साहित्य रसास्वाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
साहित्य रसास्वाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०२४
शोध मराठी रंगभूमीवरील 'ती'च्या अस्तित्वाचा!
शुक्रवार, ७ जून, २०२४
अचर्चित विषयावरची धाडसी कादंबरी - दुभंगलेलं जीवन!
समलैंगिकतेबद्दल भारतीय समाज मनामध्ये अजूनही स्पष्टता नाही. समाज याविषयी तोंडात गुळणी धरून गप्प राहणे पसंत करतो. काहींच्या मते हा चर्चेचा विषय नाही कारण हा मुद्दा आपल्या संस्कृती संस्काराच्या विरोधातला आहे. खेरीज हा वैयक्तिक विषय असून याला सार्वजनिक स्वरूप देऊ नये अशी मल्लिनाथीही केली जाते. तर काहींना असे वाटते की हा
शारीरिक जडणघडणीचा विषय आहे याच्यावर खुली चर्चा योग्य नव्हे. काहींना हे पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण वाटते. याविषयी खोलात जाऊन चर्चा करण्याऐवजी काहीजण कुजबुज स्वरूपामध्ये बोलताना आढळतात! समलैंगिकतेडे संकुचित दृष्टिकोनातून पाहण्याच्या वृत्तीचे प्रतिबिंब भारतीय साहित्य, विविध कलाविष्कार आणि अन्य माध्यमांमध्ये दिसते. अत्यंत तोकड्या प्रमाणात याच्या समर्थनार्थ लिहिले गेलेय. त्यावर वाचकांचा उस्फूर्त प्रतिसाद न येता कथित संस्कृतीरक्षकांच्या गोंधळलेल्या मानसिकतेचे प्रतिसादच अधिक येतात. समलैंगिकतेवरती चित्रे, कथा, कविता, प्रहसने, सिनेमे, जाहिराती, नाटके, डॉक्युमेंट्रीज, पथनाट्य यांचे प्रमाण एकूण निर्मितीच्या प्रमाणात अगदी नगण्य आहे. भारतीय समाजात एकूण किती लोकांचा कल समलैंगिकतेकडे आहे याची नेमकी आकडेवारीही आपल्याला ठाऊक नाही. ती एक नकोशी देहवृत्ती आहे इथून आपली जाणीव सुरू होते, ही अनैतिक आणि अनैसर्गिक भावना आहे असे आपल्या मनात हेतुतः रुजवले गेलेय. अशी भावना मनात येणे हे पाप आहे ही आपली कमालीची 'प्रगल्भता'(?)! प्रत्यक्षात वास्तव उलटे आहे. मानवाखेरीज 1500 हून अधिक प्राण्यांमध्ये समलैंगिकता आढळते त्यामध्ये सिंह वाघ कुत्रा पेंग्विन इत्यादी प्राण्यांचा समावेश आहे. व्यक्तीचा लैंगिक कल पारंपरिक नसू शकतो, एखाद्याला समलैंगिक असावं वाटणं हे नैसर्गिक आहे हे जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केलेय. आपल्या शिक्षणप्रणालीमधून, अभ्यासक्रमातून लैंगिक शिक्षण वगळलेय कारण ते गुप्तज्ञान आहे अशी आपली जुनाट धारणा!
![]() |
दुभंगलेलं जीवन - मुखपृष्ठ |
सोमवार, २१ नोव्हेंबर, २०२२
निळे घर ... – 'ब्ल्यू हाऊस' ए स्टोरी बाय इमॅन्यूएल एरेन
इमॅन्यूएल एरेनच्या काकांनी त्यांच्या आयुष्यातली ही हकीकत एरेनला सांगितलेली. अर्थार्जनासाठी त्यांना फ्रान्समध्ये खूप भटकंती केली होती. चाळीसेक वर्षांपूर्वी एका सफरीमध्ये ते दीजो जिल्ह्याजवळील ब्लेझी-बा या लहानग्या स्टेशनवर गेलेले. तिथे त्यांना निळ्या रंगात रंगलेलं एक सुंदर छोटंसं घर दिसलं. पाऊस आणि बर्फाच्या वादळामुळे घराचा निळा रंग काहीसा फिका झाला होता. पहिल्यांदा ते घर त्यांनी पाहिलं तेंव्हा घरासमोरील बागेत गुलाबी चेहऱ्याची एक दहाएक वर्षांची मुलगी बॉल खेळत होती. तिने पिवळा पोशाख घातला होता. तिचे रेशमी केस निळ्या रेशमी रिबनने बांधलेले होते. ती एखादी आनंदमूर्ती भासत होती. खरे तर त्या दिवशी सकाळी काकांना अस्वस्थ वाटत होते. खेरीज त्यांचा व्यवसायही यथातथाच असल्याने भविष्याच्या भीतीसह ते पॅरिसला परतत होते. मात्र या क्षणीच्या दृश्याने त्यांच्या मनातले द्वंद्व संपुष्टात आणलेलं. पळभर त्यांना वाटलं की अशा ठिकाणी राहणारी माणसं नक्कीच सुखी असतात कारण त्यांना कसलीही चिंता नसते, वेदना नसतात. आनंदमूर्ती असलेल्या त्या मुलीचा साधेपणा पाहून त्यांना हेवा वाटला. तिच्यासारखं आपलंही चिंतेचं ओझं उतरवता आलं तर काय बहार येईल या विचाराने ते रोमांचित झाले. क्षणात ट्रेन निघाली आणि तितक्यात कोणीतरी त्या निळ्या घराच्या खिडकीतून हाक मारली, "लॉरिन!"... आणि क्षणात ती मुलगी घरात गेली. लॉरीन ! हे नाव काकांना खूप गोड वाटलं. ते शांतपणे ट्रेनमध्ये बसून लॉरीन, तिचा चेंडू, ती बाग आणि ते निळे घर कल्पनाचक्षुंनी पाहू लागले. काळासोबत घर, बाग, चेंडू, लॉरिन हे सर्व अदृश्य होऊन त्यांच्या काळजात विलीन झाले. यानंतर खूप काळ तिकडे जाणे त्यांना जमले नाही.
सोमवार, १२ सप्टेंबर, २०२२
अभिव्यक्तीचे विद्रुपीकरण करणारे 'अनसोशल' अल्गोरिदम...
इथे सातत्याने केवळ राजकीय भूमिका मांडणाऱ्या मंडळींना त्याचा स्ट्रेसदेखील येत असतो. तब्येतीवर त्याचे साधकबाधक परिणामही होतात. अनेकांच्या अकाली अकस्मात जाण्यात या गोष्टी हातभार लावतात. मागील काही वर्षात अशी अनेक मित्रमंडळी पाहिली आहेत. तुम्हीदेखील केवळ नि केवळ राजकीय भूमिका इथे मांडत असाल वा तुमच्या मित्रयादीत केवळ राजकीय पालख्या उचलणारे भोई असतील तर तुम्ही हे वाचावं.
इथं सोशल मीडियावर राजकीय वादविवाद अधिक करत राहिलं वा सातत्याने तशाच पोस्टवर अधिक व्यक्त होत राहिलं की फेसबुकच्या अल्गोरिदमनुसार आपल्या फीडमध्ये तशाच पोस्ट्स अमाप येत राहतात. मग माणूस आपल्या आवडी निवडी, आपले छंद, आपली सर्वंकष बौद्धिक भूक विसरून एकरेषीय प्रकटनाच्या सापळ्यात अडकू लागतो. चित्रे, शिल्पे, पुस्तके, सिनेमे, साहित्य, विज्ञान, अध्यात्म, अधिभौतिक तत्वे, निसर्ग, पर्यावरण, प्रवास, खाद्यसंस्कृती, वस्त्रांची दुनिया, जीवनाशी निगडित असणाऱ्या नवरसांच्या विविध घटकांना पोषक असं खाद्य देणारे अनेक घटक इथे असतात मात्र माणूस केवळ राजकीय पोस्ट्सच्या सापळ्यात अडकत जातो. त्याचे विश्व संकुचित करण्याचे काम फेसबुक करते.
इथं सोशल मीडियावर राजकीय वादविवाद अधिक करत राहिलं वा सातत्याने तशाच पोस्टवर अधिक व्यक्त होत राहिलं की फेसबुकच्या अल्गोरिदमनुसार आपल्या फीडमध्ये तशाच पोस्ट्स अमाप येत राहतात. मग माणूस आपल्या आवडी निवडी, आपले छंद, आपली सर्वंकष बौद्धिक भूक विसरून एकरेषीय प्रकटनाच्या सापळ्यात अडकू लागतो. चित्रे, शिल्पे, पुस्तके, सिनेमे, साहित्य, विज्ञान, अध्यात्म, अधिभौतिक तत्वे, निसर्ग, पर्यावरण, प्रवास, खाद्यसंस्कृती, वस्त्रांची दुनिया, जीवनाशी निगडित असणाऱ्या नवरसांच्या विविध घटकांना पोषक असं खाद्य देणारे अनेक घटक इथे असतात मात्र माणूस केवळ राजकीय पोस्ट्सच्या सापळ्यात अडकत जातो. त्याचे विश्व संकुचित करण्याचे काम फेसबुक करते.
सोशल मीडिया, वाचन आणि पुस्तकांचा खप - नवे परस्परावलंबी सूत्र
या विषयावर बऱ्याच जणांनी सोशल मीडियावरील पुस्तक विषयक चर्चा वा पुस्तकांच्या अनुषंगाने इथे होणारा लेखन संवाद यांना केंद्रस्थानी ठेऊन काही निष्कर्ष वा मते मांडली आहेत. तर काहींनी इथे कोणत्या पद्धतीचे वाचन जास्त पसंत केले जाते, कोणत्या लेखन शैलीकडे युजर्सचा कल आहे, सोशलमीडिया युजर्स कोणत्या लेखकांना अधिक पसंत करतात वा कोणत्या लेखकांवर / पुस्तकांवर बोलतात, कुठल्या कालखंडातील पुस्तके अजूनही वाचली जातात, कोणत्या लेखकांचा साधा नामोल्लेखही होत नाही वा कोणत्या वर्गवारीतील पुस्तकांविषयी किमान चर्चा देखील केली जात नाही इत्यादी मुद्द्यांवर मत प्रकटन केलं आहे.
*** *****
सोशल मीडियापैकी फेसबुक हे अन्य प्लॅटफॉर्म्सपैकी काहीसे अधिक लेखनविस्तृत माध्यम आहे. तुलनेने इन्स्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन इथे लेखनासाठी कमी स्पेस आहे. त्यामुळे सदर पोस्टकर्त्यांनी सोशल मीडियावरील चर्चा वा इथल्या पोस्ट्समधील सूर याविषयी निष्कर्ष मांडताना फेसबुक याच माध्यमाचा मुख्यत्वे विचार केला असावा असे मी गृहीत धरतो. याबाबतचे काही बिंदू लक्षात घेणं अनिवार्य आहे ज्यान्वये काहीसे नेमके अंदाज व्यक्त करता येतील.
*** *****
सोशल मीडियापैकी फेसबुक हे अन्य प्लॅटफॉर्म्सपैकी काहीसे अधिक लेखनविस्तृत माध्यम आहे. तुलनेने इन्स्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन इथे लेखनासाठी कमी स्पेस आहे. त्यामुळे सदर पोस्टकर्त्यांनी सोशल मीडियावरील चर्चा वा इथल्या पोस्ट्समधील सूर याविषयी निष्कर्ष मांडताना फेसबुक याच माध्यमाचा मुख्यत्वे विचार केला असावा असे मी गृहीत धरतो. याबाबतचे काही बिंदू लक्षात घेणं अनिवार्य आहे ज्यान्वये काहीसे नेमके अंदाज व्यक्त करता येतील.
गुरुवार, २८ एप्रिल, २०२२
अलेक्झांडर पुश्किनची गोष्ट - डाकचौकीचा पहारेकरी

अलेक्झांडर पुश्किन
अलेक्झांडर पुश्किन हा रशियन साहित्यिक. त्याच्या कविता, नाटके, कादंबऱ्या आणि कथा प्रसिद्ध आहेत. त्याच्या एका विख्यात कथेचे हे सार. काळीज हलवून टाकेल अशी गोष्ट. पुश्किनचा काळ आजपासून दोनशे वर्षांपूर्वीचा आहे त्यानुषंगाने या कथेतील बारकावे समजून घेतले तर कथा अधिक उठावदार वाटते. कित्येक दशकांपूर्वी डाकपत्र व्यवहाराला अत्यंत महत्व होतं. जिथे वैराण वस्त्या असायच्या तिथेही पत्रे पोहोच व्हायची, साहजिकच या खात्याशी सर्वांचा स्नेह असे. दीर्घ पल्ल्याच्या प्रवासमार्गांवर इथे वाटसरूला थांबण्याची, आराम करण्याची, अल्पोपहाराची सोयही असे. खेरीज आर्थिक व्यवहारदेखील डाकमाध्यमातून होत असल्याने पहारेकऱ्याची नेमणूक असे. तिथे येणाऱ्या संशयास्पद व्यक्तींना जेंव्हा तो दाद देत नसे तेंव्हा त्याला दमदाटी व्हायची वा त्याच्याशी वाद व्हायचे. त्याच्या जागी स्वतःची तुलना केल्यासच त्याचे दुःख कळू शकते. पोस्टचौकीचा पहारेदार नेमका कसा असायचा हे गतकाळाच्या संदर्भांतूनच उमगते. दिवस असो की रात्र त्याला शांतता नसे. अलेक्झांडर पुश्किन यांनी संपूर्ण रशियामध्ये प्रवास केल्याने सर्व महामार्ग त्यांच्या परिचयाचे ! पुश्किनना ओळखत नसावा असा पोस्टऑफिसचा एखादाच पहारेकरी असावा. जनतेत यांची प्रतिमा चुकीची होती. वास्तवात ते शांतताप्रिय, सेवाभावी, मनमिळाऊ, नम्र, पैशाचा लोभ नसणारे असत. अशाच एका पहारेदाराची ही गोष्ट. सॅमसन वॉरेन त्याचं नाव.
गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२०
प्रेमचंदांची फाटकी चप्पल...
तुम्ही कधी फाटकी चप्पल घातलीय का ?
सर्रास आपली फाटलेली चप्पल कुणाच्या नजरेस पडू नये म्हणून बऱ्याचदा छुपा आटापिटा केला जातो.
मात्र एखाद्या विख्यात व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत एक रमणीय आठवण म्हणून फोटो काढून घेताना फाटकी पादत्राणे घातली असतील तर त्यातून आपण कोणते अर्थ लावू शकतो ?
सर्रास आपली फाटलेली चप्पल कुणाच्या नजरेस पडू नये म्हणून बऱ्याचदा छुपा आटापिटा केला जातो.
मात्र एखाद्या विख्यात व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत एक रमणीय आठवण म्हणून फोटो काढून घेताना फाटकी पादत्राणे घातली असतील तर त्यातून आपण कोणते अर्थ लावू शकतो ?
एख्याद्याच्या पायातली फाटकी चप्पल पाहून आपल्या मनात जे विचार येतात ते आपलं खरं चरित्र असतं जे आपल्या एकट्यालाच ठाऊक असतं. असो..
ख्यातनाम साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांनी पत्नी शिवरानीदेवीसोबत काढलेला एक फोटो खूप प्रसिद्ध आहे.
या फोटोत मुन्शीजींच्या एका पायातला बूट फाटलेला आहे आणि त्यातून त्यांच्या पायाची करंगुळी बाहेर आलेली स्पष्ट दिसते.
वरवर पाहता ही एक सामान्य बाब वाटेल. मात्र याचे अन्वयार्थ काय लावता येतील हे महत्वाचं ठरतं.
हिंदीतले जानेमाने लेखक हरिशंकर परसाई यांनी यावर एक लेख लिहिला होता ज्यावर हिंदी साहित्य जगतात कधी काळी मोठा उहापोह झाला होता. हा लेख मराठीत अनुवादित करून इथे डकवावा असे वाटत होते मात्र परसाईजींच्या प्रवाही आणि अमीट गोडीच्या हिंदीचा आस्वाद घेता यावा म्हणून हिंदी लेख जसाच्या तसा देतो आहे.
सोमवार, २ मार्च, २०२०
मणिकर्णिकेच्या घाटावरच्या स्मृती...
शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०१९
बदनाम गल्ल्यांचा 'अक्षर फरिश्ता' - मंटो !
![]() |
शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१९
आत्महत्त्या केलेल्या आईच्या शोधात...
आईच्या आयुष्यात डोकावता येतं का ?
आई हयात नसताना तिच्याजागी स्वतःला ठेवून तिचं दुःख आणि तिच्या इच्छा आकांक्षांचा चुराडा मांडता येईल का ? आईने भोगलेली दुःखे तिला सहन करावा लागलेला दुस्वास, तिची आयुष्यभराची परवड काटेकोर तशीच लिहिता येईल का ? आईच्या इच्छा वासना ; तिच्या भावनांची गळचेपी, न गवसलेलं इप्सित हे सगळं मांडता येईल का ?
सोमवार, १० जून, २०१९
विद्रोही परखड लेखनाचे दीपस्तंभ - गिरीश कार्नाड
आपल्या जन्मदात्या वडीलांच्या वंशातून न जन्मलेल्या पण आपल्या जन्माआधीपासूनच आपल्या मायपित्यासोबत राहणाऱ्या आपल्या सावत्र भावास आपल्याच वडीलांचं नाव लावता यावं म्हणून कुठल्या धाकट्या भावानं संघर्ष केल्याचं तुमच्या पाहण्यात आहे का ?
नाही ना ?
पण एक माणूस होता असा.
त्याची ही दास्तान.
गिरीश कार्नाड त्याचं नाव.
नाही ना ?
पण एक माणूस होता असा.
त्याची ही दास्तान.
गिरीश कार्नाड त्याचं नाव.
शनिवार, ८ डिसेंबर, २०१८
जगभरातील प्रतिभावंतांनी झापडबंद चौकटी मोडल्यात, आपले काय ?
वर्ष संपत आलं की विविध क्षेत्रातील लोक सरत्या वर्षात त्यांच्या प्रांतात झालेल्या घडामोडींचा आढावा मांडू लागतात आणि त्यातील तपशीलवार निष्कर्षावरून हे वर्ष त्या क्षेत्रास कसे गेले याचा बऱ्यापैकी अंदाज येतो. यातली व्यक्तीसापेक्ष मतभिन्नता वगळल्यास अनुमान बहुतांश समान येते. सर्वच क्षेत्रातील वर्षभराच्या आलेखाचे एकत्रीकरण केल्यास जगभराच्या मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि पारलौकिक कलाचे एकसंध चित्र समोर येते. लोकांच्या मनात नेमके काय चालले आहे याचे हे प्रतिबिंब असते. यंदाच्या वर्षी साहित्य- चित्रकृतींच्या प्रतिभाविष्कारात जगभरातल्या विविध भाषांतून मर्मभेदी विषयांवर नेटके भाष्य केलं गेलंय. अडगळीत पडलेले वस्तूविषय केंद्रस्थानी आणण्याचे श्रेय यामागच्या प्रतीभावंताना द्यावे लागेल. मानवी जीवनाच्या विस्तृत पटात रोज नजरेस पडणारे तरीदेखील दखल न घेतले गेलेले अनेक घटक, घटना आणि विषय अत्यंत भेदक पद्धतीने यात मांडले गेलेत.
बुधवार, २६ सप्टेंबर, २०१८
मंटो, भाऊ पाध्ये, 'वासूनाका' आणि आचार्य अत्रे ...

भाऊ उर्फ प्रभाकर नारायण पाध्ये यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९२६चा. ते दादरचे. त्यांच्या कथा कादंबऱ्यांनी तथाकथित लेखन सभ्यतेच्या अक्षरशः चिंधडया उडवल्या. सआदत हसन मंटोंनी जे काम हिंदीत केलं होतं तेच थोड्या फार फरकाने भाऊंनी मराठीत केलं होतं. मंटोंना निदान मृत्यूपश्चात अफाट लोकप्रियता मिळाली, लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं, त्यांच्यावर कवने रचली. त्या मानाने भाऊ कमनशिबी ठरले. त्या काळात साधनांची वानवा असूनही भाऊंचे शिक्षण चांगलेच झाले होते. १९४८ साली मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात त्यांनी पदवी संपादन केलेली. पदवी संपादनानंतर काही काळ (१९४९-५१) त्यांनी कामगार चळवळीत कार्यकर्ता म्हणून काम केलं. त्यानंतर तीन वर्षँ ते माध्यमिक शाळेत शिक्षकाचे काम केलं. नंतर वडाळ्यातील स्प्रिंग मिल येथे चार वर्षँ व एलआयसीत चार महिने त्यांनी कारकुनी केली. १९५६ मध्ये शोशन्ना माझगांवकर या कामगार चळवळीतील कार्यकर्तीशी त्यांचा विवाह झाला. काही काळ त्यांनी 'हिंद मझदूर', 'नवाकाळ'(१ वर्ष) व 'नवशक्ती'(१० वर्षं) या वृत्तपत्रांमधून पत्रकारिता केली. 'नवशक्ती' सोडल्यावर काही काळ त्यांनी 'झूम' या सिने-साप्ताहिकाचे संपादन केलं. 'रहस्यरंजन', 'अभिरुची', 'माणूस', 'सोबत', 'दिनांक', 'क्रीडांगण', 'चंद्रयुग' या नियतकालिकांतून स्तंभलेखन केलं.१९८९पासून अर्धांगाच्या आघाताने त्यांना लेखन अशक्य झालं. ३० ऑक्टोबर १९९६ रोजी त्यांचं निधन झालं.
शनिवार, १८ ऑगस्ट, २०१८
महादेवी वर्मा यांची कविता - ठाकुरजी !
वय जसजसे वाढत जाते तसतशी मानसिकता बदलत जाते. विचारधारा प्रगल्भ होत जाते. जीवनाकडे आणि सकल चराचराकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत जातो. काही 'दिव्य' लोक याला अपवाद असू शकतात. पण ज्यांच्यात संवेंदनशीलता आणि आत्मचिंतन करण्याची प्रवृत्ती असते त्यांचे विचार सातत्याने बदलत जाऊन विरक्तीच्या डोहाशी एकरूप होत चाललेल्या एका धीरगंभीर औदुंबरासारखी त्यांची अखेरची अवस्था होते. ज्ञानपीठसह असंख्य पुरस्कार -गौरव विजेत्या महादेवी वर्मा यांना गुगलने आजचे डूडल समर्पित केले आहे. २६ मार्च १९०७ चा त्यांचा जन्म. त्यांच्या जन्मानंतर वडील बांके बिहारी यांना हर्षवायू होणं बाकी होतं, कारण त्यांच्या कुटुंबात तब्बल २०० वर्षांनी मुलगी जन्मास आली होती. ते ज्या देवीचे साधक होते तिचेच नाव त्यांनी तिला दिले, 'महादेवी' !
मंगळवार, १२ जून, २०१८
जात्यावरच्या 'ओवी'चं आशयसंपन्न विश्व - #ओवी_गाथा !
#ओवी_गाथा - १०
"संगत करं नारी दुरल्या देशीच्या पकशा
खडीच्या चोळीवर त्याच्या नावाचा नकशा."
एखाद्या स्त्रीने गावाबाहेरील वा बिरादरीबाहेरील परपुरुषाशी सूत जुळवले तर ते संबंध लपून राहत नाहीत. त्या 'दूर देशाच्या पक्षाचं' नाव गाव तिच्या मनावर कोरलं गेल्याने तिच्या चोळीत देखील त्याचं प्रतिबिंब उमटते. तिचं न्हाण झाल्यावर खडीवर वाळत घातलेल्या तिच्या चोळीवर त्याच्या नावाचा नकाशाच पाहायला मिळतो !!
"संगत करं नारी दुरल्या देशीच्या पकशा
खडीच्या चोळीवर त्याच्या नावाचा नकशा."
एखाद्या स्त्रीने गावाबाहेरील वा बिरादरीबाहेरील परपुरुषाशी सूत जुळवले तर ते संबंध लपून राहत नाहीत. त्या 'दूर देशाच्या पक्षाचं' नाव गाव तिच्या मनावर कोरलं गेल्याने तिच्या चोळीत देखील त्याचं प्रतिबिंब उमटते. तिचं न्हाण झाल्यावर खडीवर वाळत घातलेल्या तिच्या चोळीवर त्याच्या नावाचा नकाशाच पाहायला मिळतो !!
________________________________________
#ओवी_गाथा - ११
"गुणाच्या माणसा गुण केलेस माहेरी
धन्याची कोथिंबीर वास मळ्याच्या बाहेरी."
रानात धने पेरले तर त्याची कोथिंबीरच उगवते. रानात उगवलेली कोथिंबीर कितीही झाकून पाकून ठेवली तरी तिचा वास दूरवर जातो आणि माणूस लांबूनच ओळखतो की मळ्यात धनं पेरलंय. त्यासाठी कुणाच्या कानात सांगावं लागत नाही ते कळतंच. तसेच एखाद्या स्त्रीचे / पुरुषाचे लग्नाआधी काही गुण उधळून झाले असले तरी ते उघड होतातच. त्याचा दरवळ कधी ना कधी होतोच ...
________________________________________
#ओवी_गाथा - १२
"ऊठवळ नार बसती इथतिथ
भरताराला पुस आपल्या भोजनाच कसं"
संसारात नीट लक्ष नसणारी केवळ नट्ट्यापट्ट्यावर ध्यान असणारी स्त्री 'उठवळ बाई' म्हणून ओळखली जाते. ही उठवळ बाई आपलं घरदार सोडून जगाची दारं पिटत बसते. त्यातून वेळ मिळाल्यावर घरी येथे आणि उपाशी बसलेल्या आपल्या नावऱ्यालाच विचारते की आता जेवणाचं काय / कसं करायचं ?
"ऊठवळ नार बसती इथतिथ
भरताराला पुस आपल्या भोजनाच कसं"
संसारात नीट लक्ष नसणारी केवळ नट्ट्यापट्ट्यावर ध्यान असणारी स्त्री 'उठवळ बाई' म्हणून ओळखली जाते. ही उठवळ बाई आपलं घरदार सोडून जगाची दारं पिटत बसते. त्यातून वेळ मिळाल्यावर घरी येथे आणि उपाशी बसलेल्या आपल्या नावऱ्यालाच विचारते की आता जेवणाचं काय / कसं करायचं ?
________________________________________
#ओवी_गाथा - १४
रुक्मिणीची चोळी, अभंगाने भरली दाट
देवा विठ्ठलाला जवा, लाविला हरिपाठ..
________________________________________
#ओवी_गाथा - १५
इंद्रायणीचा देवमासा, देहूला रे आला कसा
जात नव्हती माशाला, होता भक्तीचा वसा.
________________________________________
#ओवी_गाथा - १६
कुणबी निघालं शाहू, मला वांग्याचा तोडा
थोरलं माझं घर, मला येईना एक येढा,
काहूर नाही तरी, मनी आनंदाचा ओढा !
कुणबी निघालं शाहू, मला वांग्याचा तोडा
थोरलं माझं घर, मला येईना एक येढा,
काहूर नाही तरी, मनी आनंदाचा ओढा !
दैवाने काहीही सांगितले असले तरी माझे पती हे कुणबी निघाले. थोडक्यात माझ्या नशिबी कष्टच आलॆ. अशा वेळी धनी तरी काय करणार ? कधी चुकून दागिने मागितले तर जास्तीत जास्त तो वांग्याचा तोडा देईल. माझा पती घरातला सर्वात थोरला आहे म्हणून की काय त्याच्या वाट्याला कष्ट जास्ती आले आहेत, आम्ही नुसतेच श्रम करतो आहोत. अन आजतागायत त्याने मला सोन्याचा एक वेढा (सर) देखील दिलेला नाही. पण म्हणून काय मी नाखूष नाही, मी माझ्या संसारात सुखी आहे.
____________________________________
#ओवी_गाथा - १७
"लई चांगुलपण घेते पदराच्या आड
बाळायाची माझ्या सूर्यावाणी परभा पडं..'
माझे बाळ खूप लोभस आहे, खूप देखणे आहे. त्याचबरोबर त्याच्या अंगी खूप सद्गुण आहेत. पण कधीकधी अति देखणं असणं किंवा चांगलं असणं अंगाशी येऊ शकतं म्हणून त्याला लोकांपासून वाचवण्यासाठी मी त्याला पदराआड घेते. पदराआड घेतले की तो छातीला बिलगून शांतपणे झोपी जातो. त्याला पदराआड ठेवल्याचे कुणाला कळलेही नसते पण तसे होत नाही. कारण माझ्या बाळाचं तेज इतकं आहे की त्याची प्रभा पदराआडून बाहेर येते आणि माझ्या सर्वांगावर विलसते....
बाळायाची माझ्या सूर्यावाणी परभा पडं..'
माझे बाळ खूप लोभस आहे, खूप देखणे आहे. त्याचबरोबर त्याच्या अंगी खूप सद्गुण आहेत. पण कधीकधी अति देखणं असणं किंवा चांगलं असणं अंगाशी येऊ शकतं म्हणून त्याला लोकांपासून वाचवण्यासाठी मी त्याला पदराआड घेते. पदराआड घेतले की तो छातीला बिलगून शांतपणे झोपी जातो. त्याला पदराआड ठेवल्याचे कुणाला कळलेही नसते पण तसे होत नाही. कारण माझ्या बाळाचं तेज इतकं आहे की त्याची प्रभा पदराआडून बाहेर येते आणि माझ्या सर्वांगावर विलसते....
_____________________________________
#ओवी_गाथा - १८
बाळाला म्हण बाळ बाळ दिसत बेगड
सांगते बाई तुला फुटली अंगणी दगड
काही बायका माझ्या बाळाच्या देखणेपणावर मत्सर भाव मनात राखून टोमणे मारतात. खरे तर त्यांना माझ्या बाळाचा चांगुलपणा, त्याचं कमालीचं सुंदर रुपडं सहन होत नसतं. त्या उद्विग्नतेतून त्या काहीबाही बोलत राहतात. मग एखादी माझ्या बाळाला बेगड (खोटं नाटं सौंदर्य) म्हणतात. पण काय सांगू तुम्हाला, तिने असं टोचून बोललेलं देवालाच सहन होत नाही. तिच्या बोलण्यावर तो नाराजी दाखवतो आणि तिचे बोलणे पूर्ण होते नाही होते तोवर अंगणातला मोठाला आपसूक दगड फुटतो. जणू काही तो तिला सांगतो की, 'बये, तोंड आवर, बाळाला नावं ठिवू नकासा'....
बाळाला म्हण बाळ बाळ दिसत बेगड
सांगते बाई तुला फुटली अंगणी दगड
काही बायका माझ्या बाळाच्या देखणेपणावर मत्सर भाव मनात राखून टोमणे मारतात. खरे तर त्यांना माझ्या बाळाचा चांगुलपणा, त्याचं कमालीचं सुंदर रुपडं सहन होत नसतं. त्या उद्विग्नतेतून त्या काहीबाही बोलत राहतात. मग एखादी माझ्या बाळाला बेगड (खोटं नाटं सौंदर्य) म्हणतात. पण काय सांगू तुम्हाला, तिने असं टोचून बोललेलं देवालाच सहन होत नाही. तिच्या बोलण्यावर तो नाराजी दाखवतो आणि तिचे बोलणे पूर्ण होते नाही होते तोवर अंगणातला मोठाला आपसूक दगड फुटतो. जणू काही तो तिला सांगतो की, 'बये, तोंड आवर, बाळाला नावं ठिवू नकासा'....
________________________________________
#ओवी_गाथा - १९
काजवे फुलले फुलले बाई लाख लाखाचं
सांगते बाई बाळायाच माझ्या मुख राजसाचं
माझ्या बाळाचे तेज कसे आहे म्हणून सांगू तुम्हाला ? त्याचा प्रकाश माझ्या मुखी पडतो हे तर मी सांगितलेच आहे. पण जगाला कसं सांगू की नेमका प्रकाश आहे तरी किती आणि कसा ? तर, सांगतेच. ऐका, माझ्या बाळाचा मुखडा खूप लोभस आहे. तो राजस आहे. त्याच्या तेजाची तुलना करायची झाली तर अंगणी लाख लाख काजवे प्रकाशमान झाल्यावर जितका उजेड पडेल तितकी आभा त्याच्या चेहऱ्याची आहे. मग माझे बाळ किती तेजस्वी आहे याचा तुम्हीच अंदाज घाला ...
काजवे फुलले फुलले बाई लाख लाखाचं
सांगते बाई बाळायाच माझ्या मुख राजसाचं
माझ्या बाळाचे तेज कसे आहे म्हणून सांगू तुम्हाला ? त्याचा प्रकाश माझ्या मुखी पडतो हे तर मी सांगितलेच आहे. पण जगाला कसं सांगू की नेमका प्रकाश आहे तरी किती आणि कसा ? तर, सांगतेच. ऐका, माझ्या बाळाचा मुखडा खूप लोभस आहे. तो राजस आहे. त्याच्या तेजाची तुलना करायची झाली तर अंगणी लाख लाख काजवे प्रकाशमान झाल्यावर जितका उजेड पडेल तितकी आभा त्याच्या चेहऱ्याची आहे. मग माझे बाळ किती तेजस्वी आहे याचा तुम्हीच अंदाज घाला ...
___________________
#ओवी_गाथा - २१
बाईचा जलम नको देऊ देवराया
रस्त्यानी चालता निंदा करीती आईबाया
वरवर पाहता ही ओवी अगदी सर्वसामान्य वाटते. कुणा एका स्त्रीची एक कैफियत इतकंच तिचं स्वरूप समोर येतं. पण आशयचित्र असं नाहीये. जात्यावर ओव्या म्हणताना एकामागून एक विषयावर एक सलग ओव्या त्या मायबहिणी गात असतात. भक्तीपासून संसारापर्यंतचे विषय येऊन जातात आणि जेंव्हा स्त्रीच्या व्यथांचा विषय येतो तेंव्हा प्रत्येक जण ओवीमधून आपलं मत मांडू लागते. पण यातलीच एक चतुर असते, ती नकळत सर्व स्त्रियांनाच टोमणे मारते. ती म्हणते बाईचा जन्म देऊ नकोस. आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष ? हे मागणं आजकाल केवळ ग्रामीण स्त्रियांच्याच तोंडी आढळतं असं काही नाही, तर अनेक शहरी स्त्रियांच्या तोंडून देखील हे वाक्य ऐकायला येते. या ओवीतली खरी गंमत पुढच्या पंक्तीत आहे. ती म्हणते, बाईचा जन्म का नको तर रस्त्याने चालताना आईबायाच एकमेकीची निंदा करतात. पुरुषांनी बाईची निंदा करायची गरजच पडत नाही स्त्रियांची इतकी निंदा स्त्रियाच करत असतात. मग त्यात जन्मदात्री आई देखील इतर उठवळ स्त्रियांच्या सोबत असते ! आई आणि बाया हे शब्द एकत्र जोडून विलक्षण अर्थ साधला आहे, केवळ यमक जुळवणे इतकेच या ओवीचे कसब नसून स्त्रीमनाची यथार्थ खंत व्यक्त करणे हा देखील हेतू आहे... कुठलंही शिक्षण न घेतलेल्या गतकाळातल्या माझ्या मायबहिणी खरोखरच प्रतिभाशाली आणि विचारी होत्या...
______________________________
निळ्या सावळ्या आभाळाची मिठी सैल झाली
काळ्या मातीच्या ऐन्यात कंच शेतं अंकुरली
कुण्या पुण्याईने कुणब्याच्या पोटी जन्म उद्धारली
ओवी मातीत जन्मलेली ओठी मेघांच्या बहरली
कोण कौतिक हिरवाईचे शब्दे कविता पाझरली
हात राबता रानामध्ये सारी सृष्टी की तरारली
नाचे पानोपानी श्रीरंग घुमे रानोमाळी बासरी
पिके मोत्याचे शिवार वारा गाई त्याची गाणी
झुले गंधवेडया सावलीत बांधावरची बाभूळराणी
येता उधाण धरतीला थिटे पडती हात दोन्ही !
_______________________________
#ओवी_गाथा - २२
आली आगोटी रेटूनी घेते अधुली हातात
डेाई बियाची पाटी मैना जाती शेतात
मनासारखा पाऊस सगळीकडे झाला की बळीराजा पेरणीच्या कामांची घाई करतो. त्याची कारभारीण देखील त्याच्या हातात हात घालते. बळीराजा रामप्रहरीच उठून रानात जातो, त्याच्या मागोमाग त्याची कारभारीण देखील बेगीनं घरातली कामं आवरून जाते. घरातली कामं वेळेत पुरी करण्यासाठी ती दोघं लवकर उठलेली असतात. सकाळीच तिचा स्वयंपाक आटोपलेला असतो. मुलांच्या आंघोळी पांघोळी उरकून ती एका फडक्यात भाकरी गुंडाळून घेते, चुलीला नमस्कार करून तिच्या पोटातली आगटी आत सारते, समोर साठलेल्या राखेला मागे सारून त्यावर थोडं पाणी शिंपडते. स्वतःचं आवरून घेते आणि कोनाड्यात ठेवलेली अधुली (शेर, पायलीसारखे माप) हातात घेते. शेजाऱ्याला घराकडे लक्ष द्यायला सांगून डोक्यावर उतळी घेऊन ती शेताकडे झपाझप पावले टाकू लागते. तिच्या डोक्यावरच्या उतळीत (दुरडी / पाटी) पेरणीचं बियाणं आणि दुपारसाठीची भाकरी असते. वाटंनं येणाऱ्या जाणाऱ्याकडे न बघता ती तडक शेत गाठते आणि कारभाऱ्याला कामात मदत करू लागते.
पावसानंतर पेरणीची लगबग सुरु होताच पूर्वी खेडोपाडी हे चित्र ठरलेले असे. आता काळ पुष्कळ बदललाय पण सुविधा आल्यात, शेतीची पद्धतही बदललीय पण त्या काळात जी अवीट गोडी होती ती या शेतीतही नाही, पिकातही नाही, गावकुसात नाही आणि आताच्या माणसांत तर नाहीच नाही. जात्यावरच्या या ओव्यातून गतकालीन स्मृतींना पुन्हा पुन्हा जगता येतं हे ही काही कमी सुख नाही ! होय ना ?
_________________________
#ओवी_गाथा २४ -
'आला आला रुखवत त्यात होता तवा; विहीणीनं पेटवली चूल, सरपणात चंदन जाळत हुतं तवा !'
या उखाण्यात चूल आहे ! तेंव्हा उखाण्यात अतिशोयक्ती असे. यांचं द्वंद्व चाले आणि जी हरत असे तिला आपल्या नवऱ्याचे नाव घ्यावे लागे असा ग्रामीण भागात तेंव्हा रिवाज होता. अजूनही नाव घेण्याची प्रथा काही ठिकाणी आहे पण असा नखरेल मुकाबला आता होत नाही आणि आला आला रुखवताची जादूही उरली नाही. या उखाण्यातली विहिण सांगते की, कधी काळी व्याही खूप श्रीमंत होते, तेंव्हा चुलीत चंदन जाळलं जायचं, तेंव्हाच काय ते विहीणीने तेंव्हाच काय तो स्वयंपाक केला आहे. आताच्या काड्या काटक्यांच्या सरपणावर चूल पेटवताना तिची दमछाक होते ! ...
आता तो काळ निघून गेलाय. लग्न आकसत गेलीत, रुखवत मोडीत निघालेत आणि चूलही गेलीय. बदल चांगला असतो.
चुलीबद्दलच्या आठवणी काळजाला घर पाडणाऱ्या आहेत, एकदा जुन्या जखमांची खपली निघाली की त्यातून सावरायला खूप त्रास होतो. चुलीपुढे बसून धग लागल्यागत होते. स्मृतींचे सरपण धडाडून उठते आणि डोळ्यात गेलेल्या धुराने पाणी येण्याऐवजी फुकारी फुंकणारे तळहाताच्या रेषा झिजलेले निस्तेज मलूल हात आता उरले नाहीत या जाणीवांनी डोळे ओले होतात.
आज सोशल मीडिया 'चूलमय' झालाय पण आपल्या सासर माहेरच्या गतकाळातील बायकांनी काय काय सोसले असेल हे चुलीला जेव्हढे माहित असेल तेव्हढे कुणाच्याच बापजाद्यांनाही माहिती नसेल, कारण त्या काळातल्या बायका कुणापुढेच व्यक्त होत नव्हत्या, त्यासाठी त्या चूल पेटवायची वाट बघायच्या. चूल धडाडून पेटली की त्या उबेने त्यांना कधी बरे वाटायचे कारण मायेच्या उबेच्या त्या भुकेल्या असत तर कधी आवर्जून पश्चात्तापासाठी धग लागून घ्यायच्या. सर्वात महत्वाचे म्हणजे आर पेटण्याआधी जो धूर यायचा ना तेंव्हा या आयाबाया खूप रडून घ्यायच्या ! सर्वांना वाटे की धुरामुळे यांच्या डोळ्यात पाणी आलंय, मग चुलीलाच यांची दया यायची आणि ती आस्ते कदम जळत रहायची.
डोईवरचा पदर सावरत घामेजल्या अंगाने अन उपाशी पोटानं या मायमाऊल्या हात चालवायच्या. पेटलेलं सरपण चुलीला चटके द्यायचं आणि घरादारातल्या माणसांच वागणं या बायकांना चटके द्यायचं ! तरीही कुणीच तक्रार केली नाही. चुलीनेही नाही आणि त्या बायकांनीही नाही !
चुलीत घाला म्हणणे सोपे आहे पण त्या साठी आधी चुलीतलं जळणं जगलेलं असावं ! तो काळच भारलेला होता आणि त्यातली सच्चाई, साधेपणा मनाला भावणारा होता याची प्रचीती वरील ओव्यातून पुन्हा पुन्हा येते.
_________________________
#ओवी_गाथा २४ -
'आला आला रुखवत त्यात होता तवा; विहीणीनं पेटवली चूल, सरपणात चंदन जाळत हुतं तवा !'
या उखाण्यात चूल आहे ! तेंव्हा उखाण्यात अतिशोयक्ती असे. यांचं द्वंद्व चाले आणि जी हरत असे तिला आपल्या नवऱ्याचे नाव घ्यावे लागे असा ग्रामीण भागात तेंव्हा रिवाज होता. अजूनही नाव घेण्याची प्रथा काही ठिकाणी आहे पण असा नखरेल मुकाबला आता होत नाही आणि आला आला रुखवताची जादूही उरली नाही. या उखाण्यातली विहिण सांगते की, कधी काळी व्याही खूप श्रीमंत होते, तेंव्हा चुलीत चंदन जाळलं जायचं, तेंव्हाच काय ते विहीणीने तेंव्हाच काय तो स्वयंपाक केला आहे. आताच्या काड्या काटक्यांच्या सरपणावर चूल पेटवताना तिची दमछाक होते ! ...
आता तो काळ निघून गेलाय. लग्न आकसत गेलीत, रुखवत मोडीत निघालेत आणि चूलही गेलीय. बदल चांगला असतो.
चुलीबद्दलच्या आठवणी काळजाला घर पाडणाऱ्या आहेत, एकदा जुन्या जखमांची खपली निघाली की त्यातून सावरायला खूप त्रास होतो. चुलीपुढे बसून धग लागल्यागत होते. स्मृतींचे सरपण धडाडून उठते आणि डोळ्यात गेलेल्या धुराने पाणी येण्याऐवजी फुकारी फुंकणारे तळहाताच्या रेषा झिजलेले निस्तेज मलूल हात आता उरले नाहीत या जाणीवांनी डोळे ओले होतात.
आज सोशल मीडिया 'चूलमय' झालाय पण आपल्या सासर माहेरच्या गतकाळातील बायकांनी काय काय सोसले असेल हे चुलीला जेव्हढे माहित असेल तेव्हढे कुणाच्याच बापजाद्यांनाही माहिती नसेल, कारण त्या काळातल्या बायका कुणापुढेच व्यक्त होत नव्हत्या, त्यासाठी त्या चूल पेटवायची वाट बघायच्या. चूल धडाडून पेटली की त्या उबेने त्यांना कधी बरे वाटायचे कारण मायेच्या उबेच्या त्या भुकेल्या असत तर कधी आवर्जून पश्चात्तापासाठी धग लागून घ्यायच्या. सर्वात महत्वाचे म्हणजे आर पेटण्याआधी जो धूर यायचा ना तेंव्हा या आयाबाया खूप रडून घ्यायच्या ! सर्वांना वाटे की धुरामुळे यांच्या डोळ्यात पाणी आलंय, मग चुलीलाच यांची दया यायची आणि ती आस्ते कदम जळत रहायची.
डोईवरचा पदर सावरत घामेजल्या अंगाने अन उपाशी पोटानं या मायमाऊल्या हात चालवायच्या. पेटलेलं सरपण चुलीला चटके द्यायचं आणि घरादारातल्या माणसांच वागणं या बायकांना चटके द्यायचं ! तरीही कुणीच तक्रार केली नाही. चुलीनेही नाही आणि त्या बायकांनीही नाही !
चुलीत घाला म्हणणे सोपे आहे पण त्या साठी आधी चुलीतलं जळणं जगलेलं असावं ! तो काळच भारलेला होता आणि त्यातली सच्चाई, साधेपणा मनाला भावणारा होता याची प्रचीती वरील ओव्यातून पुन्हा पुन्हा येते.
_______________________________________
दसरा, दिनांक - ०८/१०/१९
पहिल्या पंगतीला माझ महिरळ जेवू द्या
तुरण्याच्या दुरड्या इड पानाच येऊ द्या
पहिल्या दसऱ्याच्या दिवशी सुनेच्या माहेरची माणसं आलेली असतात, माहेरावरून आलेली मंडळी प्रवासाने दमलेली असतात. शिवाय त्यांना लगेच माघारी जायचं असतं. तेंव्हा ती सासुरवाशीण पोर तिच्या सासरच्या मंडळींना विनविते की जेवणाच्या पहिल्या पंगतीस माझ्या माहेरची मंडळी जेवू द्यात. दुरडयातली सामग्री आणि विडेही संगे घेऊन या.
पुढच्या ओवीत ती म्हणते,
थोरली जाऊबाई टाक पानात येलदोडा
बंधूच्या बरोबर पान खातो माझा चुडा
आपल्या ज्येष्ठ जाऊबाईस ती सांगते की तिच्या पतीसाठी (ज्याला ही आपला भाऊ मानते) जो पानविडा बनवत आहे त्यात थोडेसे वेलदोडेही टाक कारण तुझ्या पतीसॊबत माझा पतीही (माझा चुडा) ते पान खाणार आहे.
जेवणं उरकतात, तिच्या माहेरची मंडळी तिचा निरोप घेऊन निघतात. मग ती हळदओल्या अंगाची सून आपल्या पतीला आणि धाकट्या नणंदेला घेऊन शेतात जाते. कारण दसऱ्याचा सण असला तरी तिथेही औजारांची पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर उरलं सुरलं काम करायचं आहे. ते तिघं जण रानात जातात. औजारांची सफाई होते, पूजन होते मग तिचा नवरा कंबर कसून काम करतो. तोवर उन्हं कलायला येतात. दिवसभरच्या श्रमाने तिच्या गोऱ्यापान नवऱ्याचा रंग लालबुंद होऊन जातो. तो थकून जातो आणि बांधावर बसून थंड पाणी पिऊ लागतो, तेंव्हा तिची धाकटी नणंद हातातल्या पंख्याने वारा घालू लागते, यावर ती म्हणते -
माझ्या चुड्याचं सोनं उन्हानं होता लाल
लाडाची नणंद कामीनी बाई वारा घालं
ओव्यात जे स्नेह प्रेम, जी माया उत्कटता अनुभवता येते ती अन्य काव्यप्रकारात इतक्या आर्ततेनं क्वचित अनुभवास येते.
#ओवीगाथा २५
___________________________________
दसरा, दिनांक - ०८/१०/१९
पहिल्या पंगतीला माझ महिरळ जेवू द्या
तुरण्याच्या दुरड्या इड पानाच येऊ द्या
पहिल्या दसऱ्याच्या दिवशी सुनेच्या माहेरची माणसं आलेली असतात, माहेरावरून आलेली मंडळी प्रवासाने दमलेली असतात. शिवाय त्यांना लगेच माघारी जायचं असतं. तेंव्हा ती सासुरवाशीण पोर तिच्या सासरच्या मंडळींना विनविते की जेवणाच्या पहिल्या पंगतीस माझ्या माहेरची मंडळी जेवू द्यात. दुरडयातली सामग्री आणि विडेही संगे घेऊन या.
पुढच्या ओवीत ती म्हणते,
थोरली जाऊबाई टाक पानात येलदोडा
बंधूच्या बरोबर पान खातो माझा चुडा
आपल्या ज्येष्ठ जाऊबाईस ती सांगते की तिच्या पतीसाठी (ज्याला ही आपला भाऊ मानते) जो पानविडा बनवत आहे त्यात थोडेसे वेलदोडेही टाक कारण तुझ्या पतीसॊबत माझा पतीही (माझा चुडा) ते पान खाणार आहे.
जेवणं उरकतात, तिच्या माहेरची मंडळी तिचा निरोप घेऊन निघतात. मग ती हळदओल्या अंगाची सून आपल्या पतीला आणि धाकट्या नणंदेला घेऊन शेतात जाते. कारण दसऱ्याचा सण असला तरी तिथेही औजारांची पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर उरलं सुरलं काम करायचं आहे. ते तिघं जण रानात जातात. औजारांची सफाई होते, पूजन होते मग तिचा नवरा कंबर कसून काम करतो. तोवर उन्हं कलायला येतात. दिवसभरच्या श्रमाने तिच्या गोऱ्यापान नवऱ्याचा रंग लालबुंद होऊन जातो. तो थकून जातो आणि बांधावर बसून थंड पाणी पिऊ लागतो, तेंव्हा तिची धाकटी नणंद हातातल्या पंख्याने वारा घालू लागते, यावर ती म्हणते -
माझ्या चुड्याचं सोनं उन्हानं होता लाल
लाडाची नणंद कामीनी बाई वारा घालं
ओव्यात जे स्नेह प्रेम, जी माया उत्कटता अनुभवता येते ती अन्य काव्यप्रकारात इतक्या आर्ततेनं क्वचित अनुभवास येते.
#ओवीगाथा २५
___________________________________
पाभार बाईचा चाक जोड जाईचा
आता माझ्या बाळा नंदी घरच्या गायीचा
आजही बहुतांश भागात पाभर वापरून पेरणी केली जाते. जात्यावरच्या ओव्यात माझ्या मायमाऊल्या या पाभरीला बाईचं संबोधन देतात.
पाभर स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणून नव्हे तर माती ही आई आहे, तिच्या कुशीत बीज रोवण्याचं काम पाभर पार पाडते.
एका अडलेल्या स्त्रीची सहज सुलभ प्रसूती एक निष्णात दाई अधिक चागल्या प्रकारे करू शकते कारण तिला त्यातले बारकावे आणि खाचाखोचा माहिती असतात, अगदी तसंच मातीच्या गर्भात बीज रोवताना तिची काळजीपूर्वक हाताळणी होणं हे मोठं कसबाचं काम आहे.
म्हणून पाभरीला जात्यावरच्या ओवीत स्त्रीरूप दिलंय.
पाभरीच्या तोंडापाशी चाकासारखं दिसणारं चाडं असतं ज्यातून मूठ मूठ दाणे टाकले जातात जे पाभरीच्या नळीतून फणावर येतात आणि मातीत विसावतात. दिंडावर पाय टाकून उभं असलं की पाभरीचे फण खोल रुतून असतात, रूमण्याचा आधार घेऊन बळीराजा दिंडावर उभा राहतो. बैलजोड पाभर ओढत जाते आणि बघता बघता वावर पेरून होतं.
ओवीतली ओळ अशी आहे की पाभार बाईचा चाक जोड जाईचा ! - म्हणजे काय ?
तर या पाभरीचं जे जाक जोड (चाडे) आहे ते जाईच्या लाकडापासूनचे आहे असं ती सांगते. आता जाईच्या लाकडाचे काय ते विशेषत्व ?
खरे तर दिंड, फण आणि चाडे हे सगळेच बहुतांश करून बाभळीच्या लाकडापासून बनवले जाते. मात्र इथे ओवीत जात्यावर दळणारी माऊली जाईच्या लाकडाची गोष्ट करतेय.
जाईच्या लाकडाचा पृष्ठभाग खरमरीत असला तरी कालांतराने ते मऊ होत जातं, नंतर त्याला एक विशिष्ठ गंध प्राप्त होतो. हा गंध त्या पेरणीतल्या बियांना लाभावा आणि पाभरबाईच्या हातांनी पेरलेलं बीज सुगंधित व्हावं !
ओवीत ती पुढे म्हणते की, आता माझ्या बाळा नंदी घरच्या गायीचा.
जात्यावर भल्या सकाळी उठून धान्य दळताना आपल्या मुलाची थोरवी सांगतानाची ही ओवी आहे.
माझ्या मुलाकडे आता जी बैलजोड आहे ती काही बाजारातून विकत आणलेली नसून घराच्या गायीच्या पोटी जन्मलेल्या गायीची तो वंश आहे असं ती मोठ्या खुबीने सांगते. याचा तिला कोण आनंद आहे !
पाभरबाई, चाक जोड जाई आणि गायी असं यमकही यात जुळवलं आहे.
वरवर ही यमक जुळवणी वाटत असली तरी या ओवीला मातीचा अमीट सुगंध आहे जो आईच्या स्निग्ध मायेच्या तोडीचा आहे.
कसलंही शालेय शिक्षण न झालेल्या माय माऊल्यांनी या अवीट गोडीच्या ओव्या कशा रचल्या असतील या कोड्याचे उत्तर काही केल्या सापडत नाही हे खरेच आहे..
#ओवीगाथा २५
______________________________________
( मागील दोन वर्षात #_ओवीगाथा या tag मधून अनेक जुन्या ओव्या आणि त्यांचे अर्थ लिहून झालेत. याचे पुस्तक काढावे का, याचे पुस्तकरूप कुणी प्रकाशित करेल का आणि मुख्य म्हणजे या पुस्तकाचे वाचन होईल का या प्रश्नांवर थोडासा गोंधळून गेलोय. गावाकडच्या जात्यावरच्या ओव्या जात्या पाठोपाठ कालबाह्य झाल्या पण त्यातला अर्थ आणि गोडवा कधीच कालबाह्य न होणारा आहे. यामुळे या दुर्लक्षित विषयावरही बऱ्यापैकी लिहून झालंय. ही शब्दशिदोरी पुढे कशी पोहोचवायची याचे नेमके उत्तर मात्र माझ्याकडे नाही.)
शनिवार, २ जून, २०१८
दया पवार- 'कोंडवाडा' - एक व्यथा ....

'शिळेखाली हात होता, तरी नाही फोडला हंबरडा
किती जन्मांची कैद, कुणी निर्मिला हा कोंडवाडा......'
काही कविता इतिहास घडवून जातात अन कालसापेक्षतेच्या कसोटयांच्या पलीकडे त्यांचे अस्तित्व टिकून राहते. विद्रोही कवितांनी साहित्याची ध्वजा उंच करताना सुखात्म जगात मश्गुल असणारया साहित्य विश्वास समाजभानाचे असे काही चटके दिले की मराठी साहित्यात विद्रोहाची धग प्रखर होत गेली.
सोमवार, १५ जानेवारी, २०१८
स्तनदायिनी ...
![]() |
१९५० च्या दशकात महाश्वेतांच्या 'स्तनदायिनी'ची कहाणी सुरु होते आणि १९७० च्या सुमारास संपते. ही कथा एका स्त्रीची आहे तिची स्त्रीयोनी आणि तिचे स्तन तिच्या मृत्यूस आणि शोषणास कारणीभूत ठरतात. यशोदा तिचं नाव. कांगालीचरण हा तिचा पती. तो दुर्गामातेच्या मंदिरातला पुजारी. कांगालीचरण हा देवभोळा ब्राम्हण. त्याची देवधर्मावर पराकोटीची श्रद्धा. पत्नीच्या गर्भातून जन्माला येणारे अपत्य म्हणजे साक्षात ब्रम्हच अशी त्याची संकल्पना. त्याच्या या नादात त्याची बायको सतत गर्भवती असते. यशोदाची वीस बाळंतपणं झालेली. यातली काही अपत्य जगली तर काही वाचली. यशोदाला तिची आई, मावशी, माहेर कसं होतं हे ही आठवता येत नाही इतकी ती मातृत्वात व्यस्त असते. यशोदाचं गर्भाशय रितं राहिलं असं वर्ष जात नव्हतं. यशोदाचा देह म्हणजे मुलं निपजणारं यंत्र झालेलं. उलट्या झाल्या नाहीत वा चक्कर आली नाही असा दिवस तिला गतदशकात अनुभवास आला नव्हता. रोज कुठल्या तरी कोनाडयात, अंधारात, अडगळीत कांगालीचरण तिच्याशी संभोग करायचाच. त्याला दिवसरात्र वा स्थळकाळ याचे बंधन नसे. तो फक्त तिला अपत्यजननी समजायचा. पतीपरमेश्वर समजणारया यशोदालाही यात काही वावगं वाटत नव्हतं. आपलं हे अतिरेकी आईपण सहन करू शकते की नाही याचादेखील ती कधी विचार करत नाही. पुढे जाऊन तिचं मातृत्व व्यावसायिक होऊन जातं इतकं जीवघेणं आईपण तिच्या नशिबी येतं आणि ते ती स्वीकारते.
मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७
अनुसरणीय वाटेवरची 'माध्यमातील ती' ...

मंगळवार, २ ऑगस्ट, २०१६
पुरुषी वासना आणि सखाराम बाईंडर......
पुरुषी विकार-वासना ह्या कधी प्रकट तर कधी अप्रकट स्वरुपात असतात. ह्या वासना कधीकधी पुरुषाचा कब्जा घेतात अन त्याच्या जीवनात रोज नवे नाट्य घडू लागते.
इतर लोकांना कधी बलात्कार वा अन्य अनैतिक बाबीतून हे नाट्य जाणवत राहतं. एखाद्या पुरुषाच्या मनात किती व कोणते वासना विकृती विकार असू शकतात किंवा तो वासनांचे शमन राजरोसपणे बायका ठेवून कसे करतो या बाबी समाजाच्या दृष्टीने नेहमीच औत्सुक्य विषय झाल्या आहेत !
मराठी रंगभूमीवर या अंतहीन पुरुषी वासनांचा वेध एका नाटकाने घेतला होता ते नाटक म्हणजे 'सखाराम बाईंडर'....त्याच्या अनुषंगाने या विकाराचा एक छोटासा धांडोळा...
गुरुवार, १६ जून, २०१६
आता वंदू कवीश्वर ..
अंधार होत आलेला आहे आणि तिच्या आठवणींनी व्याकुळ झालेला तो क्षितिजाकडे बघत उभा आहे आणि इतक्यात आकाशीच्या चांदण्यात तिचा चेहरा लुकलुकतो. या कल्पनेवर दिग्गज कवींनी कसे काव्य केले असते याची मी केलेली ही उचापत आहे. या सर्व प्रतिभावंत कवींची त्यासाठी माफी मागतो. या मांडणीत काही चुकले असल्यास दोष मला द्या आणि काही बरे वाटले तर त्याचे श्रेय या दिग्गजांच्या काव्यशैलीस द्या. (मागे काही श्रेष्ठ लेखकांचे अशाच तऱ्हेचे एकसुत्रावर आधारित लेखन केले होते तेंव्हा आपण सर्वांनी दिलेले प्रोत्साहन पाठीशी असल्यामुळे हे दुस्साहस केले आहे..)
सुरेश भट -
क्षितिजास साक्षुन मी रिता करतो आठवणींचा काजळप्याला
पाहताच तिला चांदण्यात, कैफ अंधारास अल्वार कसा आला !
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)