चित्रपट गीत संगीत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चित्रपट गीत संगीत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २९ सप्टेंबर, २०१८

'चलो ज़िंदगी को मोहब्बत बना दें' : जगजीत आणि चित्रा सिंग - एका अनोख्या प्रेमाची कथा ...


रात्र गडद होत गेल्यावर चित्रासिंग आपल्या शयनकक्षातले दिवे मालवतात. म्लान उजेडाच्या साथीने तिथे अंधार वसतीस येतो. चित्रांना आता वेध असतात रात्रीतून तिथे सुरु होणाऱ्या मैफलीचे. आस्ते कदम तिथे मंच उभा राहतो, प्रेक्षक जमा होतात, पुढ्यात हार्मोनियम घेऊन बसलेले जगजीतसिंग अवतीर्ण होतात. रात्र जशी सरत जाते तसतशा गझलांच्या एकामागून एक मैफली सजतात. लोक आनंद घेत राहतात. टाळ्यांचा गजर होत राहतो. 'वन्समोअर'चे पुकारे होत राहतात, वीणा झंकारत राहते. मधूनच भानावर येणाऱ्या चित्रा आपल्या डोळ्यांच्या कडा पुसत दीर्घ निश्वास सोडतात. उत्तररात्रीच्या अखेरच्या प्रहरी थकलेल्या चित्रा त्यांच्या नकळत डोळे मिटून शांतपणे झोपी जातात. तेंव्हा फुलांनी सजलेला मंच अदृश्य होतो, टाळ्या वाजवणारे रसिक श्रोते लुप्त होतात. एक नीरव शांतता पसरते आणि खांद्यावर मखमली किरमिजी रंगाची शाल पांघरलेले, पांढऱ्या शुभ्र वस्त्रातले जगजीतजी त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या कोमल म्लान चेहऱ्यावरून आपला थरथरता हात फिरवतात. त्यांच्या डोळ्यातून ओघळणारा उष्म अश्रूंचा थेंब चित्रांच्या गाली पडायच्या आधी अदृश्य होतात. शीतल वाऱ्याच्या झुळुकेने जाग यावी तद्वत चित्रा जाग्या होतात. एकवार डोळे उघडतात आणि किंचित मंद स्मित करत पुन्हा झोपी जातात.

मंगळवार, ९ मे, २०१७

पुराने 'जख्म' - तुम आये तो आया मुझे याद....


१९९८ मध्ये महेश भट्टनी 'जख्म' हा चित्रपट काढला होता. त्यात एक अवीट गोडीचं अर्थपूर्ण गाणं होतं. "तुम आये तो आया मुझे याद, गली में आज चांद निकला.."
अलका याज्ञिकनी अगदी जीव ओतून हे गाणं गायलं होतं. आर्त हळव्या स्वरातील ही रचना गाणं ऐकल्यानंतर ओठांवर रेंगाळत राहते. गाणं बारकाईने बघितलं तर लक्षात येतं की या दाखवलेला प्रसंग म्हणजे महेश भट्ट आणि परवीन बाबीच्या जीवनातला 'तो' प्रसंग आहे.

महेश भट्टच्या प्रेमात देहभान हरपलेली परवीन एकदा सुरा हातात घेऊन त्याच्या घरात घुसली होती आणि महेशनी अनेक मिनतवाऱ्या केल्यानंतर हात जोडल्यानंतर तिने तिथून पाऊल काढते घेतले होते. (हाच प्रसंग त्यांनी 'अर्थ'मध्ये दाखवला होता). या नंतर बरेच दिवस महेशभट्ट परवीन बाबीकडे फिरकले नाहीत. तिनं मात्र पिच्छा पुरवला. शेवटी काही दिवस तिच्यापासून स्वतःला चुकवत फिरणाऱ्या महेश भट्टनी तिचं घर गाठलं तर त्यांना दारात उभं पाहून तिला हर्षवायुच व्हायचा राहिला होता. महेश आत आल्यावर तिनं भाबडेपणाने सगळी दारं खिडक्या लावून घर बंदिस्त करून घेतलं. जणू आता महेश तिच्या घरात कायमचे कैद झाले असा तिचा होरा असावा. पण पुढे जाऊन नियतीने तिची क्रूर चेष्टा केली हे आपणा सर्वांना ठाऊक आहेच. असो.... ही घटना महेश भट्ट यांच्या मनावर खोल कोरली गेली अन तिचे पडद्यावरील प्रकटीकरण म्हणजे 'जख्म'मधलं हे गाणं...

शनिवार, २२ एप्रिल, २०१७

सौतन - पडद्यामागची करुण कथा ...




1967 चे वर्ष होते. तरुण सावनकुमारला चित्रपट सृष्टीत आपलं नाव कमवायचं होतं, इतरांपेक्षा वेगळं काही करून दाखवायचं होतं. अभिनेता संजीवकुमारला नायकाच्या भूमिकेत ठेवून त्याने ‘नौनिहाल’ हा आगळा वेगळा सिनेमा निर्मिला मात्र बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा सपशेल पडला. सावनकुमार दुःखी झाला. मात्र तो हार मानणाऱ्यापैकी नव्हता. त्याने एक कथा लिहिली होती, त्यावर त्याला सिनेमा बनवायचा होता नि त्याचे दिग्दर्शनही स्वतःच करायचे होते. त्याच्या मित्राने कथा ऐकली नि त्याला सांगितले की या कथेसाठी नायिका म्हणून मीनाकुमारीच सर्वश्रेष्ठ ठरेल. दुसऱ्याच दिवशी सावनकुमारने मीनाकुमारीला फोन केला. मीनाच्या बहिणीने फोन उचलला. सावनने आपलं काम सांगितलं. त्याच दिवशी दुपारी मीनाने त्याला घरी बोलवलं. घरी जाताच त्याने आपली ओळख करून दिली आणि आपलं कामही सांगितलं. मीनाकुमारी थक्क झाली कारण तिच्यापेक्षाही वयाने लहान असणारा आणि केवळ जुजबी अनुभव असणारा तरुण तिला कथा ऐकवत होता. कथा ऐकून आणि त्या तरुणाविषयीच्या अकस्मात भावना आकर्षणातून तिने होकार दिला. सिनेमाची तयारी पूर्ण झाली. चित्रिकरण सुरू झाले. या दरम्यान त्यांच्या दोघांमध्ये एक प्लेटोनिक नाते तयार झाले जे देह आणि लैंगिक जाणिवांच्या पुढचे होते. सिनेमाचे शुटींग सुरू झाले नि मीनाकुमारीची तब्येत वरचेवर बिघडू लागली. 2 डिसेंबर 1971 ला मीनाकुमारीवरतीच अखेरचा शॉट शूट झाला. त्यानंतर तिची प्रकृती इतकी खालावली की तिच्या मृत्यूच्या वावड्या उठू लागल्या. तिच्या आयुष्यातील अखेरच्या काळात याच सावनकुमारने तिची सेवा सुश्रूषा केली. तिच्या रक्ताच्या उलट्या तो हाताने साफ करायचा. सिनेमा पूर्ण होऊनदेखील रिलीज होण्यास आर्थिक अडथळे येत होते. मीनाकुमारीने तिच्या नावावर असलेला बंगला विकून त्याला पैसे दिले. 31 मार्च 1972 रोजी तिचे देहावसान झाले. सावनकुमार अतिव दुःखात बुडाला. मीना त्याची पत्नी नसली तरी त्याचे सर्वस्व होते, त्याच्यासाठी तीच देव होती; तीच मसिहा होती. मीनाच्या मृत्यूनंतर आठ महिन्यांनी 22 नोव्हेंबर 1972 मध्ये हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाचे नाव होते ‘गोमती के किनारे’! सिनेमा दणकून आपटला! सावनकुमारला याचे विलक्षण दुःख झाले. मीना आणि त्याच्या प्रेमभावनेविषयी त्याने कविता लिहिली. त्यातलंच एक गीत त्याला अजरामर करून गेलं! त्यासाठी आपल्याला आणखी एक दशक पुढे जावे लागेल!

गुरुवार, ३० मार्च, २०१७

'शोले', आरडी आणि जिना लोलोब्रिजीड - एक अनटोल्ड स्टोरी...



खाली दिलेल्या लिंकमधील कृष्णधवल फोटोची गोष्ट 'शोले'शी संबंधित आहे आणि यातील उजव्या बाजूच्या स्त्रीविषयीची माहिती अत्यंत रम्य आहे. पण त्या आधी हा सर्व काय प्रकार होता याची थोडीशी माहिती घेतली तरच सर्व नीट उमजेल..... १९७५ ला 'शोले' रिलीज झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसला अशी आग लावली की ऑलटाईम ब्लॉकबस्टर मुव्ही लिस्टमध्ये अजूनही तो अग्रस्थानी आहे. 'शोले'बद्दल अनेकांनी अनेकवेळा लिहिलंय कारण त्यात प्रचंड कंटेंट ठासून भरलेलं आहे. 'शोले'तलं हेलनवर चित्रित केलेलं 'मेहबूबा मेहबूबा' हे अप्रतिम गाणं अफाट गाजलं होतं. आरडींना हे गाणं आधी आशाजींकडून प्लेबॅक करून हवं होतं.

शुक्रवार, २९ जुलै, २०१६

चिंगारी 'अमरप्रेम'मधली ....



काळोख्या रात्री हेलकावे खात चाललेली नाव. नावेवर प्रत्येक क्षणाला आदळणाऱ्या लाटा आणि त्यांचा सपासप आवाज. नावेच्या पुढच्या टोकाला धूसर दिसणारा नावाडी आहे जो एका संथ लयीत वल्ही मारतोय. नावेवरच्या शाकारलेल्या झोपडीत पाठमोरी बसलेली आहे, ती पुष्पा ! डोईजवळच्या हलत्या कंदीलाच्या फिकट पिवळसर उजेडात ती अगदी दिलखुलास सुरेख दिसतेय, अगदी मन लट्टू व्हावे अशी दिसत्येय ती. आनंदी रंगाची निळ्या झाकेतली साडी तिला खूपच खुलून दिसत्येय. फिकट निळ्या रंगाचे किंचित आवळ पोलके घालून बसलेल्या पुष्पाने हातात गच्च भरलेल्या जर्दनिळ्या बांगड्या, गळ्यात सोन्याचे सर आणि कानात हलणारे गोलाकार झुबे घातलेत ! कपाळावर ठळक मोठा गोलाकार गंध. नाकात सोन्याची लखलखती मोरणी...खरे तर तिच्या गालावर पडणाऱ्या खळ्यांनीच माणूस घायाळ व्हावा आणि तिच्या मासोळी डोळ्यात सदा पाझरणारे स्नेहाचे भाव बघून पुन्हा जीवित व्हावा !...