गावाकडे एक म्हण आहे की 'दिसभर इन्जी आन रात्री दाढी पिंन्जी' ! टुकार मोकार माणसाचं इतकं सार्थ वर्णन कुणी केलं नसेल. दाढीवरची कथाधारित हिंदी म्हण तर फार प्रसिद्ध आहे. शालेय जीवनात आपण ती अभ्यासली आहे. अकबराची अंगठी चोरीला गेल्यानंतर त्याच्या स्नानगृहाबाहेरील पाच दाढीधारी सैनिकांवर बिरबलाचा संशय असतो. त्यातला चोर शोधण्यासाठी बिरबल क्लृप्ती लढवतो आणि सांगतो की आलमारीने साक्ष दिलीय की ज्याने अंगठी चोरलीय त्याच्या दाढीत गवताची काडी आहे. हे ऐकताच चोरी केलेला सैनिक नकळत आपल्या दाढीवरून हात फिरवतो आणि बिरबल त्याला अटक करण्याचे फर्मान काढतो. दाढीनेही चोरी पकडता येते याचे हे उदाहरण होय. लबाड राजकारण्यांना चपखल बसणारी 'आत्याबाईला मिशा आल्या कुणी पाहिल्या' अशा अर्थाचीही म्हण आपल्याकडे आहे. खेरीज 'केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा' हा सुविचार आपण अनेकदा वाचलेला आहे. मात्र आताचा काळ या सुविचाराचा नसून 'एकाची जळते दाढी दुसरा तीवर पेटवतो काडी' या म्हणीचा आहे ! असो. आता दाढीचं काहींना अप्रूप वाटत असेल मात्र लोकांनी 'दाढीला कांदे बांधले' की यातली मेख त्यांना कळेल. आजच्या काळात 'ओटी पसरोनि धरितो मी दाढी । नरकांतुनि येकदां काढी' अशी लोकांची अवस्था झाली आहे. तर सरकारे मात्र 'वर दाढी धरून खाली टाच रागडण्यात' मग्न आहेत. विश्व मराठी कोशातली दाढीची माहिती तर थक्क करते.
गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०
दाढीपुराण...
गावाकडे एक म्हण आहे की 'दिसभर इन्जी आन रात्री दाढी पिंन्जी' ! टुकार मोकार माणसाचं इतकं सार्थ वर्णन कुणी केलं नसेल. दाढीवरची कथाधारित हिंदी म्हण तर फार प्रसिद्ध आहे. शालेय जीवनात आपण ती अभ्यासली आहे. अकबराची अंगठी चोरीला गेल्यानंतर त्याच्या स्नानगृहाबाहेरील पाच दाढीधारी सैनिकांवर बिरबलाचा संशय असतो. त्यातला चोर शोधण्यासाठी बिरबल क्लृप्ती लढवतो आणि सांगतो की आलमारीने साक्ष दिलीय की ज्याने अंगठी चोरलीय त्याच्या दाढीत गवताची काडी आहे. हे ऐकताच चोरी केलेला सैनिक नकळत आपल्या दाढीवरून हात फिरवतो आणि बिरबल त्याला अटक करण्याचे फर्मान काढतो. दाढीनेही चोरी पकडता येते याचे हे उदाहरण होय. लबाड राजकारण्यांना चपखल बसणारी 'आत्याबाईला मिशा आल्या कुणी पाहिल्या' अशा अर्थाचीही म्हण आपल्याकडे आहे. खेरीज 'केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा' हा सुविचार आपण अनेकदा वाचलेला आहे. मात्र आताचा काळ या सुविचाराचा नसून 'एकाची जळते दाढी दुसरा तीवर पेटवतो काडी' या म्हणीचा आहे ! असो. आता दाढीचं काहींना अप्रूप वाटत असेल मात्र लोकांनी 'दाढीला कांदे बांधले' की यातली मेख त्यांना कळेल. आजच्या काळात 'ओटी पसरोनि धरितो मी दाढी । नरकांतुनि येकदां काढी' अशी लोकांची अवस्था झाली आहे. तर सरकारे मात्र 'वर दाढी धरून खाली टाच रागडण्यात' मग्न आहेत. विश्व मराठी कोशातली दाढीची माहिती तर थक्क करते.
दाभोळकर, सुशांतसिंह आणि न्याय...
सध्या जगभरातल्या राज्यकर्त्यांची आणि त्यांच्या सरकारांची वैचारिकता पाहू जाता अर्धवट सोफिस्टांचं जोरदार पुनरागमन होताना दिसतं. फॅसिझमच्याही आधीचा हा जीवनविचार जाणून घेण्यासाठी इसवीसनपूर्व कालखंडात जावे लागेल.
सोफिस्टपासून विस्तारित झालेल्या सोफेस्टिकेटेड या शब्दाचा आपण सर्रास उल्लेख करत असतो.
सोफेस्टिकेटेडचा आपला प्रचलित अर्थ 'सुसंस्कृत सवयी व अभिरुची असलेला' असा आहे.
सोफिस्ट म्हणजे कोण ? तर याचे उत्तर जाणताच आपल्या अवतीभवती अशी अगणित माणसं आढळतील.
शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२०
मुन्नाभाई एमबीबीएस - प्रकाशाची अदृश्य ओंजळ..
आमच्या सोलापूरमधील मीना चित्रपटगृहात 2003 साली डिसेंबरमध्ये लागला होता ‘मुन्नाभाई एमबीबीएस’. विधू विनोद चोपडा लिखित निर्मित मुन्नाभाईचे दिग्दर्शन केले होते राजकुमार हिरानीने. संजय दत्त, अर्षद वारसी, ग्रेसी सिंह, बोम्मन इराणी, जिमी शेरगिल, सुनील दत्त आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या मुख्य भूमिका त्यात होत्या. खेड्यातील एका सेवाभावी दांपत्याचा शहरात राहणारा तरुण मुलगा मुन्नाभाई हा अपहरण, खंडणी अशा अवैध धंद्याचा बादशहा असतो, त्याच्या साथीला सर्किट हा त्याचा मित्र अख्ख्या टोळीसह काम करतो. आईवडील भेटीस यायचे कळताच ही मंडळी मुन्नाभाईच्या ठिय्याचं रुपांतर इस्पितळात करत असतात, मुन्ना डॉक्टर आणि बाकीची मंडळी रुग्ण असल्याची बतावणी करत असतात. पुढे जाऊन मुन्नाला खरेच वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. त्याच्या बालमैत्रिणीवरील प्रेमापोटी तो तिथे रमतो. तिथल्या बऱ्यावाईट गोष्टींवर आपल्या स्टाईलने व्यक्त होतो. अखेरीस त्याचे बिंग उघडे पडते मात्र त्याच्यातला माणूस त्याच्या वाईटपणावर मात करतो जो सर्वांना भावतो अशी रम्य कथा यात होती. ‘मुन्नाभाई’ देशभरात सुपरहिट झाला तसा सोलापुरातही झाला. मात्र इथे त्यावर पब्लिकने अंमळ जास्त जीव लावला कारण त्यातलं वातावरण, त्यातली माणसं, त्यातलं खुलेपण, जिंदादिल तरुणाई या शहराशी मेळ खाणारी होती. सोलापूरची जडणघडणच अशी झालीय की इतिहासाच्या कोणत्याही टप्प्यावर जाऊन पाहिलं तर इथे निवांतपणा अधिक आढळतो, फुरसत असलेली रिकामटेकडी मनमिळाऊ माणसं खंडीभर दिसतात. इथल्या बोलीत एक तऱ्हेचा रफटफ अंदाज आहे आणि इथली तरुणाई काहीशी बेभान नि आव्हानात्मक वाटते, इथे एक प्रकारचा संथपणा आहे जो माणसाला एकमेकाशी व्यक्त व्हायला भाग पाडतो. श्रमिकापासून ते गर्भश्रीमंतापर्यंतचे लोक इथे असले तरी एक सोलापुरी बेपर्वाई आणि कमालीची आपुलकी इथे सर्रास जाणवते. ‘मुन्नाभाई’मध्ये हे घटक ठासून भरलेले असल्याने इथल्या लोकांनी त्यातल्या पात्रात स्वतःला शोधले तर त्यात नवल ते काय ? असो. फिल्मी मुन्नाभाई संजयदत्तच्या असली आयुष्यातला एक योगायोग इथे सांगावा वाटतो.
बुधवार, १२ ऑगस्ट, २०२०
कृष्णशोध...
बुधवार, ५ ऑगस्ट, २०२०
बैरुत स्फोटाच्या निमित्ताने...
शुक्रवार, २४ जुलै, २०२०
रेड लाईट डायरीज - भवताल
एका आर्टिकलमध्ये वाचण्यात आलेलं की मुलं किती छान संस्कारी पद्धतीने वागत आहेत, घरातल्या सर्व व्यक्तींची त्यांना चिंता आहे वगैरे. वाचून अनेकांनी मुलांचं कौतुक केलेलं, काहींनी पालकांचेही अभिनंदन केलेलं. भवतालच्या वातावरणाचा आणि पालकांच्या वर्तनाचा प्रभाव मुलांवर पडतो. लहान मुलं खूप अनुकरणशील असतात. यावरून मला ताहिरा आठवली. तिची चिमुरडी पोर आयेशा आठवली. ताहिरा धंदा करायची. कामाठीपुऱ्यातल्या तेराव्या लेनमध्ये यमुनाबाईच्या कुंटणखान्यात तीन बाय सहाच्या फळकुटात राहायची. 2007 ची घटना असेल. यमुनाचा कुंटणखाना दुसऱ्या मजल्यावर होता. तळमजल्यावर अरुण परदेशीचा दारू धंदा चाले. दिलीप पांडे नावाच्या इसमाची ती इमारत होती. त्यानं सुनील मथाईला ती किरायाने दिलेली. मथाईने तिथे धंदा उघडलेला. विकास मिश्रा याने तिथे युपीमधून मुली आणलेल्या. ( हा विकास मिश्रा पुणे पोलिसांनी 2012 मध्ये गजाआड केला, पुढे जामीनवर सुटल्यानंतर त्यानं नागपूरचं गंगाजमुना गाठलं) मथाईच्या अख्ख्या इमारतीची पूर्ण कळा गेलेली होती. संपूर्ण इमारतीत जवळपास चारशे बायकापोरी होत्या. सगळ्या युपीबिहारच्या. यांच्यातलीच एक होती ताहिरा. 1992 मध्ये ताहिराला बाईपणाचे भोग कळले. देहातली एक भेग काळजाच्या चिरफळ्या कशा उडवते ते तिने अनुभवलेलं.
सोमवार, ६ जुलै, २०२०
लॉकडाऊन स्टोरीज - रामपुकार पंडीतची अनसुनी पुकार
'शोले'मध्ये एक सीन आहे ज्यात कोवळ्या अहमदला (सचिन) गब्बरने हालहाल करून ठार मारून त्याचं प्रेत घोडयावर लादून रामगढला पाठवून दिलेलं असतं. अहमदचं कलेवर पाहून गाव थिजून जातं. संतापाची लाट येते आणि सर्वांचा राग जय वीरूवर उफाळून येतो. ठाकूर बलदेवसिंग मध्ये पडतो तरी गावकरी ऐकत नाहीत. ते म्हणतात की आम्ही इतकं दुःख सहन करू शकत नाही, या दुःखाचं कारण असणाऱ्या जय वीरूला गब्बरच्या हवाली केलंच पाहिजे. इतका वेळ आपल्या मुलाच्या मृतदेहावरून हात फिरवणारा म्हातारा रहीमचाचा कळवळून उठतो आणि दुःखाचा आवेग आवरत म्हणतो, "जानते हो दुनिया का सबसे बडा दुख क्या होता है ?"
रविवार, ५ जुलै, २०२०
बेंजामिन मोलॉईस - गीत विद्रोहाचे
करोनाबाधेतील एक दुजे के लिये...
कर्टीस आणि बेट्टी टारप्ले |
अमेरिकेत कोरोनाने प्रचंड हाहाकार माजवलेला असल्याच्या बातम्या आपण सर्वचजण पाहतो आहोत. संपूर्ण अमेरिका या विषाणूच्या साथीने स्तब्ध झालीय. त्याची एक गहिरी दास्तान या इस्पितळात लिहिली गेलीय. त्याची ही अद्भुत चैतन्यमय हकिकत. १८ जून २०२० ची ही घटना आहे. अमेरिकेच्या टेक्सास प्रांतामधील फोर्टवर्थ भागातलं टॆक्सास हेल्थ हॅरिस मेथॉडिस्ट इस्पितळ. पहाटेपासूनच कर्टीस टारप्ले यांचा श्वास मंदावत चालला होता. त्यांची पल्स हरवत होती. डोळे अर्धमिटले झाले होते. गात्रे शिथिल होत होती. ओठ थरथरत होते, त्यांना काही तरी सांगायचं होतं. त्यांच्या सेवेत असलेल्या परिचारिका ब्लेक थ्रोन यांनी ते ओळखलं होतं. कर्टीससोबत त्यांची गाढ दोस्ती जी झाली होती.
फिर तेरी कहानी याद आई ...
तो एक प्रतिभाशाली कर्तृत्ववान विवाहित पुरुष, एका बेसावध क्षणी एका कमालीच्या देखण्या अप्सरेचं त्याच्यावर मन जडतं. तो तिला टाळू पाहतो पण तिच्यापासून दूर जाऊ शकत नाही आणि तिला जवळही करू शकत नाही. त्याचा संसार उध्वस्त व्हायची वेळ येते. त्याची पत्नी उन्मळून जाते, त्यांचं आयुष्य विस्कटतं. पण तो पत्नीशी सर्व गोष्टी शेअर करतो. ती ही त्याच्यावर विश्वास ठेवते. तुझे मन माझेच असेल, देह कोणाचाही असू शकतो असं त्याला सांगते. मात्र तरीही त्यांच्यात गैरसमज होत जातात. अखेर त्यांचा घटस्फोट होतो. तोवर बराच उशीर झालेला असतो. ती शापित अप्सरा तोवर खचून गेलेली असते. ती अंधाऱ्या विजनवासाच्या एकांती गुहेत जाते. इकडे तो दुसरे लग्न करतो तेही एका मनस्वी समजूतदार स्त्रीशी !
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)