कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या 'म्यानातुनि उसळे तरवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात !' या कवितेने पिचलेल्या मनगटात शंभर हत्तींचे बळ दिले. मायबाप रसिक आजही त्यांना लवून कुर्निसात करतात ! ही कविता आजही मराठी माणसासाठी अखंड प्रेरणास्त्रोताचे काम करते तर 'माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा' असं मातीचं गौरवगानही त्यांची कविता करते. 'मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेउन, फक्त लढ म्हणा’! असं सांगत जगण्याची लढाई जिंकायची अनामिक ताकद त्यांची कविता देते. त्यांनी लिहिलेली 'कोलंबसाचे गर्वगीत' ही कविता त्यांच्या प्रतिभाशक्तीची दार्शनिक ठरावी अशी आहे.
मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०१६
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज ...
कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या 'म्यानातुनि उसळे तरवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात !' या कवितेने पिचलेल्या मनगटात शंभर हत्तींचे बळ दिले. मायबाप रसिक आजही त्यांना लवून कुर्निसात करतात ! ही कविता आजही मराठी माणसासाठी अखंड प्रेरणास्त्रोताचे काम करते तर 'माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा' असं मातीचं गौरवगानही त्यांची कविता करते. 'मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेउन, फक्त लढ म्हणा’! असं सांगत जगण्याची लढाई जिंकायची अनामिक ताकद त्यांची कविता देते. त्यांनी लिहिलेली 'कोलंबसाचे गर्वगीत' ही कविता त्यांच्या प्रतिभाशक्तीची दार्शनिक ठरावी अशी आहे.
कभी शाम ढले तो मेरे दिल में आ जाना - निदा फाजली ...
२००१ चे साल असेल. प्रीतीश नंदी, पूजा भट्ट आणि तनुजा चंद्रांना तेलुगु सुपरहिट 'स्वाती किरणम'वर बेतलेला हिंदी चित्रपट बनवायचा होता. हळव्या मनाच्या संगीत शिक्षकाच्या आयुष्यावर हा चित्रपट होता. त्यामुळे गाणी आणि संगीत ह्यातच सिनेमाचा प्राण होता. प्रीतिशजींना यासाठी निदा फाजलींचे नाव अधिक योग्य वाटले. त्यांनी निदांना गाणी देण्याची विनंती केली. काही तासात त्यांनी आठ गाणी लिहून दिली. तनुजा चंद्रा अवाक झाल्या कारण प्रत्येक गाणं अप्रतिम होतं. निदांनी आपल्या हृदयातील सारं तुफान ह्या गाण्यात रितं केलं होतं. चित्रपट तिकीट बारीवर सणकून आपटला पण गाणी सुपरहिट झाली. 'कभी शाम ढले तो मेरे दिल में...' हे यातलं सर्वाधिक गाजलेलं गीत. एके काळी सर्व संगीत वाहिन्यांवर याचा कब्जा होता. मात्र 'कभी शाम ढले तो मेरे दिल में आ जाना, कभी चाँद खिले तो दिल में आ जाना.... मगर आना इस तरह तुम कि यहाँ से फिर ना जाना..." असं निदा कुणाला आणि का म्हणत आहेत याचा अर्थ ध्यानी आला की आपल्याही डोळ्याच्या कडा ओलावतात.
शनिवार, ६ फेब्रुवारी, २०१६
आठवणी जयवंत दळवी आणि प्रवीण बर्दापूरकर यांच्या ......
ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिक जयवंत दळवींच्या कालच्या पोस्टच्या निमित्ताने दिग्गजांच्या आठवणींचा एक अनोखा पुनर्प्रत्यय या पोस्टमधून आपल्यापुढे मांडताना मला विलक्षण आनंद होतोय. .
प्रख्यात संपादक, लेखक व ज्येष्ठ विचारवंत श्री. प्रवीण बर्दापूरकर यांनी 'नोंदी डायरीनंतरच्या' (प्रकाशक -ग्रंथाली) या त्यांच्या आत्मकथनपर पुस्तकांत त्यांच्या काही आठवणी, काही प्रसंग व त्यांच्या प्रदिर्घ वृत्तपत्रीय कारकिर्दीत आणि दैनंदिन जीवनात संपर्कात आलेल्या काही व्यक्तीविशेषांवर त्यांच्या ओघवत्या, रसाळ, प्रवाही शैलीत लेखन केले आहे. यातीलच एक प्रकरण आहे 'अनुभवसंपन्नता'....
शुक्रवार, २२ जानेवारी, २०१६
बाळासाहेब आणि पवार साहेब - एक दिलदार यारीदुष्मनी !
बाळासाहेबांचे आणि पवारसाहेबांचे आपसातील नातेच वेगळे होते. वैयक्तिक जीवनात मैत्री आणि राजकारणात वैमनस्य असं असूनही त्यांनी आपसातले संबंध तुटूपर्यंत कधीच ताणले नाहीत. 'मैद्याचे पोते' म्हणून बाळासाहेब ज्यांची टिंगल करायचे ते शरद पवार हे त्यांचे पाच दशकाचे सोबती आणि मैत्र होते. 'ज्यांना भुईमुगाच्या शेंगा जमिनीवर उगवतात की मातीखाली उगवतात हे माहिती नाही त्यांनी माझ्याबद्दल बोलू नये' अशा शब्दात पवारसाहेबदेखील त्यांच्यावर सभांमधून बोलायचे. सभा - भाषणे यातून दोघे जरी एकमेकावर राळ उडवत असले तरी त्यांनी त्यांच्यात आपसात असलेले एक ट्युनिंग कधी बिघडू दिले नाही अन ते दोघे कधी एकही झाले नाहीत अन आपसातल्या मैत्रीतून विभक्तही झाले नाहीत. ही दोन ब्रम्हफुले महाराष्ट्राच्या एकाच वेलीवर फुलली असल्याने त्यांची आपसातील वीण घट्ट होती याचे दार्शनिक असणारे अनेक किस्से गेल्या साठ वर्षात घडले. त्यापैकीच एक किस्सा शरद पवारांनी २०१७ च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आयोजिलेल्या मुलाखतीत सांगितला होता. डॉ.जनार्दन वाघमारे, कवी फ. मुं. शिंदे व ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी त्यांना बोलते केले होते, या मुलाखतीत त्यांनी अनेक मजेशीर गोष्टी प्रकाशात आणल्या. त्यातली एक गोष्ट बाळासाहेब आणि पवारांनी एकत्र येऊन काढलेल्या मासिकाच्या जन्मकथेची होती….
शनिवार, १६ जानेवारी, २०१६
दत्ता सामंत - झुंझार पण हटवादी संघर्षाचा करुण अंत !
बुधवार, १३ जानेवारी, २०१६
सोलापूरची गड्डा यात्रा - नऊशे वर्षापासूनच्या एका अनोख्या यात्रेची गाथा....
तथाकथित मोठ्या शहरातले सृजन माझ्या सोलापूरला बरयाचदा नाके मुरडतात, टवाळकी करतात. कधीकधी काही क्षणासाठी मी ही वैतागतो पण पुढच्याच क्षणाला मातीवरचे प्रेम उफाळून येते. काहीजण तर सोलापूरला एक मोठ्ठं खेडं म्हणून हिणवतात ! एका अर्थाने हे त्यांचा हा टोमणा बरोबर देखील आहे कारण यात्रा, जत्रा, उरूस हे आता मोठ्या शहरांचे घटक राहिले नाहीत. उलट खेड्यातून देखील ते हद्दपार होतील की काय अशी स्थिती झालीय. माझ्या सोलापूरमध्ये मात्र एक यात्रा दर वर्षी साजरी होत्येय ! ती ही तब्बल सातशे वर्षापासून. याचा सगळ्या सोलापूरकरांना सार्थ अभिमान आहे. म्हणूनच आम्हाला कुणी डिवचलं की मी आवर्जून उत्तरतो, "ठीक आहे ! खेडं तर खेडं !
खेड्यात काय माणसे राहत नाहीत का ? खेड्यातल्या माणसाला आपण गावंढळ वा खेडूत म्हणतो. त्या नुसार आम्ही खेडवळ माणसं ! त्यात काय वाईट ? आम्हा सोलापूरकरांचा आमच्या मातीवर, इथल्या माणसांवर, सणावारांवर फार फार जीव ! इथे मोहरमचे पंजे अंगावर घेऊन नाचणारे, अंगावर पट्टे ओढून मोहरमचे वाघ झालेले अन पवित्र रोजे धरणारे हिंदू दिसतील. गड्डा यात्रेत मोठ्या संख्येने सामील होणारे मुस्लिम बांधव दिसतील, चर्चमध्ये ख्रिश्चन बांधवासोबत अन्यधर्मीयही नक्कीच भेटतील. सर्व जयंत्या, उत्सव अन सर्व जातींचे सणवार सगळे मिळून साजरे करणारे आमचे हे मायेच्या माणसाचे तरीही थोडेसे उग्र बोलीभाषेचे सगळ्यांच्या मनामनातले गाव, सोलापूर !!! अशा या मुलुखावेगळ्या गावाची दर वर्षी भरणारी हौसेची - नवलाची यात्रा म्हणजे 'गड्डा यात्रा' !! सिद्धेश्वर महाराजांचा अड्ड (पालखी) यात्रा महोत्सव म्हणजेच गड्डा यात्रा !
सिद्धेश्वर देवस्थान |
सोमवार, २८ डिसेंबर, २०१५
काँग्रेस - अंधारलेल्या रस्त्यावरचा जाणत्या माणसांचा भरकटलेला जत्था....
स्वातंत्र्यपूर्व काळातील
काँग्रेस ही स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देण्यास तयार असणारया, घरादारावर तुळशीपत्र वाहण्याची
तयारी असणारया, समता - बंधुता याचे आकर्षण असणाऱ्या अन
सामाजिक बांधिलकी जपत अंगी सेवाभाव असणारया भारलेल्या लोकांची सर्वजाती
-धर्मांच्या लोकांची एक सर्वसमावेशक चळवळ होती. या चळवळीला लाभलेले नेते देखील
त्यागभावनेला प्राधान्य देऊन संपूर्ण स्वराज्य या एकाच मंत्राने प्रदीप्त झालेले
देशव्यापी जनमान्यता असणारे होते. काँग्रेसची ती पिढी आपल्या लोकशाहीचा पाया होती
म्हणूनच आपली लोकशाही आजही भक्कम आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतच्या
काँग्रेसच्या कालखंडाचे ढोबळमानाने पंडित नेहरूंचा कालखंड, इंदिराजींचा
कालखंड, राजीव - नरसिंहराव कालखंड अन सोनिया गांधींचा कालखंड
असे चार भागात विभाजन करता येते.
विटंबना ..
देवदासींचे एक बरे असते
त्या विधवा कधी होत नाहीत
कारण देवाला त्याचे दलाल मरू देत नाहीत.
एव्हढे सोडल्यास देवदासींचे काही खरे नसते,
जगणे फक्त नावाला असते
त्यांची मयत केंव्हाच झालेली असते.
देवाला कशाला हव्यात दासी
हा सवाल विचारायचा नसतो,
प्रश्नकर्त्यास पाखंडी ठरवले की 'काम' सोपे होते.
लाखोंच्या अधाशी नजरा झेलणाऱ्या
सहस्त्रावधींच्या बदफैल स्पर्शाना झिडकारणाऱ्या
शेकडोंना शय्येसाठी निव्वळ अंगवस्त्र वाटणाऱ्या
रक्तहळदीच्या घामात चिंब थबथबलेल्या
गात्रांची चिपाडे झालेल्या
अभागिनी, म्हणजे देवांच्याच की भोगदासी ?
रविवार, २७ डिसेंबर, २०१५
अंधारवेळेचा आधारवड - ग्रेस !
लेखक समीक्षक विश्राम गुप्ते लिहितात की, मर्ढेकरांनी मराठी कवितेत आशय व अभिव्यक्ती या दोन्ही अंगानी क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणले. सुदैवाने नवी किंवा नवोत्तर जाणीव मराठी वाड्मयीन पर्यावरणाला नवी नाही. मर्ढेकरांपासून जर या जाणिवेचा प्रवास सुरू झाला असं मानलं तर तिला व्यामिश्रतेचे धुमारे फुटले ते दिलीप पुरुषोत्तम चित्रे, अरुण कोलटकर, भालचंद्र नेमाडे, मनोहर ओक आदी संघर्षवादी कवींच्या अफलातून कवितांमुळेच. याच काळात ढसाळांच्या परंपरांच्या मूर्तिभंजक कविता घडल्या. बालकवींनी निसर्गाचे बोरकर, पाडगावकर, बापट यांच्या कवितेतून सौंदर्यवादी अविष्काराचे मनोहर दर्शन साहित्यविश्वाला झाले. मराठी वाड्मयाला विंदांच्या व कुसुमाग्रजांच्या आदर्शाचा ध्यास घेणाऱ्या अलौकिक कवितांचा नवा आयाम प्राप्त झाला. केशवसुत, बालकवी आणि मर्ढेकरी काव्यशैलीचे पाईक असणाऱ्या कवींची पुढे अनेक आवर्तने झाली.
शुक्रवार, २५ डिसेंबर, २०१५
अटलजी.......
राजकारणाचे एक युग गाजवलेल्या अन आपल्याच पक्षाच्या सद्य विचारसरणीहून भिन्न विचारशैली व मर्यादेचे सजग समाजभान असणारया, आपल्या विचारधारांशी समर्पित राहिलेल्या राष्ट्रतेज अटलजींची आज उणीव भासत्येय आणि त्यांची किंमत अधिक प्रखरतेने लक्षात येतेय. वाजपेयीजींच्या काळातील लोकसभेच्या निवडणुकात मी भाजप उमेदवारास पसंती दिली होती. अपेक्षित असलेले बदल त्यांच्या काळात मोठ्या प्रमाणात झाले नाहीत त्याच बरोबर फारशी निराशाही पदरी पडली नाही. यथातथा असे ते अनुभव होते. मात्र काँग्रेसच्या भ्रष्ट शासनापेक्षा त्यांचे सरकार उजवे वाटायचे.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)