गुरुवार, ३० जुलै, २०१५

परीकथेतील राजकुमारा …


'परीकथेतील राजकुमारा… 'हे एकेकाळी रेडीओवर अफाट गाजलेले गीत. या गीताची सुरुवातच जादुई शब्दांनी होती. ज्या पिढीने परीकथा वाचल्या होत्या अन त्यातील राजकुमार - राजकुमारीचे स्वप्न पाहिले होते त्यांना यातील आर्त प्रतीक्षा भावली होती. ज्या पिढीला ह्या परीकथा अन त्यातील राजकुमाराचे आकर्षण उरले नाही, त्याची ओढ राहिली नाही त्या पिढीला यातील सहवेदना कदाचित जाणवणारच नाहीत. कारण आजची पिढी एका आभासी जगात जगते. खेळाच्या मैदानावर लहान मुलांचे दिसणे दुरापास्त होऊ लागलेय. मोबाईल - कॉम्प्यूटरवरील व्हिडीओ गेमपासून ते दुरचित्रवाहिन्यातील ‘डोरेमॉनच्या जंगलात’ ही मुले हरवून गेलीत. तरुणांची अवस्था त्यांच्यापेक्षा वाईट आहे, सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या कृत्रिम मायाजालात ही पिढी अशी काही हरवून गेलीय की त्यांना त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाचा, ध्येय धोरणांचाही विसर होतोय. लहानग्या वयापासून पीसी गेमच्या जाळ्यात गुरफटलेली अन व्हॉटसेप ते फेसबुकच्या फेऱ्यात अडकलेली ही मुले. त्यांना परीकथेचे स्वाभाविक वावडे असणार. पूजेचे ताट उजवीकडून डावीकडे की डावीकडून उजवीकडे फिरवायचे हे ज्यांना ठाऊक नाही, दंडवत अन नमस्कार यात काय फरक आहे किंवा आपले लोकसाहित्य कधी ढुंकूनही ज्यांनी पाहिले नाही अशीही मुले यात आहेत. फास्ट फुड ते हायटेक शिक्षण व्हाया ब्रेकअप इन माईंड एण्ड कल्चर हे ठायी असणाऱ्या पिढीस भावगीतांचा एक हृदयस्पर्शी जमाना होता यावर कसा विश्वास ठेवावासा वाटेल ?

परीकथेतिल राजकुमारा, स्वप्नी माझ्या येशिल का ?

शनिवार, २५ जुलै, २०१५

हरवलेली गाणी....



फेसबुकवरच्या मायभगिनींनो, मैत्रिणींनो तुम्ही हातात बांगड्या घालता का ? स्वतःच्या हाताने घालता की कासाराकडे जाऊन घालता ? कासाराकडे जाताना एकटयाने जाता की मैत्रिणीसवे, नात्यागोत्यातल्या महिलांसवे ग्रुपने जाता ? तिथे गेल्यावर त्याने एका पाठोपाठ एक रंगीबेरंगी फिरोजाबादी बांगडया मनगटातून पुढे नजाकतीने सरकावताना हाताला रग लागलीय का ? बोटं रटरटलीत ? ढोपर अवघडले ? त्या त्रासाकडे लक्ष जाऊ नये म्हणून माझ्या गावाकडच्या मायभगिनी काही दोन ओळींची गाणी गुणगुणत तुम्ही तसं कधी गायलात का ? एकीचे झाले की दुसरी गाई, मग तिसरी असं करत पुन्हा पहिली गात असे. लग्नघरी कासार आल्यावर मग तर एकीच्या ओळींना जोडून दुसरी उस्फुर्त काव्य रचत असे. भलीमोठी कविता तिथे जन्म घेई. यातल्याच काही जणी मग जात्यावरच्या ओव्याही रचत आणि मग काय आपला क्रम कधी येतो याची प्रत्येकजण हरीणीगत वाट बघे. ह्या साऱ्या जणी म्हणजे गावोगावच्या बहिणाबाईच की ! की तुम्हाला यातलं काहीच माहिती नाही ? चला तर मग मी काही अशी ओव्यांची / द्विरूक्तीची ओळख करून देतो. तुम्हाला आवडतात का बघा. एखादी छानशी कॉमेंट करा. तुम्हालाही एखादी ओळ सुचली तर लिहा, तुमच्या घरी आता कोणी बांगडया भरतात की नाही हे मला माहिती नाही, पण घरी पोरीबाळी असतील तर त्यांना ह्या पोस्टबद्दल, गावाकडच्या ह्या गोड रिवाजाबद्दल सांगा. त्यांना नक्कीच बरं वाटेल. जमलंच तर चाल लावून सांगा, खूप गोड आहेत हो ही बांगडयांची गाणी. एकदा गाऊन तरी बघा....

शनिवार, १८ जुलै, २०१५

मराठे - एक युद्धज्वर !


मराठयांनी एखाद्या माणसाचा सूड घ्यायचा ठरवलं की ते बेभान होऊन, जीवावर उदार होऊन, कुठलाही मागचापुढचा विचार न करता वर्षानुवर्षे आपल्या काळजात सुडाग्नी धगधगता ठेवतात. संधी मिळताच वचपा काढतात. याची अनेक उदाहरणे इतिहासाच्या पानावर जागोजागी आढळतात. इथे उदाहरण दिले आहे, इतिहासातील महापराक्रमी अजरामर काका पुतण्यांचे ! याउलट असणारे किस्सेही इतिहासात घडलेले आहेत. पेशवाईत तर काकाच पुतण्याच्या जीवावर उठला होता. मात्र पोस्टमधले उदाहरण आगळे वेगळे आणि अलौकिक आहे !

चंद्राची कैफियत.....


तुम्हाला मामा आहे ? तुम्ही अंगाई ऐकलीय ? तुमचे बालपण पाळण्यात गेलंय? तुम्ही चांदोबा पाहिलाय ? तुमच्या घराला खिडकी आहे ? यातील एकाही प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असेल तर हे लेखन आवर्जून वाचा...
काल पहाटेच्या स्वप्नात चांदण्यांच्या गावी गेल्यावर वाटेत मला हिरमुसला चंद्र भेटला … मी विचारलं "काय झालं ?" ओलेत्या डोळ्यांनी उतरल्या चेहरयाने तो उत्तरला, तुझ्याकडे माझ्यासाठी वेळ असेल तरच बोलतो.. नाहीतर तू आपला तुझ्या वाटेने मला असेच मागे सोडून पुढे निघून जा …" मान डोलावून मी खुणावले, तसे तो रडवेल्या आवाजात बोलू लागला…
"काय सांगू तुला ? रात्र रात्र झोप येत नाही मला ! असाच जागा असतो, डोळे लावून बसतो, मान दुखायला होते. शेवटी डोळे पत्थरून जातात अन डोके बधीर होते !"
हमसून हमसून रडत चंद्र असं का सांगतोय मला काही कळत नव्हतं. तो डोळे पुसत पुसत पुढे सांगू लागला, "अलीकडे माझे फार फार वाईट दिवस आलेत रे ! माझ्याकडे बघून आता कुठली आई अंगाई गात नाही नी कुठले तान्हुले बाळ माझ्याकडे बघत बघत झोपी जात नाही…आता कुठल्या तान्हुल्याचा पाळणा कुण्या खिडकीतूनही दिसत नाही… मी तासंतास खिडकीशी तसाच उभा असतो, दारे खिडक्या सारं सारं बंद असतं.. आत तान्हुल्याचा आवाज येतो पण तोही माझ्यासाठी रुसत नाही..… "

शुक्रवार, १० जुलै, २०१५

औरंगजेब ते लियाकत अली खान .....


मुघल सम्राट शहाजहान १६५९ मध्ये आपल्या मुलाकडून औरंगजेबाकडून कैदेत बंदिस्त झाला, औरंगजेबाने आपल्या सख्ख्या भावाचा मुडदा पाडला आणि मुघल सम्राटाची गादी कब्जा केली. जवळपास ३०० वर्षांनी हाच इतिहास पाकिस्तानात थोड्याफार फरकाने पुन्हा घडला. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्नाह यांनी अट्टाहास करून अखंड भारताची फाळणी करून १४ ऑगस्ट १९४७ला पाकिस्तान पदरात पाडून घेतला पण ११ सप्टेबर १९४८ ला त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. पुढे त्यावरून अनेक तर्क वितर्क लढवले गेले...

राजर्षी शाहू - एका लोकराजाची गाथा....



शाहू महाराजांचे नाव घेतले की दुर्दैवाने आजही काही लोकांच्या कपाळाला आठ्या पडतात.

तर काही लोकांना शाहूंच्या विचाराशी काही देणेघेणे नसते पण उठता बसता शाहूंचे नाव घ्यायला आवडते. तर काहींना शाहूंचे विचार केवळ आरक्षणाच्या अनुषंगाने महान वाटतात, त्या लोकांना शाहू म्हणजे केवळ आरक्षणाचे उद्गाते वाटतात. काही लोकांना शाहू फक्त आपल्या जातीच्या भूषणापायी प्रिय वाटतात ! तर काही लोकांना राजकीय सोयीपोटी शाहू जवळचे वाटतात. संपूर्ण शाहू महाराज खूप कमी लोकांच्या पचनी पडतात ! शाहूंची पूर्ण माहिती नसतानाही त्यांची भलावण करणारे आणि खाजगीत त्यांच्या नावे बोटे मोडणारे असे दोन्ही प्रकारचे लोक समाजात मोठ्या प्रमाणात आढळतात. कोणत्याही अभिनिवेशाशिवाय मनापासून संपूर्ण शाहू ज्यांच्या मनाला पटले आहेत असे लोक मात्र खूप कमी आढळतात ! नेमके कोणते कार्य शाहू महाराजांनी केले आहे ? शाहूंचे सामाजिक योगदान काय आहे ? त्यांच्या जातीधर्मा विषयी कोणत्या भूमिका होत्या ? या सर्व बाबींचा धावता आढावा वाचायचा असेल तरच पुढे वाचा अन्यथा आपला हिरमोड होईल .......

छत्रपती शिवाजी राजांची दुर्मिळ पत्रे - २



छत्रपती शिवाजी राजांची दुर्मिळ पत्रे - (२).................
मजकूर -
सरंजामी छ २४ रबीलाखर इहिदे
सीतेन अलफ पुणे व इंदापूर व चाकण
सुपे बारामती येथे इनाम हिंदू व मुसल
मान यासी इनाम आहेत. त्यास पेशजी आपणांस
मुकासा असताना अफजल खान आधी जेणे प्रमाणे
तसलमाती ज्यास जे पावेत असेल
तेणे प्रमाणे देणे यैसा तह केला असे मोर्तब
सुद.

............मर्यादेय विराजते. (शिक्क्याची मोहोर)
.................................................................................
तजुर्मा -

उन्हाशी झुंज अजून संपली नाही ....



सुर्याच्या आगीने जीवाची काहिली होत्येय. उन्हे भल्या सकाळपासूनच वैऱ्यासारखी, उभ्या जन्माचा दावा मांडल्यागत डोक्यावर नेम धरून बसलेली ! विहिरी कोरड्या ठक्क झालेल्या. काळ्या मायेच्या सगळ्या अंगाला खोल खोल भेगा. दूरवर कुठेही हिरवाई नाही. ओसाड माळरानावरनं भकास तोंडाचा काळ डोळे खोल गेलेली माणसे चोवीस तास हुडकत फिरतो. दूर बांधाबांधापर्यंत कुठेही पाखरे नाहीत की त्यांचे आवाज नाहीत, जळून गेलेल्या झाडांच्या फांद्यावर वाळून गेलेल्या घरट्यांच्या काटक्या उरल्या आहेत, र्हुमर्हुम आवाज काढणारा वारा सगळ्या शेत शिवारातून कण्हत कण्हत फिरतो आणि पाझर तलावाच्या पायथ्याशी जाऊन डोळे पुसतो. खुराड्याच्या सांदाडीला कोंबड्यांची लोळत पडलेली मातकट पिसे उगाच अस्वस्थ करतात.