तामिळनाडूमधील कुवग्गम या छोट्याशा खेड्यात 22 एप्रिल ते 6 मे दरम्यान यंदाच्या वर्षीचा, किन्नरांचा इरावन (कूथांडवर) सोहळा संपन्न झाला. आयुष्यात एकदाच किन्नरांचा विवाह होतो! हे लग्न एक दिवसाचे असते. या विवाहाची कथा महाभारताशी निगडीत आहे. पांडवांना वनवासात जावे लागले त्या काळातली ही गोष्ट. या कथेनुसार वनवासात भटकत असणारा अर्जुन नागलोकात जातो. गंगा नदीतील जलसर्पांचा राजा कौरव्य, याची मुलगी उलूपी ह्या नागकन्येशी त्याचा विवाह होतो, अर्जुनापासून उलूपीच्या पोटी जन्मलेला पुत्र इरावन होय. इरावन हा किन्नरांचा देव! ही उलूपी अर्जुन सदेह स्वर्गाच्या मार्गावर जाईपर्यंत त्याच्या सोबत होती. महाभारतानुसार कुरुक्षेत्रात 18 दिवस चाललेल्या पांडव - कौरव युद्धात पांडवांचा विजय व्हावा म्हणून इरावनने स्वतःला कालीमातेस अर्पण केले, आपले गुप्तांग दान केले. शिवाय आपले शिर धडापासून अलग केले. त्याच्या या वज्रनिश्चयामुळे श्रीकृष्णाने त्याला जीवदान दिले. मात्र इरावनने ते वरदान नाकारत मरण्याआधी कृष्णासोबत विवाहाची इच्छा व्यक्त केली. त्याच्या या इच्छेला कृष्णाने मान दिला पण त्यासाठी स्वतःच्या स्त्रीरुपाला पसंती दिली. याकरिता कृष्णाने स्त्रीरूप धारण केले ते म्हणजेच मोहिनी ! (कृष्णाने धारण केलेले हे स्त्रीरूप इतके देखणे होते की आजही मोहिनी या शब्दाचा अर्थ एखाद्यावर गारुड होणे असा घेतला जातो)
रेड लाईट डायरीज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
रेड लाईट डायरीज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
रविवार, १८ मे, २०२५
शुक्रवार, २ मे, २०२५
मुजफ्फरपूर, चतुर्भुजस्थान आणि सीतामढी - पोक आलेल्या लोकांचा देश!
![]() |
नर्तकीच्या घरातला फोटो |
शनिवार, १२ एप्रिल, २०२५
वाराणसी गँगरेप आणि 546 मुलींचे शोषण - धक्कादायक आणि भयंकर!
वाराणसीमध्ये एकोणीस वर्षे वयाच्या मुलीवर सात दिवसांत 23 जणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आलीय. या घटनेस अनेक पैलू आहेत. मुलीचीही एक महत्वाची चुक आहे. यातला एक पैलू केवळ उत्तर प्रदेश सरकारचा नसून उत्तरेकडील समग्र राज्यांचा आहे. कथित साधू संन्यासी जोगे फकीर ही मंडळी इकडे सर्रास चिलीम फुकताना दिसून येतात. यांच्या व्यसनांना आळा घालायचा म्हणजे धार्मिक भावना, अस्मिता आदींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे सरकारची पंचाईत आहे.
वाराणसीमध्ये पिशाच्च मोचन नावाचा एक भाग आहे. इथे एक कुंड आहे जिथे काही विधी केले तर पिशाच्च बाधा दूर होते अशी धारणा आहे. इथे काही लोंक पिंपळाच्या झाडाला नाणी चिटकवतात आणि आपल्यात बाधा आहे की नाही हे जाणून घेतात. अर्थातच हा सगळा श्रद्धा अंधश्रद्धा यांचा बाजार. तर रात्री या भागात नशेडीच अधिक आढळतात. मुलीवर पहिला रेप याच भागात झालाय.
शुक्रवार, २८ मार्च, २०२५
आओगे जब तुम साजना..
हे गाणं फर्माईश म्हणून अनेक प्रेमभंग झालेल्या तरुण पोरांनी गायला सांगितलेलं अजूनही पक्कं स्मरणात आहे. त्याहीआधी 1991 मध्ये नाना पाटेकर, डिम्पल, माधुरी यांच्या 'प्रहार'मध्ये शुभा गुर्टू यांनी गायलेली 'याद पिया की आये..' ही ठुमरी खूप जीव लावून ऐकलेली! तिच्याशी जसे एकरूप होता येत होतं तसेच 'आओगे जब तुम साजना'बाबतीत व्हायचे!
बुधवार, २६ मार्च, २०२५
एक दिवस शोषित जिवांच्या आनंदाचा!
![]() |
'क्रांती महिला संघ' स्नेहमेळावा |
गुरुवार, १३ मार्च, २०२५
ज्युलिअस सीझर - वासनांच्या मुळाशी जाणे कठीण नाही!
रोमन सम्राट
ज्युलियस सीझरच्या काळात बलात्कार आणि सेक्स संबंधी गुन्हे इतके वाढले होते की तो
हताश होऊन गेला होता. त्यात जबरी समलिंगी संभोगींचींही बरीच संख्या होती. यावर
त्याने एक अभ्यासगट नेमला पण त्याच्या अहवालाची वाट पाहण्याइतका वेळ त्याच्याकडे
नव्हता.
त्याने त्याच्या काही शहाण्या लोकांना निरीक्षणे नोंदवायला
सांगितली. त्यात एक निरीक्षण होतं सिन्येडसबद्दलचे (cinaedus याचा उच्चार किनायडूस असाही करतात). पिळदार देहयष्टी असलेले पण शारीरिक ढब
फेमिनाईन असलेले हे तरुण डफ वादक होते.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)