शुक्रवार, २९ एप्रिल, २०२२

'अल-अक्सा'च्या संघर्षाची रक्तरंजित पार्श्वभूमी...


‘अल-अक्सा’ मस्जिदीवरून उद्भवलेला संघर्ष जाणून घेण्याआधी तिथला इतिहास जाणून घेणं अनिवार्य आहे. या भूमीचा इतिहास सांगतो की ख्रिश्चन, मुस्लिम आणि ज्यू यांच्यात सातत्याने रक्तरंजित वर्चस्वाची अमानुष लढाई होत राहिली. गत दोन सहस्रकाच्या इतिहासात कधी मुस्लिम एकटे पडले तर कधी ख्रिश्चन तर कधी ज्यू ! सद्यकाळी ज्यूंना ख्रिश्चनांचा अप्रत्यक्ष पाठींबा आहे आणि मुस्लिम जगत एकाकी पडलेय. या संघर्षाची इतिश्री कशी व कधी असेल हे कुणीच सांगू शकत नाही. जगभरातल्या ज्यूंनी जेरुसलेमजवळची भूमी बळकावत, काबीज करत इस्राईलला स्वतंत्र राष्ट्र घोषित केलं, अरब जगतात खळबळ उडाली. १९४६ ते १९५० या काळात नित्य चकमकी होत राहिल्या आणि पॅलेस्टाईनच्या भूमीवर रक्ताचे पाट वाहत राहिले. मुस्लिमांनी ज्यूंना कधीकाळी विस्थापित केलं गेलं होतं त्याची ती दाहक, संहारक आणि सुनियोजित प्रतिक्रिया होती, जी एका ठाशीव आकृतीबंधातून आकारास आली होती. तर इस्राईलचा बिमोड करण्यासाठी तत्कालीन युनायटेड अरब रिपब्लिकने (आताचे ईजिप्त, सीरिया आणि जॉर्डन) कंबर कसली. त्यांच्यात सातत्याने युद्धे होत राहिली.

गुरुवार, २८ एप्रिल, २०२२

अलेक्झांडर पुश्किनची गोष्ट - डाकचौकीचा पहारेकरी



अलेक्झांडर पुश्किन

अलेक्झांडर पुश्किन हा रशियन साहित्यिक. त्याच्या कविता, नाटके, कादंबऱ्या आणि कथा प्रसिद्ध आहेत. त्याच्या एका विख्यात कथेचे हे सार. काळीज हलवून टाकेल अशी गोष्ट. पुश्किनचा काळ आजपासून दोनशे वर्षांपूर्वीचा आहे त्यानुषंगाने या कथेतील बारकावे समजून घेतले तर कथा अधिक उठावदार वाटते. कित्येक दशकांपूर्वी डाकपत्र व्यवहाराला अत्यंत महत्व होतं. जिथे वैराण वस्त्या असायच्या तिथेही पत्रे पोहोच व्हायची, साहजिकच या खात्याशी सर्वांचा स्नेह असे. दीर्घ पल्ल्याच्या प्रवासमार्गांवर इथे वाटसरूला थांबण्याची, आराम करण्याची, अल्पोपहाराची सोयही असे. खेरीज आर्थिक व्यवहारदेखील डाकमाध्यमातून होत असल्याने पहारेकऱ्याची नेमणूक असे. तिथे येणाऱ्या संशयास्पद व्यक्तींना जेंव्हा तो दाद देत नसे तेंव्हा त्याला दमदाटी व्हायची वा त्याच्याशी वाद व्हायचे. त्याच्या जागी स्वतःची तुलना केल्यासच त्याचे दुःख कळू शकते. पोस्टचौकीचा पहारेदार नेमका कसा असायचा हे गतकाळाच्या संदर्भांतूनच उमगते. दिवस असो की रात्र त्याला शांतता नसे. अलेक्झांडर पुश्किन यांनी संपूर्ण रशियामध्ये प्रवास केल्याने सर्व महामार्ग त्यांच्या परिचयाचे ! पुश्किनना ओळखत नसावा असा पोस्टऑफिसचा एखादाच पहारेकरी असावा. जनतेत यांची प्रतिमा चुकीची होती. वास्तवात ते शांतताप्रिय, सेवाभावी, मनमिळाऊ, नम्र, पैशाचा लोभ नसणारे असत. अशाच एका पहारेदाराची ही गोष्ट. सॅमसन वॉरेन त्याचं नाव.

मंगळवार, २६ एप्रिल, २०२२

पन्नाशी पार केलेल्या 'पिंजऱ्या'च्या काही नोंदी -


आमच्या इकडे 'पिंजरा' हा एक कोडवर्ड आहे.थेट कर्नाटकमधील गुलबर्ग्यापासून ते पुणे जिल्ह्यातील चौफुल्यापर्यंत आणि बसवकल्याणपासून ते थेट नगर जिल्ह्यातल्या राहुरीपर्यंत आणि इकडे शेजारी उस्मानाबाद लातूर जिल्ह्यात देखील सढळ हाताने याचा वापर होतो.

रिकाम्या पिशवीची घडी घालून दुमडून हाती घेऊन एकट्या दुकट्याने रस्त्याच्या कडेने उभ्या असलेल्या महिला सर्रास दिसतात. हायवेवर ढाब्याजवळ या अधिक दिसतात. भिरभिरत्या नजरेने या रस्त्याकाठी उभ्या असतात. यांना 'नेमकं' ओळखून एखादं वाहन थांबलं की या पुढे होतात. वाहनचालकाशी वा आतील इसमांशी त्यांचं बोलणं होतं. डील झाली की ती बाई त्या वाहनात बसून निघून जाते.
कधी कधी बोलणं फिसकटतं, कधी बोलणं होतच नाही मग उन्हे उतरल्यावर त्या माघारी फिरतात.
वाहनासोबत गेलेली बाई रात्री बऱ्याच उशिरा वा दुसऱ्या दिवशी तिच्या घरी परतते. हायवेवरचं लोअर ग्रेड ट्रॅफिक या बायकांना 'पिंजरा' म्हणतं !
'डायवर' 'किन्नर' यांच्या देहाची आग शमवणारा 'पिंजरा' !

मंगळवार, १२ एप्रिल, २०२२

राजपक्षे प्रायव्हेट लिमिटेड'स् श्रीलंका !


आपल्या देशाच्या शेजारील काही देशांत बऱ्याच दिवसांपासून प्रचंड अस्वस्थता आहे. म्यानमारमधील आंग स्यान स्यू की यांचे लोकनियुक्त सरकार उलथवून तिथे लष्कराने कमांड सांभाळलीय. बांग्लादेशमध्ये हिंसक कारवायांना ऊत आलाय, नेपाळमधील राजकीय अस्थिरता कधीही देशाला गर्तेत नेऊ शकते, मालदीवमधले संकट काहीसे निवळताना दिसतेय तर पाकिस्तानमध्ये अकस्मात सत्तांतर झालेय आणि श्रीलंकेमधील विविध स्तरावरची अनागोंदी दिवसागणिक वाढतेय. याचे परिणाम दक्षिण आशियाई देशांतील आर्थिक, राजकीय आणि सामाजिक स्तरांवर होणार आहेत. चीनसह अमेरिकेचेही या भूभागावर लक्ष असल्याने इथल्या अस्थिरतेला खूप महत्व आहे. पाकिस्तानमधली समस्या जुनाट व्याधीसारखी आहे ती सातत्याने अधूनमधून तोंड वर करते, तिथे लोकशाही नावालाच आहे प्रत्यक्ष लष्कराचा हस्तक्षेप ठरलेला आहे. अन्य देशांतली स्थिती आगामी काळात पूर्वपदावर येईल, अपवाद श्रीलंकेचा आहे ! कारण इथले संकट न भूतो न भविष्यती असे आहे. जगभरातील आर्थिक राजकीय घडामोडींवर 'इकॉनॉमिस्ट'मध्ये काय भाष्य केले गेलेय हे पाहून आपली विचारधारा ठरवणारे देश आहेत यावरून या नियतकालिकामधील मांडणीचे महत्व कळावे. यंदाच्या इकॉनॉमिस्ट'च्या आवृत्तीत आशिया विभागात श्रीलंकेवर जळजळीत लेख प्रकाशित झालाय ; हे संकट राजकीय, मानवनिर्मित असल्याचे ताशेरे त्यात ओढलेत.