शनिवार, ८ ऑगस्ट, २०२६

गोष्ट उषा मेहताची!



ही गोष्ट आहे स्वातंत्र्य लढ्याच्या अखेरच्या पर्वातली, जेव्हा ब्रिटिश महासत्ता एका बावीस वर्षांच्या तरुणीच्या आवाजाला घाबरली होती आणि तिचा आवाज दडपण्यासाठी जंग जंग पछाडले होते!
8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील गवालिया टँक मैदानावर महात्मा गांधींनी 'करो या मरो'ची हाक देत ब्रिटिश राजवटीविरुद्ध 'चले जाव'ची घोषणा देत भारत छोडो चळवळीची सुरुवात केली. या लढ्यात जनतेने अभूतपूर्व स्फूर्तीने सहभाग घेत समग्र ब्रिटिशांना मोठे आव्हान दिले. तत्कालीन ब्रिटिश व्हाईसरॉयने या आंदोलनाचे वर्णन '1857 नंतरचा सर्वात गंभीर उठाव' असे केले होते.

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२६

संतू लोहार


संतू लोहार वयाची नव्वदी पार करुन नुकताच मरण पावला. गावातली जुनी शिसवी खोंडं त्याला 'ढेपाळया लोहार' म्हणत. चावडीवर परवाच्याच दिवशी चर्चा सुरु होती की, ढेपाळया लव्हार मेला, लै वाईट झालं! पन्नाशी गाठलेल्या काहींना उमजलं की संतू मेलाय! बाकी पब्लिक तोंडाचा चंबू करून, बातमी सांगणाऱ्या म्हाताऱ्या लोकांच्या मुस्काडाकडं नुसतं बघत राहिलं. संतू लोहाराला 'ढेपाळया' का म्हटलं जायचं याचीही एक गोष्ट होती!