शुक्रवार, २८ मार्च, २०२५
गावाकडचे उन्हाळ्यातले दिवस..
आओगे जब तुम साजना..
हे गाणं फर्माईश म्हणून अनेक प्रेमभंग झालेल्या तरुण पोरांनी गायला सांगितलेलं अजूनही पक्कं स्मरणात आहे. त्याहीआधी 1991 मध्ये नाना पाटेकर, डिम्पल, माधुरी यांच्या 'प्रहार'मध्ये शुभा गुर्टू यांनी गायलेली 'याद पिया की आये..' ही ठुमरी खूप जीव लावून ऐकलेली! तिच्याशी जसे एकरूप होता येत होतं तसेच 'आओगे जब तुम साजना'बाबतीत व्हायचे!
मंगळवार, २५ मार्च, २०२५
माती आठवणींच्या थडग्याची!
गुरुवार, २० मार्च, २०२५
होळी, प्रेमाला आसुसलेल्या जिवांची!
साऱ्यांच्या चेहऱ्यांवर सुरकुत्यांची नक्षी होती, भाळीच्या आठ्यांचं जाळे कोरीव झालेलं. काहींच्या डोईची चांदी विरळ होऊ लागलेली तर काहींची नजर क्षीण झालेली तर काहींची नजर पैलतीरी लागलेली स्पष्ट दिसत होती. तर काहींची देहबोली अजूनही आव्हानांना छातीवर झेलणारी! काही कंबरेत वाकलेले तर काहींना पाठीवर पोक आलेला! अंगी जुनेच तरीही स्वच्छ कपडे. परिसरातही काटेकोर स्वच्छता आणि सेवाभावी कर्मचारी वर्ग.
मंगळवार, ११ मार्च, २०२५
शौचालयाचे नागरिकशास्त्र!
![]() |
जगापुढे मान खाली घालावी लागणारी गोष्ट! |
मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२५
आनंदाची एक्सप्रेस..
![]() |
क्रांती महिला संघाच्या स्नेह मेळाव्याचे बॅनर |
ज्या लोकांच्या आयुष्यात आनंद नाही त्यांना एक वेगळ्याच आनंदाची अनुभूती द्यायची. ज्यांना प्रवास करता आला नाही, पर्यटन करता आलं नाही, हॉटेलिंग करता आले नाही, विविध स्थळांना वा शहरांना भेटी देता आल्या नाहीत अशांना त्यांनी प्राधान्य दिले. विविध सामाजिक स्तरावरील गांजलेल्या, पिचलेल्या, तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या लोकांना या आनंदाची अनुभूती ते मिळवून देऊ लागले. मजूर, ओझी उचलणारे हमाल, वंचित शोषित घटक, कामवाल्या स्त्रिया, हातावर पोट असणारे गरीब यांच्या जीवनात त्यांनी आनंदाचे काही क्षण भरले! काही दिवसापूर्वी त्यांचा माझा संवाद झाला तेव्हा त्यांनी सेक्सवर्कर महिलांना मुंबईवारी करवून आणण्यासाठी मध्यस्ताचे काम करण्याबाबत विचारले. मी तत्काळ होकार दिला.
रविवार, १९ जानेवारी, २०२५
अलेक्झांडरच्या वंशाची भुरळ!
सध्या कुंभमेळयाविषयी अनेक प्रकारच्या चर्चां सुरू आहेत, त्यातलीच एक माध्यमाकर्षण असणारी गोष्ट म्हणजे मोनालिसासारखी दिसणारी भारतीय मुलगी! या मुलीच्या पार्श्वभूमीचा धांडोळा घेताना हिमाचल प्रदेशमधील मलाना या खेड्यातील बायकापोरी आठवल्या. कारण ही कथित मोनालिसा आणि या मुलींमध्ये खूप साम्य आहे. मात्र याची मूळे थेट महान योद्धा अलेक्झांडरपर्यंत जाऊन पोहोचतात! थोडे विषयांतर वाटेल मात्र यातही एक कथा, एक आख्यान आणि एक आसक्ती दडून आहे!
शुक्रवार, १७ जानेवारी, २०२५
वक्त ने किया क्या हसीं सितम..
गुरुदत्तच्या 'कागज के फूल'मध्ये 'वक्त ने किया क्या हसीं सितम हम रहे ना हम...' हे निहायत देखणं अर्थपूर्ण गाणं आहे. हे लिहिलंय कैफी आजमी यांनी. हा चित्रपट 1959 मध्ये प्रदर्शित झाला होता. गुरु दत्त आणि वहिदा रेहमान यांच्या प्रमुख भूमिका यात होत्या. सिनेमा शूट झाला होता 1954 मध्ये. अप्रतिम छायाचित्रणाचे वेधक उदाहरण म्हणून या गीताकडे पाहता येईल. गुरु दत्तकडे कैफींनी गाणं दिलं तेव्हा त्यांचं वय होतं तेहतीस वर्षांचं! हे गाणं त्यांनी कागज के फूल साठी लिहिलं नव्हतं. ती त्यांची वैयक्तिक दर्दभरी कैफियत होती.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)