वर्तमान घडामोडी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
वर्तमान घडामोडी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
रविवार, २८ सप्टेंबर, २०२५
भीमेचे अश्रू..
शुक्रवार, १३ जून, २०२५
एअर इंडिया फ्लाइट क्रॅश - वेटिंग फॉर फायनल कॉल..
![]() |
| प्रतिकात्मक फोटो |
कालच्या विमान अपघातात मरण पावलेल्या लोकांच्या करुण कहाण्या एकेक करून समोर येताहेत. त्यातली अत्यंत दुःखद दास्तान पायलट सुमित सभरवाल यांची आहे. ते अविवाहित होते. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या आईचे निधन झाले होते. त्यांचे वडील 88 वर्षांचे असून ते बेडरिडन आहेत. सुमित आपल्या वडिलांना अधिक वेळ देऊ इच्छित होते. मात्र त्यांची एक्झिट अनेकांना चुटपुट लावून गेली.
एखादा माणूस अकस्मात आजारी पडला वा त्याचा अपघात होऊन त्याची अवस्था गंभीर झाली तर निदान त्याला पाहता येतं. स्पर्श करता येतं. त्याच्याशी एकतर्फी का होईना पण संवाद साधता येतो. तो बोलण्याच्या अवस्थेत असेल तर अखेरचे दोन शब्द बोलू शकतो.
संबंधित व्यक्तीचे देहावसान झाल्यावर त्या दोन शब्दांचा आधार आयुष्यभर साथ देतो.
जाणाऱ्यालाही कदाचित काही अंशी समाधान लाभत असेल की, आपल्या अंतिम समयी आपल्या प्रियजनांना पाहू शकलो, स्पर्श करू शकलो, एखादा दुसरा शब्द बोलू शकलो! त्या जिवाची तगमग कणभर का होईना पण कमी होत असेल!
मात्र निरवानिरवीची भाषा न करता, अंतिम विदाईचा निरोप न घेता कुणी कायमचं निघून गेलं तर मागे राहिलेल्या आप्तजनांना विरहाची तळमळ आमरण सोसावी लागते. मोठे वेदनादायी नि क्लेशदायक जगणे वाट्याला येते. काहींच्या बाबतीत काळ, जखमा भरून काढतो तर काहींना त्या वेदनेसह जगावे लागते.
मंगळवार, २२ एप्रिल, २०२५
फरफट जिवाची, हंडाभर पाण्यासाठीची!
हंडाभर पाण्यासाठी प्राण पणाला लावणाऱ्या बायकांचा, काळजाचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ कालपरवाचाच आहे.
ही क्लिप पाहिल्या बरोबर मनात अशी तीव्र इच्छा उत्पन्न झाली की, इथल्या तमाम लोकप्रतिनिधींना या विहिरीत थेट तळापर्यंत असेच रस्सीच्या सहाय्याने उतरायला लावले पाहिजे आणि हंडाभर पाणी त्यांच्या डोईवर ठेवून थेट वाडीवस्तीपर्यंत भर उन्हात चालवत नेलं पाहिजे! आणि मग त्यांना अनिवार्य हिंदी, कबर, कुत्रा, गुरुजी, कोरटकर, सोलापूरकर यांच्या विषयीचे प्रश्न विचारले पाहिजेत. समाधानकारक उत्तरे देईपर्यंत पाण्याचा एक घोटही प्यायला द्यायचा नाही! असो.
व्हिडिओ क्लिपमधील गावाचे नाव बोरीची बारी, तालुका पेठ, जिल्हा नाशिक! म्हणजेच आपल्या डिजिटल प्रगतशील महाराष्ट्रामधलं हे दृश्य!
हे अपयश झाकण्यासाठी तर राज्यकर्त्यांना आस्तित्वात नसलेल्या मुद्यांचा सहारा घ्यावा लागत असेल का? नक्की सांगता येत नाही.
मंगळवार, ११ मार्च, २०२५
शौचालयाचे नागरिकशास्त्र!
![]() |
| जगापुढे मान खाली घालावी लागणारी गोष्ट! |
गुरुवार, १० ऑक्टोबर, २०२४
अनमोल 'रतन'!
रविवार, २५ ऑगस्ट, २०२४
"यंदा दुर्गा मूर्तीसाठी आम्ही माती देणार नाही!... "
आज दुर्गा प्रसन्न मनाने हसली असेल!
कोलकता येथील डॉक्टर तरुणीवरील बलात्कार हत्या प्रकरणी बंगालमधील वेश्यांनी घेतलेली भूमिका ऐतिहासिक आहे! किंबहुना सामान्यांचे डोळे उघडणारी आहे! कथित सभ्य सामान्य माणसं या स्त्रियांपासून अंतर राखतात मात्र जेव्हाही कुठला महत्वाचा सामाजिक प्रश्न उद्भवतो तेव्हा या स्त्रिया त्यात उडी घेतात हा आजवरचा अनुभव आहे.
पीडितेला न्याय मिळावा म्हणून बंगालमधील वेश्यांनी मोर्चात सहभाग नोंदवला! यावेळी त्यांच्या हातात काही घोषणाफलक होते त्यावर लिहिलं होतं की,
प्रयोजने आमादे काचे आशून, किंतू नारी के धारशन कोरबे ना!
প্রয়োজনে আমাদের কাছে আসুন, কিন্তু নারীকে ধর্ষণ করবেন না।
याचा अर्थ असा आहे - तुम्हाला जर इतकीच गरज पडत असेल तर आमच्याकडे या, परंतु कुठल्या स्त्रीवर बलात्कार करू नका!
मंगळवार, २० ऑगस्ट, २०२४
प्राणी-प्रेमाआडचा छुपा विकृत चेहरा - अॅडम ब्रिटन!
शनिवार, २५ मे, २०२४
पँडेमोनियम, जॉली एलएलबी आणि पुणे अपघात!
बुधवार, ३१ ऑगस्ट, २०२२
'तो' अखेरचा माणूस मेला तेंव्हा..
मी कधीही त्या व्यक्तीला पाहिलेलं नाही वा त्याच्याविषयी त्रोटक माहितीशिवाय काहीच ठाऊक नाही. तरीही तो मरण पावल्याची बातमी ऐकून खूप अस्वस्थ वाटलं.त्याच्या मृतदेहापाशी एका ब्राझीलियन पक्षाचे पंख आढळलेत, कदाचित आपला इथला प्रवास संपला असल्याची जाणीव त्याला झाली असावी.
ते पंख त्याला कुठे घेऊन जाणार होते हे त्यालाच ठाऊक असावे!की त्याला ते पंख कुणाला द्यायचे होते?
की त्या पंखांना आपल्या अंतिम क्षणांचे साक्षीदार म्हणून त्यानं सोबत ठेवलं असावं?
काय वाटलं असेल त्याला एकट्याने मरताना?
रविवार, १० जुलै, २०२२
बोरिस जॉन्सन यांच्या गच्छंतीचा धांडोळा..
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नुकताच राजीनामा दिला असला तरी त्यांना पायउतार व्हावे लागेल अशी चिन्हे गतवर्षापासून दिसू लागली होती, किंबहुना मागील महिन्यातच त्यांचे पद गेले असते मात्र त्यावेळी ते कसेबसे तरले होते. ब्रेक्झिटप्रश्नी त्यांनी ठाम भूमिका घेतली होती तेंव्हा ब्रिटिश माध्यमांत त्यांच्या प्रेमाचे जे भरते आले होते त्याला गतवर्षांपासून ओहोटी लागली होती. कोविडकाळात त्यांच्यावर चौतर्फा टीका झाली, कोविडची दुसरी लाट आल्यानंतर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्यानंतर ब्रिटिश मीडियाचे समर्थन त्यांनी गमावले होते, लोकांचे समर्थन गमावू नये म्हणून त्यांनी कठोर निर्बंध अनेक दिवस टाळले होते मात्र एक वेळ अशी आली की त्यांना नावडते निर्णय घ्यावे लागले आणि तिथूनच ब्रिटिश जनतेच्या मनात त्यांच्या बद्दल नाराजी निर्माण झाली. त्यानंतर अशा काही घटनांचा आलेख घडत गेला कि बोरिस जॉन्सन यांच्याविषयीच्या नाराजीचे रूपांतर बंडखोरीत झाले. हे सर्व घडत असताना ब्रिटिश राजघराण्याने धारण केलेलं मौन बोलकं होतं, याच मौनाने बंडखोरांना बळ मिळत गेले आणि एकेक मोहरा गळत गेला. जॉन्सन कुठे चुकत गेले याचा धांडोळा घेतला तर लक्षात येते की याच कारणांपायी पश्चिमेकडील अनेक सत्ताधीशांना आपली सत्ता गमवावी लागलीय, तिकडील देशांत या मुद्द्यांना असलेले महत्व आणि त्यानुषंगाने होणारी अत्यंत बेबाक चर्चा अशा नेत्यांचे अगदी निष्ठुरपणे वस्त्रहरण करते. ब्रिटन तर खुल्या लोकशाही मूल्यांचा आणि मुक्त अभिव्यक्तीचा उघड पुरस्कर्ता असल्याने तिथे हे घडणं साहजिक होतं. वास्तवात पाहू जाता आपल्या देशात अशा प्रश्नांवर काय प्रतिक्रिया येऊ शकते याचा अंदाज बोरिस जॉन्सन यांना नक्कीच असणार कारण ते मुत्सद्दी राजकारणी होते, असे असले तरी त्यांच्या बेफिकीर वृत्तीने आणि अतिआत्मविश्वासाने त्यांच्यासाठी संकटे निर्माण केली जी बरीचशी अ-राजकीय होती. ही संकटे राजकीय असती तर कदाचित जॉन्सन यांनी त्यावर एखादा तोडगा तरी काढला असता मात्र इथे त्यांचे सर्वच दोर कापले गेले होते. याची परिणती अखेर त्यांच्या राजीनाम्यात झाली, त्याशिवाय त्यांना पर्यायही नव्हता.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)








