पाऊस पडतो इजबाई
कडाडती
इजबाई कडाडती धरणीबाई तुझा पती
पडतो पाऊस हा टपा
टपा
शेताला घाली खेपा काय घालण्याचा नफा
पडतो पाऊस वल्या
होऊ दे जुमीनी
भाकरीची पाटी शेती जाऊ दे कामीनी
पडतो पाऊस हत्ती
गर्जतो ऐका
पडूनसणी गेल्या सीता सवती बाईका
#ओवी_गाथा - १२
"ऊठवळ नार बसती इथतिथ
भरताराला पुस आपल्या भोजनाच कसं"
संसारात नीट लक्ष नसणारी केवळ नट्ट्यापट्ट्यावर ध्यान असणारी स्त्री 'उठवळ बाई' म्हणून ओळखली जाते. ही उठवळ बाई आपलं घरदार सोडून जगाची दारं पिटत बसते. त्यातून वेळ मिळाल्यावर घरी येथे आणि उपाशी बसलेल्या आपल्या नावऱ्यालाच विचारते की आता जेवणाचं काय / कसं करायचं ?
"ऊठवळ नार बसती इथतिथ
भरताराला पुस आपल्या भोजनाच कसं"
संसारात नीट लक्ष नसणारी केवळ नट्ट्यापट्ट्यावर ध्यान असणारी स्त्री 'उठवळ बाई' म्हणून ओळखली जाते. ही उठवळ बाई आपलं घरदार सोडून जगाची दारं पिटत बसते. त्यातून वेळ मिळाल्यावर घरी येथे आणि उपाशी बसलेल्या आपल्या नावऱ्यालाच विचारते की आता जेवणाचं काय / कसं करायचं ?
________________________________________
#ओवी_गाथा - १५
इंद्रायणीचा देवमासा, देहूला रे आला कसा
जात नव्हती माशाला, होता भक्तीचा वसा.
________________________________________
#ओवी_गाथा - २१
बाईचा जलम नको देऊ देवराया
रस्त्यानी चालता निंदा करीती आईबाया
वरवर पाहता ही ओवी अगदी सर्वसामान्य वाटते. कुणा एका स्त्रीची एक कैफियत इतकंच तिचं स्वरूप समोर येतं. पण आशयचित्र असं नाहीये. जात्यावर ओव्या म्हणताना एकामागून एक विषयावर एक सलग ओव्या त्या मायबहिणी गात असतात. भक्तीपासून संसारापर्यंतचे विषय येऊन जातात आणि जेंव्हा स्त्रीच्या व्यथांचा विषय येतो तेंव्हा प्रत्येक जण ओवीमधून आपलं मत मांडू लागते. पण यातलीच एक चतुर असते, ती नकळत सर्व स्त्रियांनाच टोमणे मारते. ती म्हणते बाईचा जन्म देऊ नकोस. आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष ? हे मागणं आजकाल केवळ ग्रामीण स्त्रियांच्याच तोंडी आढळतं असं काही नाही, तर अनेक शहरी स्त्रियांच्या तोंडून देखील हे वाक्य ऐकायला येते. या ओवीतली खरी गंमत पुढच्या पंक्तीत आहे. ती म्हणते, बाईचा जन्म का नको तर रस्त्याने चालताना आईबायाच एकमेकीची निंदा करतात. पुरुषांनी बाईची निंदा करायची गरजच पडत नाही स्त्रियांची इतकी निंदा स्त्रियाच करत असतात. मग त्यात जन्मदात्री आई देखील इतर उठवळ स्त्रियांच्या सोबत असते ! आई आणि बाया हे शब्द एकत्र जोडून विलक्षण अर्थ साधला आहे, केवळ यमक जुळवणे इतकेच या ओवीचे कसब नसून स्त्रीमनाची यथार्थ खंत व्यक्त करणे हा देखील हेतू आहे... कुठलंही शिक्षण न घेतलेल्या गतकाळातल्या माझ्या मायबहिणी खरोखरच प्रतिभाशाली आणि विचारी होत्या...
______________________________
निळ्या सावळ्या आभाळाची मिठी सैल झाली
काळ्या मातीच्या ऐन्यात कंच शेतं अंकुरली
कुण्या पुण्याईने कुणब्याच्या पोटी जन्म उद्धारली
ओवी मातीत जन्मलेली ओठी मेघांच्या बहरली
कोण कौतिक हिरवाईचे शब्दे कविता पाझरली
हात राबता रानामध्ये सारी सृष्टी की तरारली
नाचे पानोपानी श्रीरंग घुमे रानोमाळी बासरी
पिके मोत्याचे शिवार वारा गाई त्याची गाणी
झुले गंधवेडया सावलीत बांधावरची बाभूळराणी
येता उधाण धरतीला थिटे पडती हात दोन्ही !
_______________________________
बाईचा जलम नको देऊ देवराया
रस्त्यानी चालता निंदा करीती आईबाया
वरवर पाहता ही ओवी अगदी सर्वसामान्य वाटते. कुणा एका स्त्रीची एक कैफियत इतकंच तिचं स्वरूप समोर येतं. पण आशयचित्र असं नाहीये. जात्यावर ओव्या म्हणताना एकामागून एक विषयावर एक सलग ओव्या त्या मायबहिणी गात असतात. भक्तीपासून संसारापर्यंतचे विषय येऊन जातात आणि जेंव्हा स्त्रीच्या व्यथांचा विषय येतो तेंव्हा प्रत्येक जण ओवीमधून आपलं मत मांडू लागते. पण यातलीच एक चतुर असते, ती नकळत सर्व स्त्रियांनाच टोमणे मारते. ती म्हणते बाईचा जन्म देऊ नकोस. आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष ? हे मागणं आजकाल केवळ ग्रामीण स्त्रियांच्याच तोंडी आढळतं असं काही नाही, तर अनेक शहरी स्त्रियांच्या तोंडून देखील हे वाक्य ऐकायला येते. या ओवीतली खरी गंमत पुढच्या पंक्तीत आहे. ती म्हणते, बाईचा जन्म का नको तर रस्त्याने चालताना आईबायाच एकमेकीची निंदा करतात. पुरुषांनी बाईची निंदा करायची गरजच पडत नाही स्त्रियांची इतकी निंदा स्त्रियाच करत असतात. मग त्यात जन्मदात्री आई देखील इतर उठवळ स्त्रियांच्या सोबत असते ! आई आणि बाया हे शब्द एकत्र जोडून विलक्षण अर्थ साधला आहे, केवळ यमक जुळवणे इतकेच या ओवीचे कसब नसून स्त्रीमनाची यथार्थ खंत व्यक्त करणे हा देखील हेतू आहे... कुठलंही शिक्षण न घेतलेल्या गतकाळातल्या माझ्या मायबहिणी खरोखरच प्रतिभाशाली आणि विचारी होत्या...
______________________________
निळ्या सावळ्या आभाळाची मिठी सैल झाली
काळ्या मातीच्या ऐन्यात कंच शेतं अंकुरली
कुण्या पुण्याईने कुणब्याच्या पोटी जन्म उद्धारली
ओवी मातीत जन्मलेली ओठी मेघांच्या बहरली
कोण कौतिक हिरवाईचे शब्दे कविता पाझरली
हात राबता रानामध्ये सारी सृष्टी की तरारली
नाचे पानोपानी श्रीरंग घुमे रानोमाळी बासरी
पिके मोत्याचे शिवार वारा गाई त्याची गाणी
झुले गंधवेडया सावलीत बांधावरची बाभूळराणी
येता उधाण धरतीला थिटे पडती हात दोन्ही !
_______________________________
#ओवी_गाथा २४ -
'आला आला रुखवत त्यात होता तवा; विहीणीनं पेटवली चूल, सरपणात चंदन जाळत हुतं तवा !'
या उखाण्यात चूल आहे ! तेंव्हा उखाण्यात अतिशोयक्ती असे. यांचं द्वंद्व चाले आणि जी हरत असे तिला आपल्या नवऱ्याचे नाव घ्यावे लागे असा ग्रामीण भागात तेंव्हा रिवाज होता. अजूनही नाव घेण्याची प्रथा काही ठिकाणी आहे पण असा नखरेल मुकाबला आता होत नाही आणि आला आला रुखवताची जादूही उरली नाही. या उखाण्यातली विहिण सांगते की, कधी काळी व्याही खूप श्रीमंत होते, तेंव्हा चुलीत चंदन जाळलं जायचं, तेंव्हाच काय ते विहीणीने तेंव्हाच काय तो स्वयंपाक केला आहे. आताच्या काड्या काटक्यांच्या सरपणावर चूल पेटवताना तिची दमछाक होते ! ...
आता तो काळ निघून गेलाय. लग्न आकसत गेलीत, रुखवत मोडीत निघालेत आणि चूलही गेलीय. बदल चांगला असतो.
चुलीबद्दलच्या आठवणी काळजाला घर पाडणाऱ्या आहेत, एकदा जुन्या जखमांची खपली निघाली की त्यातून सावरायला खूप त्रास होतो. चुलीपुढे बसून धग लागल्यागत होते. स्मृतींचे सरपण धडाडून उठते आणि डोळ्यात गेलेल्या धुराने पाणी येण्याऐवजी फुकारी फुंकणारे तळहाताच्या रेषा झिजलेले निस्तेज मलूल हात आता उरले नाहीत या जाणीवांनी डोळे ओले होतात.
आज सोशल मीडिया 'चूलमय' झालाय पण आपल्या सासर माहेरच्या गतकाळातील बायकांनी काय काय सोसले असेल हे चुलीला जेव्हढे माहित असेल तेव्हढे कुणाच्याच बापजाद्यांनाही माहिती नसेल, कारण त्या काळातल्या बायका कुणापुढेच व्यक्त होत नव्हत्या, त्यासाठी त्या चूल पेटवायची वाट बघायच्या. चूल धडाडून पेटली की त्या उबेने त्यांना कधी बरे वाटायचे कारण मायेच्या उबेच्या त्या भुकेल्या असत तर कधी आवर्जून पश्चात्तापासाठी धग लागून घ्यायच्या. सर्वात महत्वाचे म्हणजे आर पेटण्याआधी जो धूर यायचा ना तेंव्हा या आयाबाया खूप रडून घ्यायच्या ! सर्वांना वाटे की धुरामुळे यांच्या डोळ्यात पाणी आलंय, मग चुलीलाच यांची दया यायची आणि ती आस्ते कदम जळत रहायची.
डोईवरचा पदर सावरत घामेजल्या अंगाने अन उपाशी पोटानं या मायमाऊल्या हात चालवायच्या. पेटलेलं सरपण चुलीला चटके द्यायचं आणि घरादारातल्या माणसांच वागणं या बायकांना चटके द्यायचं ! तरीही कुणीच तक्रार केली नाही. चुलीनेही नाही आणि त्या बायकांनीही नाही !
चुलीत घाला म्हणणे सोपे आहे पण त्या साठी आधी चुलीतलं जळणं जगलेलं असावं ! तो काळच भारलेला होता आणि त्यातली सच्चाई, साधेपणा मनाला भावणारा होता याची प्रचीती वरील ओव्यातून पुन्हा पुन्हा येते.
_______________________________________
( मागील दोन वर्षात #_ओवीगाथा या tag मधून अनेक जुन्या ओव्या आणि त्यांचे अर्थ लिहून झालेत. याचे पुस्तक काढावे का, याचे पुस्तकरूप कुणी प्रकाशित करेल का आणि मुख्य म्हणजे या पुस्तकाचे वाचन होईल का या प्रश्नांवर थोडासा गोंधळून गेलोय. गावाकडच्या जात्यावरच्या ओव्या जात्या पाठोपाठ कालबाह्य झाल्या पण त्यातला अर्थ आणि गोडवा कधीच कालबाह्य न होणारा आहे. यामुळे या दुर्लक्षित विषयावरही बऱ्यापैकी लिहून झालंय. ही शब्दशिदोरी पुढे कशी पोहोचवायची याचे नेमके उत्तर मात्र माझ्याकडे नाही.)
👌👌
उत्तर द्याहटवाThank you for thiis
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर . सगळ्या जुन्या लहाणपणी च्या आठवणी जागवल्या
उत्तर द्याहटवा