हत्याकांडाआधीचे टँतुरा गावाचे दृश्य |
गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२
द ब्लड इन द बॅरल्स – दशकांच्या इस्त्राईली भ्रमकथांचा भंडाफोड..
बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२
रिअल लाईफ पुष्पा - आयुष्याची लक्तरे झालेल्या मुलीची दास्तान
हृदयी पान्हा नयनी पाणी, बंदिनी ! |
गुंटूर. आंध्रप्रदेश.
स्वर्णकुमारी वय वर्षे पस्तीस. पेशा दलाली नि विभ्रम.
देशात कोविडच्या डेल्टा व्हेरीयंटची साथ (दुसरी लाट) ऐन भरात होती तेंव्हाचा काळ. लोक कोविड रुग्णांना अक्षरशः वाळीत टाकत होते. खेड्यांनी संसर्ग वेगाने पसरत होता आणि माणसं किड्यामुंग्यांगत मरत होती. नानाविध अफवा आणि नेमक्या माहितीचा अभाव यामुळे सारेच भयभीत होते. याचा फायदा अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने घेतला आणि नैतिकतेला बाजारात उभं करून आपल्या तुंबड्या भरून घेतल्या. यात विविध स्तरावरील भल्याभल्या गणल्या गेलेल्या पेशांमधली मंडळी होती. यात ह्युमन ट्राफिकिंग करणारी मंडळी मागे कशी असतील ? कोविडकाळातील स्त्रियांचे दमण, शोषण याविषयीची जी भीती व्यक्त केली होती तिला पुष्टी मिळाल्याचे अनुभवतोच आहे. मात्र या सर्व घटनाचक्राचं शिखर ठरावं अशी एक काळीज पिळवटून टाकणारी घटना उजेडात आलीय. ही घटना जिच्या आयुष्याचं मातेरं करून गेली त्या मुलीचं नाव इथे पुष्पा लिहितोय कारण आपल्याला खोट्या नायकांची ओढ फार असते आणि खऱ्यांना आपण किंमत देखील देत नसतो.
आठवीत शिकणारी पुष्पा पंधरा वर्षांची होती. तिचं मूळ गाव गुंटूरमधल्या क्रोसूर तालुक्यातलं. पोटाची खळगी भरायला तिचे कुटुंब गुंटूरमध्ये स्थायिक झालेलं. बंगालच्या उपसागराला लागून असलेल्या या दर्यावर्दी जिल्ह्याच्या सीमेवरून कृष्णेमाई वाहते. पुष्पाने तिच्या बालपणी कृष्णेपाशी आपले अश्रू अर्पण केलेले. कारण ती शैशवावस्थेत असतानाच तिची आई तिची साथ सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेलेली. वडील मोलमजुरी करायचे आणि पुष्पा आपलं शिक्षण सांभाळून घरातली सगळी कामे करायची. कोविडच्या लाटेत तिलाही बाधा झाली. तिला बऱ्यापैकी त्रास होऊ लागला. अठराविश्वे दारिद्र्य असल्याने गुंटूरच्या शासकीय रुग्णालयात तिला दाखल केलं. रूग्णापाशी कुणी थांबायचं नाही असा दंडक असल्याने तिच्यापाशी घरचं कुणी नव्हतं, तसेही तिच्याजवळ थांबू शकेल असं तिच्या कुटुंबात कुणी नव्हतंच मुळी. याचा फायदा स्वर्णकुमारीने उचलला. बायकांची ने-आण करणाऱ्या वा त्यांना गुमराह करणाऱ्या टोळ्यांमधली माणसं (?) कुठेही कसल्याही रुपात वावरत असतात. स्वर्णकुमारी गुंटूरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये सावज हेरण्याच्या मोहिमेवर होती. यासाठी तिने परिचारिका असल्याचा आव आणला होता. बिनाआईची नि कोलमडल्या कुटुंबाची कोवळी पोर असलेली पुष्पा तिने अचूक हेरली. तिने पुष्पाचा विश्वास संपादित केला. तिच्या वडिलांना तिने कळवले की पुष्पाला विशेष देखरेखीची निकड असल्याने ती आपल्या घरी घेऊन जातेय आणि तिची प्रकृती बरी होताच तिला घरी सोडलं जाईल. परिस्थितीने गांजलेल्या आणि नियतीने पोटावर मारलेल्या पुष्पाच्या अल्पशिक्षित पित्याचा स्वर्णकुमारीवर सहजी विश्वास बसला, त्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायही नव्हता.
चेहरा हरवलेल्या पिढीचा संगीतकार - बप्पी लाहिरी..
बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२
प्रेमात जगणं म्हणजे काय - मस्ट सी मुव्ही - '96' !
तरीही 'माझं तुझ्यावर प्रेम आहे' हे सांगता येणं हे देखील जगण्यासाठी पुरेसं असतं.
अनेकांना हे सांगता येत नाही, किंबहुना कित्येकांना व्यक्त होण्याची एकही संधी मिळत नाही.
सगळ्या गोष्टी मनात राहून जातात.
रविवार, ६ फेब्रुवारी, २०२२
उनको ये शिकायत हैं आणि यूं हसरतों के दाग - एक गहिरा अर्थ...
शनिवार, ५ फेब्रुवारी, २०२२
परवीन रहमान ते आयेशा मलिक - बदलता पाकिस्तान...
रविवार, २३ जानेवारी, २०२२
फारच सिम्पल होतं ते !
आता इतकं गुंतागुंतीचं नव्हतं ते !
दोघांत एक पॉपकॉर्न. एखाद्या महिन्यांत तिच्यासाठी 'गोल्डस्पॉट' त्यात माझ्या वाट्याचे दोनच घोट,
तर कधी लालकाळं थम्सअप इंटरव्हलला !
ती कावरीबावरी होऊन मान खाली घालून बसलेली
अन् मी इकडे तिकडे पाहत मध्येच तिच्याकडे पाहणारा !
फारच सिम्पल होतं ते !
शनिवार, २२ जानेवारी, २०२२
डेथ ऑफ गॉडमदर
रविवार, १६ जानेवारी, २०२२
समानतेच्या वाटेवरचा पाकिस्तान...
न्यायमूर्ती आयेशा मलिक |
शुक्रवार, १४ जानेवारी, २०२२
उन्हांचं इर्जिक...
मंगळवार, ११ जानेवारी, २०२२
देह दाह ... @सिगारेट्स
काही पट्टीचे धूरसोडे असतात, काही स्ट्रेसपायी ओढतात,
काही चोरून पिणारे तर काही हौशी तर काही थ्रिलपायी पिणारे असतात.
काही आहारी गेलेले गंजेडी सिगारेटी असतात !
काही किक बसावी म्हणून पितात तर काहींना पूर्ण ब्लँक झाल्यागत वाटते तेंव्हा तलफ येतेच !
काही मात्र निव्वळ रिबेलर असतात, मात्र हे काही बंडाचे खरे प्रतीक नव्हे हे त्यांना पचनी पडत नसते !
भकाभका धूर सोडणारे वेगळे आणि शांतपणे धुम्रवलये सोडणारे वेगळे.
पिवळा हत्ती, चारमिनार, फोर स्क्वेअर यांचे जग वेगळे आणि मर्लबोरो, डनहिल, नेव्ही कट, रेड अँड व्हाईट यांचे जग वेगळे.
काही दारू पिताना सिगारेट्स ओढतात तर काही पिऊन झाल्यावर ओढतात तर काही सिपगणिक कश मारतात. काही दारूच्या लास्ट सिपमध्ये सिगारेट संपवून टाकतात !
सोमवार, १० जानेवारी, २०२२
देहगंध - मधू नारंग... @रेड लाईट डायरीज
गाणं संपल्यानंतर केवळ वाद्यांचा साज जेंव्हा रंगू लागतो तेंव्हा मद्याचे प्याले ओठास लावता येतात, तेंव्हा नर्तिका ठुमके देखील लावत नाही.
'हमरी अटरियां पे..' हे बेगम अख्तर यांनी गायलेलं गाणं गाण्याचा आग्रह अनेक ठिकाणी होताना मी पाहिलाय. मात्र यातला अटरी म्हणजेच कोठा हे अनेकांना ठाऊक नसते, एक छोटेखानी घर आणि त्याच्या वरच्या भागातील सज्जावजा छोटीशी खोली म्हणजे अटरी, जिथे दुमजली घर नसते तिथे पहिल्या मजल्यावरील व्हरांडावजा भागास अटरी संबोधण्यावाचून पर्याय नसतो. या अटरीमध्ये खाजगी मैफिली रंगत. म्हणून तिचं लडिवाळ आमंत्रण असे की, "हमरी अटरियां पे आ जाओं सजनवा..."
या आवतणातली मिठास कातिल असे..
गुरुवार, ६ जानेवारी, २०२२
इतकी श्रीमंती हवी ...
घेणाऱ्या हरेक हातांना देता यायला पाहिजे इतकी श्रीमंती हवी ! |
सिग्नलपाशी भीक मागत फिरणाऱ्या दोन प्रौढ स्त्रिया मागेपुढे करत होत्या.
त्यांच्या पाठीवरच्या झोळीत तान्हुली पोरे होती.
त्या स्त्रियांना कोपऱ्यावरच्या वडापाववाल्याने एका कागदाच्या भेंडोळीत वडे बांधून दिले.
त्यांना भूक खूप लागली असावी, रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या शिवाजी विद्यालयाच्या कंपाउंड वॉललगतच्या सावलीत त्या दोघी बसल्या.
काही अंतरावर बसलेली वृद्धा त्या दोघींना आशाळभूत नजरेने पाहत होती.
त्या दोघींचे मात्र तिच्याकडे लक्ष नव्हते.
त्यांचे धुळीत माखलेले, भेगाळलेले अनवाणी पाय त्यांच्या रोजच्या जीवनातील संघर्षांची ग्वाही देत होते.
मंगळवार, ४ जानेवारी, २०२२
समृद्धी याहून काय वेगळी असते ?
ज्यात झाडं आहेत, शेतं आहेत, पानं फुलं आहेत,
मधुर स्वरांची रुंजी घालणारा वारा आहे, मन चिंब करून जाणारा पाऊस आहे,
अंगांग जाळून काढणारं रखरखीत ऊन आहे, डेरेदार सावल्या आहेत,
गहिवरल्या डोळ्यात पाणी आणून मायेनं बघणाऱ्या गायी आहेत,
रात्री निशब्द होणारे गोठे आहेत,
बांधाबांधावरच्या अबोल बोरी बाभळी आहेत,
खोल खोल विहिरीत घुमणारे निळेकरडे पारवे आहेत,
पायाशी मस्ती करणारी काळी माती आहे.
मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१
साडी मनामनातली आणि अंधाराच्या सांदीतली...
जगण्याचे पसायदान
प्रत्येक जीवाला, प्रत्येक वस्तूला एक प्रवृत्ती असते. ती कळायला हवी त्यातून जग कळण्यास मदत होते.
मोगऱ्याच्या कळ्यांनी बिछाना सजवता येईल, सखीच्या केसात गजरे माळता येतील, मनगटावर लफ्फे बांधता येतील, शृंगाराच्या प्रत्येक पायरीवर मोगरा चुरगळता येईल. तिथं तुळशीच्या मंजुळा कधीच कामी येणार नाहीत !
मात्र ईश्वरासाठी हार विणताना मोगऱ्याचा विचार कमी होईल आणि मंजुळा जास्ती कामी येतील !
रविवार, १९ डिसेंबर, २०२१
ऑनर किलिंग- खोट्या प्रतिष्ठेचे हकनाक बळी..
ऑनर किलिंग- खोट्या प्रतिष्ठेचे हकनाक बळी - पूर्वप्रसिद्धी दैनिक सामना |
मंगळवार, १४ डिसेंबर, २०२१
निस्सीम प्रेमाची अमरकथा.. रवींद्रनाथ ठाकूर आणि नलिनी !
प्रेम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या मनात बऱ्याचदा प्रेमाचे काही आदर्श असतातच. जे की त्याने वाचलेले, ऐकलेले वा पाहिलेले असतात. लैलामजनू, हिर रांझा, रोमिओ ज्युलियेट ही यातली जुनी नावे. फिल्मी जोड्या आणि त्यांच्या भूमिकांची नावे जसे की वासू सपना, वीर झारा यांचाही प्रभाव असतो. याहून भिन्न प्रकृतीचाही एक महत्वाचा घटक असतो ज्याचा प्रेमी युगुलांवर प्रभाव जाणवतो तो म्हणजे साहित्य. त्यातही प्रेमकवितांचा ठसा अधिक. यात पुन्हा व्यक्तीसापेक्ष कवितांची नि कवीची नामावली वेगळीच समोर येते. त्यातही रवींद्रनाथ ठाकूर यांचे नाव बहुश्रुत असेच आहे. त्याचे कारण त्यांच्या काव्यरचनेच्या वैशिष्ट्यांत आणि त्यामागच्या पार्श्वभूमीमध्ये आहे.
गुरुवार, ९ डिसेंबर, २०२१
सुलोचना, मीना आणि काळजावरचे भळभळते घाव..
मीनाच्या मध्यस्थीतून सुलोचनाने भेटीसाठी निरोप दिलेला असल्याने तिला भेटायचे होते मात्र लॉकडाऊनच्या काळात तिला भेटता आलं नाही.
२००६ मध्ये तिच्यावर बलात्कार झालेला. आरोपी पकडले गेले. खटला भरला गेला आणि त्यांना चौदा वर्षांची सक्तमजूरीची सजा लागली.
बलात्कार झाल्यानंतर पती अरुणचं तिच्यासोबतच वर्तन हळूहळू बदलत गेलं.
सुरुवातीला लढा, संघर्ष इत्यादी शब्दांनी तिला खूप भारी वाटायचं, मात्र नंतर आपल्या अरुणचं बदलतं स्वरूप पाहून ती घाबरून गेली.
बुधवार, १ डिसेंबर, २०२१
एड्स, निरोध, वेश्या आणि अशोक अलेक्झांडर..
भारतातील कोविड विषाणूच्या साथीसंदर्भात डब्ल्यूएचओच्या विविध इशाऱ्यांनी एक प्रकारचा धुमाकूळ घातल्याचे दिसून येते, अजूनही याची मोठी दहशत आढळते. WHOने याहून भयानक इशारे भारतातील एड्सच्या प्रादुर्भावासंदर्भात दिलेले होते. 2002 साली दिलेल्या इशाऱ्यात म्हटलं होतं की साल 2010 पर्यंत भारतातील एड्सबाधितांची संख्या अडीच कोटी इतकी असेल. प्रतिदिन तब्बल हजार लोकांना एड्सची बाधा होईल असंही म्हटलं होतं. भारत हा एड्स कॅपिटल बनून जाईल अशी भीती व्यक्तवण्यात आली होती. मात्र साल 2010 येऊन गेले, डब्ल्यूएचओने सांगितल्यासारखी भयानक स्थिती देशभरात झाली नाही. पोलिओ निर्मूलनासाठी भारताने राबवलेल्या धोरणांचा, आराखड्याचा नेहमीच जगभरात गौरव होत राहिला. मात्र एड्सच्या महाभयानक संसर्गजन्य एपिडेमिकवर भारताने मिळवलेल्या विजयावर अगदी किरकोळ लेखउल्लेख समोर आले. हा भेदभाव का झाला याचं उत्तर आपल्या मानसिकतेत आहे. खरं तर हा आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा सर्वात मोठा विजय होता, कोविडच्या साथीवरून आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेलच की आपली सार्वजनिक व खाजगी आरोग्य व्यवस्था अगदीच बेताची आणि पुरती सक्षम नाही. मग दोन दशकापूर्वी जेंव्हा एड्सच्या संसर्गाचे इशारे दिले जात होते तेंव्हा तर अगदीच प्राथमिक अवस्थेत आपली आरोग्य व्यवस्था होती. असं असूनही आपण हे करू शकलो. हे सगळं कुणामुळे शक्य झालं त्यांना श्रेय नको का द्यायला ? आपण यात कोतेपणा दाखवला मात्र जगभरातील काही एनजीओंनी यासाठी मुक्त कंठाने आपल्याकडील सेक्सवर्कर्सची तारीफ केली. या महिलांसोबतच आणखी एक नाव महत्वाचं होतं ते म्हणजे अशोक अलेक्झांडर !
मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१
झुलवा - अंधार वेगाने वाढतो आहे...
सुलीचं पूर्ण नाव मला अजूनही ठाऊक नाही. थोराड बाया तिला सुली म्हणतात तर कुणी समवयीन तिला सुलू म्हणतात. पुरुष मात्र लोचना नाहीतर सुलोचना या नावांनीच तिला पुकारतात. सुलीच्या आयुष्यातलं सर्वात मोठं सुख नवरात्र होय ! तिला नेहमी वाटतं की नवरात्र कधीच संपू नये. सालभर नवरात्र असावी असंच तिला वाटतं. अश्विन पौर्णिमा सरली की दमून गेलेली सुली अगदी निपचित होई. हे चौघेही दुसऱ्या दिवशी दुपारून धुम्मस मारून तानीबाईच्या खोपटात बसत. माणिकरावच्या अड्ड्यावरून दत्त्या देशी थर्रा घेऊन येई. तानी स्वतःच्या हाताने वाडगं भरून थोडं लालभडक रश्श्याचं आणि थोडं सुकं मटन करायची. राम्या खिमा उंडे नि तिखट बुंदी घेऊन यायचा. काशिनाथची बायको त्याला चपात्याची चळत देई. सुली पिताना बडबडत नाही. शून्यात नजर लावून बसते. तिचं गुमान राहणं हेच तिचं बोलणं हे बाकीच्यांना माहिती होतं. स्टीलच्या ताटांनी मटन, खिमा वाढून झाला की तानीचं काम संपे. मग ती प्यायला सुरुवात करे. जाम बरळायची ती. दत्त्या एकदम हरामी. किती जरी ढोसली तरी त्याला फरक पडत नसे.
शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१
इर्शाद आणि विषाद ..
सभी के दीप सुंदर हैं हमारे क्या तुम्हारे क्या
उजाला हर तरफ़ है इस किनारे उस किनारे क्या..
इर्शादवरून जो गोंधळ माजवायचा होता तो माजवून झालाय. त्यातले काही बारकावे आपण समजून घेतले पाहिजेत.
जे विरोध करत होते त्यांची मुख्य भूमिका अशी होती की दिवाळी हा सण हिंदूधर्मीयांचा आहे तेंव्हा या निमित्ताने ठेवलेल्या गझल गीत गायन कार्यक्रमाचे शीर्षक फारसी उर्दू तत्सम भाषेत नको. यामुळे सांस्कृतिक आक्रमण होते आणि हिंदूंच्या अस्मितांना किंमत दिली जात नाही.
विरोध करणारी काही मंडळी म्हणत होती की दिवाळी पहाट, दिवाळी प्रभात दिवाळी काव्यमाला असे शीर्षक का दिले गेले नाही.
सण हिंदूंचा आहे तेंव्हा फारसी उर्दू भाषिक शीर्षक नको असा आग्रह ही मंडळी करत होती.
विरोधाचा यापेक्षा वेगळा युक्तिवाद माझ्या वाचनात आला नाही.
मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०२१
प्रेमिस्ते...
विख्यात तमिळ चित्रपट दिग्दर्शक एस. शंकर हे एकदा रेल्वेतून चेन्नैला प्रवास करत होते तेंव्हा एक विलक्षण घटना घडलेली. त्यांच्या कंपार्टमेंटमधील एका प्रवाशाला दुसऱ्या सहप्रवाशाकडून कळले की आपल्या बोगीमध्ये आपल्या सोबत एस. शंकर हे प्रवास करताहेत. काही क्षण त्या प्रवाशाने विचार केला, मग मनोनिश्चय करून तो शंकर यांच्या पुढ्यात जाऊन बसला. त्याने आधी समोरील व्यक्ती शंकर असल्याची खात्री करून घेतली नि पुढच्याच क्षणाला त्याने शंकर यांचे हात आपल्या हाती घेतले. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. त्याने शंकरना विनवणीच्या स्वरात एक प्रश्न केला, "सर मी एक कथा सांगतो तुम्ही त्यावर सिनेमा बनवाल का ?" शंकर बुचकळ्यात पडले. त्यांची द्विधा मनस्थिती त्या प्रवाशाने ओळखली आणि तो बोलता झाला, "ही काही काल्पनिक कथा नाहीये, ही माझ्या जीवनात घडलेली सत्यकथा आहे." त्याच्या उद्गारासरशी शंकरनी मान डोलावली. काही क्षण तो व्यक्ती गप्प झाला, शून्यात नजर लावून थिजून बसला. नंतर तो बोलत राहिला. कथा संपली तेंव्हा त्याच्या डोळ्यातले अश्रू काही केल्या थांबत नव्हते. त्या कथेने शंकर स्तब्ध सद्गदित झाले. तो प्रवासी पन्नाशीच्या आसपासचा होता, त्याने सांगितलेली जीवनकथा त्याच्या मुलीच्या बाबतीतली होती. त्या व्यक्तीला आपल्या चुकांचे प्रायश्चित्त करायचे होते आणि आपण केलेली चूक दुसऱ्या कुणी व्यक्तीने करू नये म्हणून त्यावर सिनेमा निर्मिती व्हावी अशी त्याची मनोमन इच्छा होती. शंकरनि त्याला शब्द दिला आणि त्यावर २००४ साली सिनेमा बनवला. 'काधल' हे त्याचे नाव. काधल म्हणजे प्रेम. सिनेमाने तिकीटबारीवर अक्षरशः टांकसाळ खोलली. अगदी लोबजेट सिनेमा होता तो, त्याच्या यशाने भल्याभल्यांनी तोंडात बोटे घातली. याच सिनेमाचा २००५ मध्ये तेलुगुमध्ये रिमेक झाला, त्याचे नाव होते 'प्रेमिस्ते' !
गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१
नथीचा दुखरा कोपरा...
स्त्री काही दागिने परंपरा रिवाज म्हणून घालते तर काही दागिने हौस म्हणून तर काही दागिने शृंगारासाठी घातले जातात. यातील काही दागिने स्त्रीच्या शरीर सौष्ठवात भर घालतात तर काहींनी तिचे शरीर लवचिक राहण्यास मदत होते. माथ्यावरच्या बिंदी, भांगसरने सुरुवात होते आणि पैंजण जोड्व्याने इतिश्री होते.
अग्रफूल, गोंडे, केकत (केवडा), बेसर, मुरकी, मोहनमाळ, बोरमाळ, डोरलं, खोड, बाजूबंद, मणदोरा (कंबरपट्टा), कोल्हापुरी साज, अंगठी, छल्ला, पैंजण, अनवट, जोडवी असे एक ना अनेक दागिने आहेत तरीही नथीला महत्व आहे. याचं कारण काय असावं ?
शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१
माणसांचं स्क्रोलिंग आणि टॉलस्टॉयची गोष्ट ...
सोशल मीडियापासून दूर असलेली माणसं अलीकडील काळात दृष्टीपथात नाहीत. अगदी खेडोपाडी देखील याचा बोलबाला आहे. पूर्वीच्या काळातला आर्थिक वर्गवारीचा भेद देखील याला अडवू शकला नाही. जाती, धर्म, वर्ण, वय, लिंग, भाषा, प्रांत, उत्पन्न इत्यादी सर्व बंधने यास रोखू शकली नाहीत हे सत्य आता सर्वमान्य झालेय. दिड जीबीचा डाटा हा आता विनोदाचा आणि मिम्सचा विषय होय पाहतोय. लोकांकडे फोन्स कुठून आले, रिचार्ज कसे परवडते किंवा हे सर्व पेलवते कसे हे सगळे विविध शास्त्रांचे विषय आहेत. खरा प्रश्न हा पडतो की माणूस सोशल मीडिया वापरतोय की सोशल मीडिया माणसाला वापरतोय ? हा प्रश्न म्हणजे निव्वळ शब्दच्छल नाहीये किंवा विभ्रमनिर्मितीचा मुद्दा नाहीये. हा एक महत्वाचा प्रश्न आहे जो पुढे जाऊन मानवी समुदायाला एका गंभीर नि धोकादायक वळणावर नेऊ शकतो. थोडंसं सुलभ करूया म्हणजे सहज मतितार्थ उमगेल.
बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१
वेश्यांच्या जागांवर कुणाचा डोळा ?..
रविवार, १ ऑगस्ट, २०२१
मैत्रीची अनोखी दास्तान : मार्टिना - ख्रिस
महिला टेनिसचा तो खऱ्या अर्थाने सोनेरी काळ होता असे म्हटले जाते कारण पुरुषांच्या सामन्यांहून अधिक लोकप्रियता या दोघींच्या सामन्यास लाभे. चुरशीच्या द्वंद्वावरून यांच्यातलं नातं सहज सुलभतेचे नसेल असं कुणाला वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. या दोघी बेस्ट फ्रेंड्स होत्या ! आणि आजही त्यांच्यातल्या मैत्रीचा गंध सीमापार दरवळतो आहे.
शनिवार, २४ जुलै, २०२१
पाऊस कुठे चुकलाय ?
बुधवार, ७ जुलै, २०२१
'सुहाना सफर' दिलीपसाब आणि सायराचा !....

ओढ ज्याची त्याची असते, ज्याला त्याला ती कळत असते मात्र त्याच्याशी एकरूप झालेल्या जीवाला ती अधिक कळते .....
तो 'अखेरचा रोमन' आता जवळ जवळ गलितगात्र होऊन गेला होता अन ती 'हिमगौरी' आता थकून गेली होती....
पण त्यांनी अजून हार मानली नव्हती, त्याची स्वप्ने त्याचा पिच्छा सोडत नव्हती
अन ती त्याची सेवाशुश्रूषा थांबवत नव्हती..
त्याचा श्वास हाच जणू तिचा ध्यास झाला होता...
त्याचे श्वास अलीकडे मंद होत होते..
त्याच्या डोक्याखाली तिने आपल्या हाताचीच उशी केली होती.
तिच्या डोळ्याखालची काळी वर्तुळे आता अधिक गडद होत होती अन त्याच्या देखण्या चेहऱ्यावरचे सुरकुत्यांचे जाळे अधिक दाट होत चालले होते..
शुक्रवार, २ जुलै, २०२१
मला दिसलेला श्रीमंत माणूस ...
मी माझ्या तंद्रीत पुढे सरकलो. काही क्षणांनी एक क्षीण आवाज जाणवला, फट्ट ! काही तरी फुटलं असावं असं त्यातून जाणवलं.
आरशातून मागे पाहिलं तर बाईकस्वार पुढे निघून गेला होता मात्र रस्त्यावर कुत्री गोळा झाली होती, ती भुंकत नव्हती. एका विशिष्ट स्वरात कुळकुळत होती.
मंगळवार, ४ मे, २०२१
मासूम - दो नैना एक कहानी...
आज ‘मासूम’विषयी ! पण त्याही आधी या सिनेमाच्या क्लासविषयी. यातील स्टारकास्ट आणि त्या काळातील समांतर सिनेमाची लाट यामुळे या सिनेमासाठीचा प्रेक्षकवर्ग कथित पांढरपेशी उच्च अभिरुचीचा आणि मध्यमवर्गीय असाच असेल असे आडाखे होते. चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही दिवस चित्र असेच होते नंतर मात्र चित्र बदलले आणि कॉमन पब्लिक देखील थियेटरमध्ये येऊ लागलं. तरीदेखील तद्दन पिटातले म्हणून ज्यांना हिणवले जाते तो प्रेक्षकवर्ग याला फार लाभला नाही. हे लिहिण्याचे कारण म्हणजे आपल्या सोलापुरातील प्रेक्षकवर्गाची वर्गवारी आणि जडणघडण होय. कधीकाळी सोलापूर हे एक अत्यंत साधंसुधं गिरणगाव होतं. आजही इथे श्रमिकवर्ग मोठ्या प्रमाणात आढळतो. चतुर्थ- तृतीय श्रेणी कामगार खूप आहेत. विविध भाषीय लोक मुबलक संख्येत आहेत. लोकांचे दरडोई उत्पन्न बरेच कमी आहे, चैन करण्याकडे आणि पैसे खर्च करण्याकडे इथल्या लोकांचा ओढा नाही. आहे त्यात समाधान मानून जगणारा अल्पसंतुष्ट आणि विकासाची ओढ नसणारा काहीसा सुस्त उदासीन असा इथला जनसमुदाय आहे. अशा लोकांची क्लास आणि मास अशी विभागणी केली तर क्लास अगदी अल्प आणि मास अफाट प्रमाणात आढळतो. त्यामुळेच ‘मासूम’ काहीशा उशिराने जेंव्हा सोलापुरात प्रदर्शित झाला तेंव्हा त्याची व्ह्यूअर्स काऊंटची अपेक्षा जेमतेमच होती, किंबहुना यामुळेच आसनसंख्या कमी असलेल्या छायामंदिरमध्ये याची वर्णी लागली. पहिल्या दोनेक आठवड्यात पब्लिक कमी होतं नंतर मात्र थियेटर खचाखच भरू लागलं. बिड्या वळणाऱ्या दमलेल्या वयस्क हातापासून ते गल्लीच्या कोपऱ्यावर पडीक असणाऱ्या तंबाखू मळणाऱ्या बेफिकीर तरुण हातापर्यंतचं बहुवर्गीय पब्लिक त्यात सामील होतं. ‘मासूम’ला लोकांनी नितळ निखळ प्रेम दिलं, सिनेमा हिट झाला. गाण्यांनी लोकप्रियतेचा कळस गाठला. १९८३ मध्ये आला होता 'मासुम'. शेखर कपूरने दिग्दर्शित केलेला पहिलाच पण अप्रतिम सिनेमा. तेंव्हा मी किशोरवयीन असेन. माझ्या आईवडिलांसमवेत सिनेमा पाहिलेला. आता तिथे निर्जीव मल्टीप्लेक्स आहे, त्यातल्या बेचव कॉर्नप्लेक्ससारखे वाटते ते ! ‘मासूम’ पाहताना एकदोन प्रसंगाच्या वेळेस शेजारी बसलेल्या आईच्या कुशीत तोंड लपवून रडल्याचे आठवतेय. त्यातलाच एक प्रसंग म्हणजे 'दो नैना एक कहानी' ह्या गाण्याचा हे मात्र नक्की.
सोमवार, २९ मार्च, २०२१
नापसंत ठरलेली डाकूराणी - बँडिट क्वीन..
सोमवार, २२ मार्च, २०२१
जीवनमूल्यांच्या लढ्याचा नवा चेहरा -
या आठवड्यामध्ये एक विलक्षण घटना घडली तिची नोंद पाश्चिमात्य माध्यमांनी निवडक पद्धतीने घेतली तर अन्य काही देशात त्याबद्दल क्वचित चर्चा झडली. अमेरीकेच्या इतिहासात स्वातंत्र्याच्या घोषणापत्राला (डिक्लेरेशन ऑफ इंन्डीपेंडन्स) अनन्यसाधारण महत्व आहे. थॉमस जेफरसन हा विचारवंत राजकारणी त्या घोषणापत्राचा जनक होय. अमेरिकेत असलेल्या ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी वसाहती आणि त्याआडून सुरु असलेलं शोषण यांच्याविरुद्ध जेफरसनने आवाज उठवला होता. लोकशाही, संघराज्यवाद, व्यक्तिगत अधिकारांचे रक्षण यांचा तो खंदा पुरस्कर्ता होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पद देखील जेफरसनने भूषवले होते. अमेरिकेत त्याला जनकाची (फाउंडीग फादर) उपमा बहाल केली गेलीय. या थॉमस जेफरसनच्या पत्नीचे नाव होते मार्था वेल्स. तिला त्याच्यापासून सहा अपत्ये झाली होती. ती वंशवेल यथावकाश वाढत राहिली. दरम्यान मिश्र वर्णीय संबंधातून जन्माला आलेली सॅली हेमिंग्ज नावाची एक गुलाम स्त्री जेफरसनच्या पदरी होती. या स्त्रीला त्याच्यापासून सहा अपत्ये झाली. सुरुवातीची काही दशके या अपत्यांना नाकारलं गेलं होतं ही वस्तुस्थिती होती. मात्र नंतरच्या पिढ्यात जैवशास्त्रीय आधारांच्या बळावर सॅली हेमिंग्जला झालेल्या अपत्यांचे पितृत्व थॉमस जेफरसनकडेच होते हे स्वीकारावे लागले. अर्थात उदारमतवादी आणि खुल्या विचारसरणीच्या कट्टर समर्थक असणाऱ्या अमेरिकन जनतेने खळखळ न करता हे सत्य स्वीकारले. मागील वर्षी विख्यात अमेरिकन छायाचित्रकार ड्र्यू गार्डनर यांनी काही ख्यातनाम व्यक्तींच्या स्मृतीघटकासह त्यांच्या नव्या पिढीची तसबीर पेश केली होती. याच शृंखलेतले एक पोर्ट्रेट होते थॉमस जेफरसनचे आणि त्याच्या सहाव्या पिढीतील नातवाचे. शेनॉन लेनिअर हा जेफरसनचा सहाव्या पिढीतला बंदा. त्याची वंशवेल ही सॅली हेमिंग्जच्या शृंखलेतील होती. थॉमस जेफरसनसारखी वेशभूषा केलेल्या शेनॉनचे पोर्ट्रेट खूप काही चर्चिले गेले नव्हते. काही निवडक पोर्टल्सवर याविषयी अल्पकालीन चर्चा झाली आणि विषय मागेही पडला. मात्र या आठवड्यातील टॉप ट्रेंडींग फोटोजमध्ये ही तसबीर आली तेंव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. याला पार्श्वभूमी होती ब्रिटिश राजपुत्र हॅरी आणि त्याची पत्नी सम्राज्ञी मेगन मार्कल यांनी केलेल्या खळबळजनक विधानांची. त्यामुळेच हा पोर्ट्रेटवजा फोटो इतका चर्चेत आला की त्याखालच्या कमेंट्सवरून वादविवाद झडू लागले. यात नेटिव्ह अमेरिकन विचारांच्या पुरस्कर्त्या लोकांनी कोणत्याही देशाचे प्रवासी वा परकीय नागरीक आमचा हिस्सा असूच शकत नाही या ट्रम्पवादी भूमिकेचा पुनरुच्चार केला तर उदारमतवादी विचारांच्या पुरस्कर्त्यांनी हीच खरी अमेरिकेची ओळख असल्याचं म्हटलं. कारण थॉमस जेफरसन श्वेतवर्णीय होते, सॅली हेमिंग्ज मिश्रवर्णीय होती तर शेनॉन लेनिअर हा देखील मिश्रवर्णीय शरीर लक्षणे असणारा आहे. त्याचं मूळ दक्षिण अमेरिकन आणि आफ्रिकन असं असल्याने त्यात समावेशकता दिसते. श्वेतवर्णीय अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्याने ब्रिटिश वसाहतवादाचे जोखड फेकून दिले होते त्याच्या नव्या पिढीचं तुलनात्मक वैचारिक उदात्तीकरण करण्यासाठी ब्रिटिश राजघराण्यातील राजपुत्र आणि स्नुषा यांचं सनसनाटी विधान पूरक ठरलं हे विशेष होय.
रविवार, १४ मार्च, २०२१
बॉक्स ऑफिसची देवी - जय संतोषी माँ
शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१
गोष्ट एका मास्तरांची ...
गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१
न झुकलेला माणूस..
रविवार, १४ फेब्रुवारी, २०२१
पौष...
चैत्रपालवी असते. वैशाखवणवा असतो. ज्येष्ठाचं व्रत असतं.
आषाढाला पर्जन्योत्सुकतेचा मान लाभलाय.
श्रावणमासाची हिरवाई जितकी ख्यातनाम आहे तितकेच धार्मिक महत्वही आहे.
भाद्रपदातला गणशोत्सव शहरांचा चेहरा झालाय तर भादवा गावकुसासाठी अजूनही महत्वाचा आहे.
अश्विनची नवरात्र विख्यात आहे. कार्तिक दिवाळीमुळे अमर आहे.
मार्गशीर्षातली व्रत वैकल्ये अजूनही भाव खाऊन आहेत.
माघी वारीचं महात्म्य वाढतंच आहे.
शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१
मौनातलं तुफान...
दोघे कधी भेटत नाहीत की बोलत नाहीत
तरीही त्यांच्यात असतं एक नातं, बेशक त्याला नाव मात्र कुठलं नसतं
भेटलेच जरी दोघे कधी तरी नजरेस नजर देत नाहीत
खरेतर दोघांच्या नजरा शोधत असतात परस्परांना
समोर येताच मात्र डोळ्यांना डोळे त्यांचे भिडत नाहीत
एकमेकाचे लक्ष नसताना चोरून मात्र पाहत असतात
दोघांपैकी जो आधी निघून जातो त्याचे डोळे असतात पाणावलेले
मागे थांबलेला डोळे भरून पाहतो त्या पाठमोऱ्या देहाकृतीकडे
त्याला जाणून घ्यायचं असतं, तिच्या ख्यालीखुशालीविषयी
तिला असते जिज्ञासा त्याच्याविषयी, त्याच्या संसाराविषयी
दोघेही विचारत नाहीत परस्परांना. मात्र
मात्र चौकशी आस्थेने करतात इतरेजनांपाशी !
बुधवार, ३ फेब्रुवारी, २०२१
दिव्या चेकुदुराई - जिथे मृत्यूचाही थरकाप उडाला
जून २०२० मध्ये आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणममध्ये तिची हत्या झाली. जगभरातील लॉकडाउनमधला सर्वात ह्रदयद्रावक मर्डर असं तिच्या मृत्यूचं वर्णन करता येईल.
मंगळवार, २ फेब्रुवारी, २०२१
नागम्मा @रेड लाईट डायरीज - लॉकडाउन स्टोरीज
अर्थ जगण्याचा..
गालफाडे आत गेलेला, पांढुरक्या दाढीचे खुंट वाढलेला, खोबणीत खोल गेलेल्या निस्तेज डोळयांच्या कडा पुसत ओठावर हसू आणत जिंदादिल म्हातारा
आपल्या तळहातावरची मखमल नातवाच्या गालावर पसरवत उत्तरला, "उद्याच्याला याचं की ! आभाळापल्याड तुजी आज्जी ऱ्हाती. माजी विचारपूस करायला रोज ती सूर्याला पाठवती. जोवर ती सूर्याला धाडून लावती तोवर आपण येत ऱ्हायचं आणि बांधावर बसून त्याला निरखत ऱ्हायचं. "
आज्जा काय सांगतोय यातलं नातवाला काहीच कळलं नाही. कंबरेत वाकलेल्या आज्ज्याला ते पोर घट्ट करकचून बिलगलं. खुललेल्या आज्ज्यानं त्याचा गालगुच्चा घेतला. आस्ते कदम दोघंही निघाले तेंव्हा त्यांच्या फिकट सावल्या पाहून दिगंताला टेकलेल्या सूर्याला गलबलून आलं !
शोधलं तर हरेक प्रश्नाचं उत्तर सापडतं.
शनिवार, २३ जानेवारी, २०२१
साखरीबाई @रेड लाईट डायरीज
शनिवार, १४ नोव्हेंबर, २०२०
केरसुणी...
गावाकडं आजच्या दिवशी केरसुणीचीही साग्रसंगीत पूजा होते.
सोमवार, २ नोव्हेंबर, २०२०
मुक्या लेकीचं दुःख...
त्या कोवळ्या बारक्या जीवाच्या मानेला हिसका बसू नये म्हणून कासरा ढिला बांधला होता.
रात्र जसजशी चढत गेली तसा पाण्याचा जोर वाढत गेला. पाण्याचा लोंढा इतका वाढत गेला की कालवडीच्या गळ्यातला कासरा निघून आला, गळ्याची ढिली गाठ गळून पडली.
पाण्याच्या जोरदार प्रवाहात कालवड वाहून गेली.
रविवार, १८ ऑक्टोबर, २०२०
नवरंग 2020 - रेड लाईट डायरीज
तुमची सुटका तुम्हालाच करून घ्यायची आहे, तुमच्यातल्या दुर्गेला बळ लाभो...
आदिशक्ती उत्सवाचा अर्थ असाही जाणून घेऊया..
In her teen age pregnant Kamini fled with an escort agent, later she was forced for prostitution. She was blackmailed by brothel owner making theat to her little angel daughter Meena. Three decades passed. Now Kamini is nomore, but Meena is still in the sink of slavery by means of skin currency. With help of Darbar ngo She will likely to return in this December 20. This is her own fight, and she faught it very well.
I pray for my all sisters and mothers for their freedom and rights..
amen..
_________________________________________
सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२०
चित्रीचं वासरू
सात वर्षानंतर ती पहिल्यांदा व्याली होती.
बादलीभर वार संगं घेऊन डोळे मिटलेला तो मुका जीव बाहेर पडला.
मातीत पडलेल्या निष्प्राण जीवाच्या कलेवराला
चित्री खूप वेळ चाटत होती.
लोळागोळा झालेला तो जीव थिजून होता.
चित्रीने त्याला डोक्यानं ढोसून बघितलं, पण काहीच प्रतिसाद नव्हता.
वेतामूळं गर्भगळीत झालेली चित्री आता पुरती दमली.
पुढच्या पायावर बसत तिनं मोठ्यानं त्याला हुंगायला सुरुवात केली.
तिच्या तोंडातून शुभ्र फेसाच्या तारा बाहेर पडत होत्या.
जिभ आत ओढत होती
हुंकार वेगानं होत होते..
गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२०
प्रेमचंदांची फाटकी चप्पल...
सर्रास आपली फाटलेली चप्पल कुणाच्या नजरेस पडू नये म्हणून बऱ्याचदा छुपा आटापिटा केला जातो.
मात्र एखाद्या विख्यात व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत एक रमणीय आठवण म्हणून फोटो काढून घेताना फाटकी पादत्राणे घातली असतील तर त्यातून आपण कोणते अर्थ लावू शकतो ?
ख्यातनाम साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांनी पत्नी शिवरानीदेवीसोबत काढलेला एक फोटो खूप प्रसिद्ध आहे.
या फोटोत मुन्शीजींच्या एका पायातला बूट फाटलेला आहे आणि त्यातून त्यांच्या पायाची करंगुळी बाहेर आलेली स्पष्ट दिसते.
वरवर पाहता ही एक सामान्य बाब वाटेल. मात्र याचे अन्वयार्थ काय लावता येतील हे महत्वाचं ठरतं.
हिंदीतले जानेमाने लेखक हरिशंकर परसाई यांनी यावर एक लेख लिहिला होता ज्यावर हिंदी साहित्य जगतात कधी काळी मोठा उहापोह झाला होता. हा लेख मराठीत अनुवादित करून इथे डकवावा असे वाटत होते मात्र परसाईजींच्या प्रवाही आणि अमीट गोडीच्या हिंदीचा आस्वाद घेता यावा म्हणून हिंदी लेख जसाच्या तसा देतो आहे.
बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०
गावाकडच्या पाऊसम्हणी...
याच शब्दांत सांगायचं झालं तर तरणा पाऊस पडून गेलाय,
त्याच्या पाठोपाठ म्हाताराही येऊन जाईल,
नंतर सासूचा पाऊस पडेल मग सुनेचा पाऊस पडेल...
हे असं का म्हटलं गेलंय याचे बहुतेक निष्कर्ष खुमासदार आहेत.
पुनर्वसू म्हणजे तरुण, पुष्य म्हणजे म्हातारा, मघा म्हणजे सासू आणि पूर्वा म्हणजे सून ही नावं अनेक शतकांपासून गांवगाड्यात लागू आहेत.
मृग आणि आर्द्रा या सुरुवातीच्या दोन नक्षत्रात जो पाऊस पडतो त्या दरम्यान खरीपाचा पेरा केला की उत्तम पीक हाती येतं ही पूर्वापार धारणा होय,
आताशा असं घडताना दिसत नाही ही गोष्ट अलाहिदा.
मृग आणि आर्द्रा ही पर्जन्याची बालरुपे समजली जातात, याच काळात मातीतल्या बीजांना अकुंरांचे रूप बहाल होते. हे कोवळे अंकुर म्हणजे पर्जन्याची बाल्यावस्था ही कल्पनाच मुळात अत्यंत रम्य आहे!
मग या अकुंरांवर ज्याची प्रीत बहरते तो पुनर्वसूचा पाऊस!
म्हणून तो तरणा पाऊस!
आणि पीक जोमात आल्यानंतर त्याचा निरोप घेण्यासाठी येणारा तो म्हातारा पाऊस, म्हणजेच पुष्याचा पाऊस!
किती भारी आहेत ही नावे! अगदी नितांत चपखल!
रविवार, १३ सप्टेंबर, २०२०
रविवारची दुपार आणि तू ...
सुट्टीच्या दिवशीची दुपार जरा खासच असते
अगदी तुझ्यासारखी
बेफिकीर, बेजबाबदार, मुक्त !
मी देखील स्वतःच्या पद्धतीने ती व्यतित करतो.
पण का कुणास ठाऊक
पण मागच्या काही दिवसापासून हा फुरसतीचा वेळ स्वतःसोबत घालवण्याचा प्रयत्न जरी केला
तरी कुठल्या तरी ज्ञात अज्ञात घटिकातून मोकळं होत तू माझ्यासमोर येऊन बसतेस.
माझ्या हातातलं पुस्तक मिटवतेस,
आणि आपले बहारदार किस्से सुनावत बसतेस.
डिसेंबरमधली ती गुलाबी थंडी,
पावसाचे ते टपोरे थेंब,
आणि सुट्टीची ती अमीट दुपार !
तो किस्सा जो तू कधी काळी जगली होतीस
माझ्या सोबत.
कित्येक आठवडे झालेत तू याचीच पुन्हा उजळणी करते आहेस.
आणि तोवर मला जाणवतही नाही की
काही उत्कट प्रेमळ क्षणांच्या बेड्यात मी कायमचा कैद झालोय !
- समीर गायकवाड
ही कविता विख्यात तरुण कवयित्री गीतांजली रॉय यांच्या 'इतवार की दोपहर' या रचनेवर आधारित आहे.
शनिवार, १२ सप्टेंबर, २०२०
माधव कोंडविलकर - माझ्या काटल्या आहेत वाटा उदरातच असताना आईच्या...
माधव कोंडविलकरांना पहिल्यांदा वाचलं तेंव्हा त्यांचा एक शब्द डोक्यात खिळा ठोकावा तसा रुतून बसलेला. 'बोंदरं' हा तो शब्द. फाटायच्या बेतात आलेल्या जुन्या पोत्याच्या चवाळयांचे तुकडे, चिंधड्या उडालेल्या घोंगडीचे तुकडे आणि मायमावशीच्या जुनेर साड्याचे तुकडे एकत्र करून दाभणीने विणलेलं पांघरूण म्हणजे बोंदरं. कोंडविलकर चांभार जातीत जन्माला आलेले. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील मौजे देवाचे गोठणे हे त्यांचं जन्मगाव. सोगमवाडी या नावानेही हे गाव परिचित आहे. कोकणातील खोत आणि कुळवाडी यांच्याकडून दलित, कष्टकऱ्यांचं सर्रास शोषण केलं जायचं. कोंडविलकर याला अपवाद नव्हते. गद्य वाङ्मयावर त्यांनी अधिक लक्ष दिलं. त्यामुळे त्यांच्या पद्य रचनांना फारशी ओळख लाभली नाही. तरीही ही कविता नेहमीच खुणावत राहिली.