मी कुठेही गेलो तरी संध्येस त्याच खोलीत असतो
जी माझ्या आईने अज्ञात पानाफुलांच्या सुगंधाने भरलेली असते.
हा सुगंध माझ्यासोबतच असतो जणू.
माझी आई देवाघरी गेली आणि तेंव्हापासून ही गंधभारीत खोली माझ्यासवे असते.
बालकवींच्या 'औदुंबरा'सारखा हा गंध माझा पिच्छा करतो.
खरे तर आपले आयुष्य आपण जितके उध्वस्त करू
तितका विध्वंस आपला पाठलाग करत राहतो.
हे तर माझ्या आजीच्या अंतहीन म्हणींसारखे घडतेय,
जे पुन्हा पुन्हा प्रारंभाकडे खेचतेय.
विमनस्कतेच्या या वर्तुळाला मी कसे छेदेन हे ठाऊक नाही.
शब्द, गंध आणि झेपेच्या बंधनातून मुक्त होत
हवेहवेसे पदलालित्य मला लाभेल का
याचेही उत्तर माझ्याकडे नाही.
आईच्या गंधभारीत आठवणींचे कढ हेच आता जणू जीवन झालेय...