पॅलेस्टाईनची द्रोहफुले...
ताकद, दहशत आणि राक्षसी आकारमान याच्या जोरावर कुणी अमर आणि सर्वकालिक राहू शकत नाही. त्यास आव्हान देणारे, त्याच्याशी झगडून आपलं छोटंसं का होईना पण स्वतंत्र अस्तित्व दाखवणारे निर्माण होतच राहतात. कितीही प्रयत्नांची पराकाष्ठा केली वा कसलीही षडयंत्रे रचली तरीही अशा आव्हानांना नेस्तनाबूत करता येत नाही. मातीतून अंकुर उगवावा इतक्या सहजतेने ही विद्रोही रोपटी तग धरत नसली तरी चिकाटीने दगडमातीचं काळीज भेदून आपल्या परीने ती उगवत राहतात, जमेल तशी वाढत राहतात. अगदी जेत्यांच्या चिरेबंदी गढ्यांच्या परसदारात, अंगणातदेखील ही द्रोहफुले उगवतात. त्यांच्यातल्या प्रत्येकाला तरवारीचं पातं लाभलं नसलं तरी त्यांचा दरवळ अस्मान पेटवण्यास पुरेसा ठरतो. पॅलेस्टिनी कवी खालेद अब्दुल्लाह यांच्या 'सीड्स ईन फ्लाईट' या मूळच्या अरेबिक कवितेचा स्वैर मराठी अनुवाद याला साक्ष आहे. जीवनाच्या रसरशित जाणिवांनी आणि अर्थपूर्ण प्रतिमांनी ही कविता सजलेली आहे. पहिल्या पंक्तीपासून ती मनाचा ताबा घेते. कवितेच्या अखेरीस विद्रोहाचं बीज वाचकांच्या मनात अलगद पेरण्यात कवी यशस्वो होतो. उत्तुंग आशयाने आणि कवीच्या पार्श्वभूमीने ही कविता बोलकी झाली आहे. कवीच्या मातृभूमीची ओढ यात आस्ते कदम तरळत जाते आणि अखेरीस दृढ होत होते.
ताकद, दहशत आणि राक्षसी आकारमान याच्या जोरावर कुणी अमर आणि सर्वकालिक राहू शकत नाही. त्यास आव्हान देणारे, त्याच्याशी झगडून आपलं छोटंसं का होईना पण स्वतंत्र अस्तित्व दाखवणारे निर्माण होतच राहतात. कितीही प्रयत्नांची पराकाष्ठा केली वा कसलीही षडयंत्रे रचली तरीही अशा आव्हानांना नेस्तनाबूत करता येत नाही. मातीतून अंकुर उगवावा इतक्या सहजतेने ही विद्रोही रोपटी तग धरत नसली तरी चिकाटीने दगडमातीचं काळीज भेदून आपल्या परीने ती उगवत राहतात, जमेल तशी वाढत राहतात. अगदी जेत्यांच्या चिरेबंदी गढ्यांच्या परसदारात, अंगणातदेखील ही द्रोहफुले उगवतात. त्यांच्यातल्या प्रत्येकाला तरवारीचं पातं लाभलं नसलं तरी त्यांचा दरवळ अस्मान पेटवण्यास पुरेसा ठरतो. पॅलेस्टिनी कवी खालेद अब्दुल्लाह यांच्या 'सीड्स ईन फ्लाईट' या मूळच्या अरेबिक कवितेचा स्वैर मराठी अनुवाद याला साक्ष आहे. जीवनाच्या रसरशित जाणिवांनी आणि अर्थपूर्ण प्रतिमांनी ही कविता सजलेली आहे. पहिल्या पंक्तीपासून ती मनाचा ताबा घेते. कवितेच्या अखेरीस विद्रोहाचं बीज वाचकांच्या मनात अलगद पेरण्यात कवी यशस्वो होतो. उत्तुंग आशयाने आणि कवीच्या पार्श्वभूमीने ही कविता बोलकी झाली आहे. कवीच्या मातृभूमीची ओढ यात आस्ते कदम तरळत जाते आणि अखेरीस दृढ होत होते.