tag:blogger.com,1999:blog-11205668338302748392024-03-17T07:35:41.167+05:30Sameer Gaikwad समीर गायकवाड गोष्टीवेल्हाळाची बाराखडी sameer gaikwadhttp://www.blogger.com/profile/05106372658264914305noreply@blogger.comBlogger469125tag:blogger.com,1999:blog-1120566833830274839.post-22072687893100878022024-02-23T21:06:00.003+05:302024-02-23T21:06:39.738+05:30मनोहर जोशींचा महत्वाचा पण दुर्लक्षित पैलू! <div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiJlm4FhXS9XalhFlw_QUKcc9DeaVceNEIJTbRJVhiGITVIo0GoHdGJs4SRvG0BBUdHPNa-BYlvXXjGKRyVCvcw7d8l_KgCdQwO9Y3YSFg176NKlrbDwU0jWgXDl2PiksphLwY1LZskH83EP0WScYkNC4O1tBl3SlF2zHjdvbW6iK8m5C2rh-3F5E9SlYs/s1640/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B0%20%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img alt="MANOHAR JOSHI मनोहर जोशी" border="0" data-original-height="924" data-original-width="1640" height="360" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiJlm4FhXS9XalhFlw_QUKcc9DeaVceNEIJTbRJVhiGITVIo0GoHdGJs4SRvG0BBUdHPNa-BYlvXXjGKRyVCvcw7d8l_KgCdQwO9Y3YSFg176NKlrbDwU0jWgXDl2PiksphLwY1LZskH83EP0WScYkNC4O1tBl3SlF2zHjdvbW6iK8m5C2rh-3F5E9SlYs/w640-h360/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B0%20%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80.png" title="मनोहर जोशी समीर गायकवाड" width="640" /></a></div><br /></div><div><span style="font-family: Mukta; font-size: xx-large;"><br /></span></div><span style="font-family: Mukta; font-size: x-large;">मनोहर जोशींच्या आयुष्यात डोकावताना त्यांच्या राजकीय भूमिकांचा खल अनेकजण पाडतील; मात्र त्यात सर्वांना स्वारस्य असेल असे नाही.चाळीसच्या दशकात जन्मलेल्या जोशींचे वडील भिक्षुकी करायचे. त्यानंतर मनोहर जोशीही माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत भिक्षुकी करत असत.त्यांच्या बालपणीचा एक काळ असाही होता की ते माधुकरी मागून जेवत असत. हा स्वातंत्र्यपूर्व काळ होता जिथे अनेक तऱ्हेच्या जीवनदायी साधनांची कमतरता होती. अशी प्रतिकूल स्थिती असूनही त्यांच्या अंगी शिकण्याची जिद्द प्रचंड होती. त्यामुळेच विपरीत काळावरही त्यांना मात करता आली. <br /><br />रायगड जिल्ह्यातील नांदवी हे त्यांचे गाव. त्या काळात कोकण किनारपट्टी पूर्णतः सर्वंकष साधनांच्या अभावाने ग्रासलेली होती. तरीही त्यांनी आशा सोडली नव्हती. <br />दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९५४ साली मनोहर जोशी अकरावीला शिकण्यासाठी मुंबईत त्यांच्या बहिणीकडे आले. बहीण खूप सधन अवस्थेत होती अशातली गोष्ट नव्हती. तिच्यापाशी आल्याने त्यांना शिक्षणाचे सक्षम पर्याय गवसले जे त्यांच्या गावात त्यांना कधीच मिळाले नसते. <br />मोठ्या शहरांचा हा फायदा असतो, जो तरुण मनोहर जोशींनी अचूक घेतला. <br />मात्र हे शिक्षण त्यांना सहजी घेता आले नाही. <br />त्यासाठीचा आर्थिक स्रोत त्यांच्यापाशी नव्हता. त्यांनी सहस्त्रबुद्धे क्लासेस या ठिकाणी शिपायाची नोकरी करुन त्या आधारे शिक्षण घेतलं. <br />किर्ती महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण झालं. <br /><br />स्वतंत्र भारतातले ते पहिले दशक होते. उच्चशिक्षण घेणाऱ्या हातांना तेव्हा नोकरी बऱ्यापैकी सत्वर मिळत असे. जोशींना फारशी खटपट न करता मुंबई महापालिकेत लिपिकाची नोकरीही मिळाली. मात्र या दरम्यानही त्यांचे शिक्षण सुरु होते ही एक महत्वाची गोष्ट होय. <br />मात्र एमएचे शिक्षण पूर्ण होताच डिसेंबर १९६१ मध्ये त्यांनी पालिकेची नोकरी सोडली होती. <br /><br />शक्यतो नोकरी पेशात रमणारा वर्ग म्हणून ज्या जातवर्गाची गणना होते त्या वर्गवारीतुन येणारा एक तरुण चक्क सरकारी नोकरी सोडतो हे जरा वेगळेच चित्र होते. कारण अत्यंत विषम परिस्थितीत शालेय शिक्षण घेऊन, शहरातही स्वकमाईने उच्च शिक्षण पूर्ण करून कुणाला जर सरकारी नोकरी मिळाली तर त्याच्यासाठी जणू स्वर्गप्राप्ती असते! मात्र जोशींनी तो मोह तिथेच दूर लोटला आणि एक भव्योदात्त स्वप्न पाहिले, जे पुढे जाऊन पुरेही केले! <br /> <br />पालिकेतील नोकरी सोडल्यानंतर त्यांनी आवडीचा शिक्षकी पेशा स्वीकारला होता. शिवाय त्यांना एलएलबीचे पूर्णवेळ शिक्षण घ्यायचे होते. १९६४ मध्ये वयाच्या २७ व्या वर्षी मनोहर जोशींचे एमए. एलएलबीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. <br />इथे त्यांनी एक अभूतपूर्व निर्णय घेतला तो म्हणजे स्वतःचे क्लासेस सुरु करण्याचा!<br />आता ते केवळ मनोहर जोशी उरले नव्हते तर प्रिन्सिपॉल मनोहर जोशी झाले होते. त्यांच्या नावाचे साइनबोर्ड असणारे कोहिनूर क्लासेस आधी मुंबईत सुरु झाले. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. <br /><br />सुरुवातीला चौकटबंद साच्यात असणारे हे क्लासेस त्याच दशकात तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्थेच्या रूपात पुढे आले. 'कोहिनूर टेक्निकल इन्स्टीट्यूट'चे नाव साऱ्या महाराष्ट्राला परिचित झाले. <br />जवळपास महत्वाच्या सर्व छोट्या मोठ्या शहरात एसटी स्टॅन्ड अथवा स्टेशन परिसरात जोशी सरांचे कोहिनूर क्लासेस दिसू लागले. <br />ज्यांना आयटीआयला प्रवेश मिळत नव्हता ते सर्रास कोहिनूरमध्ये प्रवेश घेत असत. फिटरपासून इलेक्ट्रिशियनपर्यंत आणि मेकॅनिकपासून ते एसी रिपेअरिंगपर्यंत अनेक कोर्सेस तिथे उपलब्ध झाले. <br /><br />दरम्यान सरांची राजकीय पत वाढल्याचा नेमका फायदा त्यांनी या संस्थेला करून दिला. नोकरीची हमी देणारी शिक्षणसंस्था म्हणून ही संस्था नावरूपाला आली. राज्याच्या ग्रामीण भागातून मुले मोठ्या संख्येने प्रवेश घेऊ लागली, त्यांना त्या अनुषंगाने रोजगारही मिळत गेला हे वास्तव होते. <br />मात्र सर राजकारणातून फेकले जाण्याचा कालखंड आणि कोहिनूरचे साचेबद्ध झालेले शिक्षण एकाच काळात झाल्याने कोहिनूरचे नाव मागे पडत गेले. वेळेवर अपडेट न केले गेल्याने ही संस्था मागे पडली ती कायमचीच! <br /><br />इतकी चांगली शैक्षणिक सूत्रे जुळवून आणूनही गणपती दूध पितो याचे ऑनलाईन रेकॉर्डिंग करून तशी अफवा पसरवण्याचा बाष्कळ मूर्खपणा त्यांनी केला होता हेही नमूद केले पाहिजे! <br /><br />मनोहर जोशी शिवसेनेला काही अंशी ओझे वाटू लागले आणि त्यांचे रूपांतर अडगळीत झाले हे वास्तव होते मात्र याची कारणे शोधली तर या कृतीचे उत्तरही सापडते. असो. <br />मनोहर जोशींचे जाणे राजकीय दृष्ट्या विविध संदर्भाचे असेल मात्र त्याला शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि भौगोलिक संदर्भही आहेत हे महत्वाचे आहे.<br />कारण खूप कमी राजकारण्यांच्या वाट्याला हे संदर्भ येतात. <br />मरण पावलेल्या व्यक्तीला चांगलेच म्हटले पाहिजे याचे बंधन नाही मात्र त्याची चिकित्सा अगदी तटस्थपणे निर्विकारपणे करायची झाल्यास त्याच्या अन्य बिंदुंचा आढावाही घेतला जाणे अनिवार्य आहे. <br /><br />आरंभीच्या काळातील शिवसेनेतील कोणत्याही नेत्याकडे सहकार वा शैक्षणिक चळवळींचा वारसा नव्हता कारण या संघटनेची / पक्षाची स्थापनाच मुळी भावनेच्या आधारावरील मुद्द्यांना धरून होती. <br />यामुळेच मनोहर जोशींचे वेगळेपण लक्षात येते. <br />त्यांचा वैयक्तिक इतिहास पाहिला की मग भिन्नतेचा हा परीघ आणखी थोडा मोठा वाटू लागतो. <br />मात्र त्यांच्या या बिंदुची चर्चा फारशी झाली नाही याची कारणे राज्याच्या जातीय, सामाजिक आणि राजकीय समीकरणात दडून होती. <br /><br />मनोहर जोशींच्या जाण्याने ऐंशी नव्वदच्या दशकातील ग्रामीण व निमशहरी तरुणांना नेहमीच्या महाविद्यालयीन शिक्षणाकडे न वळता पोटापाण्याचे शिक्षण सहज उपलब्ध करून देणारा एक वेगळा संदर्भ लयास गेला आहे. <br /><br />- समीर गायकवाड</span>sameer gaikwadhttp://www.blogger.com/profile/05106372658264914305noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1120566833830274839.post-1180544713116371402024-02-06T20:31:00.001+05:302024-02-23T20:50:14.999+05:30आयुष्याची लढाई! <p></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjnRNztojDw3mUfhkJcMTE4DgdqPob9iJRXEmL8dIGxAj-4pUF0SuDzmuQT5486A4jMu_AS7Nr0byqjg2iggJbafrGkDWgoqpXyhbpcOD_rAOqTIzcWl6d-nac9D67HNNHHps_0f2px9FQlSNPp6KPq4xt-NU7A-dmEvWdNmYba49AfeGzjzcTomw-EQZ4/s1200/ramprasad_0.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img alt="जगण्याची लढाई आयुष्य कामगार श्रमिक" border="0" data-original-height="675" data-original-width="1200" height="360" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjnRNztojDw3mUfhkJcMTE4DgdqPob9iJRXEmL8dIGxAj-4pUF0SuDzmuQT5486A4jMu_AS7Nr0byqjg2iggJbafrGkDWgoqpXyhbpcOD_rAOqTIzcWl6d-nac9D67HNNHHps_0f2px9FQlSNPp6KPq4xt-NU7A-dmEvWdNmYba49AfeGzjzcTomw-EQZ4/w640-h360/ramprasad_0.jpg" width="640" /></a></div><div><br /></div><div><br /></div><span style="font-family: Mukta; font-size: x-large;">संध्याकाळी बागेजवळ एका टोपल्यामध्ये खापराच्या मटक्यात कोळशाचे निखारे ठेवून गरम शेंगा विकणाऱ्या माणसाच्या सर्वच शेंगा विकल्या गेल्या तरी त्यातून त्याला किती रुपये मिळत असतील या प्रश्नाने नेहमीच पिच्छा केलाय!याच्या जोडीने आणखी नोंदी मागोमाग येतात. <br />गर्दीच्या ठिकाणी दिवसभर फिरस्ती करुन खेळणी विकणाऱ्याचं पोर घरी खेळणीसाठी रडत असतं, <br />बांधकाम मजूरास पत्र्याच्या वा तत्सम घरात राहावं लागतं, <br />लोकांची घरे रंगवणाऱ्या रंगाऱ्याच्या घराचे पोपडे उडालेले असतात, <br />हमाली करणाऱ्याचं ओझं कुणीच उचलत नसतं, <br />जगाच्या चपला शिवून देणाऱ्याच्या पायतल्या वाहणा झिजलेल्या असतात, <br />कापडाच्या दुकानात कामास असलेला कामगार कॉलरजवळ विरलेले शर्ट नि कंबरेत अल्टर केलेली विजार वापरतो, <br />मिठाईच्या दुकानातल्या सप्लायवाल्याच्या घरी वर्षाला देखील नीट गोडधोड होत नसतं, <br />हॉटेलमधल्या वेटरचा आपलं कुटुंब घेऊन हॉटेलात जेवायला जाण्याचा बेत कधीच तडीस जात नाही, <br />दिवसभर बाजारात उभं राहून गजरे विकणाऱ्या फुलवाल्याची बायको मोगऱ्याविनाच असते, <br />वखारीत काम करणाऱ्याच्या घरी सैपाकासाठी इंधन नसतं, <br />आडत बाजारात शेकडो पोती धान्य वाहून नेणाऱ्याच्या घरी धान्याची भांडी भरलेली नसतात, <br />चार घरची कामे करणाऱ्या मोलकरणीला आपल्या घरची धुणीभांडी करताना लाख आवंढे गुमान गिळावे लागतात... <br />या नोंदी काही केल्या संपत नाहीत. <br /><br />कष्टाच्या अंगमेहनतीच्या कामासाठी जी माणसं राबत असतात त्यातील तळाच्या माणसाचे हात रितेच असतात आणि त्याचं घरही उतरतीला लागलेलं असतं. </span><div><span style="font-family: Mukta; font-size: x-large;">श्रमणाऱ्या हातांचे बक्कळ कमावते असण्याचे एखाद दुसरे अपवाद असू शकतील मात्र अपवाद म्हणजेच सकल सत्य नसतं.<br /><br />सद्यकाळात कष्टकऱ्यांना, </span><span style="font-family: Mukta; font-size: xx-large;">अंगमेहनत करणाऱ्याना समाजात कसलेही मानाचे स्थान नाही आणि दिवसेंदिवस श्रमाच्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कलुषित होत असतानाही जे लोक नाईलाजाने स्वतःला जुंपून घेतात त्यांच्या श्रमास मूल्य नाही!</span><div><span style="font-family: Mukta; font-size: x-large;">किती क्लेशदायी विरोधाभास आहे हा!<br /><br />या माणसांचीही काही स्वप्ने असतील का आणि त्या स्वप्नांचे पुढे जाऊन काय होत असेल? <br /><br />वास्तवात ही माणसं आपली रोजमर्राची जंग दिवसाढवळ्या हरत असतात तरीही आयुष्याच्या लढाईला ते रोज उठून कशाच्या आधारे सामोरे जात असतील हा प्रश्न नेहमी अस्वस्थ करत आलाय आणि प्रेरणाही देत आलाय! <br /><br />आयुष्याच्या लढाईच्या न सुटणाऱ्या गुंत्यातल्या नोंदी.. <br /><br />- समीर गायकवाड</span></div></div>sameer gaikwadhttp://www.blogger.com/profile/05106372658264914305noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1120566833830274839.post-41697888002869302262024-02-05T15:30:00.029+05:302024-02-23T19:35:24.895+05:30कलात्मक अभिव्यक्तीवर धर्मवादाचे दडपण! <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjBYJBopioch54ajFVCqKcY93p4iCwXDpiidAvi39RxvNyQydx7mQDwbwvqOzsxBcaJpK_1B8B8GwXoow89ugA_sBqWVstyeidsAjWkbzXU9K_-rEfLHRE2Fd2YMe1sDgiXfnV5xUrxLAc3bzNuS-qg-lujtZmvGVaby47E4GYVYfeUQGNUUe-v5GmKfWI/s862/screenshot-www.loksatta.com-2024.02.23-19_30_59.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img alt="अभिव्यक्ती स्वातंत्र्य कला धार्मिक कट्टरतावाद सनातन" border="0" data-original-height="583" data-original-width="862" height="432" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjBYJBopioch54ajFVCqKcY93p4iCwXDpiidAvi39RxvNyQydx7mQDwbwvqOzsxBcaJpK_1B8B8GwXoow89ugA_sBqWVstyeidsAjWkbzXU9K_-rEfLHRE2Fd2YMe1sDgiXfnV5xUrxLAc3bzNuS-qg-lujtZmvGVaby47E4GYVYfeUQGNUUe-v5GmKfWI/w640-h432/screenshot-www.loksatta.com-2024.02.23-19_30_59.png" title="अभिव्यक्ती स्वातंत्र्य" width="640" /></a></div><br /><div><br /></div><span style="font-family: Mukta; font-size: x-large;">२०१७ साली मुंबईमधील बरेलवी रझा अकादमीने इराणी चित्रपट निर्माते दिग्दर्शक माजिद माजिदी आणि विख्यात भारतीय संगीतकार ए.आर. रेहमान यांच्या विरोधात बहिष्काराचा फतवा काढला होता. निमित्त होते एका सिनेमाचे, 'मोहम्मद - मेसेंजर ऑफ गॉड' या प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर बनवलेल्या सिनेमामुळे देशातले कर्मठ मुस्लिम संतापले होते. सिनेमा तयार झाला नि रिलीजही झाला. २१ जुलै २०२० साली तो डॉन वाहिनीवरून ऑनलाइन स्ट्रीम होणार होता. रझावाले न्यायालयात गेले नाहीत त्यांनी सत्तेत असणाऱ्या महाआघाडी सरकारकडे याचिका दाखल केली की, या चित्रपटाचे महाराष्ट्रात प्रक्षेपण होऊ देऊ नये. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यास मान्यता देत सिनेमा प्रदर्शित होऊ दिला नाही. उलट त्यांनी केंद्र सरकारला विनंती केली की देश पातळीवरही बंदी लादली जावी. सर्व सोशल मीडिया साधनांवरून हा सिनेमा हटवण्याची त्यांनी मागणी केली होती. 'द वायर'मध्ये शुद्धव्रत सेनगुप्ता यांनी त्यावर कडक निर्भत्सना करणारा लेख लिहिला होता आणि राज्य सरकारच्या या निर्णयास आव्हान देणे गरजेचे आहे असे म्हटले होते. मात्र तसे काही झाले नाही.<span><a name='more'></a></span> <br /><br />१९९७ साली नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असणारा 'गुलाम-ए-मुस्तफा' हा सिनेमा आला होता. या सिनेमाचे मूळ नाव 'मुस्तफा' असे होते मात्र कर्मठ मुस्लिमांनी धमक्या देण्यास सुरुवात केल्यावर त्याचे नाव बदलण्यात आले नि 'गुलाम-ए-मुस्तफा' असे करण्यात आले. सिनेमाच्या पोस्टरवर नमाज पढायला बसलेला नाना होता मात्र त्याच्या पायाजवळ मुस्तफा ही अक्षरे आल्याने धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचा कांगावा केला गेला, परिणामी पोस्टर बदलले गेले. पोंक्षेचे नथुराम गोडसेवरील नाटक अभिव्यक्ती म्हणून पाहिली जाते का? त्याविषयी आक्षेप नोंदवले जातातच! विविध पुस्तके, सिनेमे, सिनेमांची नावे, संवाद यावरून आपले लोक लगेच भावना दुखावून घेतात ही गोष्ट नवी नाही! हे सर्वच धर्मातले लोक करत असतात, मात्र यात सारे लोक सामील नसतात; जे कर्मठ असतात ते यात अधिक गुंतलेले असतात! <br /><br />पुण्यातला परवाचा नाटकाचा वादही धार्मिक भावना दुखावल्याचा आहे. नाट्यशिक्षणा अंतर्गत अभिव्यक्तीचे प्रकटन हा पाया होय. त्याचेच शिक्षण घेणे अभिप्रेत असते. त्यानुरूप अभ्यास, रिहर्सल आणि प्रकटन होत राहते. याचाच भाग असणारी परिक्षा पुणे विद्यापीठामधील ललित कला केंद्रात घेतली जात होती. यासाठी अख्खे नाटक सादर न करता छोटे छोटे प्रवेश सादर केले जात होते. त्यात विद्यार्थी आपापल्या आकलनशक्तीनुसार प्रवेश सादर करत होते. माहिती झालेल्या गोष्टींआधारे या प्रवेशाच्या नाट्यसंहितेनुसार दशावतारी रामायण करणाऱ्या कलावंतांच्या बॅकस्टेज मोमेंट्सवर हे नाटक बेतले होते. प्रवेशाअंतर्गत एक नाटक आहे ज्यातील कलावंत त्या नाटकातील पात्रांच्या गेटअपमध्ये आहेत आणि त्यातूनच त्यांच्यातले नाट्य समोर येते. सीतेचे पात्र साकारणारा कलावंत विंगेत धूम्रपान करतो, येडझव्या अशा शिव्या देताना दिसतो. त्याचबरोबर लक्ष्मणाची भूमिका करणारा त्याच गेटअपमध्ये या नाट्याच्या विंगेत रावणाच्या गेटअपमधील पात्राची मालिश करताना दिसतो! एकंदर नाट्याअंतर्गत नाटकातील पात्रे त्याच गेटअपमध्ये या मंचावर दिसतात नि त्यातून प्रहसन केले गेलेय. हे संदर्भ न देता या नाट्यप्रवेशाच्या क्लिप्स पाहिल्या तर असा समज होतो की यात सीता सिगारेट ओढते, वायझेड म्हणते! लक्ष्मण रावणाची पाठ दाबून देतो! हे पाहून देव देवतांवर श्रद्धा असणाऱ्या आस्तिक व्यक्तीस राग येणे साहजिक वाटावे असा हा काळ! अशा वेळी हा सर्व प्रकार काय आहे हे नीट समजावून सांगितले जाणे आणि समजावून घेतले जाणे गरजेचे होते. ते घडलेले दिसत नाही. दोन्ही बाजूने हमरातुमरीवर येत हातापायी झाल्याचे स्पष्ट झालेय. मारहाण झालीय याचा निषेध आहे.<br /><br />इथे काही प्रश्न / शंका निर्माण होतात - मंचावर धूम्रपान करणारी पात्रे दर्शवणाऱ्या महाविद्यालयीन संहितेस अनुमती दिली जाते का? पौराणिक पात्रे जेंव्हा त्याच गेटअपमध्ये डे लाईफमधल्या गोष्टी करताना दिसतात तेंव्हा जी विसंगती निर्माण होते त्यातून उपरोध / प्रहसन आकारास येते. मात्र हे करताना मंचावर एखादे डिक्लेरेशन असते की ज्यानुसार धार्मिक भावना दुखवण्याचा कोणताही हेतू नसून हा काय प्रकारचा प्रयोग आहे त्याचा उल्लेख त्यात करता आला असता का? अभिव्यक्तीचा आधार घेत अशी नाट्यसंहिता लिहिली असेल हे मान्य. मग या नाटकातील पात्रांच्या मूळ गेटअप्स मधील भूमिका ज्या राम लक्ष्मण सीता या देवदेवता रंगवणाऱ्या आहेत त्याबद्दल आक्षेप आले तर त्यावर संबंधितांचा मानस काय होता? देशातील वातावरण इतके कोलाहलग्रस्त आणि नाजूक झालेले असताना अशा स्वरूपाच्या नाट्यप्रकारांची नेमकी अनिवार्यता किती आहे याचे भान असू नये का? डार्क ह्युमर म्हणून जरी याकडे पाहिले तरी वायझेड म्हणत शिव्या देऊन सिगारेट पिणारे सीतेच्या गेटअपमधील पात्र नॉर्मल गेटअपमध्ये असते तर त्यात प्रहसन विनोदनिर्मितीच झाली नसती मग यासाठी याच देवदेवता निवडण्याऐवजी काल्पनिक देवदेवता निवडता आल्या नसत्या का? मारहाण करण्याऐवजी वास्तव जाणून घेऊन हरकत नोंदवता आली नसती का? ज्या गोष्टींवर आक्षेप आहे त्याविषयी संबंधितांकडे आपले म्हणणे मांडता आले नसते का? सादर केल्या जाणाऱ्या नाटकामुळे अशी काही रिऍक्शन येईल याची संबंधितांना पुसटशी कल्पना नसेल तर त्यांचे सामाजिक आकलन कमी आहे असे म्हणावे का? <br /><br />हिंदुत्ववादी नेहमी एक प्रश्न विचारत असतात की वारंवार आमच्याच देवदेवतांची टिंगल का केली जाते? अन्यधर्मीय देव देवता, धर्मगुरु यांची टवाळकी करणाऱ्या गोष्टी का निर्मिल्या जात नाहीत! प्रांजळपणे विचार केला तर यात तथ्य दिसते. इस्लाममध्ये कट्टरतावाद अधिक असल्याने नि थेट फतवेच काढले जात असल्याने त्यांच्या वाट्याला कुणी जात नसावे, तुलनेने हिंदू खूपच सहिष्णू म्हणावेत का? मात्र काळ बदलला तसे विचारधारेचे प्राबल्यही बदललेय. हिंदूंनाही वाटते की आमच्या देवदेवतांची टवाळकी होऊ नये, अन्यधर्मीयांच्या देवदेवतांविषयी झापडे लावून गप्प असणारे आपल्याच धर्माच्या देवदेवतांची टवाळकी करतात हे जाणीवपूर्वक होते असे त्यांना वाटू लागलेय. याला कारण काही लोकांचे सोयीस्कर मौन होय. चार्ली हेब्दोवर हल्ला झाला तेंव्हाही व्यापक आवाज उठवला जायला हवा, सलमान रश्दी ते तस्लिमा नसरीन यांच्या नावाचे फतवे काढले जातात तेव्हाही निषेधाचा स्वर हवा. निषेध जातधर्म पाहून नकोय, ज्यांनी ज्यांनी अभिव्यक्तीचा गळा दाबला त्यांच्याविरोधात निषेधाचा समान सूर हवा! तसे आपल्याकडे दिसत नाही! अर्थातच याचा दुसरा अर्थ असाही होतो की धर्मसत्तेमुळे भिकेला लागलेल्या इस्लामप्रवण देशात धार्मिक श्रद्धा / ईशनिंदा हा जसा अत्यंत नाजूक मुद्दा करुन ठेवला गेलाय, त्या आडून कडवट धार्मिकवाद जोपासला गेलाय तो आपल्याकडेही हळूहळू रुजू लागलाय! आपल्याला त्यांच्या वाटेवरुन जायचेय का? <br /><br />इतके सारे घडत असताना अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पदाधिकारी मंडळींनी आणि पुण्यातील नाट्य परिषदेच्या शाखेने जे मौन धारण केलेय ते विलक्षण क्लेशदायक आणि निषेधार्ह आहे. तातडीने त्यांनी दोन्ही बाजूंच्या मंडळींची भेट घेऊन नेमकी काय स्थिती आहे आणि काय घडले आहे याचे खरे चित्र समोर आणायला पाहिजे होते. एका प्राध्यापकास यासाठी अटक झाली असताना एरव्ही संप आंदोलने करणारी त्यांची संघटनाही गप्प राहिली. या सर्वावरून स्पष्ट होते की कुणालाही ठोस भूमिका घ्यायची नाहीये, दुसऱ्याच्या काठीने साप मारायचा आहे! वाईटपणा कुणी घ्यायचा हा आपल्याकडचा मोठा प्रॉब्लेम आहे. या सर्वांत नुकसान नाट्यचळवळीचे आणि सामाजिक विषयांवर चांगली भूमिका मांडू इच्छिणाऱ्या नाट्यकृतींचे होते! हे सर्व टाळता आले असते. एकोपा व्हावा यासाठी प्रयत्न केले जाणे गरजेचे आहे.</span><div><span style="font-family: Mukta; font-size: x-large;"><br />- समीर गायकवाड</span></div>sameer gaikwadhttp://www.blogger.com/profile/05106372658264914305noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1120566833830274839.post-75289077856794798802024-02-03T19:45:00.001+05:302024-02-23T20:13:13.511+05:30नैतिकतेचा दंडुका आपल्या हाती शोभतो का? <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjWY9pomcZfBhUDH3emTVSm0CSySqjy4ZGEDqnaqYpZPGpbng2u8KR0rqweRMHdiYhLE2G2vkIpsA5M1zb01gluy-LdkR0s0MkoLvqWCklWseNRK3zrYCMarKl5KdPIoN7yszeEPPnEmXmNXV5Us7DGTTy2hm59NKZf1Ro1boK5tiOjGXSjsfTfQb60aCI/s1200/whatsapp-image-2024-02-06-at-1.56.34-pm_2024021171713.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img alt="पूनम पांडे नैतिकता" border="0" data-original-height="628" data-original-width="1200" height="334" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjWY9pomcZfBhUDH3emTVSm0CSySqjy4ZGEDqnaqYpZPGpbng2u8KR0rqweRMHdiYhLE2G2vkIpsA5M1zb01gluy-LdkR0s0MkoLvqWCklWseNRK3zrYCMarKl5KdPIoN7yszeEPPnEmXmNXV5Us7DGTTy2hm59NKZf1Ro1boK5tiOjGXSjsfTfQb60aCI/w640-h334/whatsapp-image-2024-02-06-at-1.56.34-pm_2024021171713.jpeg" width="640" /></a></div><div><br /></div><div><br /></div><span style="font-family: Mukta; font-size: x-large;">अभिनेत्री पूनम पांडे जिवंत आहे की मरण पावली आहे हे अजून नेमके कळलेले नाही. परंतु लोकांनी सवयीप्रमाणे तिची ‘अब्रू’ चव्हाट्यावर आणलीय! आता तिची अब्रू म्हणजे काय? तिचं शरीर, तिचे लैंगिक अवयव की तिच्या सेक्स विषयक भावना? तसं तर तिने तिचे सारं शरीर पूर्वीच दाखवलेलं आहे. देहावरचे सर्व कपडे पूर्वीच काढलेत! मागून पुढून, वरून खालून लोकांनी तिला पाहिलंय! कुणी एकांतात बंद खोलीत वा लपून छपून पाहिले असेल, कुणी मित्रांबरोबर मिटक्या मारत पाहिले असेल तर कोणी थेट ग्रुप करून एन्जॉय करत पाहिले असेल पण तिला पाहिलेलं आहे हे नक्की! ज्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट नाही त्यांनी नसेल पाहिले. पण त्यांची संख्या किती हे सांगता येणार नाही. आता हेच पहा की, ती मरण पावलीय असं नुसतं सुतोवाच केलं गेलंय तरी तिच्या पोस्टवरती लोक तुटून पडलेत! जणू तिच्या देहावर पडण्याचे सुख त्यात अनुभवता आलेय. कदाचित ती जिवंतपणी यांच्यासमोर एकांतात अशीच विवस्त्र येती तर यांच्या सुखभावना प्रत्यक्षात अंमलात आणल्या असत्या! तिचा दोष काय होता? काय अपराध होता? तर ती एक पॉर्नस्टार होती. सेक्सविषयी तिच्या भावना आणि तिचं राहणं, जगण्या विषयीचे तिचे दृष्टिकोन कथित सभ्य लोकांच्या पांढरपेशी परिघाबाहेरचे होते! सर्वांनी तसेच असले पाहिजे असेही काही नाही मात्र जो परिघाबाहेर राहून बंधने तोडतो त्याला त्याची किंमत मोजावी लागते हा आपला 'न्याय' आहे!<a name='more'></a> <br /><br />ती जे काम करत होते होती ते चांगले की वाईट याची व्याख्या व्यक्तीच्या नैतिक अनैतिकतेच्या परिभाषा कोणत्या आहेत त्यावर अवलंबून आहे. तसे तर आपण सर्वच नागवे असतो, आपल्या सर्वांनाच लैंगिक भावना असतात, आपण सर्वचजण सेक्स करत असतो परंतु ते बंद खोलीत असतं! त्यामुळे या गोष्टी खुल्यावर करणाऱ्या माणसाविषयी व्यक्तीविषयी समाजामध्ये जसा संताप असतो तसेच सुप्त आकर्षणही असतं. या व्यक्ती जे काम करत असतात ते आपण करू शकत नसतो, आपण जे अनुभवलेलं नसतं, ज्याची केवळ कल्पना केलेली असते अशाचं आपल्याल आकर्षण असतं. त्यातही या गोष्टी लैंगिक भावनांशी निगडीत असल्या की अशा गोष्टींना आपल्याला मनातल्या मनात एन्जॉयही करायचं असतं आणि त्याच वेळेस दांभिक सभ्यतेचा बुरखा पांघरून त्याचा धिक्कारही करायचा असतो! हेच आपण पुनम पांडे बरोबर करत होतो!<br /><br />आता ती मेली आहे असं म्हटलं जातंय! ती किती नीच होती, छिनाल होती, बेफाम अनैतिक होती, किती बदचलन होती, तिचे चरित्र किती खालच्या पातळीवरचं होतं याच्या चर्चा लोक करताहेत. अर्वाच्च शब्दांमध्ये तिला दूषणे देताहेत. दोष देणे, गुन्हेगार ठरवणे हे समाजाचे सर्वात सोपे नि आवडते काम आहे कारण याच्यासाठी आपल्या अंगी ते चांगले पण असायलाच हवे असे काही नसतं! मात्र त्या व्यक्तीला दोष देऊन आपण तसे नाही हे सांगण्याची ती एक नामी संधी असते! कदाचित पूनम पांडे जिवंतही असेल. हा सर्व एक पब्लिसिटी स्टंटही असू शकतो कारण जेमतेम काही दिवसांपूर्वी आपल्या बजेटमध्ये सर्वाइकल कॅन्सर विषयी मोठी आर्थिक तरतूद केली गेलेली आहे आणि हा आजार काही तडकाफडकी मरण देणारा आजार नसून जी मुलगी काही तासांपूर्वी नीट होती ती केवळ यामुळे मरण पावली असावी असं छाती ठोकपणे सांगता येत नाही त्यामुळे हा एक बनाव असू शकतो. अर्थात हाही एक अंदाज आहे. अशा बनावाद्वारे त्या आजाराविषयी जागृती करायची असू शकेल किंवा ज्या कंपनीला यावर व्हॅक्सिन्स बनवायचे असतील त्या कंपनीबरोबर जाहिरात करायचे असेल. काहीही तर्क असू शकतात. ती जिवंत असो वा मृत असो तिला शिव्या घालून लोकांना हे दाखवून देण्याची संधी मिळालीय की आम्ही किती नैतिकतावादी सभ्य आहोत, आम्ही किती चांगले आहोत आणि ती किती छिनाल होती, वाईट होती! <br /><br />आपण जेव्हा एखाद्याला असंस्कृत, अनैतिक ठरवत असतो तेव्हा आपण मात्र सभ्य सच्चे आहोत असं आपल्याला बिंबवायचे असते. मात्र समाज म्हणून आपलं वर्तन तसं नसतं हे अशा घटनांवर व्यक्त होणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया पाहून लक्षात येते! <br /><br />बेसिकली आपण नालायक असतो, स्वार्थी असतो. काल-परवापर्यंत ज्या वृत्तीविषयी वा जी गोष्ट आपल्याला अपराध वाटत असते, गुन्हा वाटत असते तीच गोष्ट किंवा तो अपराध करणारी व्यक्ती आपल्या बाजूच्या माणसांमध्ये येऊन बसली की तिच्याविषयी आपल्याला कसलाच संताप येत नाही! कारण ती व्यक्ती आता आपल्या बाजूने आलेली असल्यामुळे आपली कथित शक्ती वाढलेली असते! आपला संताप त्या अपराधाबद्दल, गुन्ह्याबद्दल वा वाईट प्रवृत्तीबद्दल नसतो किंबहुना ती व्यक्ती आपल्या विरोधात आहे याचा तो चडफडाट असतो. त्यामुळे दिवसांपूर्वी आपण ज्या व्यक्तीला शिव्या दिलेल्या असतात ती व्यक्तीसुद्धा आपल्याला गोड वाटू लागते! आपलं चरित्र हे असं दोन तोंडी गांडूळासारखं आहे आणि तरी देखील आपण प्रत्येकाला उपदेश करत असतो. समोरच्याला वाईट किंवा चांगला या दोन्हीपैकी एका तराजूमध्ये हमखास टाकत असतो कारण त्याशिवाय आपला चांगुलपणा सिद्ध होणार नसतो. पूनम पांडे विषयी आपण तेच करत आहोत कारण तिला छिनाल रांड कुलटा बदचलन म्हणल्याशिवाय आपण सभ्य चांगले आहोत याचे दाखले देता येत नाही ही आपली मजबूरी असते! <br /><br />तिचं स्वतःचं आयुष्य आहे. ते ती कशी जगली, तिचे जगण्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन काय होते यावर शेरे मारण्याचा आपल्यापैकी कोणालाही अधिकार नाही. तरी देखील आपण जज बनतो आणि तिच्याविषयी अश्लाघ्य शेरेबाजी करतो. ती चांगली आहे असेच म्हटले पाहिजे असंही काही नाही. आपण कुठल्याच गोष्टीकडे तटस्थ दृष्टीने पाहू शकत नाही हा आपला मोठा लोचा झालेला आहे किंबहुना समाजामध्ये जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा आपली वर्तणूक कशी असते त्यावरून आपण स्वतःला जज करायला हवे. मग आपल्याला कळेल की आपल्यामध्ये काय दडलं आहे! बुरा जो देखने मै चला, मुझसे बुरा न कोय ही आपली सर्वांचीच अवस्था आहे मात्र आपण ती स्वीकारत नसतो! अर्थात आताच्या व्हॉटसअपबाधित काळातले लोक कबिरांनाही शिव्या घालण्यास मागेपुढे पाहत नाहीत तिथे पूनम पांडे काय चीज आहे! <br /><br />सोशल मीडियामुळे एक नक्की झालं की लोकांना थेट माणूस चघळण्याचा एक विकृत प्लॅटफॉर्म मिळाला! एखादी घटना, एखादा जिवंत / मृत व्यक्ती लोक हाती घेतात आणि त्याला ते निवांतपणे निगुतीने चघळत राहतात! अगदी निर्भया नाव देऊनही आपण चघळू शकतो! अथवा कुठली एखादी घटना असू शकते, कोणतीही व्यक्ती चघळण्यास पुरशी असते. चघळून चघळून तिचा लगदा झाला की ती फेकून देतो! थोडक्यात आपल्याला एक नित्य नवे हाडूक हवे असते जेणेकरुन त्याद्वारे आपण किती चांगले आहोत याचा आपल्याला केवळ देखावा करायचा असतो! माणसाने आपल्या संवेदना, भावना हडूक चघळण्याच्या टप्प्यावर आणून ठेवल्यामुळे आपण एक श्वापद आहोत हे नव्याने सिद्ध झालेय. पूनम पांडे हे ताजे हाडूक आहे, त्यातला रस संपला की नवे हाडूक आपण हाती घेऊ!<br /><br />जर आपण खरेच चांगले, सदवर्तनी असू तर वाईटाचा, वाईटपणाचा आणि वाईट वागणाऱ्या लोकांचा आपल्याला सदैव संताप यायला हवा आणि आपलं वागणंही चांगलं असावं! दुर्दैवाने या दोन्ही गोष्टी आपण गमावून बसलो आहोत त्यामुळे केवळ देखावा करणे हेच आपल्या हाती उरलेय! आणि आपल्यापैकी बहुतेकजण हेच तर करत असतात! <br /><br />हे वाचताना काही दोषलिप्त चेहरे तुमच्या डोळ्यापुढे तरळले असतील आणि आपण त्यांच्या खांद्याला खांदा लावून बसत आहोत याची आपल्याला लाजशरम वाटत नाही इतके आपण कोडगे झालो आहोत हे कळलेही असेल पण वळले नसेल! म्हणून पूनम पांडे त्यातल्या त्यात थोडी बरी तरी, कारण ती जशी होती तशी राहत होती. ती दोनतोंडी गांडूळ नव्हती! तरीही तिचे एक चुकलेच की सवंग प्रसिद्धीचा शिक्का बसेल अशा पद्धतीने तिने कॅन्सरच्या जागृतीच्या नावाखाली हा सर्व मेलोड्रामा केला. तिचा हा मार्ग नक्कीच चुकीचा होता. चुकीला माफी नसते हा नियम काहींना लागू असतो, काहींना नसतो! जनतेला नैतिकता शिकवायला आवडत असल्याने पूनमसारख्या कथित चीप व्यक्तिरेखा सहजी ठोकून काढणे हा सर्वांचा आवडता छंद असतो! इतरांना शहाणपणा शिकवण्यासाठीचा नैतिकतेचा दंडुका आपल्या हाती शोभतो का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे हे खरे! <br /><br />- समीर गायकवाड </span>sameer gaikwadhttp://www.blogger.com/profile/05106372658264914305noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1120566833830274839.post-14167741053708937722024-02-01T21:16:00.004+05:302024-02-07T16:45:06.529+05:30हे विधात्या इतके तर तू करू शकतोस!<p style="text-align: left;"></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj9bVEn5dP8lRtOnGMCx-74EQDvLaK0Aa-WiD_xdl2mXWSg_vLyKuPdqnGrpvbg1RZNtLvWZ_81bUAd0woxqsDQz-FhPOyL4oWUUayJpRxCpXPTUeJTytB9MXyYDTIi8Iov2v3ZrXAjmEABVyE_YYIf9eHPPRoOiXtzaHQ8bQ_7TG_RR385GoUnarnqCI4/s1600/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87.jpeg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1000" data-original-width="1600" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj9bVEn5dP8lRtOnGMCx-74EQDvLaK0Aa-WiD_xdl2mXWSg_vLyKuPdqnGrpvbg1RZNtLvWZ_81bUAd0woxqsDQz-FhPOyL4oWUUayJpRxCpXPTUeJTytB9MXyYDTIi8Iov2v3ZrXAjmEABVyE_YYIf9eHPPRoOiXtzaHQ8bQ_7TG_RR385GoUnarnqCI4/w640-h400/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87.jpeg" width="640" /></a></div><span style="font-family: 'Baloo 2'; font-size: x-large;"><div><span style="font-family: 'Baloo 2'; font-size: x-large;"><br /></span></div><div><span style="font-family: 'Baloo 2'; font-size: x-large;"><br /></span></div>दोनेक वर्षांपूर्वीच्या कडक उन्हाळ्यातली गोष्ट. बरड रानातल्या बांधालगत असणाऱ्या भल्याथोरल्या उंच पिंपळावर वरच्या बाजूला धनेश (हॉर्नबिल) पक्षाने घरटे केले होते. जाडजूड फांदीच्या ढोलीत खचका पाहून घरटं बांधलेलं. एरव्ही भयंकर एकजीव असणारी नर मादीची जोडी घरटं बांधताना नर खाली साठलेले चिखल मातीचे गोळे वर घेऊन जायचा. झाडाच्या बुंध्यापाशी जुनी डोबी होती, त्यातलं पाणी झिरपून तिथं ओल तयार झाली होती. त्याच चिखलाचे गोळे नराने वर नेलेले. मादीने बहुतके तीन अंडी घातली होती, ती आतच बसून होती. अंडी उबवून पिले जन्माला यायच्या काळात घरट्याचे तोंड जवळपास पूर्णतः बंद झालेलं. फक्त मादीची चोच बाहेर राहील इतकीच सांद त्याने ठेवली होती. पिले जन्मली. मादी पिलांसोबत आत घरट्यात आणि नर सकाळ संध्याकाळ घरट्यापाशी! दिवसातून दोनतीन वेळा तरी तो त्यांचं खाद्य घेऊन तिथं यायचा. मादीच्या तोंडात घास घालायचा, ती आपल्या चोचीतून पिलांच्या चोचीत घालायची. पिले दोन तीन आठवड्याची झाली असतील. एव्हाना मे महिन्याचे कडक उन्हाचे तडाखे बसू लागले होते. एके दिवशी हवेतला उष्मा अतिशय टोकाला पोहोचला. वाऱ्याचे नामोनिशाण नव्हते. जीवाची नुसती काहिली होत होती. रणरणत्या उन्हात सारं चराचर म्लान होऊन निपचित पडलं होतं. त्या जीवघेण्या उन्हातही नर बाहेर पडला होता. मात्र त्यादिवशी अघटित घडलं. अवकाळी पाऊस बरसला. विजेच्या कडकडाटासह नि मेघगर्जनेसह पाऊस कोसळत होता. जवळपास तासभर पाऊस पडत होता. दोन तीनदा तरी वीज कोसळल्याचा आवाज आला. काळजात धस्स झालं. संध्याकाळ सरून गेली. गडद रात्र आली. नर परतला नव्हता. पिले व्याकुळ होऊन गेली होती. त्यांचा आवाज कुंठला होता, दोनच दिवसांनी मादीने जीव सोडला. धनेश पक्षाच्या जोडीतला नर मरण पावला तर मादी पिलांसकट जीव सोडते! किती हे प्रेम, किती उत्कट या संवेदना! कुठले विधी न करता नि कुठले प्रस्थ न माजवता हे पक्षी मुक्याने आपली प्रेमकथा निसर्गाच्या पटावर लिहून जातात. ही संवेदनशीलता अफाट आहे.<span><a name='more'></a></span> <br /><br />काही वर्षांपूर्वी थायलंडमधील काओयेई राष्ट्रीय अभयारण्यामध्ये एका कळपातील आठ हत्तींनी रस्ता अडवून धरल्याने तिथला वनअधिकारी ताठकळून गेला, थोड्या वेळाने हत्ती आपण होऊन एकाच दिशेने उदासपणे निघून गेले. त्या हत्तींच्या मागे गेल्यावर एका धबधब्याजवळ त्याला दोन हत्ती अगदी टोकाच्या कडेवर उभे असल्याचे दिसले. अधिकाऱ्यास राहवले नाही त्याने जवळ जाऊन पाहिलं. तर अत्यंत हृदयद्रावक दृश्य त्याला दिसलं. तळाशी तीन वर्षांच्या एका छोट्या हत्तीचा मृतदेह त्याला दिसला. बेचैन होऊन त्यानं तळापाशी उतरून जाऊन पाहिलं तर आणखी पाच हत्तीचे मृतदेह आढळून आले. कदाचित हत्तीच्या त्या पिलाचे ते आई वडील असतील, भाऊबंद असतील, मित्र असतील! घटना घडून दोनतीन दिवस झाले तरी ते दोन हत्ती तिथेच उभे होते, काय विचार करत असतील ते? कळपातले ते दोन हत्ती अत्यंत कठीण अवस्थेत उभे होते कारण तिथे जेमतेम दोन माणसं उभी राहू शकतील इतकीच जागा होती! पिल्लाला वाचवण्याच्या नादात कळप खाली कोसळल्यानंतर कळपातील ते दोघेजण त्या धबधब्याच्या बाजूने निम्मा डोंगर उतरून अर्ध्यात आले आणि धबधब्याच्या दिशेने तोंड करून उभे राहिले. कदाचित त्यांना वेडी आशा असावी की आपले प्रियजन आता तरी आपल्या नजरेस पडतील ! पण तसे होणे नव्हते. नात्यांची ही दास्तान अत्यंत आर्त करुण अशीच आहे. मृत हत्तींच्या शोकाने गहिवरून गेलेल्या दुसऱ्या हत्तींना ही घटना उघडकीस येण्यासाठी रस्ता अडवण्याची कल्पना कशी सुचली असेल हा प्रश्नही काळीज पोखरून टाकणारा आहे. हत्ती हा सर्वात हुशार प्राण्यांपैकी एक असल्याचे म्हटले जाते. हत्ती आपल्या कळपाची आणि कळपातील प्रत्येक सदस्याची काळजी घेताना दिसतात. अनेकदा यासंदर्भातील वेगवेगळे किस्से व्हिडिओ आणि फोटोंच्या माध्यमातून समोर येत असतात. अगदी कळपामधील प्रत्येक सदस्य सोबत घेऊन प्रवास करण्यापासून शिकाऱ्यांपासून आपल्या लहान बाळाला वाचवण्यासाठी हत्तीणीने दिलेली झुंज असतो हत्तींमध्ये एकोप्याची भावना दिसून येते. मात्र याच एकोप्याच्या भावनेमुळे या सहा हत्तींना प्राण गमावावा लागला. <br /> <br /> धबधब्यावरुन खाली पडणाऱ्या पिलाला वाचवायला जाऊन कळपातील इतर हत्तीही खाली पडल्याने सर्व सहा हत्तीचा जागीच मृत्यू झाला. वाचवण्यात आलेले दोन्ही हत्ती अधिक काळ जिवंत राहण्याची शक्यता कमी असल्याचे प्राणी तज्ञांनी म्हटलं नि जग हळहळून गेलं. हत्ती हे अन्न शोधण्यासाठी एकमेकांवर अवलंबून असतात. तसेच मानसिकदृष्ट्या एकमेकांवर निर्भर असतात त्यामुळेच वाचलेल्या हत्तींना मानसिक धक्क्यातून सावरणे कठीण होते. त्यामुळे ते आणखी खूप दिवस राहणं अशक्य होतं. प्राण्यांचे बरे असते आपला साथीदार मरून गेला की जास्त आशाअपेक्षा न करता लवकरात लवकर आपणही मरून जायचं! स्वार्थी मनुष्य प्राण्याचे तसे नसते, त्याचे लचांड काही केल्या संपतच नाही.<br /><br /></span><div><span style="font-family: 'Baloo 2'; font-size: x-large;">काही आठवड्यांपूर्वी घरानजिकच्या रस्त्यावर कुत्री व्याली होती. अर्धा डझन गोजिरवाण्या पिलांना तिने जन्म दिलेला. नंतर अपघातात तिची दोन पिलं दगावली तेव्हा ती दिवसभर रस्त्याच्या कडेला बसून होती. तिची बाकीची पिलं तिला घट्ट बिलगून बसली होती. तिचा रडवेला चेहरा काही केल्या नजरेसमोरून जात नाही.<br /><br />घराशेजारी कारवारी वृध्द जोडप्याचा बंगला आहे. कंपाऊंडला लागून त्यांनी छानपैकी नारळाची झाडे लावलीत. ती आता बरीच जुनी आणि उंचच उंच झालीत. यातल्याच एका झाडावर घारीने घरटे केलेलं. खरं तर याच झाडावर दोनेक वर्षांपूर्वीही घारीनं घरटं बांधलं होतं. नोव्हेंबरमध्ये घरटं बांधलेलं आणि मार्चमध्ये तर पिलू जन्मास आलेलं. त्याला स्वतंत्र उडता येईपर्यंत नर मादी दोघेही अतोनात दक्षता नि काळजी घेत होते. यंदा मात्र लवकर घरटं बांधलं असावं. निसर्गाचं चक्र बदलतंय हे पक्षांनाही कळले असेल का? तर यंदाच्या हंगामीही त्यांच्या घरट्यात इवलुशी चोच उगवून आली होती. तिचे त्यांना कोण अप्रूप होते. दोघेही पाळीपाळीने तिची काळजी घेताना दिसत. <br />मात्र आज सकाळपासून काहीतरी बिनसले होते. मादी घरट्यापासून हललीच नाही आणि नर सारखा घिरट्या घालत होता. अधून मधून तो खाली झाडाच्या शेंड्यापाशी यायचा नि पुन्हा उडून जायचा. त्यावेळी मादीचा काहीच प्रतिसाद नव्हता. ती जणू थिजून गेली होती. वरती जाताना नर अशा काही वळणा वळणाच्या झेपा घ्यायचा की काही क्षणात तो जमिनीवर कोसळेल की काय असे वाटायचे. दिवसभर त्यांचे हेच चालले होते. अखेर दिवस मावळला. सूर्यबिम्ब पश्चिमेला दुखऱ्या मनाने विरून गेले. मनी शंका येऊन गेली, पंख थकल्याने नर कोठे कोसळून गेला असेल का? काही आक्रीत घडलेय का? शंका खरी ठरली. घरट्यातली चोच अकाली अनंताच्या प्रवासाला गेली होती. घरटे मुके झाले होते! मादी तिथेच बसून होती!<br /><br />आता अंधार काळा कभिन्न झालाय. या मौन घारीला पाहून मला लता आणि तिचा नवरा नरसू आठवले! बाळंतपणानंतर अल्पावधीतच मूल दगावलं नि लतीच्या डोक्यावर परिणाम झाला. लोक म्हणू लागले लती मेंटल झाली. कुणी काही म्हटलं तरी नरसूने तिला अंतर दिले नाही. लतीपासूनची पहिली पोरगी आठ वर्षांची होती. त्यांना अजून एक अपत्य हवे होते, मात्र काही केल्या दिवस जात नव्हते. डॉक्टर, दवाखाने, उपास तपास सारे उपाय झाले होते. अखेरीस गोड बातमी पक्की झाली. लतीचे पाय जड झाले होते. कथित नवसा सायासाने पोर जन्मले अशी त्यांची धारणा झाली होती. दिवस भरताच गोंडस गोजिरे पोर जन्मले.<br />आईबाप खुश झाले. मात्र आनंद फार काळ टिकला नाही. दोनेक महिन्यात लतीचे बाळ अकाली गेले! लतीला हा धक्का सहन झाला नाही. तिच्या मेंदूवर परिणाम झाला. भावकीने नरसूला खूप समजावून सांगितले तरी त्याने दुसरे लग्न केले नाही. लोक असंवेदनशील होत म्हणाले, नरशा भाड्या अक्कल हुकलेला बाईलभाड्या आहे! तरीही तो खचला नाही. काही वर्षांनी लती माणसात आली. पण ती सुन्न शांत बसून असायची. तिची नजर शून्यात असायची. सारी कामे यंत्रवत करायची. दरम्यान मुलगी थोर झाली, नरसूने तिचे लग्न लावून दिले.</span></div><div><span style="font-family: 'Baloo 2'; font-size: x-large;"><br />आता नरसूच्या घरी त्याचे म्हातारे आईबा आणि लता असे चौघेच असतात. रोज संध्याकाळ होताच तुळशीला दिवा लावून लती उंबरठ्यापाशी बसून राहते. ती काहीच बोलत नाही मात्र तिचे गोठलेले डोळे बोलत असतात! अस्ताला जाणारा सूर्य रोज सांजेला तिच्या डोळ्यांचा निरोप घेऊन जातो मात्र तिच्या डोळ्याला डोळा भिडवायची ताकद कुणाच्यातच नसते! गेलेल्या जिवासाठी शोक करणारे खूप असतात मात्र त्यातच जीव गुंतून पडलेले लवकर सावरत नाहीत, अशांना सावरण्यासाठी काळ सरसावतो. मात्र हा काळ जाता जात नाही, तोवर हळव्या झालेल्या जिवाने कुणाकडे बघून दिवस काढायचे? कदाचित आकाशात उडणाऱ्या नराला मादीच्या डोळ्यात पाहवले नसेल. त्याने स्वतःला संपवले असेल का? मला बऱ्याचदा वाटते की नरसूच्या पोरीला जे अपत्य होईल त्याचा तोंडवळा लतीच्या अकाली मरण पावलेल्या बाळासारखा असेल! रस्त्याच्या कडेला व्यालेल्या कुत्रीला नि घारीलाही पुढच्या हंगामात तसेच पिलू लाभावे!<br />हे विधात्या इतके तर तू करू शकतोस!<br /><br />- समीर गायकवाड </span></div><div><span style="font-family: 'Baloo 2'; font-size: x-large;"><br /></span></div><div><span style="font-family: 'Baloo 2'; font-size: x-large;">#प्राणीप्रेम #मुकेजीव #doghelp #animal #saveplanet #love #life #आयुष्य #जीवन #पशूपक्षी #मरण #जन्म #सुख #विधाता #आई #पिलू </span></div><div><span style="font-family: 'Baloo 2'; font-size: x-large;"> </span></div>sameer gaikwadhttp://www.blogger.com/profile/05106372658264914305noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1120566833830274839.post-86757218672246421792024-02-01T20:41:00.002+05:302024-02-01T20:44:33.515+05:30आपल्याच धडावर आपलेच शिर असले पाहिजे!<div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiyfKe90P_p99p7semy4QZL14YukKhnZHqr9k2C05s_JMDu8VLoHyX5FmzyBqc8MT8DXhMRaAelUdn0vZAv9yhHv4l_jLx7JbQunA5O5OhdoOSx-OThmanY6IwJJ3f0r-Q0R1lPm7U78QJtSh_EnaUlcP3RZ7MkuHE8dtS16EkOzq7M3_CyHkJ54HBSJUc/s900/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%A6.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="450" data-original-width="900" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiyfKe90P_p99p7semy4QZL14YukKhnZHqr9k2C05s_JMDu8VLoHyX5FmzyBqc8MT8DXhMRaAelUdn0vZAv9yhHv4l_jLx7JbQunA5O5OhdoOSx-OThmanY6IwJJ3f0r-Q0R1lPm7U78QJtSh_EnaUlcP3RZ7MkuHE8dtS16EkOzq7M3_CyHkJ54HBSJUc/w640-h320/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%A6.jpg" width="640" /></a></div><br /></div><div><span style="font-family: Mukta; font-size: xx-large;"><br /></span></div><div><span style="font-family: Mukta; font-size: x-large;">आमच्या इथल्या एका कुख्यात तसेच विख्यात(!) कनवाळू महान राजकीय नेता कम कार्यकर्त्याचा मध्यंतरी अकाली (कारण तेच ते प्रसिद्ध लिव्हर / किडनी फेल्युअरचे!) मृत्यू झाला.</span></div><span style="font-family: Mukta; font-size: x-large;">त्याची मयत वगैरे जाम थाटात काढली होती. तुफान पब्लिक मयतीला आलं होतं (तसेही आमच्या इथे रिकामटेकडी माणसे खूप असतात). पुढारी तर हरामी सगळे झाडून आले होते, त्या समाजातील पुढच्या मतांवर त्यांचा डोळा जो असतो! असो. <br />मयत झाली. त्या राजकीय कार्यकर्त्याची पत्नी अकाली विधवा झाली. <br />काही नालायकांनी तिच्या कानात राजकीय पेरणी करण्याचा प्रयत्न केला पण ती बधली नाही. <br />त्याच्या कोवळ्या पोरांना काही हराम्यांनी मधाचे बोट लावले. <br />पोरं बिथरली. बापाचे कटआऊट लावून बापाच्या राजकीय दुष्मनांना चॅलेंज देऊ लागली. परिसरात असणाऱ्या दोन नंबर धंद्यावरून भांडणे होऊ लागली.<span><a name='more'></a></span><br />माझा एक जवळचा मित्र या दिवंगत राजकीय कार्यकर्त्याच्या जवळचा होता, तो काही वर्षापूर्वी अपघातात मरण पावलेला. त्याची दोन पोरे या कार्यकर्त्याच्या मागे फिरत. <br />उत्सव मिरवणुका असल्या की त्यांचा थाट असे. अभ्यासात लक्ष नव्हते. <br />घरच्या गरजा त्यांची आई भागवायची, एका खाजगी ऑफिसमध्ये ती माऊली दिवसभर काम करायची. <br />आई कामावर बाहेर पडली की ही पोरे बाहेर बोंबलत फिरत. <br />घरी म्हातारी आज्जी होती तिचे कुणी ऐकत नसे. <br />पोरे अक्षरशः वाया गेली होती, नात्यातल्या आणि ओळखीतल्या हरेकाने समजून सांगूनही काही फरक पडला नव्हता. मात्र हा जननायक कार्यकर्ता मेला आणि ती पोरे उघडयावर पडली. त्यांच्या सवयींचे वांदे झाले. <br /><br />घरी भांडणे सुरु झाली. कार्यकर्त्याच्या पोरांनी या पोरांना जास्त जवळ केले नाही कारण यांच्यासाठी त्यांच्याकडे पैसा नव्हता! चारेक दिवसांपूर्वी पोरांच्या आज्जीला हृदयविकाराचा धक्का बसला. <br />सिव्हिलमध्ये ऍडमिट केले गेले. तिथे महत्वाची औषधे नव्हती, औषधपाण्याला पैसे नव्हते. <br />आईने किडूकमिडूक दागिने गहाण ठेवले. <br />म्हातारी वाचली मात्र ते दागिने कधीच सुटणार नाहीत याची त्या माऊलीला जणू खातरीच होती. <br />हे कमी की काय म्हणून दोन पोरांपैकी एकाने परवा दिवशी दुसऱ्याच्या मोटरबाईकने एकाला धडक दिली. <br />कच्ची तक्रार दाखल झाली. <br />बाईचा धीर सुटला. चार चौघांना फोन केला. कुणी आले कुणी नाही. <br />काहींनी धीर दिला तर कुणी हात वर केले. <br />न राहवून ओळखीतल्या एका पोलीस अधिकाऱ्याने मला फोन केला, त्याला ठाऊक होते की पोरांचा बाप माझा मित्र होता. फोन करुन त्याने सारा वृत्तांत कथन केला. त्यांना काय मदत केली हे लिहिण्याची ही जागा नाही. <br /><br />मात्र त्या दोन्ही मुलांना इतके वाईट झापले की त्यांच्या डोळ्यात पाणी आले. <br />माझा काळा भूतकाळ त्यांना सांगितला. बिघडवायला शेकडो हात पुढे येतात मात्र सुधरवण्यासाठी मोजकेच हात पुढे येतात याची जाणिव करुन दिली. <br />त्यांचा बाप कुठे चुकला आणि ते कुठे चुकत आहेत हे ही त्यांना सांगितलं. <br />आईला आधार द्यायचा सोडून राजकारण्यांच्या नादी लागून काही उपयोग नाही हे ही सांगितले. पुढे जाऊन भीक मागण्याची ही लक्षणे आहेत. <br /><br />आयुष्यभर गुरासारखे कष्ट केलेल्या, आपल्या प्रत्येक हौस मौजेचा स्वप्नांचा जीव घोटलेल्या विधवा आईने बेवारस म्हणून मरावे अशी अपेक्षा आहे का असे कळवळून विचारताच धाकटा पोरगा रडू लागला. <br />जवळ आला आणि मिठी मारून रडू लागला, बहुतेक गेल्या कित्येक वर्षात त्याने कुणाला मिठीही मारली नसावी आणि तो रडला ही नसावा. <br />दोन्ही पोरांना समजावून सांगितले. रीतसर कॉलेजला जाऊन फालतू धंदे बंद करण्याचा शब्द त्यांनी दिलाय. <br /><br />आमच्या सोलापुरात गल्लोगल्ली अशी कुटुंबे आणि असे सर्वपक्षीय राजकारणी सापडतील ज्यांना अशी पोरे रॉ मटेरियल म्हणून हवी असतात! या हरेकास नियतीने सडवले पाहिजे, रडवले पाहिजे म्हणजे यांना कळेल की लोकांची पोरे नासवण्याने काय दुःख वाट्याला येते! <br /><br />घरी बाप असला पाहिजे आणि त्याला खमकी भूमिका घेता आली पाहिजे. <br />आईही खमकी भूमिका घेतेच मात्र सारी जबाबदारी तिच्यावर पडली की ती इथे कमी पडते हे निरीक्षण आहे. <br /><br />राजकीय नेत्यांच्या मागे धावून आपल्या आयुष्याची माती करून घेणाऱ्या प्रत्येक नालायक माणसाने आपला नाहीतर निदान आपल्या बायकापोरांचा विचार तरी केला पाहिजे. <br />एखादा सन्माननीय अपवाद वगळता बाकीचे तमाम राजकारणी तर नीचच असतात कारण त्यांना माणसं फक्त नि फक्त वापरायची असतात! <br />आपल्याच धडावर आपलेच शिर असले पाहिजे! <br /><br />- समीर गायकवाड.<br /><br />नोंद - दोन दशकांपूर्वी बऱ्यापैकी अशाच स्थितीतून मी गेलो आहे. माझा भूतकाळ वाईट आहे, 'रेड लाइट डायरीज - खुलूस'च्या प्रस्तावनेत याविषयी मी लिहिलेय देखील! त्यात लपवण्यासारखे काही नाही. माझ्या भावंडांनी मला पुन्हा माणसात आणलं हे वास्तव आहे. वेळीच सावध करणारी माणसं आयुष्यात पुन्हा पुन्हा भेटत नाहीत. नियती इतर अनेक प्रकारच्या संधी वेगवेगळ्या रूपात पुन्हा पुन्हा देत असेल मात्र अपमार्गाच्या दलदलीतून बाहेर पडण्यासाठीची सशक्त संधी एकदाच येते ती ओळखता आली पाहिजे नाहीतर घसरण होत राहते आणि आयुष्याच्या शेवटी सोबतीला उरतो पश्चात्ताप नि खंगलेले शरीर!</span><div><span style="font-family: Mukta; font-size: x-large;"><br /></span></div><div><span style="font-family: Mukta; font-size: x-large;">#राजकारण #बेकारी #पुढारी #समाज #माणुसकी #मदत </span></div><div><span style="font-family: Mukta; font-size: x-large;">#धीर #विधवा #बहकावा #सन्मार्ग #आयुष्य </span></div>sameer gaikwadhttp://www.blogger.com/profile/05106372658264914305noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1120566833830274839.post-2933023684608194962023-08-03T14:08:00.007+05:302023-08-04T08:08:48.735+05:30प्रिय महानोर<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgDJWNy8RetWlnUPJcvgQAmovPqrkWR9onf7cy02PoSdlRPgcKhNBF7lpR7AOfrH3LFATrN-Bxk9QB0YZHxtoujmb2jMs9_EDWdHoJxffn8G0HLjpvTlyUwwbIUrK_UUQH7IEk7xbzzDNpRJQasbnhnsci_0ViyMwctBO2QxyNZnqQzKSnRZNx5Vi6v-mY/s328/Na_Dho_Mahanor.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="328" data-original-width="218" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgDJWNy8RetWlnUPJcvgQAmovPqrkWR9onf7cy02PoSdlRPgcKhNBF7lpR7AOfrH3LFATrN-Bxk9QB0YZHxtoujmb2jMs9_EDWdHoJxffn8G0HLjpvTlyUwwbIUrK_UUQH7IEk7xbzzDNpRJQasbnhnsci_0ViyMwctBO2QxyNZnqQzKSnRZNx5Vi6v-mY/w426-h640/Na_Dho_Mahanor.jpg" width="426" /></a></div><div><br /></div><span style="font-family: Tiro Devanagari Hindi; font-size: x-large;"><div><br /></div><div>प्रिय महानोर, </div><div><span style="font-family: Tiro Devanagari Hindi; font-size: x-large;"><br /></span></div>तुम्ही गेलात आणि शिवारं उदासली.<br />रानामळ्यातली हातातोंडाशी आलेली तेजतर्रार पिकं मलूल झाली.<br /><br />गोठ्यातल्या गायी मौन झाल्या, <br />माना तुकवून उभी असलेली कुसुंबी झाडं थिजली<br /><br />उजाड माळांवरुन भिरभिरणारं वारं सुन्न झालं!<br />हिरव्याकंच घनदाट आमराईने शांततेचं काळीज चिरणारी किंकाळी फोडली!<br />विहिरींच्या कडाकपारीत घुमणारे पारवे स्तब्ध झाले<br /><br />गावाकडच्या वाटेवरल्या पाऊलखुणा गहिवरल्या<br />घरट्यांतल्या पाखरांचा किलबिलाट निमाला<br /><br />उंच गगनात विहरणारे पक्षांचे थवे एकाएकी विखुरले<br />पाऊसओल्या मातीस गलबलून आले<br /><br />तुम्ही गेलात अन् वसुंधरेची हिरवाईही रुसली<br />अजिंठ्यातली चित्रे गदगदली, <br />वेरूळच्या लेण्यांचे हुंदके दाटले<br />पाऊसधाराही गहिवरल्या<span><a name='more'></a></span><br /><br />सखीच्या चांदणगोंदणातली नक्षी फिकी झाली<br />रानातल्या पाऊलवाटांवर रुळणारा पैंजणनाद विरुनी गेला<br /><br />आकाश पांघरोनी मन दूरदूर गेले<br />भरदुपारीच रानात झाली एककल्ली सुनसान सांजवेळ<br /><br />'डोळ्यांच्या गलबतांतले मनमोर' निघून गेले<br />गात्रात कापणारा ओला पिसारा सावनी हवेआधीच घुसमटला<br />केसांत मोकळ्या या वेटाळुनी फुलांना, उमलून कुणी न येई आता!<br /> <br />'मन चिंब पावसाळी मेंदीत माखलेले<br />त्या राजवंशी कोण्या डोळ्यांत गुंतलेले' आता शोधायचे कोठे?<br />गाण्यात सांडलेलं काचबिंदी नभ उभं वेचायचे कसे?<br /><br />मातीच्या गर्भातल्या बीजांचे, सांगा आता अश्रू कुणी पुसावे?<br />गहिवरल्या बांधांनी कुठे पहावे?<br /><br />पाऊस सरता पोटऱ्यातल्या गव्हाचे हसू ओंब्यात दाटेल, <br />त्याच्याशी खेळायचे कसे?<br /><br />आंब्याच्या झाडाला मोहोराचा वास झेपेनासा होईल <br />तेव्हा त्याला सावरायचे कसे?<br /><br />गाभुळ्या चिंचेला नवतीचा भर पोटी धरवणार नाही <br />तिला झुलवायचे कसे?<br /><br />सरते शेवटी इतके तरी सांगा, <br />अक्का गेल्यानंतर तुम्ही उदास झालात अन् त्यांच्या वाटेवर निघून गेलात<br />यंदाच्या मौसमात जुंधळयास चांदणे लगडलेच नाही तर तुम्हाला शोधायचे कुठे?<br /><br />आम्हाला तुमच्याशी बोलायचे नाही, आम्ही रूसलोय तुमच्यावर. <br />आम्ही हे बोलू तरी शकतो पण, पण - <br /><br />गोठ्यातल्या गायींच्या अश्रुंना तर आवाजही नाही <br />काळ्यातांबड्या मातीतल्या हिरवाईला तर वाणी ही नाही!<br /><br />महानोर तुम्हीच सांगा आता, त्यांनी रडायचे तरी कुणाच्या कुशीत?<br />ते सारे हमसून हमसून रडताहेत, त्यांचे सांत्वन तरी करायचे कुणी?<br />सांगा त्यांचे सांत्वन करायचे कुणी?<br /><br />पळसखेडची गाणी आता मुकी होतील, ती गायची कुणी<br />रातझडीचा पाऊस काळजात घर करुन राहील, त्याला निरोप द्यायचा कुणी?<br /><br />'झिळमिळ झाडांच्या झावळ्या दाटीत, पांदीतली पायवाट पांगेल पाण्यात'<br />तिच्यावरती कविता लिहायची कुणी? <br /> <br />या भुईच्या दानाचे करायचे काय, दान अर्ध्यावर टाकून गेलात तुम्ही!<br />तुम्ही असे जायला नको होते. नको होते.. <br /><br />- समीर गायकवाड</span><div><p></p></div>sameer gaikwadhttp://www.blogger.com/profile/05106372658264914305noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1120566833830274839.post-70042132310402281902023-07-30T08:57:00.003+05:302023-07-30T10:01:55.423+05:30लोभ आणि धर्म - ओशोच्या गोष्टी. <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgPPdoCUJ6QfABdxZHc7hQqOrQUuNuI1FVhlNfCDQOikdrtxIcMJuxP1T7UcGXmc6BGa0EDITJMajLg_2_sBPf3VU0QABhMWev0KhgET9-U3iDqfoQNqh4WTmcHV8W90HmuQymzxe4uoc47MRD5wNbdfOXshEQVr2wuapZNYqkxeHWZVL5tL9zwJOhiehs/s1448/screenshot-images.yourstory.com-2023.07.30-08_37_29.png" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><span style="color: black; font-family: Tiro Devanagari Hindi;"><img border="0" data-original-height="922" data-original-width="1448" height="408" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgPPdoCUJ6QfABdxZHc7hQqOrQUuNuI1FVhlNfCDQOikdrtxIcMJuxP1T7UcGXmc6BGa0EDITJMajLg_2_sBPf3VU0QABhMWev0KhgET9-U3iDqfoQNqh4WTmcHV8W90HmuQymzxe4uoc47MRD5wNbdfOXshEQVr2wuapZNYqkxeHWZVL5tL9zwJOhiehs/w640-h408/screenshot-images.yourstory.com-2023.07.30-08_37_29.png" width="640" /></span></a></div><span style="font-family: Tiro Devanagari Hindi;"><br /></span><div><br /></div><span style="font-family: Tiro Devanagari Hindi; font-size: x-large;">एकदा मी एका छोट्याशा गावात गेलो होतो. तिथे नवीन मंदिर बांधण्यात आले होते आणि मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा चालू होता.<br />शेकडो पुरोहित आणि संन्यासी जमले होते. हजारो बघ्यांची गर्दी जमली होती.<br />पैशाचा बिनधास्तपणे मुक्तहस्ते व्यय सुरु होता. गाव मात्र वेगळ्याच कारणाने थक्क झाले होते!<br />कारण ज्या व्यक्तीने मंदिर बांधले आणि या सोहळ्यात एवढा पैसा खर्च केला त्याहून अधिक कंजूष माणूस कोणी असू शकत नाही, असे त्या गावातील लोकांना वाटत असे. ती व्यक्ती कंजूषपणाची आदर्श होती.<span><a name='more'></a></span> <br /><br />त्याच्या हातातून एक पैसाही कधी सुटलेला दिसला नव्हता. मग त्याच्यात हा बदल कसा झाला? <br />ही चर्चा आणि चमत्कार सर्वांच्याच ओठावर होता. <br />भिकारीसुद्धा त्या व्यक्तीच्या दारात कधी जात नसत. कारण त्या घराच्या दरवाजांना केवळ घ्यायचंच ठाऊक होतं. त्यांना देण्याचे ज्ञानच नव्हते. <br />मात्र नंतर असे काय झाले की त्या व्यक्तीने जे स्वप्नातही केले नव्हते ते प्रत्यक्षात डोळ्यांसमोर घडत असल्याचे पाहून सर्वजण थक्क झाले होते.<br />या प्रसंगाने चकित झालेल्या एका वृद्धाने मला विचारले - "यामागे काय रहस्य आहे? ती व्यक्ती अंतरबाह्य बदलली आहे का?"</span><div><span style="font-family: Tiro Devanagari Hindi; font-size: x-large;"><br />उत्तरादाखल त्याला मी एक घटना सांगितली.</span></div><div><span style="font-family: Tiro Devanagari Hindi; font-size: x-large;"><br />एकदा एका लहान मुलाने एक रुपयाचे नाणे गिळले होते. त्याला बाहेर काढण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. त्याची आई आपल्या पतीला वारंवार सांगत होती - 'लवकर डॉक्टरांना बोलवा.' <br />त्यावर मुलाचा पिता म्हणजे त्या स्त्रीचा पती म्हणाला - "डॉक्टर नको, मला वाटते की धर्मगुरूस बोलावणे जास्त योग्य आहे. होय ना?"<br />बायको आश्चर्यचकित होऊन म्हणाली "धर्मगुरु? धर्मगुरूला बोलवावेसे वाटते म्हणजे माझे मूल जगू शकणार नाही, असे तुम्हाला सुचवायचेय का?"<br />नवरा म्हणाला, "नाही. तसे म्हणूनच नाही. कारण कोणाकडूनही पैसे काढून घेण्यात धर्मगुरूंचा हात कुणीही धरू शकत नाही!"<br /><br />त्या दांपत्याचा हा संवाद सांगून त्या वृद्धास मी म्हणालो, 'इथे गावात घडत असलेल्या मंदिर उभारणीद्वारे 'त्या' कंजूष व्यक्तीचा लोभ संपला आहे असे समजू नका. इथे मंदिर बांधल्याबद्दल परलोकात कोणते फळ मिळते हे त्या व्यक्तीने जाणून घेण्याचे प्रयत्न केले होते! हा सगळा परोपकार-धर्मही 'त्या' फळाच्या लोभाचाच प्रसार आहे. <br />मंदिर उभारणीस केलेली ही मदत त्याच्या कंजूषपणाच्या पूर्वप्रवृत्तीला विरोध नसून त्याचाच विस्तार आहे. <br />आयुष्य हातात असताना माणसाचा लोभ पैसा जोडतो. <br />आणि जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा माणसाचा तोच लोभ धर्मात भर घालतो. <br />हा सर्व एकाच मनाचा खेळ आहे. धर्मगुरू त्या लोभाला नवी दिशा देतात. ते धर्मफलाच्या अदृश्य नाण्यांचे (परिणामांचे) प्रलोभन निर्माण करतात.<br /><br />हे केले नसते तर तो कंजूष नीट मेलाही नसता! परलोकातील फलाचा लोभ तृप्त करण्याचा दुसरा कोणताही मार्ग दिसत नसल्याने तो दानाची, मदतीची, धर्मसेवेची अदृश्य नाणी गोळा करू लागलाय. अर्थात, त्यासाठी धर्मगुरूंना त्या बदल्यात खरीखुरी चलनातली नाणी द्यावी लागताहेत. </span></div><div><span style="font-family: Tiro Devanagari Hindi; font-size: x-large;">असे धर्मगुरू पैशाला पैसे जोडत राहतात आणि तथाकथित दानी / भक्त व्यक्ती आपल्या गाठीस धर्म जोडतात. मरणानंतर कोणीही परत येत नसल्यामुळे, कुठल्याही व्यक्तीने खर्च केलेल्या चलनी नाण्यांच्या बदल्यात पारलौकिक लाभाची अदृश्य नाणी त्या त्या व्यक्तीस मिळतात की नाही हे देखील कळत नाही!<br /><br />यामुळे धर्मगुरूचा व्यवसाय अखंड सुरु राहतो. मृत्यू हा धर्मगुरूचा मोठा सहयोगी आहे. हाच त्याच्या व्यवसायाचा आधार आहे. त्याच्या सावलीत त्याचे शोषण चालू असते.<br /><br />ती कंजूष व्यक्ती अजिबात बदललेली नाही. <br />त्याच्या हातातून फक्त जीवन सुटत चालले आहे. <br />तो वयस्क होतो आहे आणि त्याला मृत्यूच्या पाऊलखुणा ऐकू येऊ लागल्या आहेत. <br />आणि हे सर्वज्ञात आहे की जिथे मृत्यू आहे तिथे धर्मगुरू असतो. <br />तो मृत्यूचा धंदा करणारा असतो. <br /><br />जीवनाचा उपभोग घेत असताना केलेली मदत, दानधर्म आणि भक्ती ही अधिक खरी होय आणि मृत्यूची चाहूल लागल्यानंतर वार्धक्याकडे झुकू लागल्यानंतर बदललेली भक्तीची दानाची मदतीची परोपकाराची भावना ही देखील एक लोभवृत्तीच असते जी त्या व्यक्तीच्या ठायी आयुष्यभर असते!<br /><br />- ओशो. <br /><br />Osho's stories in marathi by Sameer Gaikwad</span></div>sameer gaikwadhttp://www.blogger.com/profile/05106372658264914305noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1120566833830274839.post-20801248904277832082023-06-24T00:02:00.002+05:302023-06-24T00:02:53.043+05:30त्यांच्यासाठी एक खिडकी खुली राहूद्यात!<span style="font-family: Karma; font-size: x-large;">श्रद्धा वालकर या तरुणीचे दिल्लीत झालेले हत्याकांड असो वा अल्पवयीन साक्षीचे अघोरी हत्याकांड असो किंवा नुकतीच झालेली सरस्वती वैद्य या प्रौढ महिलेची निर्घृण हत्या असो. अशा हत्याकांडामधून काही गोष्टी कॉमन जाणवतात.<br />एखादी मुलगी किंवा एखादी स्त्री घर सोडून निघून जाते अथवा घरच्या लोकांच्या मर्जीविरुद्ध तिच्या इच्छेने कुणासोबत तरी राहू लागते तेव्हा घरातील बहुतांश लोकांच्या प्रतिक्रिया अत्यंत, हिंसक नकारात्मक आणि विरोधाच्या असतात.<br />खूप कमी लोक असे असतात की जे आपल्या मुलीच्या/ बहिणीच्या किंवा घरातल्या स्त्रीच्या इच्छा आकांक्षा समजून घेतात.<br />बहुतेकांना मात्र आपल्याच इच्छा आपल्याच अपेक्षा तिच्यावर लादायच्या असतात.<br />यातून मुलगी आणि तिच्या कुटुंबियांमध्ये एक ज्वलंत संघर्ष जन्म घेतो.<br /><br />आपल्या मुलीने आपल्याच मर्जीप्रमाणे राहावे, आपण सांगू तेच ऐकावे त्याचबरोबर आपण ज्याच्याशी तिचे लग्न ठरवू त्याच्यासोबतच तिने लग्न करावे यासाठी अनेक पालक हट्ट धरतात. तिच्या मनामध्ये काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात नाही.<br />परिणामी मुलीला असे वाटते कि आपले कुणीच ऐकून घेत नाही.<span><a name='more'></a></span> <br /><br />मुलगी घर सोडून निघून गेल्यामुळे कुटुंबात, नात्यात, समाजात आपली बदनामी झाली हा समज आपल्याकडे मोठय़ा प्रमाणामध्ये दृढ आहे.<br />घर सोडून निघून गेलेल्या मुलीबद्दल तिच्या कुटुंबियांमध्ये कमालीचे नकारात्मक विचार असतात.<br />त्यामुळे या मुली द्विधावस्थेत सापडतात. <br /><br />यातील काही मुली आपल्या पतीसोबत वा पार्टनरसोबत सुखात राहतात. त्यांच्यात काही वितुष्ट येत नसल्याने वा त्यात काही टीआरपी सदृश्य मटेरियल नसल्याने तशा घटना आपल्यासमोर येत नाहीत. त्यामुळे अशा घटनांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन अगदी साचेबंद झाला आहे.<br /><br />मात्र जर का या मुलींचे निर्णय चुकीचे ठरले तर त्यांना त्याचा प्रचंड पश्चाताप होतो, वाईट वाटते. मात्र त्या आपल्या जन्मदात्याच्या घरी परतू शकत नाहीत! कारण घरातल्या लोकांनी खोट्या इभ्रतीच्या मुद्यापायी त्यांचे परतीचे रस्ते बंद केलेले असतात. <br /><br />परिणामी या मुलींना वाटयाला येईल ते सोसत राहणे हा एकच पर्याय उरतो. काही आयुष्यभर सोसत राहतात. तर काही मुली अपार खचून जातात. एकतर त्या जीव देतात अथवा त्यांची हत्या तरी केली जाते. आपल्या मुलीसाठी ज्यांनी घराची दारे कायमची बंद केलेली असतात ते लोक अशा घटना घडल्या की आक्रोश करू लागतात.<br /><br />मुलगी घरातून निघून गेल्यानंतरच्या दरम्यानच्या काळात संपूर्ण समाजाचा आविर्भाव असा असतो त्या कुटुंबातील सर्वच व्यक्तींनी कुठला तरी मोठा गुन्हा केला आहे! ज्या कुटुंबात अशा घटना घडलेल्या असतात त्या कुटुंबांना समाज अत्यंत वाईट वागणूक देत असतो. तोच समाज या मुलींच्या हत्या झाल्या की अचानक जागा होतो.<br /><br />मात्र समाजाची जागृती त्या मुलीच्या जीवाबद्दलची नसते उलटपक्षी मुलीला मारणारा कुठल्या जातीधर्माचा आहे त्यानुसार लोक त्या घटनांना रंगवत राहतात, आपली विकृती त्यात मिसळत जातात आणि त्या भागी गुरुदेव मुलीचा मृत्यु एक सनसनाटी व्हायरल बातमी म्हणून लोकांच्या सोशल मीडियावर ते मिरवली जाते. <br /><br />लोक आपापले गोल सेट करू लागतात. वास्तवात ही या पिढीची एक मोठी समस्या आहे, जिच्याकडे पाहण्याचा परिपक्व दृष्टिकोन आपण अद्यापही स्वीकारु शकलो नाही. <br /><br />आपण आपल्या मुलींना समजून घेत नाही, तिचे निर्णय चुकले तर त्याच्यासाठी आपण दारे बंद करतो ते देखील समाजासाठी! जो समाज आपल्या व्यक्तिगत सुखदुःखातले कोणतेही सत्व सच्चेपणाने वाटून घेत नाही त्याच्यापायी आपण आपल्याच घरातील सुखशांतीला चूड लावतो हे अद्यापही आपल्याला आकळले नाही.</span><div><span style="font-family: Karma; font-size: x-large;"><br />बऱ्याचदा असेही घडते की एक निर्णय चुकला नंतर ती मुलगी नव्याने दुसरा निर्णय घ्यायला जाते आणि आगीतून फुफाट्यात जाते. पहिल्या खेपेस तिचं म्हणणं ऐकून घ्यायला एखादा मित्र मैत्रीण तरी असते. दुसऱ्या वेळेस तिच्या पाठीशी कुणीच नसते!<br /><br />या मुलींची, बायकांची अमानुष हत्या झाल्यानंतर अपवाद वगळता लोक त्यांच्यासाठी संवेदना व्यक्त करत नाहीत तर त्यांच्या मनातले गरळ ओकण्यासाठी व्यक्त होताना दिसतात! <br /><br />संसाराची स्वप्ने बघणारी एक जिती जागती मुलगी जीवाला मुकली याचे ते दुःख नसते! तिला कुणी ठार मारले त्याच्या जातीधर्म आदी बाह्यांगांवरती लोकांचा संताप अवलंबून असतो.<br /><br />येत्या काळात मरणारी मुलगी आपल्यापैकी कुणाच्याही कुटुंबातील असू शकते याचे आपल्याला भान उरले नाही. आपल्या धडावर आता शिर राहिले नाही, तिथे विकृतीने ताबा घेतलाय! <br /><br />अशा घटना कमी व्हाव्यात वा या घटनांमधून काही अघटित घडू नये घडवणे असे वाटत असेल तर आपल्या मुलीशी संवाद असायला हवा. तिला समजून घेतलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे तिच्यासाठी परतीची दारे कायमुळे असावीत. <br /><br />कळप सोडून गेलेल्या हरिणीच्या पाडसाची शिकार पिसाळलेला कुत्रा देखील करू शकतो, पाडस चुकले म्हणून कळप तिला सोडून पुढे जात नाही! तिने कळपासोबत राहावे याची दक्षता घेतच ते पुढची वाटचाल करत असतात. <br /><br />आपल्या मर्जीने लग्न करताना घरच्यांचा विरोध असला की भविष्यात काही विलक्षण चुका घडतात, त्यांना टाळणं कठीण होऊन जातं! <br /><br />काही प्रकरणात लग्नानंतर भावनांचा बहर ओसरतो, व्यावहारिक जगात वावरताना नि सहवासाच्या जवळीकीतून जाणवलेल्या निरिक्षणाचा निष्कर्ष धक्कादायक असतो.<br />आपला जोडीदार आपल्याला अनुकूल नाही हे उमगते.<br />आपली जोडी योग्य नसून विजोड आहे हेही कळते!<br />आयुष्यभराचा जोडीदार म्हणून माणूस ओळखण्यात आपण फसलो आहोत हे ही उमगते!<br />इथून पुढे सगळी गल्लत होत जाते <br /><br />आधीच घरच्यांचा विरोध पत्करून लग्न केलेले असते त्यामुळे आपला जोडीदार अपात्र, अयोग्य आणि सार्थ नाहीये हे ठाऊक असूनही त्याविषयी कसलीही वाच्यता न करता उलट त्याचे खोटे गुणगान गायले जाते, जेणेकरून आपल्या निर्णयावरुन झालेली नाराजी कमी व्हावी!<br /><br />आपली फसगत झाली हे झाकून ठेवले जाते!<br />ह असे का होते याचे आणखी एक कारण म्हणजे जेंव्हा घरच्या मंडळींना डावलून लग्न केलेले असते तेंव्हा घराकडचे सर्व रस्ते दोन्ही बाजूंनी बंद केले गेलेले असतात, संवादासाठी एखादी फटदेखील शिल्लक ठेवलेली नसते.<br />आपल्या मनातली खंत सांगण्यासाठी एखादी खिडकीदेखील खुली नसते!<br />सारी माणसं परकी झालेली असतात.<br /><br />अशा वेळी दोन्ही बाजूंनी किमान एक तरी माणूस खुल्या संवादासाठी उपलब्ध असायला हवा याचे भान राखले जात नाही.<br />त्यातून गुंता अधिकच वाढत जातो! <br /><br />अक्षरशः मेलेलं नातं खोट्या आनंदाने माथी मिरवावं लागतं!<br />त्याच्या व्यथा वेदना मूक असतात ज्या त्या त्या व्यक्तीस रोज आतल्या आत जाळत जातात. <br /><br />ज्यांना पश्चात्तापही व्यक्त करण्याची संधी नाकारली जाते ती तरुण मुलं / मुली कोसळून जातात नि त्यांचे संसार निव्वळ औपचारिकता बनून जातात आणि ते स्वतः जिवंत प्रेते बनून श्वास घेत राहतात!<br />या नात्यांना कसलाही अर्थ नसतो, त्यात कसलीही ओढ नसते निव्वळ ओढून ताणून ते नाते निभवावे लागते!<br />अशा जगण्याला काय म्हणावे? <br /><br />यातून आणखी गंभीर चुका होत राहतात. अशा लग्नानंतर मुलगी गर्भवती राहिली वा तिला एखादे अपत्य झाले की मग तर तिच्या दुर्दैवाचे अक्षरशः दशवतार होतात. तिची कशी फरफट होते हे पाहण्यास देखील कुणी समोर येत नाही. <br /><br />मात्र त्याऐवजी घर सोडून गेलेली मुलगी / मुलगा आर्थिक दृष्ट्या सक्षम असेल, ते स्वतःच्या पायावर भक्कम उभे असतील तर फसवणूक होऊन देखील त्यांचा त्रास काहीसा कमी होतो. ते लवकर खचत नाहीत.<br />तरीदेखील अशा वाट चुकलेल्या मुलांना / मुलींना घरचा आधार सर्वाधिक हवाहवासा वाटतो!<br /><br />"मुली / मुला तू मोकळेपणाने बोल, तुझा निर्णय चुकला असेल तर तू मोकळेपणाने घरातल्या कुठल्याही व्यक्तीपाशी कधीही सांग. तुझ्या भूतकाळास विसरून या घराचे दरवाजे तुझ्यासाठी सदैव खुले असतील" अशी ग्वाही दिली जाणं गरजेचे आहे.<br />अशा मुलीचे पुन्हा लग्न करता येते, नव्याने त्यांना उभं करता येतं.<br /><br />त्यांची चूक दुरुस्त करण्याची संधी त्यांना देता येते मात्र हे आपण करतच नसू तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक नसतो!<br />त्यांनी जोशात नि भावनेच्या भरात निर्णय घेतलेला असतो आणि त्यांचं खरं म्हणणं ऐकून न घेणाऱ्यांनी केवळ कानकोंडेपणा केलेला नसतो तर त्या अपरिपक्व जीवांशी उभा दावा मांडलेला असतो, तोही बहुतांशी जग काय म्हणेल, नात्यातले लोक काय म्हणतील या भीतीने!<br /><br />मुलांची / मुलींची मर्जी ध्यानात ने घेता केल्या गेलेल्या अरेंज्ड मॅरेजमध्येही बऱ्याचदा असे चित्र दिसते मात्र तिथे किमान घरचे रस्ते तरी खुले असतात.<br />परंतु त्या नात्यात काही दम नसतो.<br />करपलेले नाते आयुष्यभर रेटून न्यावे लागते.<br />घरच्यांना वाईट वाटेल म्हणून काहीजण सुखी असल्याचा दिखावा करत कुढत कुढत जगतात तर काहींना सुखाचे आभासी चित्र उभे करावे लागते!<br />या संसाराला सुखाचा संसार कसे म्हणावे?<br /><br />हे चित्र बदलण्यासाठी सर्वांचीच मदत लागेल. <br /><br />- समीर गायकवाड </span></div>sameer gaikwadhttp://www.blogger.com/profile/05106372658264914305noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1120566833830274839.post-87178366974324618162023-02-28T19:33:00.000+05:302023-02-28T19:33:34.736+05:30झगमगाटाआडचा भेसूर चेहरा - सलाम बॉम्बे.. <div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhXZhhL4U0h6lGp5YXU3Or9ucT83cpS-CMZn80raTQsR8V4OJZbO6wnFBi9SMiTmxLPm98VT2n_9XLwoPGKs-Ha2TVFclfNVOZfS2hjwKh3t1Ib8Bgc5nYcbPHNtb9-REu8M9DUzjTiVXUy1-hC521iJKT3snEU2Y3w3vD3cWdZ_5pbqwOElbxvhLRF/s759/screenshot-www.google.co.in-2023.01.16-13_51_33.png" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="455" data-original-width="759" height="384" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhXZhhL4U0h6lGp5YXU3Or9ucT83cpS-CMZn80raTQsR8V4OJZbO6wnFBi9SMiTmxLPm98VT2n_9XLwoPGKs-Ha2TVFclfNVOZfS2hjwKh3t1Ib8Bgc5nYcbPHNtb9-REu8M9DUzjTiVXUy1-hC521iJKT3snEU2Y3w3vD3cWdZ_5pbqwOElbxvhLRF/w640-h384/screenshot-www.google.co.in-2023.01.16-13_51_33.png" width="640" /></a></div><br /></div><span style="font-family: Eczar;"><div><span style="font-family: Eczar;"><br /></span></div><span style="font-size: x-large;">हिंदी सिनेमा पूर्णतः निव्वळ मनोरंजनाचे साधन म्हणून कधीच गणला गेला नाही त्याला काही सिनेमे कारणीभूत आहेत. चित्रपटाकडे पाहण्याचे विविधांगी दृष्टीकोन या गृहीतकामागे आहेत, गल्लाभरु सिनेमाच्या जोडीने असेही चित्रपट निर्मिले गेलेत की ते पाहून आपण सुन्न व्हावं, आपल्यातल्या माणसाने आत्मचिंतन करावं, झालाच तर क्लेशही करावा. अशा सिनेमांच्या यादीत एक नाव 'सलाम बॉम्बे'चे आहे! या सिनेमाविषयी विस्ताराने मांडणी करण्याआधी यातल्या एका सीनचा उल्लेख करावासा वाटतो.<span><a name='more'></a></span><br /><br /> यातला बाबा(नाना पाटेकर) हा रेड लाइट एरियातला एक नामचीन भडवा आणि ड्रगपेडलर असतो. एका सीनमध्ये <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhWyQmu6TGelgAJTqzOMrmNpLmS0ISu_ZDmwRT8X9CG4FyhdetG2fFG7yr5VE5Qi6yFGlvltc6XYF44_UqNKrfRll_0nm7oX5y41ydvBcBH6U8j8G21_8UOV8FeaNAFdVmhFVNssOBVKnBBt2g-aeS_hQC_uY4lWhvAH1ZzuIa7zL9400CpV8uua6Xm/s2000/%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%20%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%87%201%20%20(1).jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" data-original-height="2000" data-original-width="1500" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhWyQmu6TGelgAJTqzOMrmNpLmS0ISu_ZDmwRT8X9CG4FyhdetG2fFG7yr5VE5Qi6yFGlvltc6XYF44_UqNKrfRll_0nm7oX5y41ydvBcBH6U8j8G21_8UOV8FeaNAFdVmhFVNssOBVKnBBt2g-aeS_hQC_uY4lWhvAH1ZzuIa7zL9400CpV8uua6Xm/w480-h640/%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%20%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%87%201%20%20(1).jpg" width="480" /></a></div> त्याला भेटायला एक विदेशी पत्रकार इयन (संजना कपूर) आलेली असते, तिच्या सोबत हिंदी अनुवादक असतो जो बाबाचा परिचित असतो. बाबा त्याला सांगतो की त्याने रेखाला (अनिता कंवर) जगाच्या उकिरड्यातून बाहेर काढलंय आणि तिला तो आता आपली घरवाली समजतोय. तिच्यापासून झालेल्या मंजू (हंसा विठ्ठल) या मुलीला आपल्या अपत्याचा दर्जा दिलाय अशी मखलाशीही तो करतो.<br /> बोलता बोलता तो सवयीप्रमाणे घसरतो आणि ती पत्रकार देखील मस्त चिकणा माल आहे हे तिला सांग असं त्या अनुवादकाला सुनावतो. अनुवादक चिडतो आणि असलं काहीही तिला सांगणार नाही असं उत्तर देतो!<br /> त्यांच्या बाचाबाचीवर ती पत्रकार विचारते की, 'बाबा काय म्हणतोय?"<br /> यावर अनुवादक खोटंच सांगतो की, "बाबा विचारतोय की चहा घेणार का?"<br /> पुढच्याच सीनमध्ये बाबाच्या हाताखाली गर्द विकणाऱ्या टोळीतला हरकाम्या चिलीम (रघुवीर यादव) दोन कळकटलेल्या ग्लासमध्ये चहा घेऊन येतो. त्याला तिथं आलेलं पाहताच विकृत असलेल्या बाबाच्या डोक्यात बीभत्स कल्पना येते.<br /> तो म्हणतो, "थांबा तुम्हाला मी गंमत दाखवतो, खूप मजा येईल!"<br /> बाबा आपल्या कंबरेचा चामडी पट्टा काढतो आणि एकेक करून गंमत म्हणून चिलीमच्या पायाखाली फटके मारू लागतो. सुरुवातीला हाफ चड्डीमधला चिलीम बरोबर उड्या मारून ते चुकवतो. त्या गडबडीत त्याच्या खिशातून 555चे सिगारेट्सचं सोनेरी पाकीट पडतं, चहाचे ग्लास पडतात. फुटतात. त्याच्या पिंडरीवर पट्ट्याचे मजबूत वळ उमटतात. माराच्या वेदनेने चिलीम विव्हळू लागतो आणि अखेरीस पेकाटात लाथ बसल्यागत खाली बसतो! <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEivsIwdTNDLcvKCrwL9p3WtOc2h6yce21uu6ewmc34o_KttjtQpOWuF0IWybP-Q_Jir02vqQkR5VYhz_YJTuRMZTmgghCamSRKT8SsM3JIQ4O_DuBz-RtGQmyGHN834Kshvym-mzF77PMwwK553Gx8eHw-WA7Zd_ZKSKcOu-UZhQsEcts_QQOmuY0P1/s554/%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%20%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%87%201%20%20(1).png" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" data-original-height="554" data-original-width="403" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEivsIwdTNDLcvKCrwL9p3WtOc2h6yce21uu6ewmc34o_KttjtQpOWuF0IWybP-Q_Jir02vqQkR5VYhz_YJTuRMZTmgghCamSRKT8SsM3JIQ4O_DuBz-RtGQmyGHN834Kshvym-mzF77PMwwK553Gx8eHw-WA7Zd_ZKSKcOu-UZhQsEcts_QQOmuY0P1/w466-h640/%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%20%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%87%201%20%20(1).png" width="466" /></a></div> पस्तिशीच्या वयाचा, मळकटलेल्या देहाचा नि काळवंडलेल्या चेहऱ्याचा काटकुळा रोगट चिलीम कुत्र्यागत ओरडू लागतो! बाबाच्या चेहऱ्यावर विकृत हास्य विलसत राहतं. चिलीमच्या वेदना नि बाबाची विकृती सहन न झालेली इयन अनुवादकाला सोबत घेऊन तडकाफडकी निघून जाते.<br /> एका मिनिटात तिथला नूर बदलतो. बाबा भानावर येतो आणि इतक्या वेळ वेदनेने कळवळणारा चिलीम चक्क हसू लागतो. चिडिया उड गयी म्हणून बाबाला खिजवतो! बाबाच्या तळपायाची आग मस्तकाला जाते आणि जुन्या हिशोबाचे कारण देऊन तो चिलीमला आपल्या टोळीतून बेदखल करतो. चित्रपटात चिलीम बाबाला पुरून उरत नाही मात्र त्या क्षणी तर तो त्याच्यापुढे झुकत नाही. तो देखील तावातावाने निघून जातो आणि जाताना अकस्मातपणे बाबाला हाताने इशारा करतो 'घे चढवून'चा !<br /> <br /> 'सलाम बॉम्बे'च्या हरेक फ्रेममध्ये एक कविता दडलीय आणि हरेक सीनमध्ये एक कथा आहे. वरती वर्णिलेल्या दोन सीन्सच्या आधी आणि नंतर जे सिक्वेन्स आहेत ते अगदी सुन्न करणारे आहेत. नशेड्या बकाल एकाकी चिलीमच्या आयुष्याचा पाया घृणा, तिरस्कार, दारिद्रय, भणंग भयाण दुःखांवर आधारलेला असल्याने पट्ट्याचा मार त्याच्यासाठी अगदी किरकोळ असतो. त्याच्या आयुष्यात याहून भयंकर दुःखे असतात! माणसाच्या हाती काहीच नसलं आणि पुढ्यात बकाल भयाण उदास अंधारं आयुष्य असलं की त्याला वेदनेची, दुःखाची नशा चढते. त्याशिवाय त्यांना काही पर्यायही नसतो. किंबहुना दुःख हाच त्यांच्या आयुष्याचा पाया बनून जातो. दुःख नसलं तर ही माणसं अधिक सैरभैर होतात, उध्वस्त होतात आणि बेफाम होतात.<br /> <br /> 'सलाम बॉम्बे'मधून अशी माणसं एकेक करून समोर येत जातात आणि प्रेक्षक कोलमडून जातो. आपण जर सुखवस्तू असलो तर आपल्या सुखाची आपल्याला टोचणी लागते नि जर आपणच शोषित असलो तर मग सिनेमाच्या हरेक फ्रेममध्ये आपण स्वतःलाच शोधू लागतो! हे या सिनेमाचे उत्तुंग यश होते. <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgBTqF2XnfPVfvoaL1BF1FxcRAatiQz3x03oaSgcZEuRFPFvN73HzgEfzK3JPIiLWNa-8SJRftU2ZgDGBoNq86MMihVWI4aeuKFOOPT_GI2s560oDVp1-MiKfkDYW-DP78PY2WHCWzdMXhWIzvRjznzqCPXd4I0akw3Hi_LVwfOoKxa_t0u4iHfGpzf/s640/%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%20%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%87%201%20%20(2).jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" data-original-height="345" data-original-width="640" height="216" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgBTqF2XnfPVfvoaL1BF1FxcRAatiQz3x03oaSgcZEuRFPFvN73HzgEfzK3JPIiLWNa-8SJRftU2ZgDGBoNq86MMihVWI4aeuKFOOPT_GI2s560oDVp1-MiKfkDYW-DP78PY2WHCWzdMXhWIzvRjznzqCPXd4I0akw3Hi_LVwfOoKxa_t0u4iHfGpzf/w400-h216/%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%20%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%87%201%20%20(2).jpg" width="400" /></a></div> 'सलाम बॉम्बे'ची वीण बहुपेडी होती, यातली दुःखे समान नव्हती, यातल्या वेदनांचे सल भिन्न असले तरीही टोकदार होते, यातली पात्रं विभिन्न स्तरांवरची असली तरी काळाच्या कराल जबड्यात पिसलेली होती! मुंबईच्या बकाल रस्त्यांवरची अनाथ भटकी मुले असोत वा रेड लाईट एरियात अमानवी अवस्थेत जगणाऱ्या वेश्यांच्या भयाण गल्ल्या असोत हा सिनेमा काहीच भाष्य करत नाही, नुसतं मांडत जातो! किंबहुना दिग्दर्शिकेने भाष्य करण्याची जबाबदारी प्रेक्षकांच्या मस्तकी टाकून एक अणकुचीदार सल बहाल केलाय!<br /> <br /> सिनेमाच्या कथेचा जीव इवलासा असला तरी ती आभाळाला गवसणी घालणारी गोष्ट होती! कृष्णा (शफीक सय्यद) हा पौगंडावस्थेतला किशोरवयीन गरीब फाटका पोर असतो. त्याच्या आईने त्याला अपोलो सर्कसमध्ये सोडून दिलेलं असतं. त्याच्या आईने त्याला तंबी दिलेली असते की भंगारात जमा झालेली त्याच्या थोरल्या भावाची सायकल सोडवून आणण्यासाठी जेंव्हा तो पाचशे रुपये कमावेल तेंव्हाच त्यानं घराचं तोंड पाहावं अन्यथा आपलं तोंड काळं करावं. लहानगा कृष्णा काही दिवस सर्कशीच्या चमूसोबत घालवतो आणि एके दिवशी सर्कस आपलं चंबूगबाळ आवरून स्थलांतरित होते. सर्कसचं सारं विश्व अवघ्या काही तासांत त्याला आपल्यापासून बेदखल करत निघून जातं. कृष्णा गांगरून जातो नि पुढच्याच क्षणाला सावध होतो. कुठे जायचं काहीच ठाऊक नसतं. नशीब नेईल तिकडे तो जातो आणि मुंबईला जाणारी ट्रेन पकडतो.<br /> <br /> मुंबईत पोहोचलेला कृष्णा बेवारसाचंग जिणं जगू लागतो. लोकलचं स्टेशन त्याच्यासाठी आसरा बनतं. तिथं असणाऱ्या अनाथ नि घरादारा पासून परागंदा झालेल्या कळकट मळकट मुलांशी त्याची ओळख होते. हळूहळू तो त्यांच्यात सामावून जातो. तिथंल्याच रस्त्यावरच्या चाचाच्या कँटीनमध्ये तो चहावाला पोऱ्या म्हणून कामास लागतो! बदनाम गल्लीत चहा पोहोचवू लागतो. तिथली बायकापोरे त्याला चायपाव म्हणूनच त्याला ओळखतात. हेरॉईनच्या व्यसनात आकंठ बुडालेल्या भणंग अवस्थेतील चिल्लम (रघुवीर यादव) बरोबर त्याची मैत्री होते. चिल्लम हा फुटकळ ड्रगसप्लायर, अंमली पदार्थाच्या व्यवसायातील शेवटचा घटक! त्याचा बॉसवजा मालक बाबा(नाना पाटेकर) हा नावालाच माणूस असतो, कारण तो चमडी बाजारमधला एक उलट्या काळजाचा दल्ला असतो!<br /> <br /> बाबाचे रेखा(अनिता कंवर) या मध्यमवयीन वेश्येशी संबंध असतात. खरे तर तिला या धंद्यात त्यानेच लोटलेले असते. मात्र त्याचा आव तर असा असतो की जणूकाही तोच तिचा मुक्तिदाता आहे! मंजू (हंसा विठ्ठल) ही रेखाची मुलगी. <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjsj3f8Q0YHXXp9cRTV82MIdw0bgZl7HoY8Jl_fWgA6D9pY18o99jT3FI9f3TMP6TGD1yb64egMdXeuqaYGyQvfnXXUuF72_O3F1WETtnrANtcXQvrOM0sbqS5R0YRrWn245fEKJq5UUZsm2vhGqQ8zUzF8V7HC1qs9JGFJz8llnyLhSc-yaYw7rLbC/s556/%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%20%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%87%201%20%20(2).png" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" data-original-height="430" data-original-width="556" height="309" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjsj3f8Q0YHXXp9cRTV82MIdw0bgZl7HoY8Jl_fWgA6D9pY18o99jT3FI9f3TMP6TGD1yb64egMdXeuqaYGyQvfnXXUuF72_O3F1WETtnrANtcXQvrOM0sbqS5R0YRrWn245fEKJq5UUZsm2vhGqQ8zUzF8V7HC1qs9JGFJz8llnyLhSc-yaYw7rLbC/w400-h309/%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%20%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%87%201%20%20(2).png" width="400" /></a></div> अशक्त, कुपोषित! रस संपलेल्या पाचटासारखं तिचं हडकुळं काळपट शरीर पाहून पोटात कालवतं. याच वस्तीत एक नवी कोरी हेमांगी षोडशवर्षीय पोर आलेली असते. रीतसर सौदा करुन तिची विक्री झालेली असते. तिथल्या शोषित स्त्रियांपेक्षा ती काकणभर अधिक देखणी वाटते. तिच्यातलं कोवळंपण गव्हांकुरासारखंय! तिचं निरागस मन त्याहून लुसलुशीत वाटतं. कृष्णाकडून ती चहा घेते, त्याला पैसे देऊ करते. कृष्णाच्या कोवळ्या मनाला तिची भुरळ पडत्ये, तो तिला 'सोलवा साल' या नावानेच पुकारतो. त्याच्या नकळत तिची ओढ लागून राहते. तर त्याच वेळी बाबाला तिच्यावर हात फिरवायचा असतो, तिची नथ उतरण्याआधी कुस्करता येतं का या विचाराने त्याचे प्लॅनिंग सुरु असतं. अखेर सोलवा सालची पहिली रात्र मुक्रर होते, वास्तवात तिला याचं फारसं गांभीर्यच नसतं.<br /> <br /> खरं पाहता ती ज्या भकास ओसाड दुनियेतून आलेली असते ते पाहू जाता इथला नरक देखील तिला लोभस वाटत असतो. हे सारं तिच्या तारुण्याच्या शोषणापायी सुरु आहे याची तिला पुरेशी भनक नसते! याच दरम्यान बाबा आणि चिल्लम <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEinNbjSD-tj-qqas7HvYGIylj-bd6eoOfZHqFicYK7BaD3sbs9-Yd3bzoUDIMVZE53o9kkXaK3t6-lp6oJHRFwm0oWcKf2GovcL8UyoZS6nFiB_LpiCQoYaKywrLiDoDYOjLTfPhlo540r3yLGD9L_wxACDOuaOIkMjgQggRl9RT-nprTujnjax5_-l/s1280/%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%20%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%87.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" data-original-height="720" data-original-width="1280" height="225" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEinNbjSD-tj-qqas7HvYGIylj-bd6eoOfZHqFicYK7BaD3sbs9-Yd3bzoUDIMVZE53o9kkXaK3t6-lp6oJHRFwm0oWcKf2GovcL8UyoZS6nFiB_LpiCQoYaKywrLiDoDYOjLTfPhlo540r3yLGD9L_wxACDOuaOIkMjgQggRl9RT-nprTujnjax5_-l/w400-h225/%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%20%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%87.jpg" width="400" /></a></div> यांच्यात वैमनस्य येतं. चिल्लम पैशाला मौताज होतो. काही केल्या त्याच्या नशेची तलफ जात नाही. त्याची तडफड पाहवत नाही. कृष्णा त्याला जीवापाड मदत करु पाहतो मात्र तो बचावत नाही. भणंग भिकारी गर्दुल्ल्या चिल्लमची अंत्ययात्रा निघते तेंव्हा भडभडून येतं. आपली हतबलता डोळ्यांतून वाहू लागते. क्लायमॅक्सला कृष्णाला घराची ओढ लागते मात्र त्याने कष्टाने जमा केलेले पैसे देखील चिल्लमने आपल्या व्यसनात उडवलेले असतात. कृष्णाचं माघारी फिरणं दुरापास्त वाटू लागतं. मुंबईच्या रस्त्यावरती बेवारसाचं जगणं त्याच्या वाट्याला उरतं. सिनेमाच्या अखेरीस काळीज पोखरणारा सवाल प्रेक्षकांच्या वाट्याला येतो!<br /> <br /> विकसनशील देशांत विकासाच्या नावाखाली बकाल होत चाललेली शहरे आणि मानवी मूल्यांना काळीमा फासणाऱ्या तिथल्या शोषणकथा आपल्या नजरेसमोर येतात. कॅमेरा संथगतीने फिरतो, दिग्दर्शक वा संवादलेखक आपल्याला प्रबोधनाचे कोणतेही डोस पाजत नाही, किंबहुना कोणताही मेसेज देणारं एकही पात्र यात नाही. मीरा नायरनि हे हेतुतः केलं असावं कारण याला प्रबोधनाचा बाज दिला असता तर निव्वळ डॉक्युमेंट्रीचं स्वरूप आलं असतं. त्यापेक्षा आपण अगदी टोकदार मांडणी करत राहायचं आणि त्याचवेळी त्यावर काहीच भाष्य करायचं नाही हा फंडा दिग्दर्शिकेने वापरलाय जो अत्यंत प्रभावी ठरलाय. सिनेमा ज्याला जसा रिलेट होतो जो ज्या दृष्टिकोनाने सिनेमा पाहतो त्याला त्या त्या प्रतिमेत तो दिसतो! तरीदेखील रस्त्यावरची अनाथ भटकी मुलं, अंधकारमय असणारं त्यांचं वर्तमान, त्यांच्या प्रति समाजाची असंवेदनशीलता आणि यासगळ्याकडे कमालीच्या बधिरपणाने पाहणारी व्यवस्था हे सारं अंगावर येतं.<br /> <br /> जी मुले कायद्याच्या भाषेत गुन्हेगार आहेत आणि ज्यांच्या बालपणाचे संरक्षण होणं गरजेचे आहे अशा दोन्ही <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhI13OysR1MUSrhFRYdDfni1-r1_npDTZjAt_7L0croDTGy6SoE54Kq8ppwIYXfwtHQjNlWK37SzyVnK95ipgtiYgUUzb0yEcV1pV5TUKWZkiV-z_v6ONxoxpAzH-P9zp4yTHId0QADG5F_B-e2dxqW-7cSkV7O-V8bimAy65wPOsrJFehJgt-7qvZ5/s445/%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%20%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%87%201%20%20(3).jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" data-original-height="214" data-original-width="445" height="193" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhI13OysR1MUSrhFRYdDfni1-r1_npDTZjAt_7L0croDTGy6SoE54Kq8ppwIYXfwtHQjNlWK37SzyVnK95ipgtiYgUUzb0yEcV1pV5TUKWZkiV-z_v6ONxoxpAzH-P9zp4yTHId0QADG5F_B-e2dxqW-7cSkV7O-V8bimAy65wPOsrJFehJgt-7qvZ5/w400-h193/%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%20%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%87%201%20%20(3).jpg" width="400" /></a></div> वर्गवारीतील मुलांच्या समस्येवर हा सिनेमा बोट ठेवतो. किरकोळ चोरीपासून ते कृष्णाने बाबाला मारल्याच्या घटनेपर्यंत सिनेमा अगदी सूक्ष्म निरीक्षणे नोंदवतो. 'सोलवा साल'चं कमालीचं निरागस असणं आणि अधाशी मुंबईच्या वासनेत तिचा सहज बळी जाणं हे इतक्या मृदू पद्धतीने दाखवलंय की कोणताही बिभत्सपणा न करता तो प्रसंग हादरवून सोडतो. अखेरचे श्वास मोजत असणाऱ्या चिल्लमसाठी कृष्णाचं कासावीस होणं, त्याच्यासाठी औषधं आणणं, त्याला खाऊ घालून त्याची काळजी घेणं हे अत्यंत नितळपणे समोर येतं. या सगळ्या कुकर्मासाठी केवळ बाबाला जबाबदार ठरवून आपण मोकळे होऊ शकतो का? याकरिता सामूहिक विवेकाच्या शीर्षकाखाली आपल्यापैकी हरेकास सजा द्यावी का? सूड आणि प्रतिशोध यांच्या भावनावेगाखाली भरकटलेल्या बालकांसाठी आपल्याकडे काय योजना आहेत वा कोणतं समुपदेशन केलं जाणार आहे या बाबतीत पूर्णतः अंधकार आहे. समाज म्हणून आपलं अपयश आणि गुन्हेगारांच्या हातात हात घालून चालणारा कायदा, प्रशासन यांच्यासमोर आपणच कःपदार्थ वाटू लागतो. 'सलाम बॉम्बे'चे हे मोठे यशच म्हणावे लागेल.<br /> चहावाला कृष्णा त्याच्या हरवलेल्या निरागसतेसाठी रडतो आणि अखेरीस त्याचं रूपांतर कशात होतं हे परिवर्तन पोटात गोळा आणणारं आहे. अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या चिल्लमप्रमाणे तो पहिल्यांदा मुंबईत कसा आला आणि आता फक्त निराशेचे आणि दुःखाचे मळभ अनुभवतो हे पाहताना त्याचं ते 'विसरणं' बरं वाटू लागतं.<br /> <br /> मुंबईचं झगमगाटाचं रुपडंच जगापुढे नित्य मांडण्याकडेच साऱ्यांचा कल असतो, सिनेमाखेरीज साहित्यातून देखील झुकते माप दिले गेलेय. भाऊ पाध्ये, अरुण साधू, जयवंत दळवी, मधू मंगेश कर्णिक आदींनी मात्र मुंबईची काळी बाजू समोर आणलेली. मुंबईच्या झगमगाटाआडचा भेसूर चेहरा त्यांनी नेमका समोर आणला. कास्टिंगमधल्या सर्वच अभिनेत्यांनी आपल्या भूमिकांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. प्रभावी दिग्दर्शन, नेटकं छायाचित्रण, अफलातून सिनेमॅटोग्राफीमुळे सिनेमा अत्यंत बोलका झालाय. सिनेमा बालगुन्हेगारीवर फोकस करत असतानाच यातलं कृष्णाचं मुख्य पात्र निभावणाऱ्या कृष्णाने रीअल लाईफमध्ये एका स्टोअरमध्ये चक्क चोरी केली, त्याला अटक झाली तेंव्हा नकळत सिनेमातला मुख्य कंटेंट ओरिजिन चर्चेत आला होता. या सिनेमापासून प्रेरणा घेत 'सलाम बॉम्बे' याच नावाने स्वयंसेवी संस्था उभी राहिली जी स्ट्रीट चिल्ड्रेन्ससह मुलांच्या करिअरसाठी, क्रिडा कौशल्य विकासासाठी काम करतेय! मुंबईमधल्या अनेक मुलांच्या जीवनात या संस्थेने आशेचा किरण आणलाय! मीरा नायरच्या 'सलाम बॉम्बे'ला आणि अशा सिनेमांना आपलंसं करणाऱ्या बॉलिवूडला याचे श्रेय जाते.<br /> #lovebollywood हा हॅशटॅग त्यासाठीच तर आहे!<br /> <br /> - समीर गायकवाड</span></span>sameer gaikwadhttp://www.blogger.com/profile/05106372658264914305noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1120566833830274839.post-50415326151687614762023-02-19T08:18:00.003+05:302023-02-27T12:25:06.686+05:30शिवबा आपल्याला खरेच कळलेत का? <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh-WiN887GeH6MwjN3WMO8H8vL2AeVT9z1RqvjCvnU6UZ2QHy6c2_ZWh0zuzDG1MB0IQHqbdxpZ8mNYegC0-wu0vrYCfiYHKyp7SXSZz1JhSwpeiWUUmKSbEY0EnooIPS5I650atjSxO9tPA0LEPyisrA2cs77n01i3l055gA4q3AhnhwYzko3kOWMQ/s600/screenshot-gumlet.assettype.com-2023.02.19-08_10_03.png" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="363" data-original-width="600" height="388" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh-WiN887GeH6MwjN3WMO8H8vL2AeVT9z1RqvjCvnU6UZ2QHy6c2_ZWh0zuzDG1MB0IQHqbdxpZ8mNYegC0-wu0vrYCfiYHKyp7SXSZz1JhSwpeiWUUmKSbEY0EnooIPS5I650atjSxO9tPA0LEPyisrA2cs77n01i3l055gA4q3AhnhwYzko3kOWMQ/w640-h388/screenshot-gumlet.assettype.com-2023.02.19-08_10_03.png" width="640" /></a></div><div><br /></div><span style="font-family: Noto Serif Devanagari; font-size: x-large;">शिवाजीराजे म्हणजे मराठ्यांचं काळीज असं जेंव्हा लिहितो तेंव्हा नकळत आपण आपला खुजेपणा दाखवत असतो. शिवबा सगळ्यांचेच काळीज होते ! <br /><br />शिवाजी महाराज कसे होते हे सांगताना जो तो व्यक्ती त्याला अभिप्रेत असलेले वा ज्या रूपांत तो राजांना पाहू इच्छितो तेच वर्णन संबंधितांकडून केले जाते. <br />मग सकल शिवाजी महाराज कळणार तरी कसे? <br />मनातले सर्व अभिनिवेश नि सर्व भावभावनांना दूर सारून राजांना पाहिलं तर हिमालयाहून उत्तुंग आणि जळाहून नितळ असे पराक्रमी, दक्ष, चाणाक्ष दूरदृष्टी असणारे द्रष्टे धोरणकर्ते, कुटुंबवत्सल, रयतप्रेमी, ज्ञानी, संयमी, शांत, विचारी अशा अनेक बहुआयामी राजांचे चित्र समोर येते. <br /><br />ते क्षत्रियकुलावंतस असल्याचा अभिमान आपण मिरवतो तेंव्हा तो त्यांचा अभिमान नसून आपला वर्गीय अभिनिवेश असतो.<br />शिवबा राजांचं अस्तित्व सकल कुळ गोत्र जात धर्म यापलीकडचं होतं, त्याचा अभिमान असायला हवा!<span><a name='more'></a></span><br /><br />एककल्ली देवधर्माधिष्ठित राज्य हीच राजसत्ता असेही त्यांचे धोरण नव्हते, लोककल्याणकारी स्वराज्य हे त्यांचे धोरण होते. <br /><br />शिवराय केवळ धुपारत्या ओवाळत नसत वा कुठल्या दैवी साधनांच्या बळावर त्यांनी राज्य उभे केले नाही, त्यांनी पराक्रमाने व चतुराईने शून्यातून राज्य उभे केले, त्याकरिता युद्धनीती वापरली. पुरंदरचा तह असो की आग्र्याहून सुटकेचा प्रसंग असो त्यांची कुटनीती विलक्षण होती. <br /><br />त्यांनी केवळ रांझ्याच्या पाटलाचे हातपाय कलम केले होते असे नव्हे तर बदफैलीचा निव्वळ आरोप झाला तरी आपल्या मेव्हण्याचे डोळे काढण्याचे समानन्यायी तत्व त्यांनी अंगीकारले होते.<br /><br />आपल्या मातेच्या शब्दांना वचन मानणारे, पित्याचे स्वप्न पुरे करणारे, साधूसंतांचा आदर करणारे, चुकलेल्यांना क्षमा करणारे आणि घेतला वसा जपणारे शिवबाराजे बहुआयामी जाणते राजे तर होतेच मात्र खऱ्या अर्थाने श्रीमानयोगी होते!<br /><br />हा राजा एकमेवाद्वितीय होता ज्यांनी आपल्या जीवावर उठलेल्या नि स्वराज्याशी उभा दावा मांडलेल्या शत्रूंना ठार मारल्यानंतर त्यांच्या कबरी बांधल्या होत्या व त्यांच्या देखरेखीसाठी तरतूद केली होती. <br /><br />जिंकलेल्या संस्थानाच्या राणीच्या बाळाला मांडीवर बसवून दुध पाजणारा राजा जगाच्या पाठीवर कुठेही सापडणार नाही!<br /><br />जगात असे अनेक राजे महाराजे होऊन गेलेत की ज्यांनी नावापुरतं स्त्रीदाक्षिण्य दाखवलं मात्र त्यांचे अंतरंग वेगळेच होते, शिवबा त्यांना अपवाद होते. शिवबांच्या दरबारी कधी नाचगाणं झालं नाही की कधी स्त्रीचा अवमान झाला नाही!<br /> <br />आपल्या मावळ्यांना छातीशी कवटाळून रडणारा राजा आणि त्यांच्या कुटुंबाची देखभाल करणारा हा राजा अभूतपूर्व होता, त्याच्यासाठी त्याची रयत हेच कुटुंब होतं. <br /><br />आपल्या मुलावर राजधर्माचे संस्कार करतानाच त्याच्या बहुविध शिक्षणासाठी दक्ष असणारे शिवबाराजे जितके कनवाळू होते तितकेच कठोरही होते! आपल्या पत्नीवर त्यांचे अमीट प्रेम होते. <br /><br />शिवबाराजे म्हणजे केवळ युद्धांची खुमखुमी असणारे, युद्धघोष करणारे नि शत्रूच्या जीवावर उठलेले योद्धे नव्हते. रयतेच्या गवताच्या गंजीची काळजी करताना उंदीराने दिव्याची वात नेऊ नये इतकी बारीकसारीक दक्षता बाळगण्यास सूचित करणारे शिवबा रयतेच्या हितास आणि सुखास प्रथम प्राधान्य देत.<br /><br />शिवराय म्हणजे डोक्यावर घेऊन नाचण्याची गोष्ट नसून डोक्यात ठेवून जगण्याची गोष्ट आहेत. शिवराय कोणत्याही जाती धर्माच्या विरुद्ध नव्हते वा कोण्या एका जाती धर्मापुरतेही ते मर्यादित नव्हते. ते अखिल रयतेचे राजे होते. <br /><br />शिवकल्याणकारी राज्य जे जिजाऊ मां साहेबांच्या स्वप्नात होते त्याची उभारणी करणे हे त्यांचे परमध्येय होते. <br /><br />शिवाजी राजांनी अमुक एक व्यक्ती अमुक जात धर्माची आहे म्हणून त्यास ठार मारा असे फर्मान कधी काढले नाही. <br />जो जो स्वराज्यावर चालून आला व ज्याने ज्याने स्वराज्यनिर्मितीत अडथळे आणले वा स्वराज्यातील रयतेस ज्यांनी ज्यांनी त्रास दिला ते सर्व लोक महाराजांच्या लेखी दुश्मन होते. <br />तर ज्यांनी स्वराज्यासाठी आपलं योगदान दिलं व रयतेच्या कल्याणासाठी जे राबले ते सर्व जाती धर्माचे लोक त्यांनी आपले मानले. <br /><br />शिवाजी राजांसाठी 'रयतेचे कैवारी' आणि 'रयतेचे दुश्मन' अशा लोकांच्या दोनच वर्गवारी होत्या. <br />चंद्रराव मोरे आणि अफजलखान यांत धर्मभेद न करता रयतेचा व स्वराज्याचा वैरी हे एकच परिमाण त्यांनी या दोघांसाठी वापरले. <br />त्याच प्रमाणे हिरोजी इंदलकर व दौलत खान, इब्राहीम खान यांच्यातही फरक केला नाही. कारण ते स्वराज्यनिर्मितीतले घटक होते. <br /><br />असे असूनही अनेक लोक त्यांना विविध चौकटीत बंद करून त्यांच्या उत्तुंग आणि भव्य प्रतिमेला एक प्रकारे सीमित करतात. <br />शिवरायांना कुठल्या चौकटीतून आपण पाहत असू तर तो आपला दोष असतो<br />कारण हा रयतेचा राजा असा एकमेवाद्वितीय होता की त्याला कुठली चौकटच लागू होत नव्हती.<br /><br />खऱ्या अर्थाने रयतेचा, मातीचा आणि माणसांच्या मनामनातला राजा !<br />राजा शिवछत्रपती !<br /><br />राजे समजून घ्यायचे असतील तर त्यांना डोक्यात ठेवायला हवं नुसतं डोक्यावर घेऊन ते जमणार नाही..<br /><br />आपल्या मनातल्या प्रतिमा, आपली धोरणे नि आपले विचार बाजूला ठेवून आपण जर शिवराय अभ्यासले तर निश्चितच एक बहुआयामी नि आगळे वेगळे शिवराय आपल्याला भेटतील, मग आपल्यातले कैक गुणदोष गळून पडतील. विचारांना एक नवी दृष्टी लाभेल.. <br /><br />शिवजयंतीच्या शुभेच्छा तर आहेतच, शिवबांचे विचार खऱ्या अर्थाने अंमलात आणण्यासाठी शुभेच्छा.<br /><br />- समीर गायकवाड</span><p></p>sameer gaikwadhttp://www.blogger.com/profile/05106372658264914305noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1120566833830274839.post-78014233738704168622023-01-23T23:12:00.001+05:302023-01-23T23:12:46.851+05:30दक्षिणेतील सिनेमांचा उत्तर-दिग्विजय!<div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgIZ77pV21dd_XFtTUp9WpcSMEbTkrxIlBZR-YWn4EezPj6ZC1liGIaV7awkkAsVIZea36XRBISOzMJQFIYc4a4BOkVoIfHPjr1KkBbMqVVClef5-TSGdV0VY_1lXHHzvUAl37XFD1c89y2QE3SosuLTKaP1X_9FKpp52MEzxUQyj9xYR5PWzhdRLRa/s2634/Epaper_241_2023-01-22_5.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="2634" data-original-width="1140" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgIZ77pV21dd_XFtTUp9WpcSMEbTkrxIlBZR-YWn4EezPj6ZC1liGIaV7awkkAsVIZea36XRBISOzMJQFIYc4a4BOkVoIfHPjr1KkBbMqVVClef5-TSGdV0VY_1lXHHzvUAl37XFD1c89y2QE3SosuLTKaP1X_9FKpp52MEzxUQyj9xYR5PWzhdRLRa/w276-h640/Epaper_241_2023-01-22_5.jpeg" width="276" /></a></div></div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><br /></span></div>एक काळ होता की जेंव्हा आगामी हिंदी सिनेमांची चर्चा सर्व माध्यमांत असायची. येऊ घातलेल्या सिनेमाविषयी अपार उत्कंठा असायची, त्यातली गाणी, त्यातले सीन्स, संवाद, <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgF8nttcfbnvKUp4JwKPN-YUIkA3Nd1BmKyoBcXlgqviz3tnVPH65yojdkORKoJOkNM7RLaMmIqD0vEayrg9Vj5pJU8bXL6dZeip15D5ecXvilDWS_Tn47T4X948p0etNCUwyIEJ2Oi6tToRMM1w2MkQkEO9q4xkftlPrY0Q1hMCkroZgNQU0BL0qKs/s419/WhatsApp-Image-2022-04-23-at-1.14.16-PM%20(2).jpeg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" data-original-height="419" data-original-width="267" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgF8nttcfbnvKUp4JwKPN-YUIkA3Nd1BmKyoBcXlgqviz3tnVPH65yojdkORKoJOkNM7RLaMmIqD0vEayrg9Vj5pJU8bXL6dZeip15D5ecXvilDWS_Tn47T4X948p0etNCUwyIEJ2Oi6tToRMM1w2MkQkEO9q4xkftlPrY0Q1hMCkroZgNQU0BL0qKs/w255-h400/WhatsApp-Image-2022-04-23-at-1.14.16-PM%20(2).jpeg" width="255" /></a></div> ऍक्शन, तांत्रिक अंगे यांची माहिती झळकत राहायची. त्यावर गॉसिप व्हायचं. ही वातावरण निर्मिती सिनेमाच्या पथ्यावर पडायची. हा प्रकार अनेकदा आताच्या पेड मार्केटिंगच्या स्वरूपाचा असायचा, मात्र त्याचे बाह्यरुप बटबटीत नव्हते. पुष्कळदा लोकांनाही याची जिज्ञासा असायची. मुळात सिनेमाविषयी नि त्यातल्या नायक नायिकांविषयी एक कुतूहलयुक्त आदर असे. आता परिस्थिती बदललीय. माध्यमांचा सुकाळ आहे, माहितीचा भडिमार आहे तरीदेखील आगामी काळात कोणते हिंदी सिनेमे प्रदर्शित होणार आहेत याबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता अभावानेच आढळते, उलटपक्षी दक्षिणेकडील कोणकोणते सिनेमे कधी रिलीज होणार आहेत त्यांचा यूएसपी काय आहे याविषयी लोक भरभरून बोलताना दिसतात. आता असे वातावरण झालेय की हिंदी चित्रपटसृष्टीच्या नियमित प्रेक्षकांनाही पुढचा बहुप्रतिक्षित चित्रपट कोणता पहायचा आहे हे आठवावं लागतं. कारण मोजके अपवाद सोडल्यास या वर्षात <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="समीरबापू " imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" data-original-height="630" data-original-width="402" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhoPq3ZToBy8Opql-oCFA7OFDPMQ9FLVFBerfj7eAii1mR117VpTBKotCdaAFX_GMCC5lGKDPmH-QGfH3NaB3aQixZRltAr1_XtpYpKzm9w5_8ME1OYAalbNPXb4lO1VraEDiHPhO-QuDG7dAJY5dd0h9uL_CUVd-UmVHD4ncskif3Z5PQ3vAACIhGx/w255-h400/Top-2025-Best-South-Indian-Movies-Dubbed-in-Hindi-1%20(1).jpg" width="255" /></a></div> आतापर्यंत जे छोटे-मोठे हिंदी चित्रपट आले आहेत, त्यांचे नशीब गुणवत्तेच्या आणि कलेक्शनच्या बाबतीत सर्वश्रुत आहे. बॉलीवूडचा शेवटचा फील-गुड चित्रपट कोणता होता किंवा ज्याच्या कलेक्शनची खूप चर्चा झाली होती असा चित्रपट लक्षात ठेवणे कठीण झालेय हे वास्तव आहे. त्या तुलनेत जर दक्षिणेच्या चित्रपटांबद्दल बोललो तर लगेचच 'RRR', 'KGF 2' आणि 'पुष्पा: द राइज' ही नावे समोर येतात. या चित्रपटांना मिळालेले व्यावसायिक यश अभिनंदनपात्र का आहे याची अलिकडे सातत्याने चर्चा होतेय. सिनेसृष्टीत दक्षिणोत्तर जे काही घडते आहे त्यावर व बॉलीवूडमधल्या त्रुटींवर फोकस केला जातोय हे उत्तमच आहे मात्र काही प्रश्न चर्चेतून गायब आहेत जसे की दक्षिणेकडील ज्या चित्रपटांनी सणकून मार खाल्ला असे चित्रपट उत्तरेकडे चांगला व्यवसाय करतील का किंवा दक्षिणेकडे अपयशी ठरलेल्या चित्रपटांचे हिंदी रिमेक्स यशस्वी होतील का? दक्षिणेकडचे सर्वच चित्रपट ब्लॉकबस्टर हिट होताहेत का? तिकडच्या फ्लॉप सिनेमांची टक्केवारी किती आहे? असे मुद्दे चर्चेत नसतात! खरे तर यांची चर्चा झाली तर नेमके चित्र समोर येऊ शकते मात्र आपली माध्यमे अशी चर्चा करण्यात निरुत्साही दिसतात. किंबहुना ही मांडणीदेखील केली जात नाही. बॉलीवूडविरोधात सातत्याने बॉयकॉट मोहिमा चालवत असताना दक्षिणेकडील केवळ छप्परफाड यशाचेच गोडवे गायचे नि तिकडच्या <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiZaqi2T5d1X0fL8Wu0jrlit83UGnukJrJF4up5N6wn-dsgPoxLqoLco1c25VWDOISr1oYW5UkZgXdio0AUZTwKobTsQItJK8Cyz04L_mVRYspxd8gH5lTkzNx590-ZHEk2-TOzVPlB3ilRTnwALilgNQX9ESM4Vm4Szhtsr1aFZ5KGXSHsfYQ7OMSH/s419/WhatsApp-Image-2022-04-23-at-1.14.16-PM%20(1).jpeg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img alt="समीरबापू" border="0" data-original-height="419" data-original-width="267" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiZaqi2T5d1X0fL8Wu0jrlit83UGnukJrJF4up5N6wn-dsgPoxLqoLco1c25VWDOISr1oYW5UkZgXdio0AUZTwKobTsQItJK8Cyz04L_mVRYspxd8gH5lTkzNx590-ZHEk2-TOzVPlB3ilRTnwALilgNQX9ESM4Vm4Szhtsr1aFZ5KGXSHsfYQ7OMSH/w255-h400/WhatsApp-Image-2022-04-23-at-1.14.16-PM%20(1).jpeg" width="255" /></a></div> अपयशाविषयी मौन राहायचे असा एक फंडा सर्वत्र दिसतोय. याला राजकीय, आर्थिक, समाजिक नि धार्मिक कंगोरे असल्याने खरे स्वरूप समोर येणे तूर्तास कठीण दिसतेय हे स्पष्ट आहे. दक्षिणेकडेही मोठ्या संख्येने सिनेमे कोसळत आहेत. तिकडच्या सिनेनिर्मात्यांनी धास्ती घेऊन मध्यंतरी थेट ओटीटीवरच प्रदर्शित करण्याचा सपाटा लावला. परिणामी थिएटर्स ओस पडली, चित्रपटसृष्टीच्या तंत्रज्ञ मंडळींनाही फटका बसला; चित्रपट निर्मितीसह वितरणव्यवस्थेतही बेफाम बदल झाले त्यामुळे अपवाद वगळता सगळ्यांचे पेकाट मोडायच्या बेतात आले. याविरोधात आंदोलन उभं राहिलं, चक्क स्टुडिओ बंद ठेवले गेले, महिनाभर चित्रपटनिर्मिती बंद पडली वा पुढे ढकलली गेली. अर्थात ज्या सिनेमांनी तिकीटबारीवर टाकसाळ खोलली होती त्याच्या निर्मात्यांनी सावध भूमिका घेतली. मग काही दिवसांनी सारं सुरळीत झाल्याचा देखावा केला गेला. चित्रपट निर्मिती पुन्हा सुरु झाली मात्र मूळ दुखणे कमीअधिक फरकाने बदललेल्या स्वरुपात तसेच राहिले. हा विषय माध्यमांत फारसा चर्चेस आलाच नाही मात्र ज्या मोजक्या सिनेमांनी अफाट यश मिळवले होते त्यांचीच चर्चा अधिक झाली. दक्षिणेकडील फ्लॉप्सची नोंद घेतली तरीही हिंदी सिनेमाच्या यशाच्या उतरत्या आलेखाची कड घेता येत नाही हे वास्तव आहे.<span><a name='more'></a></span><br /> <br /> लोकमानसाला भिडणारा आशय, नावीन्य, अफलातून शैली आणि मास अपील यांमुळे हे यश साऊथच्या सिनेमांना <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="समीरबापू " imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" data-original-height="540" data-original-width="360" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiDt4hvlH5bAAaYqW2IJyEYz5NQZYOceslByhfHi_anIFIbl7EkOQ221ZIU7xQkbjxajOjH16ipKDI7Z-hmCwplS90DbPn43MIZeUYBP7P1oPVeW_Byrc-aOsyRqUNGlVAq6g-gyBoma8MeZBE84QV6Mo2jluamt4CAhYRsWBUUhNguezK5kYBsMjn6/w266-h400/pic.jpg" width="266" /></a></div> लाभलंय. त्यांचे यश कमी लेखता येणार नाही. एस.एस. राजामौलीचा 'आरआरआर', अभिनेता यशचा ऍक्शनपट 'केजीएफ-2' आणि अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' या चित्रपटांनी देशभरातील प्रेक्षकांच्या हृदयावर जे अधिराज्य गाजवलं तशीच संधी हिंदी चित्रपटांनाही होती मात्र त्यांना संधीचे सोने करता आले नाही. त्यावर लावलेले पैसे पाण्यात गेले. याचा परिणाम अधिकच उलटा झाला! रणबीर-आलियाचा मेगा बजेट 'ब्रह्मास्त्र', अक्षय कुमारचा 'कठपुतली' आणि सैफ-हृतिकचा साऊथरिमेक असलेला 'विक्रम वेधा' हे ओटीटीवर फार वेगाने आले! काही नव्या हिंदी सिनेमांची बिलकुल चर्चा आढळत नाहीये मात्र ते ओटीटीवर येताहेत तर वाथी, कब्जा, सालार या नव्या रिलीजसह इंडियन, पुष्पा, केजीएफ यांच्या सिक्वेलची चर्चा आताच दिसू लागलीय. हे गुणलक्षण केवळ बिग बजेट साऊथ सिनेमांपुरते मर्यादित राहिले नाही. गतसाली ऑगस्टमध्ये रिलीज झालेल्या निखिल सिद्धार्थच्या 'कार्तिकेय 2' या तेलगू चित्रपटाच्या हिंदी <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="sameerbapu " imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" data-original-height="419" data-original-width="268" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgKIGCge2mzN-XWSwu1z0P3hfF_Z9UEPZI9EWvtnUXrHUVL_AwWGN3HgTpGI8erITsqAaFL_Y82Ab-V_DifycqyDlGhN-8Yadb-8a_HBv-j8clBz1JFUvbsdIldsTw6_TELVXFbyFsa0qJw9pgHKC8PeXYFRTObo4m0C16Xdapit7vT8W_4koiXvEXZ/w256-h400/thumb-1.jpg" width="256" /></a></div> आवृत्तीची मागणी अवघ्या पाच दिवसांत इतकी वाढली की, प्रदर्शकाला स्क्रीन्सची संख्या पन्नासवरून पंधराशेपर्यंत वाढवावी लागली. या लो-बजेट चित्रपटाची हिंदी आवृत्ती सुपरहिट घोषित झाली. या चित्रपटाच्या जागतिक कलेक्शनने १०० कोटींचा आकडा पार केला! गेल्या दीड वर्षात असं अनेकदा घडलेय की दक्षिणेकडील चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर आश्चर्यकारकपणे चांगली कामगिरी केलीय. त्याउलट बी-टाऊनमध्ये नाण्यांची टांकसाळ खोललीच नाही, दुसरीकडे दक्षिणेत शिट्ट्या आणि नाण्यांचा जोरदार पाऊस पडत होता. गतवर्षाची सुरुवात 'मास्टर' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटाने झाली आणि अखेर 'पुष्पा: द राइज'च्या देदीप्यमान यशाने झाली. पुष्पाने 365 कोटी रुपये कमवून सर्वांना आश्चर्यचकित केले. हिंदी आवृत्तीने 106 कोटींचा व्यवसाय केला आणि त्याचे श्रीवल्ली… हे गाणे देशभरात गाजले. याच काळात 40 कोटींमध्ये बनलेल्या 'डॉक्टर' या तमिळ चित्रपटाने 100 कोटींची कमाई केली. रजनीकांतच्या 'अन्नत्ते' या तमिळ चित्रपटाला प्रेक्षक आणि चित्रपट समीक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या नाहीत तरीही त्याने 240 कोटींचा व्यवसाय केला होता. म्हणजेच वाईट कंटेंटची भलावण करणारे प्रेक्षक देशभरात आहेत हे उघड आहे, तरीही हिंदी सिनेमेच अधिक प्रमाणात सपकून आपटत राहिले.<br /> <br /> संमिश्र प्रतिसादानंतरही तेलुगू चित्रपट 'अखंड'ने 150 कोटींचा गल्ला जमवला. कन्नड चित्रपट 'रॉबर्ट'नेही 100 <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="sameerbapu " imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" data-original-height="1440" data-original-width="960" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiAIPZkSc-cKO88KvHiEAP01APPk5JmwxrS0VD3bHzzEK39v1mSaxv_QkDRgLvtrg7gij3yyZKVsd0xBD7BQHa4TtWZ0BP9GO9t2GS6IT0O4BPBemz5nE1MirjgwF8xKkluZnM-ppZEBR7A2XveJwK5XUSPGEWQmhr-15q6r5W0puYVmNDHHp325ScR/w426-h640/p14341711_v_v8_aa.jpg" width="426" /></a></div> कोटींचा गल्ला जमवला. प्रशंसा आणि पैसा मिळवलेल्या चित्रपटांमध्ये मल्याळम चित्रपट 'नायट्टू' नावाशिवाय पुढे जाऊ शकत नाही, त्याचे बजेट फक्त 4 कोटी रुपये होते त्याने कोरोनाकाळातही 30 कोटी रुपये कमवले. त्यात भर म्हणजे या वर्षी 'RRR' ने जागतिक स्तरावर कमावलेले रु. 1,200 कोटी, 'KGF 2' ने जमा केलेले रु. 1,300 कोटी, 'Vikram' ने गोळा केलेले रु. 432 कोटी आणि 'विक्रान्त रोना' ने गोळा केलेले रु. 131 कोटी असे म्हणता येईल. दक्षिणेकडील सिनेमांचे हे सुवर्णयशच होय. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय), साउथ मीडिया अँड एंटरटेनमेंटच्या अहवालाने देखील याची पुष्टी केली आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की 2021 मध्ये, चित्रपटांच्या अखिल भारतीय बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या एकूण संकलनाच्या 62 टक्के साऊथ चित्रपटांमधून मिळाले. तर गतवर्षी एप्रिलमध्ये साउथ इंडिया मीडिया अँड एंटरटेनमेंटवर सीआयआयने जारी केलेल्या आणखी एका अहवालानुसार 6,000 कोटी रुपयांचा दक्षिण भारतीय चित्रपट उद्योग सुमारे 13 टक्के (CAGR) दराने वाढण्याच्या मार्गावर आहे. हे मोठे चित्रपट सोडले तर दक्षिणेतील अन्य चित्रपट हिंदी पट्ट्यात इतका दमदार व्यवसाय करू शकले नाहीत हेदेखील सत्य आहे. विजय देवरकोंडा अभिनीत तेलगू चित्रपट 'लिगर' बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप झाला. दक्षिणेतील सुपरस्टार चिरंजीवी आणि त्याचा मुलगा राम चरण यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'आचार्य' या चित्रपटाला बजेटचे 140 कोटी रुपये कमावण्यात धापा टाकाव्या लागल्या! साऊथच्या बिग बजेट फ्लॉपच्या यादीत अभिनेता प्रभासच्या 300 कोटींहून अधिक खर्चून बनलेल्या 'राधे श्याम' या चित्रपटाने तर अक्षरशः धूळ चाखली! त्याचप्रमाणे, अभिनेता नाग चैतन्यचा तेलगू चित्रपट 'थँक यू', जो जुलैमध्ये आमिर खानसोबत 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटात मुख्य भूमिकेत आला होता, त्याने केवळ 8.95 कोटी रुपये कमावले, तर चित्रपटाचे बजेट 30 कोटी रुपये होते.<br /><br />तरीही साऊथच्या मानाने हिंदी सिनेमा पिछाडीवर पडलाय हे मान्य करावे लागेलच. याला बळकटी देणाऱ्या काही घटना अलीकडे घडल्या. गोल्डन ग्लोब पुरस्कारांच्या बेस्ट सॉन्ग <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="समीरबापू " imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" data-original-height="419" data-original-width="270" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgqokWKbB2TK9RngfcqOgko2p-1BoAqHwxH6WGYGsL-9nPK147844FcFoU73bk5-hPxl7rVkVwiDKQC61ZEaHP1xacxYy3BVgM_VT9Dkik0EseVkBX2MfeFoWiL4Jo1U0HQeOtkyoFbI2mrOKUQl-bgYm-3tWBB7LQhV3qP79K2Ay2dpaapHwFc7JpZ/w258-h400/WhatsApp-Image-2022-04-23-at-1.14.16-PM.jpeg" width="258" /></a></div> श्रेणीत 'आरआरआर'ने ‘नाटुनाटु’साठी आपलं नाव कोरलं! ऑस्करसाठीही साऊथने स्वतःची मोहीम उघडलीय! एकीकडे थिएटरमधील अपयशास घाबरून हिंदी सिनेमे अधिकाधिक ओटीटीकडे वळत असताना दक्षिणेचा दिग्विजय जारीच आहे! हिंदी सिनेमांच्या उतरत्या आलेखाची समीक्षा करताना काही मुद्दे ठळकपणे समोर येतात. दक्षिणेतील चित्रपट निर्माते अधिक बुद्धिमान पद्धतीने आणि वेगवेगळ्या शैलीने प्रयोग करताहेत तर हिंदी चित्रपट निर्माते एकाच सूत्रावर चित्रपट बनवतात. वास्तवात 'पुष्पा' हा टिपिकल जॉनर चित्रपटांपैकी एक होता. मात्र तो पूर्णपणे नवीन पद्धतीने प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आला. तमिळ आणि मल्याळम या खूप जुन्या भाषा आहेत आणि या भाषा खूप जुन्या संस्कृतींचा भाग आहेत. कदाचित यामुळेच तिथले चित्रपट निर्माते त्यांच्या चित्रपटाच्या तपशीलावर खूप काम करतात. तसेच कोणताही चित्रपट बनवण्यापूर्वी ते खूप संशोधन करतात. या उलट उत्तरेकडे असा कोणताही चित्रपट बनला नाही जो सामान्य व्यक्तीच्या वास्तव जीवनावर प्रभाव टाकू शकेल. राजकुमार हिरानीचा '3 इडियट्स' हा चित्रपट या अर्थाने वेगळा असला तरी त्यालाही मर्यादा होत्या! दक्षिणेकडील दिग्दर्शक तुलनेने अधिक हुशार आणि प्रतिभावान आहेत. टिपिकल फॉर्म्युल्यांवर काम करुन हिंदी सिनेमाच्या दिग्दर्शनातली प्रतिभा अस्तास जाण्याची भीती वाटतेय. एकच कथाकल्पना विविधतेने, नाविन्यपूर्ण नि लोकांच्या पसंतीस पडेल अशा पद्धतीने सादर करण्याची खुबी हिंदी सिनेमाने आत्मसात करणे हाच एकमेव तरणोपाय सद्यस्थितीत दिसतोय. किमान तेव्हढे जरी केले तरी बुडत्याला काडीचा आधार होईल अन्यथा साऊथच्या सिनेमांचा उत्तरदिग्विजयी कैफ जारी राहील.</span><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><br /></span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;">- समीर गायकवाड <br /></span><br /> </div>sameer gaikwadhttp://www.blogger.com/profile/05106372658264914305noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1120566833830274839.post-41536723069041522962023-01-15T12:05:00.006+05:302023-01-15T12:05:29.108+05:30विहीर.. <table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto;"><tbody><tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjPpFYM4d6LZcV11nA1GWmL5dqdhsuvG-e-tDRIVUcWc8tP7SDpdGNVkRlJZi_cKZWhBBJC_KRR-y5sBOPL8utv743GkYS3Aq1v1ttQ65bC1gnGFLN8NnRacDhLH6ZATS2zmVI-b5unKUqHK86NZXPuvPXmWdxXT04b85yjELPrbPb3THytDiMlaa8d/s1760/screenshot-epaper.agrowon.com-2023.01.12-19_26_49.png" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img alt="#sameerbapu" border="0" data-original-height="1760" data-original-width="1494" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjPpFYM4d6LZcV11nA1GWmL5dqdhsuvG-e-tDRIVUcWc8tP7SDpdGNVkRlJZi_cKZWhBBJC_KRR-y5sBOPL8utv743GkYS3Aq1v1ttQ65bC1gnGFLN8NnRacDhLH6ZATS2zmVI-b5unKUqHK86NZXPuvPXmWdxXT04b85yjELPrbPb3THytDiMlaa8d/w544-h640/screenshot-epaper.agrowon.com-2023.01.12-19_26_49.png" title="#समीरगायकवाड #समीरबापू" width="544" /></a></td></tr><tr><td class="tr-caption" style="text-align: center;">विहीर .. </td></tr></tbody></table><br /><span style="font-family: Eczar; font-size: x-large;">तुळसाबाई म्हणजे बज्याबाची बाईल! नांगी तुटलेल्या खेकड्यागत तिरक्या चालीची बाई. तिला काही सांगितलं तर ती वाकड्यात जायची. तांबूस गोऱ्या रंगाची बुटक्या चणीची तुळसा सदानकदा ओसरीवर नाहीतर संत्याच्या पिंपळापाशी बसून असायची. डोईच्या केसांना इतके तेल थापलेले असे की पदर तेलकट वाटायचा! बंद्या रुपयाचं कुंकू तिच्या व्हंड्या कपाळी असायचं. चाफेकळी नाक नसले तरी नाकपुड्या फार काही फेंदारलेल्या नव्हत्या. उतरत्या गालांच्या चेहऱ्याला आखूड हनुवटीची जोड होती त्यामुळे पत्त्यातल्या चौकट राणीसारखा तिचा चेहरा दिसायचा. तिचा रुबाबही राणीसारखा होता, बज्या शेळकेच्या घरी तिचा शब्द अंतिम होता. बज्या तिच्या शब्दाबाहेर नव्हता याची अनेक कारणे होती त्यातली फार थॊडीच गावाला ठाऊक होती. तुळसा अगदी तिरसट आणि तापड होती, बज्याच्या मामाची पोरगी होती ती. मामाने थाटात लग्न लावून दिलेलं, रग्गड पैसाअडका खर्च केलेला. गरीब जावयाचं बोट पिवळंधमक केलेलं, पोरीच्या अंगावर बक्कळ सोनं घातलेलं. आपली पोरगी डोक्यातून गेलेली आहे हे त्या बापाला माहिती होतं म्हणूनच त्यानं भाच्याला पोरगी देताना त्याला पुरतं मिंधं केलं होतं. बज्याचे हात त्या ओझ्याखाली अडकले होते. सासऱ्याच्या मदतीने त्यानं जमीनजुमला घेतला नि तिथून त्याचे दिवस फिरले! सारं होत्याचं नव्हतं झालं.<span><a name='more'></a></span> <br /><br />बज्या शेळकेला चार भाऊ होते. बापाच्या मृत्यूनंतर वडिलोपार्जित सात एकर जमीन त्यांनी आपसात वाटून घेतलेली. बज्या शेवटून दुसरा होता. त्याच्या वाट्याला आलेलं रान मुरमाड होतं, अगदी नापिकी नसली तरी त्या मातीत कसदेखील नव्हता. घरी मयत झाल्यावर वर्षात लग्न केलं गेलं नाही तर तीन साल अंगाला हळद लावायची नाय असा गावाचा भावकीचा अन् गावकीचा संकेत होता, त्याचं पालन करत बज्या आणि त्याचा धाकटा भाऊ वसंत यांचं लग्न एकाच मांडवात झालं होतं. वसंताला गावातलीच मुलगी सांगून आली होती, त्याचं शिक्षण बऱ्यापैकी झालं होतं नि तो थोडाफार हुशार व्यवहारचतुरही होता! गावातला पहिला मॅट्रिक पास तरुण होता तो! त्याचं चांगलं निपटलं. बज्या मात्र नात्यांच्या गुंत्यात अडकून बसला. तुळसाचा स्वभाव त्याला माहित नव्हता असं नव्हतं मात्र त्याच्या आईच्या इच्छेपुढे त्याचे काहीच चालले नाही. एकाएकी बाप गेला, घरात वाटण्या झाल्या, थोरल्याने कावा केला नव्हता मात्र मधल्याने डाव मांडला होता. बापाच्या पाठीमागे घर तुटलं, आई कोलमडून गेली आणि आईच्या मायेत असहाय्य झालेला बज्या नकार देऊ शकला नाही. तुळसाने उंबऱ्यावरचं माप ओलांडल्यापासून घरातली शांती भंग पावली होती. आईकडे बघून तो सारं सहन करायचा. मात्र एका पावसाळ्यात आई गेली आणि बज्याचा आधार गेला. त्यांच्या राहत्या वाड्याचेही हिस्से झाले. छातीत अगणित कळा येत गेल्या मात्र सोशिक असणारा बज्या काहीच बोलला नाही. जे मिळेल त्याला होकार देत गेला. तुळसाने मात्र मोकार तमाशा केला. जावांशी दावा मांडला, झिंज्या उपटून काढेपर्यंत भांडणं केली. शेवटी गावातल्या थोराड मंडळींनी मामला मिटवला. आपल्या बायकोने मोठ्या भावाच्या अंगावर जाणं बज्याला रुचलं नाही, मोठ्या वहिनीचा तिने केलेला पाणउतारा तो कधीच विसरू शकला नाही. ही भांडणं त्याच्या जिव्हारी लागली. घर सोडून तो वस्तीवर राहायला गेला. <br /><br />बजरंग नावाप्रमाणेच बलदंड होता. चार गड्याचं काम करायचा, एका अंगाला बैल नि एका अंगाला त्याला जुंपलं तर तो बैलाला भारी पडायचा. कसलेला धिप्पाड देह होता त्याचा मात्र व्यावहारिक जगाची फारशी समज नव्हती. सगळं आई आणि बापाच्या मर्जीने चालायचं. भावंडेही प्रेमळ होती, थोरल्या वहिनीने तर आईची माया दिली होती. वडिलांच्या पाठीमागे त्यांच्या घराची लक्तरे वेशीवर टांगण्याचे काम आपल्या बायकोने केले हा डंख त्याला सुखाने जगू देत नव्हता. त्याची तब्येत आस्ते कदम ढासळत गेली. आपल्या पोरीने जावयाचे हाल केले याचा बज्याच्या सासऱ्याला पस्तावा आला. केलेल्या चुकीचे प्रायश्चित्त म्हणून त्याने ओढ्याच्या कडेला असलेली जमीन घेण्यासाठी बज्याला मोठी मदत केली. ती जमीन घेण्यासाठी बज्याने त्याच्या वाट्याला आलेली वडिलोपार्जित जमीन विकली. त्या जमिनीत तो रात्रंदिवस कसू लागला. गावाकडे घरी सुरु असलेली भांडणे त्याच्या दृष्टीआड सुरुच होती, त्यात खंड नव्हता. तांबडं फुटल्यापासून तुळसाच्या तोंडाचा पट्टा सुरु व्हायचा. जावांनी घराची दारं बंद केली ती ओसरीवर येऊन बसायची नाहीतर आळीच्या कोपऱ्यावर राहणाऱ्या संत्याच्या पिंपळापाशी बसून असायची. बसल्या बसल्या दातवण लावत गावाची मापं काढायची. तिच्या निंदेची ज्यांना गोडी होती अशा साळकाया म्हाळकाया तिच्या भवताली रिंगण करुन बसायच्या. तुळसाची कूस उजवून तिच्या पोटी एक गोरंगोमटं पोर आणि एक पोरगी झालेली. तुळसाने आपल्या पोरीवर जीव लावला नाही पण पोराला मात्र लाडाने येडं अन् गुळानं बोबडं करुन ठेवलं होतं! पोरगं अगदी वाया गेलं. बज्याला काही कळत नव्हतं असं नाही पण त्याचं काही चालतच नव्हतं, तो हताश होऊन पाहत राहायचा. कधी त्याने तिच्यावर डाफरण्याचा प्रयत्न केला तर ती वस्सकन अंगावर यायची, चार लोकांदेखत आपल्या बापाने केलेल्या उपकाराचा पाढा वाचून त्याचा पाणउतारा करायची. तो निमूटपणे मान खाली घालून निघून जायचा. मग तिला अजून चेव यायचा. असं करत करत बरेच दिवस लोटले. पोटापाण्याचे भागेनासे झाले तेंव्हा त्याने सासऱ्याच्या मदतीने जमीन घेतली. <br /><br />आपली हक्काची जमीन विकून त्याने सौदा केला खरं मात्र फासे उलटेच पडले. दरम्यान मुलगी न्हातीधुती झाल्यावर तिच्या लग्नाची गोष्ट निघाली. त्यासाठी थोडा पैसा हवा होता, शिल्लक राहिलेली सगळी रक्कम मुलीच्या लग्नात खर्ची पडली. बज्या कंगाल झाला. ओढ्यालगत घेतलेली निम्मी जमीन रस्त्याच्या कामासाठी सरकारने ताब्यात घेतली नि त्याच्यावर आभाळ कोसळले. तो खचून गेला. त्याने दत्तू पाटलाच्या वस्तीवर सालगड्याचं काम धरलं. पण त्याचं गणित काही केल्या मेळ खात नव्हतं. हप्त्यातून एका दिवसासाठी जरी गावातल्या घरी गेलं तरी भूतकाळ त्याला खायला उठायचा. दरम्यान पोरीचं बाळंतपण जवळ आलं, खर्च मोठा दिसत होता खिसा मोकळा होता. त्याचा पोरगा रामचंद्र हा लग्नाला येऊन निबार दिसू लागला होता. त्याच्या लग्नावरुन तुळसा रोज टोमणे मारू लागली होती. तिच्या रोजच्या किरकिरीला कंटाळून बज्याच्या भावंडांनी दुसरीकडे राहण्याची सोय केली, वाडा विकून टाकला. तुळसाला भांडायला माणूस उरलं नाही आणि तिचे वडीलही वार्धक्याने गेले. बज्या खऱ्या अर्थाने अनाथ भणंग झाला होता. पोराचं लग्न करायला नि पोरीचं माहेरपण करायला त्याच्याकडे फुटका मणी नव्हता. त्याची नड दत्तूची बायको लीलावती हिने अचूक हेरली, तिने एक भयानक सौदा केला. त्याला बज्या आधी तयार नव्हता मात्र त्याची मती कुंठित झाली होती, त्याचा विवेक लोप पावला होता. रामचंद्राच्या वयाचा काशिनाथ हा लीलावतीचा एकुलता पोर होता नि तिला तीन पोरीही होत्या ज्यांची लग्ने झाली होती. दत्तूच्या पहिल्या बायकोपासून झालेल्या मुलाचं खटलं देखील तिथेच होतं. दत्तूपासून तिच्यापोटी शिवा जन्मला होता. त्याच्या जन्मानंतर काही दिवसांतच दत्तूची पहिली पत्नी मरण पावली होती. लीलावतीने सावत्र मुलाचे लग्न लावून दिले मात्र तिच्या मनात असूया होती. लग्नानंतर शिवाचा पाळणा लगेच हलला नि त्याला देखणं पोर झालं. मोठ्या नितळ मनाचा दत्तू नातू झाल्याने हरखून गेला, इकडे काशिनाथाच्या बायकोला मूल होत नव्हतं म्हणून लीलावती तळमळत राहिली. द्वेषाने ग्रासलेल्या लीलावतीच्या डोक्यात कुटीलतेचं जहर फणा काढून होतं, तिने त्यासाठी बज्याला निवडलं. काम ऐकताच त्याचा चेहरा काळाठिक्कर पडला! ओठ कोरडे पडले, नरडं आत ओढू लागलं. आधी त्याने नकार दिला मात्र लीलावतीने आमिष दाखवली त्याला तो भुलला. वस्तीवर कुणी नाही हे पाहून रानात खेळत असणाऱ्या शिवाच्या चिमुरड्या पोराला त्यानं विहिरीत कोंडलं, पायट्याचे धोंडे काढले. तो निघून आला आणि लीलावतीने पुढचे काम पार पाडलं. ते पोर तिने पाण्यात बूडवून ठार मारलं. साळसुदागत ती वस्तीवर येऊन बसली. सांज होता होता पोराचा शोध घेताना एकच गलका उडाला नि बज्याला आपण किती मोठी चूक करुन बसलोय याचा अंदाज आला. त्याचं मन त्याला खाऊ लागलं. रामचंद्राचं लग्न झालं तरी बज्याच्या चेहऱ्यावर ख़ुशी नव्हती. या लग्नानंतर काही दिवसांतच तुळसाने अंथरून धरले. आजाराने अवघ्या काही दिवसांत गंभीर रुप धारण केलं नि त्यातच तिचा मृत्यू झाला. तुळसा मेली तेंव्हा बज्या रडला नाही!<br /><br />इकडे दत्तू पाटीलही हाय खाऊन मरण पावला. त्याच्या पाठीमागे वंशाची वेल काही केल्या वाढली नाही. काशिनाथला मूलबाळ झाले नाही. लीलावती टाचा रगडून रगडून खंगून गेली. चार दशकाहुन अधिक काळ पाटलांच्या शिवारात सालगडी म्हणून राबणारा बज्या उतारवयात लागीर झाल्यागत वागू लागला. पाटलाच्या शेतांत आणखी आक्रीत घडलं, ज्या विहिरीत शिवाचा मुलगा मरण पावला तिचं पाणी दत्तू जाताच एकाएकी आटलं. त्यानंतर दोन वर्ष सलग दुष्काळ पडला, रान निव्वळ पडीक पडलं. शिवार ओसाड झालं. काशिनाथ बायकोला घेऊन नोकरीच्या गावी गेला, शिवा आणि लीलावती दोघेच त्या भकास वस्तीवर राहू लागले, बज्या त्यांच्या जोडीला येऊन बसायचा. शेतात काम नव्हतं, त्याने कामावर जाऊ नये म्हणून रामचंद्र त्याला खूप अडवायचा पण कितीही मिनतवाऱ्या केल्या तरी बज्या काही केल्या ऐकायचा नाही. तो पाटलाच्या वस्तीवर यायचाच, आटून गेलेल्या विहिरीच्या ढलाणीपाशी जांभळाच्या झाडाखाली येऊन बसायचा. तहानभूक हरपून तासंतास बसून राहायचा. त्याला आता वेगळीच चिंता लागली होती. रामचंद्राच्या लग्नाला वीस वर्ष झाली तरी तान्हुली पावलं अंगणात उमटली नव्हती. आपण पाटलाच्या वंशाचा दिवा विझवण्यात मदत केली म्हणून द्येवानं आपला वंश बुडवला असंच त्याला वाटायचं. आभाळाकडं बघत पुटपुटत राहायचा,कधीकधी विहिरीत उतरून साफसफाई करायचा. नेणत्या लेकरागत हमसून रडायचा. सांज होताच रामचंद्र येऊन त्याला घेऊन जायचा. बज्या रोज उठून पश्चात्ताप करायचा आणि आपल्या रामचंद्राला मुलबाळ व्हावं म्हणून देवापाशी गाऱ्हाणं करायचा. हेच त्याचं आयुष्य झालं होतं.<br /><br />आणि एका दिवाळीत बज्याची प्रार्थना सुफळ झाली. थोराड झालेली त्याची सून मंदाबाई पोटुशी राहिली. तिचे पाय भारी झाल्याचं कळताच तो ढसाढसा रडला. इतकी आनंदाची बातमी कळली तरी पाटलाच्या वस्तीवर विहिरीपाशी यायला तो काही चुकला नाही. त्या दिवशी त्याला विहिरीतून प्रतिध्वनी आल्याचे भास झाले. विहिरीच्या तळाशी कुणी तरी हाका मारत असल्याचा त्याला भास झाला. ते भास वाढतच राहिले. तो पुरता भ्रमिष्ट झाला. बज्याला वेड लागलंय असं गाव चारी तोंडाने बोलू लागलं. जख्ख म्हाताऱ्या झालेल्या लीलावतीला तर अपार दुःख झालं, तिलाही पश्चात्ताप होत होता मात्र सांगणार कुणाला? ज्याचं पोर आपण मारलं त्या शिवाच्या हातून सेवा करवून घेताना ती रोज तीळतीळ मरत होती. पावसाळा तोंडावर आला होता, सुनेचं बाळंतपण कधीही होईल हे बज्याला एव्हाना उमगलं होतं. आषाढ भरावर आला होता. वारं मुकं झालं होतं. काळयाकुट्ट ढगांनी एकच गर्दी केली होती. सुकून गेलेली झाडं माना टाकून उभी होती. दूरवर कुठं चिटपाखरू दिसत नव्हतं. अंगातून घामाच्या धारा लागलेल्या अवस्थेत बज्या विहिरीच्या तोंडापाशी बसून होता. त्याचं अंग आता थरथरत होतं. भास वाढले होते. डोक्यात कसले तरी आवाज घुमत होते. इतक्यात रामचंद्राच्या हाका त्याच्या कानी पडल्या. तो लांबूनच आरडत धावत येत होता, आबा तुला नातू झालाय! आबा तू आज्जा झालाय! मी बाप झालोय, मंदाला पोरगं झालंय! आबा मंदाला पोरगं झालं!" <br /><br />काही सेकंदासाठी बज्याच्या चेहऱ्यावर हसू झळकलं! पण निमिषार्धात त्याचा चेहरा भावव्याकुळ झाला. रामचंद्राच्या हाका वाढत गेल्या आणि बज्याला त्याचा आवाज आता क्षीण वाटू लागला, मात्र विहिरीतून येणारा आवाज मात्र अत्यंत वेगाने वाढला होता. त्यातच पावसाची रीपरीप सुरु झाली. रामचंद्राचे पाय ढेकळात अडकू लागले. असेच काही क्षण गेले. बांधावरुन धावत येणारा रामचंद्र बज्याच्या नजरेच्या टप्प्यात येऊनदेखील त्याची नजर शून्यात होती, त्याच्या डोळ्यात विहीर दिसत होती! खोल खोल कोरडी ठाक विहीर! रामचंद्र बज्याच्या जवळ पोहोचला आणि त्याने आनंदाने बापाच्या नावाने आरोळीच मारली! त्याला हात लावून हलवून पाहिलं. त्याचं अंग एकाएकी थंड पडलं होतं. सर्रकन त्यानं हात मागे घेतले आणि निष्प्राण झालेला बज्याचा देह कठडयावरून कलून विहिरीत पडला, दहा परस खोल घडीव विहीर होती. धोंडयांवर पडून बज्याचं डोकं फुटलं. विहिरीचा तळ लाल झाला. त्या रात्रीच त्याचं मर्तिक झालं. काही दिवसांनी काशिनाथ गावी येऊन गेला. लीलावतीने त्याच्यासोबत शहरी जाण्यास नकार दिला. आपल्या थोरल्या लेकीचा मुलगा तिने शिवासाठी दत्तक घेतला. दत्तू पाटलाचं शिवार लहान मुलाच्या आवाजाने पुन्हा डवरलं. आताशा लीलावती वस्तीवर शांत बसून असते, तिला वेध लागलेत मरणाचे, मुक्तीचे. तिला शिवाच्या मांडीवर आपले प्राण सोडायचेत. बज्याच्या मरणाने तिथे आणखी एक बदल झाला. दत्तू पाटलाच्या आटलेल्या विहिरीतले झरे पुन्हा पाझरु लागले. पाटलाची विहीर त्या पावसाळ्यात काठोकाठ भरुन गेली. त्याच विहीरीचे पाणी तुळसाच्या डोळ्यातून वाहत असते ज्याला त्या चिमुरड्या मुलाचा देहगंध आहे! <br /><br />- समीर गायकवाड</span>sameer gaikwadhttp://www.blogger.com/profile/05106372658264914305noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1120566833830274839.post-18730270783350717162022-12-28T09:44:00.000+05:302022-12-28T09:44:13.713+05:30हम भी अगर बच्चे होते! <div><table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto;"><tbody><tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg1hW_uH2Vpug3b2ntVb-Qo6vVec1ZDpcVqTxLzQv4CSx5vecT1HvI81M6Nti2GK60Qlt_Votxk_IFIzJT3TT_MPV-0OySgT2IJARVrEPNryXs2dQxg8Tmb0gZI4bcxHx2oNOD5GP0DIzVlWIqR2uV8NMstGH4RjNSuLOo25K_0Wx0Ofa2Y9XqGCyAK/s1622/son-of-india.jpg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="1622" data-original-width="1200" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg1hW_uH2Vpug3b2ntVb-Qo6vVec1ZDpcVqTxLzQv4CSx5vecT1HvI81M6Nti2GK60Qlt_Votxk_IFIzJT3TT_MPV-0OySgT2IJARVrEPNryXs2dQxg8Tmb0gZI4bcxHx2oNOD5GP0DIzVlWIqR2uV8NMstGH4RjNSuLOo25K_0Wx0Ofa2Y9XqGCyAK/w474-h640/son-of-india.jpg" width="474" /></a></td></tr><tr><td class="tr-caption" style="text-align: center;">सन ऑफ इंडिया </td></tr></tbody></table></div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><br /></span></div>हिंदी चित्रपटसृष्टीने सर्वच वयोगटातील पात्रांना ग्लॅमर दिलेय, त्यांच्या भूमिकांना स्वतंत्र स्पेस दिलीय. हरेक वयाच्या कलाकारांना किर्ती मिळवून देताना हिंदी सिनेमा नित्य नव्या उंचीवर जात राहिलाय. कलाकारांनी देखील आपल्याला <table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: right; margin-left: 1em; text-align: right;"><tbody><tr><td style="text-align: center;"><img border="0" data-original-height="369" data-original-width="270" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg-jp1ZL9zhvd_zB7byzEN0PhePVuDN6ZUI-PBTUQTofaklccZOORcK3CqKW2Uk_sOLm2t_9XeUe4cmf93IQsrwMs7IqPfHmDVWZMV2PLkroAjXAqBr4bqfTD2hRv8rqJnPfbovU_G1zFrWnqRSkdIR24ixRXCJsAgnR8opG8OuV5iqZiVTGpeCTaBJ/w293-h400/%23lb%203%206.jpg" style="margin-left: auto; margin-right: auto;" width="293" /></td></tr><tr><td class="tr-caption" style="text-align: center;">चाची 420 </td></tr></tbody></table> मिळालेल्या संधीचे सोने करत आपल्या वाट्याला आलेल्या कॅरेक्टर्सना न्याय दिला. नायिका, नायकापासून ते खलनायकांपर्यंतच्या आलेखाचा आढावा घेताना बालकिशोरांच जगही सिनेमाने ध्यानात घेतल्याचे दिसते. देशात बालचित्रपटांना जे स्थान मिळायला हवे होते ते मिळालेले नाही हे जरी मान्य केले तरी बालमित्रांच्या जगास बहिष्कृतही केलेलं नाही हे ही खरेय. मुलांवर बनवलेले चित्रपट कमी-अधिक प्रमाणात स्वीकारले गेलेत. इतर भारतीय भाषांपेक्षा हिंदीत बालचित्रपटांची निर्मिती जास्त झालीय. राज कपूरपासून ते आमिर खानपर्यंत निर्मात्यांनी मुलांना केंद्रस्थानी ठेवून बालचित्रपट तयार केले आहेत. हे सिनेमे केवळ मनोरंजनच करत नाहीत तर मुलांशी संबंधित समस्यांकडेही लक्ष वेधतात. 1980 मध्ये 'मिस्टर इंडिया' हा चित्रपट एका अदृश्य माणसावर बनवला गेला होता पण त्या चित्रपटाचा केंद्रबिंदू ही मुले होती. हा सिनेमा ऐंशीच्या दशकातील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक होता. 'तारे जमीन पर', 'मकडी', 'नन्हे जेसलमेर', 'इक्बाल', 'ब्लू अंब्रेला', 'जजंत्रम ममंत्रम', 'अपना आसमान', 'मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर', 'भूतनाथ', 'सिक्रेट सुपरस्टार', 'बम बम बोले' आदी बालचित्रपटांनी बालचित्रपटाची संकल्पना थोडी बदललीय. नव्या संवेदनेवर निर्मिले गेलेले हे चित्रपट शक्यअशक्यतेचा नवा पट उभा करतात. या चित्रपटांमध्ये मानवी नातेसंबंध आणि सहवास भावना, मुलांच्या समस्या मोठ्या वैविध्यपूर्ण आणि सौंदर्याने चित्रित केल्यात. बालपण वेगवेगळ्या पद्धतीने मांडतानाच कधी त्यातली गंमत, कधी त्यांची भीती, कधी त्यांची निरागसता तर कधी त्यांची आंतरिक धडपड चित्रपटांतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. काही चित्रपट असेही आहेत जे विशेषतः मिलेनियल किड्सच्या आधीच्या पिढीशी बोलतात.<span><a name='more'></a></span><br /><br />विवेक शर्मा दिग्दर्शित बी.आर. चोप्रा दिग्दर्शित 'भूतनाथ' चित्रपटातील बंकू आणि भूतनाथ यांच्या नात्याने संयुक्त कुटुंबाच्या हरवलेल्या संकल्पनेबद्दल आणि भारतीय <table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: right;"><tbody><tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEggV3ZgaoTaXyNdfhZLdxrFUseK0iq1MwrEXqfIjLYf_8svvZFr--rYMwQWwTJtemeMvR5iXy5oqs45GiA8CeS0oGRp18AomdzTW0-8O87vu7x61HpoLMleZg5m4T6RwV_o6h6NKPBs2MwuShM5o4DCMOIg62Sc9ljRK20r2UzLXTV5BmXlsSqwAnIq/s1500/%23lb%203%205.jpg" imageanchor="1" style="clear: right; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="1500" data-original-width="1494" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEggV3ZgaoTaXyNdfhZLdxrFUseK0iq1MwrEXqfIjLYf_8svvZFr--rYMwQWwTJtemeMvR5iXy5oqs45GiA8CeS0oGRp18AomdzTW0-8O87vu7x61HpoLMleZg5m4T6RwV_o6h6NKPBs2MwuShM5o4DCMOIg62Sc9ljRK20r2UzLXTV5BmXlsSqwAnIq/w399-h400/%23lb%203%205.jpg" width="399" /></a></td></tr><tr><td class="tr-caption" style="text-align: center;"></td></tr></tbody></table> कुटुंबांच्या विभाजित मूल्यांबद्दल जागरुकता निर्माण केली. हिंदी चित्रपटांमध्ये अभिनेता या नात्याने मुलांची उपस्थिती तसेच बालचित्रपटांबद्दलची आपली धारणा 'मकडी' चित्रपटाने बदलली. विशाल भारद्वाजच्या 'ब्लू अंब्रेला'नेही संवेदनांच्या पातळीवर खूप छाप पाडली. इरफान कमालने त्याच्या 'थँक्स माँ' या चित्रपटात मुंबईच्या झोपडपट्टीतील भटक्या आणि अनाथ मुलांमधून अपूर्ण बालपणीची मार्मिक कहाणी मांडण्याचा प्रयत्न केलाय. या चित्रपटात एका अनाथ बालकाची कथा आहे. ज्याला स्वतःला सलमान खान म्हणवायला आवडते. तो अनाथ मुलांसोबत खिसा कापून उदरनिर्वाह करतो. त्याची एकच इच्छा असते की कधीतरी आईला भेटावे. बालगृहातून पळून जात असताना त्याला दोन दिवसांचे नवजात बाळ दिसते. तो त्या निरागस मुलाला घेऊन येतो आणि वाढवतो. त्याच्या मित्रांच्या मदतीने, तो मुलाच्या आईपर्यंत पोहोचण्यात यशस्वी होतो, परंतु जेव्हा त्याला हे सत्य कळते की मुलाला त्याच्या आईने तेथे सोडून दिले होते तेव्हा त्याला धक्का बसतो. चित्रपटानुसार देशात दररोज 270 मुले अनाथ होतात. शहरातील निनावी गल्ल्यांमध्ये या मुलांचे आयुष्य निघून जाते आणि काही मुले उदरनिर्वाहासाठी गुन्हेगारीचा मार्ग पत्करतात.<br /><br />नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पाठशाळा' या चित्रपटाच्या माध्यमातून समाज आणि मुलांच्या भवितव्याशी होणारा <table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: left; margin-right: 1em; text-align: left;"><tbody><tr><td style="text-align: center;"><img border="0" data-original-height="1200" data-original-width="1200" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhnFlSEuTrJcakyBWWHsB6DVWiZoFeWPj2VYbABqdKyzLxM6sa7W0kFdKdsvCS-umCn7g_75hvNO431F6d0JtermApbPgeNFcfmurS8-6LZK_BPSDD9TaN2I8sDtCSzxRZICbOhaOsPqA46svWBH7qn3Pzk1G8AZNa43WZgspppFRq-M3wFkkO-rwEX/w400-h400/%23lb%203%208.jpg" style="margin-left: auto; margin-right: auto;" width="400" /></td></tr><tr><td class="tr-caption" style="text-align: center;">बम बम भोले </td></tr></tbody></table> गोंधळ दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. शिक्षक आणि मुलांच्या पालकांसाठी हा डोळे उघडणारा चित्रपट ठरला. शाळकरी मुलांचे ज्वलंत प्रश्न उपस्थित केलेले. सार्वजनिक शाळांतील व्यावसायिक वृत्ती तपासण्याचा प्रयत्न करण्यात केला गेलाय. प्रियदर्शनचा 'बम बम बले' हा चित्रपट मुलांसोबत थोरांनीही मोठ्या प्रेमाने पाहिला. या चित्रपटात दोन लहान भावंडे असतात. एके दिवशी चुकून भावाकडून बहिणीचे बूट हरवतात. आई-वडील गरीब असल्याने ते आपल्याला रागावतील याची त्यांना भीती वाटते. दोन्ही भावंडं मनात एक गोष्ट निश्चित करतात. बहीण सकाळी तेच बूट घालून शाळेत जाते, भाऊ दुपारी तेच बूट घालून शाळेत जातो. दरम्यान कुटुंब आणि शाळा यांच्यातील घुसळण रंजक वळणावर पोहोचते. आंतरशालेय मॅरेथॉन शर्यतीत भावाला प्रथम नव्हे तर तिसरे यायचे असते कारण तिसरे पारितोषिक म्हणजे त्याच्या बहिणीला आवश्यक असलेले शूज. पण मॅरेथॉन शर्यतीत तो पहिला क्रमांक मिळवतो. त्याला पुढील अभ्यासासाठी शिष्यवृत्ती मिळते, पण तो आनंदी नाही. उलट प्रथम क्रमांक मिळाल्यावर आपले स्वप्न आणि गरज असलेले तिसरे पारितोषिक 'शू' मिळू शकणार नाही याचे त्याला दुःख होते. या चित्रपटाचा हा एक अतिशय हृदयस्पर्शी भाग आहे. जिंकूनही तो स्वतःला पराभूत समजतो. प्रसिद्ध चित्रपट निर्माते माजिद माजिदी यांनी या कथेवर 'चिल्ड्रन ऑफ हेवन' बनवला आहे. हिंदीतच खालिद वाई बाटलीवाला यांनी 'सलाम बच्चे' नावाचा हा चित्रपट बनवला आहे. 'कुछ कुछ होता है' या बिगस्टारर चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण होता. यात लहानग्या अंजलीची तिच्या आईबद्दलची तळमळ, तिच्या वडिलांना त्याच्या प्रेमाने पुन्हा जोडण्याचा तिचा प्रयत्न आणि छोटी अंजली तिच्या आजीसोबतचे ऋणानुबंध अशा साध्याच पण महत्वाच्या गोष्टी होत्या. कथानक बालचित्रपटाचे नसले तरीही त्याचा मुख्य धागा छोट्या अंजलीच्या प्रवासाविषयीशी जोडला गेलेला असल्याने अंजलीला जेंव्हा रडू येते तेव्हा थिएटरमध्ये बहुतांश प्रेक्षक डोळे पुसतात!<br /><br />आमिर खानचा 'तारे जमीन पर' हा चित्रपट डिस्लेक्सियाने ग्रस्त असलेल्या मतिमंद मुलावर आधारित होता. चित्रपटाने अनेक बेंचमार्क सेट केले आणि डिस्लेक्सिया असलेल्या <table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: right;"><tbody><tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgNqaGnR6jTWkaUw5qcX1RFuANwDfAO3UMBv0dVMf-riBVglXizs8FIXCM3MwiGR779IjhJlihRh-7bIqace-ot3NJZOTM3l4-ERwr7NZKFlwtReYMg9ki3LK7_N1MkkLdmvpCvk5evb8k-8BxE5dF5QspWN8H1cMYAuC4CPJs7mW9Wb91LXOU0XWfT/s387/%23lb%203.png" imageanchor="1" style="clear: right; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="387" data-original-width="258" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgNqaGnR6jTWkaUw5qcX1RFuANwDfAO3UMBv0dVMf-riBVglXizs8FIXCM3MwiGR779IjhJlihRh-7bIqace-ot3NJZOTM3l4-ERwr7NZKFlwtReYMg9ki3LK7_N1MkkLdmvpCvk5evb8k-8BxE5dF5QspWN8H1cMYAuC4CPJs7mW9Wb91LXOU0XWfT/w266-h400/%23lb%203.png" width="266" /></a></td></tr><tr><td class="tr-caption" style="text-align: center;">तारे जमीन पर </td></tr></tbody></table> मुलाचे मानसशास्त्र मोठ्या गांभीर्याने आणि जागरूकतेने चित्रित केले. 'तारे जमीन पर'च्या गाण्यांनीही वेगळी छाप सोडली. 'तहान' आणि 'रामचंद पाकिस्तानी' सारख्या चित्रपटांच्या पटकथेत मुले मागे राहिली. मुलांच्या शिक्षणावर आधारित 'नन्हे जसमेलर'च्या स्क्रिप्टमध्ये काही नाविन्य होते, पण चित्रपटाची कथा बॉबी देओलभोवती फिरते. विशाल भारद्वाजच्या 'ब्लू अंब्रेला'ला तर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राहुल बोसचा 'चेन कुली की मैंन कुली', अनुराग कश्यपचा 'बाल गणेश', 'माय फ्रेंड गणेश', 'रिटर्न ऑफ हनुमान' या चित्रपटांचीही खूप चर्चा झाली. अजय देवगणच्या 'राजू चाचा'नेही चांगली कमाई केली. काही वर्षांपूर्वी संजय लीला भन्साळी यांचा 'ब्लॅक' हा चित्रपट आला होता, ही कथा एका अंध आणि मूकबधिर मुलीची होती. यामध्ये अमिताभ त्या अंध मुलीच्या कडक शिक्षकाच्या रूपात होते, यास अनेक पुरस्कारही मिळाले. या चित्रपटाचेही खूप कौतुक झाले. त्याचप्रमाणे अमिताभ बच्चन अभिनीत 'पा' मध्ये प्रिजेरिया आजाराने ग्रस्त बालक दाखवण्यात आला होते. ज्या मुलांचे पालक गमालेले असतात त्यांची काळजी देव घेईल असा भाबडा आशावाद असणारी कथा 'राजू चाचा'मध्ये होती. यात अजय देवगणपेक्षा बाल कलाकारांना स्पेस जास्ती होती.<br /><br />पियुष झा यांच्या 'सिकंदर' चित्रपटात काश्मीरमधील तणाव आणि वेदना मुलांच्या डोळ्यांतून पाहण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. सिकंदर ही एका मुलाची कथा आहे ज्याला <table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: right;"><tbody><tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhvLiajCvV5K9Xcss4MzHB44p9a941GbJPAAov6B4JWJdKK1eLdZyyeC5PXesj8NuJHp3HGYOWlSFgLh3JiaeYf_cVWCFntJ_5ZybbtARp4kD39L4ZGXSsKuRTYsXU8ymKe4MnnpQOMGh3vzaZk2Q4LnCMMHgYsznlmF32yQFNrQu6zr2ElackbJebQ/s1600/%23lb3%204.jpg" imageanchor="1" style="clear: right; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="1600" data-original-width="1120" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhvLiajCvV5K9Xcss4MzHB44p9a941GbJPAAov6B4JWJdKK1eLdZyyeC5PXesj8NuJHp3HGYOWlSFgLh3JiaeYf_cVWCFntJ_5ZybbtARp4kD39L4ZGXSsKuRTYsXU8ymKe4MnnpQOMGh3vzaZk2Q4LnCMMHgYsznlmF32yQFNrQu6zr2ElackbJebQ/w280-h400/%23lb3%204.jpg" width="280" /></a></td></tr><tr><td class="tr-caption" style="text-align: center;"><span style="text-align: left;">स्टॅनली का डिब्बा</span></td></tr></tbody></table> फुटबॉलची आवड आहे आणि त्याला राष्ट्रीय स्तरावर फुटबॉल खेळायचा आहे. पण एके दिवशी त्याला रस्त्यावर बंदूक सापडते, त्यानंतर त्याच्या आयुष्यातील सर्व काही बदलू लागते. या चित्रपटात काश्मिरी मुलांच्या व्यथा पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. 'स्टॅनली का डिब्बा' या चित्रपटाची कथा शाळेत जाणाऱ्या नऊ वर्षांच्या स्टॅनलीची आहे. स्टॅनली त्याच्या मित्रांसोबत अभ्यास करण्यासोबतच सामान्य जीवन जगत असतो. पण एके दिवशी जेव्हा हिंदी शिक्षक बाबूराम यांची नजर त्याच्या आणि सहकाऱ्यांच्या जेवणाच्या डब्यांवर पडते तेव्हा तो अडचणीत येतो. इतकंच नव्हे तर बाबूरामला जेव्हा कळतं की प्रत्यक्षात स्टॅनली डबा आणत नाही, तेव्हा त्याचा त्रास आणखी वाढतो. बाबूराम त्याच्यावर डबा आणण्यासाठी दबाव आणतो आणि म्हणतो की डबा आणली नाही तर त्याला शाळेत प्रवेश दिला जाणार नाही. शेवटी स्टॅनलीच्या डब्याच्या शोधात मोहीम सुरू होते आणि या मोहिमेत घडणाऱ्या घटना हे स्टॅनलीच्या डब्याचे वैशिष्ट्य आहे. 'स्टॅनली का डिब्बा' चित्रपटाच्या शेवटी जेव्हा प्रेक्षकांना कळते की स्टॅनली अनाथ आहे, त्याला आई-वडील नाहीत आणि तो आपल्या क्रूर काकांच्या दयेवर जगत आहे, तेव्हा प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू येतात. 'लकडी की काठी' गाणं असणारा 'मासूम' हा सिनेमा कुणी विसरणं शक्यच नाही. त्यातला निरागस नि मृदु जुगल हंसराज विस्मृतीत जाणं अशक्य आहे.<br /><br />यूटीव्ही स्पॉटबॉय आणि सलमान खान द्वारे सह-निर्मित 'चिल्लर पार्टी' ही एका निरागस मुलांच्या गटाची कथा होती जी राजकारण्याविरुद्ध उभे राहतात आणि एका भटक्या कुत्र्याचा जीव वाचवून मन जिंकतात. 'आय एम कलाम' चित्रपटाची कथा देशाचे सर्वात प्रसिद्ध राष्ट्रपती आणि <table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: right; margin-left: 1em; text-align: right;"><tbody><tr><td style="text-align: center;"><img border="0" data-original-height="597" data-original-width="426" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjFbm_SpxFQnt6XClKHZhqPad1ZxqvmPHGPfHbACpev3AXGXIXIwPiCu6y_kNuPxPr-_c-8Bun_RhPFKmZogHBwsMz_OKhgk25ZSIBk7CAM5sQMoFitF26TlAFcVnV-Px-vFo31tHUuuWG3TFPseVMVZN8a9GrbwcpDhm2jbFYhhwFaqvFa7dRJ12ZU/w285-h400/%23lb3%202.jpg" style="margin-left: auto; margin-right: auto;" width="285" /></td></tr><tr><td class="tr-caption" style="text-align: center;">आय एम कलाम </td></tr></tbody></table> मिसाइलमॅन एपीजे अब्दुल कलाम यांना भेटण्यासाठी एक लहान मूल कोणत्या प्रकारचे प्रयत्न करते यावर फोकस्ड होती. दारिद्र्यरेषेखालील छोटू या गरीब राजस्थानी मुलाची ही कथा. जो एपीजे अब्दुल कलाम यांचा मोठा चाहता असतो आणि त्यांना भेटू इच्छितो. छोटू प्रतिकूल परिस्थितीतही आपला उत्साह आणि चैतन्य टिकवून ठेवतो. दिवसभर बालकामगार म्हणून काम केल्यानंतर संध्याकाळचा वेळ पुस्तकांमध्ये घालवून अभ्यास पूर्ण करण्याचा तो आटोकाट प्रयत्न करतो. त्याला खात्री असते की एक दिवस तो कलामांसारखा मोठा व्यक्तिमत्व बनेल. 'मकडी' चित्रपटातली शबाना आझमीची भूमिका विसरणे कठीण आहे. या चित्रपटातील आनंदाचे क्षण आपल्याला मुलांसारखे हसवतात आणि दुःखाचे क्षण आपल्याला रडवतात. 'चाची 420' हा साऊथचा रिमेक होता. यात कमल हासनचा उत्कृष्ट अभिनय होता. 'मिसेस डाउटफायर'वर हा चित्रपट बेतला होता. एका पित्याने आपल्या मुलासोबत जगण्यासाठी केलेल्या संघर्षाची कथा यात होती. 'चुपडी चाची' हे गाणं गाजलं होतं.<br /><br />विधू विनोद चोप्राचा 'फेरारी की सवारी' ही तीन पिढ्यांमधील बंध आणि समजूतदारपणाची कथा आहे. कौटुंबिक <table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: right; margin-left: 1em; text-align: right;"><tbody><tr><td style="text-align: center;"><img border="0" data-original-height="666" data-original-width="461" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgOHP7--oVfy1CreGtQ_hkVoYRHF0NnaEQ8WyuynImDEpcBSt5G99LgSceJLWjbTTT75NDmN7sBcRf_RmpFHjMjZze8FDNm11PYfvs_FFPwPoWESomSrpO9jFMgWc0tDkkuCVmpb5EzZekcdfnExjkA17h8PS0Sa0iQDUzTO2fF6SIOFwNCeWsrvG8e/w278-h400/%23lb3%203.jpeg" style="margin-left: auto; margin-right: auto;" width="278" /></td></tr><tr><td class="tr-caption" style="text-align: center;">मेरे प्यारे पीएम </td></tr></tbody></table> नातेसंबंधांचे धागे या चित्रपटात अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आलेत. कलाकारांमुळे हा चित्रपट उल्लेखनीय झालाय. चित्रपटातील मुख्य पात्र रुसी हा त्याचा प्रतिभावान क्रिकेटर मुलगा कायोसाठी काहीही करु शकतो. बेडवर बसून टीव्ही पाहत आजोबा घरातील प्रत्येक घडामोडी जाणून घेतात. आजोबा किशोरवयात क्रिकेटपटू असतात. क्रिकेटमध्ये फसवणूक झालेल्या आजोबांना आपल्या मुलाने क्रिकेटर व्हावे असे वाटत नाही. मुलगा ते मान्य करतो मात्र नातू क्रिकेटर होतो. नातू कायोची लॉर्ड्सच्या विशेष प्रशिक्षणासाठी निवड होणार असते. अडचण एवढीच असते की निवडून आल्यास त्याला दीड लाख रुपये फी भरायची असते. मर्यादित उत्पन्न असलेल्या या कुटुंबासाठी एवढी मोठी रक्कम उभी करणे कठीण काम असते. अत्यंत प्रामाणिक जिद्दी बाप असलेला रुसी आपल्या मुलाच्या भविष्यासाठी तत्वांशी तडजोड करतो. तो प्रामाणिकपणापासून डगमगतो. सचिन तेंडुलकरची लाल फेरारी त्याच्या वडिलांच्या संपर्कातील एखाद्याला काही तासांसाठी उपलब्ध करून दिल्यास त्यासाठी त्याला दीड लाख रुपये मिळणार असतात. मात्र अशा काही घटना घडतात की सचिन तेंडुलकरला न कळवता रुसी त्याची फेरारी घेऊन निघून जातो. फेरारी राईडमध्ये पिता-पुत्राच्या नात्याचे मार्मिक चित्रण आहे. कायोच्या कुटुंबाची अवस्था पाहून डोळे भरून येतात. फेरारी राईडमध्ये मध्यमवर्गीय महत्त्वाकांक्षा आणि ती पूर्ण करण्यासाठीची धडपड दाखवण्यात आली आहे. सचिन तेंडुलकर आणि त्याची लाल फेरारी चित्रपटात अत्यंत प्रतिकात्मक मार्मिकतेने वापरली आहे.<br /><br />अलीकडील काळात बालचित्रपटातली गाणी अगदी जिभेवर खेळत नसली तरी जुन्या काळातली काही बालगाणी अजूनही लोकप्रियता टिकवून आहेत. 'दादी अम्मा मान जाओ ना..' हे <table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: right;"><tbody><tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEggnz6nUIGbLRFBOtrVF4doMcAAZO9g5BXtTAuTYnRIh_6WJMZEWdJef21aTcbyjziFrI0y8hLCakHHgcnOlh8xJ7-OWFlYNPCnCGDLHCmnrVc9OaPlzNy8VBBNjI99hy68-SfYcceFWwJChLant58Zb0HYBV_H1QbL3rZHlVzfoYH7A7GfY7ZNrq0Z/s1844/film-masoon.jpg" imageanchor="1" style="clear: right; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="1844" data-original-width="1200" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEggnz6nUIGbLRFBOtrVF4doMcAAZO9g5BXtTAuTYnRIh_6WJMZEWdJef21aTcbyjziFrI0y8hLCakHHgcnOlh8xJ7-OWFlYNPCnCGDLHCmnrVc9OaPlzNy8VBBNjI99hy68-SfYcceFWwJChLant58Zb0HYBV_H1QbL3rZHlVzfoYH7A7GfY7ZNrq0Z/w260-h400/film-masoon.jpg" width="260" /></a></td></tr><tr><td class="tr-caption" style="text-align: center;">मासूम </td></tr></tbody></table> गाणे गाऊन आजच्या पिढीतली मुले त्यांच्या आजीचा आनंद साजरा करताना दिसतात. राज कुमार, राजेंद्र कुमार यांचा हा चित्रपट त्या काळातील हिट चित्रपटांपैकी एक होता आणि कदाचित आजही लोकांना हा चित्रपट आठवतो आणि आवडतो.<br />'हम भी अगर बच्चे होते' हे गाणं हरेकाने आपल्या बालपणी कधीतरी गायलेच असावे इतके याचे नाते घट्ट आहे.<br />आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या वाढदिवशी वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांमध्ये हे गाणे सर्वात वरच्या क्रमावर असते! घरातील वडीलधाऱ्यांचा वाढदिवस साजरा होतो तेव्हा त्यांच्यासाठी हे गाणे आवर्जून ऐकवले जाते. कारण या गाण्याचे बोल "हम भी अगर बच्चे होते नाम हमारा होता वा बबलू, खाने को मिले लड्डू, तो दुनिया कहती हॅपी बर्थडे टू यू!" असे लोभसवाणे होते.<br />1960 च्या मासूम चित्रपटातील 'नानी तेरी मोरनी को मोर ले गये' हे गाणे इतके लोकप्रिय आहे की या गाण्यावर लहान मुलांसाठी यमकगीते तयार केली गेलीत. मुले जेव्हा आजी आजोबांना भेटतात तेव्हा हे गाणे पाठ करतात. <table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: right;"><tbody><tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgnjlgJSIKNPURxWRfByDRoupU6we6mo8EPHo3MQtu3TAGGWX9JEDFrEt6-Ia8S-8zJJNxeQaxDRQQvKiANzisepdsiISaJfkqNVdzjqmvR2AXdu4F__XI9H6arUWND0jQBXMmILUtOEN4YRTOCeFdr3AklMugk7NEEhZ7Lv_JTHCRQMxO4zLa3hARG/s1828/shrii-420.jpg" imageanchor="1" style="clear: right; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="1828" data-original-width="1200" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgnjlgJSIKNPURxWRfByDRoupU6we6mo8EPHo3MQtu3TAGGWX9JEDFrEt6-Ia8S-8zJJNxeQaxDRQQvKiANzisepdsiISaJfkqNVdzjqmvR2AXdu4F__XI9H6arUWND0jQBXMmILUtOEN4YRTOCeFdr3AklMugk7NEEhZ7Lv_JTHCRQMxO4zLa3hARG/w263-h400/shrii-420.jpg" width="263" /></a></td></tr><tr><td class="tr-caption" style="text-align: center;">श्री 420 </td></tr></tbody></table><br />'नन्हा मुन्ना राही हूं' या गाण्याशिवाय बचपन अधुरे ठरावे. मेहमूद खान दिग्दर्शित 'सन ऑफ इंडिया' या चित्रपटात हे गाणं होतं. आजही जेव्हा आपण आपली मुले किंवा इतरांची मुले शाळेत परेड करताना पाहतो तेव्हा आपोआप आपल्या मनात "नन्हा-मुन्ना राही हूं देश का सिपाही हूं, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंदी जय हिंद" हे गाणे सुरू होते. मातृभूमीशी आपल्या आठवणी विविध रूपात जोडलेल्या आहेत आणि हे गाणे त्यापैकीच एक आहे.<br />1955 मध्ये आलेल्या श्री 420 चित्रपटातील सर्व गाणी खूप प्रसिद्ध आहेत. राज कपूर आणि नर्गिसचा हा चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. चित्रपटातील "इचक दाना बीचक दाना" हे गाणं कोडं घालतं. आजही या गाण्याचा स्वॅग अजूनही टिकून आहे!<br /><br />गेल्या काही दशकात बालकिशोरांवर बरेच चित्रपट निर्मिले गेलेत. या चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला असल्याने <table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: right;"><tbody><tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgftHFwgP686CRWeZomQIb3dIS9oUFX0OHgijiEvpVwn9PqscPhIEUiUzbY--78PsYJHwxM6UVDu0_TgLSb_1rLkpDnnQguwaDeyqukRiVkTPRKyBzn3S-NCtNPR-hA8T4724pchQSxnC6DyBSUrgYF4YzGe6oPLNYTCJd6749Iay-QQkEjp5Pnbk2X/s1631/film-gharana.jpg" imageanchor="1" style="clear: right; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="1631" data-original-width="1200" height="200" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgftHFwgP686CRWeZomQIb3dIS9oUFX0OHgijiEvpVwn9PqscPhIEUiUzbY--78PsYJHwxM6UVDu0_TgLSb_1rLkpDnnQguwaDeyqukRiVkTPRKyBzn3S-NCtNPR-hA8T4724pchQSxnC6DyBSUrgYF4YzGe6oPLNYTCJd6749Iay-QQkEjp5Pnbk2X/w147-h200/film-gharana.jpg" width="147" /></a></td></tr><tr><td class="tr-caption" style="text-align: center;">घराना </td></tr></tbody></table> देशातील बालचित्रपट निर्मितीला बळ लाभेल. परदेशाच्या तुलनेत आपल्याकडे बालचित्रपटांना मुख्य प्रवाहात अद्याप गांभीर्याने घेतले गेलेले नाही. बालचित्रपटांनाही मुख्य प्रवाहातील चित्रपटसृष्टीत स्थान मिळाले तर निश्चितच देशातील बालचित्रपटांचे भविष्य उज्वल होईल आणि त्याला नवी दिशा मिळेल. त्यासाठी प्रादेशिक सिनेमांनाही प्रोत्साहन द्यावे लागेल आणि नवीन निर्मात्यांना प्रोत्साहन आणि मदत करावी लागेल.<br /><br />मुलांबद्दलचे हे चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवर व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरले नाहीत, तर समाजावरही - केवळ मुलांवरच नव्हे तर प्रौढांवरही त्यांचा <table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: right;"><tbody><tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgBUUgAJHVnW8xAmxGNrjO8v3i68EBKdXxrPUI0hb2cxPXoQEvgR7ovzEkRFtIuEEC44GvQA18YMjr5jSC2bMAULUfSo2AYww6lJrIGgrjj9spjsnctBCY5CGFWNhwx8R0muFA4y5ueuF7GK2cl6LY2OePUodCbFTVZnbFjs0te2SVCgWe9T3tnIcn6/s1444/%23lb%203%207.jpeg" imageanchor="1" style="clear: right; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="1444" data-original-width="1000" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgBUUgAJHVnW8xAmxGNrjO8v3i68EBKdXxrPUI0hb2cxPXoQEvgR7ovzEkRFtIuEEC44GvQA18YMjr5jSC2bMAULUfSo2AYww6lJrIGgrjj9spjsnctBCY5CGFWNhwx8R0muFA4y5ueuF7GK2cl6LY2OePUodCbFTVZnbFjs0te2SVCgWe9T3tnIcn6/w278-h400/%23lb%203%207.jpeg" width="278" /></a></td></tr><tr><td class="tr-caption" style="text-align: center;">चिल्लर पार्टी </td></tr></tbody></table> सकारात्मक प्रभाव पडला आहे. बालमानसशास्त्र आणि मुलांच्या समस्यांशी निगडीत हे चित्रपट मोठ्या प्रमाणात तयार व्हायला हवेत. आतापर्यंत आमच्या समाजाला डिस्लेक्सिया आणि प्रीजेरिया यांसारख्या आजारांची माहिती होती पण 'तारे जमीन पर' आणि 'पा' यांसारख्या चित्रपटांमुळे आम्ही त्यांच्याशी परिचित झालो. या चित्रपटांनी आपल्या विचारसरणीवर खोलवर परिणाम केला आहे. या चित्रपटांमुळे मुलांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला आहे, असे म्हणता येईल. बालचित्रपटांना मुख्य प्रवाहातील चित्रपटसृष्टीत स्थान मिळावे म्हणून हरेक सिनेरसिकाने त्यांना बळ पुरवले पाहिजे. बॉलिवूडने लहानग्यांचा विचार गत शतकापासूनच केलेला आहे ही बाब नक्कीच स्वागतार्ह आहे. बॉलिवूडच्या या गुणग्राहकतेसाठी ते प्रेमास पात्र आहे!<br /><br />- समीर गायकवाड </span>sameer gaikwadhttp://www.blogger.com/profile/05106372658264914305noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-1120566833830274839.post-44246580069701024662022-12-22T22:55:00.002+05:302022-12-22T22:55:18.931+05:30गजब माणूस - इफ़्तिख़ार<div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgaBBNPDcLyNi92Ad4iVKB0_rLbbDCc7NtnyRp28azNp_c1eMcdySDjxn9_GzSaEhpAbfm4rGZRh33Gf_FQUSz2WrSg3EiWmlOJK4w1Ch30wpBbUeGiMwBv9RrxO3tPMHK6xPpgUJQydmj5gA9Rvepzz88kjSl1ZB0035Vtxn4AjtMRznCqjKwmIE9t/s620/Iftekhar.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="415" data-original-width="620" height="428" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgaBBNPDcLyNi92Ad4iVKB0_rLbbDCc7NtnyRp28azNp_c1eMcdySDjxn9_GzSaEhpAbfm4rGZRh33Gf_FQUSz2WrSg3EiWmlOJK4w1Ch30wpBbUeGiMwBv9RrxO3tPMHK6xPpgUJQydmj5gA9Rvepzz88kjSl1ZB0035Vtxn4AjtMRznCqjKwmIE9t/w640-h428/Iftekhar.jpg" width="640" /></a></div><br /></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;">हिंदी सिनेमाच्या कथा, पटकथांमध्ये अनेक तऱ्हेची पात्रे आढळतात. नायक, नायिका, सहायक अभिनेता, सहायक अभिनेत्री, विनोदवीर, चरित्र भूमिका साकारणारे अभिनेते आणि खलनायक ही मंडळी आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेत. यांच्या जोडीने विविध छोटयामोठ्या भूमिका कथेच्या मागणीनुसार सिनेमात दिसतात. डॉक्टर, वकील, न्यायाधीश, दुकानदार, पोलीस इन्स्पेक्टर - कमिशनर ही पात्रे बऱ्याच सिनेमात आढळतात, पैकी पोलीस इन्स्पेक्टरचे पात्र अधिक प्रमाणात आढळतं. मुदलात एकूण सिनेमाच्या दोन अडीच तासांच्या लांबीत हे रोल अवघ्या काही मिनिटांचे असतात. मात्र तरीदेखील या भूमिकांमधून आपला ठसा उमटवणारे काही अभिनेते होऊन गेले. विशेष म्हणजे त्यांनी साकारलेले पोलिसी पात्र इतके खरेखुरे वाटायचे की हा इसम खरोखरच्या जीवनात पोलीस आहे की काय वाटावे! सत्तर एमएमच्या सिनेमास्कोप पडद्यावर अनेक अभिनेते, अभिनेत्र्या नायक नायिका म्हणून आपला ठसा उमटवू शकले नाहीत मात्र अवघ्या काही मिनिटांच्या पोलिसाच्या भूमिका करून हिंदी सिनेमाच्या इतिहासात अजरामर होण्याची जादू काहींनी साधली! हे कशामुळे शक्य झाले याचे उत्तर एकच येते ते म्हणजे या अभिनेत्यांची आपल्या कामावरची निष्ठा आणि रसिक प्रेक्षकांचे त्यांच्यावरचे अपार प्रेम! नायक नायिकांना मिळणारे ग्लोरिफिकेशन या अभिनेत्यांच्या वाट्याला आलं! कोणताही रोल छोटा नसतो आणि कोणताही अभिनेता मामुली नसतो, तो ज्या भुमिकेत प्राण फुंकतो ती भूमिका सजीव होते हे नक्की! या वर्गातली हिंदी सिनेमाच्या इतिहासातली दोन ख्यातनाम नावं म्हणजे जगदीश राज आणि इफ्तेकार! जगदीश राज यांच्यापेक्षा इफ्तेकार यांची कारकीर्द मोठी होती आणि त्यांचं वैयक्तिक आयुष्य चढउतारांनी भरलेलं होतं. आताचे साल म्हणजे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष होय!</span><span><a name='more'></a></span></div><div><br /></div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><br /></span></div> सय्यदना इफ्तेकार अहमद शरीफ हे त्यांचे पूर्ण नाव! ते एक उत्कृष्ट गायक आणि चित्रकारही होते. अभिनयाच्या <table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: right;"><tbody><tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhvrPt1kyMzcMVg5Zg2R92KlBgooXU1TkIuT3IHsiWIOStZyW7oJCxdYdsy8yvYRoa6jc6ni1x7aZ-MkEOBmFFgBHQ70SiR96z8UePWUhDhwB3Z2D4KfQdaf9shNGgeshpw-Jhm_kDNqlTIRsnjHyugbz1AAejdGpd_20KvoZOWjTdeMnJ-GH9fGWtm/s980/dscn0062.jpg" style="clear: right; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"><span style="font-size: x-large;"><img border="0" data-original-height="980" data-original-width="677" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhvrPt1kyMzcMVg5Zg2R92KlBgooXU1TkIuT3IHsiWIOStZyW7oJCxdYdsy8yvYRoa6jc6ni1x7aZ-MkEOBmFFgBHQ70SiR96z8UePWUhDhwB3Z2D4KfQdaf9shNGgeshpw-Jhm_kDNqlTIRsnjHyugbz1AAejdGpd_20KvoZOWjTdeMnJ-GH9fGWtm/w276-h400/dscn0062.jpg" width="276" /></span></a></td></tr><tr><td class="tr-caption" style="text-align: center;"><span style="font-size: x-large; text-align: left;">इफ्तेकार</span></td></tr></tbody></table> सुरुवातीच्या काळात काही चित्रपटांमध्ये ते नायक म्हणूनही दिसलेले. मूळचे जालंधरचे रहिवासी असलेले त्यांचे वडील कानपूरमधील एका कंपनीत उच्च पदावर होते. चार भाऊ आणि एका बहिणीमध्ये सर्वात थोरले असणारे इफ्तेकार 26 फेब्रुवारी 1922 रोजी जालंधरमध्ये जन्मलेले. मात्र त्यांचे बालपण कानपूरमध्ये गेलेलं. त्यांना गाण्याची खूप आवड होती. त्यांना सैगलचे वेड होते आणि त्याच्यासारखे प्रसिद्ध गायक व्हायचे होते. त्यावेळी सर्व मोठ्या म्युझिक कंपन्या कोलकात्यात असल्याने इफ्तेकार वयाच्या 20 व्या वर्षी कोलकात्यात आले. तेंव्हाचे प्रसिद्ध संगीतकार कमल दासगुप्ता हे एचएमव्ही कोलकाता येथे काम करायचे. तिथेच इफ्तेकारांची ऑडिशन झाली. एचएमव्हीने त्यांच्या दोन गाण्यांचा खाजगी अल्बम रिलीज केला, त्यानंतर ते कानपूरला परतले. पण काही दिवसांनी त्याला एम.पी. प्रॉडक्शनकडून ताबडतोब कोलकात्याला येण्यास सांगणारी तार आली. इफ्तेकारांच्या व्यक्तिमत्त्वाने आणि स्पष्ट भाषेने कमल दासगुप्ता इतके प्रभावित झाले होते की, त्यांनी इफ्तेकारना अभिनेता म्हणून काम मिळावे अशी शिफारस केली होती.<br /> <br /> दरम्यान कानपूरमधील सईदा नावाच्या मुलीसोबत इफ्तेकारांचे संबंध पक्के झाले होते. तार आल्यावर ते कोलकात्यात आले आणि कंपनीत रुजू झाले. पण तो चित्रपट फार काळ गेला तरी सुरू होऊ शकला नाही. त्याच वेळी ते कोलकात्यात त्यांच्याच इमारतीत राहणाऱ्या हाना जोसेफ या ज्यू मुलीच्या प्रेमात पडले. नंतर सईदासोबत ब्रेकअप केल्यानंतर त्यांनी हानाशी लग्न केले. लग्नानंतर हाना जोसेफला रेहाना अहमद हे नवीन नाव मिळाले. इफ्तेकारांचा पहिला चित्रपट 'तकरार' हा 1944 साली आर्ट फिल्म्स-कोलकाताच्या बॅनरखाली बनला होता. याची नायिका जमुना ही त्या काळातील स्टार अभिनेत्री होती. इफ्तेकारांचे ‘घर’ आणि ‘राजलक्ष्मी’ हे दोन चित्रपट 1945 साली प्रदर्शित झाले. 1947 मध्ये इफ्तेकार हे 'ऐसा क्यूं' आणि 'तुम और मैं' या चित्रपटांमध्ये दिसले. दरम्यान, 1946 मध्ये त्यांची मोठी मुलगी सलमाचा जन्म झाला आणि 1947 मध्ये त्यांच्या पत्नीने दुसऱ्या मुलीला जन्म दिला. इफ्तेकारांनी आपल्या पहिल्या प्रेमाला जागत या मुलीचे नाव सईदा ठेवलं. यावरून लक्षात यावं की ते किती हळव्या मनाचे होते! <br /> <br /> फाळणीच्या काळात इफ्तेकारांचे आई-वडील, भावंडांसह सर्व जवळचे नातेवाईक पाकिस्तानात गेले. दंगलीमुळे <table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: left; margin-right: 1em; text-align: left;"><tbody><tr><td style="text-align: center;"><span style="font-size: x-large;"><img border="0" data-original-height="637" data-original-width="481" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiLfpUVmsGxlnrX0fP64Z-YAL8gkwAQ7SKKEgFDOyP8uui8r5B5-B8xrBRFMXNLVxnCVU1w4tkDLDX3WzybW3cqJ3EvmoOi1WaHsVeJw89ifbDt1Olvosqmgjjh4Vsn7613vHx1vzq5ehqssStLnKbCUy26Vk8VPb2BYq8AdgfFPMS1uJ9x0KJOX3rM/w303-h400/images.jpeg" style="margin-left: auto; margin-right: auto;" width="303" /></span></td></tr><tr><td class="tr-caption" style="text-align: center;"><span style="font-size: x-large;">एव्हरग्रीन अभिनय </span></td></tr></tbody></table> कलकत्ता सोडावा लागला असला तरी इफ्तेकारनी भारतात राहण्यास पसंती दिली. ते धर्मवेडे असते तर आपल्या मातापित्यासमवेत ते ही पाकिस्तानला गेले असते. मात्र या भूमीवर आणि आपल्या कलेवर त्यांचे निस्सीम प्रेम होते त्यामुळे त्यांनी भारतभूमी सोडली नाही. 1948 मध्ये ते पत्नी आणि दोन मुलींसह मुंबईत आले आणि त्यांनी खारमधील एव्हरग्रीन हॉटेलला आपले घर बनवले. पुन्हा एकदा संघर्षाचा टप्पा सुरू झाला. पण काम मिळणे सोपे नव्हते. भुकेजलेली मुलं त्यांच्या पत्नीपाशी असत आणि पोटातली आग भागवण्यासाठी इफ्तेकार पायपीट करत फिरत! अनेकदा त्यांच्या घरच्या सर्वाना उपवास घडलेला! घराच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी त्यांच्या पत्नीला ऑफिस सेक्रेटरी म्हणून काम करावे लागले. दुसरीकडे जी काही मिळतील ती छोटी कामं इफ्तेकार करत राहिले. पण त्यांच्या आर्थिक स्थितीत मोठा बदल मात्र झाला नाही. हा कालखंड त्यांची परीक्षा घेणारा नि खडतर दिवसांचा साक्षीदार ठरला. <br /><br /> <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEia8qJWEkVU9BHSci6rFzQekxM4cAN_A5-JjX34pPsJjhjhvqRJv3dCZx6OPTuazfKCV64TX0-4Zm91ACtXq5kkwzWNvQamnP9ItXtQ_SCcGWmh5zqOYQzZt6bVzsnXaPEw3I4rIDz1UwY9Mn26HHdHNZBL0xrXuuFeeFC7LRBssmwjtw_-1zghIGpf/s731/EoFqcowVEAAyg8t.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="419" data-original-width="731" height="366" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEia8qJWEkVU9BHSci6rFzQekxM4cAN_A5-JjX34pPsJjhjhvqRJv3dCZx6OPTuazfKCV64TX0-4Zm91ACtXq5kkwzWNvQamnP9ItXtQ_SCcGWmh5zqOYQzZt6bVzsnXaPEw3I4rIDz1UwY9Mn26HHdHNZBL0xrXuuFeeFC7LRBssmwjtw_-1zghIGpf/w640-h366/EoFqcowVEAAyg8t.jpg" width="640" /></a></div><br />एकदा कोलकात्यात कानन देवी यांनी इफ्तेकारची ओळख अशोक कुमार यांच्याशी करून दिली होती. मुंबईत आल्यावर इफ्तेकारनी 'बॉम्बे टॉकीज'मध्ये अशोककुमार यांची भेट घेतली. अशोक कुमार यांनी इफ्तेकारच्या प्रतिभेस अचूक ओळखले. बॉम्बे टॉकीजच्या ‘मुकद्दर’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका देऊ केली. पुढे अशोक कुमार यांनीही इफ्तेकार यांच्याकडून चित्रकला शिकली आणि वयाने त्यांच्यापेक्षा खूप मोठे असूनही त्यांनी इफ्तेकार यांना आपला कुंचलागुरू मानले. इफ्तेकार किती उत्तम चित्रकार होते हे 'दूर गगन की छांव में' या चित्रपटाच्या शीर्षक गीताच्या पार्श्वभूमीसाठी काढलेल्या चित्रांवरून कळते. 1950 आणि 60 च्या दशकात इफ्तेकारनी ‘सगाई’, ‘साकी’, ‘अबशार’, ‘आगोश’, ‘बिराज बहू’, ‘मिर्झा गालिब’, ‘देवदास’, ‘श्री 420’, ‘संदारी डाकू’, यांसारखे चित्रपट केले. ‘अब दिल्ली नहीं दूर’, ‘दिल्ली का ठग’, ‘रागिणी’, ‘बेदर्द जमाना क्या जाने’, ‘कंगन’, ‘नाचघर’, ‘छबिली’, ‘कल्पना’, ‘कायदा’, ‘प्राध्यापक’, ‘रांगोळी’ ‘, ‘बंदिनी’, ‘मेरी सूरत तेरी आंखे’, ‘दूर गगन की छांओं में’, ‘संगम’, ‘शहीद’, ‘फूल और पत्थर’, ‘तीसरी कसम’, ‘तीसरी मंझील’, ‘हमराज’, ‘ संघर्ष’, ‘आदमी और इंसान’ आणि ‘इंतकाम’ सारख्या जवळपास 70 चित्रपटांमध्ये त्यांनी छोट्या-मोठ्या सर्व प्रकारच्या भूमिका केल्या, पण त्यांना विशेष ओळख मिळवता आली नाही. संघर्ष अव्याहत चालूच होता. 1969 साली ‘इत्तेफाक’ हा चित्रपट आला आणि त्यांचे नशीब पालटले. यात पोलीस निरीक्षकाच्या महत्त्वाच्या भूमिकेत ते दिसले होते. पोलिसांचा गणवेश इफ्तेकारना इतका साजेसा दिसला की त्यानंतर त्यांच्याकडे कामाची कमतरता राहिली नाही. लवकरच त्यांनी खारमध्ये स्वतःचा फ्लॅटही विकत घेतला. याचे श्रेय त्यांनी अशोक कुमारना देऊ केलं. कारण त्यांच्याच शिफारसीवरून बीआर चोप्रा बॅनरमध्ये त्यांची एंट्री झाली होती! ‘इत्तेफाक’ च्या आधी ते ‘कानून’, ‘हमराज’ आणि ‘आदमी और इंसान’ यातही दिसले होते. <br /><br /><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><img border="0" data-original-height="572" data-original-width="760" height="482" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhAru2jeFLGB9LnRDHOxZFzjpw2WzTC1zBZ9diw3AlbNPL-Oq-ljD-OJTfKFtgx-pGNtLrXTkuP8a6aUHhvAqFYwsKnAbuqDT7IXB6fdi1mU5D23d4VbYlYDLSx-5DHiQDMvSCGo-er1vthhzNWJ7bg5BmD7Nkqbn_PWMqjMl9cVHEv825bPPvHOTl0/w640-h482/e7874ed1907d02bd2c913d5814faab71.jpg" width="640" /></div><br />जवळ चार पैसे जमा झाल्यावर इफ्तेकारनी आपल्या लेकीचे लग्न मोठ्या थाटात लावून दिले. आंतरधर्मीय विवाह होता तो! जावई विपिनचंद्र यांना अभिनेता व्हायचे होते, त्यांचे आजोबा डेहराडूनचे विख्यात उद्योगपती नि नगराध्यक्षही होते. इफ्तेकारांची मुलगी सलमा आपल्या पतीसोबत सासरी निघून गेली. 15 वर्षे सहजीवनानंतर त्यांचा घटस्फोट झाला. इफ्तेकारना याचा मोठा धक्का बसला. अपत्यांना सोबत घेऊन त्यांची मुलगी सलमा मुंबईला परतली तेंव्हा ते सैरभैर झाले होते. त्यांनी तिला एनसी सिप्पींच्या कार्यालयात नोकरी मिळवून दिली. या दरम्यान दुसरीकडे 1970 आणि 80 चे दशक इफ्तेकारनी खूप चांगले गेले. यशाच्या चढत्या काळात त्यांनी ‘शर्मेली’, ‘मेहबूब की मेहंदी’, ‘गॅम्बलर’, ‘कल आज और कल’, ‘हरे रामा हरे कृष्णा’, ‘जवानी दीवानी’, ‘अचानक’, ‘जंजीर’, ‘शर्मीली’, ‘महबूब की मेहंदी’ असे चित्रपट केले. मजबूर.’, ‘दीवार’, ‘धर्मात्मा’, ‘शोले’, ‘कभी कभी’, ‘दुल्हन वही जो पिया मन भये’, ‘डॉन’, ‘त्रिशूल’, ‘नूरी’, ‘काला पत्थर’, ‘कर्ज’ , ‘दोस्ताना’, ‘रॉकी’, ‘साथ साथ’, ‘राजपूत’, ‘सदमा’, ‘इन्कलाब’, ‘जागीर’, ‘तवायफ’, ‘अंगारे’ आणि ‘आवाम’ हे सिनेमे तर अफाट गाजले. 50 वर्षांच्या कारकिर्दीत, त्यांनी जवळपास 300 चित्रपटांमध्ये काम केले. ‘बेखुदी’ (1992) आणि ‘काला कोट’ (1993) हे त्यांचे शेवटचे चित्रपट होते. पण आजही ते चित्रपट रसिकांच्या स्मरणात आहेत.<br /><br /><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh39DgunClwRu2SWoc-tX-UWMV5jqagSiuXYWLtsqmaJXVB56y_4r5Jo3iS8944wTuXmdx4jY5BXCN1bP5wNVcXPomzXPB-OJnH4xJFxpXtZtQDIJp0aQ1QoxmSws8UzDkHc0m--hWKq0E2zpYJSBOmIImyXRsHKayIATnH98RQaYsitcT3EP1z_Uhq/s1500/DWpN-0bW0AMIEDc.jpeg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1142" data-original-width="1500" height="488" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh39DgunClwRu2SWoc-tX-UWMV5jqagSiuXYWLtsqmaJXVB56y_4r5Jo3iS8944wTuXmdx4jY5BXCN1bP5wNVcXPomzXPB-OJnH4xJFxpXtZtQDIJp0aQ1QoxmSws8UzDkHc0m--hWKq0E2zpYJSBOmIImyXRsHKayIATnH98RQaYsitcT3EP1z_Uhq/w640-h488/DWpN-0bW0AMIEDc.jpeg" width="640" /></a></div><br />इफ्तेकार संवेदनशील होते. त्यांनी यशाचा गर्व बाळगला नाही नि त्याचा माजही केला नाही. भले ते पाकिस्तानला गेले नसले तरी त्यांच्या कुटुंबातील जितके ही सदस्य पाकिस्तानात गेले होते त्यांच्या ते संपर्कात राहिले. त्यांचे मोठे बंधू इम्तियाज अहमद हे पाकिस्तान टीव्हीचे प्रसिद्ध अभिनेते झाले. पाकिस्तान सरकारने त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्यापेक्षा लहान असलेला भाऊ मुश्ताक अहमद हा पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्समध्ये पायलट होता. निवृत्तीनंतर तो अमेरिकेत गेला, मात्र इफ्तेकारनी आपला मुलुख सोडला नाही! त्यांच्या वहिनी शमीमबानो या कराचीत राहायच्या. त्यांची त्यांच्यावर खूप माया होती. इफ्तेकारांचे सावत्र भाऊ नि शेंडेफळ असणारे सर्वात कनिष्ठ बंधू इक्बाल अहमद पेशाने डॉक्टर होते. त्यांच्या पत्नीही डॉक्टर होत्या. हे दांपत्यही अमेरिकेत राहत होते. विशेष बाब अशी की काही गैरसमजातुन त्यांचे ज्या मुलीशी ब्रेकअप झाले होते त्या सईदाचं सारं कुटुंब फाळणीनंतर पाकिस्तानला गेलं होतं. ते रावळपिंडीत राहायचे. सईदाने ब्रह्मचर्य स्वीकारले होते तिने कधीच लग्न केले नाही याचा आघात इफ्तेकारना सहन करता आला तो म्हणजे त्यांच्या जीवनसंगिनीमुळेच! कदाचित म्हणूनच त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलीचे नाव सईदा ठेवलं होतं. <br /><br /><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhi89Iw5MAQTr41Oltmf86YHxvjy3JvQm-wghGtK0QE35hpeNsisSOSwGyUNTg0bCxMOMt7kcpW2nng-DNrqON8g_Sngl-dG6v1DhrvH31FkPX3xzVuqF_5QEpPHaAAdp1qn6sbdGpqQqy0DOBshHNMwYAfggp-fQ7DX7_Y-B8jQvHtqWirIzO_EX9S/s259/download.jpeg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="194" data-original-width="259" height="479" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhi89Iw5MAQTr41Oltmf86YHxvjy3JvQm-wghGtK0QE35hpeNsisSOSwGyUNTg0bCxMOMt7kcpW2nng-DNrqON8g_Sngl-dG6v1DhrvH31FkPX3xzVuqF_5QEpPHaAAdp1qn6sbdGpqQqy0DOBshHNMwYAfggp-fQ7DX7_Y-B8jQvHtqWirIzO_EX9S/w640-h479/download.jpeg" width="640" /></a></div><br />मात्र नियतीने इथेही त्यांना धोका दिला नि दुःखाच्या डागण्या दिल्या. इफ्तेकारांची कन्या सईदा आपला पती मोईन शेख याच्यासोबत जुहू-मुंबईत राहायची. तो सिएट टायर्समध्ये व्यवस्थापक होता. सईदापासून त्याला दोन मुलं झाली. नव्वदच्या दशकाच्या प्रारंभी या कुटुंबावर पहाड कोसळला. सईदाला कॅन्सर झाल्याचे समजले. तब्बल ५ वर्षे ती कॅन्सरशी झुंज देत राहिली. 7 फेब्रुवारी 1995 रोजी ती तिची लढाई हरली. आपल्या लाडक्या लेकीच्या मृत्यूचा धक्का इफ्तेकार यांना सहन झाला नाही आणि अचानक त्यांचा मधुमेह खूप वाढला. त्यांना मुंबईच्या उपनगरातील मालाड (पूर्व) येथील ‘सुचक हॉस्पिटल’ मध्ये दाखल करण्यात आले, परंतु त्यांची प्रकृती सतत खालावत गेली. शेवटी, त्यांच्या मुलीच्या मृत्यूनंतर अवघ्या 24 दिवसांनी, 1 मार्च 1995 रोजी त्यांचे निधन झाले. <br /><br /><table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto;"><tbody><tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi2FlVp1wpiFQRRE4FoRUn2Qb-_Rf1VKIDkBXKc1bi7MaoEAEEkX0PMxTZHR54Uqjr2uFbKDmJmzmZUNbJQzb5yuTDAs4j0W26Mmx2Mhua_ixNyyQ1lugHL7fb8rr-Iv-D4VSfvXFsI6_QVUnqMJL4jVh5ancvOhuV6pnRid5OtvhzIJDRtPGuiOnUc/s330/Deewar%5B1%5D--330x220.jpg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"><span style="font-size: x-large;"><img border="0" data-original-height="220" data-original-width="330" height="426" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi2FlVp1wpiFQRRE4FoRUn2Qb-_Rf1VKIDkBXKc1bi7MaoEAEEkX0PMxTZHR54Uqjr2uFbKDmJmzmZUNbJQzb5yuTDAs4j0W26Mmx2Mhua_ixNyyQ1lugHL7fb8rr-Iv-D4VSfvXFsI6_QVUnqMJL4jVh5ancvOhuV6pnRid5OtvhzIJDRtPGuiOnUc/w640-h426/Deewar%5B1%5D--330x220.jpg" width="640" /></span></a></td></tr><tr><td class="tr-caption" style="text-align: center;"><span style="font-size: x-large;">दीवार </span></td></tr></tbody></table><br />अवघ्या काही मिनिटांच्या भूमिकेद्वारे आपल्या अभिनयाची नि व्यक्तीमत्वाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडणाऱ्या इफ्तेकारना वैयक्तिक आयुष्यात सातत्याने हेलकावे खावे लागले. त्यांची नि मातापित्यांची ताटातूट झाली, आपल्या पहिल्या वाहिल्या प्रेमास ते मुकले, एका मुलीचा घटस्फोट झाला तर लाडकी मुलगी अकाली गेली. इतकी दुःखे पचवूनही हा माणूस कॅमेऱ्यापुढे आल्यावर भूमिकेशी अगदी समरस होऊन जायचा. लोकांना वाटायचे की हा माणूस खरेच पोलीस असावा. सुख दुःखाने त्यांच्यासोबत चोरपोलिसांचा खेळ खेळला असला तरी त्यांनी मात्र आपला पोलिसाचा रोल असा काही पार पाडला की हिंदी सिनेमामधला त्यांचा पोलीस इन्स्पेक्टर कुणीच विसरणार नाही. रसिक प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रेम दिले, आजही त्यांचे नाव निघते! 'डॉन'मधला अमिताभ आणि त्याचा ग्यारह मुल्क की पुलिसचा फेमस डायलॉग इथे सर्वांनाच ठाऊक आहे आणि त्या सर्वांचे अमिताभ इतकेच इफ्तेकारवरही प्रेम आहे. ही इथली गंगाजमनी संस्कृती! माणूस भूमिकेच्या लांबीवरून इथे लहान मोठा ठरत नाही हे इथलं वैशिष्ट्य होय. दॅट्स व्हाय, आय लव्ह बॉलिवूड! <br /><br />- समीर गायकवाड</span><div><br /></div>sameer gaikwadhttp://www.blogger.com/profile/05106372658264914305noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1120566833830274839.post-91193103771948810892022-11-26T22:16:00.000+05:302022-11-26T22:16:02.208+05:30शैलेंद्र - एक सुरेल शोकांतिका <table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto;"><tbody><tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEihLdU1eQL1td4f4nusqaXfHlxeAZyeUZWeg_315pbTd0qihBgMCK8PDYu3z-KT2M_pxlVOlpIF5HLrObzkH7P5-ArdSBolAbkO9i1AxIuHBJzm66AScsZJ9ydujE-d4spuq73GBMwhCi2sTE8usvU04ukuYk1ua91GKrSiJGzQbYE-aOCIxpkM04rF/s1970/0fdf789b-a3a7-48ed-983e-370e1bdde43c.jpg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="1274" data-original-width="1970" height="414" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEihLdU1eQL1td4f4nusqaXfHlxeAZyeUZWeg_315pbTd0qihBgMCK8PDYu3z-KT2M_pxlVOlpIF5HLrObzkH7P5-ArdSBolAbkO9i1AxIuHBJzm66AScsZJ9ydujE-d4spuq73GBMwhCi2sTE8usvU04ukuYk1ua91GKrSiJGzQbYE-aOCIxpkM04rF/w640-h414/0fdf789b-a3a7-48ed-983e-370e1bdde43c.jpg" width="640" /></a></td></tr><tr><td class="tr-caption" style="text-align: center;">एका शापित राजहंसाची दास्तान.. </td></tr></tbody></table><br /><div><br /></div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;">शैलेंद्र म्हटलं की त्यांची अप्रतिम अर्थपूर्ण गाणी आणि चटका लावणारी अकाली एक्झिट आठवते. वरवर भरजरी वाटणाऱ्या शैलेंद्रच्या आयुष्यास एक अधीर नि अखंडित वाहणारी कारुण्यकिनार होती जी क्वचितच समोर आली. खरं तर ही माहिती कमी लोकांपर्यंत सीमित राहिल्याने भारतीय समाजमनाला केवळ गीतकार शैलेंद्रच उमजले. त्या महान गीतकाराच्या उत्तुंग प्रतिमेखाली दफन झालेला एक पिचलेला, नाकारलेला, काळीजकोवळ्या हृदयाचा माणूस जगाला फारसा दिसलाच नाही. शैलेंद्रांच्या गाण्यात इतकं आर्त कारुण्य नि टोकदार वेदना का पाझरल्यात हे जाणून घ्यायचं असेल तर त्यांच्या जीवनातील काहीशा अपरिचित अशा पार्श्वभूमीचा धांडोळा घेणं गरजेचं आहे, निदान त्यांच्या या जन्म शताब्दी वर्षात तरी हे केलंच पाहिजे तरच अधिकाधिक लोकांपर्यंत एका नाकारलेल्या तरीही न हरलेल्या हळव्या दिलदार माणसाची दास्तान पोहोचेल. <br />त्यांच्या गीतांविषयी लिहिलंच पाहिजे मात्र त्यांच्या दमलेल्या, हिणवलेल्या आयुष्याविषयीही बोललं पाहिजे. त्यांच्या कारकिर्दीविषयीचं विपुल लेखन सहजी उपलब्ध आहे मात्र त्यांच्या वैयक्तिक जीवनातील काळीजकथा तुलनेने कमी प्रकाशात आलीय. एखाद्याच्या आयुष्यात फरफट जितकी अधिक असते तितके त्यात अतिव कारुण्य असते, वेदना व्यथांचा सल असतो. मुळात जे जगाला उमजलेले नसतं ते कवीला आकळलेलं असतं. त्यात तो होरपळून निघालेला असेल तर त्याच्या रचनांत ती धग आपसूक प्रसवते. हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि विख्यात गीतकार कवी शैलेंद्र हे याचे उत्तम उदाहरण ठरावेत.<span><a name='more'></a></span><br /><br />त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याआधी सद्यकाळात घडलेल्या दोन घटनांचा इथे उल्लेख करणं क्रमप्राप्त आहे. <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhg5O9DsnqoDvq9i-zAHhan0i6aiLxvz6qT5LHjhwm-_5ZSyXcn2UMpN3c2mLShPhj_67jg__FrMDpajavCuJmout8mnUn5WGYIc6mfDLGANZQ2tad3UYy8fOxIQQohvXfcUh-EB7KIDEHVJ5Fe_lKWu7mUCR3pudHNU1RzA40ZjvfG1vSZ4Mi6OW3h/s300/images%20(4).jpeg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" data-original-height="168" data-original-width="300" height="224" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhg5O9DsnqoDvq9i-zAHhan0i6aiLxvz6qT5LHjhwm-_5ZSyXcn2UMpN3c2mLShPhj_67jg__FrMDpajavCuJmout8mnUn5WGYIc6mfDLGANZQ2tad3UYy8fOxIQQohvXfcUh-EB7KIDEHVJ5Fe_lKWu7mUCR3pudHNU1RzA40ZjvfG1vSZ4Mi6OW3h/w400-h224/images%20(4).jpeg" width="400" /></a></div>काही दिवसांपूर्वी शैलेंद्र यांची जात सार्वजनिक केल्याबद्दल काहींनीं विरोध केला होता. दिनेश शंकर याने आपले वडिल शैलेंद्र यांचा "अंदर की आग" या कवितासंग्रहाच्या निर्मितीचे काम हाती घेतले होते. राजकमल प्रकाशन, नवी दिल्ली यांनी तो प्रकाशित केला. या पुस्तकाच्या मनोगतात दिनेश शैलेंद्र यांनी आपल्या वडिलांची सामाजिक पार्श्वभूमी (बिहारची धुसिया चर्मकार जात) उघडपणे नमूद केली. या पुस्तकाचे प्रकाशन करताना सर्वोच्च समीक्षक डॉ. नामवर सिंग यांनी शैलेंद्र यांना संत रविदासांनंतरचे सर्वात महत्त्वाचे दलित कवी असे वर्णन केले. पण शैलेंद्र यांची जात उघड करण्यावर अनेक साहित्यिक आणि लेखकांनी आक्षेप घेतला. तेजिंदर शर्मा या लेखकाने सोशल मीडियावर आपला आक्षेप नोंदवताना असेही म्हटले आहे की, डॉ. नामवर सिंह यांनी केवळ शैलेंद्रच नव्हे तर सर्व साहित्यप्रेमींचा अपमान केला आहे. <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjijm2Mo8sv4Tdrqc_UeA-OiPIycSF3AbYs-M-4DacX68rS5vhNtZ4gDwzfaQufLpDkbbVRFf_Y9_9EqBDHhyIyvmSrqRfPEFPs8BvCLibvBLdN0zO4cDch149bYrNt62NKlG91cVuK6hXiQ5Ed6Pgc4cZdOy_b1tMznQnB9xXwPlIUNOHViOcLqBzC/s300/images.jpeg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" data-original-height="168" data-original-width="300" height="224" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjijm2Mo8sv4Tdrqc_UeA-OiPIycSF3AbYs-M-4DacX68rS5vhNtZ4gDwzfaQufLpDkbbVRFf_Y9_9EqBDHhyIyvmSrqRfPEFPs8BvCLibvBLdN0zO4cDch149bYrNt62NKlG91cVuK6hXiQ5Ed6Pgc4cZdOy_b1tMznQnB9xXwPlIUNOHViOcLqBzC/w400-h224/images.jpeg" width="400" /></a></div>मुद्दा असा आहे की एखादे महान व्यक्तिमत्व जर दलित असेल तर त्यांची जात उघड करायला काय हरकत आहे? ब्राह्मण किंवा इतर उच्चवर्णीय व्यक्तींच्या जातींचा उघडपणे प्रचार केला जातो, तेव्हा कोणी आक्षेप नोंदवत नाही. मात्र दलित व्यक्तिमत्त्वाची जात उघड करण्यास विरोध केला जातो हा दुटप्पीपणा होय.<br /><br />यानंतर आणखी एक घटना मीडियाने पुरती दाबून टाकली. 21 फेब्रुवारी 2015 रोजी दुपारी 3 वाजता, मुंबईत शैलेंद्रच्या मुलाच्या लग्नाच्या 31 व्या वर्धापनदिना निमित्तच्या कार्यक्रमात चक्क सशस्त्र गुंड घुसले होते. बेसबॉल बॅट आणि काठ्या घेऊन सुमारे तीसेक गुंड त्याच्या घरात घुसले. त्यांनी दिनेश शैलेंद्र आणि त्यांच्या पत्नीचे मोबाईल <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh4YMpKI7k5yy8k5zckeL0AeKLOsRSAVJ_osxH8jw5QgsQpvSpiubYish8py7uhevPOSAjG-Khy7XZLH5iU-iVY-B6GvQ4hOn1Xf6Oz_zBi04aYCDp4Wb5yb4lA73nQyQjUyRhnwKHrICdB-kz_yEnVtnfGuxzdDDuXgpLv-eRJwrqVMyNkq8DKlgay/s300/images%20(1).jpeg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" data-original-height="168" data-original-width="300" height="224" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh4YMpKI7k5yy8k5zckeL0AeKLOsRSAVJ_osxH8jw5QgsQpvSpiubYish8py7uhevPOSAjG-Khy7XZLH5iU-iVY-B6GvQ4hOn1Xf6Oz_zBi04aYCDp4Wb5yb4lA73nQyQjUyRhnwKHrICdB-kz_yEnVtnfGuxzdDDuXgpLv-eRJwrqVMyNkq8DKlgay/w400-h224/images%20(1).jpeg" width="400" /></a></div> हिसकावून घेतले आणि त्यांना एका कोपऱ्यात बसवून घरातील प्रत्येक वस्तू समोरील ट्रकवर चढवली. एक चमचाही सोडला नाही. या गुंडांनी शैलेंद्रच्या हस्तलिखित कविता, पत्रे, पुरस्कार आणि ट्रॉफी हिसकावून घेतल्या. त्यांना बळजबरीने दिनेश शैलेंद्र आणि त्यांच्या पत्नीला ट्रकमध्ये बसवायचे होते, मात्र त्यानंतर तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने पोलिसांना फोन केला आणि पोलिस येण्यापूर्वीच गुंडांनी ट्रकसह पळ काढला. दिनेश शैलेंद्र आणि त्यांच्या पत्नीने त्याच दिवशी पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र आजतागायत पोलिसांनी ना माल जप्त केला ना गुंडांना पकडले. पोलिसांनी केवळ एकाला पकडले होते, परंतु त्यालाही चौकशीसाठी रिमांडवर न घेता सोडले गेले. माध्यमांचा आणि प्रशासनाचा हा सापत्नभाव कशासाठी? हीच घटना कुण्या उच्चवर्णीय वा कथित उच्चभ्रू व्यक्तीबाबतीत घडली असती तर त्याचे ठळक मथळे दिसले असते. मात्र शैलेंद्रांच्या बाबतीत असे घडले नाही. <br /><br />केवळ जातीपायी त्यांना त्यांच्या आवडत्या क्रीडा क्षेत्रातील करिअरला मुकावे लागले होते हे कुणी नाकारेल काय? असे असूनही त्यांच्या जातीय व डाव्या वैचारिक जडणघडणीचा मुद्दा झाकून ठेवावा असं म्हणणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं आहे. त्यांची सुरुवातीची जडणघडण, <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="p" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" data-original-height="197" data-original-width="256" height="308" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj0YxgwJPkjJlmgwXsh-fXYXvjAEn-OaeHGG09uU-a944CnByuy87f8ryU9xfZ1EG28iyJkpTuXYPkxCykMEygTpSmaOlyDycmI5dPEmxxp_k6H5O8kqUUtickSnvDqSUYayISsW3lADffrmci0f3anM8dqawfmR5lDBFeicugypc4dnfqh7XXtIsF9/w400-h308/images%20(2).jpeg" width="400" /></a></div> साम्यवादाकडे झुकणारी त्यांची वैचारिक बैठक, जन्माने दलित असण्याने वेळोवेळी नाकारलं जाणं, अंगी अफाट कौशल्य असूनही आश्रितासारखं जिणं जगताना मनाचं एकारलं होत जाणं नि नंतरच्या काळात जीवनात येत गेलेले विलक्षण उतार चढाव, जीवघेणा संघर्ष आणि अखेरीस आलेले अपयशाचे दाट झाकोळ हे सारं त्यांच्या कवितांमधून जाणवतं. त्यांच्या रचना बेगडी न ठरता त्यात एक प्रकारचं आपलेपण हरेकास जाणवतं. आजच्या काळात लोक ज्या विखारी विभाजनवादी भाषेत बोलतात त्या भाषेत सांगायचे झाले तर शैलेंद्र 'आपले' नव्हते, आताच्या लोकांनी 'बायकॉट शैलेंद्र' अशी मोहीम चालवली असती. बिहारमधील आरा जिल्ह्यातील धुसपूर गावातील दलित कुटुंबातील शैलेंद्र यांचा जन्म 30 ऑगस्ट 1927 रोजी रावळपिंडी (पाकिस्तान) येथे झाला. त्यांचे वडील केसरीलाल आणि आई पार्वतीदेवी बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे बिहारमधून रावळपिंडीला स्थलांतरित झाले. जिथे त्यांचे वडील केसरीलाल राव ब्रिटिश मिलिटरी हॉस्पिटलमध्ये (जे मुरी कॅन्टोन्मेंट एरियात होते) कंत्राटदार होते. शैलेंद्र लहानपणापासूनच आधी रावळपिंडी आणि नंतर मथुरेत आपल्या वडिलांसोबत राहत असल्याने त्याचा गावाशी विशेष संबंध नव्हता. त्यांच्या गावातील बहुतेक लोक शेतमजूर होते. रावळपिंडीत त्यांच्या मातापित्यास कठोर परिश्रम करावे लागले. अवघे काही दिवस सुखाचे आले मात्र हा आनंद दीर्घ काळ टिकला नाही. दुःख जणू पाठलाग करत त्यांचा मागोवा घेत समोर उभं ठाकलं. केसरीलालना आर्थिक नुकसान सोसावे लागले, कुटुंब रस्त्यावर आले. पोटापाण्याचे हाल सुरू झाले. तरीही <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="l" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" data-original-height="168" data-original-width="300" height="224" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgmKziFHt3SzDi3HSOYtl3XVf7kKozjGAof0YztwYyHZ8taKsoFy23GbdEMpEm61xtgumx3hSCdRe94uDGs3fpv6ulYBwDhIDXdQG_y-VB8bhQ4hYc5tFMU5U6ZnA3FuuoV5yEdUBn-mO5mpsXOyi_YyAadGJ-LcyhtFPZ-jpk3uJgIvTVDNKRV8po-/w400-h224/download.jpeg" width="400" /></a></div> स्वाभिमान कुणाची मदत मागू देत नव्हता. अखेर रेल्वेमार्गाचे काम पाहणाऱ्या त्यांच्या मोठ्या भावास या परिस्थितीविषयी कळले नि मग ते स्वतः तिथे आले. हलाखीत अडकलेल्या केसरीलालला कुटुंबासह घेऊन ते मथुरानजीक गावी आले. मथुरेत कुटुंबाची आर्थिक समस्या इतकी वाढली की शैलेंद्र आणि त्यांच्या भावांनी भुकेने मरावे म्हणून वडील त्यांना विडी ओढायला लावले. एवढ्या आर्थिक अडचणींनंतरही शैलेंद्रने मथुरा ते इंटरपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. परिस्थितीने शैलेंद्रच्या मार्गात काटे आणले होते आणि एक वेळ अशी आली की भगवान शंकरावर अपार श्रद्धा असलेल्या शैलेंद्रनी देवाला दगड मानले. गरिबीमुळे त्यांच्या एकुलत्या एक बहिणीवर उपचार करता आले नाहीत आणि तिचा मृत्यू झाला. या दरम्यानच्या काळात शैलेंद्र यांच्या मातोश्री पर्वतीबाई यांच्या प्रकृतीची अत्यंत हेळसांड झाली, दातावर मारायला देखील पैसा नसल्याने त्यांनी आजारपण लपवलं होतं. घरादारच्या चिंतेने ग्रासलेल्या त्या माऊलीने आपला इहलोकीचा प्रवास खूप लवकर संपवला. शैलेंद्र बालवयात असतानाच त्यांची आई अकाली गेली. त्यांची आई कमालीची देवभक्ती करणारी सोशिक भारतीय स्त्री होती, आपल्या आईने इतकी कठोर भक्ती आराधना करूनदेखील ती एकाएकी देवाघरी गेल्याने शैलेंद्र नास्तिकतेकडे झुकले.<br /><br /><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhWWQ-o8n3dtKU2iDYkt4ssRj-PJj3-qsCtZhde2mrbET7jGK-TU6OHMtGh0hsSxhfU7jM2zak5RTH3h0IybcotE4TxlI8wboDINLQrep8nhzV60NVe_MWzx__UsJCy4NdM4M3F5mPNijqbKGo6CGytTEzk3w_FKDxAdYvrNo7NOsawPgfoj7N_yvZK/s292/images%20(5).jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="173" data-original-width="292" height="379" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhWWQ-o8n3dtKU2iDYkt4ssRj-PJj3-qsCtZhde2mrbET7jGK-TU6OHMtGh0hsSxhfU7jM2zak5RTH3h0IybcotE4TxlI8wboDINLQrep8nhzV60NVe_MWzx__UsJCy4NdM4M3F5mPNijqbKGo6CGytTEzk3w_FKDxAdYvrNo7NOsawPgfoj7N_yvZK/w640-h379/images%20(5).jpeg" width="640" /></a></div><br /> आईचं अकाली जाणं त्यांना चटका लावून गेलं, पुढे जाऊन ती पोकळी सदैव त्यांच्या कवितांत डोकवत राहिली. आई गेल्यानंतर ते अबोल नि अंतर्मुख राहू लागले. मथुरा येथे शिक्षण घेत असताना इंद्र बहादूर खरे नावाच्या एका कवीच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनाही कवितेचे आकर्षण जाणवू लागले. खऱ्या अर्थाने इथे त्यांच्या लेखणीचा जन्म झाला. त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली. वडील कामावर गेलेले असत, घरात आई नसे. घर खायला उठे. मग पौगंडावस्थेतले शैलेंद्र यमुनेच्या काठी जाऊन बसत. इथे त्यांच्या मनाचा तळ ढवळून निघत असे. नदीला साक्षी ठेवून आपल्या मानातल्या भावनांना त्यांनी शब्दरूप देण्यास सुरुवात केली. तरीही त्यावर ते समाधानी नव्हते. आपल्या कविता वाचकांसमोर याव्यात असं त्यांना राहून राहून वाटू लागलं. आग्रा शहरात प्रकाशित होणाऱ्या नया युग, साधन या मासिकात त्यांच्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. प्रारंभी ‘शचीपती’ या टोपणनावाने त्यांनी या कविता लिहिल्या. त्यांचे खरे नाव शंकरदास असले तरी त्या नावाने ते फार कमी ओळखले गेले.<br /><br /><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgmZMyk3XaMbU4EbnvMpXeWfb9bRJWcWghXhQTRcQEZnXFcNgKJQk_zUdRn3WGpm31xg4XV3WYxYXvIXmcEGj8KYbUbDzHu2GpJe4Jj9kwB4z-jQGIRT0LT4DYx40WJM7NhbcHYvvCzNqZLNCJEH7OqNvzA_RwcDomqcY3SQC-q_8jU9li5LFBhXDiS/s300/images%20(6).jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="168" data-original-width="300" height="358" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgmZMyk3XaMbU4EbnvMpXeWfb9bRJWcWghXhQTRcQEZnXFcNgKJQk_zUdRn3WGpm31xg4XV3WYxYXvIXmcEGj8KYbUbDzHu2GpJe4Jj9kwB4z-jQGIRT0LT4DYx40WJM7NhbcHYvvCzNqZLNCJEH7OqNvzA_RwcDomqcY3SQC-q_8jU9li5LFBhXDiS/w640-h358/images%20(6).jpeg" width="640" /></a></div><br />कविता लिहिताना आपल्या अंतःकरणाचा ठाव त्यांना खोलवर गवसला. भवतालाकडे पाहण्याचा उदात्त दृष्टिकोन मिळाला. आपल्या आईवडिलांची ससेहोलपट त्यांनी पाहिली होती, आजूबाजूच्या श्रमिकांचे शोषण पाहताना त्यांच्या मुठी वळत. मात्र त्यावरचे प्रहार त्यांनी शब्दांमधून केले. त्यांच्यातल्या देशप्रेमाच्या ज्योती इतक्या दाहक होत्या की स्वातंत्र्यलढ्यात ते कारावास भोगून आले. त्यांच्या कवितेतली बंडखोरी इथूनच प्रसवली मात्र तिचे प्रकटन त्यांच्या प्रकृतीसारखंच सौम्य सुसंस्कृत नि नितळ होतं.<br /><br /><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhctPvERscgvyCS-iq1DBSU_nHuKqr-c9Tn3iEWKGrJD_y6NywGSk5t8sK40GecJ6TyjNeyC1fSlwB2c7815f57u0QJpZGrOCKVQmm4SVeNiQXUOAAtWBG9EatT9mzZpvQsItFibPb_b0nj2nE15exCyMoTMpjPxDb2PHWsDtezQDJ_vagBdVJm51_D/s263/images%20(7).jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="192" data-original-width="263" height="467" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhctPvERscgvyCS-iq1DBSU_nHuKqr-c9Tn3iEWKGrJD_y6NywGSk5t8sK40GecJ6TyjNeyC1fSlwB2c7815f57u0QJpZGrOCKVQmm4SVeNiQXUOAAtWBG9EatT9mzZpvQsItFibPb_b0nj2nE15exCyMoTMpjPxDb2PHWsDtezQDJ_vagBdVJm51_D/w640-h467/images%20(7).jpeg" width="640" /></a></div><br /> कसेबसे शिक्षण पूर्ण करून त्यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना हॉकी खेळताना पाहून काही विद्यार्थ्यांनी त्यांची खिल्ली उडवली आणि ‘आता हे लोकही खेळतील’, असे त्यांना हिणवले गेले. याची परिणती शैलेंद्रांच्या खचण्यात झाली. त्यांनी संतप्त होऊन त्यांनी आपली हॉकी स्टिक फोडली. शैलेंद्र अत्यंत दुखावले गेले. जड अंतःकरणाने त्यांनी आवडत्या क्रीडा क्षेत्रास अलविदा केलं. पोटाची खळगी भरण्यासाठी हाताला काम असणं गरजेचं होतं. मुंबईतल्या अक्राळ विक्राळ आकाराच्या अजस्त्र यंत्रांनी सुसज्ज असलेल्या माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागात ट्रेनी म्हणून त्यांना नोकरी मिळाली. अकरा रुपये पगारात त्यांना निर्वाह करायचा होता. <br />या दरम्यानच्या काळातच त्यांच्या विचारसरणीवर डाव्या विचाराचा पगडा पक्का झाला. एकीकडे जगराहाटीत त्यांची दमछाक होत होती तर दुसरीकडे मनातला संवेदनशील कवी स्वस्थ बसू देत नव्हता. कवितेचं प्रसवणं जारी होतं. रेल्वे क्वार्टरच्या खोलीत बसून कविता करणाऱ्या शैलेंद्रना त्यांचे मित्र हसत असत. त्यांची टवाळी करत, हा नाद सोडून त्यानं कामात लक्ष घालावं असा सल्ला ते देत. शैलेंद्र मात्र त्याकडे दुर्लक्ष करत.<br />"काम नये नित गीत बनाना<br />गीत बनके जहाको सुनाना<br />कोई ना मिले तो अकेले में गाना.. "<br />हा त्यांचा पिंडच झाला होता.<br /><br />काम सुटल्यानंतर ते पृथ्वीराज कपूरच्या रॉयल ऑपेरा हाऊससमोर असलेल्या प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनच्या कार्यालयात वेळ घालवत असत. रोज संध्याकाळी कवी तिथे जमायचे. याच काळात ते भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) ची सांस्कृतिक शाखा, इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (IPTA) मध्ये सामील झाले आणि त्यांनी स्वातंत्र्योत्तर भारतातील समाजवादी-थीम असलेली कविता आणि गाणी लिहायला सुरुवात केली. <br />“हर जोर-जुल्म की टक्कर में, हरताल हमारा नारा है” (प्रत्येक अत्याचार, प्रत्येक अतिरेकाविरुद्ध संप हे आमचे हत्यार आहे) अशी प्रसिद्ध घोषणा त्यांनी तयार केली, आजही आंदोलक ही घोषणा वापरतात.<br />त्यांच्या लेखणीतला दमदार आशय पाहून ‘हंस’ या हिंदी मासिकात त्यांच्या कविता छापून येऊ लागल्या ज्याचे संपादक हिंदीतले ख्यातनाम नि लोकप्रिय लेखक प्रेमचंद होते. मुंबईने शैलेंद्रच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवला पण मनातली तगमग शांत बसू देत नव्हती. पंक्चरली जरी रात्र दिव्यांनी आणि बेकलाईटी या मर्ढेकरी कवितांसारखं त्यांचं आयुष्य यंत्रांच्या गोंगाटात दडपून गेलं होतं. कबीर नामदेव नि तुकोबांच्या विचारधारेची शब्दकळा त्यांच्या कवितेत नेटाने आढळते. हा कालखंड भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षाचा परमोच्च काळ होता. बापूंनी 'चले जाव'चा नारा दिला होता. काय नि कोणासाठी लिहायचं याचं द्वंद्व त्यांच्या मनी सुरू असे. <br /><br /><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhnbuTVeDTf5WFXg4v0puUE5A9iWt4vvtlGwOb3w-RIEpnKSBFylT7g0ygCQ5lkQDkljblO5VN4Owy_8nnWfpCSuzVpYiFy-wY8A7jpV83_DgliNaaOe5adrsnyvTR76uySDuij6Xtrfrni8U51xvZHe7fU3cTUw7M6nJmjHe3H7OowPdPZAmKDuicO/s1200/most-popular-bollywood-songs-in-raag-bhairavi.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="773" data-original-width="1200" height="412" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhnbuTVeDTf5WFXg4v0puUE5A9iWt4vvtlGwOb3w-RIEpnKSBFylT7g0ygCQ5lkQDkljblO5VN4Owy_8nnWfpCSuzVpYiFy-wY8A7jpV83_DgliNaaOe5adrsnyvTR76uySDuij6Xtrfrni8U51xvZHe7fU3cTUw7M6nJmjHe3H7OowPdPZAmKDuicO/w640-h412/most-popular-bollywood-songs-in-raag-bhairavi.jpg" width="640" /></a></div><br /> देशभरात भारत छोडोची मोहीम भरात आली होती कवी मनाच्या शैलेंद्रवर याचा प्रभाव पडणं साहजिक होतं. त्यांनी हिरीरीने यात भाग घेतला, कारावास भोगला. आपली लेखणी क्रांतीसाठी मशालीसारखी परजायची असं त्यांनी मनोमन ठरवलं. इंडिअन नॅशनल थिएटरच्या नाटकांमध्ये हाती डफ घेऊन स्वरचित गीत गाणारे शैलेंद्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असत. पारतंत्र्य, गुलामी, क्रांतीकारकांचा विद्रोह हे त्यांच्या गीतांचा विषय झाले.<br />एके दिवशी अशाच एका मुशायऱ्यात शैलेंद्र गात होते.<br />'जलता हुआ पंजाब... ' हे गीत होतं आणि समोरच्या श्रोत्यांत होते राजकपूर!<br />राजकपूरना शैलेंद्रच्या गीतांची इतकी भुरळ पडली की कार्यक्रम संपताच त्यांनी थेट भेट घेत आपल्या सिनेमांसाठी गीतलेखन करण्याची ऑफरच दिली! मात्र स्वाभिमानी बाणेदार वृत्तीच्या शैलेंद्रनि ती ऑफर धुडकावून लावली. आपण आपली कला विकणार नाही, ती पोट भरण्यासाठी वापरणार नाही. देशभक्तीसाठीच तिचा उपयोग केला जाईल असं ठासून सांगितलं. तरीही आरकेने त्याला आर्जव केलं की, 'जेंव्हा कधी त्याचा इरादा बदलेल वा कधी कशाची गरज पडली तर त्याने बिनधास्त यावं, आरकेची दारं त्याच्यासाठी सदैव खुली असतील!'<br />इतके बोलून हिंदी सिनेमाचा तो बेताज बादशाह निघून गेला आणि पुढे जाऊन शैलेंद्र त्याच्या गीतांच्या दुनियेत रममाण झाले होते.<br /><br />"योद्धा हम दोनों एक ही मैदान के<br />परदेसी कैसे चाल चल गया<br />झूठे सपनों में हमको छल गया<br />वो डर से घरसे निकल तो गया<br />पर दो आँगन कर गया मकान के..."<br />हिंदू मुस्लिम यांच्यात इंग्रज जो द्वेष पेरत होते त्याला उत्तर देणारं हे गीत शैलेंद्रच्या मनात काय चाललं होतं याची ग्वाही देतं. आताच्या धर्मद्वेषानि ग्रासलेल्या काळात अशी प्रभावी गाणी असणं बरंच अहमियत असणारं ठरलं असतं. कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता आपल्याच गीतांच्या कैफात शैलेंद्र जगत होते आणि याच दरम्यान त्यांच्या आयुष्याला नवे वळण देणारी घटना घडली.<br /><br />1948 मध्ये एका नातलगाच्या लग्न सोहळ्यास हजर राहण्यासाठी ते झाशीला आले होते. इथेच त्यांची भेट शकुंतलेशी झाली, शकुंतला त्यांच्या दूरच्या नात्यातली होती. उभयतांचे सूर जुळले, पुढे जाऊन त्यांनी विवाह केला. त्यांच्या दांपत्य जीवनाची सुरुवातच कठोर परिश्रमाने नि संघर्षाने झाली. लग्नानंतर ते दोघे मुंबईस रवाना झाले. रेल्वेच्या नोकरीत मिळणारा तुटपुंजा पगार त्यांच्या संसारास पुरात नव्हता. नियतीने त्यांची कठोर परीक्षा बघायचं ठरवलं होतं, शकुंतलेस दिवस गेले. तिने गोंडस मुलाला जन्म दिला आणि कुटुंबाची ओढाताण वाढत गेली.<br />आपल्या हेकेखोर स्वभावाने आणि फुकट फौजदारकीने कुटुंबाच्या अर्थार्जनास फटका बसतोय हे शैलेंद्रना उमगत होते. अखेर आपल्या पत्नीची आणि तान्ह्या बाळाची फरफट त्यांना असह्य झाली. शकुंतलेस माहेरी पाठवण्याइतके पैसेही आपल्याकडे नसावेत याचे त्यांना अतिव शल्य झाले. आपणच यास कारणीभूत असल्याची टोचण लागली.<br /><br />त्याचक्षणी त्यांना राजकपूरचे ते शब्द आठवले. अधिक विलंब न करता त्यांनी आरकेचे महालक्ष्मीला असलेलं ऑफिस गाठलं. दरबानाने त्यांना गेटवरच अडवलं. त्यासरशी त्यांनी केवळ शैलेंद्र आला आहे असा निरोप दिला. तेंव्हा आरकेचं 'बरसात'चं काम चाललं होतं. राज कपूरसमोर जाताच त्यांनी जुन्या भेटीची आठवण करून दिली. आपल्याला पैशांची गरज आहे आणि त्या बदल्यात त्याने हवे ते काम करवून घ्यावे असं निसंकोचपणे सांगितलं. राजनि शैलेंद्रची अडचण ऐकून घेतली, त्यांना आधी मदत केली नि अडचणीतून मन मोकळं झाल्यावर परत यायला सांगितलं.<br />दुसऱ्याच दिवशी शैलेंद्र परतले ते दोन अमीट गाणी घेऊनच!<br />‘बरसात में हम से मिले तुम सजन’ आणि ‘पतली कमर हैं, तिरछी नजर हैं’या दोन्ही गीतांनी नवा ट्रेंड सेट केला. इंडस्ट्रीला पहिलं वाहिलं टायटल सॉन्ग लाभलं. आरके, शंकर जयकिशन आणि शैलेंद्र यांची अद्भूत केमिस्ट्री जन्मास आली. शैलेंद्र आरकेच्या कोअर टीमचा भाग झाले. <br /><br />यानंतर शैलेंद्रनि कधी मागे वळून पाहिले नाही. मदत म्हणून पाचशे रुपये देऊ करणाऱ्या आरकेसाठी त्यांनी कायमच तितकेच मानधन घेतले त्यात कधीच वाढ केली नाही. इतरांकडून मात्र ते दहा हजार रुपये घेत असत हे विशेष होय. राजकपूर त्यांना कविराज आणि रशियन कवी अलेक्झांडर पुष्किन म्हणत. <br />या नंतर सिनेसृष्टीमधील सर्वच नामवंतांसोबत काम करण्याची संधी शैलेंद्रना मिळाली. <br /><br /> आर.के. नारायण यांच्या कादंबरीवर आधारलेल्या देव आनंद अभिनित 'गाईड' चित्रपटात एक गीत होतं - 'वहाँ कौन है तेरा मुसाफिर जाएगा कहाँ.. ' जगण्याचा मार्ग हरवलेल्या कुठल्याही व्यक्तीस हे गाणं आपल्या भावना व्यक्त करणारं वाटेल. यातल्या काही पंक्ती अशा होत्या -'कोई भी तेरी, राह ने देखे<br />नैन बिछाए न कोई<br />दर्द से तेरे, कोई ना तड़पा<br />आँख किसी की ना रोई<br />कहे किसको तू मेरा<br />मुसाफिर जाएगा कहाँ..'<br />या गीतामधली ही वेदना अगदी आर्त होती. हे दुःख बाभळीच्या काट्यासारखं होतं. जगाने धुत्कारलेल्या माणसाचा सल त्यात होता. शैलेंद्रनी झेललेल्या वेदनाच इथे शब्दरूपात होत्या. <br /> 'गाईड' अफाट चालला. लोकांनी त्यातली गाणी डोक्यावर घेतली. - आज फिर जीने की तमन्ना है, दिन ढल जाए, गाता रहे मेरा दिल, क्या से क्या हो गया, पिया तोसे नैना लागे, सैंया बेइमान, तेरे मेरे सपने, हे राम मेरे रामचंद्र, अल्ला मेघ दे पाणी दे आणि वहा कौन है तेरा ही ती गाणी होती.<br /><br />राजकपूरची कारकीर्द ज्या 'श्री 420' ने अगदी बहरात आली त्यातील सर्वाधिक गाजलेलं गीत होतं- 'दिल का हाल सुने दिलवाला!' एका निहायत सच्च्यासीध्या, भोळ्या भाबड्या बेरोजगार तरुणाची रसिली कथा यात होती. 'दिल का हाल सुने दिलवाला..' हे गीत त्या काळच्या आदर्शवादाचे प्रतिनिधित्व करत नव्हते मात्र त्याकाळच्या नितळ साधेपणाचे ते लख्ख प्रतिबिंब होते. फुटपाथच ज्यांचे घर होते अशा बेघरांना आभाळाचे छत होते, त्यांचे संसार उघड्यावर होते, हाती येईल त्या कामास तडीस नेणाऱ्या अष्टौप्रहर भटकणाऱ्या अगणित लोकांनी शहरे भरली होती. काम नसले तर रित्यापोटी झोपणारे हे जीव वेळप्रसंगी इतरांसाठी चोऱ्यामाऱ्या करत. त्यांचे विश्वच दैन्य दारिद्रयाने ग्रासलेले होते. त्यांचे दुःख कुठल्या सिनेमात कुणी मांडायचा सवालच नव्हता मात्र शैलेंद्र याला अपवाद होते. स्वतःच्या शैशवातील गरीबीचे चटके त्याने शब्दबद्ध केले होते -<br />"छोटे से घर में गरीब का बेटा,<br />मैं भी हूँ माँ के नसीब का बेटा,<br />रंजो गम बचपन के साथी,<br />आंधियों में जले जीवनबाती,<br />भूख ने हैं बडे प्यार से पाला.”<br />शिणलेल्या, गांजलेल्या एका बदनसीब तरुणाचे रसरशीत चित्र या ओळींमधून समोर येतं जे कथेमधील नायकास तंतोतंत चपखल बसत होतं. वास्तवात ही तर शैलेंद्र यांची स्वतःचीच कैफियत होती!<br /><br />1955 साली नूतन आणि बलराज साहनी यांच्या भूमिका असणारा 'सीमा' हा अत्यंत देखणा सिनेमा आला होता. एक प्रौढ पुरुष आणि घर सोडून आलेली एक कोवळी तरुणी यांच्यातल्या अबोल प्रेमाची कथा यात होती. यातलं मन्ना डे यांच्या आवाजातील 'तू प्यार का सागर है..' हे गीत म्हणजे प्रेमी युगुलांसाठीची भावोत्कट रचना आहे. तर काहींच्या मते हे एक भजन आहे.<br /><br />या गीतातल्या एका कडव्यात प्रेमाच्या शक्यअशक्यतेच्या द्विधा मनस्थितीचे वर्णन करताना कथेची नेमकी नस पडकलीय -<br />"इधर झूमके गाए जिंदगी, उधर है मौत खड़ी,<br />कोई क्या जाने कहाँ है सीमा,<br />उलझन आन पड़ीऽऽऽ<br />उलझन आन पड़ी कानों में जरा कह दे,<br />कि आएँ कौन दिशा से हम..."<br />कथेतील उमर ढळत चाललेल्या नायकास एकीकडे आयुष्याचं आकर्षण जाणवतंय आणि तिथंच काही अंतरावर त्याला त्याच्या दुःखासमवेत कवेत लपेटून घेणारा मृत्यू उभा आहे. नियतीने (की तिने?) त्याला कसल्या कोड्यात टाकलंय? आता त्यानं नेमकं कुठं जावं? जन्म-मृत्युच्या नेमक्या सीमा आहेत तरी कुठे? विनंती करतो की, निदान दया दाखवून सांग तरी असं आर्जव यात आहे? मनात इतका गोंधळ आहे की कुठल्या दिशेनं तुझ्याकडे यावं हे काही केल्या कळत नाही.<br />'सीमा'मधल्या या गीताने सारे प्रेमीजन व्याकुळ झाले होते. शैलेंद्र यांनी आयुष्याच्या प्रारंभी जीवनमृत्यूचे जे द्वंद्व लढलं त्याचा हा प्रसव होता. <br /><br />1966 मध्ये वैजयंती मालाचा 'आम्रपाली' प्रदर्शित झाला आणि सर्वत्र त्यातील कथासंहितेची, वैजयंतीमालाच्या सौंदर्याची, नृत्य कौशल्याची, देखण्या चित्रपट मूल्यांची चर्चा सुरू झाली. याबरोबरच 'आम्रपाली'मधील वेगळ्या धाटणीच्या गीतांचीही मोहिनी पडली. एक राजा, एक नगरवधू गणिका आणि महान साधू यांच्यातला तत्वसंघर्ष यात चितारला होता. रसिक प्रेक्षक 'आम्रपाली'च्या सौंदर्याने घायाळ होणं साहजिक होतं!<br />मात्र कथेतील बोजड वाटणारं तत्वज्ञान गीतांमधून अगदी सुलभ सरळ पद्धतीने समोर आलं.<br />विवेक, वासना, विकार, संयम आणि मनःशक्ती यांच्यातलं द्वंद्व केवळ गाण्यांमधून मांडायचं म्हणजे कठीण काम होतं. मात्र शैलेंद्रनी लीलया हे काम पेललं.<br />जाओ रे, जोगी तुम जाओ रे<br />ये है प्रेमियों की नगरी<br />यहाँ प्रेम ही है पूजा<br />जाओ रे ...<br /><br />संगीतकार अनिल बिस्वास यांनी सुरावट दिलेल्या 'छोटी छोटी बातें मधील 'कुछ और जमाना कहता है..' या गीतातील पंक्ती तर अत्यंत आशयघन आहेत-<br />“ये बस्ती है इन्सानोंकी इन्सान मगर भूले ना मिला<br />पत्थत की बुतों से क्या कीजे फरियाद भला टूटे दिल की... ”<br />शैलेंद्र यांच्या गीतांचा बाज अभूतपूर्व असा होता. जड शब्दांचा हव्यास नसलेली नेटक्या नि नेमक्या शब्दांनी सजलेली अर्थपूर्ण गीते इतक्यावरच त्यांच्या गीतांचे मूल्यमापन होऊ शकत नाही. त्यांच्या गीतांना असणारी पार्श्वभूमी जाणून घेतली की त्यामागचा अर्थ अधिक व्यापक नि खोल होतो.<br /><br /><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjMDz0l6UMsA75CS5qhByywC27TiCsIIkCfacqZs8i32G2mZ_C17QbrxoeQAPu0fVOPgKcflqAM4O4W8Nef66T_R7igUQQ5u7_SxYzoh6SMY4PPrEubaKkUmrt09T87BqncFw3KufontjmpPODGijYXqoggjTPZM0QxlCsL4Fr2Gb1AYqOEZwExRhao/s850/Lyricist-Shailendra-850.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="550" data-original-width="850" height="414" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjMDz0l6UMsA75CS5qhByywC27TiCsIIkCfacqZs8i32G2mZ_C17QbrxoeQAPu0fVOPgKcflqAM4O4W8Nef66T_R7igUQQ5u7_SxYzoh6SMY4PPrEubaKkUmrt09T87BqncFw3KufontjmpPODGijYXqoggjTPZM0QxlCsL4Fr2Gb1AYqOEZwExRhao/w640-h414/Lyricist-Shailendra-850.jpg" width="640" /></a></div><br />शैलेंद्रांनी इतिहास रचला. हिंदी चित्रपट गीतांना विदेशात प्रेमाचं स्थान मिळवून देण्याची अचाट कामगिरी त्यांच्या गीतांनी केली. 'आवारा हूँ’, ‘मेरा जूता हैं जपानी’ ही त्यांची गाणी विदेशात खास करून रशियामध्ये लोकप्रिय झाल्यानंतर त्यांनी रशियन भाषेचा अभ्यास केला होता. रसिकांनी डोक्यावर घेऊनही त्यांचे पाय मातीचेच होते. अंगी असणारी नम्रता कधी ढळू दिली नाही आणि अतिआत्मविश्वासाला बळीही पडले नाहीत. देशभरात करमणुकीची समान साधने नव्हती तरीही त्यांची गाणी सर्वदूर पोहोचली होती. प्रेमाची गाणी वा जीवनविषयाची गाणी असली तरी त्यांच्या गीतातून एक छुपा संदेश असायचा ज्याच्या तत्कालीन समाजमनावर नकळत परिणाम झाला होता.<br />त्यांच्यातला कवी त्यांनी नेहमीच काळजातल्या दिव्याप्रमाणे जतन करून ठेवला होता.<br />"ऊपर नीचे नीचे ऊपर लहर चले जीवन की,<br />नादाँ हैं जो बैठ किनारे पूछें राह वतन की,<br />चलना जीवन की कहानी, रुकना मौत की निशानी”<br />या गाण्यातला (श्री 420) अप्रतिम जीवन संदेश कोण बरे विसरेल?<br /><br />“कहते हैं ग्यानी, दुनिया है फ़ानी,<br />पानी पे लिखी लिखायी, है सबकी देखी,<br />है सबकी जानी हाथ किसीके न आयी..<br />कुछ तेरा ना मेरा, मुसाफ़िर जायेगा कहाँ…”<br />हे तत्वज्ञान इतक्या सहज सोप्या शब्दांत सिनेगीतांत (गाईड) कोण बरे सांगेल?<br /><br />"सब कुछ सिखा हमने सिखी ना होशियारी<br />सच है दुनिया वालो हम है अनाडी!..."<br />'अनाडी'मधला सच्चेपणा इतक्या तरल शब्दांत कुणाला मांडता येईल?<br /><br />“मिटे जो प्यार के लिये वो ज़िन्दगी,<br />जले बहार के लिये वो ज़िन्दगी...”<br />खरे तर हे मानवी आयुष्याचे सार आहे, जे शैलेंद्रनि आपल्या किशोरवयात अनुभवलं होतं!<br /><br />'गाईड'ने जसा सुरेल इतिहास निर्मिला तशीच कामगिरी 'मधुमती'ने केली होती आणि या जादूमध्ये शैलेंद्रचा वाटा मोठा होता. जुल्मी संग आँख लड़ी, आजा रे परदेसी, चढ़ गयो पापी, दिल तड़प तड़प के, घड़ी घड़ी मोरा दिल, हम हाल-ऐ-दिल सुनाएंगे, जंगल में मोर नाचा, सुहाना सफ़र, टूटे हुये ख़्वाबों ही सर्व गाणी आजही ऐकली जातात.<br />या गीतांचे एक वेगळे वैशिष्ट्य होते ते म्हणजे सर्व नऊ गीतांचे मुखडे वेगळ्या धाटणीचे होते, यात अवधी, भोजपुरी, मैथिली, उर्दू, गंगेच्या काठची रसाळ हिंदी आणि शुद्ध पांडित्य असणारी हिंदी ही सर्व गुणलक्षणे यातील भिन्न रचनांमधून आढळतात.<br /><br />'यहुदी'मधलं ये मेरा दिवानापन है हे साधं सरळ प्रेमगीत जितकं थेटपणे मनाला भिडतं तितकीच 'बसंत बहार' मधली 'भयभंजना सुन हमारी' ही विराणीही भावते. 'रमैय्या वस्तावैया' हे गीत बांधकाम मजुरांनी गायलेलं लोकगीत ऐकून सुचलं होतं तर एकदा जवळून जाणाऱ्या एका देखण्या स्त्रीकडे जयकिशन यांची सहज नजर गेली तेंव्हा तिथे असणाऱ्या शैलेंद्रना 'मूड मूड के ना देख...' हे गाणं सुचलं होतं!<br /><br />साठच्या दशकात ठराविक संगीतकार काही ठराविक गीतकारांना संधी देत. त्याच धर्तीवर शंकर जयकिसन यांचे शैलेंद्रसोबत अलिखित ऐक्य होते. मात्र मधल्या काही वर्षात एसजेंच्या हातून हे कॉम्बिनेशन कायम राहिले नाही. शैलेंद्रना ही गोष्ट खटकली. त्यांनी एका चिठ्ठीवर दोनच पंक्ती लिहून पाठविल्या -<br />‘छोटी सी ये दुनिया पहचाने रस्ते है,<br />कही तो मिलोगे तो पूछेंगे हाल.. ’<br />चिठ्ठी वाचताच शंकर जयकिशन द्वयीस अन्वयार्थ उमगला. त्यांनी शैलेंद्रना पुन्हा जवळ केले. संधीही दिली. 'रंगोली' चित्रपटातील गीतात याच पंक्तींचा वापर केला गेला.<br />अशी विविधांगी पार्श्वभूमी लक्षात घेतली तर शैलेंद्रच्या गाण्यातील सहजतेचे सिक्रेट उमगते.<br />'गर्दिश में हूं,आसमान का तारा हूं. आवारा हूं..' या पंक्तींचा जन्मही असाच चालता बोलता झालेला. शैलेंद्र हे अंतप्रेरणेने उस्फुर्त काव्य लिहिणारे असल्याने ही गीते कधी खटकली नाहीत. त्यांचा लळा मात्र अफाट लागला.<br /><br />‘खोया खोया चांद’ (काला बाजार), ये रात भीगी भीगी, ये मस्त समाये...'(चोरी चोरी), 'कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन' (दूर गगन की छाव में), 'रुलाके गया सपना मेरा.. ' (ज्वेल थीफ), 'मेरे साजन है उस पार..' (बंदिनी), 'अजीब दास्ता है ये...' (दिल अपना प्रीत पराई) या अवीट गोडीच्या गीतांमधून भिन्न स्वभावप्रकृतीचे शैलेंद्र समोर येत राहिले. दिग्गज गीतकार आणि संगीतकारांच्या काळात त्यांनी स्वतःला सिद्ध केलं, कुणाचीही नक्कल न करता स्वतःला घडवत गेले. कामावर निष्ठा ठेवत कवितेशी प्रामाणिक राहिले.<br />आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांना सामोरे गेले असल्याने कथेतील कारुण्यमय संघर्षाने भारलेल्या प्रसंगांना साजेशी गाणी लिहिताना त्यांना आपला जीवनानुभव कामी आला. टूटे हुये ख्वाबोने हम को ये सिखाया है, हाय गजब कहीं तारा टूटा, गाता रहे मेरा दिल, तू हि मेरी मंझील, सजनवा बैरी होगए हमार, आज फिर जिने कि तमन्ना हैआणि ओ जाने वाले हो सके तो लौट के आना ही गाणी त्याचे प्रतीक ठरावीत.<br /><br />फिल्मी पडद्यावर कविता जिवंत करण्यासाठी शैलेंद्रनी जिवाचं रान केलं. मात्र गीतकार म्हणून इंडस्ट्रीत काम करत असताना त्यांनी एक काव्यमय स्वप्न पाहिलं होतं ज्याचं नाव होतं 'तिसरी कसम'! मात्र याच स्वप्नाने त्यांना पुरतं लयास नेलं. विख्यात हिंदी साहित्यिक फणीश्वरनाथ रेणू ह्यांच्या 'मारे गये गुलफाम' या कथेच्या ते प्रेमात पडले होते. त्यांनी रेणूंकडे या कथेवर चित्रपट करण्याची परवानगी मागितली. रेणूंनी होकार देताच शैलेंद्रनी त्यांना दहा हजार रुपये देऊन हक्क विकत घेतले आणि रेणूंनाच चित्रपटाची पटकथा लिहायला सांगितली. चित्रपटाच्या नायकासाठी राज कपूर सोडता कोणी दुसरा कोणी डोळ्यापुढे येणं शक्यच नव्हतं. मात्र वेळेअभावी राजने दिग्दर्शनास नकार देत केवळ अभिनयास होकार दिला. दिग्दर्शकाचा शोध बासू भट्टाचार्यापाशी संपला. मोठ्या उत्साहात चित्रपटाचा मुहूर्त झाला. शैलेंद्रचा पहिलाच चित्रपट म्हणून सगळ्या चित्रपटसृष्टीने खूप कौतुक केलं.<br /><br />पण चित्रपट रखडत गेला. तब्बल ५ वर्षं झाली, तरी चित्रपट पूर्ण होत नव्हता. खूप लोकांनी शैलेंद्रना फसवलं. बजेट ४-५ लाखांवरून २५-२६ लाखांवर गेलं. फिल्म एडिट करायलासुद्धा पैसे उरले नव्हते. शैलेंद्र पुरते कर्जात बुडालेले होते मात्र सिनेमा चालेल याविषयी ते आश्वस्त होते. दरम्यान रेणूदेखील आजारपणामुळे त्यांच्या मूळ गावी परतले आणि शैलेंद्र एकटे पडले. शेवटी चित्रपट कसाबसा पुरा झाला. सिनेमा जबरदस्त झाला होता. अभिनय, पटकथा, गीत संगीत तांत्रिक अंगे सर्व काही उजवं होतं.<br />पण हा सिनेमा आम आदमीसाठी नाही अशी धारणा वितरकांत तयार झाली नि त्यांनी हात आखडता घेतला. चित्रपट प्रदर्शित करण्यास कोणीच राजी नव्हतं. शैलेंद्रच्या आयुष्यभराची कमाई होत्याची नव्हती झाली आणि मस्तकी कर्जाचं ओझं आलं. या धक्क्यातून ते कधीच सावरू शकले नाहीत. अनेक मिनतवाऱ्या केल्यानंतर काही वितरक बिहार बंगाल नि युपीमध्ये रिलीज करण्यास तयार झाले. आपल्या चित्रपटाचे भव्य स्क्रिनिंग्ज करण्याचं त्यांचं स्वप्न त्यांच्या जितेपणी कधीच पुरं झालं नाही.<br /><br />'तिसरी कसम' बॉक्स ऑफिसवर फेल गेला इतकंच गणित नव्हतं, मुद्दा एका माणसाच्या स्वप्नाचा, स्वाभिमानाचा, संवेदनशीलतेचा, आयुष्यभराच्या कमाईचा आणि जगावरच्या विश्वासाचा होता. हे सर्वच उध्वस्त झालं. परिणामी शैलेंद्र अबोल झाले, त्यांनी स्वतःला कोंडून घेतलं. असेच काही दिवस उदासीनतेने भारलेल्या एकांतात गेले. एके दिवशी त्यांच्या मनाने उचल खाल्ली नि ते थेट राजकपूरला भेटायला गेले. त्या भेटीत त्यांचा संवाद असा झालाच नाही. नुसती दृष्टादृष्ट झाली. थिजलेल्या मनाने ते घरी परतले. त्या दिवसानंतर ते अक्षरशः खचून गेले.<br />१३ डिसेंबरचा दिवस उजाडला. त्या सकाळी त्यांना अत्यंत अस्वस्थ वाटत होतं.<br /><br />काही तरी अघटित घडणार आहे याची त्यांना पुसटशी जाणीव झाली असावी. त्यांच्या पत्नीने शकुंतलाने डॉक्टरांना फोन केला, त्यांनी तत्काळ दवाखान्यात आणण्यास सांगितलं. ते हॉस्पिटलच्या दिशेनेच रवाना झाले होते. मात्र का कुणास ठाऊक रस्ता वाकडा करून ते आरकेकडे गेले. दोघांच्या गप्पा झाल्या. निघताना राजने विचारलं, "रे कवीराज! जीना यहां मरना यहां, इसके सिवा जाना कहां... अपना गाना कब पुरा होनेवाला है?"<br />हा प्रश्न मेरा नाम जोकरमधील त्या अजरामर गीतासंबंधी होता. सवाल ऐकून शैलेंन्द्र हसले आणि उत्तरले, "कल का तमाशा तो निपटा लूँ, तभी पूरा कर लूंगा.."<br />१४ डिसेंबर राजकपूरचा वाढदिवस. त्याच अनुषंगाने शैलेंद्रने हे उद्गार काढले होते. बड्डे पार्टीचा गोंधळ संपला की कामाला लागता येईल असं त्यांना सांगायचं होतं. मात्र नियतीच्या मनात काही और बात होती.<br /><br />इस्पितळात दाखल होताच शैलेंद्रच्या तपासण्या केल्या गेल्या आणि त्यांना ऍडमिट करून घेतलं गेलं. त्या दिवशी त्यांची प्रकृती खालावत गेली. दुसऱ्या दिवसाची सकाळ उजाडली. त्यांना आपल्या मित्राला भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. खुद्द आरके आपल्या पत्नीसह त्यांची भेट घेऊन गेला. मुकेशचे पाय तिथून निघत नव्हते, ते तिथेच थांबले होते. इंडस्ट्रीत शैलेंद्रच्या आजारपणाची बातमी एव्हाना पसरली होती, आरके स्टुडिओमध्ये शैलेंद्रना अराम पडावा म्हणून होमहवन सुरु झाले होते. विघ्न टळल्याची बातमी कानी यावी म्हणून सगळेच आतुरले होते मात्र दुःखद वार्ताच सगळ्यांच्या कानी पडली.<br />शैलेंद्र हरले होते, श्वासांची लढाई त्यांना जिंकता आली नाही. सगळ्यांना जबर धक्का बसला. राजकपूरच्या शब्दांत सांगायचं झालं तर त्याच्या देहातला आत्माच निघून गेला होता!<br /><br />काही महिन्यानंतर डिस्ट्रीब्युटर्सनी 'तिसरी कसम'चे हक्क विकत घेतले आणि पुनर्प्रकाशनात सिनेमाने बऱ्यापैकी यश मिळवले. हिरामण गाडीवाल्याच्या भूमिकेत राज कपूर यांनी जान ओतली होती आणि नौटंकीवाल्या हीराच्या भूमिकेत वहिदा रेहमान यांनी कारकिर्दीतील सर्वोत्तम अदाकारी पेश केली होती. शैलेंद्रच्या ‘हाय गजब कहीं तारा टूटा’, ‘पान खाए सैंया हमार’, ‘आ आभी जा रात ढलने लगी’, ‘सजनवा बैरी होगए हमार’, ‘सजन रे झूट मत बोलो’ या गाण्यांनी कहर केला. मात्र हे यश पाहायला शैलेंद्र हयात नव्हते.<br /><br />आयुष्यात सर्वांना सर्व मिळेलच असं होत नसतं, कुणाच्या तरी वाट्याचं आकाश दुसऱ्याच कुणाच्या तरी हिश्श्यात आलेलं असतं. सगळ्याच व्यथा बोलून दाखवता येत नसतात, सगळीच स्वप्ने पुरी होत नसतात. आपली स्वप्नं मरुन जाणं आणि आपल्या व्यथा ऐकून घेणारं कुणी नसणं या सारखं दुःख नसतं. आयुष्यभर उपेक्षेत जगलेल्या शैलेंद्रच्या वाट्याला ही दुःखे आली, निबर माणसं यात निभावून जातात शैलेंद्रसारख्यांना ते जमत नाही, त्यांच्या आयुष्याची पाने अकाली मिटतात नि मग जग त्यातलं मखमली मोरपीस शोधून त्यांची महती गात राहतं!<br /><br />केवळ काही वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल आठशे गीतं लिहून आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या शैलेंद्र यांना आजतगायत चित्रपट विषयक कोणताही मोठा पुरस्कार मिळालेला नाही ही खेदाची गोष्ट आहे. त्यांच्या जन्मशताब्दीवर्षात तरी सरकारने ही चूक दुरुस्त करावी.<br /><br />शैलेंद्र तुम्ही जिथे असाल तिथे सुख समाधान नांदो, तुमच्यामुळे ते जगही आता रसरशीत झालं असेल. तुम्हाला सलाम! <br /><br />- समीर गायकवाड.</span><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><br /></span></div><div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhtFEPQUBjt4csFCkYJL7RKAgjzVjxc0oGGw41aBL3xQmggwq2c1D9aNl7NZRUGrMs68G7DfXRyLKZ1EfS3C1qErpCCIwpUd4fSG8fXRLfMPOB8EbYHW0Rj2vU8vdfUNHQKh-i8zVzE27ufNoRwiXYLq0-ymgeYzWLsTqAKRsqsBGgx8NV6zvZCNQ-e/s1500/36055.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1136" data-original-width="1500" height="484" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhtFEPQUBjt4csFCkYJL7RKAgjzVjxc0oGGw41aBL3xQmggwq2c1D9aNl7NZRUGrMs68G7DfXRyLKZ1EfS3C1qErpCCIwpUd4fSG8fXRLfMPOB8EbYHW0Rj2vU8vdfUNHQKh-i8zVzE27ufNoRwiXYLq0-ymgeYzWLsTqAKRsqsBGgx8NV6zvZCNQ-e/w640-h484/36055.jpg" width="640" /></a></div><br /></div>sameer gaikwadhttp://www.blogger.com/profile/05106372658264914305noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1120566833830274839.post-26223088630631255152022-11-21T20:53:00.003+05:302022-11-21T20:54:59.326+05:30निळे घर ... – 'ब्ल्यू हाऊस' ए स्टोरी बाय इमॅन्यूएल एरेन <div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjLK0bgReql47tvv0Znbp9SjrSdaGmYYBDXGEK5oAO5_rUb-vHCEljw7Ey3yvZwD_eAxfAHzprZTrzuYIF-hu2lanO_L8pDTfJcZthVL6JfLL8A5tMthgL4wHvfV4H34CmwYhn5VKugWgJtZDShLs6oqxlpEuvbZOpTVaOahfWtMZAbJDwbBriujp3k/s499/51Ap839OsUL._SX356_BO1,204,203,200_.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="499" data-original-width="358" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjLK0bgReql47tvv0Znbp9SjrSdaGmYYBDXGEK5oAO5_rUb-vHCEljw7Ey3yvZwD_eAxfAHzprZTrzuYIF-hu2lanO_L8pDTfJcZthVL6JfLL8A5tMthgL4wHvfV4H34CmwYhn5VKugWgJtZDShLs6oqxlpEuvbZOpTVaOahfWtMZAbJDwbBriujp3k/w460-h640/51Ap839OsUL._SX356_BO1,204,203,200_.jpg" width="460" /></a></div></div><div><span style="font-family: Eczar; font-size: xx-large;"><br /></span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: xx-large;">इमॅन्यूएल एरेनच्या काकांनी त्यांच्या आयुष्यातली ही हकीकत एरेनला सांगितलेली. अर्थार्जनासाठी त्यांना फ्रान्समध्ये खूप भटकंती केली होती. चाळीसेक वर्षांपूर्वी एका सफरीमध्ये ते दीजो जिल्ह्याजवळील ब्लेझी-बा या लहानग्या स्टेशनवर गेलेले. तिथे त्यांना निळ्या रंगात रंगलेलं एक सुंदर छोटंसं घर दिसलं. पाऊस आणि बर्फाच्या वादळामुळे घराचा निळा रंग काहीसा फिका झाला होता. पहिल्यांदा ते घर त्यांनी पाहिलं तेंव्हा घरासमोरील बागेत गुलाबी चेहऱ्याची एक दहाएक वर्षांची मुलगी बॉल खेळत होती. तिने पिवळा पोशाख घातला होता. तिचे रेशमी केस निळ्या रेशमी रिबनने बांधलेले होते. ती एखादी आनंदमूर्ती भासत होती. खरे तर त्या दिवशी सकाळी काकांना अस्वस्थ वाटत होते. खेरीज त्यांचा व्यवसायही यथातथाच असल्याने भविष्याच्या भीतीसह ते पॅरिसला परतत होते. मात्र या क्षणीच्या दृश्याने त्यांच्या मनातले द्वंद्व संपुष्टात आणलेलं. पळभर त्यांना वाटलं की अशा ठिकाणी राहणारी माणसं नक्कीच सुखी असतात कारण त्यांना कसलीही चिंता नसते, वेदना नसतात. आनंदमूर्ती असलेल्या त्या मुलीचा साधेपणा पाहून त्यांना हेवा वाटला. तिच्यासारखं आपलंही चिंतेचं ओझं उतरवता आलं तर काय बहार येईल या विचाराने ते रोमांचित झाले. क्षणात ट्रेन निघाली आणि तितक्यात कोणीतरी त्या निळ्या घराच्या खिडकीतून हाक मारली, "लॉरिन!"... आणि क्षणात ती मुलगी घरात गेली. लॉरीन ! हे नाव काकांना खूप गोड वाटलं. ते शांतपणे ट्रेनमध्ये बसून लॉरीन, तिचा चेंडू, ती बाग आणि ते निळे घर कल्पनाचक्षुंनी पाहू लागले. काळासोबत घर, बाग, चेंडू, लॉरिन हे सर्व अदृश्य होऊन त्यांच्या काळजात विलीन झाले. यानंतर खूप काळ तिकडे जाणे त्यांना जमले नाही.<span><a name='more'></a></span></span></div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><br /> तब्बल दहा वर्षांनी एकेदिवशी मार्सेलीहून परतीचा प्रवास करत असताना त्यांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. ते संध्याकाळी निघाले. पहाटेच ट्रेन ब्लेझी-बा स्टेशनला पोहोचली. निळे घर अगदी तसेच होते मात्र रंग अजूनच फिका वाटत होता. घराकडे कुणाचेच लक्ष नसल्यासारखे वाटले. पण त्या बागेत एक अतिशय सुंदर तरुणी बसली होती, जिचे मखमली केस गुलाबी रिबनने बांधलेले होते. ही लॉरिनच असावी असा त्यांनी कयास बांधला. लॉरिनच्या शेजारी बसलेला तरुण अगदी एकरूप झाल्यागत तिच्याकडे पाहत होता. प्रसन्न साधं हास्य आणि निखळ शांतता त्या दोघांच्या सहवासात नांदत होती. <br /> <br /> त्या तरुण-हृदयी भेटीच्या दृश्याने इमॅन्यूएलच्या काकांचे मन आनंदाने भरून आले. ट्रेनची शिटी वाजताच घाईने खिडकीबाहेर डोकावत नमस्कार करत ते ओरडले, "हॅलो मिस लॉरिन!...'गुड बाय'..."<br /> त्या सरशी त्या दोघांनी त्यांच्याकडे चकित होऊन पाहिलं नि मग दोघंही एकमेकांवर रेलल्यागत हसून नमस्ते म्हणत रुमाल हलवून अभिवादन केलं. एरेनना त्याचा आनंद झाला. <br /> <br /> याला बरीच वर्षे उलटली. मार्सेल लाईनवर त्यांचं अनेकदा येणंजाणं होऊनही कामाच्या रगाड्यापायी ज्या ट्रेन्सनी प्रवास व्हायचा त्या ट्रेन्स ब्लेझी-बा स्टेशनवर थांबत नव्हत्या. मात्र एकदा संध्याकाळच्या ट्रेनने तिथे जाण्याची संधी मिळालीच. आपण लॉरिनला तिच्या प्रियकराच्या शेजारी कधी पाहिले होते हे आता त्यांना नक्की आठवत नव्हते. या खेपेस ट्रेन जेव्हा तिथे थांबली तेंव्हा त्या निळ्या घराच्या बागेत एका महाकाय कुत्र्याशी खेळणारा किशोरवयीन मुलगा त्यांना दिसला. लॉरिन कुठे दिसत नव्हती. ते खूप निराश झाले. तितक्यात तो मुलगा ओरडू लागला, "मॉम !.. मॉम..ट्रेन आली.. ट्रेन..."<br /> लगोलग घरातून एक प्रौढा बाहेर आली. ही लॉरिनच असावी जी आता थोडी लठ्ठ, सावळीशी दिसत होती. पाहताच त्यांनी तिला ओळखलेलं. आपली टोपी वर उचलून त्यांनी आदराने नमन केले. उत्तरादाखल तिनेही आश्चर्यचकित मुद्रेने अभिवादन केले. आपल्या येण्याची खुण लक्षात राहावी म्हणून त्यांनी एक संत्री उचलून मुलाच्या दिशेने बागेत फेकली. ती गवतावरून घरंगळत गेली. मुलगा आणि कुत्रा त्यामागे धावले.<br /> <br /> यानंतर एरेनच्या काकांच्या आयुष्यात अशा काही विचित्र घटना घडल्या की ज्या आता दुःस्वप्नागत वाटत होत्या. एका कामासाठी तुर्कीहून परतताना त्यांचे जहाज समुद्रात बुडाले. त्या प्रलयभयात देखील ब्लेझी-बा स्टेशनच्या बाजूचे ते निळे घर त्यांना आठवले ! जहाज बुडाल्यावर मृत्यूच्या दारात उभं असताना त्यांच्या मनात अत्यंत काळजी दाटून आली होती. खरेतर जगभ्रमंतीची मजा टाळून थोडं समाधानी होण्यासाठी लॉरिनसारखं शांततेत जगलं पाहिजे हे त्यांना उमगलं होतं मात्र तशा निळ्या घरात राहण्याची शक्यता त्यांच्यासाठी दुरापास्त झाली होती. प्रलयाच्या घटनेत सुदैवाने ते वाचले. दोनेक आठवड्यांनी ते फ्रान्सला घरी परतले. त्यानंतर मार्सेलीहून पॅरिस शहरासाठी ट्रेनमध्ये चढले तेंव्हा तो त्यांचा शेवटचा रेल्वे प्रवास होता. म्हातारपणी इतक्या त्रासानंतर अजून प्रवास करायची त्यांची इच्छा नव्हती.<br /> सकाळी ट्रेन त्या ब्लेझी-बा स्टेशनवर पोहोचली. त्यांचे हृदय आनंदाने भरून आले. आता ट्रेन थांबेल नि मग पुन्हा धावेल, दरम्यान केवळ क्षणभराची संधी असेल. कदाचित ही लॉरिनची शेवटची भेट असेल हे त्यांना ठाऊक होतं.<br /> डब्यातून डोकावून पाहताच स्टेशनला लागून असलेले, सूर्यप्रकाशाने उजळून निघालेले निळे घर दिसले. ते पाहताच आठवलं की ती अजूनही याच घरात असावी, बहुधा तशीच शांत आणि काहीशी उदासीन ! तिला त्यांचे जहाज बुडाल्याची माहिती असायचे काही कारण नव्हते. काका विचारमग्न असतानाच त्या घरासमोर ट्रेन थांबली. घराच्या पूर्वेला व्हरांड्यात एक वृद्धा बसली होती. रेखीव भांगामुळे माथ्यावरचे चंदेरी केस दोन भागात विभागले होते. घरातली लहान मुलं तिच्याभोवती कल्ला करत होती.<br /> <br /> ही लॉरिनच होती यात शंका नसावी. वृद्धावस्थेत तिला कोणीही ओळखू शकलं नसतं पण त्यांनी निमिषार्धात तिला ओळखले ! आधी तिच्या मुलाचे चेंडू खेळणे, मग तारुण्यातील तिचे प्रेमळ आयुष्य; मग पत्नी नि आईच्या रुपात आणि आज ती आजी होती. नातवंडांनी वेढलेली आजी ! प्रत्येक वेळी तिची वेगवेगळी रूपे होती !<br /> <br /> या खेपेस तिला पाहताच त्यांच्या कारुण्याने भरलेल्या हृदयात तिच्याशी जवळीक साधण्याची उर्मी पुन्हा दाटून आली. ते या मार्गाने पुन्हा कधीही येणार नव्हते. या जन्मातली ती त्यांची अंतिम भेट असल्याने तिच्याशी थोड्याशा तरी संवाद व्हावा याची ओढ लागली होती. तिच्याशी बोलूनच चाळीस वर्षांपासूनच्या अबोल ओळखीचा शेवट करावा असं वाटत होतं. अखेर याकामी नियतीनेच त्यांना मदत केली, नेमके रेल्वेचे इंजिन बिघडले. दुरुस्तीस तासाचा अवधी होता तोवर स्टेशनवरच थांबणे क्रमप्राप्त होते. वृद्धत्व आले असले तरी गैर काही करत नसल्याने संधीचा फायदा घेत खेचल्यागत ते त्या निळ्या घराच्या गेटकडे निघाले. त्यावेळी त्यांचे पाय थरथरत होते. आजवर कुणाच्या भेटीचा त्यांना इतका मोह कधीच पडला नव्हता. एका विराट जलप्रलयाशी सामना करून जगलेले असल्याने भित्रं असण्याचा सवालच नव्हता. गेटपाशी जाताच त्यांनी बेल वाजवली. आतून आलेल्या नोकराने दार उघडताच ते त्याला म्हणाले की, ‘त्या पोर्चजवळ बसलेल्या मालकिणीशी बोलायचे आहे. ‘ <br /><br />नोकराने त्यांना प्रतीक्षारत थांबवून ठेवले आणि तो मालकिणीला बोलवायला गेला. काही क्षणांतच ती आली.<br /> <br /> इतक्या दिवसांनंतर अखेरीस लॉरिन त्यांच्यासमोर उभी होती. पण तिच्याशी बोलण्यासाठी त्यांना एकही मुद्दा सापडला नाही. ते जणू मुग्धच झाले होते. न राहवून मग तिनेच त्यांना विचारले, "तुमच्या भेटीचा योग कसा जुळून आलाय ? याचे प्रयोजन काय आहे ? की हे एक सौभाग्यच समजावे ?” <br /> या प्रश्नावर ते घाबरून उत्तरले, " हे काय ? तू मला ओळखू शकली नाहीस?"<br /> "नाही !" – तिचे उत्तर. <br /> "अरेच्चा ! मी... मी तर तुम्हाला चांगलंच ओळखतो !... आठवून पहा बरं !... खूप काळ उलटलाय तेव्हापासून मी तुम्हाला ओळखतो. मी तुम्हाला या घराच्या बागेत चेंडूशी खेळताना पाहिलंय... तुम्हाला आठवतेय का पहा मागे एकदा ज्याने तुम्हाला रेल्वेच्या खिडकीतून नमस्कार केला होता तो मीच आहे. तेव्हा तुमचे लग्न झालेले नव्हते आणि नंतर खूप दिवसांनी एका लहानग्याच्या दिशेने संत्री फेकणारा माणूसही मीच आहे." एरेनकाका म्हणाले. <br /> <br /> त्या खुलाशनंतर ती स्त्री त्यांच्याकडे घाबरलेल्या नजरेने पाहतच राहिली; भीतीने ती दोन पावले मागे सरकली; कदाचित तिला ते वेजे वा नशेडी वाटले असावेत. पण मग त्यांचे म्लान म्हातार्याचे रूप पाहून तिला धीर आला असावा आणि ती अगदी मृदू स्वरात म्हणाली, “तुम्ही चुकलात साहेब ! आम्ही या निळ्या घरात राहून फक्त एक वर्ष झालो आहोत."<br /> थक्क होण्याची वेळ आता काकांची होती. स्तब्ध होऊन त्यांनी विचारले, "मग काय तुम्ही लॉरिन नाहीत ?"<br /> "लॉरिन !.. तुम्ही काय बोलत आहात मला काहीच समजत नाहीये. आमच्या घरात या नावाचे कोणी नाहीये !"<br /> <br /> त्या वृद्ध स्त्रीच्या उद्गाराने त्यांच्या आजूबाजूला भासमय वातावरण पसरल्यासारखे वाटले. ते पुन्हा बोलते झाले, "माफ करा, मला एका प्रश्नाचे उत्तर द्या. तुम्ही येण्यापूर्वी या घरात कोण राहत होते?"<br /> "आमच्या आधी ? एक वृद्ध गृहस्थ. ते ब्रम्हचारी होते. दहा वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले.” वृद्ध स्त्रीने उत्तर दिले. <br /><br />तरीही ते सवाल करत तिथेच उभे राहिल्यावर वृद्धेने संतापाने पाहत त्यांना गेटबाहेर काढले आणि गेट बंद केले. मिस्टर एरेन अगदी वेड्यात निघाल्यागत 'ब्लेझी-बा'च्या रस्त्यावर पावलं टाकत माघारी निघाले. अचानक झालेल्या या धक्क्याने त्यांचे मन दुःखभारीत झाले. हाती थोडासा वेळ शिल्लक असल्याने त्यांनी निर्धार केला की शोधाशोध करून खरे काय ते शोधून काढले पाहिजे. त्या स्त्रीने दिलेल्या माहितीमध्ये काहीतरी मोठी तफावत असावी, ती शोधून काढली पाहिजे असे त्यांना राहून राहून वाटू लागले. <br /> <br /> परत येऊन त्यांनी स्टेशन मास्तरांना लॉरिनविषयी विचारलं तर त्या सदगृहस्थांना काहीच माहीत नव्हते. या स्टेशनवर तो नवखा होता. पण त्याने सांगितले की या गावातील सर्वात वृद्ध माणूस स्टेशनजवळील निळ्या घरासमोर राहतो, त्याच्याकडे थोडीफार माहिती मिळू शकते. <br /> मिस्टर एरेन त्याच्याकडे थडकले. त्यानी त्यास प्रश्न विचारले. वृद्धाने स्मरणशक्तीस ताण देऊन काही आठवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला "लॉरिन ? ओहो, लॉरिन ? नाही सर, मला आठवत नाही."<br /> “पण पंधरा-सोळा वर्षांपूर्वी मी त्या बागेत एक स्त्री पाहिली होती, काहीशी लठ्ठ आणि काहीशी सावळी. तिच्यासोबत एक लहान मूल आणि एक मोठा कुत्रा होता, मग ती कोण होती ?" एरेन यांनी सवाल केला. <br /> "भारीच ! मोठा कुत्रा...? एक मोठा कुत्रा ? अहो त्या तर एका फौजदाराच्या पत्नी, मिसेस झिलमे होत्या, त्यांचे नाव लॉरिन नव्हते. मला चांगलं माहीत आहे. मी त्याच्याच घरात राहायचो. आणि त्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव फ्रान्सिस होते."<br /> ते ऐकून एरेन पुरते गोठल्यागत झाले.<br /> "बरं साहेब, नीट आठवतंय का पहा बरं... त्याही आधी, साधारण बारा वर्षांपूर्वी तिथे एक तरुण स्त्री राहत होती, खूप गोरी होती ती. तिचे लांबसडक केस गुलाबी रिबनने बांधलेले असायचे आणि एक छोटया अंगचणीचा गव्हाळ तरुणही तिथे असायचा. कदाचित त्यांच्यात काही नाते असावे अशी त्यांच्यात लगट होती, तो तरूण या निळ्या घरात राहत नव्हता का ?"<br /> या प्रश्नावर म्हातारा विचार करत राहिला. मौन राहिला. पुन्हा बराच वेळ विचार करत राहिला. शेवटी काहीच आठवेना झाले तेंव्हा त्याने त्याच्या म्हातारीला बोलावलं. ती वृद्धा बारीक अंगकाठीची होती, तिचे डोळे तेजस्वी पाणीदार होते. तिच्या प्रफुल्लित चेहऱ्यावरून अंदाज येत होता की तिच्यापाशी तीक्ष्ण स्मरणशक्ती होती. वृद्धाने एरेननी उपस्थित केलेले सर्व मुद्दे तिला कथन केले. <br /><br />ते ऐकताच वृद्धा उस्फुर्तपणे उद्गारली, "अरेच्चा ! ती मिस स्टेफनी होती. कॉन्ट्रॅक्टर सरांची मुलगी. तिचे लग्न झाले होते. अहाहा, बिचारी ! त्यांचे लग्न सुखाचे नव्हते. ते एकमेकांपासून विभक्त झालेत. अहा ! आता त्या मुलीचे नाव काय आहे ते आठवून पाहते... सोम्बरॉन गावी ती आता तिच्या वडिलांच्या घरी राहते. अरेरे ती गरीब आता खूप दुःखी आहे."<br /> लॉरिनचा सारा शोध दुःखद रीतीने संपुष्टात येऊ लागल्याने काहीसे उदास होऊन मिस्टर एरेननी तिथून निघण्यासाठी नमस्ते म्हटलं. एव्हाना त्यांच्याकडे आता फारसा वेळही शिल्लक नव्हता ; ट्रेन थोड्या वेळात निघालीच असती.<br /> नकळत एरेन बोलून गेले, "लॉरिन ! लॉरिन ! हा माझा भ्रम नाही. मी तिला इतक्या लहान वयात पाहिलं, तिचं नाव ऐकलं. आजही ती वसंताच्या फुलपाखरासारखी नाचताना आणि उडी मारताना माझ्या डोळ्यासमोर दिसते" <br /><br /> ते ऐकताच निमिषार्धात काहीशा उत्साहाने ती वृद्धा उत्तरली, "उफ्फ ! तुम्ही हे आधीच सांगितले असतेत तर बरे झाले असते... तुम्ही आधी एका मध्यमवयीन बाईबद्दल विचारले, मग एका तरुण मुलीबद्दल विचारले... आता तुम्ही एका लहान मुलीबद्दल विचारताय.. .. होय, हो, मला ते चांगलं आठवतंय.. लॉरिन!... ..तुम्ही त्या सुंदर मुलीबद्दल विचारताय?...ती डॉक्टरची मुलगी होती, आमची नातेवाईक ! अहाहा, ती गरीब मुलगी अकस्मात मरण पावली हो ! वय दहा फक्त !" <br /><br />तिच्या माहितीने एरेन दिग्मूढ झाले. गोठून गेले... <br /> <br /> एरेननी लॉरिनला तिच्या वयाच्या दहाव्या वर्षी पाहिल्यानंतर काही आठवड्यांनंतरच तिचा मृत्यू झाला होता आणि एरेन ? गत चाळीस वर्षांपासून ते पुन्हा पुन्हा तिच्या मागे मागे येत होते ! हे विस्मयकारक आणि काळीज उसवणारं वास्तव होतं !<br /><br />(इमॅन्यूएल एरेन यांच्या ब्ल्यू हाऊस या फ्रेंच कथेचा स्वैर मराठी अनुवाद)</span><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"> <br />*******************************************************<br /><br /></span><span style="font-family: Eczar; font-size: xx-large;">इमॅन्यूएल</span><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"> एरेन (</span><h3 class="LC20lb MBeuO DKV0Md" style="display: inline-block; font-size: 20px; font-weight: 400; line-height: 1.3; margin: 0px 0px 3px; padding: 5px 0px 0px;">Emmanuel Arène_</h3> <span style="font-family: Eczar; font-size: xx-large;">१ जानेवारी १८५६ - १४ ऑगस्ट १९०८) हे फ्रेंच पत्रकार, नाटककार, कथाकार आणि गणतंत्राचे चिकित्सक होते. अनेक वर्षे ते कोर्सिकाचे उपसांसद होते आणि अंतिम काळात ते कोर्सिकाचे सिनेटर होते. समुद्र विषयक नियम आणि पनामा कालव्याच्या उभारणीतील आर्थिक घोटाळयांच्या अभ्यास समितीतही सामील होते. कारकिर्दीच्या अखेरीस त्यांनी कोर्सिकन राजनीतीमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता. ते जितके सफल पत्रकार होते तितकेच उत्कृष्ठ लेखक होते, त्यांनी लघुकथांसह नाटके देखील लिहिली होती.</span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><br />- समीर गायकवाड </span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><br /></span></div><div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><img border="0" data-original-height="666" data-original-width="1280" height="334" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi44hoouEgtkxsZiVkjAb4aC3mAlAmKnaYjpfeGJj-5nkVW_C9NY5ymS4giq9kuJKcBBCv70HvPUi05-rdfFDOVl9YHQrMSsd5vAn-e5TtYWEnoScaf12q7Fx8onqZN4Xmaloc36npw__pc6ndXQO8GC9K4hapVMsoqiK56-Ua_rXmJTGgRNAwZAkgi/w640-h334/maxresdefault%20(1).jpg" width="640" /></div></div>sameer gaikwadhttp://www.blogger.com/profile/05106372658264914305noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1120566833830274839.post-31703727972856357592022-11-21T17:44:00.000+05:302022-11-21T17:44:16.588+05:30बॉलिवूडमधल्या देशप्रेमाची ऐंशी वर्षे! <div><div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj0QlQzni6VC96G3fYi-y_or_WjJDpaefQolXWlzx6POHfsXV2oef3Yqsa0eZOg_aux_lJEwE2oYEwRPzpGhKd8n70H3hgB6Kv7hB9jCg-0LKruwbP95X7GaXY9v8--bRZyVIWlAq_zFObwH8J7ajv0JU1Dq_63PC7ZsQrtuX_H5_Q7w4jtPfWfmBgZ/s1879/9971beb2-7085-4f2b-b45d-581d7ab683a4.jpeg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1280" data-original-width="1879" height="436" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj0QlQzni6VC96G3fYi-y_or_WjJDpaefQolXWlzx6POHfsXV2oef3Yqsa0eZOg_aux_lJEwE2oYEwRPzpGhKd8n70H3hgB6Kv7hB9jCg-0LKruwbP95X7GaXY9v8--bRZyVIWlAq_zFObwH8J7ajv0JU1Dq_63PC7ZsQrtuX_H5_Q7w4jtPfWfmBgZ/w640-h436/9971beb2-7085-4f2b-b45d-581d7ab683a4.jpeg" width="640" /></a></div><div><br /></div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;">मागील दोन वर्षांपासून आपल्या देशात काही मोहिमा राजकीय, सामाजिक आणि धार्मिक ध्रुवीकरणासाठी राबवल्या गेल्यात. त्यात छुपे अजेंडे आहेत आणि आर्थिक स्वार्थाचे गणितही आहे, वर्चस्वाच्या साठमारीतून अशा कैक मोहिमा राबवल्या गेल्यात. या मोहिमांसाठी सोशल मीडिआचा वापर शस्त्रासारखा केला गेलाय. त्यात आयटीसेलचं चाळीस पैशांवर राबणारं भाडोत्री पब्लिक मोठ्या संख्यने कामी आलंय. द्वेष, तिरस्कार पसरवणं आणि त्याआडून वर्चस्वाची खेळी खेळत सामान्यांना हिंसेच्या आगडोंबात ढकलून देणं हे यामागचं प्रयॊजन होतं नि आहे. या मोहिमांपैकीच एक मोहीम होती - '#बॉयकॉट बॉलिवूड!'<span><a name='more'></a></span><br /><br /># बॉयकॉट बॉलिवूड ही मोहीम सुशांतसिंग राजपूत या उमद्या अभिनेत्याच्या अकाली मृत्यूनंतर पद्धतशीरपणे राबवली गेली. लोकांच्या मनात आधी संशय निर्माण करायचा, कुजबुज मोहिमेतून कॉन्स्पिरेसी निर्माण करायची, बेफाम खोटेनाटे आरोप करायचे आणि चारित्र्यहनन करायचे अशी क्रोनॉलॉजी होती. अख्खं बॉलिवूड वेठीस धरून ही मोहीम राबवली गेली तेंव्हा इंडस्ट्री कोरोनामुळे पुरती गलितगात्र झाली होती. यानंतरचा टप्पा म्हणजे अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्जच्या खोट्या केसेसमध्ये गोवण्याचा प्रयत्न! बॉलिवूड कसे व्यसनी, चरसी आहे आणि इथे सारा काळा पैसा वाहतो अशी हॅशटॅग लाईन होती. साऱ्या इंडस्ट्रीला यात गोवले होते. जे आपल्या बाजूने येतात त्यांच्या सिनेमांना अभय द्यायचं आणि जे विरोधाचा सूर लावतात वा तटस्थ राहतात त्यांचे सिनेमे बॉयकॉट करायचे, सोशल मीडिआवर त्यांना ट्रोल करायचं हा एककलमी कार्यक्रम हे लोक राबवत होते. याचा परिणाम असा झाला की अनेक चांगले सिनेमे पडले, कोट्यवधींचे नुकसान झाले! हे नुकसान कधीतरी भरून येईल मात्र बॉलिवूडची प्रतिमा ज्या पद्धतीने डागाळली गेलीय ती सावरण्यास मोठा काळ लागू शकतो! <br /><br />बॉयकॉट बॉलिवूड ही मोहीमच मुळात इथली इंडस्ट्री हलवून योगींच्या युपीमध्ये नेण्यासाठीच्या उद्देशाने आखली गेली <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgrfMqQs_QrNglZ-Me70Y36UKRLsAGFzqKqOqPt4NWWzmOThvqN_xuX17DrXZVb7qysSIeg_Hc7ZkNrlgg3pbUo8c4MAVW1yPqYTuwSlHSKblcmMOj7VFb3dRAFDP7Y3Xrr1hpa0D4BuIwXSgVKfEc8ss0Zf_tn477Jh0PTIB-jYYa1XPb_fIulXr-j/s1280/e1405933-9ee7-43b1-a2cb-b5ee8c862e19.jpeg" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" data-original-height="1280" data-original-width="954" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgrfMqQs_QrNglZ-Me70Y36UKRLsAGFzqKqOqPt4NWWzmOThvqN_xuX17DrXZVb7qysSIeg_Hc7ZkNrlgg3pbUo8c4MAVW1yPqYTuwSlHSKblcmMOj7VFb3dRAFDP7Y3Xrr1hpa0D4BuIwXSgVKfEc8ss0Zf_tn477Jh0PTIB-jYYa1XPb_fIulXr-j/w478-h640/e1405933-9ee7-43b1-a2cb-b5ee8c862e19.jpeg" width="478" /></a></div> होती, मात्र बॉलिवूडने त्याला भीक घातली नाही तेंव्हा साध्य बदलले गेले. त्या काळात सत्तेत असलेले उद्धव ठाकरेंचे लोकप्रिय सरकार कोसळवणे आणि त्यासाठी बेताल आरोप करायचे, खोट्या माहितीचा डोंगर उभा करायचा हे धंदे सुरु झाले. याचा फटका महाविकास आघाडीला बसला नसला तरी प्रतिमाभंजनास सहायक ठरला. केंद्रातील सरकारच्या विचारधारेचे प्रसारक बनून ज्यांनी आपल्या गळ्यात पट्टा बांधून घेतला ते यातून यशस्वी रित्या सुटले, काहींनी मौन बाळगले तर काहींनी विरोधाचा आवाज बुलंद केला. बॉयकॉट गॅंग अजूनही कार्यरत आहे आणि ती रोज नित्यनवे मनगढंत आरोप लावत असते. त्यांचे आरोप तद्दन तकलादू आणि खोटे असतात हे वेगळं सांगायला नको. या बॉयकॉट बॉलिवूड मोहिमेचे मुद्दे खोडून काढून इंडस्ट्रीचे अस्सल स्वरूप समोर मांडताना त्यात दडलेल्या भारतीय जनमानसाच्या आत्म्याचा शोध घेणं हे या '#लव्ह बॉलिवूड' सदराचे प्रयोजन होय! बॉलिवूडने आपल्याला काय दिलं आणि त्यांची नाळ आपल्याशी कशी जुळलेली आहे याचा धांडोळा वर्षभरात घेऊया. <br /> <br />बॉयकॉट गॅंगचा नेहमीचा आरोप असतो की हिंदी चित्रपटसृष्टी देशद्रोही आहे, इथे देशप्रेमाचे सिनेमे बनलेच <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh3RxszbjCoaZyZPRvus8TxyrRrgzDPwJFpNotAgJtuJNUW-DdO-4UdyEV8GvzQzJb9CrXjW6s4RCuREo6Eal9obE5AiiwwbUpVFfiVKoqROiO4JHOPO7iBbpzhD_KudJ94MBZMDdDMhAAHIiMTjXCKh1-91UjvWjuGd9bqBUUbaJ5Vx3y7Na5bNRIv/s1280/917ca894-2a72-4612-adc7-7ef0e2f336fb.jpeg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" data-original-height="1280" data-original-width="954" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh3RxszbjCoaZyZPRvus8TxyrRrgzDPwJFpNotAgJtuJNUW-DdO-4UdyEV8GvzQzJb9CrXjW6s4RCuREo6Eal9obE5AiiwwbUpVFfiVKoqROiO4JHOPO7iBbpzhD_KudJ94MBZMDdDMhAAHIiMTjXCKh1-91UjvWjuGd9bqBUUbaJ5Vx3y7Na5bNRIv/w478-h640/917ca894-2a72-4612-adc7-7ef0e2f336fb.jpeg" width="478" /></a></div> नाहीत. देशभक्तीचे जे काही सिनेमे आले ते २०१४ नंतर भगत मंडळींच्या लाडक्या अक्षयकुमार, देवगण कंपनीचे आले असा बालिश दावा ते करतात. त्याचीच पोलखोल करण्याचा प्रयत्न आजच्या लेखात केलाय. मागील सात दशकांत अनेक अविस्मरणीय हिंदी चित्रपटांनी देशभक्ती, शौर्य आणि देशासाठी त्यागाची भावना लोकांमध्ये रुजवली आहे. या जॉनरमधील चित्रपटांचा आशय स्वातंत्र्य लढा, आक्रमण आणि युद्ध, खेळ, प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास, बंड असा व्यापक राहिलाय. मुळात हे सिनेमे बनवतानाच प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयी आपलं भारतीयत्व आणि देशाप्रतीची कर्तव्याची भावना असणं उद्दिष्ट होतं. सद्यकाळात जे धार्मिक विखार निर्माण करणारे कथित देशभक्तीचे सिनेमे बनवले जाताहेत त्यांच्या तुलनेत हे सिनेमे आशय, मांडणी आणि भाष्य या तिन्ही आघाड्यांवर उठावदार होते. बॉलिवूडमध्ये देशभक्तीपर चित्रपट अगदी गत शतकापासून निर्मिले गेलेत हे अंधभक्तांना कादाचित ठाऊक देखील नसेल; काही गायगुंडांना हे ज्ञात असले तरी ते त्याची ओळख दाखवणार नाहीत. कारण सत्य पचवायची ताकद अशा लोकांत नसतेच!</span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><br />देशातील स्वातंत्र्य चळवळ जोमात असतानाच्या काळात भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रारंभ झाला. इंग्रजांना भीती वाटत होती की एकोणिसाव्या शतकातील नाट्य चळवळी प्रमाणेच चित्रपटांतूनही देशभक्तीची भावना सांगितली जाईल की काय! त्या काळातील भारलेले वातावरण पाहता ती शंका रास्तच होती. याच आशंकेने 1876 मध्ये लॉर्ड नॉर्थब्रुक प्रशासनाने रंगमंचावरून देशद्रोहाची दृश्ये काढून टाकण्यासाठी ड्रामा परफॉर्मन्स कायदा लागू केला होता. तसेच ब्रिटिश राजवटीच्या अधिपत्याखाली काम करणारे सेन्सॉर कार्यालय आणि पोलिसांच्या माध्यमातून चित्रपटांवर बारीक नजर ठेवली जात असे. 1943 मध्ये रामचंद्र नारायण द्विवेदी उर्फ कवी प्रदीप यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. बॉम्बे टॉकीजचा बिग शॉट मुव्ही 'किस्मत'मध्ये भारत छोडो आंदोलनाच्या समर्थनार्थ अप्रत्यक्षपणे राजवटीच्या विरोधात त्यांनी लिहिलेल्या गाण्यासाठी हे वॉरंट जारी करण्यात आले होते. <br />'आज हिमालय की चोटी से फिर हम ने ललकरा है<br />दूर हटो ऐ दुनिया वालों हिन्दुस्तान हमारा है.." हे त्या गीताचे बोल होते. <br /><br />या गीताच्या पुढच्या पंक्ती अगदीच दाहक होत्या - "शुरू हुआ है जंग तुम्हारा जाग उठो हिन्दुस्तानी, तुम न किसी के आगे झुकना जर्मन हो या जापानी, आज सभी के लिये हमारा यही क़ौमी नारा है.." वास्तवात 1939 ते 1945 च्या काळात दुसऱ्या महायुद्धात भारत मित्र राष्ट्रांच्या बाजूने होता. प्रत्यक्षात जर्मनी आणि जपानचा शत्रू होता. 1942 मध्ये सिंगापूर आणि ब्रह्मदेशाच्या राजवटी डळमळीत झाल्यानंतर भारतातील जपानी आक्रमणाची चिंता खरी वाटू लागली. पण इंग्रजांना चतुराईने ताडले की या गीतामधील 'जंग' म्हणजे भारतीयांचा स्वातंत्र्यलढा आहे आणि गाण्यातला विदेशी हा उल्लेख ब्रिटिशांसाठी आहे. पोलिस आपल्या मागावर आहेत हे कळताच कवी प्रदीप भूमिगत झाले होते. 15 ऑगस्ट 1947 रोजीच्या स्वातंत्र्याच्या घोषणेने असे अडथळे दूर झाले. ब्रिटिशांची राजवट हटली तरीही राष्ट्रवादाच्या विषयावर चित्रपटनिर्मिती जारी राहिली. 1948 साली रिलीज झालेला 'शहीद' हा चित्रपट वजाहत मिर्झा यांनी लिहिला होता. रमेश सहगल यांचे दिग्दर्शन होते. या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला होता. यातले 'वतन की राह में वतन के नौजवान शहीद हो' हे गाणे कमर जलालाबादी यांनी लिहिले होते. 1950 चा सर्वात यशस्वी चित्रपट म्हणजे 'समाधी'. 'समाधी'चे दिग्दर्शनही रमेश सहगल यांनीच केले होते. हा चित्रपट नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेशी संबंधित एका सत्य घटनेवर आधारित असल्याचे सांगितले जाते. त्याच वर्षी आझाद हिंद फौजेवरचा आणखी एक चित्रपट आला. हा चित्रपट 'फर्स्ट मॅन' होता, दिग्गज दिग्दर्शक विमल रॉय यांनी तो दिग्दर्शित केला होता.<br /><br />1952 मध्ये बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या कादंबरीवर आधारित 'आनंद मठ' हा चित्रपट आला. हेमेन गुप्ता यांचे दिग्दर्शन होते. स्वातंत्र्यसैनिक असणाऱ्या हेमेन गुप्तांनी अनेक वर्षे तुरुंगात घालवली होती. ब्रिटिश जाताच ते फाशीच्या शिक्षेतून वाचले होते. पुढे ते चित्रपट निर्मितीकडे वळले. त्या सालच्या हिट सिनेमांत 'आनंद मठ'ला पहिल्या दहा चित्रपटांमध्ये स्थान मिळाले नव्हते. 'आन', 'बैजू बावरा', 'जाल' आणि 'दाग' हे त्या वर्षीचे यशस्वी चित्रपट होते ज्यात संगीत, रोमान्स, सस्पेन्स आणि सामाजिक नाट्य ठासून भरलेले होते. 1940 आणि 1950 च्या दशकात सामाजिक, रोमँटिक, संगीतमय, पौराणिक चित्रपट बनले असले तरी देशभक्तीपर आणि राष्ट्रवादावरचे चित्रपट देखील मोठ्या संख्येत निर्मिले गेले. हीच परंपरा स्वातंत्र्योत्तर काळात पुढे नेताना 1953 मध्ये सोहराब मोदींनी 'झांसी की रानी' हा चित्रपट बनवला पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट यशस्वी झाला नाही. त्या वर्षी नंदलाल जसवंतलाल यांचा 'अनारकली' हा चित्रपट टॉपवर होता. त्याचप्रमाणे बंकिमचंद्र चटर्जी यांच्या ऐतिहासिक कादंबरीवर आधारित 1956 साली आलेला 'दुर्गेश नंदिनी' हा चित्रपटही अयशस्वी ठरला. याचा अर्थ स्वातंत्र्य मिळताच भारतीय प्रेक्षक राष्ट्रवादी भावनेपासून दूर गेले होते असे होत नाही. याचा अर्थ असा होता की फक्त राजकीय स्वातंत्र्य हेच भारतासमोरील एकमेव आव्हान नव्हते, आणखी अनेक संकटे, आव्हाने आपल्यापुढे तोंड वासून उभी होती! त्यांना बॉलिवूडने काळजात स्थान दिले तर त्यात नवल ते काय! तत्पूर्वी 1946 मध्ये चेतन आनंदच्या 'नीचा नगर' या चित्रपटात श्रीमंत लोक गावात राहणाऱ्या गरीबांचे कसे शोषण करतात हे दाखवण्यात आले होते. या चित्रपटाने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये धडक मारली होती.<br /><br />ख्वाजा अहमद अब्बास यांनी यांनी दिग्दर्शित केलेला 'राही' हा चित्रपट 1953 साली प्रदर्शित झाला होता. आसाममधील चहाच्या बागांमध्ये इंग्रज मालकांकडून मजुरांचे होणारे शोषण या चित्रपटात दाखवण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर चित्रपटांना स्वतःचा आयाम मिळाला, चैतन्य लाभलं! 1940 आणि 1950 च्या दशकात लोकांची पसंती एकसारखी दिसून आली असली तरी भारतीय प्रजासत्ताकाच्या स्वतःच्या समस्या होत्या आणि लोकांचे लक्ष त्याकडे होते. पन्नासच्या दशकातील सर्वात यशस्वी चित्रपट म्हणून मेहबूब खानच्या 'मदर इंडिया'चे नाव घ्यावे लागेल. यात गावातील गरीब महिला राधा (नर्गिस अभिनीत) हिचा दोन मुलांना वाढवण्यासाठीचा आणि धूर्त सावकाराच्या विरोधातल्या संघर्षाचा विषय होता. 1955 चा सर्वात यशस्वी चित्रपट होता राज कपूरचा 'श्री 420'. गरीबांचे रक्त शोषणाऱ्या पॉन्झी योजनांची दुर्दशा या चित्रपटात दाखवण्यात आली होती. 1959 मध्ये हृषीकेश मुखर्जी यांच्या 'अनाडी' या चित्रपटाचा नायक होता राज कपूर. यात शहरांमध्ये घातक विषारी औषधांचे भयानक परिणाम दाखवण्यात आले. स्वतंत्र भारतातील समस्यांना चित्रपटांमध्ये स्थान मिळाले होते हे विशेष होय. <br /><br />सिनेमाच्या वाटचालीने साठच्या दशकात स्पष्ट केले की भारताला केवळ अंतर्गत आव्हानांना सामोरे जावे लागत नसून बाह्य हल्ल्यांना देखील तोंड द्यावे लागणार आहे. त्याकरिता लष्करी दृष्टिकोनातूनही भारताला सज्ज राहावे लागेल हे सिनेमाने ताडले होते. 1960 मध्ये गोवा मुक्ती युद्ध, 1962 मध्ये चिनी आक्रमण आणि 1965 मध्ये पाकिस्तानी आक्रमणाचा सामना देशाला झाला. त्यानंतर 1971 मध्ये भारत-पाक युद्धही झाले. या युद्धांनी आपल्याला शौर्य, देशभक्ती आणि त्यागाची नव्याने जाणीव करून दिली. त्यानंतरच्या काळात पुष्कळ देशभक्तीपर चित्रपट आले. यामध्ये हकीकत (1964), हमसाया (1968), प्रेम पुजारी (1970), ललकार (1972), हिंदुस्थान की कसम (1973), विजेता (1982), अमिताभचा 'देशप्रेमी', अकारवा (1975) यांचा समावेश आहे. याच आक्रमणाची पुनरावृत्ती घडल्यानंतर पुढच्या टप्प्यात प्रहार (1991), बॉर्डर (1997) आणि LOC कारगिल (2003), टँगो चार्ली (2005), शौर्य (2008) हे चित्रपट बनले. या चित्रपटांमुळे सामान्य भारतीय जनतेच्या मनात लष्कराबद्दलचा आदर वाढला.<br /><br />या दरम्यानच्या काळावर आपला प्रभाव टाकणाऱ्या मनोज कुमार यांचा उल्लेख टाळणं कृतघ्नपणा ठरेल. साठ सत्तरच्या दशकात अभिनेता हरिकिशन गिरी गोस्वामी उर्फ मनोज कुमार यांनी चित्रपटांमध्ये सकारात्मक आणि देशभक्तीपर विचारांची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. त्यामुळे प्रेमाने त्यांना ‘भारत कुमार’ हे टोपणनाव मिळाले. शहीद (1965) या चित्रपटात त्यांनी क्रांतिकारक भगतसिंग यांची भूमिका साकारली होती. 'उपकार' (1967) सारख्या चित्रपटांनी निवृत्त लष्करी जवान काळ्या बाजारात पडण्याचे धोके आणि बनावट औषधांच्या सापळ्याचे चित्रण केले. 'पूरब आणि पश्चिम' (1970) मध्ये त्यांनी भारतीय संस्कृतीची ज्योत पश्चिमेत तेवत ठेवली. विदेशात राहूनही आपले देशप्रेमाचे निखारे धगधगते ठेवता येतात हे त्यांनी दाखवून दिलं. 1970 पर्यंत भारत हा पाश्चिमात्य देशांच्या दृष्टिकोनात मागासलेला आणि प्रतिगामी देश मानला जात होता. मनोजकुमार यांनी भारतीय संस्कृतीची पूर्व आणि पश्चिमेतील श्रेष्ठता मांडली. जागतिकीकरण आणि उदारीकरणानंतर ही परिस्थिती बदलली, ज्यामध्ये माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीने भारताला जागतिक स्तरावर वाढता दर्जा दिला. 1960 च्या दशकाच्या मध्यापासून, अमेरिका आणि ब्रिटन सारख्या पश्चिमेकडील औद्योगिक देशांमध्ये जाणाऱ्या भारतीय नागरिकांच्या संख्येत वाढ झालीय. यामुळे दूरस्थ राष्ट्रवादाच्या भावनेच्या उदयाचा मार्ग मोकळा झाला, ज्याद्वारे भारतीयांना त्यांच्या ओळखीचा अभिमान वाटू लागला. "आय लव्ह माय इंडिया" (परदेस 1997) सारख्या गाण्यांनी ही भावना कायम ठेवली.<br /><br />लगान (2001), चक दे इंडिया (2007), भाग मिल्खा भाग (2013), दंगल (2016) यांसारख्या चित्रपटांनी देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी खेळाचा वापर केला. या अनुषंगाने 29 जून 1911 रोजी कोलकाता येथे झालेल्या IFA शील्ड सामन्यात ईस्ट यॉर्कशायर रेजिमेंटवर मोहन बागानच्या विजयावर आधारित अरुण रॉय यांच्या 'इगारो' किंवा 'द इमॉर्टल इलेव्हन' (2011) या बंगाली चित्रपटाचाही संदर्भ घेणं हितावह ठरतं. ब्रिटीश संघावर भारतीय फुटबॉल क्लबचा हा पहिला विजय होता. या घटनेच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आलेला हा चित्रपट म्हणजे त्यांच्याप्रतीची श्रद्धांजली होती. स्वातंत्र्योत्तर पाच दशकानंतरही चित्रपट निर्मात्यांचे देशभक्तीबद्दलचे आकर्षण कायम राहिले. 2002 मध्ये भगतसिंग यांच्यावर तीन हिंदी चित्रपट तयार झाले यावरून हे सिद्ध होते. हे चित्रपट होते – राजकुमार संतोषी यांचा 'द लीजेंड ऑफ भगत सिंग', गुड्डू धनोवा दिग्दर्शित: 'शहीद' आणि सुकुमार नायरचा 'शहीद-ए-आझम'. या दरम्यानच 2004 मध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचा नेताजी सुभाषचंद्र बोस: द फॉरगॉटन हिरो हा चित्रपट आला होता.<br /><br />लोकांनी देशप्रेमासाठी कितीही गळे काढले तरी बॉक्स ऑफिसवरील अखंड निर्भेळ यशासाठी देशभक्ती हा एकमेव जादूई विषय ठरला नाही हे खूप बोलके ठरावे. आशुतोष गोवारीकरच्या 'खेले हम जी जान से' (2010) च्या अपयशाने हेच सिद्ध झाले. हा चित्रपट 1930-34 दरम्यानच्या चितगाव आरमोरी उठावावर आधारित होता. मागील चार वर्षातही देशभक्तीचे सिनेमे आलेत. पैकी काही सिनेमांनी छप्परफाड यश मिळवले. तर काही सिनेमांनी निर्मात्यांना डुबवलं. सिनेसृष्टीला रुपेरी पडद्यावर येण्याचे नवनवीन मार्ग राष्ट्रवाद शोधत राहतील यात शंका नसली तरी आगामी काळात निव्वळ राष्ट्रभक्तीचे सिनेमे सादर न होता त्याआडून आपले अजेंडे राबवणारे प्रचारकी सिनेमेही येत राहतील. मात्र कुणी अशी कोल्हेकुई करू नये की गतकाळात देशप्रेमाचे सिनेमे बनतच नव्हते! असं कुणी म्हणत असेल तर त्याच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी माझ्याकडून पुष्पगुच्छ आणि शुभेच्छा! पुढच्या वर्षी बॉलिवूडच्या देशप्रेमाची आठ दशके पुरी होताहेत, दोस्तांनो त्यासाठी लव्ह बॉलिवूड म्हटलंच पाहिजे!!<br /><br />- समीर गायकवाड</span><br /></div></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><br /></span></div><div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><img border="0" data-original-height="630" data-original-width="1200" height="336" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhknz9PV2qeEwbVF4arJ6y9gTPHkXfBQ4MStIqiXn8lSZnnbL2J1_CbHj3OBv9n64p9hmRHY2bF85nehk-q_QOQrD0pvMr_bXi1y_rr8UOY0dXVOqJZJveQ6Zlv0ifKsykCmvGufI_LXwoDVBdXylf7giMPZXwS2XAkVymx8M-843CnzxiP7AdDGlHF/w640-h336/Bollywood-Movies-Based-on-True-Stories-featured.jpg" width="640" /></div></div>sameer gaikwadhttp://www.blogger.com/profile/05106372658264914305noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1120566833830274839.post-60744236283661532682022-11-19T10:14:00.001+05:302022-11-19T10:14:25.847+05:30तर आपली मान झुकलेली राहील.. <div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhyEcGT5eNoD9d7T_txBWP-h5rsXpk0KaeMkejkJiGbc9Xo1kLkf6I51y_cA3NktVmTBHpeqlxsXIBMH2i5LnnjqI2jP2o1wEFKZ9-I_BiKCPAogsr_ODseHm71p9dXcTHdQZUs03utNurZXcu8eWr4jvauGDCm48g7Rm78bGnCh-E5RmOgH3GJxJgF/s696/india.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="348" data-original-width="696" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhyEcGT5eNoD9d7T_txBWP-h5rsXpk0KaeMkejkJiGbc9Xo1kLkf6I51y_cA3NktVmTBHpeqlxsXIBMH2i5LnnjqI2jP2o1wEFKZ9-I_BiKCPAogsr_ODseHm71p9dXcTHdQZUs03utNurZXcu8eWr4jvauGDCm48g7Rm78bGnCh-E5RmOgH3GJxJgF/w640-h320/india.jpg" width="640" /></a></div><br /></div><div><span style="font-family: Eczar; font-size: xx-large;"><br /></span></div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;">आपण जर शरद पवार यांचे समर्थक असू तर आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे की, आपले नेते ज्या भाजपचा कट्टर विरोध करतात त्यांच्या नेत्यांशी वेळ येताच युती कशी काय करतात?</span><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><br /></span><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;">आपण जर आशिष शेलार, फडणवीस यांचे चाहते असू तर आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे की, आपले नेते ज्या राष्ट्रवादीचा आणि शरद पवारांचा प्रचंड तिरस्कार करतात त्यांच्याशी आघाडी कशी काय करतात?</span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><br /></span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;">आपण शिंदे, ठाकरे वा गांधी नि आणखी कुणाचे जरी समर्थक असलो तरी आपल्या पक्षाने ज्यांना विरोध केलाय त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याविषयी आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत?<br />इथे मुद्दा एमसीएचा आहे त्यामुळे आपल्या चाणाक्ष नेत्यांचे उत्तर असते की आम्ही राजकारणातले विरोधक आहोत मात्र इथे खेळांत आम्ही मित्र आहोत!</span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><br />मग एक सुजाण नि परिपक्व नागरिक म्हणून आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे की खेळात राजकारण्यांचे काय काम? त्यांना त्यांतले नेमके काय ज्ञान वा अनुभव याचा सवाल पडला पाहिजे!<span><a name='more'></a></span><br /><br />मुळात आपलाच लोचा झालाय त्यातून आपण बाहेर पडायला तयार नाही. <br />आपण ज्यांचे कट्टर कडवट चाहते / समर्थक असतो त्यांना आपण कधीच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू इच्छित नाही हा आपल्यातला मोठा दोष होय. आपल्या आवडत्या पक्षाने, नेत्याने काहीही केलं तरी आपण त्यांचे सार ओढण्यात धन्यता मानलेली असते. अशा प्रकारे आपण आपल्या विवेकाला तिलांजली वाहिलेली असते. <br /><br />एक बोलके उदाहरण देतो- <br />स्त्रियांवरील बलात्काराबद्दल आपण हिरिरीने बोलत असतो. बलात्कारी नराधमांना कठोर शासन झाले पाहिजे असं आपण म्हणत असतो. मग बिल्किस बानो बलात्कार खटल्यातील आरोपींची वेळेआधी सुटका होण्याबद्दल आणि सुटकेनंतर झालेल्या विकृत सत्काराबद्दल आपल्याला क्रोध यायला हवा! <br />आला का आपल्याला राग? काहींना आला तर काहींना नाही! <br />तर काहींना राग आला तरी ते गप्प बसले कारण त्यांच्या आवडत्या राजकीय पक्षाने आणि नेत्याने यावर मौन धारण केलं!</span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><br />इथली गंमत पाहा. <br />आपल्याला स्त्रियांच्या शोषणाबद्दल राग आहे म्हणजे आपला विवेक जागृत आहे मात्र त्याच वेळी बलात्कारींच्या सत्काराविषयी आपण मौन राहतो म्हणजे आपल्यातल्या विवेकाचा आपण गळा घोटत असतो! <br />हे सर्व कुणासाठी तर आपल्या आवडत्या राजकीय पक्षाच्या आणि नेत्याच्या समर्थनासाठी!<br />मग आपल्या कथित आक्रोशाला तरी कुठे अर्थ राहतो?<br /><br />अशी उदाहरणे सर्वच राजकीय पक्षांची आढळून येतील. <br />इथे कुणीच धुतल्या तांदळासारखा नाही असं म्हणून आपण आपली सुटका करून घेऊ शकत नाही. हे माहिती असूनही यांच्या पालखीचे भोई का व्हायचे? <br /><br />मित्रांनो आपण कुठल्याही राजकीय पक्षाचे, नेत्याचे समर्थक असावं. त्याबद्दल हरकत असण्याचे कारण नाही. <br />मात्र आपल्या आवडत्या नेत्याला, पक्षाला नैतिकतेविषयीच्या चौकटीतून पाहिलं पाहिजे, त्यांच्याकडून काही चुकीचे काम झाले वा कुठलीही गैरविधाने केली तर त्याच्याशी सहमत असण्याची फरफट काय कामाची? <br />आपल्या धडावर आपलाच मेंदू असला पाहिजे. <br />एकदा का विवेक हरवत गेला की आपल्यात आणि पशूत फरक उरत नाही.<br /> <br />माणसाचं पशूत रुपांतर होण्यास फारसे कष्ट पडत नाहीत मात्र पशूचे माणसात रूपांतर होण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी लागते, आयुष्य पणाला लागते. <br /><br />जिथे सत्ता, पैसा तिथे तत्वे गुंडाळून कुणालाही मिठ्या मारण्यास राजी असणाऱ्या अप्पलपोट्या राजकारण्यांसाठी आपलं अधःपतन होत असतानाही आपण मुकाट राहत असू तर त्यांच्याइतकेच आपण दोषी असू!</span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><br />कालपर्यंत ज्यांची सावली एकमेकांना चालत नसते, ज्यांच्यावर अगणित आरोपांची राळ उडते ती माणसे देखील एका कोलांटीउडीत पावन होत असतील आणि आपल्याला त्यात गैर वाटत नसेल तर नक्कीच आपल्या नैतिकतेच्या व्याख्या पोकळ झालेल्या असतात.</span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><br />कालपर्यंत जे राजकीय पक्ष एकमेकांस शिव्यांची लाखोली वाहत असतात ते एका रात्रीत, एका पहाटेत गळ्यात गळे घालतात तेंव्हा आपल्याला त्याचा संताप यायला हवा. तो येत नसेल तर आपली तात्विक सात्विकता दांभिक झालेली असते. <br /><br />राजकारणापासून तटस्थ राहणं हे ही वाईटच.</span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><br />आपल्याला राजकीय विचार नक्कीच असले पाहिजेत मात्र त्यांना नैतिकतेची चाड असली पाहिजे.</span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><br />दरम्यान आपल्या राजकीय भूमिकेपायी आपल्या विवेकाची फरफट होत असल्याने आपण जागृत कर्तव्यदक्ष नागरिक न राहता निव्वळ राजकीय समर्थक झालो आहोत.</span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><br />आपल्याला प्रश्न पडत नाहीत, चुकीच्या गोष्टींवर आपण सवाल करत नाही आणि आपण आत्मपरीक्षण तर आपण विसरून गेलो आहोत.<br />असो.. <br /><br />आज मोठा नि महान वाटणारा राजकीय कालखंड इतिहासात रूपांतरित होईल तेंव्हा त्याचे वर्णन अवघ्या काही पानांत वा परिच्छेदात असेल.</span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><br />काळाच्या कसोटीवर आजच्या काळास तेंव्हा परखले जाईल, त्यावर सवाल केले जातील, त्याचं मूल्यमापन केलं जाईल तेंव्हा आपल्याला ताठ मानेने सांगता आलं पाहिजे की, काहीही झालं तरी मी नेहमी विवेकाच्या बाजूने उभा होतो!<br /> <br />आपल्याला असं सांगता आलं नाही तर आपली मान झुकलेली राहील आणि आपल्याविषयी कुणाला आदर आपुलकी नसेल, आपल्या सन्मुख कुणीच नसेल! <br /><br />- समीर गायकवाड</span><p></p></div></div>sameer gaikwadhttp://www.blogger.com/profile/05106372658264914305noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1120566833830274839.post-107531824905117872022-11-18T21:26:00.008+05:302022-12-22T21:15:25.703+05:30अजूनही जिवंत आहेत रोमन साम्राज्यातील राजप्रवृत्ती! <span style="font-family: Eczar; font-size: x-large;">काही माणसं अधुरी असतात, त्यांची पात्रता एक असते आणि भलतेच काम ते करत राहतात. त्यांच्या आवडत्या प्रांतात त्यांना स्पेस लाभत नाही, त्याहीपलीकडे जाऊन काहींच्या वाट्याला अधिकचे भोग येतात. त्यांच्या नावावर अशा काही विलक्षण नकोशा गॊष्टींची नोंद होते ज्यात त्यांचा महत्वाचा रोल नसतो! रोमन सम्राट टायबिरिअस हा अशांचा शिरोमणी ठरावा. पराक्रमी रोमन सम्राट ऑगस्ट्स आणि विकृत रोमन सम्राट कॅलिगुला या दोघांच्या मधला कार्यकाळ टायबिरिअसच्या वाट्याला आला.<span><a name='more'></a></span><br /><br />महान रोमन सेनापतींपैकी तो एक होता; त्याने पॅनोनिया, डॅलमॅटिया, रेसिया आणि जर्मेनियाचा काही भाग जिंकून </span><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhAM1zk4yek9lCDp2FiFG1r4cTf8vZ_sz3f5rbSLe0VKJaqL8FUwbrHL80MQ9jV2c5TXC7jdI3zGWKbc8PBN5dXFFwqLdBHYyOJYl5QxOjOwpEDMj147dzpXVDfbeecfE6PZIUUGsz_oX6vG_6qrTBvpTPZfBbQJbubJFg8-wU83_7Y4Pu9Rr3UKytg/s2250/Statue-Augustus.jpg" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><span style="clear: right; float: right; font-family: Eczar; font-size: x-large; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" data-original-height="2250" data-original-width="1500" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhAM1zk4yek9lCDp2FiFG1r4cTf8vZ_sz3f5rbSLe0VKJaqL8FUwbrHL80MQ9jV2c5TXC7jdI3zGWKbc8PBN5dXFFwqLdBHYyOJYl5QxOjOwpEDMj147dzpXVDfbeecfE6PZIUUGsz_oX6vG_6qrTBvpTPZfBbQJbubJFg8-wU83_7Y4Pu9Rr3UKytg/w426-h640/Statue-Augustus.jpg" width="426" /></span></a></div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"> उत्तर सीमेचा पाया घातला. तरीसुद्धा तो गुप्ततेकडे कल असणारा, एकांतप्रिय आणि उदास शासक म्हणून स्मरणात ठेवला गेला. वास्तवात त्याला सम्राट होण्याची खरोखर इच्छा नव्हती; प्लिनी द एल्डरने त्याला "पुरुषांमधील सर्वात हताश राज्यकर्ता" असं म्हटलेय, इतकी हताशा त्याच्या ठायी होती. विशेष बाब म्हणजे रोमन साम्राज्यातील सर्वाधिक शक्तिशाली नि प्रभावी समजल्या गेलेल्या ऑगस्ट्स याचा तो वारसदार होता.<br /><br />त्या काळात देखील सामान्य लोकांना मतदानाचा हक्क प्राप्त झाल्यापासून शासनकर्ते त्यांना आपल्या बाजूने अनुकूल करून घेण्यासाठी प्रसंगानुसार मोफत धान्य वाटण्याचे ठराव संमत करून घेत. इसवीसन पूर्व पहिल्या शतकात यासंबंधी जणू सामान्य नियमच झाले होते. त्यावेळी खुद्द रोममध्ये धान्य स्वीकारणारे सुमारे तीन लक्ष भिक्षेकरी होते. यावरून लक्षात यावे की लोकांनी आपल्या बाजूने राहावे म्हणून मोफत धान्य वाटण्याचे खूळ किती जुने आहे! असो! ऑगस्ट्सला यातील अनिष्टपणा समजत होता, पण लोकप्रियतेसाठी धान्य वाटण्याची ही पद्धत त्याने तशीच चालू ठेवली. एवढेच नव्हे तर गोरगरिबांना तो पैसेही वाटत असे. याशिवाय लोकांनी राजकारणात फारसे लक्ष घालू नये. म्हणून त्याने सार्वजनिक सामने व खेळ यांना उत्तेजन दिले. या सुमारास रोममध्ये ‘ॲक्टियन गेम्स’ नावाचे सामने दर चार वर्षांनी भरत असत. या खेळांतील द्वंद्वयुद्धात पराभव पावलेल्यांना ठार मारण्याची क्रूर प्रथा मात्र ऑगस्ट्सने बंद केली. गुलामांची स्थिती सुधारण्यासाठी त्याने काही कायदे केले परंतु प्रत्यक्षात त्यांची पुढे अंमलबजावणी झाली नाही. तत्कालीन साहित्यात एकाही लेखकाने या क्रूर चालीसंबंधी निषेध अथवा सहानुभूती व्यक्त केलेली आढळत नाही एवढी ही प्रथा त्यावेळच्या समाजात हाडीमासी खिळली होती.<br /><br />सम्राट ऑगस्ट्स याला मुलगा नव्हता. आपल्या मृत्यूनंतर रोमन साम्राज्यात आपल्या वारसावरून यादवी माजू नये <table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: right; margin-left: 1em; text-align: right;"><tbody><tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEif6I5TUcy10SDmf_2nNzjVZK9KbJ0tgZn0lVoj00ZnmpLuLMON8gj534H0AW9FTqV2R0n3kF_rA2OhnSMaZ3F7SBusHpV1SRZxifpkgmPmExy7uDcAIQ6MdW5vb82m9Wp8E2lBhx4DDa58Vvz3InUyyMHrT3wZ9n1nIbwY9SmvpK-J55KmtEQRcPsp/s861/screenshot-cdn.britannica.com-2022.11.18-21_08_35.png" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="861" data-original-width="602" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEif6I5TUcy10SDmf_2nNzjVZK9KbJ0tgZn0lVoj00ZnmpLuLMON8gj534H0AW9FTqV2R0n3kF_rA2OhnSMaZ3F7SBusHpV1SRZxifpkgmPmExy7uDcAIQ6MdW5vb82m9Wp8E2lBhx4DDa58Vvz3InUyyMHrT3wZ9n1nIbwY9SmvpK-J55KmtEQRcPsp/w448-h640/screenshot-cdn.britannica.com-2022.11.18-21_08_35.png" width="448" /></a></td></tr><tr><td class="tr-caption" style="text-align: center;"><span style="font-size: xx-large; text-align: start;">टायबिरिअस</span></td></tr></tbody></table>म्हणून ऑगस्ट्सने आपल्या हयातीत आपला अनौरस पुत्र टायबिरिअस याला दत्तक घेतले आणि त्याच्याबरोबर आपल्या जुलिया या विधवा मुलीचा पुनर्विवाह केला. काही वर्षे ऑगस्ट्सने टायबिरिअसला आपल्या शासनात सहसम्राट म्हणून सामावून घेतले आणि त्याला प्रशासनातील तपशिलांची माहिती दिली. साहजिकच ऑगस्ट्सच्या मृत्यूनंतर त्याने केलेल्या मृत्यूपत्राप्रमाणे टायबिअरिअस हा रोमचा विधिवत सम्राट झाला आणि सिनेटसभेनेही त्याला मान्यता दिली.<br /><br />टायबिरिअसने राजेशाही थाट कमी करून सिनेटसभेचे काही अधिकार वाढविण्याचा प्रयत्न केला. त्याच्या कारकिर्दीतली अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे ख्रिस्ती धर्मप्रवर्तक येशू ख्रिस्त याला विद्रोहाच्या आरोपाखाली रोमन अधिपत्याखालील पॅलेस्टाईन या भूप्रदेशात क्रॉसवर ठोकून मारण्यात आले. वास्तवात हा निर्णय त्याचा एकट्याचा कधीच नव्हता. तरीही तो राजा असल्याने याचे उत्तरदायित्व इतिहासाने त्याच्याच कालखंडावर टाकलेय.<br /><br />त्याच्या अधिपत्याखाली असणाऱ्या जेरूसलेम मधील ऱ्हाईन नदीच्या खोऱ्यातील काही सैनिकांनी बंडही केले होते. त्याचा <table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: right; margin-left: 1em; text-align: right;"><tbody><tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj-oXAunLWY9_oa2Tde4bWF1kooGiqd0IIrKpSTBDvvJ5VaKtph_ilLmoKlu8B84UO9qzbh6A9eNX1jIKbJ8PlSasUk6OyNBm_rfMiZHbMXfhtu66D0M2qGZWF1c4oepHQgr8TWRS4BD9W-k-WopKkj1yKPpbdC9f-Vj3x7y7DJIAZ-1gJe_DCguH9p/s869/screenshot-cdn.britannica.com-2022.11.18-21_12_30.png" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="869" data-original-width="621" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj-oXAunLWY9_oa2Tde4bWF1kooGiqd0IIrKpSTBDvvJ5VaKtph_ilLmoKlu8B84UO9qzbh6A9eNX1jIKbJ8PlSasUk6OyNBm_rfMiZHbMXfhtu66D0M2qGZWF1c4oepHQgr8TWRS4BD9W-k-WopKkj1yKPpbdC9f-Vj3x7y7DJIAZ-1gJe_DCguH9p/w458-h640/screenshot-cdn.britannica.com-2022.11.18-21_12_30.png" width="458" /></a></td></tr><tr><td class="tr-caption" style="text-align: center;"><span style="font-size: xx-large; text-align: start;">कॅलिगुला</span></td></tr></tbody></table>पुतण्या व मुख्य सेनापती जरमॅनिकस याला सैन्याने सम्राट करण्याचे आमिष दाखविले आणि फितुरीचे प्रयत्न केले. परंतु टायबिरिअसने त्यालाच दत्तक घेऊन भावी वारस म्हणून घोषित केल्यामुळे सैन्यातील हा अंतर्गत संघर्ष टळला. जरमॅनिकस हा महापराक्रमी योद्धा होता. त्याच्या कारकिर्दीत रोमन साम्राज्याने आपल्या सीमारेखा दूरवर भिडवल्या. टायबिरिअसने त्याला दत्तक घेतले असले तरी त्याच्या मनात जरमॅनिकस विषयी अपार असूया होती, आपण त्याच्या इतके पराक्रमी नाही याचा सल त्याला भयगंडाकडे घेऊन जाई. कधीतरी तोच सम्राट होईल या भीतीने टायबिअरिअसने काही काळानंतर त्याला विषप्रयोग करून ठार मारले! नात्याने तो त्याचा काका असला तरी त्याला भय, असुरक्षिततेने ग्रासले होते. याचे परिणाम त्यापुढच्या काळावर झाले नि साम्राज्यास उतरती कळा लागली. <br /><br />टायबरिअस या सर्व हतबलतेस त्रासला होता, त्याचा एकुलता मुलगा द्रसस सिझर याची हत्या झाली आणि तो खचला. त्याने सम्राटाचे हक्क त्यागले आणि तो ज्याला <table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: right; margin-left: 1em; text-align: right;"><tbody><tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhirc4GyeYdPKbW8UU9lrI-kMgg-kxPKz2T96eotYgJs_H7BGIUTDLckBXx0sNGQE-aQeqrvxd93iNzl9HvI9ce788ZvLalxkrjjJ_9-cSOyIfSqg9D7MdMRxFiRc-RWlIi8KlYHXKaWeRGUaEyb58kNuEkczqKvbq-5yk2Vzw4Cf75018RszVnT3k4/s862/screenshot-alchetron.com-2022.11.18-21_18_08.png" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="862" data-original-width="591" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhirc4GyeYdPKbW8UU9lrI-kMgg-kxPKz2T96eotYgJs_H7BGIUTDLckBXx0sNGQE-aQeqrvxd93iNzl9HvI9ce788ZvLalxkrjjJ_9-cSOyIfSqg9D7MdMRxFiRc-RWlIi8KlYHXKaWeRGUaEyb58kNuEkczqKvbq-5yk2Vzw4Cf75018RszVnT3k4/w438-h640/screenshot-alchetron.com-2022.11.18-21_18_08.png" width="438" /></a></td></tr><tr><td class="tr-caption" style="text-align: center;"><span style="font-size: xx-large; text-align: start;">जरमॅनिकस</span></td></tr></tbody></table><br /> आपला निष्ठावंत प्रशासक समजत होता त्या सेजानुसच्या हातात त्याने सूत्रे सोपवली. सत्तेत येताच सेजानुसने टायबिरिअसच्या पत्नीची आणि तिच्या अनौरस पुत्राची हत्या केली. त्याचा अधिकारही फार दिवस चालला नाही, अनागोंदीपायी त्याला जेरबंद करून त्याचा वध करण्यात आला. त्याच्या नंतर मॅक्रोनने सूत्रे ताब्यात घेतली आणि टायबिरिअसने दत्तक घेतलेल्या कॅलिगुला याला त्याने रोमन सम्राट घोषित केलं. वास्तवात कॅलिगुलाऐवजी टायबिरिअसचा नातू म्हणजे द्रसस सिझरचा मुलगा जिमेलस याला गादीवर बसवणं अपेक्षित होतं. मात्र सारी सूत्रे आपल्या हाती राहावीत म्हणून सेनापती मॅक्रोनने कॅलिगुला याला सम्राट घोषित केले. याच कॅलिगुलाने पुढे जाऊन जिमेलसचा खून करवला तसेच मॅक्रोनला आत्महत्या करायला भाग पाडले.<br /><br />रोमन साम्राज्यातील सर्वात क्रूर नि विकृत लिंगपिसाट राजा म्हणून इतिहासात कॅलिगुलाचे नाव नोंदले गेलेय. प्रिटोरियन सैनिकांच्या मदतीने राज्यपदी आल्यापासून त्याला मारण्याचे कट रोमन सरदारांमध्ये सुरू झाले होते.<br /><br />इतिहासात तो अत्यंत क्रुर, निष्ठुर, उधळ्या आणि माथेफिरू असल्याची नोंद आहे. एका वदंतेनुसार त्याने चक्क आपल्या घोड्याला रोमन सेनेटचा अधिकारी म्हणून नेमले होते! कॅलिगुला स्वतःला देव मानीत असे. सर्वांनी आपली पूजा करावी तसेच ज्यूंनी आपल्या पुतळ्याची सिनेगॉगमधून प्रतिष्ठापना करावी असा त्याने हुकूम काढला होता. त्याच्या या कृत्यास ज्यूंनी विरोध केल्यामुळे कॅलिगुलाने ज्यूंचा अतोनात छळ केला. कॅलिगुलाच्या या उद्दाम वर्तनास कंटाळून सुरक्षा दलातील काही अधिकाऱ्यांनी त्याचा खून करून क्लॉडिअस या वृद्ध अधिकाऱ्यास सम्राटपदी बसविले. अगदी अल्पकाळ सत्तेत असलेल्या क्लॉडिअसनंतर निरो हा रोमचा सम्राट झाला. रोम जळत असताना फिडल-वादनात मग्न असणारा ऐशआरामी, बदचलनी नि हव्यासी निष्क्रिय राजा म्हणून इतिहासाने त्याची नोंद घेतलीय. <br /><br />ऑगस्ट्सच्या वैभवशाली राजवटीची धुरा टायबिरिअसच्या खांदयावर आली आणि रोमन साम्राज्य गर्तेत गेलं. टायबिरिअसने प्रजा आपल्यावर नाराज होऊ नये म्हणून प्रजेला अनिष्ट सवयी लावल्या, चुकीची वचने दिली, भोंगळ कल्पनांनी त्याने प्रजेचे मन भारून टाकले. ऑगस्ट्सपेक्षाही स्वतःला ओजस्वी समजणाऱ्या टायबिरिअसच्या हाती राजसूत्रे जाण्याआधी प्रजा सुखात आनंदात होती मात्र प्रत्यक्षात तो सम्राट झाल्यापासून रोमन जनतेस दुर्दैवाचे दशावतार पाहावे लागले. कित्येक पिढ्या त्याची शिक्षा भोगावी लागली. एक चुकीचा माणूस चुकीच्या जागी आल्याने पुढचे कित्येक कालखंड अक्षरशः रोमन प्रतिष्ठेच्या चिंधड्या उडवणारे ठरले!<br /><br />बारकाईने पाहिले तर लक्षात येते की ऑगस्ट्स, टायबिरिअस आणि कॅलिगुला हे कधीच मरण पावले असले तरीही एक प्रवृत्ती बनून जगभरातील शासनकर्त्यांमध्ये ते जिवंत आहेत. त्यांचे व्हर्जन थोडेफार बदलले आहे आणि सिक्वेन्स थोड्याफार फरकाने मागेपुढे होताना दिसतो हाच काय तो फरक! <br /><br />- समीर गायकवाड </span><br /><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><br /></span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;">#sameerbapu #sameergaikwad #history</span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;">#roman #king #politics #समीर #समीरगायकवाड </span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><br /></span></div><div><table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto;"><tbody><tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgasg7AhW9NYATPfdU4kmfod6enS5TiWnT7-4Ye1hRYw8UKuC8PLR-bRveFgcUvNwrE2YjvMrARVnK2kZYcuTwYIbNJrqd6pDw-lu9UN0O_FpSmYFRZuWSCjx3WcXuFDNTMaDpCIvoyNSftf00l6H8DjewJYrLPNH2X3p5pNw_RvDYzKyfAJlkdv4OR/s1275/screenshot-cdn.britannica.com-2022.11.18-21_20_35.png" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="866" data-original-width="1275" height="434" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgasg7AhW9NYATPfdU4kmfod6enS5TiWnT7-4Ye1hRYw8UKuC8PLR-bRveFgcUvNwrE2YjvMrARVnK2kZYcuTwYIbNJrqd6pDw-lu9UN0O_FpSmYFRZuWSCjx3WcXuFDNTMaDpCIvoyNSftf00l6H8DjewJYrLPNH2X3p5pNw_RvDYzKyfAJlkdv4OR/w640-h434/screenshot-cdn.britannica.com-2022.11.18-21_20_35.png" width="640" /></a></td></tr><tr><td class="tr-caption" style="text-align: center;"><br />रोमन साम्राज्याचे अवशेष <br /><br /><br /><div style="text-align: left;"><span style="font-family: Eczar; font-size: x-large;">रोमन इतिहासात अकालॅरेन्शिआ नावाची स्त्री होऊन गेलीय. तुम्ही जर जितेंद्र धर्मेंद्र यांचा 'धरमवीर' हा सिनेमा किंवा प्रभासचा 'बाहुबली' हा सिनेमा पाहिला असेल तर यातले महत्वाचे धागे त्या कथेत आढळतील. इतकेच नव्हे तर सत्तरच्या दशकातील बऱ्याच पोषाखी हिंदी सिनेमांत अकालॅरेन्शिआच्या आयुष्याशी साम्य असणाऱ्या घटना दिसतील. असो.<br /><br />अकालॅरेन्शिआ विषयीच्या नोंदी मानवी स्वभावाचे कंगोरे नि समाजजीवनातील पुरुषमन दर्शवते. अकालॅरेन्शिआविषयी रोमन लोकात एक दंतकथा अशी आहे की, ती फास्ट्युलस नावाच्या मेंढपाळाची पत्नी होती. ती देखणी आणि कमनीय होती. फास्ट्युलस हा बलवान आणि धैर्यशाली होता. पुढे जाऊन ज्यांनी रोम शहराची स्थापना केली त्या रोम्युलस व रीमस या जुळया भावंडांना टायबर नदीत फेकून देण्यात आलं होतं. नदीच्या वेगवान प्रवाहातून ते वाहून जात असताना फास्ट्युलसने त्यांना पाण्याबाहेर काढून प्राण वाचवले. त्याने ह्या मुलांना आपली पत्नी अकालॅरेन्शिआ हिच्या स्वाधीन केले. तिला बारा मुले होती, त्यातलं एक मुल निवर्तलं. त्याच्या जागी तिने रोम्युलसला आपला मुलगा मानलं. तिने आपल्या मुलांच्या बरोबरीने या जुळ्यांचे संगोपन केले.<br /><br />वास्तवात अकालॅरेन्शिआने जमेल तितकं योगदान देऊन त्यांना सांभाळलं, लाडकोड करून मोठं केलं. तरीही रोमन इतिहासकारांनी तिची निर्भत्सना केली आहे. काहींनी ती लांडग्याची मादी होती असं म्हटलंय. याहीपुढे जाऊन या लांडगिणीचे दूध जुळी मुलं कशी पित होती याची वर्णनेही केलीत. अकालॅरेन्शिआ ही हिंस्त्र श्वापद असल्याने त्या मुलांमध्ये अफाट ताकद आली असंही काहींनी म्हटलंय. तर काही रोमन ग्रंथांत तिचा उल्लेख कुलटा असा आलाय, जी एक बदनाम नि वाईट चालीची बाई या अर्थाने वापरली जाणारी संज्ञा आहे!<br /><br />एक दंतकथा अशी ही आहे की अकालॅरेन्शिआ इतकी देखणी होती की तिला वस्तूसम प्रलोभन म्हणून वापरले गेले जेणेकरून तिला जिंकायची इच्छा असणाऱ्या पुरुषाने परमपराक्रम गाजवावा! बलाढ्य योद्धा हर्क्युलसनें तिला द्यूतांत जिंकून मिळवले होते. त्यानंतर काही अभ्यासकांना उपरती झाली असावी त्यांनी म्हटलंय की हर्क्युलसपाशी गेल्यानंतर तिला आपल्या संपत्तीमधला वृथा अभिमान लक्षात आला. तिने ती संपत्ती रोमन लोकांत वाटून टाकली. याचमुळे तिच्या नावाचा दानउत्सव सुरु करण्यात आला. तिच्या या कृत्यामुळे काहींनी तिला भूमाता मानले!<br /><br />रोम्युलस व रीमस यांचे आजोबा न्यूमिटॉर हे अल्बाचे राजे होते. त्यांचा भाऊ ऍम्युलिस याने त्यांना बळजोरीने सत्तेवरून दूर करून राज्य बळकावले होते. न्यूमिटॉरच्या मुलाचा वध करुन नातवंडांना नदीपात्रात फेकून देण्याचे फर्मान याचेच होते. मात्र ती दोन्ही भावंडं यातून बचावली. फास्ट्युलस आणि अकालॅरेन्शिआ दांपत्यापाशी राहून ते मेंढपाळाचे जीवन जगत होते. एके दिवशी रिमसची गाठ काही सैनिकांशी पडली जे आपसांत लढत होते. न्यूमिटॉर आणि ऍम्युलिस यांचे ते पाठीराखे होते. अल्बाच्या राजसत्तेवरुन त्यांची चकमक सुरु होती. रिमसने पराक्रम गाजवून न्यूमिटॉरच्या सैनिकांना विजय मिळवून दिला तरीदेखील ते त्यालाच बंदी बनवून आपल्या राजाकडे घेऊन गेले. त्याला पाहताच न्यूमिटॉरच्या लक्षात आले की हा काही सामान्य मेंढपाळ युवक नाही याचे कुळ खानदान वेगळेच असावे. आपला भाऊ रिमस याला बंदिवान बनवल्याचे कळताच रोम्युलसने अल्बाच्या दिशेने कूच केले. मात्र अल्पवधीतच या दोन्ही भावांना आपला पूर्वेतिहास कळला. त्यांनी अफाट पराक्रम गाजवून आपल्या आजोबांना राज्य मिळवून दिलं आणि रोम शहर उभं केलं!<br /><br />इतका महत्वाचा इतिहास घडवूनही अकालॅरेन्शिआची अयोग्य शब्दांत बोळवण केली गेली. जगातल्या कोणत्याही इतिहासात डोकावून पाहिले तर स्त्रीला उचित गौरव देताना कथित इतिहासकारांचा हात आखडतो. अगदी सम्राज्ञी क्लिओपात्राविषयीच्या नोंदी पाहिल्या तरी लक्षात येते की तिला देखील संपूर्ण न्याय न देता अवलंबित्व बहाल केले गेलेय.<br />अशा कित्येक स्त्रिया देशोदेशीच्या इतिहासात आढळतात. आताच्या काळातही हीच प्रथा पुढे नेली जातेय. मुलांच्या संगोपनात आणि मुलं मोठी करण्यात आईचे जे श्रेय आहे ते कौटुंबिक स्तरावर अगदी आवर्जून दिले जाते, मात्र सामाजिक वा ऐतिहासिक स्तरांवर आईला श्रेय देण्यात सगळेच कचरतात! आपल्याकडचं चपखल उदाहरण म्हणजे जिजाऊ!<br /><br />- समीर गायकवाड<br /></span></div></td></tr></tbody></table></div>sameer gaikwadhttp://www.blogger.com/profile/05106372658264914305noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1120566833830274839.post-280639356715587312022-11-15T14:01:00.065+05:302022-11-18T23:27:22.525+05:30श्रद्धा वालकरच्या निमित्ताने - मुलींना समजून घेतलेच पाहिजे! <div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgnUWf38JoRHqCNSqBqpUAKSrWu3_XQXuCw4X0c9UHDMlAjZR86BUT6QTrRjmRAUTweSV5XBjegEdOCS99fP8LRFmYg-bXswY4HzbIhvMokd2_UgbiTWrbmI8pThfnl5LkqZCUV-po3bfUGchUFIB8_YJ3RlI7xGuE_d0uk4FIVAa4q2kqeGyC69cZg/s1278/screenshot-i.ndtvimg.com-2022.11.18-23_19_21.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="844" data-original-width="1278" height="422" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgnUWf38JoRHqCNSqBqpUAKSrWu3_XQXuCw4X0c9UHDMlAjZR86BUT6QTrRjmRAUTweSV5XBjegEdOCS99fP8LRFmYg-bXswY4HzbIhvMokd2_UgbiTWrbmI8pThfnl5LkqZCUV-po3bfUGchUFIB8_YJ3RlI7xGuE_d0uk4FIVAa4q2kqeGyC69cZg/w640-h422/screenshot-i.ndtvimg.com-2022.11.18-23_19_21.png" width="640" /></a></div><br /></div><div><br /></div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;">श्रद्धा वालकर आपल्या वसईमधली मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणी होती. नोकरीत असताना तिची आफताब अमीन पूनावाला या तरुणाशी ओळख झाली. आफताब अमीन पूनावाला हा देखील वसईचा रहिवासी आहे. वसईतील सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झालेय. त्याने मुंबईतील एलएस रहेजा कॉलेजमधून बीएमएस पदवी घेतली. व्यवसायाने तो फूड ब्लॉगर आहे, तो इंस्टाग्रामवर ‘हंग्रीचोक्रो’ नावाने फूड ब्लॉग चालवतो.<br />मुंबईतील कॉल सेंटरमध्ये काम करत असताना लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाशी भेट झाली. आरोपी आफताब हा श्रद्धा जिथे राहत होती त्याच परिसरात राहत होता. मुंबईत काम करत असताना दोघांचे प्रेम झाले. श्रद्धा एका मल्टीनॅशनल कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये काम करत होती.<span><a name='more'></a></span><br /><br />दोघांच्याही कुटुंबियांनी त्यांचे नाते स्वीकारण्यास नकार दिला तेव्हा हे जोडपे दिल्लीत स्थलांतरित झाले आणि छतरपूर परिसरात, मेहरौली येथे भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहू लागले अशी माहिती समोर येतेय. तिथे ते लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहिले. काही महिन्यांनी तिने लग्न करण्याचा तगादा लावला. त्याने नकार दिला आणि त्यानंतर तिचं जे काही केलं ते काळजाचा थरकाप उडवणारं आहे, माणूसकीला काळीमा फासणारं नि प्रेम या शब्दाला बदनाम करणारं आहे.<br /><br />या पाशवी नराधमाने आपल्या प्रेयसीचा उपभोग तर घेतला मात्र नात्याला नाव द्यायची वेळ आल्यावर तिचा खून केला. तिच्या देहाचे पस्तीस तुकडे केले! हात थरकापले कसे नाहीत त्याचे?<br /><br />त्यानंतर त्याने तीनशे लिटर क्षमतेचा फ्रिज आणून त्यात तिच्या देहाचे तुकडे ठेवले. रोज मध्यरात्री दोन वाजल्यानंतर तो घराबाहेर पडायचा नि दिल्लीच्या सर्वदूर भागात तिच्या देहाचे तुकडे टाकून यायचा. असं त्यानं तब्बल अठरा दिवस केलं.<br /><br />श्रद्धाची सोशल मीडियावरची अनुपस्थिती लक्षात येताच घटनेनंतर सहा महिन्यांनी तिच्या पालकांनी मिसिंग तक्रार दाखल केली. पोलिसांनी आफताबला बोलतं केल्यावर त्याने सारं ओकलं.<br /><br />हाच आफताब सोशल मीडियावर पर्यावरण, स्त्रीमुक्ती, खरे स्त्रीसौंदर्य यासह एलजीबीटी कम्युनिटीवर आधारित लिंगभेदमुक्ती विषयीच्या गप्पा हाणताना दिसतो. <br />त्याच्या पोकळ नैतिकतेच्या मुखवट्याआडचा चेहरा अत्यंत क्रूर हिंसक नि अमानवी आहे हे त्या मुलीला कळले नसेल! <br />इथे असे फसवे मुखवटे कितीएक असतील. म्हणून तरी माणसांची पारख असली पाहिजे. <br /><br />'प्रेम सांगून वा ठरवून होत नाही' हे मी देखील मानतो मात्र आपण ज्याच्यासोबत आयुष्य काढण्याची स्वप्ने रंगवतो त्याचे विचार काय आहेत, त्याची मनोवृत्ती कशी आहे, त्याचं आपल्यावर खरेच प्रेम आहे का, शरीराच्या उपभोगानंतर पुढे काय असणार आहे, आपल्या नात्याला ओळख मिळणार आहे का, प्रेमाआडून आणखी काही साध्य करण्याचा छुपा हेतू आहे का इत्यादी बाबींवर किमान विचार तरी केला पाहिजे.<br /><br />अलिकडच्या काळात अशा घटना सातत्याने घडत असूनही मुलींचे डोळे का उघडत नसावेत? 'प्रेम आंधळं असतं' हा फिल्मी डायलॉग आताच्या खुल्या नि मोकळ्या वातावरणाच्या काळात उचित वाटत नाही. नीटनेटका विचार करुन, चौकसपणे माहिती घेऊन, सारासार विवेक न गमावता पुढचे निर्णय घेतले पाहिजेत. जन्मदात्यांच्याच मर्जीनेच आयुष्याचा जोडीदार निवडणं सक्तीचं नसलं तरीही त्यांच्या मतांचा, विचारांचा साधक बाधक विचार करायला हरकत नसावी.<br /><br />आफताबच्या घोर अपराधाची त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. त्याने ज्या थंड डोक्याने, कमालीच्या निर्ममतेने श्रद्धाचा खून करत तिच्या देहाची जी विल्हेवाट लावलीय ती पाहता त्याच्यातल्या क्रौर्याची, निर्विकारपणाची, अमानवी वृत्तीची कल्पना यावी. या क्रूरकर्म्यास फासावरच लटकवले पाहिजे.<br /><br />नाती कुठलीही असोत कौटुंबिक हिंसा ही आढळतेच.<br />घरगुती हिंसाचार जसे की बायकोला मारहाण करणे, सासरच्या मंडळींकडून जिवंत जाळणे वा फासावर लटकावणे असे प्रकार इतके नित्याचे झालेत की आपण त्याला निर्ढावले आहोत आपल्याला त्याचे दुःख वाटेनासे झालेय.<br />विवाहित स्त्रियांना हिंसेस अजिबात सामोरे जावे लागत नाही असे कुणाला वाटत नसेल तर तो त्याचा गैरसमज आहे.<br />मुळात लग्न झालेल्या बाईला मारझोड होणे वा तिने मनासारखे वागले नाही वा मागण्यांची पूर्तता केली नाही तर विहिरीत लोटून देणे याविषयी आपला संताप कधीच विझून गेला आहे.<br /><br />'लिव्हइन'कडे आपण एका चमचमीत नि खमंग नजरेने पाहत असल्याने त्यातून समोर येणारा हिंसाचार अधिक ठळकपणे अधोरेखित करून नकळत कथित विवाहसंस्थेची साईड बळकट करून घेत असतो!<br />लग्न असो वा लिव्हइन असो आपला जोडीदार पारखूनच घेतला पाहिजे, त्याच्या मानसिकतेविषयी पुरता अंदाज आल्याशिवाय पुढची पाऊले उचलू नयेत हे लख्ख स्पष्ट आहे.<br /><br /></span><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;">आफताबचा सोशल मीडियावरचा वावर स्टायलिश होता. </span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;">श्रद्धाखेरीज आणखी काही मुलींशीही त्याची मैत्री / संबंध होते. यावरून त्या दोघांत खटके उडत. </span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;">श्रद्धाच्या हत्येनंतर तिच्या देहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवलेले असतानाही त्याने एका मुलीला डेटवर घरी आणल्याची माहिती समोर येतेय. </span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;">मात्र ही माहिती खरी असेल तर अन्य मुलींची सद्यअवस्था काय आहे यावरही प्रकाश पडला पाहिजे. ही सर्व माहिती खरी असेल तर यात आणखी कोणी सामील आहे का याचाही तपास व्हायला हवा आणि असे करण्यामागचे सर्व हेतू शोधून पाळेमुळे खणून काढली पाहिजेत.<br /><br /><b><i>या हत्याकांडानंतर काही प्रश्न उपस्थित झालेत त्या अनुषंगाने काही सवाल विचारावेसे वाटतात, काही मुद्दे प्रकर्षाने समोर येतात -</i></b> <br />मुलींचे शोषण होण्याचे सरासरी वय कोणते आहे हे आपल्याला नेमके ठाऊक आहे का?<br />साधारण चार पाच दशकांपूर्वीच्या काळापर्यंत मुली आठवी नववीत असताना मेन्स्ट्रुएशन यायचे. दशकानुगणिक हे प्रमाण खालच्या इयत्तेत येत राहिलेय.<br />आता परिस्थिती अशी झालीय की चौथी पाचवीतल्या मुली देखील 'शहाण्या न्हात्या धुत्या(?!)' होऊ लागल्यात.<br />हे कसे काय घडत गेले, याची कारणे काय हा वेगळा लेखनविषय आहे. इथे मुद्दा तो नाहीये. <br /><br />सहावी सातवीत जाईपर्यंत मुलगा हा तिच्या दृष्टीने नव्या परिघात मोडू लागतो. शिकण्याचे माध्यम कोणत्याही भाषेचे असूद्यात {विश्वास बसत नसेल तर तुम्ही मुलींच्या शाळेतील शिक्षकांशी अनौपचारिक गप्पा मारून बघा) ही स्थिती सगळीकडे कमीअधिक प्रमाणात सारखीच आहे. फरक फक्त ग्रामीण आणि मोठ्या शहरातील शाळांत उरलाय, मात्र हे लोण तिथेपर्यंतही पोहोचलेय. <br /><br />मुलींना मुलाबद्दल काय वाटते? त्यांच्या मनातील आकर्षणाचे अर्थ काय? प्रेमाचं नि संसार करण्याची स्वप्ने पाहण्याचे वय कोणते नि शालेय वयातले प्राधान्यक्रम काय यावर शाळेंत खुलेपणाने बोललं जात नाही.<br />परिणामी याच वयात मुलींचे शोषण सर्वाधिक होते. <br /><br />बाह्य रूपास भुललेल्या मुली पालकांचं अजिबात ऐकत नाहीत कारण त्यावेळी त्यांचं मन आकंठ प्रेमात देहआकर्षणात बुडून गेलेलं असतं.<br />मुळात त्यांचं वय ते किती असतं? त्यांच्या अंगी परिपक्वता तरी किती असेल? जो संयम मोठ्यांच्या अंगी पुरता दिसत नाही तो त्या धगधगत्या वयात कसा आढळणार? या टप्प्यावर मुलींना समजून घेणं खूप गरजेचे आहे. <br /><br />याच विषयांवर काही शाळांत नि कनिष्ठ महाविद्यालयांत बोलण्यासाठी आमंत्रित केलेलं होतं. बोलताना मी अगदी आडपडदा न ठेवता अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय, मात्र यासंदर्भातले अनुभव भिन्न आहेत. एका महाविद्यालयांत आधीच सूचना केली गेली की कृपया अमुक एक उल्लेख टाळावेत आणि तमुक एक उल्लेख आवर्जून करावेत, मी सपशेल नकार दिला. जे उल्लेख टाळा असं सांगितलं होतं ते केले नाहीत मात्र त्यांनी ज्यावर भर दिला होता ते उल्लेख काही केले नाहीत.<br />मात्र काही उल्लेख निश्चयपूर्वक करतोच. <br /><br />जसे की मुलींना फसवणारे वा भुलवणारे हे बहुतांश करून त्यांचे मित्र, परिचित,शेजार परिसरातील वा नात्यातीलच <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjueNirnnFjNjzjHNARAJnQUnOQEAilwjaMdVfnMFgAV9oFgqiydzSFcK8ahiAsp6V-q0ppskW860UvShmZG_t5EdJJWgamOkgB9cBnsmsI-cGGBKzyALvvpUA4HMt0oB7XY7Pn41hWNz1IT4w_aR5M6InTPCQaLUhf6ww--h3PHIrJnMihkGJNfnBg/s1201/Happy-Daughters-Day-Suvichar-Quotes-in-Hindi-1.jpeg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" data-original-height="1201" data-original-width="960" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjueNirnnFjNjzjHNARAJnQUnOQEAilwjaMdVfnMFgAV9oFgqiydzSFcK8ahiAsp6V-q0ppskW860UvShmZG_t5EdJJWgamOkgB9cBnsmsI-cGGBKzyALvvpUA4HMt0oB7XY7Pn41hWNz1IT4w_aR5M6InTPCQaLUhf6ww--h3PHIrJnMihkGJNfnBg/w512-h640/Happy-Daughters-Day-Suvichar-Quotes-in-Hindi-1.jpeg" width="512" /></a></div> असतात.<br />सुरुवात मध्यस्थापासून होते जी मोस्टली मैत्रीण वा त्या मुलाची परिचित असते! सर्व संवाद रेकॉर्ड करून ठेवले जातात, चॅट केलेलं असेल तर त्याचे स्क्रीनशॉट्स घेऊन ठेवले जातात.<br />मग आऊटींग म्हणजे बाहेर फिरणं होतं ( हे काहीही असू शकतं जसं की सिनेमा, हॉटेलिंग, गार्डन व्हिजिट, बर्थडेपार्टी वा फ्रेंड्स मीट इत्यादी).<br />इथे मुली सर्वाधिक फसतात, इथे तिसरा कुणी तरी आधीच उपस्थित असतो ज्याने सर्व शूट केलेलं असतं वा त्या मुलानेच कधी कळत तर कधी नकळत सेल्फी घेतलेली असते, कधी व्हिडीओ शूट केलेला असतो.<br />इथून खेळ सुरु होतो. हे फोटो / व्हिडीओ मॉंर्फ केले जातात आणि त्या मुलीला शरीरसंबंध ठेवण्यास प्रेशर आणलं जातं.<br />या टप्प्यावर मुलीचे पालकांशी विश्वासाचे संबंध असले की समस्या निपटली जाऊ शकते मात्र असं खूप कमी घडतं.<br />मग ती मुलगी कधी खुशीने तर कधी बळजोरीने राजी होते.<br />पुढे जाऊन मुलींची अदलाबदली होते, मुलं मुली बदलले जातात आणि किस्सा तोच राहतो!<br />कित्येक महाविद्यालयीन मुलांच्या मोबाईलमध्ये आपआपल्या 'जीएफ'सोबतच्या सेक्ससंबंधी खमंग गप्पा आढळून येतात.<br /><br />या मुली मग दिशाहीन होतात आणि अशातच कुणी एक गाठ पडतो जो नितांत प्रेमाचे नाटक करतो. या वेळी मुलगी अजूनच गाळात रुतून बसते. मग तो आफताबही असू शकतो!<br />आपली मुलगी काय करते?<br />तिच्या फोनचा वापर ती कसा करते?<br />ती कोणाशी बोलते?<br />तिची क्लोज फ्रेंड खरेच क्लोज आहे का?<br />तिची मैत्रीण / मित्र कोण नि कसे आहेत? शाळा / कॉलेज / क्लासेस ती नियमित अटेंड करते का?<br />फ्रेंड्स पार्टी वा अन्य कुठेही ती गेली तरी तिच्या येण्याजाण्याची खरी तंतोतंत माहिती बहुतांश पालकांना नसते. <br /><br />मुलींना हे सांगावेसे वाटत असते मात्र कधी भीती आड येते, तर कधी आईवडील जुनाट विचारांचे वाटतात तर कधी कसं सांगायचं हा मुद्दा असतो!<br />तर कधी थ्रिलची अनुभूती खुणावत असते तर कधी तारुण्यसुलभ भावनांनी मुलींच्या भावनाआवेगांवर ताबा मिळवलेला असतो,<br />तर कधी त्यांना धाकधपटशाचा अवलंब केलेला असतो!<br />याही व्यतिरिक्त आणखी बरीच कारणे असतात जसे की पालकांचेच आपसात पटत नसते, घरात सतत कलह सुरु असतात, मुलींना प्रायव्हसी नसते आदी. <br /><br />या वयातील मुलींना 'शेण खाऊन वाहवत गेली' वा 'खानदानीला बट्टा लावला' म्हणून कुणी दुषणे देत असेल तर त्या व्यक्तीची मी मनापासून कीव करतो, कारण मुलींवर दोषाचे खापर फोडून झाले की समाज, कुटुंब व्यवस्था आपले हात झटकण्यास मोकळी झालेली असते!<br /><br />या मुलींशी समजेल अशा पद्धतीने आणि रुचेल अशा शैलीनेच बोललं पाहिजे.<br />किंबहुना नुसतं बोललं पाहिजे यावर न थांबता त्यांना बोलतं केलं पाहिजे, काय योग्य काय अयोग्य हे समजावून सांगितलं पाहिजे.<br />कोणती खबरदारी घेतली पाहिजे, विश्वास टाकण्याआधी कोणत्या बाबी तपासून घेतल्या पाहिजेत हे मुलींना अगदी सहजी सांगता येतं.<br />काही कॉलेजमधून याचे चांगले अनुभव आले.<br />याविषयी सामाजिक मानसिक प्रयोग केले पाहिजेत ज्यात पालक प्राध्यापक शिक्षक यांचेही सहकार्य लागते.<br />हरेक कॉलेजेस, शाळांमध्ये यावर बोललं गेलं पाहिजे.<br />नुसताच आक्रोश व्यक्त करून आणि भेदाभेद करून काहीच साध्य होणार नाही कारण येणारा काळ याहून वाईट असणार आहे तेंव्हा आपणच मार्ग काढले पाहिजेत. <br /><br />आपल्या घरी, शेजारी, नात्यांत, मित्र परिवारात पौगंडावस्थेतली वा नवतरुण मुलगी असेल तर तिच्याशी अगदी खेळीमेळीचे, सुसंवादी नि सच्च्या स्नेहाचे संबंध असूद्यात. तिच्यावर नजर राखण्याचा एककलमी कार्यक्रम करत असाल तर तुम्ही गंडले जाल त्याऐवजी तिला बोलतं ठेवा, तिचे बेस्ट फ्रेंड बनले पाहिजे!<br /><br />सोशल मीडियावर आक्रोश / संताप वा बुद्धिभेद करून काहीच साध्य होणार नाही. कृती केली पाहिजे. मुलींना समजून घेतले पाहिजे आणि भरकटण्यापासून वाचवले पाहिजे! हे शक्य आहे!! <br /><br /><b><i>श्रद्धासारखीच मात्र काहीशा वेगळ्या पार्श्वभूमीची एक केस</i></b> मागच्या महिन्यात माझ्या आजोळकडील नात्यातल्या व्यक्तीने निदर्शनास आणली होती.<br />आई वडील विभक्त, वडील व्यसनी. मोठ्या बहिणीचे लग्न तोंडावर आलेले नि धाकटी बहीण घरातून निघून गेली!<br />खानदानी जातीचा अभिमान, वर खोट्या इभ्रतीचा सवाल!<br /><br />घर सोडून गेल्यानंतर तिचा माग काढताना फारशी शोधाशोध करावी लागली नाही. तिच्या मित्राच्या घरी पुण्यानजीक ती राहू लागली होती. अर्थातच त्याने तिचे शोषण सुरू केलेलं.<br />क्लिप्स बनवल्या, नशेची औषधे दिली नि तिला एक साधन बनवले.<br />माहिती मिळताच पोलिसांशी संपर्क केला, पोलिसानी अवघ्या काही तासांत त्याला शोधून काढले.<br /><br />मात्र मुलीने मुलाच्याच बाजूने स्टेटमेंट दिले.<br />तक्रार देणाऱ्यांच्या मनात काळेबेरे आहे असा उलटआरोप केला!<br />पोलिसांच्या दृष्टीने माझी टीप कुचकामी ठरली, तोंडघशी पडलो.<br />असे असूनही त्या मुलीचे कौन्सिलिंग करण्याचे प्रयत्न दुसऱ्या बाजूने सुरूच आहेत. <br /><br />मुलीला आपल्या मात्या पित्यांविषयी ममत्व नाही हे जरी मान्य केले तरी आपण जे करतो आहोंत त्यातून आपल्या आयुष्याची माती होणार आहे याची परिपक्वता तिच्या अंगी नाही हे मला नि त्या मध्यस्थाला कळतेय, मात्र मुलीला ते कळत नाहीये.<br />कारण सध्या तिची विचार करण्याची क्षमताच खुंटली आहे.<br />अशा अवस्थेत तिच्यावर चिडून चालणार नाही. <br /><br />"तिनेच हा मार्ग निवडलाय ना, मग मरूद्यात तिला!" असे म्हणणारे लोक म्हणूनच मला आवडत नाहीत!<br />मुलींना समजून घेतले पाहिजे! त्यांच्या चुका सुधारून त्यांच्यासाठी परतीचा एक दरवाजा कायम उघडा ठेवला पाहिजे!<br /><b><i><br />अशीच आणखी एक घटना - </i></b><br />पुणे परिसरातीलच घटना. मुलगी इयत्ता नववीमधली. लॉकडाऊनच्या आधीचा महिना. <br />परीक्षा जवळ आल्याने मुलगी क्लासला जाते म्हणून निघून गेली ती परत आलीच नाही. <br />मुलीच्या घरच्या मंडळींनी घराण्याची इज्जत जाईल या भीतीपोटी दोन दिवस अक्षरशः वाया घालवले. <br />नंतर रीतसर तक्रार देण्यात आली. त्यांच्या एका परिचिताने तिचा सगळा बायोडाटा मलाही पाठवला. <br /><br />माहिती घेता कळले की मुलीचे एका मुलावर प्रेम होते, आईवडिलांनी अनेक बंधने लादली बळ वापरून मुलाचे कुटुंब वेगळ्या शहरात हलवले. मुलीचा मोबाईल काढून घेतला. <br />तिची सर्व सोशल मीडिया अकाउंट्स डिलिट करण्यात आली. तिच्यावर पाळत ठेवण्यात आली, मुलगी आता कह्यात आलीय या विचाराने त्यांनी घरानजीक असणाऱ्या क्लासमध्ये जाण्याची परवानगी दिली. <br />तिथून ती मुलगी गायब झाली. <br /><br />ती त्या दिवशी क्लासला गेलीच नव्हती असं नंतर कळलं. <br />सीसीटीव्ही फुटेजमध्ये मेनरोडवरील क्रॉस करतानाची दृश्ये वगळता खास काही दिसले नव्हते. <br />सगळे हैराण झाले. मात्र खऱ्या अर्थाने चकित तेंव्हा झाले जेंव्हा मुलीने वापरलेली चतुराई(!?) समोर आली. <br />तिने ट्युशनमधील मैत्रिणीच्या मोबाईलमध्ये मैत्रिणीच्या नकळत इंस्टाग्राम अकाउंट उघडले होते आणि ट्युशनमध्ये गेली की त्या मुलाशी ती चॅट करायची. <br />त्याने कुठून कधी निघायचे हे सगळे निश्चित केले यासाठी एक मध्यस्थ निवडला जो त्या मुलीच्या घरी अगदी सटरफटर कामासाठी काही काळ येऊन गेला होता. <br />मुलीने मोठ्या विश्वासाने त्या मधल्या पोराच्या हाती आपली बॅकपॅक दिली आणि ती ट्रेनमध्ये बसली.<br /><br />त्याने घात केला नि तो तिला पाटण्याला त्याच्या गावी घेऊन गेला. <br />एक आठवडा त्याने तिला घरी ठेवलं. मुलीच्या मित्राने त्या अकाउंटवर चॅट केलं पण रिप्लाय आला नाही, त्याला वाटलं घरच्यांनी पुन्हा अडवलं असेल. <br />नेपाळ सीमेनजीक ह्युमन ट्रॅफिकींगमधल्या काही लोकांनी त्या मुलीची टीप दिली आणि मुलगी सुखरूप घरी आली. आता मुलीकडे मोबाईल आहे, तिचे सोशल मीडिया अकाउंट देखील रिस्टोअर केलं गेलंय मात्र तिचे आईवडील तिचे बेस्ट फ्रेंड झालेत!<br /><br />मुलींना समजून घेतलं पाहिजे हेच मी इथेही लिहीन. हे लेखन कदाचित ती देखील वाचत असेल आणि केलेल्या चुकीला सुधारता आलं म्हणून समाधानही वाटत असेल!</span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><br /></span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;">- समीर गायकवाड </span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><br /></span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;">#shraddhamurder #live-in #sameerbapu</span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;">#love #murder #religion #girls #feminism </span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;">#sameergaikwad #समीरगायकवाड </span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><br /></span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><img border="0" data-original-height="540" data-original-width="820" height="422" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhX8FzA14nTFFKz9n4ItBMeP8ZhPZOiOrNxb6IHrQbRNIJ4p9FGb-Js8QoX9OVAjUhcXBbLBEoLohDB5FOds2xTeh4uqG3mRBaKT6xYntmbSI_ryUSIAZrWXFYL9qlN_j8leZpXRgQlXClh9Cf0ZAEdcp0fSvtBWsgLUUgJlacBw8-JXRdQE8AJwaFS/w640-h422/oziel-gomez-L8-0SAy-aoQ-unsplash_6310755954f23.jpg" width="640" /></div></span></div>sameer gaikwadhttp://www.blogger.com/profile/05106372658264914305noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1120566833830274839.post-72502431006546303052022-11-11T20:40:00.005+05:302022-11-11T20:40:59.038+05:30लोकसंस्कृतीचे परस्पर प्रेम - यात्रा आणि तमाशा <div><div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgZpFoF0VPHTcCR_jpIpHAkb5BtB0xan8U2-MsYFe8_AwxfqaU9Kjw7UjCizx6O0tyW2yJCPz_gTTrJcf-qixLrFRXyHKD0iiKBKUfu_oIXB54FrxzvmYeDKIkH6Hrq8wY6lUDfHyABQNMroEMXRU9fi5F3O_0b5972s_Kvr1pQsuxyN9ly44uYty_k/s2205/Akshardan%20Page146.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="2205" data-original-width="1654" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgZpFoF0VPHTcCR_jpIpHAkb5BtB0xan8U2-MsYFe8_AwxfqaU9Kjw7UjCizx6O0tyW2yJCPz_gTTrJcf-qixLrFRXyHKD0iiKBKUfu_oIXB54FrxzvmYeDKIkH6Hrq8wY6lUDfHyABQNMroEMXRU9fi5F3O_0b5972s_Kvr1pQsuxyN9ly44uYty_k/w480-h640/Akshardan%20Page146.jpg" width="480" /></a></div><br /></div><div><span style="font-size: x-large;"><span style="font-family: Eczar;">मराठी माणसाला मुळातच उत्सव आणि सणवारांचे अतिशय अप्रूप आहे. त्याच्या जोडीने हरेकाची कुलदैवते, ग्रामदैवते आणि कुळपुरूषांचे देवदेव इत्यादींचे सोहळे असतातच. याखेरीज विविध बुवा, महाराज, साधू बैरागी यांचेही उत्सव असतात, हे सर्व एकीकडे आणि गावोगावच्या यात्रा एकीकडे! यात्रा म्हटलं की गावाला नवं उधाण येतं, माणसं खडबडून कामाला लागतात आणि त्यांच्या जोडीला पंचक्रोशीतलं चराचर देखील कामाला लागतं. घरोघरी यात्रेचा खुमार वाढू लागतो. साधारणतः यात्रांचेदेखील ठराविक मौसम असतात. </span><span style="font-family: Eczar;">मार्गशीर्ष संपून पौषाची चाहूल लागताच पाऊस आणि थंडी जोडीने येतात, हळूहळू पाऊस ओसरतो आणि थंडीचे साम्राज्य सुरू होते. याच हंगामात खेडोपाड्यांत जत्रा यात्रांचा मौसम सुरु होतो. कुठे ग्रामदैवताची जत्रा भरते तर कुठे पीरबाबाचा उरूस भरतो. अद्यापही हे दोन्ही यात्रा उत्सव हिंदू मुस्लीम एकत्रितपणे साजरा करतात. कैक वर्षांपासून राज्यभरातील अनेक गावांत तशी परंपराच आता रूढ झाली आहे. आजकाल ज्या यात्रा साजऱ्या होतात त्यांचे स्वरूप आणि गतकाळातील स्वरूप यात प्रचंड फरक होता. गावकरी मंडळी आपआपल्या नातलगांना, पैपाहुण्यांना आवतण धाडतात. घरोघरी माणसांची लगबग वाढू लागते. गल्ल्या माणसांनी फुलून जातात. फर्मास जेवणाचे बेत होतात, जेवणावळी होतात, पंगतीच्या पंगती उठतात. जिकडं तिकडं घमघमाट होतो. प्रत्यक्ष यात्रेच्या दिवसापर्यंत हा माहौल टिकून असतो. हे सर्व करण्यामागे भिन्न प्रकारच्या श्रद्धा असल्या तरी आजकाल आणखी एक कारण असते आणि ते म्हणजे यात्रांच्या निमित्ताने भेटी गाठी होतात सबब यात्रा जोरातच झाल्या पाहिजेत असा सूर सगळीकडे दिसतो. <span><a name='more'></a></span></span></span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><br /></span></div><div><span style="font-size: x-large;"><span style="font-family: Eczar;">याची सुरुवात यात्रेची तारीख नक्की होण्यापासून असते. तारीख तिथी नक्की होताच गावाला जणू उधाण येते. सर्वांच्या चेहऱ्यावर एक अनामिक तेज झळकते. सासुरवाशिणींना सांगावे धाडले जातात, त्यांच्यासाठी ही एक पर्वणीच असते. </span><span style="font-family: Eczar;">गावातील घरा घरांत सजावट केली जाते. मांडव उभे केले जातात आरास मांडली जाते. गल्ली बोळात विद्युत रोषणाई केली जाते. पाहुण्यांच्या स्वागतासाठी गावाच्या कमानीपासून ते वेशीच्या चारी दिशांना भलेथोरले फ्लेक्स आजकाल उभे केले जातात. स्पर्धा साजऱ्या होतात. मुख्य धार्मिक उत्सव वगळता अनेक छोट्या मोठ्या गोष्टींचे नियोजन असते, त्यासाठी गावातल्या तरुण मंडळीत जणू चुरस निर्माण होते. खरे पाहू जाता यात्रेचा कालावधी म्हणजे विविध जाती धर्मियांच्या देव -देवतांचा नैमित्तीक उत्सव होय. परस्पराविषयीच्या प्रेमापोटी आणि शेती माती गावकीच्या ऋणापायी गावोगावची माणसं गोळा होतात. उत्सवस्थळापाशी वा मंदिर दर्ग्यापाशी रेंगाळतात, एखादं वडपिंपळाचं नाहीतर आंबा चिंच निंबाचं डेरेदार सावलीचं झाड शोधून तिथे विसावतात, गप्पा होतात, ख्यालीखुशाली विचारून होते. संध्याकाळ होताच माणसं पांगू लागतात आणि दोनेक दिवसात गावातली लगबग कमी होते. विविध ठिकाणी पडलेली पालं उठतात, तंबू काढले जातात, मोठाल्या यांत्रिक खेळण्यांचे जोड ढिले करून त्यांना अवजड मालट्रकमध्ये भरले जाते. मंदिरासमोरचा मांडव सर्वात शेवटी हलवला जातो, निरोपाचे विधी होतात आणि खऱ्या अर्थाने यात्रा संपते. यात्रा काळात हे विधी कुणी करायचे याचेदेखील एक गणित असते, यात्रेतील हरेक धार्मिक गोष्टींचे स्वरूप निश्चित असते. त्याचे मानकरी ठरलेले असतात. जे ते काम ज्याने त्यानेच करावे लागते, त्यात दुसऱ्याची ढवळाढवळ चालत नाही. यात गावातील विविध जातींची माणसं असतात. </span><span style="font-family: Eczar;"> पूजेचा मान, अभिषेक विधी, धुपारती, नैवेद्य अर्पण, दिवाबत्ती, नारळ वाहणे, पालखीला खांदा देणे इत्यादी गोष्टींचे मानकरी असतात. खरेतर ही गावाची सामाजिक वीण असते! यातूनच एकसंध गावकी आकारास येते जी संकटकाळी एकमेकांसाठी धावून जाते. </span></span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><br /></span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;">यात्रा काळ हा जसा हरेक घरातल्या बायकापोरांसाठी कल्ला करणारा काळ असतो तसाच गावातल्या म्होरक्यांना आपले नेतृत्वगुण सिद्ध करण्याचा कसोटीचा काळ असतो. तरुणांसाठी विविध स्पर्धांमधून स्वतःला चमकवण्याची इरस जागते. यात्रेत हौसे गवसे नवसे असे सगळेच आलेले असतात. त्यांच्या दिमतीसाठी आणि गोळा झालेल्या तमाम अठरापगड लोकांसाठी मनोरंजनाच्या खंडीभर गोष्टी उपलब्ध केल्या जातात. खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, हॉटेलं, नटण्या मुरडण्याच्या सामग्रीने सज्ज असलेली दुकानं, कापड चोपड विकणारी दुकानं, सांसारिक वस्तूंची दालनं, पोरासोरांसाठी खेळण्या, आकाशपाळणे, मौत का कुंआ आणि शेकडो जिनसा तिथे मौजूद असतात. या सर्वांच्या जोडीने आणखी एका महत्वाच्या गोष्टीची ओढ यात्रा जाहीर झाल्यापासूनच असते ती म्हणजे तमाशाचा फड! यात्रेची घोषणा होताच सगळ्यांचे कान टवकारले जातात आणि जिकडे तिकडे चावडीपासून वेशीपर्यंत आणि गावाच्या शीवेपासून ते गच्च भरलेल्या पारापर्यंत यंदा तमाशाचा फड कोणता आणला जाईल याची रंगेल चर्चा झडू लागते. </span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><br /></span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;">पानाचा विडा रंगू लागतो, तंबाखूचे बार भरले जातात, दुपारच्या शिळोप्याच्या गप्पांत पत्त्यांचे डाव पिसताना देखील विषय एकच असतो, यंदा कोण? पारुबाई, मंजुळाबाई, हौसाबाई, रखमाबाई, सुनंदा तारा की जया छाया? जो तो आपआपल्या वकुबाप्रमाणे अंदाज वर्तवू लागतो. खरे तर हे अंदाज म्हणजे त्या त्या व्यक्तीच्या इच्छा असत. ज्याला जिची तमाशाची बारी आवडलेली असे तो तिचे नाव घेई आणि म्हणे, "मी तर हिच्याच नावाची चर्चा समदीकडं ऎकलीय बाबांनो!"</span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;">शेतात खुरपणाऱ्या बायकांपासून ते औत धरणाऱ्या सालगड्यापर्यंत सगळ्यांना यात रस असतो. दुपारच्या वक्ताला बांधावर फडक्यातली भाकरी सोडताना शेतातल्या गप्पा याच वळणावर येऊन थांबत. मग कुणी एक बाई सांगे की, "मागल्या साली आल्ती ती लै गंड्याची होती, सदू पाटलाची पार कळा खाल्ली बाई तिनं!" एकीने इतका बोलायचा अवकाश की मग गप्पांना विषयच मिळे. कोणत्या गड्याला तमाशातल्या बाईचा किती नाद याची उजळणीच तिथं सादर होते. मग एखादा म्हाताराच त्यांना वेसण घाले आणि पुन्हा कामाला जुंपे. </span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;">लिगोरी खेळणाऱ्या शेंबड्या पोरांनादेखील यातलं थोडंफार कळतं, ओठावर मिसरूड फुटलेली पोरं तर अगदी कान देऊन या गप्पा ऐकत असतात. मग अशी पोरं आजूबाजूला असली की बायका सावध होतात आणि ओठाला पदर लावून बारीक आवाजात तमाशाचं दळण दळत राहतात. रात्री देवळांतलं कीर्तन आटोपून घराकडं जाणारी पिकली पानं देखील दबक्या आवाजात याची चर्चा करतात, मात्र त्यांचा अंदाज वेगळाच असतो. त्यातला एखादा रंगेल म्हातारा मिशीला पीळ भरत अगदी बेरक्या तऱ्हेने सांगतो, "मंग क्काय? औंदा फेटा हवंत उडिवणार न्हाय का? की उगीच आपलं घरी जाऊनशान घोंगडी ओढून तोंड लपिवणार? नारबाचं गोतार काय ठ्ठीक दिसत न्हाय गड्या, गुडघं आरलं तोंडाचं बोळकं झालं तरी अजुनबी रंगू तेल्याच्या कट्ट्यावर बसूनशान कोंचा फड आणायचा याची गंतं समजिवतो! छ्या गड्या!" वास्तवात हा नारबा यातल्या बहुतांशांच्या मनात दडलेला असे. आयुष्यभर खस्ता खाऊन काबाडकष्ट थकलेली ही ज्येष्ठ मंडळी आपल्या परीने यात्रेतील तमाशाचा वेगळ्या पद्धतीने आनंद घेतात. </span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><br /></span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;">गावातील तरण्या कर्त्यासवरत्या मंडळींसाठी याचे अनेक पैलू असतात. हे सगळे नादिष्ट असतात अशातली गोष्ट नसते. किंवा यांना बाईबाटलीचा नाद असतो असेही नसते, याहीपलीकडे जाऊन गावातल्या जत्रा म्हणजे तमाशातल्या स्त्रियांसाठी हपापलेल्या आंबटशौकिनांचे एकत्र येणे असेही काही नसते. वा निव्वळ वासनांचे डोह ही इथे नसतात. दोन घडीच्या निखळ करमणूकीशिवाय वर्षभर न दिसणारा शृंगाराचा हा एक रांगडा अविष्कार असतो ज्याची गावातल्या तमाम मंडळींना ओढ असते. तमाशाचा फड आला नाही तर यात्रेला अर्थ नसतो असंही काही ठाशीव सूत्र नसतंच, मात्र तमाशाचा फड कुठला आला यावरून गावात कुणाचा किती वट्ट आहे आणि पंचक्रोशीत कोणतं गाव कोणत्या गावाच्या मागेपुढे आहे याचे आडाखे बांधले जातात. याही गोष्टीमुळे गावातल्या यात्रेत कोणता फड येणार याला बऱ्यापैकी महत्व येते. मुळात आताच्या धकाधकीच्या जीवनात आणि डिजिटल काळात खेडी देखील वेगाने बदलू लागलीत, गावकीच्या जुन्या खुणा प्रचंड वेगाने पुसल्या जाताहेत, जुनी प्रतिके मोडून निघताहेत, निव्वळ घरंदारं बदलताहेत असंही नाहीये तर माणसं देखील नव्या युगाच्या कृत्रिम जगण्याच्या दिशेने खेचली जाताहेत. मग आपल्या गावाची ओळख म्हणून निदान यात्रा तरी जपली पाहिजे हा अट्टाहास जपला जातोय आणि त्याला आताच्या दशकात काहीसे अस्मितेचे स्वरूप येऊ लागलेय. याकरिता पुष्कळ माणसं राबतात, एक यंत्रणा उभी केली जाते, मोठ्या प्रमाणात पैसा गोळा केला जातॊ. वास्तवात गावातल्या गावदेवाचा गावकऱ्यांनी वर्गणी गोळा करून केलेला उत्सव म्हणजे यात्रा असं साधंसरळ स्वरूप पूर्वी होतं, ते आता मागे पडून आपल्या गावाची गावदेवाची खूण सांगणारा, अस्मितेचं दर्शन घडवणारा माणसांच्या उत्साहाचा धार्मिक सोहळा म्हणजे यात्रा झालाय. यात्रेत आणला जाणारा तमाशाचा फड हा या सोहळ्याचा अविभाज्य भाग आहे. यात्रा कितीही दिवसांची असली तरी फड आणला जातोच! त्याशिवाय रंगत चढत नाही. </span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><br /></span></div><div><span style="font-size: x-large;"><span style="font-family: Eczar;">राज्यभरात लोककलेचे प्रतिक म्हणून तमाशाकडे पहिले जायचे, मात्र बदलत्या काळानुसार मनोरंजनाची साधने बदलली, लोकांच्या आवडी निवडी बदलल्या, नवनवी साधनं आली, घरबसल्या अफाट मनोरंजन सामग्री उपलब्ध झाली नि जुन्या ढंगाची ठेवणं असणारा तमाशा मागे पडत गेला. लावणी केवळ इव्हेंटपुरती उरली. तमाशा कलावंतांची उपासमार सुरु झाली. मोठाल्या गावांच्याबाहेर असणारी कलाकेंद्रे चालवणं जिकिरीचं काम झालं. त्यात आधुनिक संगीताचा बाज आणि नव्याची नवथर ओढ यात लावणीला देखील उतरतीची कळा लागली. काही वर्षांपूर्वी उत्तरेकडील राज्यांत ज्या वेगाने मुजरा नर्तिका देशोधडीला लागल्या आणि त्यांचे कोठे उध्वस्त झाले त्याच पद्धतीने तमाशा लयास जातो की काय असे वाटत होते. मात्र गावोगावच्या यात्रांनी तमाशाला मोठा आधार दिला आहे हे कुणी नाकारणार नाही. यात्रा काळात साजऱ्या होणाऱ्या तमाशाच्या फडासोबतच जंगी कुस्तीचा फड देखील यात्रेत असतो मात्र कुस्तीचे मैदान कोण मारणार, लाल माती नि मानाची गदा कोणाच्या हाती चमकणार याची सर्वांनाच उत्सुकता असते असे नाही. शिवाय </span><span style="font-family: Eczar;">कुस्त्यांना निदान लोकाश्रय,राजाश्रय आहे परंतु तमाशा फडाच्या बाबतीतले चित्र वेगळे आहे. त्यामुळे यात्रा काळात गावोगावी उभारले जाणारे तमाशाचे फड ही लोककलेची अभूतपूर्व जपणूक आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यामुळे यात्रेसाठी गाव जसे उत्सुक असते तद्वतच तमाशाचे विश्व् देखील उत्सुक असते. कोणत्या गावात कोणता म्होरक्या महत्वाचा आहे आणि कुठं आपली डाळ शिजणार याची गणितं घालून फडमालकांचे वस्ताद गावोगावी आपल्या बारीची रुजवात करून देत फिरतात, गावात याची चर्चा होते. यात्रा कमिटीत यावर ठराव घेताना गावातले दोन तीन दिग्गज गट आपल्या पसंतीची नावं पुढं करतात. ज्याच्या मर्जीतला फड यात्रेत येतो त्याचं गावात वजन असतं असा संदेश यातून जात असल्याने जो तो आपल्या नावासाठी आग्रही असतो. अखेर बऱ्याच मोठ्या गुऱ्हाळानंतर एकदाचा पिट्टा पडतो, बारी पक्की केली जाते. मग सुपारी द्यायची गोष्ट निघते. मोजकी मुरलेली मंडळी एका तर्राट सकाळी जिपडं घेऊन गावातनं सुसाट निघतात ते थेट नारायणगावच्या वाटेला लागतात! </span><span style="background-color: white; color: #050505; font-family: Eczar; white-space: pre-wrap;">पुणे नाशिक महामार्गावरच्या </span><span style="font-family: Eczar;">पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातल्या नारायणगावचा तमाशा पंढरी म्हणून राज्यात नावलौकिक आहे. नारायणगावात राज्यातील सगळे नावाजलेल्या तमाशाच्या राहुट्या असतात. इथेच येऊन गावोगावचे कारभारी तमाशा मालकांना सुपाऱ्या देतात. यंदाही नारायणगावात आतापर्यंत जवळपास ३२ राहुट्या आल्या आहेत. सुरेखा पुणेकर, मंगला बनसोडे, रघुवीर खेडकर, दत्ता तांबे, मालती इनामदार अशा एकाहून एक सरस तमाशाच्या राहुट्या सध्या नारायणगावात आहेत.</span></span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><br /></span></div><div><span style="font-size: x-large;"><span style="font-family: Eczar;">मधल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे सगळीकडेच यात्रा जत्रा झाल्या नाहीत, सिनेमे नाटके तमाशा सगळंच बंद पडलं होतं. यंदा मात्र ही रौनक परतली आहे. </span><span style="font-family: Eczar;">दोन अडीच वर्षानंतर ढोलकीवर पुन्हा थाप पडलीय. घुंगरांचा नाद ऐकायला मिळतोय. आपापले फड गाजविण्यासाठी तमाशा कलावंतांच्या रिहर्सल (सराव) सुरु झाल्यात. निर्बंध हटविल्यानंतर दोन वर्षांच्या खंडानंतर यात्रा-जत्रांचं जंगी आयोजन केलं जातंय. तमाशा पंढरी असलेल्या नारायणगावात गावोगावचे कारभारी आणि गावपुढारी राहुट्यांवर येऊन कलावंतांना सुपाऱ्या देऊन तारीख ठरवतात.</span><span style="font-family: Eczar;"> मोठ्या अंतरानंतर आपली कला सादर करायची असल्याने यंदा कलावंतांनी लवकरच सराव सुरु केलाय. आपला फड चांगला रंगावा, कार्यक्रम उत्तम व्हावा, यासाठी सगळे कलाकार जोमाने तालमी करतायत. यापुढचे सगळे हंगाम निर्विघपणे पार पडो, अशी प्रार्थनाच कलाकार गणरायाचरणी करतायत. </span><span style="font-family: Eczar;">तशी तर महागाई दर साली वाढतच असते. मात्र यंदा तिचे स्वरूप अक्राळविक्राळ असेच आहे. शिवाय यंदा उत्पन्नही कमी आहे तरीही यात्रेस पैसे देताना कुणी फारसं खळखळ करताना दिसत नाही. मात्र दोनतीन साल आधीच्या भावात आता तमाशा फड येऊ शकत नाही. </span><span style="font-family: Eczar;">गॅस जवळपास हजार रुपयांना झालाय तर पेट्रोल डिझेलच्या दरांनीही शंभरी पार केली आहे. तमाशाच्या फडात ५० हून अधिक माणसं असतात. यांचा पगार, </span><span style="background-color: white; color: #050505; font-family: Eczar; white-space: pre-wrap;">मानधन आणि तमाश्याच्या साहित्याचा खर्च हा पेलवण कठीण होत चाललं आहे. </span><span style="font-family: Eczar;">त्यांच्या खाण्यापिण्याचा-येण्याजाण्याचा खर्च देखील कित्येक हजारांत आहेत. चांगली सुपारी मिळावी असं हरेक बारीच्या मा</span><span style="font-family: Eczar;">लकाला वाटतं. </span></span></div></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><br /></span></div><div><span style="font-size: x-large;"><span style="font-family: Eczar;">हरेक गावच्या यात्रेची गोष्ट न्यारीच असते, मात्र दस्तुरखुद्द नारायणगावमध्ये देखील यात्रा भरते आणि तिथेही तमाशाचा फड रंगतो. इथल्या तमाशाचे वैशिष्ट्य असे की विविध कलावंत विना मोबदला आपली कला सादर करतात. एका अर्थाने हा बिन पैशाचा तमाशा होय! नारायणगावात मुक्ताईदेवीची यात्रा भरते तिथे विविध तमाशा बारीवाले आपली कला सादर करतात. आजमितीस पन्नास</span><span style="background-color: white; color: #050505; font-family: Eczar; white-space: pre-wrap;">हून अधिक तमाशे आधुनिक काळातील मनोरंजनाच्या सोयीसुविधांसमोर या नारायणगाव मध्ये तग धरून आहेत. हल्ली ही जिवंत कला टिकवून ठेवण कठीण होऊन बसलं आहे.कमीत कमी ४० ते ५० कलावंत एका तमाशाच्या फडात असतात.यांच मानधन आणि तमाश्याच्या साहित्याचा खर्च हा पेलवण कठीण होत चाललं आहे.तरीही या नारायणगावच्या मुक्ताई देवीच्या यात्रेच्या निमित्तान मात्र आपला तमाशा हे तमाशा फड मालक विना मोबदला दाखवितात.एवढंच नाही तर आपलाच तमाशा व्हायला हवा याकरिता आग्रही असतात. एकीकडे तमाशाचा फड रंगत असताना दुसरीकडे फटाक्यांची आतषबाजी सुरु असते. नारायणगावात याचा मान मुस्लिम समाजाच्या अत्तार कुटुंबास आहे! हे शोभेचे दारूकाम लक्षवेधी असते, लोकांच्या मनात याची वेगळीच उत्सुकता असते. </span></span></div><div><span style="background-color: white; color: #050505; font-family: Eczar; font-size: x-large; white-space: pre-wrap;"><br /></span></div><div><span style="background-color: white; color: #050505; font-family: Eczar; font-size: x-large; white-space: pre-wrap;">यात्रेतले धार्मिक विधी टिपेस पोहोचतात तो दिवस अपार गर्दीचा असतो. एकीकडे देवाला साडी चोळीकापड दिले जाते, कुठे तिखटाचा तर कुठे गोडाचा नैवेद्य अर्पण केला जातो. पूजा आरती संपन्न होते, पालखीत मिरवणूक निघते, रात्री छबिना निघतो गर्दीला लक्ष पाय फुटलेले असतात आणि आकाशातले सहस्रावधी तारे तारका गावातल्या आस्मंतात लकाकत असतात. धार्मिक विधी उरकत येऊ लागले की म्हामूर गर्दी तमाशाच्या तंबूसमोर रेंगाळू लागते. तिकिटं संपतात, गणगौळण सादर होऊ लागल्याचं स्पिकरच्या कर्ण्यातून उमगू लागतं. नमन होते नि मग बतावणी होते. पाहता पाहता वग रंगू लागतो. तंबूत शिट्ट्यांचा पाऊस पडू लागतो. नर्तिकांचे घुंगरू छनछन्नन वाजू लागतात, ढोलकी गर्जू लागते. नुसती राळ उडते. फक्कड लावण्या सादर होत राहतात, प्रेक्षकांच्या डोईवरचे फेटे हवेत उडू लागतात. तमाशा रंगात येतो आणि ज्यांनी बारीची निवड केलेली असते ते समाधानाने भरून पावतात. </span></div><div><span style="background-color: white; color: #050505; font-family: Eczar; font-size: x-large; white-space: pre-wrap;">तीनचार दिसात नाहीतर हप्त्याभरात तमाशाचा तंबू आपलं बस्तान हलवतो, यात्रेचं नवं गाव शोधलं जातं. नवी माणसं नवं गाव समोर येतं मात्र उत्साह तोच असतो. सादरीकरणातला बहारदार आनंदही तोच असतो. गावोगावच्या यात्रा म्हणजे तमाशाच्या देहातल्या आत्म्याची धुगधुगी जित्ती ठेवणाऱ्या धमन्या आहेत, जोवर या धमन्यात ताकद आहे तोवर तरी तमाशा जिवंत राहील याबाबतीत शंका नाही. गावजत्रेचं एक विशिष्ठ धार्मिक अधिष्ठान असूनही लोककलेला आश्रय देणारं हे बलस्थान अत्यंत अभूतपूर्व असं आहे. कारण तमाशा फडांना आता यात्रा जत्रांचाच आधार उरलाय, जोवर यात्रा आहेत तोवर घुंगरू खणकत राहणार हे निश्चित! राज्यभरातील अनेक लावणीसाम्राज्ञीनि विविध यात्रेत मिळवलेले अनुभव हा लोककलेचा जिताजागता इतिहास आणि वर्तमान आहे. त्यांचे येणारे भविष्य देखील याच्याशीच निगडित आहे, निदान त्यांच्या जगण्यासाठी आणि कलावंतांच्या कलेची कदर राखण्यासाठी यात्रेतला हा घटक तगला पाहिजे.</span></div><div><span style="background-color: white; color: #050505; font-family: Eczar; font-size: x-large; white-space: pre-wrap;"> </span></div><div><span style="background-color: white; color: #050505; font-family: Eczar; font-size: x-large; white-space: pre-wrap;">यात्रा संपताच घरे उदास होतात, शेत शिवारे सुन्न होतात आणि परिसर काहीसा उजाड वाटू लागतो, माणसं तोंड बारीक करून कामाला लागतात मग गावातली जाणती माणसं यंदाच्या वर्षी रंगलेल्या तमाशाच्या आठवणी नव्याने सांगू लागतात. गावजीवनातील करमणुकीचा हा परमोच्च दिवस गावकरी आपल्या मनात वर्षभर जतन करून ठेवतात आणि आगामी वर्षासाठी नवी स्वप्ने पाहू लागतात. रोजच्या कष्टातून या आठवणींनी प्रसन्न झुळूक मिळते, उसंत मिळाल्याचा अनुभव येतो आणि मग कष्टकरी बळीराजाचे हात नव्या जोमाने कामाला लागतात! यात्रेतील तमाशाचं अस्तित्व गावजीवनाच्या आत्म्याशी पुरते तादात्म्य पावलेलं आहे याला कुणी विभक्त करू शकत नाही! यात्रा आणि तमाशा हे परस्परांवर प्रेम असणारे असे एकजिनसी अधिभौतिक घटक आहेत की ज्यांची नाळ गावजीवनाशी इतकी घट्ट जुळलीय की गावाच्या डीएनएमध्ये देखील ती आढळावी! </span></div><div><span style="background-color: white; color: #050505; font-family: Eczar; font-size: x-large; white-space: pre-wrap;"><br /></span></div><div><span style="background-color: white; color: #050505; font-family: Eczar; font-size: x-large; white-space: pre-wrap;">- समीर गायकवाड</span></div><div><span style="background-color: white; color: #050505; font-family: Eczar; font-size: x-large; white-space: pre-wrap;"><br /></span></div><div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi6G2wf8lcQWOx5bA6w8C_3LAgWC4QII10MQD_F6mBH49mhUoKeu1C6G8xCZznAEPRccPA2gMmX2FKL3Z1rwU6EYnE-bsad2e9xzkW_O0FT7MEYxNTRIpvCpslvGMnEb0bXEko6vfW0CR-QBd1Ua_jKR5WFhwIcSsD3q-iw7Ntbxh2-cc58PZJO5Kim/s3310/SAVE_20221014_173145.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="3310" data-original-width="2484" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi6G2wf8lcQWOx5bA6w8C_3LAgWC4QII10MQD_F6mBH49mhUoKeu1C6G8xCZznAEPRccPA2gMmX2FKL3Z1rwU6EYnE-bsad2e9xzkW_O0FT7MEYxNTRIpvCpslvGMnEb0bXEko6vfW0CR-QBd1Ua_jKR5WFhwIcSsD3q-iw7Ntbxh2-cc58PZJO5Kim/w480-h640/SAVE_20221014_173145.jpg" width="480" /></a></div></div>sameer gaikwadhttp://www.blogger.com/profile/05106372658264914305noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1120566833830274839.post-19777187215833239942022-11-09T22:27:00.001+05:302022-11-21T20:20:47.351+05:30नंदूची शाळा <div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><img border="0" data-original-height="1280" data-original-width="880" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjYACbkvaybdV3v5me9tysnHmTZBkYgykCnytVjKao_Z-PzFQVqTGsC8yypv2YOqUfPKRhCAWCv9XfSSYfy_t2LReqlo24DCmnkl39zDRISdyeLsY0OB1Wcxb0bQW9scBeRZEb22YJeYM1wggEifB2PltE2_Z1jqE1ZXQKXjhAntWlGajDPZthzFoUn/w440-h640/312247259_5485837494802943_8474024243521025785_n.jpg" width="440" /></div></div><div><br /></div><div><br /></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;">प्राचार्य दत्तात्रेय कदम अत्यंत बेचैन होऊन एकसारखं मोबाईलवरून एक कॉल करत होते. पण फोन काही लागत नव्हता. बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर एकदाचा त्यांचा फोन लागला. अधीर होऊन त्यांनी विचारलं, "काय साळे सर! केंव्हापासून प्रयत्न करतोय फोन लावायचा, पण काही केल्या कॉलच कनेक्ट होत नव्हता..." <br /><br />त्यांचं वाक्य अर्ध्यातच तोडत पलीकडून रामचंद्र साळे उद्गारले, "अहो सर नेटवर्क प्रॉब्लेम आहे. गावाकडे आता दर सांजच्याला हा घोटाळा होतोय." <br /><br />त्यांना थांबवत कदमांनी पुन्हा आपलं संभाषण जिथून तुटलं होतं तिथून सुरु केलं, "ते असू द्यात. मला सांगा नंदूचं काय झालं? भेटला का तो? त्याच्या घरी गेला होतात का तुम्ही? त्याचे आजोबा भेटले का? काय अडचण काही कळलं की नाही? शेवटी काय ठरलं त्यांचं?" कदमांनी प्रश्नांची सरबत्तीच केली. <br /><br />त्यांच्या प्रश्नांना दमाने घेत साळेंनी सगळी माहिती पुरवली. ती ऐकून कदमांचा चेहरा उतरला. ते उदास होऊन मटकन सोफ्यावर बसले आणि 'फोन ठेवतो साळे सर' म्हणत त्यांनी फोन कट केला.<br />इतक्या वेळापासून त्यांचं संभाषण ऐकत, त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून असणारा त्यांचा मुलगा सिद्धार्थ गोंधळून गेला. त्याने वडिलांच्या जवळ जात विचारलं, "बाबा काय झालं? नंदूच्या शाळेचं काही कळलं का? तुम्ही इतके उदास का झाले?" आपल्या चिमुरड्या मुलाचे ते कोमल उद्गार ऐकून त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. त्यांनी त्याला मायेने जवळ घेतले. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. काही वेळ शांत राहून मग म्हणाले, "आता नंदूची शाळा बहुतेक कायमचीच बंद होणार की काय असे वाटू लागलेय."<span><a name='more'></a></span> <br /><br />आपल्या वडिलांना असं हताश होताना पाहून त्या चिमुरड्याचा जीव गहिवरला. त्याने वडिलांना घट्ट मिठी मारली. मग मनाशी काही एक विचार करत तो स्वयंपाकघरात भाजी करणाऱ्या आईपाशी धावतच गेला. त्याने आईच्या कानात काही खुसपुसलं. आई एक मिनिट कोड्यात पडली नि पुढच्याच क्षणी तिने आपल्या मुलाच्या मखमली गालांवरून हात फिरवत त्याचा गोड मुका घेतला. आईने दिलेल्या प्रतिक्रियेने सिद्धार्थ हरखून गेला. त्याच्या चेहऱ्यावर ख़ुशी साफ झळकत होती. आईला हाताशी धरून तो आपल्या बाबांपाशी आला. त्या दोघांनी मिळून त्यांना चार गोष्टी सांगितल्या, मग त्यांच्याही चेहऱ्यावर समाधान विलसले. <br /><br />डावा हात फ्रॅक्चर झाल्याचं दुःख विसरून त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून मोटेवाडीला जायचं ठरवलं. जोडीला मागे लागून आलेला सिद्धार्थही होता. शाळा सुरु झालेल्यास महिना लोटला होता तेंव्हापासून नंदूच्या शाळेचा विषय कदमांच्या घरी चर्चेत होता. दरम्यान कदम सरांचा छोटासा अपघात झाला आणि रजा काढून ते घरीच थांबले आणि तिकडे नंदूचे पुढे काय झाले याची चिंता वाढली. सातवीत गेलेल्या नंदू शेळकेचं गाव आडवळणाचं होतं, तिथून तो मोहोळला जिल्हा परिषदेच्या शाळेत यायचा. अभ्यासात तो फार हुशार होता. मनमिळाऊ, कामसू आणि प्रेमळ अशा नंदूच्या घरी खूप गरिबी होती. त्याचे वडील आत्माराम आणि चुलते शांताराम यांच्यात आपसात दोन एकर कोरडवाहू जिरायत जमीन होती. पाऊस आला तरच त्यात पीक यायचं. एरव्ही सगळा कोरडाठाक मामला होता. सहा वर्षांपूर्वी नंदूच्या काकांनी कर्जबाजारीपणापायी स्वतःला संपवलं होतं, जे की पूर्णतः चुकीचे नि अयोग्य होतं. शांतारामाच्या पाठीमागे त्याची पत्नी आपल्या दोन लहान मुलींना घेऊन कायमची माहेरी निघून गेली. नंदूच्या कुटुंबातील खाणारी तोंडे कमी झाली असली तरी जिवाभावाची माणसं कायमची निघून गेल्याचं दुःख सर्वांनाच होतं. <br /><br />भावाच्या अकाली जाण्याने आत्माराम खचून गेला. पण नंदूच्या आजोबांनीच त्याला धीर दिला. पाऊसपाणी नसेल तेंव्हा नंदूचे अख्खं घरदार रोजंदारीवर कामाला जाऊ लागलं. अपवाद फक्त नंदूच्या अंध आज्जीचा होता. ती बिचारी घरात बसून राही. नंदूची लहान बहिण वनिता हिचा सांभाळ करी. नंदूची आई मालनबाई ही खूप कामाची बाई होती. तिच्या अंगाला गेल्या कित्येक वर्षात नवं कापड नव्हतं पण बिचारीची कसली तक्रार नव्हती. घरात बऱ्याचदा ताजं अन्न नसे, तेंव्हा मायमाऊली स्वतः उपाशी राहून जे आहे ते सर्वांच्या ताटात वाढत असे. आत्माराम हा पहाडी कष्ट करणारा माणूस होता. त्याच्या अंगावरचे जाड्याभरड्या मांजरपाटाचे कपडे मातकट कपडे घामाने ओले झालेले असत तरीदेखील त्याचे हात थांबलेले नसत. आपल्या अंध आईसाठी, थकलेल्या वडिलांसाठी आणि नंदू वनिता साठी ते अफाट काबाडकष्ट करत असत. शेळके कुटुंब कसे तरी करून हाती आलेल्या भाकरीच्या चंद्रात नशिबाची चकोर शोधत असे. आपल्या गरिबीची, आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असलेला नंदू त्यामुळेच अत्यंत जिद्दीने शिकत असे. मन लावून अभ्यास करे. शाळेतील सर्व शिक्षक आणि मित्र त्याला मदत करत. त्याचा वर्गात पहिला नंबर असायचा. <br /><br />दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या काळात शाळांचे वर्ग बंद झाले. नंदूसाठी त्याच्या वडिलांना स्वस्तातला मोबाईल विकत घ्यावा लागला. त्याचे देखील पैसे त्यांच्याकडे नव्हते. पूर्वी शाळा नित्य भरायची तेंव्हा नंदूला त्याचे बाबा पाच किलोमीटरचे अंतर कापत सायकलवरून आणून सोडत, शाळा सुटल्यावर गावाकडे माघारी जाणारा टमटम रिक्षावाला त्याच्यावर दया दाखवून घरी घेऊन यायचा. मात्र ऑनलाईन वर्ग मोबाईलअभावी नंदूला लवकर शक्य झाले नाहीत तरीदेखील त्याने पहिला नंबर कायम ठेवला. मागच्या वर्षी आक्रीत घडलं, नंदूचे वडील कोरोनाच्या साथीत दगावले. त्यांच्या घराचा आधार कोसळला. त्या दरम्यानच्या काळात नंदूच्या काकीने एक गाय सांभाळायला दिली होती तिला पहिल्या वेतात एक गोऱ्हा झाला. त्या खोंडाचा सांभाळ करता करता नंदूला मुक्या प्राण्यांची आणि शेतीवाडीची गोडी लागली. वडील गेल्यानंतर त्याने गावातली गुरे वळण्याचे काम सुरु केले त्यासोबत आपलं पांढरं शुभ्र मखमली खोंडही तो घेऊन जायचा. दुपारनंतर आपल्या आईसोबत हजेरीच्या कामावर तो जाऊ लागला. दमून घरी आल्यावर असतील ते चार घास खाऊन झोपी जाण्याआधी जमेल तसा अभ्यास करू लागला. त्याच्या आईने, आजी आजोबाने खूप सांगितले तरी त्याने आपला हेका सोडला नाही. शिवाय त्याला गायीचा अफाट लळा लागला होता. आता आपण शाळेत कसं जाणार? आधीच घरात कमावणारं कुणीच नाही त्यात आपला खर्च वाढणार त्यापेक्षा आपणच थोडेसे काम करून शाळेला सुट्टी दिली पाहिजे असं त्याचं किशोरमन सांगत होतं. किती गुणी पोर होता तो! त्याला आपल्या कुटुंबाची नि त्यांच्या कष्टांची पैशाची किती किंमत होती ना! त्यासाठी त्यानं आपलं शिक्षण पणाला लावलं होतं. नंदू शाळेत येणार नाही हे कळताच साळे सरांनी त्याच्या घरी जाऊन समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण तो लहानगा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. आपण घरी लक्ष दिले पाहिजे, अंध आजीला सहारा दिला पाहिजे आणि घराचे ओझे उचलले पाहिजे आपल्या वडिलांची कमी भासू देता कामा नये असा निश्चयच त्याने केला होता. त्यापुढे साळे सरांचे काहीच चालले नाही. हा सर्व वृत्तांत त्यांनी वेळोवेळी कदम सरांच्या कानी घातला होता. कदम सरांच्या घरी नंदूविषयी असीम मायेची नि प्रेमाची प्रतिमा तयार झाली होती. त्याच्यावरील प्रेमापायीच आता ते नंदूच्या गावी आले होते.<br /><br />"नंदू ए नंदू!"<br />कदम सरांनी आवाज देताच आपल्या खोपटातून नंदू बाहेर आला. साक्षात आपले हेडसर, प्राचार्य घरापाशी आलेले पाहून त्याला गहिवरून आलं आणि धावतच जाऊन त्याने त्यांना मिठी मारली. त्यांनी त्याला मायेने जवळ घेतले. एक शब्दही न बोलता दोघांच्या डोळ्यांना अश्रूच्या धारा लागल्या. त्या दृश्याने सिद्धार्थचेही डोळे पाणावले. त्याने नंदूला घट्ट मिठी मारली. <br /><br />कदम सर नंदूला कवटाळून त्याच्या घराबाहेरील बाजेवर बसले. त्यांचा आवाज ऐकून नंदूची आजी आजोबा बाहेर आले. अत्यंत विनम्रतेने सरांनी त्यांचे चरणस्पर्श केले. थोड्याच वेळात नंदूची आई देखील धावत पळत धापा टाकत तिथे हजर झाली. कदम सरांना पाहून तिला कोण आनंद झाला! त्या मायमाऊलीच्या डोळ्यांना धारा लागल्या. कदम सरांना राहवले नाही, पुढे होत त्यांनी नंदूच्या आईच्या मस्तकावर हात ठेवला आणि म्हणाले, ताई रडू नका, तुमचा हा भाऊ अजून जिवंत आहे. सगळं माझ्यावर सोडा. फक्त नंदूला शाळेसाठी राजी करा. बाकी सगळं मी सांभाळतो!"<br />त्यांचे हे उद्गार ऐकून नंदूच्या वयोवृध्द आजीआजोबांनी हात जोडले. कदम सर त्यांच्याजवळ गेले आणि त्यांनी त्यांना मायेने जवळ घेतलं. नंतर बरीच चर्चा झाली. कदम सर आणि सिद्धार्थ तिथून हसतमुखाने समाधानी मुद्रेने बाहेर पडले. निघताना नंदूच्या आईने त्यांच्या हातावर पिवळ्याजर्द गुळाचा छोटासा खडा ठेवला. <br /><br />त्या दिवसापासून नंदूची शाळा पूर्ववत सुरु झालीय. आता तो कदम सरांच्या घरी राहतोय. सिद्धार्थशी त्याची चांगली गट्टी जमलीय. नंदूजवळची गाय आणि तिचे खोंड तालुक्याच्या गावी गोशाळेत देखभालीसाठी ठेवलेय, तिथे असणारा सरांचा शिष्य नंदूच्या घरी लिटरभर दुध पोहोच करतो. नंदूच्या घरी आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून सरांनी सरकार दरबारी विशेष प्रयत्न केले त्याला यश आलेय. त्याच्या घरची आर्थिक तंगी काही अंशी तरी दूर झालीय. नंदूचं दुःख आभाळाहून मोठं असलं तरी त्याचं समजूतदार मन त्याहून विशाल आहे त्याच्या बळावर तो आयुष्यात यशस्वी होणार याची खात्री आहे. <br /><br />दिवसभर अभ्यास करून रोज रात्री नंदू झोपी जातो तेंव्हा त्याच्या स्वप्नात गाव येतं, घर येतं. थकलेले आजोबा आणि अंध आजी त्याचा लाड करताना दिसतात. आईच्या मखमली हातानी जोजवत तिच्या कुशीत झोपल्याचा त्याला भास होतो. रात्री कधी जाग आलीच तर त्याची नजर दूर निळ्याकाळ्या आभाळात जाते, जिथे लुकलुकत्या चांदण्यात त्याला त्याच्या प्रेमळ वडिलांचा हसरा चेहरा दिसतो, मग नंदू पुन्हा डोळे मिटून शांतपणे झोपी जातो. <br /></span><br /> </div>sameer gaikwadhttp://www.blogger.com/profile/05106372658264914305noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1120566833830274839.post-45636146707072234332022-11-09T00:09:00.001+05:302022-11-19T00:20:58.799+05:30टिकली, कुंकू आणि सुधा मूर्ती! <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhAuyjTONmS3R8XPhzc3QGJPHGl3mTi51mofZ_y2tglYZHYv_0cnCzoO7FPCIh_mimBewaPvRANqaocP-hvMRUdeYYNlaWnL5wBJOgqZ_OynVnIDOQ00SOeAeCq4Reajq_AlfYDH-TrJlQFp3LmUivtUqrc0XC2yk8rxzullNi11J5CmD6JIvTnrQBD/s1200/pic.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="900" data-original-width="1200" height="480" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhAuyjTONmS3R8XPhzc3QGJPHGl3mTi51mofZ_y2tglYZHYv_0cnCzoO7FPCIh_mimBewaPvRANqaocP-hvMRUdeYYNlaWnL5wBJOgqZ_OynVnIDOQ00SOeAeCq4Reajq_AlfYDH-TrJlQFp3LmUivtUqrc0XC2yk8rxzullNi11J5CmD6JIvTnrQBD/w640-h480/pic.jpg" width="640" /></a></div><br /><div><br /></div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;">सुधा मूर्ती या विख्यात उद्योगपती नारायण मूर्तींच्या पत्नी आहेत. नारायण मूर्तींची 'इन्फोसिस' ही कंपनी आयटी क्षेत्रातील एक दिग्गज रोजगार निर्मिक आहे. 'इन्फोसिस'च्या तगड्या सात आकडी पगाराचे अनेकांना आकर्षण असते.मध्यमवर्गास आर्थिक सुबत्ता, आयुष्यभर वंचित राहावं लागलेल्या ऐश आरामी जीवनशैलीचं अत्यंत तीव्र नि छुपं आकर्षण असतं. त्यामुळे नारायण मूर्ती आणि तत्सम लोक यांच्यासाठी अत्यंत प्रातःस्मरणीय आदर्श असतात. वास्तवात या दांपत्याने औद्योगिक जगतात जे करून दाखवले आहे त्याला तोड नाही. आयटी सेक्टरमध्ये इन्फोसिसचा दबदबा अजूनही कायम आहे. या बाबतीत मूर्ती दांपत्य निश्चितच कौतुकास पात्र आहेत, त्यांचे हे कार्य उत्तुंग पातळीवरचे आहे हे कुणीही मान्य करेल. <br /><br />सुधा मूर्तींच्या संवादात, भाषणात वा व्यक्त होण्यात एक उल्लेख नेहमी येतो. तो म्हणजे आपल्या पतीच्या उद्योगासाठी आपले दागिने विकण्याच्या घटनेचा. जोडीनेच पतीच्या मेहनतीस सकारात्मक साद दिली वगैरे वगैरे.<span><a name='more'></a></span> <br /><br />सुधा मूर्ती अब्जाधीश पतीच्या पत्नी आहेत, सुविद्य नि धनवान अपत्याच्या माता आहेत. आता तर ब्रिटिश पीएमच्या सासूबाई आहेत. <br />असं असूनही त्यांचं राहणीमान सामान्य मध्यमवर्गीय लोकांना ज्याचं अप्रूप वाटतं त्या पद्धतीचे आहे, म्हणजेच अगदी साधं सुधं! भडकपणा नसणारं असं त्या राहतात.<br />आपल्याकडे या गोष्टींचं भांडवल केलं जातं अमका कलेक्टर पायरीवर बसला होता, फलाण्या मंत्र्यांकडून सायकलचा वापर होतो, ढिमका विना इस्त्रीचे कपडे घालतो, तमक्याने अमूक तमूक साधेपणा अंगीकारला होता. इत्यादी.<br /><br />धर्माच्या आणि संस्कृतीच्या बऱ्याचशा कथित खुणा वा प्रतिकं सुधा मूर्ती यांच्या अंगी दिसतात. नाकात नथ, भाळी कुंकू, पायात जोडवी, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या इत्यादी ठसठशीतपणे दिसेल अशा पद्धतीने असतं. <br />वृंदा करात देखील रुपयाएव्हढं कुंकू लावतात! अर्थात हा ज्याच्या त्याच्या अभिरुचीचा, विचारपद्धतीचा आणि जीवन अनुसरण पद्धतीचा मुद्दा असल्याने त्याबद्दल कुणा एकाला त्या व्यक्ती विषयी आक्षेप असण्याचा मुद्दा नाही.<br />वैयक्तिक रित्या याविषयी आधुनिक विचारधारा वा मतभिन्नता असू शकते जी उचित आहे.<br /> <br />मध्यम व उच मध्यमवर्गीयास ज्यांचा प्रचंड हव्यास आहे अशा एका अब्जाधीश उद्योगपतीची पत्नी सामान्य सांसारिक स्त्रीला जी जीवनपद्धती आदर्श संस्कारिक वाटते तिचा अंगीकार करते याचे विलक्षण कौतुक त्या वर्गातील मंडळींना वाटतं. <br />समाजमाध्यमं आणि मीडिया याला खतपाणी घालत राहतो, कारण त्यात त्यांना क्लिकबाईटचे मूल्य दिसते. <br /><br />सुधा मूर्तींनी लिहिलेल्या पुस्तकांवर नुसती नजर टाकली तरी लक्षात येईल की त्यांचा टोन कोणता आहे! <br />पत्नी आणि पती यांनी आपसी सामंजस्य कसे राखावे, नात्यांत विश्वास कसा राहावा, आयुष्यातील विविध टप्प्यावर संघर्षास कसे सामोरे जावे, जीवनातील आखीव रेखीव आदर्श संकल्पना असलेली कथामूल्ये, नकळत केल्यागत वाटावं अशा धाटणीचं उदात्तीकरण, सांसारिक जीवनतत्वे इत्यादींवर त्यांचा भर आहे. <br />अर्थातच अशा लेखनाचा चाहता वर्ग कोण आहे हे वेगळे सांगायला नको. <br /><br />श्रमिक, कष्टकरी, शेतकरी, दारिद्रय रेषेखालचा वा अगदी कनिष्ठ वर्गीय व्यक्तीची स्वप्ने फार मोठी नसतात. <br />आयुष्यातील रोजच्या लढाईस ते वैतागलेले असतात. <br />त्यामुळे अगदी भुरळ पडावी अशा अब्जाधिशाचं आयुष्य जगण्यासाठीची तडफड त्यांच्या गावी नसते. सबब त्यांना इन्फोसिस, नारायण मूर्ती, सुधा मूर्ती, 'वाईज अँड अदरवाइज' - 'आयुष्याचे धडे गिरवताना' - 'तीन हजार टाके' - 'सर्पाचा सूड' - 'गरुडजन्माची कथा' इत्यादीमधलं काहीच ठाऊक नसतं. <br /><br />सामाजिक विषमता, जातीय वर्चस्ववाद, तळातील लोकांचे शोषण, असमतोलाविरोधातला विद्रोह, व्यवस्थेनं सरकारचं मांडलिकत्व पत्करणं याविषयी त्यांची लेखणी मौन आहे. <br />तरीही त्यांच्या लेखनाचं, वागण्याचं अप्रूप असणारा शहरी, निमशहरी वर्ग एका विशिष्ठ विचारांच्या कुपीत बंदिस्त आहे. <br /><br />सुधा मूर्ती त्यांना हवे असलेले धार्मिक अधिष्ठान खुलेपणाने करताना दिसून येतात. <br />त्या प्रार्थनास्थळांना भेटी देतात, माथा टेकवतात. <br />त्या आस्तिक आहेत आणि ईश्वरी पूजेवर त्यांचा विश्वास आहे हे त्यांनी कधी लपवलेले नाही, हा त्यांचा धार्मिक धारणेच्या स्वातंत्र्याचा भाग आहे त्या स्वातंत्र्याचा आदर असला पाहिजे. <br /><br />परवा दिवशी संभाजी भिडे यांना त्या भेटल्या. <br />भेट कशी झाली, का झाली, कोणत्या हेतूने झाली, भेटीचे फलित काय इत्यादी मुद्दे खऱ्या अर्थाने त्या दोघांनाच ठाऊक असणार आहेत. इतरांनी काढलेले अन्वयार्थ नेमकेच असतील असं म्हणता येणार नाही. <br />भिडे यांना भेटताना त्यांच्या त्या पाया पडल्या. <br />हा देखील त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा आणि अभिव्यक्तीचा भाग आहे, किंबहुना जडणघडणीचा देखील भाग आहे. <br /><br />भिडे यांच्या पाया पडल्यानंतर त्या बोलताना दिसतात की <table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: right; margin-left: 1em; text-align: right;"><tbody><tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg4eisOTD_sx-CTeaNVGQJw5Gss9nrW3QAUP7e_-iMxb4QoJoQ1pPKpCU2LwOrWAlrkqEeTN9AHfWK0epeoOAO7RFYYBcV-_bnL8F2zEIM6IToR0guZG5zmk3o-VbkKf4ukFKs9Exn33kL5NAjNCTgC8FxtvmygITAp6zBDxsmGUAptyBtxXkKv1f3P/s640/bharat-mata-abanindranath-tagore.jpg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="640" data-original-width="428" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg4eisOTD_sx-CTeaNVGQJw5Gss9nrW3QAUP7e_-iMxb4QoJoQ1pPKpCU2LwOrWAlrkqEeTN9AHfWK0epeoOAO7RFYYBcV-_bnL8F2zEIM6IToR0guZG5zmk3o-VbkKf4ukFKs9Exn33kL5NAjNCTgC8FxtvmygITAp6zBDxsmGUAptyBtxXkKv1f3P/w428-h640/bharat-mata-abanindranath-tagore.jpg" width="428" /></a></td></tr><tr><td class="tr-caption" style="text-align: center;">भारतमाता </td></tr></tbody></table>आपण खूप वर्षांआधी भेटलो होतो का?<br />म्हणजेच त्यांची ओळख जुनी असावी का ?आणि नि त्यांनी ती ध्यानात ठेवली असावी का?<br />भेटीचा व्हिडीओ सुधामूर्ती यांच्या ट्विटर हॅन्डलवर त्यांनी पोस्ट केलाय म्हणजे ती भेट त्यांना तितकी महत्वाची वाटलीय की त्याचा त्यांना आनंद आहे आणि त्यांनी ती शेअर केलीय. <br />हे हॅन्डल त्यांचे नाही असे काही लोक म्हणत असले तरी त्यावरही त्यांनी कुठले भाष्य केलेले नाही.</span><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;">काही दिवसानंतर हे ट्विट आमचे नाही असा त्रोटक खुलासा करताना आपण भिडे गुरुजी यांना पहिल्यांदा भेटलो असून त्यांच्याविषयी काही माहिती नाही असे सांगितले गेलेय. </span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;">शिवाय ते वयस्कर असल्याने त्यांच्या पाया पडले असल्याचा खुलासाही केला गेलाय. <br />असे असले तरी भिडेंनी त्यांच्याशी आनंदाने संवाद साधलाय. <br /><br />आता गंमत पाहा. <br />सुधा मूर्ती यांचे विचार काय आहेत, त्यांचं वैचारिक विश्व कोणत्या परिघातलं आहे याचे दाखले त्यांचं साहित्य देतं. <br />त्यांची धार्मिक विचारसरणी काय आहे याची साक्ष त्यांचं राहणीमान देतं,<br />समाजातील ज्या व्यक्तींना त्या भेटतात त्याविषयी काय वाटतं याचे पुरावे त्यांच्या सोशल मीडियावर उपलब्ध आहेत.<br /><br />इथे तर सुधा मूर्तींनी कुठला मुखवटाही लावलेला नाही! त्यांना भिडे यांची कुठली कुठली अडचण नाहीये. पाया पडण्यातही त्यांना गैर वाटत नाहीये. सारं काही त्यांच्या इच्छेनुरुप तर झालंय असं सध्या तरी दिसतंय(!)<br />या सर्व घटनाक्रमामुळे डॉलरप्रेमी तरीही कथित संस्कृतीरक्षक असणाऱ्या वर्गातला छानसा उन्माद जाणवला! <br /> <br />असं असूनही सुधा मूर्तींनी भिडे यांच्या पाया पडल्यानंतर काहींनी उद्वेगाने, तर काहींनी चकित होत तर काहींनी संताप व्यक्त करत पोस्ट केल्या! <br />बहुधा काहींचा भ्रमनिरास झाला असावा! यांनी त्यांना जसं समजलं तशा त्या कधी नव्हत्याच! त्यांचा पैस जोखायला हे लोक चुकलेत! <br /><br />सुधा मूर्ती त्यांच्या आकलनाप्रमाणे, जडणघडणीप्रमाणे, वकुबाप्रमाणे नि धार्मिक - सामाजिक जाणिवांप्रमाणेच तर वागल्यात! त्यांनी कुठे भूमिका बदललीय? <br /><br />- समीर गायकवाड</span><p></p></div>sameer gaikwadhttp://www.blogger.com/profile/05106372658264914305noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1120566833830274839.post-70693817225867735652022-11-03T23:52:00.015+05:302022-11-19T00:01:09.871+05:30विधवा स्त्री भारतमाता नसते का? <div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj5M3qviGXL2Vl9pFOx62X83RT79KyU-cqFJGd630CFn8rbHIhLmS1mbkOye4Ae5zR0NQyYEmG57CCua0NeBb552zpc32SXnnrax1twiedWaZ6ON9h4V37IKCMBvXhQNm-_sUQzQP_siKjgVsXCe7hpncqPd1a88K2LZa_tpbYBiYkrQzE0IYSvB04r/s1276/maxresdefault.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="672" data-original-width="1276" height="338" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj5M3qviGXL2Vl9pFOx62X83RT79KyU-cqFJGd630CFn8rbHIhLmS1mbkOye4Ae5zR0NQyYEmG57CCua0NeBb552zpc32SXnnrax1twiedWaZ6ON9h4V37IKCMBvXhQNm-_sUQzQP_siKjgVsXCe7hpncqPd1a88K2LZa_tpbYBiYkrQzE0IYSvB04r/w640-h338/maxresdefault.jpg" width="640" /></a></div><br /></div><div><br /></div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;">"विधवा स्त्री भारतमाता नसते.<br />विधवेने कुंकू लावू नये!"<br />किती गरळ आहे यांच्या मनात!<br /><br />23 जानेवारी 1664 रोजी शहाजी राजे निवर्तले. <br />6 जून 1674 रोजी शिवबांचा शपथविधी झाला तेंव्हा जिजाऊ मां साहेब हयात होत्या. राज्याभिषेकानंतर अकराच दिवसांत त्यांचे दुःखद निधन झाले.<br />शहाजी राजांच्या मागे उर्वरित दहा वर्षात वा पुढच्या इतिहासात त्यांचं महत्त्व कमी झालं का?<br />कधीच नाही!<br /><br />आपण अजून मागे जाऊ या.<br />दशरथ राजाची पत्नी कैकेयी हिच्या अट्टाहासापायी राम, सीता, लक्ष्मण वनवासाला गेले. पुत्रविरहाने दशरथ राजे व्याकुळ होऊन मरण पावले.<br />दशरथांच्या पश्चात कौशल्येस हीन लेखले गेले का?<br />नाही!<span><a name='more'></a></span><br /><br />पंडू राजाच्या निधनानंतर कुंतीस कमीपणा आला का?<br />नाही!<br /><br />आता आणखी एक परंतु अत्यंत महत्त्वाचे उदाहरण पाहू.<br />संभाजी भिडेंचा मुख्य प्रभाव सांगली कोल्हापूर भागात आहे त्यामुळे तरी हा प्रश्न नक्कीच पडला पाहिजे.<br />3 मार्च 1700 रोजी छत्रपती राजाराम महाराज निवर्तले तेंव्हा त्यांच्या पत्नी ताराराणी पंचवीस वर्षांच्या होत्या.<br />पतीच्या निधनानंतर या लढवय्या झुंजार स्त्रीने हार न मानता स्वराज्यावर चालून आलेल्या औरंगजेबाच्या संकटाचा सामना केला.<br />त्याला याच मातीत गाडलं.<br /><br />1706 मध्ये औरंगजेब मेल्यानंतर पुढे पंचावन्न वर्षे ताराराणी विविध संकटांना झुंजत होत्या.<br />मराठा साम्राज्यातील सर्वाधिक पराक्रमी स्त्री म्हणून गौरवल्या गेलेल्या भद्रकाली ताराराणींचा सारा पराक्रम वैधव्यकाळातलाच आहे!<br />मग त्या विधवा होत्या की सौभाग्यवती होत्या याने काय फरक पडतो?<br /><br />19 मार्च 1754 रोजी पती खंडेराव होळकर यांचा मृत्यू झाला तेंव्हा अहिल्यादेवी होळकर 29 वर्षांच्या होत्या.<br />त्यानंतरच्या काळात अहिल्यामाईंनी जे अप्रतिम शासन केलं ते विख्यात आहे. <br />ब्रिटिश लेखकांनी त्यांची तुलना कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ मार्गारेट यांच्याशी केलीय यावरून त्यांच्या महान शासनपद्धतीची कल्पना यावी.<br /><br />पतीच्या निधनानंतर तब्बल एकेचाळीस वर्षे त्यांनी राज्यकारभाराचे शकट हाकले. आजही त्यांच्या शासनप्रणालीचे दाखले आपण देतो.<br />पतीच्या अपरोक्ष जगताना त्यांचा पराक्रम झळाळून उठला आहे, त्यांची देदीप्यमान कारकीर्द तेजस्वीच होती. त्या विधवा असल्याने त्यात कुठेही कमीपण आलेलं नाही.<br />मी तर त्यांना भारतमातेचं ओजस्वी स्वरूप मानतो!<br /><br />जोतिबांच्या निधनानंतर सावित्री माईंनी सात सत्यशोधक समाजाचे काम खंबीरपणाने सांभाळले. आपल्या कर्तव्यापासून त्या ढळल्या नाहीत की त्यांचा आवेशही कमी झाला नाही. त्यांनी दाखवलेल्या समतेच्या मार्गावरून कोट्यवधी सावित्रीच्या लेकी शिक्षण घेताहेत. <br />मग सावित्रीमाई विधवा झाल्या होत्या म्हणून त्यांना भारतमाता म्हणण्यास हे नकार देणार आहेत का? <br /><br />याने समाधान होत नसेल तर अजून एक महत्वाचे उदाहरण पाहू. <br />हे उदाहरण तर अगदी बोलके आहे, अगदी भिडे आणि त्यांचे समर्थक देखील यावर निरुत्तर होतील.<br /><br />भारतमातेच्या स्वातंत्र्यलढ्याचे एक मुख्य प्रतीक म्हणून झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचा उल्लेख होतो. त्यांचा पराक्रम सर्वांनाच ज्ञात आहे.<br /><br />१८५७ चे बंड होण्याआधीच २१ नोव्हेंबर १८५३ रोजी राणी लक्ष्मीबाईंचे पती गंगाधर नेवाळकर यांचा मृत्यू झाला.<br />त्यानंतरची तीन वर्षे राणी लक्ष्मीबाईंनी इंग्रजांना कडवी झुंज देण्यात घालवली आहेत. ५ जून १८५७ रोजी झाशीच्या सैनिकांनी इंग्रजांविरोधात एल्गार केला. त्या लढ्यात राणीस वीरमरण आलं!<br /><br />लक्ष्मीबाई विधवा झाल्या होत्या तेंव्हा त्या कुंकू लावत नव्हत्या मात्र भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या त्या प्रतीक आहेत. मग त्यांच्यात भारतमाता नाहीये का ? <br />भारतमातेच्या रूपात राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी, ताराराणी, जिजाऊ, कुंती, कौशल्या या स्त्रिया रुजत नाहीत का?<br /><br />मुळात भारतमाता विधवा की सवाष्ण हे ठरवणारे हे कोण? आई ही आईच असते ती विधवा असो वा सधवा असो त्याने काय फरक पडणार आहे?<br />स्त्री विधवा असो वा सधवा असो त्याने तिच्या कारकिर्दीस, जगण्याच्या लढाईस कमीजास्त लेखता येत नाही. तिच्यात भारतमाता असल्याने तिने कुंकू लावले पाहिजे हे थोतांड ठरवणारे हे कोण?<br /><br />भिडे त्या पत्रकार महिलेस म्हणाले की, "तुला मी भारतमाते सारखं मानतो. तू आधी कुंकू टिकली लाव मगच मी तुझ्याशी बोलेन, कारण भारतमाता विधवा नव्हती!"<br />हा केवळ त्या पत्रकार महिलेचा अपमान नसून समग्र विधवा स्त्रियांचा अपमान आहे. <br /><br />विधवा स्त्री भारतमाता का असू शकत नाही असा त्यांना सवाल करायला हवा होता.<br />इतिहासातील पराक्रमी महिलांचे दाखले त्यांना द्यायला हवे होते. <br />जिजाऊ, ताराराणी, अहिल्यादेवी, राणी लक्ष्मीबाई यांना आपण भारतमातेचेच रूप मानतो.<br />भिडे वा आणखी कुणी त्यांना तसं मानत नसतील तर तो त्यांचा कोतेपणा आहे.<br /><br />वास्तवात इथे त्या पत्रकार महिलेस अडवण्याचा मुद्दा नसून बुरसटलेल्या सनातनी पुरुषी मानसिकतेचा मुद्दा आहे जी विधवा स्त्रीला कमी लेखते, विधवेवर धर्माच्या नावाखाली बंधने लादते. जग कुठे चाललेय आणि हे अजून पुरुषी वर्चस्ववादी मानसिकतेच्या डबक्यात खितपत पडले आहेत!<br /><br />ज्यांच्या ज्यांच्या घरी विधवा स्त्री आहे ते तिला भारतमाता मानत नसतील तर आनंद आहे!<br /><br />भिडेंनी कुणाशी बोलायचं वा कुणाशी न बोलायचं हे भिडे ठरवतील. ते त्यांचे स्वातंत्र्य आहे, त्यात गैर काहीच नाही.<br />मात्र न बोलण्यासाठी त्यांनी जे कारण दिलेय ना ते छद्मी आहे, विधवा स्त्रियांना हीन लेखणारे आहे. स्त्रियांच्या हक्कावर गदा आणणारे आहे.<br /><br />या देशातील सर्वच स्त्रियांना मी भारतमाता मानतो.<br />मग तिचा पती असणं, नसणं वा तिचं अविवाहित असणं याने देखील मला फरक पडत नाही.<br />मग तिने कुंकू लावून बोलावं की आणखी कसं राहावं हा त्या त्या स्त्रीचा हक्क आहे. तिने कुंकू लावावे याचे कारण भारतमाता विधवा नव्हती असं म्हणणं विधवांवर अन्याय करणारं आहे.<br /><br />- समीर गायकवाड</span><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;"><br /></span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;">#भारतमाता #विधवा #realqueen </span></div><div><span style="font-family: Eczar; font-size: x-large;">#sameerbapu #समीरबापू #sameergaikwad </span></div>sameer gaikwadhttp://www.blogger.com/profile/05106372658264914305noreply@blogger.com0