शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०१५

मामाचा सांगावा ...



माझ्या लाडक्या सोनुल्यांनो तुम्हाला मामाचा आशीर्वाद. तुमच्या परीक्षा संपल्या असतील. आता तुम्हाला उन्हाळ्याच्या सुटीचे वेध लागले असतील.
मी लहान असताना परीक्षा झाल्या की माझ्या मामाच्या गावाला जायचो. झाडांच्या गर्दीत वसलेल्या रम्य नगरीत, चिरेबंदी वाड्यात जाऊन राहायचो. तुम्हीही काही वर्षे माझ्याकडे आलात. याही वर्षी तुम्हाला आपल्या लाडक्या मामाच्या गावाला जावेसे वाटत असेल होय की नाही ? पण जरा अडचण आलीय बाळांनो.
काळजावर दगड ठेवून एक गोष्ट सांगतो. तुम्ही यंदा माझ्याकडे येऊ नका असं माझं सांगणं आहे.
यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही आपल्या लाडक्या मामाच्या घरी यायचं नाही बरं का छकुल्यांनो...

गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०१५

यादवाडच्या शिल्पाआड दडलेला शिवबांचा जाज्वल्य इतिहास....



शिवबांनी त्यांच्या सख्ख्या मेहुण्याचे डोळे काढण्याची सजा फर्मावली होती हे फार कमी लोकास ज्ञात असेल. अश्वारूढ शस्त्रसज्ज छत्रपती शिवरायांचे शिल्प वा जिजाऊ मांसाहेबासोबतचे शिल्प / चित्र आपण अनेक ठिकाणी पाहतो. मात्र शिवबा मांडी घालून बसलेले आहेत, त्यांच्या मांडीवर एक लहान मुल आहे, त्याच्याकडे ते प्रेमाने पाहत आहेत असंही एक शिल्प आहे. विशेष म्हणजे हे शिल्प शिवाजीराजे हयात असताना कोरलेलं आहे ! शिवबांनी मेहुण्यास दिलेली सजा आणि हे अनोखं शिल्प यांचा परस्पराशी संबंध आहे. या दोन्ही घटनामागे एक जाज्वल्य इतिहास आहे. शालेय क्रमिक पाठ्यपुस्तकातून जाणीवपूर्वक गाळीव व ठोकळेबाज ठाशीव इतिहासाची पाने रचत गेल्यामुळे या गोष्टी ठळकपणे समोर आल्या नाहीत.

सोमवार, १९ ऑक्टोबर, २०१५

जीवनगाण्यांच्या कवयित्री - शांता शेळके.


'काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी
मज फूल ही रुतावे हा दैवयोग आहे
सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची
चिर-दाह वेदनेचा मज शाप हाच आहे
काही करू पहातो रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेही विपरीत होत आहे
हा स्नेह वंचना की काहीच आकळेना?
आयुष्य ओघळोनी मी रिक्त-हस्त आहे..'
कवयित्री शांता शेळके यांची ही कविता म्हणजे जगण्याचा अर्थ सांगणारी एक कैफियतच आहे. मनातले भाव आणि मनोमीत व्यक्त करण्याची संधी जगात खूप कमी लोकांना मिळते. आपण म्हणू तसे फासे जीवनाच्या सारीपाटावर कधीच पडत नसतात हे जवळपास साऱ्यांना आयुष्याच्या एका वळणावर कळून चुकते. आपल्या मनातलं ओठावर येत नाही. जे घडत राहतं ते आपल्याला उमगत नाही. जरी उमगलं तरी ते आपल्याला पटत नाही. अशीच प्रत्येकाची जीवनाविषयी तक्रार असते. पण साऱ्यांच्या बाबतीत असं घडत नाही. शांताबाई लिहितात की, 'कुणाच्याही पायी काटा रुतला तर त्यामुळे साहजिकच त्याचे आक्रंदन असणार आहे, मात्र माझ्या वाट्यास काटे न येता फुले आली. असे असूनही इतरांना जसे काटे रुततात तशी मला फुले रुतली !' हा एक अजब दैवयोग आहे अशी पुस्तीही त्या जोडतात.

सोमवार, १२ ऑक्टोबर, २०१५

दिडशतकापासूनचे निर्दोष गुन्हेगार (?)



दिडशतकापासूनचे निर्दोष गुन्हेगार ( ! ) आणि आरक्षण...एक मागोवा ...

१२ ऑक्टोबर १८७१ चा तो दुर्दैवी दिवस होता... भारतात ब्रिटिश सरकारने ’क्रिमिनल ट्राइब्स अॅक्ट’ या कायद्याद्वारे देशभरातील १६१ जाती व जमातींना गुन्हेगारी जमाती ठरविले. त्यांच्यावर गुन्हेगारीचे शिक्के मारून त्यांचे आयुष्य नासवले आणि जनमाणसात त्यांची प्रतिमा कायमची मलीन केली...या सर्व १६१ जातीजमातींच्या लोकांचा अनन्वित छळ केला गेला. यात स्त्रिया, बालके आणि वृद्धदेखील अपवाद नव्हते...

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०१५

तैमुरलंग ..



तैमूरलंग अत्यंत क्रूर, कपटी व दुष्ट होता आणि केवळ अमुक एका धर्माचा द्वेष्टा होता हे सांगण्याची चढाओढ काही लोकात लागली आहे. तैमूर फक्त तेव्हढाच सीमित होता की अजून कसा होता याविषयी थोडे लिहिले जाणे क्रमप्राप्त आहे. साम्राज्याच्या रक्तपिपासू विस्ताराची भूक असणाऱ्या सम्राटास आवश्यक असणारे सर्व गुण तैमूरच्या अंगी होते. त्याच्या विषयी अधिक बारकाईने पाहण्याआधी त्याचा एक प्रसिद्ध किस्सा जाणून घेतला तर त्याचे कंगोरे कळण्यास मदत होईल.

शनिवार, ५ सप्टेंबर, २०१५

संभाजीराजे - वादग्रस्त मुद्द्यांची एक चिकित्सा ....



आपल्याकडे स्वतःच्या राजकीय, जातीय फायद्याच्या गणितानुसार इतिहासाच्या चिंधडया उडवण्याचे काम सर्रास केले जाते. छत्रपती संभाजीराजांच्याबद्दल तर तीन शतकापासून हा उद्योग सुरु आहे. त्याचीच एक चिकित्सा...

ऑक्टोबर १६७६ पासून शिवछत्रपतींचा मृत्यू झाला तोपर्यंत संभाजीराजे रायगड परिसरात आले नव्हते. असं ऐतिहासिक साधनं दर्शवतात तरीही मल्हार रामरावाची बखर, इंग्रजी वार्ताहराच्या नोंदी आणि आदिलशाही इतिहासातील बुसातिन-उस-सुलातिन या तीन ऐतिहासिक साधनानुसार संभाजीराजांनी रायगडावर एका महिलेवर बलात्कार केला असे सांगितलं जातं आणि आपण त्यावर विश्वास ठेवतो !

शनिवार, २९ ऑगस्ट, २०१५

रेड लाईट डायरीज - कोरं पत्र..



तू कुठे आहेस मला नेमकं ठाऊक नाही,
तुझ्याकडे पोस्टमन येतो का याचीही माहिती नाही.
पत्र आलंच तुझ्या नावाचे तरी ते तुला पोहोच होते का तेही ज्ञात नाही.
मागच्या दोन दशकात खरंच तुला कुणाचं पत्र आलं का हे तरी कसं विचारू ?
तुझं नाव तेच आहे की, शहर बदलल्यावर नावही बदलते ?
तू आता कोणती भाषा बोलतेस, पैशाची तर नक्कीच नाही !
तुला पत्र पाठवलं तर ते तुझ्याच जीवावर तर बेतणार नाही ना ?
तसं मी तुला खूप खूप शोधलंय पण तू पुन्हा एकदाही दिसली नाहीस...

गुरुवार, १३ ऑगस्ट, २०१५

क्रांतिकारी भीमगीतांचे रचेते – वामनदादा कर्डक


आंबेडकरी चळवळीतला माणूस वा सर्वसामान्य माणूस असो ज्याचे बाबासाहेबांवर अपार प्रेम, निस्सीम श्रद्धा आहे अशा मराठी माणसाला महाकवी वामनदादा कर्डक यांचे नाव माहिती नाही असे होत नाही. याचे कारण वामनदादांनी लिहिलेली अवीट गोडीची आवेशकारक भीमगीते आणि आंबेडकरी चळवळीची गीते ! वामनदादा कर्डर्कांची भीमगीते आंबेडकर जयंतीचा अविभाज्य घटक झालीत. ही गीते सामान्य माणसाच्या मनाला भावलीत. नुकतेच मिसरूड फुटलेल्या मुलांपासून ते संघर्षमय जीवनाचा अखेरचा काळ व्यतित करणारे वृद्ध असोत, सर्वांना ही गाणी तोंडपाठ आहेत. वामनदादांनी लिहिलेल्या गाण्यात असे कोणते रसायन आहे की ज्याने माणसाचे रुपांतर भीमसैनिकात होते हे पाहण्यासाठी त्यांच्या गीतांवरून नुसती नजर फिरवली तरी ध्यानी येते की ही लोकांची बोली आहे, हा लोकांचा आवाज आहे, हा लोकांच्या डोळ्यातला तप्त अंगार आहे, हा निळ्या क्रांतीचा एल्गार आहे, हा जल्लोषही आहे अन वेदनेचा हुंकारही आहे, हा मनामनात दफन केलेल्या उपेक्षेचा आक्रोश आहे, हा धगधगत्या अग्नीकुंडाचा निखारा आहे आणि हा आंबेडकरी जनतेचा बुलंद नारा आहे !

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५

हिंदुस्थानच्या अखेरच्या बादशहाची दर्दभरी दास्तान .....



बाबरच्या रूपाने मुघल ज्या क्षणी हिंदुस्थानात दाखल झाले त्या क्षणापासून त्यांनी ह्या भूमीकडे केवळ लुटमार, साम्राज्यविस्तार व अय्याशीच्या हेतूने पाहिले. त्यांच्यातल्या एकाही बादशहाने ह्या भूमीला आपले सरजमीन-ए-वतन मानले नाही की ह्या मातीचे त्यांना ऋण वाटले नाही. पण ह्या सर्व मुघल बादशहांना अपवाद राहिला तो हिंदुस्थानचा अखेरचा बादशहा, बहादूरशहा जफर. आधीच्या सम्राटांनी हिंदुस्थानची लयलूट केली तर याचे प्राणपाखरू ह्या भूमीसाठी रुंजी घालत निशब्दतेने भयाण अवस्थेत मरून पडले. ज्या मुघलांनी हिंदुस्थानला कधी आपला वतनमुलुख मानला नाही त्यांचा अखेरचा शिलेदार मात्र ह्या भूमीत दफन केले जावे म्हणून तडफडत राहिला ! किती हा दैवदुर्विलास !

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०१५

छायाचित्रकाराची अनोखी दास्तान ....केविन कार्टर !



संवेदनशील व्यक्तीने काळजाला हात घालणारी एखादी कलाकृती बनवली आणि त्यातून त्याच्या मनात अपराधीत्व दाटून आले तर त्याच्या मनातील भावनांचा कडेलोट होतो. अशाच एका सहृदयी व्यक्तीबद्दल, केविन कार्टरबद्दल जेंव्हा कधी विचार करतो तेंव्हा डोळ्यात नकळत पाणी येतेच....

छायाचित्रकाराच्या मनात भावनांचे कल्लोळ दाटतील अशा काही क्षणांचे त्याला साक्षीदार व्हावे लागते अन त्यातून जन्माला येते एक अप्रतिम छायाचित्र. त्यात कधी दुःख असते तर कधीवेदना, राग, आक्रोश, शृंगार, प्रेम, आनंद, द्वेष, मोह अशा अगणित भावनांचे हुंकार त्यात व्यक्त होतात. छायाचित्रकारासाठी त्याच्या आयुष्यातले सर्वोच्च ध्येय पुलीत्झर पुरस्कार ठरावा. या पुरस्काराच्या वेडाने झपाटलेले छायाचित्रकार जगाच्या पाठीवर कुठेही अन कसल्याही परिस्थितीमध्ये जातात.ताजी उदाहरणे म्हणजे सिरीयाचे गृहयुद्ध असो वा इबोलाचा आउटब्रेक असो आपल्याला खरी आणि नेमकी परिस्थिती तंतोतंत माहिती छायाचित्रकारच पोहोचवतात.त्यासाठी प्रसंगी ते जीवसुद्धा धोक्यात घालतात.....