2010 साली अल्गॉनक्विन बुक्सद्वारे प्रकाशित झालेली रनिंग द रिफ्ट ‘Running the Rift’ ही नाओमी बेनारॉन यांची एक प्रभावी आणि हृदयस्पर्शी कादंबरी. या कादंबरीत रवांडामधील हुतू - तुत्सी यांच्यातला दीर्घ संघर्ष आणि 1990 च्या दशकातील नरसंहाराच्या पार्श्वभूमीवर एका तरुण तुत्सी मुलाच्या जीवनाचा प्रवास रेखाटलाय. ही कादंबरी सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकणारी असल्याने तिला आंतरराष्ट्रीय ख्यातीचा पेन-बेलवेदर पुरस्कार मिळालाय.
कादंबरीचा नायक जीन पॅट्रिक नकुबा हा एक तुत्सी मुलगा आहे, जो रवांडाच्या डोंगराळ भागात वाढलाय. त्याच्या अंगी धावण्याची नैसर्गिक प्रतिभा आहे. रवांडाचा पहिला ऑलिम्पिक ट्रॅक पदक विजेता बनण्याचे त्याचे स्वप्न असते. या स्वप्नामुळे त्याला स्वतःला आणि विवेकवादी लोकांना हुतू - तुत्सी तणावामुळे होणाऱ्या क्रूर हिंसाचारापासून मुक्ती मिळेल, अशी त्याची आशा असते. कथेचा पहिला भाग जीन पॅट्रिकच्या बालपणावर, त्याच्या कुटुंबावर आणि त्याच्या धावण्याच्या उत्कटतेवर केंद्रित आहे. पण, जसजसा हुतू - तुत्सी संघर्ष वाढत जातो, तसतशी त्याची स्वप्ने आणि जीवन धोक्यात येतात.
जीन पॅट्रिक एका खाजगी शाळेत शिकतो, जिथे त्याला त्याच्या तुत्सी अस्मितेमुळे भेदभाव आणि हिंसाचाराचा
![]() |
मूळ फ्रेंच पुस्तक |
लेखिका नाओमी बेनारॉन यांनी स्वतः हे दुःख पाहिलंय. रवांडातील नरसंहार पीडितांसोबत त्यांनी काम केलेय. हाच अनुभव कादंबरीतून प्रकट झालाय. त्या स्वतः उत्तम धावपटू आहेत. अफगाणिस्तान मधील महिलांसाठी त्यांनी लेखन प्रोजेक्ट राबवलेत.
Running the Rift ही केवळ एक क्रीडापटूची कहाणी नाही,
![]() |
लेखिका नाओमी बेनारॉन |
थोडेसे रवांडामधील संघर्षाविषयी. 1890 ते 1916 पर्यंत जर्मनीची
![]() |
पूर्व आफ्रिकेतील रिफ्ट प्रभावित देशांचा नकाशा |
बहुसंख्य असणाऱ्या हुतू लोकांनी तुत्सी लोकांची आणि त्यांना
![]() |
रिफ्टचा वाढता परिसर |
सध्या तुत्सी लोक रवांडामध्ये तुलनेने सुरक्षित आणि स्थिर जीवन जगत आहेत, आणि त्यांना आर्थिक व सामाजिक संधी उपलब्ध आहेत. तथापि, ऐतिहासिक तणाव आणि राजकीय गतिशीलता यामुळे काही आव्हाने कायम आहेत. सरकारच्या सामंजस्य आणि एकता धोरणांमुळे तुत्सी आणि हुतू यांच्यातील संबंध सुधारले आहेत, परंतु खोलवर असलेल्या आठवणी आणि अविश्वास पूर्णपणे नाहीसा होण्यास वेळ लागेल. हाणा, मारा कापा युद्ध करा असं म्हणणं सोपं असतं मात्र प्रत्यक्षात तसं काही झालं तर त्यातून सावरण्यास दशके लागू शकतात. इतर देशांच्या तुलनेत देश शेकडो वर्षे मागे जातो.
रवांडाला आफ्रिकेचं हृदय म्हटलं जातं कारण त्याचं नेमकं भौगोलिक स्थान! हा देश हजारो टेकड्यांचा प्रदेश आहे! हृदय रक्ताळले आणि आफ्रिका हळहळले कारण इथे गृहयुद्ध सुरू असताना आंतरराष्ट्रीय समुदायाने निव्वळ बघ्याची भूमिका घेतली होती. इथल्या खनिज संपत्तीवर अनेकांचा डोळा असल्याने अशी नीती अवलंबली गेली असावी. ज्या तुत्सी समुदायाला हाकलून लावले होते त्यांना सन्मानाने परत बोलवावे लागले. सध्याचे सरकार रवांडन पॅट्रियॉटिक फ्रंट (RPF) च्या नेतृत्वाखाली आहे. यात तुत्सी समुदायातील अनेक नेते आणि कार्यकर्ते 1994 च्या नरसंहारानंतर परदेशातून परतलेल्या तुत्सी समुदायातील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी सरकारच्या पुनर्रचनेत महत्त्वाची भूमिका बजावली. यामुळे तुत्सी समुदायाला राजकीय नेतृत्वात मजबूत प्रतिनिधित्व मिळाले. रवांडाच्या मंत्रिमंडळात आणि उच्च प्रशासकीय पदांवर तुत्सी व्यक्ती सक्रिय आहेत, हुतूही आता समप्रमाणात आहेत.
एकेकाळी एकमेकांच्या जिवावर उठलेल्या या लोकाना आता त्या इतिहासाची नि आठवणींचीही किळस वाटते. हुतू – तुत्सी अशी चर्चा करण्यासही तिथे आता बंदी आहे! या दोन्ही समुदायांमधील संबंध आता सुधारले असले तरीही काही अंतर्निहित तणाव आणि आव्हाने कायम आहेत. रवांडा सरकारने राष्ट्रीय एकता आणि समेट यावर जोरदार भर दिल्यामुळे सामाजिक संबंधांमध्ये प्रगती दिसून येते. रवांडा सरकारने वांशिक धार्मिक जातीय ओळखी काढून टाकून सर्वांना "रवांडन" म्हणून एकच राष्ट्रीय ओळख दिलीय. "Ndi Umunyarwanda" (मी रवांडन आहे) ह्या कार्यक्रमांद्वारे सामाजिक एकता वाढवली जातेय. नरसंहारातील गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी सरकारने गकाका कोर्ट्स (पारंपरिक समुदाय-आधारित न्यायालये) स्थापन केली, ज्यामुळे हुतू आणि तुत्सी समुदायांमधील सत्य, क्षमा आणि समेट प्रक्रिया घडून आली. या कोर्ट्समुळे अनेक हुतू गुन्हेगारांनी तुत्सी पीडितांकडे तुत्सी पीडितांकडे सार्वजनिकपणे माफी मागितली. या कोर्ट्समध्ये सुमारे 20 लाख प्रकरणे हाताळली गेली, आणि अनेक हुतू व्यक्तींनी पश्चाताप व्यक्त केला, काहींनी तुरुंगवास भोगला, तर काहींना समुदाय सेवेची शिक्षा देण्यात आली. या प्रक्रियेमुळे पश्चाताप आणि समेटाला प्रोत्साहन मिळाले.
असे असले तरी शालेय अभ्यासक्रमातून त्यांनी या गोष्टी वागळल्या नाहीत! नरसंहाराच्या इतिहासासह एकता आणि समेट यावर भर दिलाय. तरुण पिढीला जातीयतेच्या आधारावर भेदभाव टाळण्याचे शिक्षण दिले जातेय, ज्यामुळे नवीन पिढीतील हुतू आणि तुत्सी यांच्यातील संबंध सुधारले आहेत. रवांडाच्या आर्थिक प्रगतीमुळे दोन्ही समुदायांना रोजगार, शिक्षण आणि व्यवसायाच्या संधी मिळाल्या आहेत. किगालीसारख्या शहरी भागात हुतू आणि तुत्सी एकत्र काम ज्यामुळे तणाव कमी झालाय. सरकारच्या पुढाकाराने हुतू तुत्सी यांच्यातील मिश्र विवाहांचे प्रमाण वाढलेय. विशेषतः शहरी भागात. हे सामाजिक एकीकरणाचे एक सकारात्मक लक्षण आहे.
रवांडा सरकारने नरसंहारातील गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी गकाका कोर्ट्स (पारंपरिक समुदाय-आधारित न्यायालये) स्थापन केली, जिथे हutu समुदायातील अनेकांनी आपल्या कृतींसाठी तुत्सी पीडितांकडे सार्वजनिकपणे माफी मागितली. या कोर्ट्समध्ये सुमारे 20 लाख प्रकरणे हाताळली गेली, आणि अनेक हutu व्यक्तींनी पश्चाताप व्यक्त केला, काहींनी तुरुंगवास भोगला, तर काहींना समुदाय सेवेची शिक्षा देण्यात आली. या प्रक्रियेमुळे पश्चाताप आणि समेटाला प्रोत्साहन मिळाले. सरकारच्या सुधारणा, आंतरराष्ट्रीय सहाय्य आणि सामाजिक समेट यामुळे रवांडाने आश्चर्यकारक पुनर्बांधणी केली आहे आणि तो पूर्व आफ्रिकेतील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनला आहे. या सर्व गोष्टी कधी उघडपणे तर कधी चोरपावलाने या कादंबरीत आल्या आहेत! वाचून काही बोध घेता आला तर आनंदच आहे!
ज्यांची पोटं भरलेली असतात, ज्यांना उद्या काय खायचे नि त्यासाठी पैसे कुठून आणायचे याची भ्रांत नसते ते लोक भडकावत असतात अशा अर्थाचे एक वाक्य कादंबरीत येते. जे हुतू लोक दाणापाण्याला मौताज होते त्यांच्या डोक्यात पद्धतक्षीरपणे द्वेष पेरला, कामधंदे नसणारे नि मागेपुढे कुठली दौलत नसणारे हे सारे भणंग एकमेका विरोधात उभे ठाकले. उदारमतवादी हुतू लोकांनाही त्यांनी सोडलं नाही. आता तिथल्या सत्तेत उदारमतवादी हुतू आणि मवाळ तुत्सी आहेत, ज्यांनी चिथावणी दिली त्यांना व्यवस्थेत स्थान नाही! असेच चित्र युद्धोपरांत देशात दिसते.
या कादंबरीची विशेष गोष्ट म्हणजे लेखिका जन्माने अमेरिकन आहेत. त्यांचे आईवडील दोघेही मानसोपचार तज्ज्ञ. रवांडाच्या बातम्यांनी त्यांना विलक्षण घायाळ केलं. नरसंहार शेवटच्या टप्प्यात असताना त्या तिथं गेल्या. त्यानंतर काही वर्षे त्या तिथे राहिल्या. यातील पात्रे त्यांना तिथे रुग्णसेवा करताना गवसली. 2009 साली त्यांनी ही कादंबरी लिहिली. त्यांचे विशेष शिक्षण समुद्रशास्त्रात झालेय. बऱ्याच ठिकाणी त्यांनी भूकंपशास्त्रज्ञ आणि भुभौतिकशास्त्रज्ञ म्हणून काम केलेय. पूर्व आफ्रिकेच्या रिफ्टविषयी त्यांना विलक्षण आकर्षण आहे. त्यामुळे रवंडाविषयी लिहिताना त्यांनी अत्यंत सुरेख भौगोलिक वर्णने केली आहेत.
शांतता, सुव्यवस्था, विकास आणि प्रगती हा प्रत्येक नागरिकांचा हक्क आहे आणि याप्रती सर्व सरकरांची बांधिलकी असली पाहिजे. आपली सत्ता टिकावी म्हणून राजकीय आर्थिक सामर्थ्यवान लोक जनतेला आपसात लढवत ठेवतात आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतात. दोन्हीकडचे मूढ अंध याला बळी पडतात आणि पर्यायाने दोन पिढ्यांचे वाटोळे होते! मग सुरू होते जगण्याकरिता धावण्याची लढाई, रनिंग द रिफ्ट ही त्याचीच तर गोष्ट आहे!
- समीर गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा