हॅरी ट्रूमन हे अमेरिकेचे 33 वे राष्ट्राध्यक्ष होते. ट्रूमन यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या अंतिम टप्प्यात राष्ट्राध्यक्षपद स्वीकारले. जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकण्याचा ऐतिहासिक विनाशकारी निर्णय त्यांनी घेतला, ज्यामुळे युद्ध संपले पण मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली.
ट्रूमन यांच्या डेस्कवर एक पाटी असायची, ज्यावर "The Buck Stops Here" लिहिले होते. याचा अर्थ असा की अंतिम जबाबदारी त्यांचीच आहे. हा वाक्प्रचार त्यांच्यामुळे प्रसिद्ध झाला. वास्तवात ते एक साधे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा जन्म मिसूरीतील एका शेतकरी कुटुंबात झालेला. त्यांनी लहानपणी शेतात काम केलेलं, औपचारिक कॉलेज शिक्षणही ते पूर्ण करू शकले नाहीत, तरीही ते राष्ट्राध्यक्षपदापर्यंत पोहोचले.
1947 मध्ये त्यांनी ट्रूमन डॉक्ट्रिन जाहीर केले, जे कम्युनिझमचा प्रसार रोखण्यासाठी अमेरिकेने इतर देशांना मदत करावी, असा विचार मांडते. यामुळे शीतयुद्धाला सुरुवात झाली. राष्ट्राध्यक्षपद सोडल्यानंतर ट्रूमन आपल्या मिसूरीतील घरी परतले आणि सामान्य जीवन जगले. त्यांच्याकडे फारशी संपत्ती नव्हती, आणि त्यांनी स्वतः आपली पेन्शन मिळावी यासाठी कायदा मंजूर करवला (!)
रविवार, ११ मे, २०२५
गुरुवार, ८ मे, २०२५
कॉफी ब्लॅक - डॉन विल्यम्स
![]() |
कॉफी ब्लॅक - डॉन विल्यम्स |
दरवर्षी सुट्ट्या लागल्या की त्या ब्रिटिश महिलेचा पती न चुकता भारतात यायचा. नंतरच्या काळात मात्र कैक वर्षे अंथरुणाला खिळून त्याचे देहावसान झाले. त्याच्या स्मृती जागवण्यासाठी ती वृद्धा गोव्यात टिटो बार्डेसला (दशकापूर्वी) आली होती. तिने डॉन विल्यम्सचं एक गाणं असं काही गायलं होतं की जमलेल्या तरुणाईला कावरंबावरं व्हायला झालं, ते गाणं होतं "कॉफी ब्लॅक.."
नॉर्थईस्टमधील डाऊन स्ट्रीट म्युझिक कॅफेज असोत की गोव्यातील फेरीबोट्स, वा मेट्रो सिटीमधली पंचतारांकित हॉटेल्स असोत, डॉन विल्यम्सची गाणी मंद स्वरांत कानी पडतात!
विशेषतः केरळच्या बॅकवॉटर्समधील हाऊसबोट्स आणि गोव्यातले नाईट पब्ज रोज रात्रीस भरात येण्याआधी म्हणजे अंधार गडद होण्याआधी जी शांतशीतल गाणी वाजवतात त्यात डॉनची गाणी आवर्जून असतात.
गतपिढीतला कुणी दर्दी रसिक तिथं असला तर मग तो एखादा खंबा ज्यादा रिचवतो. एखाद्या कमनीय ललनेला जवळ बोलवून ओलेत्या डोळ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देतो, तिच्या कपाळाचे चुंबन घेऊन चिल्ड 'पॉल जॉन' वा तत्सम स्कॉचचे सिप घेत राहतो!
रम्य भूतकाळ त्याच्या भवती घुमू लागतो!
हे गारुड विलक्षण असतं.
बुधवार, ७ मे, २०२५
'बांगलादेश ए ब्रूटल बर्थ' आणि व्हायरल फोटोचे सत्य!
![]() |
हेच ते छायाचित्र ज्याच्या आधारे खोटी द्वेषमूलक माहिती पसरवली जात आहे. |
सोबतच्या छायाचित्राचा वापर अत्यंत बेमालूमपणे द्वेष पसरवण्यासाठी होत असल्याने त्यातले सत्य समोर आणण्यासाठीची ही ब्लॉगपोस्ट!
याची सत्यता जाणून घेण्यासाठी थोडी पार्श्वभूमी जाणून घेणे क्रमप्राप्त आहे. हे छायाचित्र ज्यांनी काढले आहे ते किशोर पारेख हे भारतीय छायाचित्रकार होते. त्यांचा जन्म गुजरातमधील भावनगरचा. दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात त्यांनी चित्रपट निर्मिती आणि माहितीपट छायाचित्रणाचे शिक्षण घेतलेलं. विद्यार्थीदशेत केलेल्या प्रोजेक्टमुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. 1960 ला ते भारतात परतले आणि हिंदुस्तान टाईम्सचे मुख्य छायाचित्रकार बनले. तिथं काम करताना त्यांनी 1962 च्या भारत-चीन युद्धाचे आणि 1965 च्या भारत-पाकिस्तान संघर्षाचे वार्तांकन केले. युद्धाच्या समाप्तीच्या वेळी झालेल्या ताश्कंद शिखर परिषदेच्या वार्तांकनासाठी त्यांना तत्कालीन सोव्हिएत लँडने सुवर्णपदक प्रदान केले. त्यांनी 1966 - 1967 च्या बिहारमधील दुष्काळाचे टोकदार कव्हरेज केले. या विषयावरील त्यांच्या छायाचित्रांचे अमेरिकेत प्रदर्शन भरवण्यात आलेलं.
हिंदुस्तान टाईम्समध्ये सहा वर्षे काम केल्यानंतर, पारेख 1967
![]() |
पुस्तकाचे मुखपृष्ठ |
पारेख हे 1971 च्या बांगलादेश मुक्ती युद्धावरील त्यांच्या कामासाठी प्रसिद्ध आहेत. या विषयावरील त्यांचे पुस्तक, 'बांगलादेश: अ ब्रुटल बर्थ', हे पाकिस्तानी सैन्याने केलेल्या अत्याचारांवर आणि मूळ बंगाली लोकसंख्येच्या दुःखावर आधारित होते. छायाचित्रकार पाब्लो बार्थोलोम्यू यांच्या मते: "बांगलादेश हा किशोर पारेख यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू होता. त्यांनी स्वतःहून, स्वेच्छेने मानवतेच्या भावनांनी आणि धाडसाने प्रेरित होऊन, दोन आठवड्यांच्या कालावधीत त्यांनी थक्क करणाऱ्या फोटोंचा एक संच तयार केला. ज्याचे रूपांतर एका शक्तिशाली पुस्तकात आणि भाष्यात झाले!" युद्धाच्या परिणामां विषयक संवेदना वाढवण्यासाठी भारत सरकारने पुस्तकाच्या या 20000 प्रती प्रकाशित केल्या. पारेख यांचे काम आणि त्यांचे समर्पण या माहितीवरून लक्षात यावे! त्या पुस्तकातील पान नंबर 22 वर हे छायाचित्र आहे! त्याचे स्क्रीनशॉट्स सोबत जोडले आहेत.
असे असूनही काही ट्रोल मंडळी आणि काही व्हॉट्सअॅप
![]() |
पुस्तकाची अर्पणपत्रिका |
वास्तवात या फोटोमध्ये, भारतीय सैनिक, संशयित बांगलादेशी नागरिक गुप्तहेर आहे की काय जाणून घेण्यासाठी त्याची लुंगी तपासून त्या लुंगीत शस्त्रे लपवली आहेत का याचा शोध घेत होते, ते दृश्य कैद झालेय! आणि आपल्याकडची ट्रोल मंडळी सांगताहेत की, पाकिस्तानी सैनिक भारतीय पुरुषांची खतना (खरे तर सुंता!) झाली आहे की नाही ते तपासत असत, आणि गैरमुस्लिम असेल तर त्याला जिवंत सोडत नसत! बेहद्द खालची पातळी गाठलेल्या व्यक्तीच असलं भयंकर असत्य पसरवू शकतात!
आपल्या भारतीय आणि तेही गुजराती व्यक्तीने हे फोटो शूट करून त्यासोबत कॅप्शन दिल्याने हे सत्य तरी समोर आले नाहीतर अनेक खोट्या फॉरवर्ड प्रमाणे हेही फेक नरेटीव्ह खपून गेले असते! असो!
भारतीय हवाई दलातील दिवंगत फ्लाईट लेफ्टनंट अभिजीत
![]() |
पान नंबर बावीसवरील छायाचित्र.. |
आपल्या नेत्याची, आपल्या पक्षाची, आपल्या विचारधारांची भलामण करण्यासाठी रोज उठून कुणाला तरी शिव्या घालायच्या, कुणाच्या न कुणाच्या वॉल हुंगत फिरायचं, आईबहिण न पाहता शिव्यांची लाखोली वाहायची, विरोधातला विचार दिसला की सदविवेकबुद्धी न वापरता तुटून पडायचं आणि जोडीने आपल्या जवळचं खोटं बेमालूमपणे पसरवत राहायचं हे काम जगातल्या सर्वात लाजिरवाण्या, नीच आणि वाईट वृत्तीचे दार्शनिक ठरावे! असो. सर्वांचाच विवेक कधी न कधी जागा होवो!
- समीर गायकवाड
मंगळवार, ६ मे, २०२५
तू रूह है तो मैं काया बनूँ..
![]() |
तू रूह है तो मैं काया बनूँ |
प्रियदर्शिनी अकॅडमीच्या कार्यक्रमासाठी ट्रेनने मुंबईला गेलो होतो. ट्रेन पुण्यात थांबल्यानंतर एक अत्यंत तरुण उमदं कोवळं पोरगं ट्रेनमध्ये चढलेलं. त्याचं नेमकं माझ्या समोरचं बुकिंग होतं. रात्रीची वेळ होती. काही वेळात ट्रेन निघाली. त्याचे डबडबलेले डोळे एसी कोचच्या फिकट निळ्या उजेडात स्पष्ट दिसत होते. मधूनच तो ग्लासविंडो मधून बाहेर पाहत माझी नजर चुकवण्याचा प्रयत्न करत होता. थोड्या वेळाने मीच नजर हटवली. त्याच्या मोबाईलवर एकच गाणं शफल मोडमध्ये प्ले होत होतं.
गोष्ट रामकेवलच्या पराक्रमाची!
![]() |
डोळ्यात आनंदाश्रू आलेला रामकेवल! |
हे सर्व वाचायला विचित्र वाटेल पण हे वास्तव आहे. स्वातंत्र्यानंतरच्या 77 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच युपीच्या बाराबंकी जिल्ह्यातील निजामपुर इथला रहिवासी रामकेवलने ही कामगिरी केलीय! 15 वर्षीय विद्यार्थी रामकेवल उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण परिषदेची हायस्कूल परीक्षा 55 टक्के गुणांसह उत्तीर्ण झाला आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्याचा सन्मान केला आहे, ही चांगली बाब होय. मात्र ही गोष्ट आजवर का होऊ शकली नाही याची कारणे दुःखद आहेत.
रामकेवलच्या गावाविषयी आणखी एक गोष्ट सांगता येईल ती म्हणजे इथे केवट या अतिमागास जातीचेही लोक
आहेत. रामायण काळात जिचा उल्लेख आहे ती घाघरा नदी यांच्या गावापासून खूप जवळ नाहीये मात्र तिला जेव्हाही पुर येतो तेव्हा त्याचा फटका या गावांना बसतो. केवट होड्या बनवतात, मासेमारी करतात, नदीकाठाच्या भागात मजूरी करण्यात यांचा हातखंडा आहे. याला जोडून नि रामकेवलच्या पिढीजात कामाला जोडून आणखी एक मुद्दा याच नदीशी रिलेटेड आहे, ही नदी बाराबंकी जिल्ह्यातून जिथूनही वाहते तिच्या काठावरील गावांत तिला उद्देशून कजरी, चैती आणि सोहरसारखी लोकगीते गायली जातात. ही माणसं नदीला आई मानतात. तर ही गाणी गाणारा जो समुदाय आहे त्यांचे आणि कहार केवट यांचे साटेलोटे आहे. हा लेहजा नदीकाठातून पुढे कॅरी ऑन होत बिहारमधील छपरा पर्यंत जातो जिथे घाघरा नदी गंगेच्या विशाल पात्रात सामावते. शहरीकरणाच्या कचाट्यातून वाचलेला नदीपरिसर असं याचं वर्णन करता येईल.
रामकेवलचे गाव बाराबंकी जिल्ह्यातील बनीकोंडर तालुक्यात आहे. तो ज्या निजामपूर गावात राहतो ती एक लहानशी वाडी वस्ती आहे जिथे 60 उंबरे आहेत. 300 लोकसंख्या असणारी छोटीशी वाडी. अहमदपूर या गावाच्या पंचायत क्षेत्रात ही वाडी आहे. बाराबंकीचे जिल्हाधिकारी शशांक त्रिपाठी हे कानपूर आयआयटीचे विद्यार्थी आहेत, 2015 साली ते केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, त्यांना रामकेवलच्या भीम पराक्रमाची माहिती मिळताच त्याला सन्मानाने जिल्हाधिकारी कार्यालयात बोलवून घेऊन त्याचा सत्कार केला ही गोष्ट इथल्या जातीय विषमतेच्या पार्श्वभूमीवर महत्वाची आहे.
कारण रामकेवलचे पूर्ण गाव अतिमागास जातींच्या लोकांनी भरलेले आहे, इतकेच नव्हे तर अहमदपुर देखील दलितबहुल गाव आहे. गोमती आणि घाघरा या दोन नद्या या जिल्ह्यातून वाहतात. अत्यंत खराब रस्ते, सार्वजनिक वाहन व आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा, अस्वच्छतेचे साम्राज्य आणि इन्फ्रास्ट्रक्चरची पुरती वानवा यांनी हा जिल्हा कायम ग्रासलेला आहे. त्यामुळे निजामपुर सारखी गावे अजूनही स्वातंत्र्यकालीन समाजरचनेतच जगत आहेत. अशा गावातून एक मुलगा जो रात्री वरातीत काम करतो नि दिवसा शाळेत जातो त्याचे हे यश विलक्षणच म्हणावे लागेल!
रामकेवल याला लहानपणापासूनच अभ्यासाची आवड होती पण गरिबीमुळे त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे
लागले. कष्ट करून मिळवलेल्या पैशातून तो पुस्तके खरेदी करायचा आणि शाळेची फी भरायचा. कुटुंबातील तीन भावांमध्ये तो सर्वात मोठा आहे आणि त्यामुळे त्याला कुटुंबाच्या खर्चाचा भार उचलावा लागतो. वरातीचे काम नसले की वडिलांसोबत मजूर म्हणून कामावर जायचा मात्र त्याने कधी हार मानली नाही! त्याला अभियंता होण्याची आकांक्षा आहे. उत्तर प्रदेश सरकारने त्याच्या पुढील शिक्षणासाठी शुल्क माफ करण्याची घोषणाही केली आहे. रामकेवलचे वडील जगदीश मजूर म्हणून काम करतात तर आई पुष्पा प्राथमिक शाळेत स्वयंपाकी म्हणून काम करते. रामकेवलच्या यशाने गावातील लोक खूप आनंदी आहेत आणि त्यांना आशा आहे की येणाऱ्या काळात गावातील अधिक मुले त्याच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जातील.
उत्तर प्रदेशात बहुतांश करून क्लेशदायी वा वाईटच बातम्या समोर येतात त्या पार्श्वभूमीवर रामकेवलची बातमी आणि त्याला तिथल्या प्रशासनाने दिलेली सन्मानाची वागणूक या भल्या गोष्टी म्हटल्या पाहिजेत आणि त्याची दखल घेतली पाहिजे!
- समीर गायकवाड
![]() |
मुलाखती दरम्यान त्याला रडू कोसळले तेव्हा आईने लगेच पुढे होत त्याचे डोळे पुसले! |
आहेत. रामायण काळात जिचा उल्लेख आहे ती घाघरा नदी यांच्या गावापासून खूप जवळ नाहीये मात्र तिला जेव्हाही पुर येतो तेव्हा त्याचा फटका या गावांना बसतो. केवट होड्या बनवतात, मासेमारी करतात, नदीकाठाच्या भागात मजूरी करण्यात यांचा हातखंडा आहे. याला जोडून नि रामकेवलच्या पिढीजात कामाला जोडून आणखी एक मुद्दा याच नदीशी रिलेटेड आहे, ही नदी बाराबंकी जिल्ह्यातून जिथूनही वाहते तिच्या काठावरील गावांत तिला उद्देशून कजरी, चैती आणि सोहरसारखी लोकगीते गायली जातात. ही माणसं नदीला आई मानतात. तर ही गाणी गाणारा जो समुदाय आहे त्यांचे आणि कहार केवट यांचे साटेलोटे आहे. हा लेहजा नदीकाठातून पुढे कॅरी ऑन होत बिहारमधील छपरा पर्यंत जातो जिथे घाघरा नदी गंगेच्या विशाल पात्रात सामावते. शहरीकरणाच्या कचाट्यातून वाचलेला नदीपरिसर असं याचं वर्णन करता येईल.
रामकेवलचे गाव बाराबंकी जिल्ह्यातील बनीकोंडर तालुक्यात आहे. तो ज्या निजामपूर गावात राहतो ती एक लहानशी वाडी वस्ती आहे जिथे 60 उंबरे आहेत. 300 लोकसंख्या असणारी छोटीशी वाडी. अहमदपूर या गावाच्या पंचायत क्षेत्रात ही वाडी आहे. बाराबंकीचे जिल्हाधिकारी शशांक त्रिपाठी हे कानपूर आयआयटीचे विद्यार्थी आहेत, 2015 साली ते केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, त्यांना रामकेवलच्या भीम पराक्रमाची माहिती मिळताच त्याला सन्मानाने जिल्हाधिकारी कार्यालयात बोलवून घेऊन त्याचा सत्कार केला ही गोष्ट इथल्या जातीय विषमतेच्या पार्श्वभूमीवर महत्वाची आहे.
कारण रामकेवलचे पूर्ण गाव अतिमागास जातींच्या लोकांनी भरलेले आहे, इतकेच नव्हे तर अहमदपुर देखील दलितबहुल गाव आहे. गोमती आणि घाघरा या दोन नद्या या जिल्ह्यातून वाहतात. अत्यंत खराब रस्ते, सार्वजनिक वाहन व आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा, अस्वच्छतेचे साम्राज्य आणि इन्फ्रास्ट्रक्चरची पुरती वानवा यांनी हा जिल्हा कायम ग्रासलेला आहे. त्यामुळे निजामपुर सारखी गावे अजूनही स्वातंत्र्यकालीन समाजरचनेतच जगत आहेत. अशा गावातून एक मुलगा जो रात्री वरातीत काम करतो नि दिवसा शाळेत जातो त्याचे हे यश विलक्षणच म्हणावे लागेल!
रामकेवल याला लहानपणापासूनच अभ्यासाची आवड होती पण गरिबीमुळे त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे
![]() |
रामकेवल आपले आईवडील, आजी आजोबा आणि दोन भावांसमवेत! |
रामकेवल कहार जातीमधून येतो. उत्तरप्रदेशात ही जात अतिमागास म्हणून गणली जाते. कहार जातीच्या लोकांचे एक काम पिढीजात आहे ते म्हणजे लग्नातली कामे करणे, पाणी वाटपासाठीच्या चामडी पखाली वाहणे हे त्यांचे काम असे. पखाली बंद झाल्या, पाण्याचे टँकर आले. मात्र ओझे बंद झाले नाही त्याचे स्वरूप बदलले, डोक्यावर पेट्रोमॅक्स घेऊन संपूर्ण वरातीत चालत राहणे हे काम अत्यंत त्रासदायक आणि संयमाचा अंत पाहणारे! रामकेवलने हे काम विनातक्रार केले मात्र त्याची आकांक्षा आहे की हे कामच बंद व्हावे आणि जे लोक हे काम करतात त्यांनी शिकावे नि नवे काम हस्तगत करावे. पोरगा भारी आहे आणि त्याचे विचारही भारी आहेत. शिवाय त्याच्या विचारांना प्रशासनाने मनावर घेतले आहे. बदल चांगले असतात.
रामकेवलने शिक्षणावरचा फोकस हलू दिला नाही, ध्येयाप्रती तो प्रामाणिक राहिला. कावड वाहणाऱ्या गर्दीत तो गेला नाही की कुठल्या जलशात मिरवणूकीतही तो कधी गेला नाही. मुळात या सर्व गोष्टी त्याच्यासाठी एखाद्या चैनी सारख्या होत्या. जे त्याला परवडणारे नव्हते. राम केवलला जे उमजले ते सर्वांना उमजावे आणि आपल्या शिक्षणाला प्राधान्य देण्यास कटिबद्ध व्हावे. अनेक प्रश्न आपसूक सुटतील! रामकेवलला शुभेच्छा, आशीर्वाद आणि सलाम!
रामकेवलने शिक्षणावरचा फोकस हलू दिला नाही, ध्येयाप्रती तो प्रामाणिक राहिला. कावड वाहणाऱ्या गर्दीत तो गेला नाही की कुठल्या जलशात मिरवणूकीतही तो कधी गेला नाही. मुळात या सर्व गोष्टी त्याच्यासाठी एखाद्या चैनी सारख्या होत्या. जे त्याला परवडणारे नव्हते. राम केवलला जे उमजले ते सर्वांना उमजावे आणि आपल्या शिक्षणाला प्राधान्य देण्यास कटिबद्ध व्हावे. अनेक प्रश्न आपसूक सुटतील! रामकेवलला शुभेच्छा, आशीर्वाद आणि सलाम!
उत्तर प्रदेशात बहुतांश करून क्लेशदायी वा वाईटच बातम्या समोर येतात त्या पार्श्वभूमीवर रामकेवलची बातमी आणि त्याला तिथल्या प्रशासनाने दिलेली सन्मानाची वागणूक या भल्या गोष्टी म्हटल्या पाहिजेत आणि त्याची दखल घेतली पाहिजे!
- समीर गायकवाड
नोंद - बाराबंकी या जिल्हयाचे एक वैशिष्ट्य आहे. ब्रिटिशांच्या विरोधात जेव्हा देशभरात लढा उभारला जात होता तेव्हा शक्यतो जमीनदार लोक त्यात मध्ये पडत नसत अपवाद बाराबंकीचा! इथे जे तालुकदार (स्थानिक जमीनदार) होते त्यांनी अक्षरश: घरावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले. परिणामी इंग्रजांनी अत्यंत अमानवी पद्धतीने तो लढा मोडून काढला. इथल्या जवळपास सर्व जमीनदारांच्या जमिनी जप्त करण्यात आल्या. त्याचा मोठा फटका बसला, हे क्षेत्र जे तया काळात अवधच्या नवाबाच्या सत्तेखाली होते, ते पुरते कंगाल झाले! किंबहुना आजतागायत या क्षेत्राला आर्थिक उबदारी आली नाही! त्यामुळे इथली माणसं खूप साधी नि सरळमार्गी आहेत. ज्यांना युपीच्या लखनौ साईडचा ग्रामीण भाग अनुभवायचा असतो ते आवर्जून घाघरा नदी काठच्या गावांना भेट देतात.
सोमवार, ५ मे, २०२५
गुनाहों का देवता – त्यागाच्या मर्यादा सांगणारी गोष्ट..
त्याग करावा, मात्र त्याचा अतिरेक करू नये. काहींचा त्याग इतका मोठा असतो की त्यांचे अस्तित्व मिटून जाते. त्या त्यागाचीही किंमत राहत नाही आणि त्यांचे मूल्य तर त्यांनी स्वतःच गमावलेले असते. परिचयातील एका महिलेचे काही दिवसांपूर्वी युपीमधील वृंदावन इथे निधन झाल्याचं तिच्या घरच्या लोकांना आठवड्यापूर्वी कळलं. मला मात्र आज समजलं. तिच्या घरी तिची आठवण काढणारं मायेचं माणूस देवाघरी जाऊन तीन दशके लोटलीत. तिच्या असण्या नसण्याने कुणालाच काही फरक पडला नाही हे वास्तव आहे. त्यामुळे, ती गेली इतकाच त्रोटक निरोप मिळाला. एकांतातलं अतिशय रुक्ष मरण तिच्या वाट्याला आलं आणि तिच्या जाण्याचा तितकाच रुक्ष निरोप मिळाला. जीव हळहळला. तिच्या जाण्याने मला चंदर आठवला.
चंदर हा धर्मवीर भारती यांच्या गुनाहों का देवता या कादंबरीचा नायक. चंदर, एक हुशार, अभ्यासू आणि संवेदनशील तरुण. प्रयागराज येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतो. तो जिथे शिक्षण घेतो त्या कॉलेजमधले प्राध्यापक डॉ. शुक्ल यांच्याच घरी तो राहतो. त्यांची विलक्षण देखणी मुलगी सुधा हिच्याशी त्याची जवळीक वाढते. सुधा ही सुसंस्कृत विचारांची, मृदु स्वभावाची आदर्शवादी मुलगी. चंदर आणि सुधा यांचे प्रेम नकळत बहरते, पण त्यांचे नाते सामाजिक नियम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे अडचणीत येते.
डॉ. शुक्ल यांनी चंदरला आपला मुलगा मानलेलं असतं. सुधाचं लग्न दुसऱ्या मुलाशी ठरवले जातं. चंदर, सुधाच्या सुखासाठी स्वतःच्या प्रेमाचा त्याग करतो आणि तिचे लग्न होऊ देतो. सुधाचे लग्न कैलास सोबत होतं मात्र तिच्या आयुष्यातलं सुख कायमचं निघून जातं. तिच्या वैवाहिक आयुष्यातलं दुःख आणि तिचं अकाली निधन यामुळे चंदर अंतर्मुख होतो. कादंबरीच्या अखेरीस चंदर एकाकी आणि पश्चात्तापाने ग्रस्त जीवन जगतो. आपल्या प्रेमयुक्त त्यागाला तो गुन्हा मानतो! त्याचा गुन्हा खरा मानला तरीही तो इतका महान वाटतो की तोही एक देवताच वाटू लागतो!
हिंदी साहित्यातील एक अजरामर कथा म्हणून या कादंबरीकडे पाहिले जाते. जाती, धर्म आणि कौटुंबिक अपेक्षांचे ओझे याचे वेगळे कंगोरे यात समोर येतात. स्त्री पुरुष सहवासाच्या आणि मैत्रीच्या मर्यादांवर प्रश्नचिन्ह लावण्याचे काम, 'गुनाहों का देवता' करते. यातली पात्रे काव्यात्म भाषा बोलतात. ओघवती सुंदर भाषा हा अत्यंत मजबूत प्लसपॉइंट. अशी काव्यात्म भाषा बोलणारी स्वप्नाळू माणसं खूप लवकर फसली जातात अथवा बाजूला तरी फेकली जातात. नियती आणि व्यवहार दोन्हीकडे सपाटून मार खातात!
सुख, दुःख, त्याग आणि पश्चात्ताप यांचा अतिरेकी विचार करणारी माणसं व्यवहारात यशस्वी होत नाहीत कारण व्यवहारी जगात भावनांना शून्य स्थान असते. टोकाची त्यागभावना असणाऱ्या लोकांचं व्यवहाराशी कधीच जमत नाही. कथित सत्य वा द्वापार युगात यांची किंमत असेल मात्र आताच्या डिजिटल युगात अशा लोकांना जग वेड्यात मोजतं! या गोष्टी कुणी ठरवून करत नसतो हे जरी मान्य केले तरीही एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते, ती म्हणजे आपण ज्यांच्यासाठी त्याग करतो ते त्याच्या लायक आहेत का याचा तरी किमान विचार केला पाहिजे. असो. फेसबुक पोस्टने जग बदलत नसतं, व्यक्त होण्याचं आणि कुणाप्रती संवेदना व्यक्त करण्याचं समाधान इतके आऊटपुट पुरेसे वाटते. ..
- समीर गायकवाड
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)