शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०१९

बदनाम गल्ल्यांचा 'अक्षर फरिश्ता' - मंटो !



सआदत हसन मंटो यांच्या जीवनावरचा नवाजुद्दिन सिद्दिकी अभिनित 'मंटो' हा चित्रपट २१ सप्टेबर रोजी रिलीज झालाय. नंदिता दास यांनी त्याचं दिग्दर्शन केलंय. मंटोच्या कथांवर आधारलेले 'काली सलवार', 'मिर्जा- गालिब', 'शिकारी', 'बदनाम', 'अपनीनगरियां' हे सिनेमे येऊन गेलेत. शिवाय पाकिस्तानमध्येच त्यांच्यावर जिओ फिल्म्सने बनवलेला याच नावाचा बायोपिक येऊन गेलाय. या चित्रपटात मंटोच्या काही प्रसिद्ध कथा समोर येतात, कथेतली पात्रे येतात, मंटोच्या आयुष्यातील काही महत्वाच्याघटनांचा पट रंगत असताना या कथातील पात्रे मध्ये येतात त्यामुळे रसभंग होतो. मंटो दाखवायचे म्हणजे त्यांच्या आयुष्यातल्या घटनांचा पट उलगडताना त्यांच्या कथांवर भाष्य होणं अनिवार्यच आहे. मात्र चित्रपट संपल्यानंतर मंटो जितके लक्षात राहतात तितक्याच त्यांच्या कथाही लक्षात राहतात. मात्र एकूण परिणाम साधण्यात चित्रपट कमी पडतो. असं का होतं ? हा या चित्रपटाच्या रसग्रहणाचा भाग होऊ शकतो. इस्मत चुगताई कोण होत्या, मंटोच्या जीवनात वेश्यांचं काय स्थान होतं आणि मुख्य म्हणजे मंटोनी तत्कालीन साहित्याच्या तथाकथित मापदंडांना सुरुंग लावत कोणतं साहित्य लिहिलं होतं हे विस्ताराने समोर न आल्याने ज्यांना या विषयी काहीच माहिती नाही वा अल्पशी माहिती आहे त्यांच्या पदरी फारसं काही पडत नाही. मंटो समजून घेण्याआधी त्यांचं साहित्य समजून घ्यायला हवं मग ते पानागणिक उलगडत जातात !

शनिवार, २६ ऑक्टोबर, २०१९

रेड लाईट डायरीज - नाळेचं कर्ज ...



सोबतचा जिन्याचा फोटो श्रेया कालराने काढला आहे. फोटोबद्दल जाणून घेण्याआधी हे वाचलं तर संदर्भ लागतील..
श्रेया फोटोस्टोरीमेकर आहे. भारतीच्या केसमुळे तिची माहिती मिळालेली.
तामिळनाडूमधल्या ईरोडे या शहरातील गांधीनगर या स्लममधील भारतीने स्वेच्छेने वेश्याव्यवसाय स्वीकारत मुंबई गाठली होती त्याला दशकं उलटून गेलीत. कामाठीपुऱ्याची एक खासियत आहे, इथे भाषेगणिक वर्गीकरण असलेल्या इमारती आहेत. कानडी, तेलुगू, उडिया, आसामी, मल्याळी, मराठी, हिंदी अशा बहुतेक सर्व भाषेच्या कन्या इथं राहतात. एके रात्री ईरोडेमधून मुंबईत आलेल्या एका व्यक्तीने भारतीला ओळखलं. खातरजमा करून तिची माहिती तिच्या घरी कळवली. काही दिवसात तिला घेऊन जाण्यासाठी तिच्या घरची मंडळी कामाठीपुऱ्यात आली. ती ऐकत नाही हे लक्षात येताच त्यांनी तिला झोडपायला सुरुवात केली. तिला मारहाण होऊ लागल्यावर बाकीच्या बायका मध्ये पडल्या आणि त्यांनी तिच्या नातलगांना पिटाळून लावलं.

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१९

आत्महत्त्या केलेल्या आईच्या शोधात...



आईच्या आयुष्यात डोकावता येतं का ?
आई हयात नसताना तिच्याजागी स्वतःला ठेवून तिचं दुःख आणि तिच्या इच्छा आकांक्षांचा चुराडा मांडता येईल का ? आईने भोगलेली दुःखे तिला सहन करावा लागलेला दुस्वास, तिची आयुष्यभराची परवड काटेकोर तशीच लिहिता येईल का ? आईच्या इच्छा वासना ; तिच्या भावनांची गळचेपी, न गवसलेलं इप्सित हे सगळं मांडता येईल का ?

शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०१९

सौंदर्यवती दुर्गांची कर्तृत्ववान गाथा...


आजचा रंग हिरवा... 
ही पोस्ट वाचण्याआधी तुमच्याकडून एक प्रॉमिस हवंय, द्याल का प्रॉमिस ? 
खूप काही मागत नाही मी. फक्त तुमची छोटीशी साथ हवीय, मला खात्री आहे पोस्टच्या अखेरीस तुम्ही होकार द्याल. ताजमहाल पाहायला जाल तेंव्हा माझी पोस्ट विसरू नका एव्हढी विनंती लक्षात असू द्यात. 
फोटोत दिसणाऱ्या तरुणीचं नाव आहे शबनम, तिच्यावर ऍसिड हल्ला झाला होता. 

शबनमवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला वाटलं होतं की 
एका प्रसन्न क्षणी शबनम 
इतक्या भयानक ऍसिड हल्ल्यानंतर शबनम मरून जाईल किंवा विद्रुपतेच्या भीतीने घरात बसून राहील, तिच्या आयुष्याची पुरती धूळधाण होईल याची त्याला खात्री होती. हल्ला झाल्याला आता काही वर्षे उलटून गेलीत पण त्या दिवसानंतर शबनमच्या आयुष्यात काहीच भयप्रद वा दुःखद घडलेलं नाही.

गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१९

तुमच्यात मी दुर्गेला पाहतो... - 'रेड लाईट डायरीज'मधल्या दुर्गा...



धवल भगवा ... २९-३०/०९/२०१९
सोशल मीडियाच्या आभासी जगातल्या नटलेल्या, सजलेल्या आणि कथित तृप्तीच्या रंगात न्हालेल्या स्त्रियांचे नवरात्रीच्या नवरंगातले फोटो दिसून येतात. या फोटोत आणि या स्त्रियांत खऱ्या भारताचे प्रतिबिंब दिसते का ? या प्रश्नावर माझे उत्तर नाही असे आहे. असो...
नवरात्रीच्या कथित रंगशृंखलेत आजचा रंग केशरी आहे आणि उद्याचा रंग शुभ्रधवल आहे,
हे दोन्ही रंग या एकाच फोटोत आहेत.
फोटोतल्या सगळ्याच जणी देवदासी आहेत...
परंपरा, प्रथा हे आपले दाखवायचे दात आहेत, खरे दात तर मनमुराद शोषणाचे आहेत.

टिप - माझे मत अनेकांना अमान्य असू शकते, त्यात वावगं काही नाही. कारण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ! .. असो .. मुळात नवरात्रीच्या नऊ रंगाच्या साड्यांची कल्पना हीच बाजारू दृष्टीकोनातून माथी मारली गेलीय परंतु त्या फोल कल्पनेने आता रूढीचे स्थान मिळवले आहे ही बाब भूषणावह खचितच नाही...

________________________________________




सोमवार, ९ सप्टेंबर, २०१९

गडकोटांच्या संवर्धनासाठी लक्षावधींचं आर्थिक नियोजन करणारे शिवराय...


ब्लॉगपोस्ट नीट वाचल्याशिवाय कमेंट करू नयेत.

किल्ल्यांनो, गडकोटांनो तुम्ही तेंव्हाच बेचिराख व्हायला हवं होतं कारण ... कारण... तुमचा पोशिंदा आता हयात नाहीये..     
त्यांचे पोशिंदे असलेले शिवबाराजे आपल्या किल्ल्यांची किंमत जाणून होते. किल्ल्यांवर त्यांनी जीवापाड प्रेम केले होते. .
शिवराय म्हणजे गडकोट, स्वराज्य म्हणजे गडकोट आणि गडकोट म्हणजे रयत !
हे समीकरण इतिहासाने आपल्या सर्वांच्या मस्तकात असं भिनवलंय की गडकोट हा शब्द उच्चारताच शिवराय आठवतात, झुंजार रणमर्द मावळे आठवतात ! लढाऊ मराठ्यांचा तेजस्वी इतिहास डोळ्यासमोर येतो.

मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१९

रेड लाईट डायरीज - लता, नट्टीबाई, गुरुदत्त आणि प्यासा ...


सोबतच्या फोटोत दिसणारी लता आहे. सात महिन्याची गर्भवती आहे, तरीही बाजारात उभी आहे. या अवस्थेत असताना तिच्याकडे येणार्‍या गिऱ्हाईकात सगळे आंबटशौकीन भरलेले असत. गर्भवती बाईसोबतची 'मजा' कशी असते याचा अधाशी हव्यास असणारे लोक तिच्याकडे येत. पन्नास ते पंधरा असा त्यांच्या वयाचा लंबक होता. असो..     
लताच्या फोटोचा आणि गुरुदत्तच्या 'प्यासा'चा घनिष्ट संबंध आहे. लताला पाहिल्याबरोबर गुरुदत्तचा 'प्यासा'मधला तो सीन आठवला होता कारण लता सात महिन्याची गरोदर असूनही चमडीबाजारमध्ये रात्रीच्या अंधारास आपल्या उरावर घेण्यासाठी नटून थटून तयार व्हायची. शक्य झालं असतं तर अंधारानेही तिच्याशी समागम केला असता का असा प्रश्न पडावा अशी स्थिती.

दुपारची जेवणं झाली की या बायका आपली दमलेली शरीरं घेऊन आपआपल्या पिंजऱ्यात झोपी जातात, अस्ताला जाणारा सूर्य यांच्यापर्यंत पोहोचत नाही पण तो अस्त पावल्याची खूण म्हणून अंधार तिथं येतो, पाठीवरचं कुबड सांभाळत पाय खुरडत खुरडत यावं तसा हा अंधार येतो. जिला जास्त गरज असते ती आपल्या देहाचं गाठोडं ढिलं करते आणि आरशापुढे बसते, लेप चढवत राहते. आरसा छद्मीपणे हसत राहतो, रात्रभर कपडे चढत राहतात उतरत राहतात. तयार होण्याआधी चरबटलेल्या केसांवर वेटोळं घालून बसलेला अधाशी मोगरा मध्यरात्री उलटून गेल्यावर पुरता चोळामोळा झालेला.

गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९

दुर्गापूजा आणि वेश्या - एक अनोखा संबंध ..

आतल्या खोलीचा मुख्य भाग ज्यात दुर्गा प्रतिष्ठापना केली गेली होती..

दुर्गापूजेचा वेश्यावस्तीशी संबंध आहे हे आपल्याला  ठाऊक नसते ! हे लिहिण्याचे कारण म्हणजे गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे. तुम्ही म्हणाल गणेशोत्सवाचा याच्याशी काय संबंध ?
आहे, संबंध आहे. खास करून पुण्या, मुंबईतील गणेशोत्सवाचा तर नक्कीच आहे. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ज्या परिसरात आहे तिथून वेश्यावस्ती असलेली बुधवार पेठ खूप जवळ आहे ! केवळ एव्हढ्या एका गोष्टीसाठी मी सुतावरून स्वर्ग गाठत नाहीये.....

गुरुवार, २५ जुलै, २०१९

जगणं ...

तुझ्या शहरात आता पाखरांचा किलबिलाट तर होतच नाही
खूपच नीरस संध्याकाळ असेल ना !
घराकडे निघालेली माणसं आणि तुडूंब भरलेले रस्ते असंच काहीतरी..
'ती डोळे मिटून म्हटली जाणारी रामरक्षा आता कानी पडत नाही'
अंगणातल्या तुझ्या तुळशी वृंदावनाने कालच निरोप धाडलाय !
घरात आता माणसं कमी असतात, ऐसपैस खोलीत भिंतींशी बोलतात म्हणे.
एकाच डायनिंग टेबलवरती तुम्ही भिन्न वेळांना जेवता
बिछान्यात शेजारीच झोपूनही एकमेकांना अनभिज्ञ असता...

बरं ते जाऊ दे.
मला एक सांग, शेवटची मिठी कधी मारलीस तू बाबांना
आईच्या मखमली गालांचा मुका कधी घेतला, आठवत नसेल नाही का ?
तुझ्या गार्डन एरियातलं हिरमुसलेलं झाड सांगत होतं,
"आता उरलोय मी सेल्फीपुरतं !"

अरे तू मैदानात खेळायचास ना ?
तळ्यातल्या पाण्यात पाय सोडून बसताना दंग होऊन जायचास
सोनेरी स्वप्नांच्या रुपेरी कथा सांगायचास
कुणी चिडवलं तरी खळखळून हसायचास
तेंव्हा तुझे मोत्यासारखे दात आकर्षित करायचे
आता यंत्रवत आखीव रेखीव वागत असतोस.

वाचनखुणा म्हणून पानं दुमडून ठेवून कैक पुस्तके तू एकाच वेळी वाचायचास,
आता पुस्तकांवरची धूळही तुझ्या नजरेस पडत नाही, खरंय का हे ?
मित्रा तू वाचणं विसरलेला नाहीस,
तू तर जगणंच विसरलास !

- समीर गायकवाड

मंगळवार, २५ जून, २०१९

झोएशा इराणी ते केतकी चितळे : ट्रोलच्या बळी


काळ मोठा महान असतो तो सर्वांना पुरून उरतो. तो कोणाला कसा सामोरा येईल हे कुणी सांगू शकत नाही. आपल्या कर्मानुरूप त्याचं प्रत्यंतर येत राहतं. आपण जे पेरतो तेच उगवत जातं हे सूत्र सर्वंकष लागू पडतं आणि ते ही सर्व बाबतीत ! अगदी सोशल मीडियावरच्या ट्रोलराक्षसाच्या बाबतीतही ! मुद्दा ट्रोलचा आहे म्हटल्यावर कालपरवा घडलेली एक महत्वाची घटना चक्षुसमोर येणं साहजिक आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी इन्स्टाग्रामवर टाकत असलेल्या पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांना भाजपच्या रणरागिणी असंही म्हटलं जातं. विरोधी पक्षाचा हल्ला आक्रमकपणे परतावून लावण्यात त्यांचं विशेष कसब आहे. सोशल मीडियावर त्या बऱ्यापैकी सक्रीय असतात. अनेक नेत्यांसोबत झडलेली ट्विटरवॉर्स विशेष स्मरणीय आहेत. फाडून काढणे किंवा धूळ चाटायला लावणे यासाठी त्यांची खासियत आहे. त्यांनी केलेल्या पोस्टच्या वा प्रत्युत्तराच्या समर्थनार्थ आयटी सेलची भली मोठी फौज काम करत असते. आयटीसेलचे नेटकरी म्हटले की त्यात ट्रोल आलेच. ट्रोल म्हटलं की जे जे वाईट आणि अश्लाघ्य आहे ते ते सर्व आलेच. पण 'छु' म्हणून दुसऱ्याच्या अंगावर सोडलेलं श्वान कधी कधी आपल्याही अंगावर येऊ शकतं. याचं प्रत्यंतर बऱ्याच जणांना येऊ लागलंय, राहिलेल्या उत्साही आणि उतलेल्या नेटकऱ्यांनाही येईलच. कारण ती निसर्ग नियमानुसारची बात आहे.