकाचं वर्णन करावं लागेल. वास्तविक तेंडुलकर निळूभाऊंना 'सखाराम' पेलवेल का, याविषयी साशंक होते. मात्र, कमलाकर सारंग निळू फुलेंच्याच नावावर ठाम होते. त्यांनी तेंडुलकरांना 'कथा'चा प्रयोग दाखवला. त्यानंतर निळूभाऊंना हे काम मिळालं. 'बाईंडर' आणि त्याचा पुढचा सगळा इतिहास सर्वज्ञात आहे. या नाटकानं निळूभाऊंना आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव मिळवून दिलं. 'कथा अकलेच्या कांद्याची', 'सखाराम बाईंडर', 'सूर्यास्त', 'जंगली कबुतर' या सर्वाचे त्यांनी जवळपास दहा एक हजार प्रयोग केले. त्यातही 'कथा'चे दोनेक, 'जंगली कबूतर'चे दीडेक हजार, 'सखाराम'चे आठशे प्रयोग केले. 

'सखाराम बाईंडर’ या नाटकामध्ये निळूभाऊसोबत १९७२ मध्ये चंपाचे काम लालन सारंग यांनी असं काही साकारलं की त्यांचं सार्वजनिक जीवन ढवळून निघालं. हे त्यांचं पहिलं मराठी नाटक होतं. त्यात वेगळेपणाही होता अन्‌ भूमिका साकारण्यासाठी त्यांना स्वातंत्र्यही दिलं होतं. खरंतर ही भूमिका त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविरुद्ध होती. त्यांना स्वतःला त्या चंपाची भूमिका इतकी दर्जेदार करतील अन्‌ हे नाटक खूप गाजेल, विशेष म्हणजे हे नाटक इतिहास घडवेल होईल, असं कधीही वाटलं नव्हतं. मात्र ही भूमिका सगळ्याच दृष्टिकोनातून वेगळी ठरली. असो...बाईंडरची कथा हा या नाटकाचा प्राण होता... 

एका झोपडपट्टीत बाईंडर राहतो. तो आपल्या घरी बायका आणतो. अशा सात बायका त्यानं ठेवलेल्या असतात. त्यातल्या काही जणी निघून जातात, तर काहींना त्यानं सोडून दिलेलं असतं. या नाटकातील चंपा त्याची आठवी बायको असते. चंपा म्हणजे सखारामाच्या आयुष्यात आलेलं एक वादळच. त्यालाही चक्रावून टाकणारं. चंपा बिनधास्त आहे. बेफिकीर आहे. आपण आकर्षक आहोत, याचं तिला भान आहे. पुरुष आपल्याकडे आकृष्ट होतात हेही तिला ठाऊक आहे. तिनं जीवनातले बरेच अनुभव घेतले आहेत. 
नवरा नपुंसक असल्यानं तिनं त्याला सोडलं आहे. तीही गरज म्हणूनच सखारामाकडे आलेली असते. त्याच्या अटी ऐकूनही न ऐकल्यागत करते. अरेरावी करणारा, आक्रमक असणारा सखारामही चंपाचं वागणं पाहून अवाक होतो. सखाराम आणि दाऊद, दोघंही चंपावर भाळतात. 
सखारामाला शरीरसुख देण्यास ती नाखुष असते. डोक्यावर छप्पर हवं असेल, तर कोणत्यातरी पुरुषाला शरीर द्यावं लागणारच, या हिशोबानं दारू प्यायल्यानंतरच ती सखारामच्या अधीन होते. खरं तर ती तिच्या पहिल्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून सखारामच्या आश्रयाला आलेली असते. ती तिथ मुक्तपणे जगण्यासाठी धडपड करते. चंपावर फिदा झालेला बाईंडर तिला आपल्या घरी कायमचे 'ठेवतो'. ती घरात येताच त्याची आधीची बाई लक्ष्मी घरी परत येते.

ही लक्ष्मी सुरुवातीला सदाचरणी, भाबडी, सहृदय आहे. तिला मूलबाळ नाही, आणि म्हणून पहिल्या नवऱ्यानं तिला टाकलं आहे. सासरी आणि माहेरी तिला कोणी विचारत नाही. जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. ती देवावर उत्कट प्रेम करते. देवानं निर्माण केलेल्या जीवांवरही प्रेम करते. कावळा, मुंगी-मुंगळ्याशी बोलते. त्यांना खायला देते. ती घरात आल्यापासून देवपूजा, निरांजन लावणं वगैरे गोष्टी गृहिणीप्रमाणे करत असते. आपण गरजू असल्यानं सखारामाकडे राहायला आलो आहोत, याची तिला जाणीव असते. पण त्याचबरोबर आपली व्यक्तिगत जीवनमूल्यं, निष्ठा जपण्याचाही ती प्रयत्न करत असते. गणपतीच्या आरतीला सखारामाचा मित्र असलेला दाऊद तिला नको असतो. हे सारं सखारामाच्या जगण्याला, दृष्टिकोनाला छेद देणारं आहे. सखाराम तिच्यात गुंततो आहे, असं वाटत असतानाच तो तिला हाकलून देतो. लक्ष्मी आपल्या पुतण्याकडे राहायला जाते. मात्र चंपा सखारामच्या घरी येताच तीही तिथं परतते.  

सखारामाच्या घरी परतल्यावर लक्ष्मीला आधी चंपाचा सामना करावा लागतो. 
'चंपा सखारामाच्या शारीरिक मागण्या पुर्‍या करत राहील आणि लक्ष्मी घरातली पडतील ती कामं विनातक्रार करेल', या अटीवर चंपा लक्ष्मीला निवारा देते. 
खरं तर दोघींचे हितसंबंध परस्परविरोधी आहेत. बर्‍यावाईटाच्या दोघींच्या व्याख्याही अगदीच विरुद्ध आहेत. चंपाला सखारामबद्दल अजिबात प्रेम नाही. त्याच्याशी शरीरसंबंधही ती दारू प्यायल्यावरच ठेवू शकते. तिला सखारामाचा केवळ आसरा हवा आहे. लक्ष्मी मात्र सखारामबद्दल सकारात्मक  आहे. पण तरीही चंपा लक्ष्मीचा स्वीकार करून तिला घरात घेते.
लक्ष्मीनं घरात राहणं सखारामाला अजिबात मंजूर नाही. पण चंपापुढे त्याचं काही चालत नाही. लक्ष्मीच्या येण्यानं सखारामामध्ये हळूहळू बदल होत जातो. 
तिला, तिच्या देवांना तो घाबरू लागतो. चंपाशी संबंध ठेवण्यासही तो घाबरू लागतो. चंपा दाऊदशी संधान बांधते. चंपाचे हे बाह्यसंबंधच तिच्या जीवावर येतात. लक्ष्मी सखारामला सावध करू पाहते पण यातच तिच्या हातून चंपाचा खून होतो.    

प्रेमळ असणारी लक्ष्मी शेवटी चंपाचा आपल्या हातून झालेला खून थंडपणे पाहते. चंपा मेल्यावर तिला आनंद होतो. तिचं प्रेत पुरायला ती लगेच जमीन खणू लागते. इतकी क्रूरता तिच्या अंगी कुठून येते? 
लक्ष्मी अशिक्षित आहे. कर्मठ, सनातनी आहे. पहिल्या नवर्‍यानं घरातून हाकलून दिल्यावर सखाराम हाच लक्ष्मीच्या दृष्टीनं तिचा पती. तिचं त्याच्यावर प्रेम आहे आणि अशा आपल्या नवर्‍याच्या घरात आपलं स्थान बळकावून आलेली चंपा, दाऊदासारख्या ’मुसलमाना’बरोबर अनैतिक संबंध ठेवते? 
प्रत्यक्ष देवाशी बेईमानी! 
चंपाच्या या कृत्याला लक्ष्मीच्या जगात क्षमा नाही. 
लक्ष्मी धूर्त आहे. असुरक्षिततेचा भयगंड तिला ग्रासतो आहेच. अशा तणावाच्या अवस्थेत ती ते गुपित सखारामाला सांगते. स्वत:च्या बचावासाठी पशू असाच प्राणांतिक झुंज देतो. 
चंपाचा खून झाल्यावर तिची प्रतिक्रिया : "नाही तरी पापीच होती ती, नरकात जाईल'. तिच्या हिशेबी या बेईमानीला हीच शिक्षा." 
आता पोलादी, कणखर सखाराम हातून पाप घडल्याची जाणीव झाल्यावर संपतो. पार निर्जीव होतो. आणि आतापर्यंत मार खाऊन निर्जीव झालेली लक्ष्मी आपल्या कुंकवाच्या रक्षणासाठी चंपाच्या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी प्रचंड ताकदीने, धैर्याने उभी राहते.

नाटकाच्या शेवटी सखाराम पूर्णपणे पराभूत होतो. मात्र चंपाला मारून मिळवलं काय? रागाच्या भरात चंपाचा खून होतो खरा पण चंपाच्या खुनानंतर लक्ष्मी त्याचा ताबा घेते आणि मनानं, शरीरानं तो सपशेल खचून जातो. 
कावळ्याशी, मुंगळ्याशी बोलणारी लक्ष्मी, त्याची मारझोड सहन करणारी लक्ष्मी आता त्याचा खरडून खरडून होणारा अंत शांतपणे बघते. आपली चूक झाल्याची त्याला कल्पना येते पण आता हताश होण्यापलीकडे त्याच्या हाती काहीच नाहीये.  

'बाईंडर'मधली सखारामची भुमिका जितकी महत्वाची आहे तितकीच महत्वाची भूमिका चंपाची आहे. या भूमिकेच्या मागणीनुसार त्यासाठी लालन सारंगना गावरान अन्‌ शिवराळ भाषा शिकावी लागली. अशा प्रकारची भूमिका यापूर्वी त्यांनी कधीच केली नसूनही ही भूमिका त्या अक्षरशः जगल्या. 

नाटकाचे जेव्हा राज्यभरात प्रयोग सुरु झाले तेंव्हा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला अन तितकेच तथाकथित संस्कृतीरक्षकांचे अरण्य रुदन वाढू लागले. कल्याणच्या साहित्य संमेलनात रणजित देसाईंनी या नाटकावर बहिष्काराचा ठराव मांडला. प्रस्तावावर एका शब्दाची चर्चा न होता केवळ आवाजी मतदानाने या नाटकावर बंदी घालण्याची मागणी मराठीतील थोर साहित्यिकांनी केली. मजा म्हणजे त्यांपैकी अनेकांनी हे नाटक बघितलंच नव्हतं. नाटकाचे तेरा प्रयोग झाल्यानंतर सेन्सॉरने या नाटकावर बंदी आणली. 
ज्या काळात रंगभूमीला अतिशय पवित्र मानलं जायचं त्या काळात अखेर पडती भूमिका घेऊन सेन्सॉरला हे नाटक बंद करणं भाग केलं गेलं. 
अर्थातच हे आंदोलन शिवसेनेनं  केलं होतं. 
राज्यभरात अनेक वाद झाले, न्यायालयात खटले दाखल केले गेले. तेव्हा लालन सारंग यांचे पती कमलाकर सारंग जे या नाटकाचे दिग्दर्शकदेखील होते त्यांनी न्यायालयीन लढा दिला. हा लढा सहा महिने सुरू होता. 
त्याच दरम्यान इतर नाटके 'बाईंडर'पायी सोडून दिल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती गुंतागुंतीची झाली असूनही लालन 'बाईंडर' मधून बाहेर पडल्या नाहीत हे विशेष.मात्र या लन्यायालयीन लढ्याला यश आलं. 'सखाराम बाइंडर'चे प्रयोग पूर्ववत सुरू झाले असे वाटत असतानाच, शिवसेनेने झुंडशाहीच्या जोरावर काही प्रयोग बंद पाडले. 
शेवटी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून हे नाटक 'संमत'(!) करून घेतल्यावरच पुढचे प्रयोग होऊ शकले. हा सगळा त्रास सहन केल्यानंतरच त्यातून धडा घेत लालन सारंग व कमलाकर सारंग यांनी मिळून ‘कलारंग’ ही संस्था स्थापन केली. त्यानंतर त्यांनी अनेक नाटकं रंगभूमीवर आणली. अनेक नाटकं गाजलीही. त्यात ‘बेबी’, ‘कमला’, ‘पोलिसनामा’, ‘जंगली कबुतर’ यांसह अनेक नाटकांचा समावेश होतो. 
'बाईंडर'मधल्या कुठल्याच कलावंताने पैसा हे कधीच इप्सित मानले नाही त्यामुळेच की काय बाईंडरमधल्या कुठल्याच कलावंताला कधी कामाची ददात पडली नाही. या नाटकाचा हा सर्व भन्नाट प्रवास कमलाकर सारंग यांनी 'बाईंडरचे दिवस' या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे.

तेंडुलकरांच्या ‘गिधाडे’ आणि ‘सखाराम बाईंडर’ नी मराठी मध्यमवर्गीय माणसाची मूल्यचौकटच मोडून टाकली. त्यांनी ‘लग्न’ या सामाजिक संस्थेलाच प्रश्नांकित केले. सखाराम बाईंडरचे तत्त्वज्ञान हे ‘लग्न’ या संस्थेसंबंधी चिरकालीनत्वाच्या सामाजिक समजाला छेद देणारे तत्त्वज्ञान आहे. मध्यमवर्गीय माणसाच्या आवाक्यापलीकडचं जग तेंडुलकरांनी या नाटकाच्या निमित्तानं मध्यमवर्गीय माणसाच्या जाणिवेत आणून सोडले. मराठी नाट्यपरंपरेला अपरिचित असलेलं जग तेंडुलकरांनी मराठी रसिकाच्या जाणीवेत आणले याला त्यांची प्रायोगिकता म्हणता येईलच, परंतु परंपरेला माहीत असलेला ऐवजही तेंडुलकरांनी प्रायोगिक केला. ज्या नाटकाने तेंडुलकरांना भारतीय स्तरावर नाटककार म्हणून मान्यता मिळवून दिली, ते नाटक म्हणजे ‘घाशीराम कोतवाल’. मराठी रंगभूमीच्या इतिहासाला वळण देणारे हे अनैतिहासिक नाटक होते. लोकसंगीत हा ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचा आत्मा आहे. कीर्तन, तमाशा, लावणी, मुजरा आदी लोककलांच्या वापरातून या नाटकाने हे दर्शवून दिले की, लोकनाट्य आणि वास्तववादी नाटकाच्या सरमिसळीतून समकालीन नाट्य घाटाची निर्मिती होऊ शकते. या नाटकाने हे देखील दर्शवून दिले की, ऐतिहासिक ऐवजातून अनैतिहासिक नाटक घडविता येते. या नाटकातून उपहास, विनोद, हिंसा आणि करुणा यांचा एकत्रित प्रत्यय येतो. लोकरंगभूमीच्या वैशिष्ट्यांचा प्रभावी वापर करणारे ते आधुनिक संवेदनांचे नाटक आहे. लोकरंंगभूमीवरील लवचिकता, ऊर्जा आणि कल्पकता यांचा वापर करून आधुनिक आशय मांडण्यात हे नाटक यशस्वी ठरले आहे. म्हणून हे नाटक मराठी प्रायोगिक रंगभूमीवरील मैलाचा दगड ठरलेे. घाशीरामने पुण्यातील ब्राम्हणी संस्कृतीवर हल्ला केला असे ब्राम्हणांचे म्हणणे तर सखारामने नवी नैतिक अधोगतीची पातळी (हिला खालची सीमा नसते बहुतेक, कारण कितीही पडली तरीही तिला परत अजून खाली पडायला जागा उरलेली असते) गाठली असे काहींचे म्हणणे. दोन्हीही नाटकात स्त्रीपात्रे अगदी पॉवरफुल होती आणि माणसाच्या (पुरुषांच्या?) कामुकतेचे बहुतेक सर्वांना पटणारे दर्शन त्यात होते.  घाशीराम मधली गौरी आणि बाईंडर मधल्या लक्ष्मी आणि चंपी, त्याचप्रमाणे बाईंडरची कामुकता बेडरपणा, आणि नाना फडणविसाचे "ते तुम्ही म्हणजे आम्हाला दुसऱ्याच्या मुलींसारख्या" उद्गार अगदी अंगावर काटा आणतात आणि विचार करायला लावतात, की माझ्यात पण एक बाईंडर आणि नाना आहे का? 
मी असा विचार करू आणि वागू शकतो का? 
कामुकता आणि हिंसाचार अंगावर सर्र्कन्न काटा आणणारा आणि वाचल्यानंतर/ नाटक बघून महिने झाले तरी चटका लावणारे. हे असले लिखाण सोपे नाही किंबहुना अशक्यच आहे. अनंत वेलणकरची तो भीषण मानसिक कुतरओढ, तो त्याचा जमादार बाप आणि शेट्टी आणि त्याचे हसणे. हे राम! 

अर्थात बाईंडर गाजले ते लालन सारंग कशी स्टेजवर लुगडे बदलते, आणि सखारामच्या शिव्या आणि त्याच्या मित्र्याशी "पक्षी" ह्या अर्थाने बायकांचा उल्लेख करून केलेली चर्चा ह्या असल्या गोष्टींमुळे गाजला. 
तर घाशीराम त्यात ब्राह्मणांवर टीका आहे त्यामुळे जास्त वादग्रस्त ठरला, नाना फडणवीस हे असे  नव्हतेच असा प्रतिवाद केला गेला. 
असल्या टीकेमुळे आणि दोन्ही नाटकांवरच्या बंदीमुळे गाजली. सध्याच्या काळात चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी मुद्दाम कॉंट्रोव्हर्शीयल गोष्टी आणि रिएलिटीमधला विटून गेलेला मसाला घातलेला असतो. विविध खानांच्या माकडचाळयांपेक्षा अन चिंधीभर कपडे अंगावर घालून पडद्यावर मिरवणाऱ्या  बाजारू अभिनेत्र्यांच्या हिडीसपणापेक्षा तो काळ कलात्मकदृष्ट्या निश्चितच उजवा होता. मात्र दुर्दैव असं की अशा नाटकांना रंगभूमीवरचं आगमन सुसह्य व्हावं म्हणून स्थापन झालेली 'थियेटर अकेडमी' पुढे जाऊन बंद पडली, काही लोकांनी त्यात बराच आर्थिक तोटा सोसला. त्यापैकीच एक धगधगत्या प्रतिभेचे ज्वालाग्राही लेखन करणारे तेंडुलकर होते. पुढील काळात त्यांना आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय लोकमान्यता मिळाली. महाराष्ट्राचे सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून काढून, देशाच्या रंगभूमी आणि कला ह्या प्रांतात मराठी कलेला अटकेपार घेऊन जाण्याचे काम या दोन्ही तेंडुलकरी नाटकानीच केलं होतं.

मराठी रंगभूमीवर प्रायोगिकतेचे पितृत्व विजय तेंडुलकरांना सार्थपणे बहाल केले जाते. त्यांनी मराठी रंगभूमीवर प्रायोगिक नाटकांची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी मराठी रंगभूमीवर एक नवी रंग-परंपरा निर्माण केली. समाजातील सुप्त स्वरूपाची हिंसा आणि लैंगिकता त्यांनी रंगभूमीच्या चव्हाट्यावर मांडली. त्यांना विरोध पत्करावा लागला. अपमान सहन करावे लागले. त्यांच्या नाटकांनी अनेक विवाद निर्माण केले. परंपरावाद्यांनी तेंडुलकरांना नेहमीच असहिष्णूपणे वागवले. पण ते डगमगले नाहीत. त्यांनी व्यवस्थेसमोर शरणागती पत्करली नाही. त्यांच्या वृत्तीप्रवृत्तीला मानवेल तेच आणि तसेच ते लिहीत राहिलेत. नभोनाट्य, एकांकिका, निमव्यावसायिक नाटक आणि काही प्रमाणात व्यावसायिक नाटक असा तेंडुलकरांच्या नाट्यलेखनाचा जवळ जवळ पाच दशकांचा कालखंड आहे. परंतु नाटक कुठल्याही वर्गातले असले तरी प्रत्येक नाटकातून तेंडुलकरांची प्रायोगिकताच प्रकर्षाने जाणवली. पारंपरिकरीत्या जे मराठी रंगभूमीवर दाखवले जात होते ते सारेच त्यांनी नाकारले. त्यांनी नव्यानव्या विषयांना हात घातला आणि नाटकासारखे कृतिप्रधान माध्यम आशयगर्भ केले.

कमीत कमी शब्द, कोर्‍या जागा, टिंबांचा विपुल वापर आणि विरामचिन्हें यातून तेंडुलकरांनी एका वेगळ्याच रंगभाषेची निर्मिती केली. त्यांनी नाटकातून कधीच गोष्ट सांगितली नाही. त्यांच्या नाटकांनी नेहमीच अंतर्मुख करणारा नाट्यानुभव दिला. ते आरंभापासूनच प्रयोगशील राहिले. मध्यमवर्गीय जीवनातील वासनेची, हिंसाचाराची, त्यातून येणार्‍या उद्ध्वस्ततेची गाज त्यांच्या नाटकांतून ऐकू येत राहिली. माणसाला येणार्‍या एकाकीपणाचे भकास-विदीर्ण अनुभव त्यांच्या नाटकांतून अत्यंत प्रभावीपणे व्यक्त होत राहिले. पन्नास वर्षे ते सातत्याने नाटकाच्या रचनेत विविधांगी प्रयोग करीत राहिले. त्यांच्या नाटकांची सर्व भारतीय भाषांत भाषांतरे झालीत. देशभरात त्यांच्या विविध नाटकांचे प्रयोग सातत्याने झालेत. देशातील महत्त्वाच्या रंगकर्मींना तेंडुलकरी नाटक नेहमीच मोह घालीत राहिले. ते केवळ मराठी रंगभूमीवरचे महत्त्वाचे नाटककार नाहीत, तर भारतीय रंगभूमीवरचे अतिशय महत्वाचे नाटककार आहेत. माणसाच्या मनातील आदिम भाव-भावनांचा शोध तेंडुलकरी नाटक सातत्याने आणि अथकपणे पन्नास वर्षे घेत राहिले. त्यांच्या नाटकातील अनुभवांच्या पृथगात्मतेमुळेच त्यांना मळलेली वाट नाकारावी लागली. परंतु त्यामुळे मराठी रंगभूमीवर एक वेगळी वाट निर्माण झाली. याच वाटेवर तेंडुलकरोत्तरी प्रायोगिक नाटक निर्माण झाले आणि बहरलेही.

यंदाच्या दोन फेब्रुवारीला 'सखाराम बाईंडर'ची पन्नास वर्षे पूर्ण झाली . 'सखाराम...' च्या पहिल्या तीन आवृत्त्या कमलाकर सारंग यांनी १९७२ ते १९९५ पर्यंत रंगमंचावर सादर केल्या. हे नाटक पहिल्यांदा वाचल्यानंतर डॉ. श्रीराम लागू आणि अरविंद देशपांडे यांनी त्याचं दिग्दर्शन करण्याची इच्छा तेंडुलकरांकडे व्यक्त केली होती. कमलाकर सारंग तर ते नाटक अगदी आपल्याचसाठी असल्याचा हट्ट तेंडुलकरांकडे करून बसले होते. शेवटी तेंडुलकर, डॉं.लागू आणि देशपांडे यांना म्हणाले की, 'सारंग व्यावसायिक रंगभूमीवर नवा असला तरीही मी हे नाटक त्याला दिलं आहे. तो करणार नसेल तरच तुम्ही ते करा.' या नाटकाचा इतिहास सारंगच्या हातूनच घडावा ही निर्मिकाची इच्छा असावी. तेंडुलकर लोकनिंदेत होरपळलेले, तर लालन आणि कमलाकर सारंग मानसिक, आर्थिक त्रासाने त्रस्त होते. पण यांच्यापैकी कोणीही डगमगलं नाही आणि नाटकाचे प्रयोग अनेक अडथळे पार करत होतच राहिले. या संचांनंतरही पुढच्या दशकात प्रयोग होतच राहिले. अनेक नाट्यसंस्थांना याची भुरळ पडली. विविध संस्थांकडून प्रयोग होतच राहिले; पण त्याची दाहकता संपली होती. पहिल्या शिल्पाची दाहकता सहन करणारे जवळजवळ सगळेच आज हयात नाहीत. मात्र आजही मराठी नाट्यरसिक बाईंडरच्या आठवणीने भरून पावतो.

यातील सखाराम हा पुरुषी वासना विकृतीचं शिसारी आणणारं प्रतिक आहे, जोवर पुरुषी विकृत वासना विकार असतील तोवर सखाराम असणार आहे. आयुष्याच्या कोणत्या न कोणत्या वळणावर या वासना पुरुषाच्या मनाचा ताबा घेतातच. मध्यमवर्गी पांढरपेशी माणूस हे सत्य कधीच स्वीकारत नाही, तो दांभिकपणे तो आपला 'विश्वामित्री' पवित्रा सुरूच ठेवतो. सखारामसारखे काही पुरुष आपल्या वासना खुल्लेपणाने बायका ठेवून शमवत राहतात तर बहुतंशी पुरुष वासनेमुळे हिंसेच्या आहारी जातात. घरच्या बायकांना मारणे, कार्यालयातील सहकारी महिलेचा छळ करणे, सार्वजनिक ठिकाणी केवळ नजरेने स्त्रियांचे शोषण करणे, गरिबी आणि अडचणी याच्या दैन्यचक्रात अडकलेल्या महिला तर सर्वात सॉफ्ट टारगेट ठरतात, लहान बालिकांपासून ते जरठ वृद्धेपर्यंत यांच्या तावडीतून कुणीच सुटू शकत नाही. वासनापासून दूर पळून गेलेले देखील कुठल्या न कुठल्या मार्गे वासनांचे शमन करताना आढळतात. पुरुषांची लैंगिक अतृप्तता अन लैंगिक हिंसा जेंव्हा सर्व सीमा पार करते तेंव्हा त्या पुरुषाचा अंत समीप येतोच. मात्र हे सर्व सहन करणारी स्त्री जोवर पुरुषाला आव्हान देत नाही, त्याच्या समोर उभी ठाकत नाही तोवर ती पिचलेली राहते, तिचे स्थान दुय्यमच राहते.पुरुषी वासनांचे अंतरंग असे ढवळून काढून गेलेल्या सखाराम बाईंडरसारख्या नव्या कलाकृती जोवर लिहिल्या,वाचल्या, पाहिल्या जात नाहीत अन त्यावर साधक बाधक खुली चर्चा होऊन ह्या नागड्या गोष्टीवर मनमोकळे संवाद होत नाहीत तोवर ही पुरुषी वासनांध श्वापदे असहाय स्त्रियांचा छळ करत राहणार हे स्पष्ट आहे. कारण या पुरुषी विकार वासनांना माझ्या मते तर अंत नाही कारण त्या मानवी मनाचा एक भाग आहेत म्हणूनच सखाराम अमर आहे.....

- समीर गायकवाड.

संदर्भ - 'बाईंडरचे दिवस' : लेखन - कमलाकर सारंग 

शुक्रवार, २९ जुलै, २०१६

चिंगारी 'अमरप्रेम'मधली ....



काळोख्या रात्री हेलकावे खात चाललेली नाव. नावेवर प्रत्येक क्षणाला आदळणाऱ्या लाटा आणि त्यांचा सपासप आवाज. नावेच्या पुढच्या टोकाला धूसर दिसणारा नावाडी आहे जो एका संथ लयीत वल्ही मारतोय. नावेवरच्या शाकारलेल्या झोपडीत पाठमोरी बसलेली आहे, ती पुष्पा ! डोईजवळच्या हलत्या कंदीलाच्या फिकट पिवळसर उजेडात ती अगदी दिलखुलास सुरेख दिसतेय, अगदी मन लट्टू व्हावे अशी दिसत्येय ती. आनंदी रंगाची निळ्या झाकेतली साडी तिला खूपच खुलून दिसत्येय. फिकट निळ्या रंगाचे किंचित आवळ पोलके घालून बसलेल्या पुष्पाने हातात गच्च भरलेल्या जर्दनिळ्या बांगड्या, गळ्यात सोन्याचे सर आणि कानात हलणारे गोलाकार झुबे घातलेत ! कपाळावर ठळक मोठा गोलाकार गंध. नाकात सोन्याची लखलखती मोरणी...खरे तर तिच्या गालावर पडणाऱ्या खळ्यांनीच माणूस घायाळ व्हावा आणि तिच्या मासोळी डोळ्यात सदा पाझरणारे स्नेहाचे भाव बघून पुन्हा जीवित व्हावा !...

मंगळवार, २६ जुलै, २०१६

मराठी साहित्यातला 'नाम'महिमा .....



आयुष्यात सर्वप्रथम अक्षरं डोक्यात शिरली ती बाराखडीतून. आज बाराखडी क्रमानुसार कितीजणांना म्हणता येते ते सांगता येणार नाही मात्र त्यातील काही अक्षरांनी केलेली जादू दिगंतापर्यंत टिकून राहणारी असेल हे निश्चित. तर या बाराखडीतील अक्षरे कित्येक लेखक - कवींच्या नावात प्रवेशकर्ती झाली अन त्या अक्षरांची एक जोडीच बनून गेली. मराठी साहित्यातील काही नावं त्यांच्या अद्याक्षरातच इतकी सवयीची होऊन जातात की त्यांच्या उच्चारणात एक गोडी निर्माण होते अन त्या नावाशी आपसूक भावनिक नाते तयार होते. अशी अनेक नावं वानगीदाखल सांगता येतील. ग.दि.माडगुळकर (आपण तर थेट गदिमाच म्हणतो की नै !) , पु.ल.देशपांडे (हे असं इतकं मोठ्ठ नाव घेण्याऐवजी आपल्याला पुलं जास्त जवळचं वाटतं होय ना ?), वि. स.खांडेकर (यांना तर आपण विसं या नावानेच आणखी शॉर्ट केलं आहे) , व.पु.काळे (पूर्ण नावाचा इथं पुन्हा कंटाळा वर भरीस आणखी लघु रूप - फक्त वपु !), गोविंद विनायक उर्फ विंदा करंदीकर (इथंही विंदा असं सहजरूपच जास्त रसिकप्रिय). 

मंगळवार, १९ जुलै, २०१६

निरभ्र ......



बिगारी कामगाराने जशी ठराविक वेळेची ड्युटी करावी, वेळेवर यावे वेळेवर निघून जावे तसे मान्सूनचे असते. तो ठराविक वेळेस येतो, मर्जीनुसार पडतो आणि निघूनही जातो. त्यानंतर बऱ्याच काळाने कावराबावरा झालेला एक अवकाळी पाऊस मान्सून घरी सुखरूप पोहोचल्याची वार्ता घेऊन येतो, पोस्टमनने घरोघरी पत्रे वाटावीत तसा सगळीकडे हा पाऊसनिरोप तो पोहोच करतो. कधी कधी या निरोप्या पावसासोबत अंगात वारं भरलेली चहाटळ वावटळही येते. लोक म्हणतत अवकाळी पाऊसवारं आलं. मला तसं वाटत नाही. यात माणसाचा थेंबमात्र संबंध नसतो, ही सगळी निसर्गाची भाषा असते. ज्याची त्याला कळते. माणूस उगाच लुडबुड करतो, नाक खुपसतो. खरंतर इतर कुठलाही प्राणी निसर्गाशी खेळत नाही पण माणसाला भारी खोड. असो....

शनिवार, १६ जुलै, २०१६

बैलगाडीच्या रम्य वाटा .......



बैलगाडीच्या वाटा म्हणजे गाडीवानाच्या मनावरचे एक गारुड असते, या वाटा म्हणजे बैल आणि माती यांच्या अबोल नात्याचे अस्सल प्रतिक असतात. फुफुटयाने भरलेल्या मातकट रस्त्यावरून जाताना बैल माती हुंगत चालतात अन त्यांच्या तोंडातून गळणारी लाळेची तार मातीत विरघळत जाते. बैलांच्या गळ्यात बांधलेल्या घुंगराच्या आवाजावर वाटेच्या दुतर्फा असणारी पिवळी रानफुले मस्त डुलत असतात तर गाडीच्या एका लयीत येणारया आवाजावर आजूबाजूची दगडफुले अन मातकट झालेली पाने धुंद होऊन जातात. सारया रस्त्याने बैल खाली वाकून मातीशी हितगुज करत असतात अन माती मुक्याने त्यांच्याशी बोलत बोलत बैलांच्या दमलेल्या थकलेल्या खुरांना मातीने न्हाऊ घालते, मातीनेच मालिश करते, बैलांचे पाय जितके मातकट होतात तितके त्यांचे श्रम हलके होतात . रस्त्याने जाताना ओझे ओढणारे बैल त्यांच्या वाड वडलांचे क्षेम कुशल तर मातीला विचारत नसावेत ना ? हा प्रश्न माझ्या डोळ्यात हलकेच पाणी आणून जातो....

शुक्रवार, १ जुलै, २०१६

अनुवादित कविता - जेहरा निगाह : पाकिस्तान, उर्दू कविता



आई मी बचावलेय गं,
तुझ्या रक्ताच्या मेंदीने माझ्या अस्तित्वाचा प्रत्येक अणूरेणू रंगलेला होता गं !

मला तू पूर्णत्वास येऊ द्यायला पाहिजे होतं,
माझं प्रत्येक अंग रक्ताने अजूनही भरलं गेलं असतं.
माझ्या डोळ्यांना प्रकाशकिरणांनी शिवण्याआधी
काजळाने रेखांकीत केलं असतं.
सट्टा बट्टा करावा तसं मला दिलं घेतलं असतं,
वा ऑनर किलिंगसाठी मी कामी आले असते !

मात्र आता हरेक स्वप्नं अधुरीच राहिलीत ..
मी थोडी मोठी झाली असती तर माझ्या वडिलांचा लौकिक घटला असता,
माझी ओढणी थोडी जरी घसरली असती तर
माझ्या भावाच्या पगडीच्या गर्वाला धक्का बसला असता.
पण तुझी मधुर अंगाई ऐकण्याआधीच,
माझ्या न जन्मलेल्या चिरनिद्रेच्या मी अधीन झाले.
आई, मी एका अज्ञात प्रदेशातून आले होते आणि
आता एका अज्ञात प्रदेशात हरवतेय.
आई मी बचावलेय गं, आई मी बचावलेय गं
तुझ्या रक्ताच्या मेंदीने माझ्या अस्तित्वाचा प्रत्येक अणूरेणू रंगलेला होता गं !

रेड लाईट डायरीज - 'रेड लाईट एरिया'तल्या मातीमोल मौती ....



काही महिन्यांपूर्वी कामाठीपुऱ्यातील एका प्रौढ वेश्येच्या करुण मृत्यूवर एक पोस्ट लिहिली होती. कालपरवा तिच्या मुलींबद्दलची माहिती मिळाली..
ती माहिती ऐकून वाटले की हे पहायला वा ऐकायला 'ती' आज हयात नाही हे बरे झाले कारण या घटनेने ती रोज तीळतीळ तुटत राहिली असती अन खंगून खंगून मेली असती...

ही सत्यघटना आहे मुमताजची..
एका अभागी आईची, एका दुर्दैवी बहिणीची अन भारतमातेच्या एका निष्पाप मुलीची, कस्पटासमान जगून कुत्र्याच्या मौतीने मेलेल्या एका संवेदनशील स्त्रीची..

आपल्या देशात रोज लाखोने माणसे मारतात त्यामुळे कोण कुणासाठी मेले याचा विचार सर्वांनी करावा असं म्हणणे वस्तुस्थितीला धरून होणार नाही. मात्र काहींच्या जीवनाला जशी झळाळी असते तसाच त्यांच्या मृत्यूलाही उजाळा असतो तर काहींच्या जन्मभरातला अंधार मृत्यूपश्चात देखील त्यांचा पाठलाग करत राहतो.

मरणारी व्यक्ती वर गेल्यावरदेखील कधी कधी तिचे कवीत्व दीर्घकाळ सुरु असते तर काही अभागी असेही असतात की मृत व्यक्तीच्या आसपासचे लोक त्या दुःखद वेळीही शय्यासोबतीत मश्गुल असतात !

रविवार, १९ जून, २०१६

शिवसेना - वाघाची पन्नाशी ! - एक आलेख ....



५ जून १९६६च्या मार्मिकच्या अंकात एक आवाहन छापून आले होते. "यंडुगुंडूंचे मराठी माणसाच्या हक्कांवरील आक्रमण परतवून लावण्यासाठी शिवसेनेची लवकरच नोंदणी सुरू होणार ! विशेष माहितीसाठी ‘मार्मिक’चा पुढील अंक पाहा !"१९ जून १९६६ ला 'मार्मिक'चा पुढचा अंक आला आणि त्यातील आवाहन वाचून मुंबईकर भारावून गेला त्याने तुफान प्रतिसाद दिला ! नोंदणीचे २ हजार तक्ते अवघ्या तासाभरात संपले ! प्रबोधनकार ठाकरे यांनी नाव दिलेल्या ‘शिवसेना’ या चार अक्षरी मंत्राची रीतसर स्थापना झाली. 'मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा' या वचनाप्रमाणे मराठी माणसाच्या हक्कासाठी म्हणून शिवसेनेची स्थापना झाली.

विठ्ठलभक्तीची पाऊसवारी...


आषाढी वारीतलं कुंद पावसाळी वातावरण, टाळमृदंगाचा तालबद्ध नाद, वारकऱ्यांची एका लयीत पडणारी पावले आणि वारकऱ्यांच्या प्रतिक्षेत तिकडे पंढरपुरात कंबरेवर हात टेकवून विटेवर उभं असलेल्या विठ्ठलाच्या जीवाची होणारी तगमग हे सारंच अद्भुत असतं. याचा सर्वात मोठा आणि सर्वकालीन साक्षीदार असतो तो पाऊस. या पावसाचं आणि आषाढीचं नातं मायलेकरासारखं आहे. हा पाऊस पेशाने शेतकरी असलेल्या वारकऱ्याच्या जीवनांत अनन्यसाधारण स्थानी आहे. कारण त्याचं अवघं जीवन त्याच्याभोवती गुंफलेलं आहे. कदाचित यामुळेही ऐन पावसाळ्यातल्या आषाढी वारीस दिवसेंदिवस अधिकाधिक महत्व येतेय.

गुरुवार, १६ जून, २०१६

आता वंदू कवीश्वर ..



अंधार होत आलेला आहे आणि तिच्या आठवणींनी व्याकुळ झालेला तो क्षितिजाकडे बघत उभा आहे आणि इतक्यात आकाशीच्या चांदण्यात तिचा चेहरा लुकलुकतो. या कल्पनेवर दिग्गज कवींनी कसे काव्य केले असते याची मी केलेली ही उचापत आहे. या सर्व प्रतिभावंत कवींची त्यासाठी माफी मागतो. या मांडणीत काही चुकले असल्यास दोष मला द्या आणि काही बरे वाटले तर त्याचे श्रेय या दिग्गजांच्या काव्यशैलीस द्या. (मागे काही श्रेष्ठ लेखकांचे अशाच तऱ्हेचे एकसुत्रावर आधारित लेखन केले होते तेंव्हा आपण सर्वांनी दिलेले प्रोत्साहन पाठीशी असल्यामुळे हे दुस्साहस केले आहे..)        

सुरेश भट -

क्षितिजास साक्षुन मी रिता करतो आठवणींचा काजळप्याला
पाहताच तिला चांदण्यात, कैफ अंधारास अल्वार कसा आला !

गुरुवार, ९ जून, २०१६

अजुनी रुसून आहेचे अक्षय भावगीत ... कवी अनिल .


साल होते १९१९. विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापुर या अगदी छोट्याशा शहरातुन शिक्षणाच्या निमित्ताने अठरा वर्षे वयाचा एक हळव्या मनाचा उमदा तरुण पुण्यात आला. शालेय शिक्षण गावाकडे पूर्ण केल्यानंतर त्याने पुण्यात येऊन थेट फर्गसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. किंचित अबोल स्वभावाच्या या तरुणाला तिथे जमवून घेणे थोडे कठीण जात होते. असेच दिवस पुढे जात राहिले आणि त्याच दरम्यान पुण्यातल्या हुजूरपागा शाळेत मॅट्रिकला असणाऱ्या तरुणीशी ओळख झाली. दोघात काही विलक्षण साम्य होते. दोघेही हळवे आणि कवी मनाचे होते. दोघेही विदर्भातले. तो अकोला जिल्ह्यातला तर ती अमरावतीची. तो मॅट्रिकपर्यंत मुर्तीजापुंरात तर तिचे प्राथमिक शिक्षण अमरावतीत झालेले. पुढे तो पुण्यात आलेला तर ती मॅट्रिक व कनिष्ट महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत पुण्यातच होती. दोघांच्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.अगदी सच्चे आणि गहिरे प्रेम दोघामध्ये होते. पुढे ती नागपूरास गेली, तो पुण्यातच राहिला. अधून मधून भेटीगाठी होत राहिल्या, पण मनातले बोल जास्त करून पत्रांतून व्यक्त व्हायचे. पत्रे इकडून तिकडून जात राहिली, इतकी की त्यावर नंतर सुंदर पुस्तक निर्मिले गेले. दोघेही कलाशाखेतून पदवीधर झाले. तिला नागपूर विद्यापीठाच्या बीएच्या परीक्षेत सुवर्णपदक मिळाले, आणि मध्य प्रांत-विदर्भ सरकारची विशेष शिष्यवृत्ती मिळवून ती इंग्लंडला गेली. पुढे इंग्रजी साहित्यातली लंडन विद्यापीठाची पदवी मिळवून ती १९२९ला भारतात परतली. तोवर हा तरुण कला शाखेची पदवी मिळवल्यावर भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी कोलकाता इथे गेलेला. भौगोलिक अंतर वाढलेले पण दोघांमधले प्रेम तसूभरही कमी झाले नव्हते. दोघेही एकमेकाची प्रतीक्षा करत होते. अखेरीस १९२९ ला त्यांचा विवाह झाला. त्याने पुढे विधीशाखेची पदवी घेतली अनेक मोठ्या हुद्द्यांवर नोकरी केली. दोघांचा स्वभाव हळवा आणि कवीमनाचा असल्याने दोघेही एकमेकावर जीवापाड प्रेम करत करत लेखन करत राहिले. तो कवितेवर जीव लावून होता, तर कथा हा तिचा आवडता पिंड होता. सुखाचा संसार होत गेला. लग्नाला आता चांगली ३२ वर्षे झाली होती आणि प्रेमाची चाळीशी पार झाली होती. तिने तर भीमपराक्रम केला, १९६१ मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ती पहिली महिला अध्यक्ष झाली अन त्याला हाच मान १९५८ मध्ये मिळाला होता. प्रेमाने ओथंबलेल्या या दोघांनी आपल्या आयुष्यातली हे सर्वोच्च शिखर सर केले होते. आयुष्य आनंदाने व्यतित होत होते....

गावाकडचा पाऊस ....



गावाकडे आता पाऊस सुरु झालाय...माहेरवाशिनी सारखे त्याचे डोळ्यात पाणी आणून स्वागत झालेय...
मी इकडे सोलापूरात. इथला पाऊस अगदीच अरसिक.
त्याचं स्वतःच असं काही वेगळेपणच नाही. तो कधी असा मनाशी गुजगोष्टीही करत नाही, तो देखील शहरी झालाय. तोंड देखलं पडून जातो, त्याच्यात कोसळण्याची विशेष उर्मी अशी नसतेच. तो येतो आणि पडून जातो. खेरीज इकडे शहरी भागात त्याचे रुक्ष वर्णन मॉन्सूनने होते...
गावात पाऊस आला की पांडुरंगाला दह्यादुधाचा अभिषेक होतो, घरी काही तरी गोड धोड होते. घरधनी धोतराच्या सोग्याला डोळे पुसत पुसत आभाळाकडे बघून काहीबाही पुटपुटतो, त्याचे ते पुटपुटणे एखाद्या अभंगाच्या ओवीसारखे असते. पावसाच्या स्वागतासाठी पेज होते. त्यासाठी माजघरातल्या चुलीवर पातेले चढले की बाहरेच्या पावसाचा आवाज, चुलीवरल्या पातेल्यातला रटरटणारा आवाज आणि चुलीतल्या जळणाच्या वासात मिसळलेला मृद्गंधाचा वास सारं कसं मस्तकात भिनत जातं....

मंगळवार, ७ जून, २०१६

मायेचं कष्टाळू गणगोत - बैल


मऊसुत रेशमी अंगाचं पांढरं शिफट खोंडं होतो तेंव्हा धन्याने घोडेगावच्या बाजाराहून आणलं होतं तो दिवस अजून आठवतो. तेंव्हा गावात कैकांच्या शेतांनी मोट होत्या. पाऊसपाणी वेळेवर होत होतं. सगळ्यांच्या रानात औत ओढण्यापासून, नांगरट, कुळवण, मळणी आणि उसाची गाळणी अशी खंडीभर कामं असायची. त्या कामांसाठी बैल कमी पडायचे, मग एकमेकाचे बैल घेतले दिले जायचे. दावणीत तेंव्हा कधी टाचकं पडलेलं नसं. कडबा असायचा. पाऊसपाणी झालं की बाटूक असायचं, हिरवा गवत-घास असायचा. पाऊस आटला की भरडा- कडवळ. जेंव्हा औतं जोरात होते तेंव्हा धन्याने कधीकधी गुळपोळी सुद्धा खाऊ घातली होती.

सोमवार, ३० मे, २०१६

'आमच्या काळी असं नव्हतं (?)......'



आताच्या तरुण पिढीचे प्रेम आणि लग्नाबद्दलचे विचार स्वतःचे असे स्वतंत्र आणि स्वागतार्ह आहेत. यासाठी कधी कधी त्यांचा हेवाही वाटतो. पण काही चाळीशी गाठलेली वा चाळीशी पार केलेली मंडळी याच मुद्द्यावर बोलताना थोडा कद्रूपणा करतात.
'ही पिढी फार नशीबवान बघा नाहीतर आमच्या पिढीला असली सुखं नव्हती' असा सूर जनरली ते आळवत असतात.
मित्रांनो हे तद्दन खोटं असतं, ही धूळफेक असते.

'औदुंबर' - बालकवी



औदुंबर...
ऎल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासांवळा झरा वाहतो बेटाबेटातुन.

चार घरांचे गांव चिमुकले पैल टेकडीकडे
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.

पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणामधुनि चालली काळ्या डोहाकडे.

झांकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर.

औदुंबर ही बालकवींची ओळख म्हणून ख्याती पावलेली कविता. ही एक अनुभवदायी प्रचीती देणारी कविता आहे, तिला समजावून घेण्यासाठी दुसऱ्याच्या संदर्भांची, स्पष्टीकरणांची गरज भासत नाही. अत्यंत प्रवाही, कमालीची सोपी, साधी नादमधुर अशी ही कविता आहे. तिच्यात गेयता आहे, तिला ताल आहे. लय आहे. ती यमकांची वा प्रतिमांची चतुरस्त्र जुळवाजुळवी नाहीये. विशाल कॅनव्हासवर चितारलेल्या एखाद्या टुमदार गावकुसाबाहेरच्या मनोहारी निसर्गरम्य दृश्यांच्या पोट्रेटची परिणामकारकता या कवितेतून बालकवींनी साधली आहे. निसर्गाचे इतके देखणे वर्णन एक अभिजात प्रतिभावंत कवीच करू शकतो, बालकवी हे तर प्रतिभेचे अलौकिक देणे लाभलेले सौंदर्यदृष्टीची जादुई पारख असणारे कवी होते.

गुरुवार, २६ मे, २०१६

आठवणीतले विलासराव...



विलासरावांच्या ६०व्या वाढदिवशी ज्येष्ठ पत्रकार श्री.मधुकर भावे यांचे 'राजहंस' हे पुस्तक मुद्रा प्रकाशनने प्रसिद्ध केले होते. त्याचे प्रकाशन त्यावेळचे राज्यपाल रा.सु. गवई यांच्या हस्ते झाले. या पुस्तकाची कल्पना भावेंनी विलासरावांना दिली. त्यावर विलासराव त्यांना फोनवर म्हणाले की, " तुम्हाला त्यात ज्या कोणत्या मान्यवरांचे फोटो द्यायचे असतील ते द्या; पण दोन फोटो द्यायला विसरू नका, एक वसंतदादा पाटील यांचा आणि दुसरा माधवराव शिंदे यांचा. पुढे राजहंसचे थाटात प्रकाशन झाले. त्या पुस्तकाची प्रत भावेंनी विलासरावांना दिली. वसंतदादा आणि माधवरावांचे फोटो पाहून ते काहीसे हळवे झाले. कारण तेंव्हा हे दोन्ही नेते जगात नव्हते आणि विलासराव म्हणाले, "तुम्हाला हे दोन फोटो टाकायला सांगितले त्याचे कारण म्हणजे मला वसंतदादांनी राज्यमंत्री करून गृहखाते दिले आणि कॅबिनेट मंत्र्याला देतात त्याप्रमाणे मी राज्यमंत्री असताना मला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री केले."

मंगळवार, १७ मे, २०१६

आदय क्रांतिकारक उमाजी नाईक - क्रांतीचा गौरवशाली इतिहास...



३ फेब्रुवारी १८३२ ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी देशासाठी सर्व प्रथम नरवीर उमाजी नाईक हसत हसत फासावर चढले. या थोर आद्य क्रांतीकारकाचे प्रेत इतरांना दहशत बसावे म्हणून कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते...
मराठेशाहीतील उत्तरार्धात पेशवाई बुडाल्यानंतर हिंदुस्थानावर इंग्रजांचा अंमल सुरु झाला तेव्हा उमाजी नाईकांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध पहिले बंड पुकारले म्हणून ते आद्यक्रांतिवीर ठरतात. छत्रपती शिवाजीराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी गनिमीकाव्याने लढत ब्रिटिशांशी झुंज दिली...

~~~~~~~~

ब्रिटिशांनी १८१७ मध्ये भारतात मद्रास लिटररी सोसायटीची स्थापना केली. याच संस्थेकडून मद्रास जर्नल ऑफ लिटरेचर अँड सायन्स नावाचे 

नियतकालिक चालवले जात होते. त्याचे पाच शृंखलात ३८ अंक काढले गेले. १८३३ ते १८९४ या काळात ते प्रकाशित केले गेले. १७५० पासून ते १८९४ पर्यंतच्या विविध ठिकाणी विविध हुद्द्यावर कार्यरत असणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या बहुपेडी माहितीचं हे संकलन स्वरूप होतं. यात पानाफुलांपासून ते किटकापर्यंत आणि तापमान - पर्जन्यमानापासून ते क्रांतीकारकापर्यंत व जात - वंश भेद इथपर्यंतचे मुद्दे, घटना, व्यक्ती विशेष चर्चिले गेलेत. हे सगळं तटस्थ वृत्तीने केल्याचे जाणवतं. याच उपक्रमा अंतर्गत 'ऍन अकाऊंट ऑफ द ओरिजिन अँड प्रेझेंट कंडिशन ऑफ द ट्राईब ऑफ रामोसीज इनक्लुडिंग लाईफ ऑफ द चीफ उमैया(उमाजी) नाईक' या कॅप्टन अलेक्झांडर मॅकिंटॉश लिखित पुस्तकात उमाजी नाईक आणि रामोशी समाज यांचा सविस्तर इतिहास मांडला आहे. अलेक्झांडर मॅकिंटॉश हे मद्रास आर्मीच्या २७ व्या रेजिमेंटमधील लष्करी सेवेत होते यामुळे या ऐतिहासिक दाव्यांना, तथ्यांना महत्व आहे. यात एके ठिकाणी उमाजी नाईक याने बंड केले असा उल्लेख आहे, विशेष म्हणजे बंड हा मराठी शब्द BUND असा लिहिलाय. उमाजी नाईक यांचे प्रेरणास्थान मराठा राज्याचे नायक शिवाजी होते असा महत्वाचा उल्लेख यात आढळतो.

शुक्रवार, १३ मे, २०१६

वढू तुळापूरची गाथा .....



राजे, इथल्या पाण्यात अजूनही तुमचे प्रतिबिंब दिसते,
हताश झालेला औरंग्या दिसतो, त्या दिवशी अबोल झालेली इथली सृष्टी अजूनही तशीच थबकून आहे !
राजे इथे तुमच्या किंकाळ्या कुठेच ऐकायला येत नाहीत वा ना हुंदके ऐकायला येतात !
कवीराज कलश यांचे थोडेसे उमाळे मात्र इथल्या हवेत अजूनही ऐकता येतात ! ज्यांनी तुमचा छळ केला ते रात्र रात्र झोपू शकत नसत त्यांच्या कन्हण्याचा आवाज मात्र इथल्या मातीला कान लावला की ऐकायला येतो !
राजे तुमची जिव्हा जेंव्हा कापली त्या दिवशीपासून इंद्रायणी जी अबोल झाली ती आजतागायत मूक बनून राहिलीय !

मुघलपूर्व भारत अन हिंदूंचे पतन ....एक वेध इतिहासाचा... -



मुघलपूर्व भारतीय उपखंडाचा इतिहास अभ्यासल्यावर असे दिसून येते की इस ५०० पर्यंत गांधार, हुण -श्वेतहुंण (आताच्या अफगाणीस्तानातील कंदहार), तक्षशीला - सिंध, मुलतान (आताच्या पाकिस्तानातील ताक्सिला ), आताच्या ब्रम्हदेश - बांगलादेश पर्यंत असणारे पाटलीपुत्रचे विशाल साम्राज्य, दक्षिणेकडे पांड्य,चोल आणि थेट आताच्या श्रीलंकेत असणारे ताम्रपर्णी साम्राज्य असे चौफेर विविध राजवटी आणि राज्यांचा विस्तार होता. हिंदुस्तान वा भारत नावाचा सलग भूप्रदेश जरी तेंव्हा अस्तित्वात नव्हता तरी सर्व राज्ये - राजवटी गैरमुस्लीम आणि हिंदूबहुल होती. मात्र जसजशी शतके उलटत गेली तसतसे मुसलमानी आक्रमक सत्ताविस्तार, भूविस्तार, लूटमारी आणि धर्मप्रसार यासाठी आक्रमण करत गेले आणि इथले शासक बनून गेले. हा सर्व इतिहास इस ६१५ ते इस १७००च्या दरम्यानचा आहे. इस्लामी आक्रमकांनी इथल्या राजवटी कशा ताब्यात घेतल्या आणि तेंव्हाचा हिंदूशासित प्रदेश इस्लामी राज्यकर्त्यांचा कसा अंकित होत गेला यावर प्रकाश टाकणे हा या लेखाचा हेतू आहे.

गुरुवार, १२ मे, २०१६

अल्लाउद्दिन खिलजी ते शिवछत्रपती .....

 

एक काळ होता जेंव्हा खरोखरच महाराष्ट्रावर वर्षांतील बाराही पौर्णिमा सुखाचे चांदणे शिंपीत होत्या. अन् शेकडो वर्षांपूर्वी मोठा घात झाला. चंद्राला अकस्मात खळे पडले. कसे पडले, केव्हा पडले ते कुणाला समजलेच नाही. विंध्याचलाच्या मागून धुळीचे लोट उठले. आठ हजार घोडय़ांच्या बत्तीस हजार टापा वाढत्या वेगाने आणि आवेशाने खडाडत महाराष्ट्रावर चालून आल्या. त्यांचा आवेश कत्तलबाजांचा होता..
त्यांचा म्होरक्या होता अल्लाउद्दीन खिलजी पठाण. त्याचा युद्धपुकार अस्मान फाडीत होता. ती पठाणी फौज नर्मदा ओलांडून सातपुडय़ाच्या माथ्यावर चढली. पठाणांची पहिली झडप पडली एलिचपुरावर. हंबरडे आणि किंकाळ्या फुटल्या. परचक्र आले. महाराष्ट्रावर परचक्र आले. थोडे दिवसच आधी महाराष्ट्रातील संतांची दिंडी उत्तर हिंदुस्थानात यात्रांना जाऊन आली होती. त्यांनी सुलतानांची सत्ता पाहिली, काही कठोर कडवट अनुभव घेतले. लोकांना सांगितले होते. तरीही राजा आणि राज्य गाफील होते..

अल्लाउद्दीनचे हे वादळी आक्रमण राजा रामदेवराव यादवाला उशिरा कळले. स्वराज्यात तो कमीतकमी शंभर कोस (म्हणजे सव्वाशे किलोमीटर) घुसला तरी त्याला कुणीच अडवले नाही? मग आमचे सैन्य होते कुठे? आमचा राजा बेसावध होता. पण सेनापती काय करत होता? सेनापती होता राजा रामदेवाचा युवराजच. त्याचे नाव शंकरदेव ऊर्फ सिंघणदेव. तो आपल्या सैन्यासह दूर कोठेतरी गेला होता. यात्रेला गेला होता म्हणे. अल्लाउद्दीनची फौज देवगिरीच्या रोखाने दौडत येत होती. रामदेवरावाला आपले भयंकर भविष्य दिसू लागले.

शिंदेशाहीचा देदिप्यमान इतिहास .....


शिवकालानंतर मराठ्यांच्या इतिहासातली रणांगणावरची सर्वोच्च पराक्रमाची शर्थ म्हणून पानिपताकडे पाहिले जाते. या सर्व धामधुमीच्या कालखंडात ज्या मराठा सरदारांनी आपल्या शौर्याची शिकस्त केली त्यात शिंदे घराणे अग्रस्थानी होते आणि पानिपतात गेलेली पत परत आणण्याचे महत्कार्य करणारे शिंदे होळकर यांचा इतिहास हा भव्य आणि उत्तुंग आहे. यातही शिंदे घराण्यातल्या महादजी शिंद्यांनी दाखवलेली मुत्सद्देगिरी व पराक्रम अलौकिक असा आहे. महादजी शिंद्यांनी उत्तर हिंदुस्थान आपल्या कब्जात घेतला होता. मध्यंतरी ज्या गोवध हत्या बंदीवरून आपल्या देशात गदारोळ माजला होता ती बंदी महादजींनी १७८५ मध्ये शहाआलम या मुघल बादशहाला आपली कठपुतळी बनवून अंमलात आणली होती. मुघल बादशहा सत्तेत असूनही हा फतवा त्यांनी अमलात आणला होता यावरून महादजींचे दिल्लीवरील वर्चस्व लक्षात यावे. उत्तर भारताचा प्राण असणारा मध्य - पूर्वेचा भाग आपल्या टापाखाली ठेवणारे धोरणी राणोजी, सर्वांग जखमांनी भरलेले असतानाही बचेंगे तो और लढेंगे असं म्हणण्याची जिगर ठेवणारे दत्ताजी, वयाच्या १६ व्या वर्षी नजिबाच्या गुरुचे कुतुबशहाचे मुंडके जमदाडाच्या एका वारात तोडणारे अन पुढे पानिपतावर हौतात्म्य पत्करणारे जनकोजी, काळाची पावले ओळखून आपला विकास साधून घेणारे जयाजी व माधवराव, स्वातंत्रोत्तर काळात राजकारणात आपली पत राखणाऱ्या  विजयाराजे अन त्यांचे पुत्र माधवराव, अन आताच्या काँग्रेसमधील एक आशास्थान असलेले ज्योतिरादित्य शिंदे असा यांचा छोटेखानी परिचय देता येईल. ग्वाल्हेरचे संस्थानिक म्हणून ओळखले जात असलेल्या शिंदे घराण्याचा इतिहास सुरु होतो राणोजी शिंदयांपासून.....

बुधवार, ११ मे, २०१६

गोब्राम्हण - जुन्या वादाला नवी फोडणी !



"आजवर शिवरायांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने शिकवला गेला. ज्ञान देण्याची मक्तेदारी विशिष्ट वर्गाकडे असल्याने त्यांना अभिप्रेत असलेला इतिहास समाजापर्यंत पोहचविण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीमविरोधी होते, अशी प्रतिमा तयार करण्यात आली. आजही विशिष्ट भूमिका समाजासमोर मांडण्याचे आणि तरुणाईच्या मनावर बिंबवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना मिळणारे यश अस्वस्थ करते", अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केली आणि राज्यात एकच धुरळा उडाला.

मंगळवार, १० मे, २०१६

मराठ्यांच्या इतिहासातील भाऊबंदकी ... कोल्हापूर - सातारा गादी !


#१२जानेवारीचे दोन संदर्भ - एक अतिव सुखाचा तर एक भाऊबंदकीचा...
१२ जानेवारी हा जिजाऊ मांसाहेबांचा जन्मदिवस, ज्या जिजाऊनी शिवराय घडवले, स्वराज्याची आस जागवली अन एक भव्य दिव्य स्वप्न नुसते पाहिलेच नाही तर प्रत्यक्षात आणले त्यांचा जन्मदिवस म्हणजे तमाम मराठी माणसांचा आनंदोत्सव !! हा खरा सण, ज्यांनी आपल्या सर्वांचे स्वराज्य निर्मिले त्यांचा हा जन्मदिन !! त्यामुळे आजच्या या १२ जानेवारीचे महात्म्य कैक पटीने वाढले ! १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेडराजा (आजच्या बुलढाणा जिल्ह्यातले) इथे लखुजी जाधवरावांच्या घरी त्यांचा जन्म झाला अन सह्याद्रीपासून ते भीमा-गोदाच्या प्रवाहावर आनंदाचा रोमांच आला. जिजाऊ मांसाहेबांच्या जन्मामुळे १२ जानेवारीचा संदर्भ आत्यंतिक आनंदाचा होऊन गेला आहे. पण ज्या जिजाऊनी मराठ्यांच्या शौर्याचे बीज रोवले, ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले ज्यांनी स्वराज्यनिर्मितीसाठी आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्या जन्मदिनाच्याच तारखेला ११० वर्षांनी मराठी स्वराज्यात दुही माजली, भाऊबंदकी झाली ! या दिवशी झालेल्या घटनेतून बोध घेऊन प्रत्येक मराठी माणसाने आपसातले वाद नक्कीच टाळले पाहिजेत नाहीतर १२ जानेवारीचा हा दुसरा संदर्भ आपल्याला आयुष्यभर अणकुचीदार दुहीचे भाले टोचवत राहतील....
काय झाले होते १२ जानेवारी १७०८ ला ? ह्याची माहिती घ्यायला आपल्याला इतिहासात जावे लागेल. पण नुसते मागे जाऊन चालणार नाही तर त्यातून आपण धडा घेतला पाहिजे तरच भाऊबंदकीचा लकडा आपला पिच्छा सोडेल ..

स्त्रीत्वाची कोंडी - 'आई' ! प्रवीण बर्दापूरकर यांनी संपादित केलेल्या 'आई' पुस्तकाचा रसास्वाद ...



"जायची चार वाजताची वेळ होत आली. ती हट्टानं अधिकच बेभान झाली. मी जाणार नाही हं !- तिचा पक्का निश्चय. तिच्या लक्षात आलं, बाळाला हे सोडून मला नेणार. तिला तिचा कुक व 'तो' दोघांनी दोन्ही बखोट धरून बेडरूमच्या दारापर्यंत खेचून आणलं. तिने दोन्ही पायाचे पंजे उंबरयाला घट्ट टेकवून दोन्ही हात दाराच्या चौकटीला दाबून धरले. "मला बाळाला टाकून नाही जायचं...मी नाही जाणार." दोघांनी सारी त्यांची ताकद पणाला लावली.तिला बाहेर काढली अन अक्षरशः फरफटत ओढीत बाहेरच्या दारापर्यंत आणली. ते सारं पाहून मी जमिनीवर कोसळलेच. तिची गाडी जसलोकच्या गेटपर्यत पोहोचली अन ती कोमात गेली ती अखेरपर्यंत. तिला कृत्रिम लंग्जवर ठेवून, १३ तारीख उलटली आणी बाळाच्या बारश्यापासूनची त्याची स्वप्नं पाहणारी एक बाळवेडी 'आई' त्याला सोडून कायमची निघून गेली. दुःखाचा डोंगर कोसळला, बाळाला क्षणभरही पापणीआड न करणारी. आईपणाला अखंड आसुसलेली ही थोर आई तिच्या बाळासाठी फक्त एक स्वप्न बनून राहिली.....

सोमवार, ९ मे, २०१६

शहीद भगतसिंह आणि हिंदुत्व - एक विरोधाभास ...

"एखादा देवावर विश्वास ठेवणारा हिंदू आपण पुढच्या जन्मी राजा म्हणून जन्मावे अशी अपेक्षा करत असेल,
भगतसिंह 
एखादा मुसलमान किंवा ख्रिस्ती आपल्या हाल-अपेष्टांचे व त्यागाचे बक्षीस म्हणून स्वर्गात भोगायला मिळणार्‍या ऐश्वर्याची स्वप्ने पाहत असेल पण मी कशाची अपेक्षा करावी? मला चांगली कल्पना आहे की ज्याक्षणी माझ्या मानेभोवती फास आवळला जाईल आणि पायाखालची फळी खेचली जाईल तो शेवटचा क्षण असेल. तोच अंतिम क्षण असेल. मी, किंवा अगदी काटेकोर आध्यात्मिक भाषेप्रमाणे बोलायचे झाले तर माझा आत्मा याचा तेथेच अंत होईल. बस्स इतकेच.

मंगळवार, ३ मे, २०१६

प्रेमस्वरूप आई - माधव ज्युलियन


प्रेमस्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई !
बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?

नाही जगात झाली आबाळ या जिवाची,
तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची.
चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा,
आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका.

ही भूक पोरक्याची होई न शांत आई,
पाहूनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनांही.
वाटे इथून जावे, तूझ्यापुढे निजावे,
नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे !

वक्षी तुझ्या परि हे केव्हा स्थिरेल डोके,
देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके ?
घे जन्म तू फिरूनी, येईन मीहि पोटी,
खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी !

कंदहार - हिंदूकुश पर्वतरांगा . एक रोचक शोध - इतिहास ...


क़ीमत, क़ुरबानी हे जसे खालच्या बिंदूचे उर्दू उच्चारण असलेले उर्दू शब्द आहेत तसाच क़ंदहार हा शब्द देखील आहे. आपले काही इतिहास अभ्यासक आणि संशोधक कंदहार शहर - प्रांत म्हणजे आपल्या ग्रंथ पुराणात उल्लेख असलेले काही हजार वर्षापूर्वीचे गांधार हे राज्य समजतात. तसेच उर्दू - पर्शियन इतिहास अभ्यासक या शहराला सिकंदरने (द ग्रेट वॉरियर) स्थापन केलेले सिकंदरिया हे शहर मानतात. आजच्या घडीला हे शहर तालिबानी कट्टरवाद्यांचे प्रमुख आश्रयस्थान आहे. अफगाणीस्तानच्या दक्षिणेकडील हा सर्वात अस्थिर प्रांतापैकी एक आहे, याची दक्षिणेकडील सीमा पाकिस्तानच्या उत्तरेस लागून आहे. पश्तून ही इथली मुख्य भाषा आहे. कंदहार येथील उत्खननात सापडलेल्या चीजवस्तूंना मोठे ऐतिहासिक मुल्य आहे कारण त्याचा कालखंड !

गुरुवार, २८ एप्रिल, २०१६

राणी चेन्नम्मा असीम शौर्याची धीरोदात्त स्त्री ....



आपल्या सर्वांना झाशीची राणी आणि तिचे असीम शौर्य याविषयी माहिती आहे पण तिच्या कालखंडाहून आधी व तिच्याइतकेच शौर्य- धैर्य यांचे अलौकिक प्रदर्शन करून इंग्रजी सत्तेविरुद्ध शस्त्र उचलणारया पहिली सशस्त्र स्त्री क्रांतिकारक चेन्नम्माविषयी फारशी माहिती बहुधा नसते. १८५७च्या बंडाच्या ३३ वर्षे आधी एका स्त्रीने केलेला हा रक्तरंजित संघर्ष खरे तर भारतीय इतिहासातील स्वातंत्र्य संग्रामाच्या गाथेतील एक सोनेरी पान आहे पण आमचे दुर्दैव असे की बहुतांश लोकांना त्यांचे कार्य आणि शौर्य याबाबत अनभिज्ञता आहे. बहुधा झाशीच्या राणीचे 'मराठी'पण आणि अलीकडील काही दशकातील कन्नडिगांप्रतीचा राग याचीही झालर या अनास्थेमागे असू शकते..

बुधवार, २७ एप्रिल, २०१६

क्रूरकर्मा नादिरशहा ...



पुर्वीच्या उत्तरपुर्व पर्शियामधील आणि आत्ताच्या इराणमधील खोरासनमध्ये १६८७ सालीं एका धनगरी मेंढपाळाच्या अफ्शराच्या घरी जगात इतिहास घडवणारा एक मुलगा जन्माला आला. किझीबाश आणि अफ्शर या दोन्हीही भटक्या पण पराक्रमी पर्शियन प्रजाती होत्या. त्याच्या जन्मानंतर काही वर्षातच त्याच्या आईला उझबेकी गनिमांनी पळवून नेले. त्याचे वडिल मेंढपाळ असल्याने ते मेंढ्यांच्या चामड्यांचे कोट, टोप्या वगैरे करून विकीत असत. १३व्या वर्षी त्याचे वडिल मृत्युमुखी पडले. आजूबाजूची युद्धग्रस्तता आणि वडिलांचे निधन या अस्थिरतेमुळे लहानपणापासून त्या मुलाचे आयुष्य अनेक प्रकारच्या साहसांत गेले. सतरा वर्षांचा असतांना तो उझ्बेकांच्या कैदेत सांपडला, याचवेळेस त्याच्या आईला बंदी बनवण्यात आले आणि कालांतराने तिचेही निधन कैदेत असताना झाले.१७०८ मध्ये तो उझ्बेकांच्या तावडीतून निसटला आणि खोरासनला परतला. या सर्व घटनांचा त्याच्या युवा मनावर विपरीत परिणाम झाला आणि त्याचा स्वभाव क्रूर, विध्वंसक, परहिताविषयी निष्ठुर व मानवी संस्कृतीला विरोधी असा बनला.

भगिनी निवेदिता - एका योगिनीची कथा ....



कोलकात्त्यातील बागबाजार या जुन्या शहरी भागातली ती एक छोटीशी घरवजा शाळा होती. उन्हाळ्याचे धगधगते दिवस होते. अंगाची लाही लाही करणारया त्या हवामानात महिला,मुले आणि वृद्ध शक्यतो घरी बसून राहत. अशा वातावरणात विदेशी महिलांना फार शारीरिक हाल अपेष्ठा सोसाव्या लागत. मात्र कोलकात्त्यातील त्या छोट्याशा शाळेत एक विदेशी स्त्री अशा विषम वातावरणात आनंदात राहत होती.

मंगळवार, २६ एप्रिल, २०१६

संयुक्त महाराष्ट्र आणि शाहीर अमरशेख .....


दिल्लीतल्या रस्त्यांवरचा मराठी माणसाचा आजवरचा सर्वात मोठा मोर्चा होता अन त्यात अग्रभागी असलेल्या एका ट्रकच्या हौदयात उभे राहून एक शाहीर माईकचा वापर न करता गळ्याच्या शिरा ताणून सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत सलग सहा तास एका हाताने डफ वाजवत आपल्या खडया पहाडी आवाजात पोवाडे गात होता आणि हे अद्भुत दृश्य बघून हैराण झालेले दिल्लीकर तोंडात बोटे घालून त्या शाहीराकडे अचंबित नजरेने बघत होते !
चार वाजता मोर्चाची सांगता जाहीर सभेने झाली. या सभेत बोलताना आचार्य अत्रे त्या शाहीराचे कौतुक करताना सदगदित होऊन बोलले -
"शाहीर, छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी तुमच्या पाठीवर ‘शाब्बास शाहीर’ अशी थाप मारून हातातलं सोन्याचं कडं तुम्हाला बक्षीस दिलं असतं...."
ती सभा होती संयुक्त महाराष्ट्रासाठीची !
अन 'दो कवडी के मोल बिकने को मराठा तयार नहीं है' असं ठणकावून सांगणारे ते महान शाहीर होते - 'शाहीर अमर शेख' !
या अमरशेखांच्या कर्तुत्वाचा आणि जीवनाचा हा धांडोळा ....