शनिवार, ५ एप्रिल, २०२५
मेरे देश की धरती ..
शुक्रवार 4 एप्रिल रोजी ज्येष्ठ दिग्गज अभिनेते मनोजकुमार यांचे निधन झाले आणि सोशल मीडियासह सर्व प्रसारमाध्यमे त्यांच्या विषयीच्या माहितीने भरून वाहू लागली. अनेकांनी शोक व्यक्त केला. जवळपास हरेक चाहत्याने त्यांच्या जुन्या फिल्मी आठवणींना उजाळा दिला. त्यांची गाणी, त्यांचे संवाद आणि त्यांची शैली याविषयी लोक भरभरून बोलले. मुळात मनोजकुमार यांची स्वतःची एक इमेज होती त्यामुळे त्यांचा स्वतःचा खास असा चाहता वर्ग होता त्याच्याखेरीज अन्य वर्गातले सिनेरसिकही त्यांच्याविषयी मनःपूर्वक व्यक्त झाले हे विशेष. कारण अलीकडील काळात एक वाईट गोष्ट हमखास दृष्टीस पडते ती म्हणजे कुणा प्रसिद्ध व्यक्तीचे वा सेलिब्रिटीचे निधन झाले की लोक त्याच्या विषयी वाईटसाईट बोलू लागतात. मृत्यूनंतरचे बदनामीचे कवित्व सुरु होते. अर्थात एखाद्या व्यक्तीने त्याच्या हयातीत काही वाईट गोष्टी केल्या असतील, त्याने केलेल्या कुकर्माविषयी कबुली दिली नसेल वा त्याबद्दल त्याच्या मनात प्रायश्चित्त भावना नसेल तर लोक त्याच्या मृत्यूपश्चात वाईट बोलत असतील तर किती जणांना आपण रोखू शकणार? कुणालाच नाही! मात्र अलीकडील काळात माणूस गेला रे गेला की त्याच्या बाजूने बोलणारे नि त्याची निंदा नालस्ती करणारे असे दोन गट पडतात. याने मन व्याकुळ होतं, अंतःकारणात विषाद दाटून येतो. श्रद्धांजली देखील द्यावीशी वाटत नाही. मात्र मनोजकुमार याला अपवाद ठरले. त्यांच्या निधनानंतर समग्र माध्यमे, सोशल मीडिया त्यांच्याविषयीने आदराने बोलत होता, लोक त्यांच्या विविध गोष्टी सांगताना आढळले. हे भाग्य अलीकडील काळात क्वचित कुणाच्या वाट्याला आले आहे. मनोज कुमार यांना मृत्यूपश्चात हे साधले कारण त्यांची भारत कुमार अर्थात भारत का नायक, भारत का बेटा या प्रतिमेने लोकांच्या मनावर फार पूर्वीपासून गारुड केलेय. शिवाय ते इंडस्ट्रीमध्ये तामझाम पासून दूर होते, त्यांचे कुणाशी वैर असायचेही कारण नव्हते. त्यांची स्वतःची एक विचारधारा होती त्याच्याशी ते आयुष्यभर प्रामाणिक राहिले त्याचेच हे फळ म्हणावे लागेल.
शुक्रवार, २८ मार्च, २०२५
गावाकडचे उन्हाळ्यातले दिवस..
आओगे जब तुम साजना..
हे गाणं फर्माईश म्हणून अनेक प्रेमभंग झालेल्या तरुण पोरांनी गायला सांगितलेलं अजूनही पक्कं स्मरणात आहे. त्याहीआधी 1991 मध्ये नाना पाटेकर, डिम्पल, माधुरी यांच्या 'प्रहार'मध्ये शुभा गुर्टू यांनी गायलेली 'याद पिया की आये..' ही ठुमरी खूप जीव लावून ऐकलेली! तिच्याशी जसे एकरूप होता येत होतं तसेच 'आओगे जब तुम साजना'बाबतीत व्हायचे!
बुधवार, २६ मार्च, २०२५
एक दिवस शोषित जिवांच्या आनंदाचा!
![]() |
'क्रांती महिला संघ' स्नेहमेळावा |
मंगळवार, २५ मार्च, २०२५
माती आठवणींच्या थडग्याची!
गुरुवार, २० मार्च, २०२५
होळी, प्रेमाला आसुसलेल्या जिवांची!
साऱ्यांच्या चेहऱ्यांवर सुरकुत्यांची नक्षी होती, भाळीच्या आठ्यांचं जाळे कोरीव झालेलं. काहींच्या डोईची चांदी विरळ होऊ लागलेली तर काहींची नजर क्षीण झालेली तर काहींची नजर पैलतीरी लागलेली स्पष्ट दिसत होती. तर काहींची देहबोली अजूनही आव्हानांना छातीवर झेलणारी! काही कंबरेत वाकलेले तर काहींना पाठीवर पोक आलेला! अंगी जुनेच तरीही स्वच्छ कपडे. परिसरातही काटेकोर स्वच्छता आणि सेवाभावी कर्मचारी वर्ग.
मंगळवार, ११ मार्च, २०२५
शौचालयाचे नागरिकशास्त्र!
![]() |
जगापुढे मान खाली घालावी लागणारी गोष्ट! |
मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२५
आनंदाची एक्सप्रेस..
![]() |
क्रांती महिला संघाच्या स्नेह मेळाव्याचे बॅनर |
ज्या लोकांच्या आयुष्यात आनंद नाही त्यांना एक वेगळ्याच आनंदाची अनुभूती द्यायची. ज्यांना प्रवास करता आला नाही, पर्यटन करता आलं नाही, हॉटेलिंग करता आले नाही, विविध स्थळांना वा शहरांना भेटी देता आल्या नाहीत अशांना त्यांनी प्राधान्य दिले. विविध सामाजिक स्तरावरील गांजलेल्या, पिचलेल्या, तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या लोकांना या आनंदाची अनुभूती ते मिळवून देऊ लागले. मजूर, ओझी उचलणारे हमाल, वंचित शोषित घटक, कामवाल्या स्त्रिया, हातावर पोट असणारे गरीब यांच्या जीवनात त्यांनी आनंदाचे काही क्षण भरले! काही दिवसापूर्वी त्यांचा माझा संवाद झाला तेव्हा त्यांनी सेक्सवर्कर महिलांना मुंबईवारी करवून आणण्यासाठी मध्यस्ताचे काम करण्याबाबत विचारले. मी तत्काळ होकार दिला.
रविवार, १९ जानेवारी, २०२५
अलेक्झांडरच्या वंशाची भुरळ!
सध्या कुंभमेळयाविषयी अनेक प्रकारच्या चर्चां सुरू आहेत, त्यातलीच एक माध्यमाकर्षण असणारी गोष्ट म्हणजे मोनालिसासारखी दिसणारी भारतीय मुलगी! या मुलीच्या पार्श्वभूमीचा धांडोळा घेताना हिमाचल प्रदेशमधील मलाना या खेड्यातील बायकापोरी आठवल्या. कारण ही कथित मोनालिसा आणि या मुलींमध्ये खूप साम्य आहे. मात्र याची मूळे थेट महान योद्धा अलेक्झांडरपर्यंत जाऊन पोहोचतात! थोडे विषयांतर वाटेल मात्र यातही एक कथा, एक आख्यान आणि एक आसक्ती दडून आहे!
शुक्रवार, १७ जानेवारी, २०२५
वक्त ने किया क्या हसीं सितम..
गुरुदत्तच्या 'कागज के फूल'मध्ये 'वक्त ने किया क्या हसीं सितम हम रहे ना हम...' हे निहायत देखणं अर्थपूर्ण गाणं आहे. हे लिहिलंय कैफी आजमी यांनी. हा चित्रपट 1959 मध्ये प्रदर्शित झाला होता. गुरु दत्त आणि वहिदा रेहमान यांच्या प्रमुख भूमिका यात होत्या. सिनेमा शूट झाला होता 1954 मध्ये. अप्रतिम छायाचित्रणाचे वेधक उदाहरण म्हणून या गीताकडे पाहता येईल. गुरु दत्तकडे कैफींनी गाणं दिलं तेव्हा त्यांचं वय होतं तेहतीस वर्षांचं! हे गाणं त्यांनी कागज के फूल साठी लिहिलं नव्हतं. ती त्यांची वैयक्तिक दर्दभरी कैफियत होती.
शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०२४
शोध मराठी रंगभूमीवरील 'ती'च्या अस्तित्वाचा!
सुखाचे घर!
गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४
स्वर्गसुखाच्या भेटीगाठी!
दिवाळसण सरताच आपलं घर मागं टाकून अनेक बिनचेहऱ्याची माणसं आपापल्या घाण्याला जुंपून घेण्यासाठी वेगवेगळ्या इप्सित शहरांकडे रवाना झाली होती. दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी फिरणारी मंडळी आणि उदास देहबोलीने कामावर रुजू होण्यासाठी निघालेली माणसं एकाच बसमधून प्रवास करत होती. असो. आज सकाळच्या प्रवासात माझ्या शेजारी एक बऱ्यापैकी वयस्क विधवा महिला बसून होती.
मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४
'गुड़िया' - सहस्त्र लेकींची आई!
शोषणाच्या नि देहव्यापाराच्या दलदलीत अडकलेल्या स्त्रियांना काय काय सोसावं लागतं हे मंजू सिंहनी अनुभवलं आहे. यातल्या हरेक स्त्रीला मुक्त होता यावं नि त्यांचा छळवाद संपावा यासाठी त्यांनी आयुष्य वाहिलं आहे. त्यात त्यांना पती अजित सिंह यांची उत्तम साथ मिळाली. मंजू आणि अजित या दांपत्याने आजवर साडेपाच हजार मुलींची सुटका केली आहे. बाराशे मुलींचे यशस्वी पुनर्वसन केले आहे.
1988 साली त्यांनी वेश्यावस्तीतल्या तीन मुली दत्तक घेतल्या आणि आपल्या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. दत्तक देण्यास स्त्रिया कच खाऊ लागल्या तेव्हा त्यांनी ठरवलं की आपण थेट मुलींच्या सुटकेचे उद्दिष्ट ठेवू! त्यांनी तशा पद्धतीने काम करण्याचा एक प्रोटोकॉल ठरवला. छोटेखानी टीम बनवली. त्यांचे काम इतके जबरदस्त होऊ लागले की त्यांचा आपसूक गवगवा होऊ लागला. त्यांनी संस्थेची नोंदणी करून स्वरूप व उद्दिष्टे व्यापक करण्याचे ठरवले. 1993 मध्ये त्यांच्या 'गुड़िया' या एनजीओची अधिकृत नोंदणी झाली.
सोमवार, २८ ऑक्टोबर, २०२४
आयेशा परवीन नावाची दुर्गा!
![]() |
आयेशा परवीन |
सोमवार, १४ ऑक्टोबर, २०२४
हिरवाई..
आज पुष्कळ हिरवाई दिसतेय. त्याविषयी काही अवांतर. गावाकडं एखादा पिकल्या केसांचा वा अर्धवट वयाचा डंगरा इसम बाईलवेडा झाल्यागत वागू लागतो तेव्हा 'गडी लई हिरवट' असल्याचा शेरा मारला जातो.
'पिकल्या पानाचा देठ की ओ हिरवा..' ही संकल्पना यातूनच उगम पावलेली!'पांढरे केस, हिरवी मने' या नावाचे वि. द. घाटे यांचे पुस्तक जीवनासक्त व्यक्तींच्या आयुष्याचा धांडोळा घेणारे आहे. ते 'कथित' हिरवट नाहीये. असो.
शांता शेळके यांची 'पाकोळी' ही कविता सुप्रसिद्ध आहे. कवितेची सुरुवातच हिरवी 'झाडी या शब्दांनी केलीय.
हिरवी झाडी, पिवळा डोंगर, निळी-सावळी दरी,
बेट बांबुचे त्यातुन वाजे, वार्याची पावरी.
कभिन्न काळ्या खडकांमधुनी, फुटति दुधाचे झरे.
संथपणे गिरक्या घेती, शुभ्र शुभ्र पाखरे!.. '
गुरुवार, १० ऑक्टोबर, २०२४
अनमोल 'रतन'!
मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४
आईच्या आठवणींचा पाऊस!

डब्यात ठेवलेल्या वाळवणाच्या वस्तू पावसाळी हवेत तळून, भाजून खाताना त्याला निराळाच स्वाद येई. डबा उघडताच आईच्या साडीचा तो स्निग्ध मायागंध दरवळे! आता एअरटाईट कंटेनर असतात, वस्तू सादळत नाहीत मूळ चव शाबित राहते मात्र त्यात तो मायेचा स्निग्ध परिमळ दरवळत नाही! कालपरवा जुन्या बोहारीण मावशी घरी आल्या होत्या, घर हुडकत हुडकत आल्या होत्या. आसपास बांधकामे पुष्कळ झाल्याने घर लवकर सापडले नाही म्हणून हैराण झाल्या होत्या. ‘घरात जुने काही कपडे असतील तर दे बाबा’, असं म्हणत हेका लावून बसल्या होत्या. अलीकडे अपवाद वगळता घरोघरी रोजच्याला कुणी साडी नेसत नाही याची त्यांना खंत होती. एक्स्टर्नल कॉलेज करत असणाऱ्या त्यांच्या तरुण सुनेला घेऊन आल्या होत्या!
गुरुवार, १२ सप्टेंबर, २०२४
पैशाने साऱ्या गोष्टी मिळत नाहीत - गोष्ट मटकाकिंगची!
हितेश भगत हा कुख्यात मटकाकिंग सुरेश भगत याचा लाडाने बिघडलेला मुलगा. 2008 साली आपल्या वडिलांची सुपारी देऊन हत्या केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक झालेली. त्याची आई जया भगत ही देखील या प्रकरणी आरोपी होती. नंतर ते जामीन देऊन बाहेर आलेले. मात्र या खटल्याची सुनावणी सुरु असतनाच अघटित घडलेलं.
हितेशची स्वतःची एक ऐय्याशीची नि मस्तीची दुनिया होती.
डान्सबारच्या जगात त्याचं लाडाचं नाव होतं चिंटूसेठ!
बारमध्ये तो पैसे उधळायला यायचा तेंव्हा त्याची साईज अदनान सामीसारखी सुपरहेवीवेट होती. पुढे त्याने लिपोसक्शनची शस्त्रक्रिया केली. देहाचा आकार कृत्रिमरित्या घटवून घेतला.
मात्र 2014 मध्ये या शस्त्रक्रियेचा त्याला फटका बसला आणि पोटात नव्या व्याधी उद्भवल्या, त्यातच तो मरण पावला.
त्याचे तीन फेमस डान्स बार होते (कार्निव्हल - वरळी, बेवॉच - दादर, टोपाझ - ग्रॅण्ट रोड) जिथल्या मुलींना त्यानं मोकळ्या हाताने बिदागी दिली. असो...
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)